Home Blog Page 418

आमदार समिर कुणावार यांची मातोश्री स्व. आशाताई कुणावार अभ्यासिकेस सदिच्छा भेट

0

 

हिंगणघाट
दि.१६ आगस्ट २०२१

शहरातील मातोश्री आशाताई कुणावार अभ्यासिका येथे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भेट देऊन पाहणी केली.
अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना काही समस्या किंवा अडचणी असल्यास त्यांनी कोणत्याही क्षणी संपर्क करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी हिंगणघाट तालुक्याच्या नव्यानेच रूजू झालेल्या उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोणाले, तहसीलदार श्रीराम मुंदड़ा इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
नुकत्याच २१ फेब्रूवारी रोजी स्व.आशाताई कुणावार यांचे स्मृतीपर या अभ्यासिकेचे स्थानिक यादगार व्यायाम शाळेच्या परिसरात निर्मित समाज भवनात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले होते. शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील गरीब,होतकरु विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगामार्फत किंवा शासनाचेवतीने शासकीय, निमशासकीय नौकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तसेच इतर नोकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षाची तयारी करण्यासाठी,त्याचा अभ्यास करण्यासाठी विनामूल्य पुस्तके तसेच शांततामय परिसर उपलब्ध व्हावा,असा आ.समीर कुणावार यांचा हेतु होता,या हेतुने प्रेरित होऊन त्यांनी पुढाकार घेऊन या अभ्यासिकेची निर्मिती केली होती,अवघ्या सहा महिन्याचे कालावधीतच या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करीत शासकीय नौकरीत प्रवेशसुद्धा मिळविला . आमदार समीर कुणावार, श्री. सुनिल फुटाणे सर, अ‍ॅड. सुशील नायडू सर व इतर मान्यवरांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी दिसुन आले.
आज सदिच्छा भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले ,तहसीलदार श्रीराम मुंदड़ा यांनी अभ्यासिकेतील उपस्थित विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
आमदार समीर कुणावार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

शास्त्री वार्ड येथे 75 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

0

 

हिंगणघाट शास्त्री वार्ड येथे फिटनेस क्लब व चावडी स्वयं सहाय्यता बचत गट बालाजी दाल मिल च्या मागे
15 ऑगस्ट निमित्त देशभक्ती गीते, कारगिल युद्ध सर्वधर्मसमभाव यावर लघु नाटक, मनोरंजनात्मक,कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमातून आजच्या युवा पिढीला आपल्या देशातील सैनिकांनी केलेले बलिदान व देशासाठी सर्वधर्मसमभाव ही भावना जागृत करणे हे लघुनाट्य च्या माध्यमातून सादर करण्यात आले संतोष करपे माजी सैनिक यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व मोलाचे मार्गदर्शन केले . आजच्या युवा पिढीने जाती-धर्माचे राजकारण न करता सर्व धर्म समभाव याच गोष्टीचा विचार केला पाहिजे आपले सैनिक देशासाठी, आपल्यासाठी देशाचे रक्षण करतात व आपण धर्माच्या नावावर एक मेकाचे रक्त सांडवतो अशा कार्यक्रमा चे आयोजन करणे आज अत्यंत आवश्यक आहे .
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन चावडी बचत गटाचे अध्यक्ष राजू धात्रक, उपाध्यक्ष सुधीर सावकार,, सचिव नीलकंठ आष्टनकर, सदस्य विलास खडसे, प्रदीप सायंकार, फिटनेस क्लब चे वेदांत आष्टनकर सुमित सावकार , यश खडके, प्रदीप शाहू, बालू कोरटकर , यांनी केले हा कार्यक्रम वार्डातील लोकांनी उपस्थित राहुल 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला .
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

विरावाली ता. यावल या गावातिल देश सेवेत कार्यरत/माजी सैनिक आणि त्याचे परिवार सदस्यना स्वातंत्र्यदिना निमित्त १४ आणि १५ अगस्त २०२१ ला मोफत सुविधा प्रदान केली आहे.

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

विरावली गावातिल नाभिक समाजाचे श्री दिलीप शामराव फूलपगारे, श्री सतीश यादव फुलपगारे, श्री दिनेश पुंडलिक फूलपगारे, राहुल दिलीप फूलपगारे, विशाल विलास फूलपगारे आणि फुलपगारे परिवार यांचे कडून त्यांचे गावातिल सैनिक याना स्वातंत्र्यदिना निमित्त १४ आणि १५ अगस्त २०२१ ला मोफत दाढ़ी कटिंग ची सुविधा प्रदान करने बाबत निर्णय घेउन तशी सैनिक/परीवाराना सुविधा प्रदान केली गेली. या त्याचे महान कार्य बद्दल वीरावली गावचे नाभिक सामाजाचे सारे गाव व पारिसारातिल नागरिक यांचे कडून स्वागत व कौतुक केले जात आहे ज्यात गावातील सैनिक प्रेमी नागरिक, तथा माजी सैनिक मुकेश राजपुत सीआरपीएफ, व सारे सेवारत सैनिक ज्यात बीएसएफ सैनिक महेंद्र पुंडलिक पाटिल, प्रदीप बाळु अड़कमोल CRPF, अमोल बाळु अड़कमोल CISF, प्रशांत मिलिंद अड़कमोल व संकेत संजय अड़कमोल, Army सारे विरावली
यांनी हया निर्णया चे स्वागत करून सैनिक आणि पारिवार यांचे बद्दल वीरावली गावातिल नाभिक समाज यांचे या प्रेमाचे मनपुर्वक कृतनता व आभार व्यक्त केले आहे ।

तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायत कार्यालयात ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत सदस्य विमल बाई चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

0

 

यावल, तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

आज बोराडे ता यावल. जि. जळगाव येथे ७५व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बोराळे ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करतांना गावाचे ग्रामपंचायत सदस्य विमलबाई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले सरपंच वंदना चौधरी उपसरपंच उज्जैन सिंग राजपूत मोना राजपूत सरोज बाई राजपूत शीतल राजपूत रवींद्र वानखेडे पोलीस पाटील आशा वर्कर सुनयना राजपूत माजी सरपंच नितीन राजपूत तमन्ना मुक्त अध्यक्ष कैलास सिंग राजपूत खिलचंद चौधरी भरत राजपूत युवा सेना अध्यक्ष अनिल वानखेडे किशोर वानखेडे संदीप वानखेडे रोजगार सेवक जितेंद्र पाटील सुमित राजपूत तुषार राजपूत किसन नावे सूत्रसंचालक प्रदीप वानखेडे यांनी केले तरी आभार व्यक्त संजय सिंग राजपूत यांनी मानले आहे

स्वातंत्र्याच्या ७५ व्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या विविध घोषणा ; ७५ वंदे भारत ट्रेन, देशाच्या विकासासाठी १०० लाख कोटींची गतीशक्ती योजना; महिलांसाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म योजना ; २०२४ पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिकतांदूळ ; नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची स्थापना ; मुलींसाठी सैनिकी शाळा खुल्या — मोहन चौकेकर

0

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडवून आज अनेक घोषणा केल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ७५ आठवड्यांमध्ये ७५ वंदे भारत ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. भारताची विकास यात्रा सुरू करण्याची वेळ आली आहे. या विकास यात्रेची आता सुरुवात करून, पुढील २५ वर्षांचा प्रवास हा नवीन भारताच्या निर्मितीचा अमृत काळ आहे. या अमृत काळात आमच्या संकल्पांची पूर्तता आपल्याला स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपर्यंत घेऊन जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात कोणत्या नवीन घोषणा केल्या ते पाहूया…

*मुलींसाठी सैनिकी शाळांची कवाडे उघडणार*
सर्व सैनिका शाळांची कवाडं आता मुलींसाठीही उघण्यात येतील. देशात सध्या ३३ सैनिकी शाळा आहेत. अडीच वर्षांपूर्वी मिझोराममध्ये मुलींना सैनिका शाळेत प्रवेश देण्याचा प्रयोग केला गेला. आता देशातील सर्व सैनिकी शाळांची कवाडं मुलांसाठी खुली केली जातील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

*स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ७५ वंदे भारत ट्रेन*
देश आज स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. आता ७५ आठवड्यांच्या आत ७५ वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. या ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतील. देशात ज्या वेगाने नवीन विमानतळे बांधली जात आहेत आणि उडाण योजना दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडत आहे, ती देखील अभूतपूर्व आहे, असं ते म्हणाले.

*पंतप्रधान गतीशक्ती योजना सुरू करणार*
पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. पंतप्रधान गतीशक्ती योजना सुरू करण्यात येईल. १०० लाख कोटी रुपयांहून अधिकच्या योजनांमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील. पंतप्रधान गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन हा औद्योगिक उलाढालीला चालना देणं आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणारा असेल.

*नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन*
ग्रीन हायड्रोजनचे जागतिक केंद्र आणि सर्वात मोठा निर्यातदार बनण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची स्थापना करण्याची घोषणा पीएम मोदींनी केली. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी देश ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी झाला पाहिजे, असा संकल्प पंतप्रधान मोदींनी सोडला. देशाची प्रगती आणि स्वावलंबी होण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणं गरजेचं आहे. देश अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने वाटचाल करत आहे आणि या क्षेत्रातील ऊर्जा क्षमता एक लाख मेगावॅटच्या वर गेली आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. देशाने २०२२ पर्यंत १,७५,००० मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे, असं मोदींनी सांगितलं.

*महिलांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म*
देशात ८ कोटीहून अधिक गावातील महिला बचत गटांशी जुळल्या आहेत आणि त्या एकहून अधिक उत्पादनांची निर्मती करतात. त्यांच्या उत्पादनांना देशात आणि विदेशात मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकार आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल, अशी घोषणा पीएम मोदींनी केली.

*२०२४ पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिक तांदूळ*
सरकार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत मध्यान्ह भोजन यासारख्या विविध योजनांद्वारे गरिबांना वितरित करण्यात येणारा तांदूळ पौष्टिक ( फोर्टिफाइड ) केला जाईल. सरकार आपल्या विविध योजनांतर्गत जे तांदूळ गरीबांना देते, ते आता पौष्टिक तांदूळ देईल. रेशन दुकानातून दिला जाणारा तांदूळ असो की मध्यान्ह भोजणासाठी दिला जाणारा तांदूळ, २०२४ पर्यंत प्रत्येक योजनेद्वारे दिला जाणारा तांदूळ हा पौष्टिक केला जाईल.

*खेळात तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता आणण्यासाठी प्रयत्न*
भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली. तसंच त्यांनी नव्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचं मोठं काम केलं. खेळांमध्ये प्रतिभा, तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता आणण्यासाठी सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र आणि व्यापक करावी लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ✍️ *मोहन चौकेकर*

अनोळखी व्यक्ती बुरकुणी शिवारात शेतात मृत अवस्थेत

0

 

हिंगणघाट गणपत हिरामण चापले रा.बुरकुणी यांनी आज 15 ऑगस्टला पोलीस स्टेशनला माहिती दिली की बुरकुणी शिवारातील शेतात एक अनोळखी अंदाजे 60 ते 65 वर्षे पुरुषाचा मृत अवस्थेत पडून आहे. त्यावरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे मर्ग. क्र. 80/ 2021 कलम 174 नोंद करून सदर अनोळखी मृतक इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु ओळख पटली नाही . मृतकाचे प्रेत सध्या उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील
शवविच्छेदन शीतगृहात ठेवण्यात आले आहे . याचे वर्णन उंची 05 फूट 07 इंच रंग सावळा बांधा सडपातळ अंगात पांढुरक्या रंगाचे त्यावर पिवळसर उभ्या रेषा असलेले शर्ट व पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला असून त्याच्याजवळ एक पिवळसर रंगाची तंबाखू चुन्याची प्लास्टिक डब्बी मिळून आली सदर अनोळखी मृतकांची ओळख पटल्यास हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला यांच्याशी संपर्क करावा . मोबाईल क्र.9765864264 , हिंगणघाट पोलीस स्टेशन नं.07153 – 244033
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

बेवारस जखमी उंटाला मिळवुन दिला हक्काचा निवारा ; निसर्ग साथी फाऊंडेशन हिंगणघाट चा पुढाकार

0

हिंगणघाट शहरातील वणा नदी तीरावर बऱ्याच दिवसांपासून एक जखमी उंट फिरत असल्याचे विट भट्टीवर काम करणाऱ्या लोकांचा लक्षात आले ,त्यांनी त्या उंटाचे निरीक्षण केले तर त्याला मोठी जखम होती . ही बाब त्यांनी निसर्ग साथी फाउंडेशन चे गुणवंत ठाकरे यांना सांगितली , आणि लगेच निसर्ग साथी ची टीम उंटा ला पाहण्याकरिता गेली . प्रकाश धानोरकर यांचे शेता जवळ उंटाला पकडून त्याचे निरीक्षण केले .त्याचा शरीरावर अनेक जखमा होत्या उपचार न मिळाल्यामुळे त्या चिघळल्या होत्या जखमांमध्ये जंतु पडले होतेत्याला दीर्घ उपचारा ची गरज आहे हे ओळखून निसर्ग साथीचे शिलेदार राकेश झाडे ,परिक्षीत ढगे , यांनी त्याचेवर प्रथमोपचार केले ,खायला दिले . निसर्ग साथी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडू यांच्याशी चर्चा करून त्याला प्यार फाउंडेशन ऐनीमल रेस्क्यू सेंटर मध्ये दीर्घ उपचारा करिता पाठवायच ठरवीले .उंटाला रात्री ११ वाजता प्राणी रुग्णवहिकेतून रेस्क्यु सेंटर ला नेण्यात आले .श्री देवेन प्यार फाउंडेशन त्याला घेण्यासाठी आले होते .निसर्ग साथी फाउंडेशन जखमी प्राण्यांवर उपचारा करिता नेहमी प्रयत्नशील असते ,कुत्रे,गाय,मोर,उंट ,गाढव, माकड यांचा उपचारा करिता प्रयत्न केला त्यामुळे सर्वत्र निसर्ग साथी फाउंडेशन चे कौतुक होत आहे .
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

नांदगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

0

 

तालुका प्रतिनिधी- सचिन पगारे नांदगाव

नांदगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.रानभाज्यांचे आरोग्य विषयक महत्त्व व माहिती ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना मिळावी व विक्री व्यवस्था निर्माण करून शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी नांदगाव येथे रविवार दिनांक 15/08/2021रोजी ठीक 10.00वाजता तालुका कृषी अधिकारी नांदगावच्या आवारात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर महोत्सवाचे उद्घाटन माननीय आमदार सुहास आण्णा कांदे साहेब करणार आहेत.मानवी आरोग्यासाठी सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, रानातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिक रीत्या उगवल्या जाणारया रान पालेभाज्या,कंद व फळभाज्या यामध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्न घटक व औषधी गुणधर्म असतात सदर रानभाज्या या नैसर्गिक रीत्या येत असुन त्यावर रासायनिक किटकनाशके व बुरशीनाशके फवारणी करण्यात येत नाही, त्यामुळे या संपूर्ण नैसर्गिक असल्याने शरीरासाठी अतीशय उपयोगी आहेत नांदगाव तालुक्यातुन जातेगावचे शेतकरी श्री.पोपट राऊत तसेच वेहळगाव येथील शेतकरी श्री.महेंद्र चकोर या शेतकऱ्यांनी करटोली, तोंडली,आर्वी या पिकांची लागवड केली आहे.श्री.महेंद्र चकोर यांनी एक एकर क्षेत्रामध्ये ९०क्विटल आर्वी ही कंद भाजी उत्पादन केली असुन इतर शेतकरी देखील आळु,कुर्डु, गवती चहा,शेवगा,पाथरी, तांदुळजा,काठेमाठ, अंबाडी व गुळवेल इत्यादी औषधी वनस्पती व पालेभाज्या, फळभाज्या लागवड करीत आहे.
तरी नांदगाव शहरातील शहरवासी व ग्रामीण भागातील शेतकरी बंधू यांनी उद्या रविवारी दिनांक १५/०८/२०२१ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.

मार्मिकमुळे एक संघटना उभी राहिली, जिचं नाव शिवसेना”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण! – मोहन चौकेकर

0

 

मार्मिक साप्ताहिकाच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी ६ दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचं मार्मिक हे साप्ताहिक अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरायचं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर देखील मार्मिकनं आपलं काम तसंच कायम ठेवलं असून त्याच मार्मिकचा आज वर्धापन दिन सोहळा पार पडला. करोना काळात निर्बंध आणि सतर्कता म्हणून हा सोहळा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आला. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाही झाले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मार्मिकविषयी आणि खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
मार्मिकचं प्रारंभीचं स्वरूप विरंगुळ्याचं!
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मार्मिक साप्ताहिकाचं सुरुवातीचं स्वरुप विरंगुळ्याचं होतं असं सांगितलं. “सतत लढा सुरू असताना मराठी माणसाच्या आयुष्यात थोडा विरंगुळ्याचा क्षण आला पाहिजे. दुर्घटना असली, की मोठी हेडलाईन असते. वाईट घटनांची बातमी मोठी असते. तेच तेच बघून त्यातून चेतना कशी मिळणार? त्या एका विचारातून मार्मिकचा जन्म झाला. सुरुवातीला मनोरंजन करणं असं त्याचं स्वरूप नक्कीच होतं. पण मराठी माणसाच्या घरामध्ये त्याच्या हक्कांवर परप्रांतीय आक्रमण करत आहेत. मग त्या मनोरंजनाची जागा मनोव्यथा व्यक्त करणारी, अन्यायावर धारदार वार करणारी झाली. त्यातून एक चळवळ आणि पुढे संघटना निर्माण झाली. तिचं नाव शिवसेना”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“त्या वेळीही स्वत:चं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करणं हा धाडसी विचार होता. कशामुळे मार्मिकची कल्पना आली? संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आमचे काका व्यंगचित्र काढायचे. मावळा या नावाने ते व्यंगचित्र काढायचे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबई घेऊन महाराष्ट्रानं यशस्वी केला. त्यालाही आता ६१ वर्ष झाली”, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
आणीबाणीत मार्मिकवर होती बंधनं!
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी आणीबाणीच्या वेळी मार्मिकवर असलेल्या बंधनांविषयी देखील आठवण सांगितली.आणीबाणीच्या वेळी विचित्र असं बंधन मार्मिकवर होतं. मार्मिकवर बंदी नव्हती, पण मार्मिकच्या प्रेसला टाळं होतं. म्हणजे घराला कुलूप आणि बाहेर जाऊन जेवायचं. दहशतीखाली कुणी मार्मिक छापायला तयार नव्हतं, कुणी वितरक मार्मिक बाजारात आणायला तयार नसायचं. तेव्हा दिवाकर रावते अक्षरश: हातगाडीवरून मार्मिक बाजारात घेऊन जायचे. त्याच मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेसाठी सामनाला जन्म घ्यावा लागला”, असं शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले . ✍️ मोहन चौकेकर

अपंगांचा स्वयंरोजगारासाठी मंजुर केलेली जागा रद्द केल्यास अपंग बेरोजगार कायदा हातात घेणार

0

 

अपंग नेते शेख अनिस पत्रकार याचा निवासी जिल्हाधिकारी नितीन व्याहारे यांना इशारा

अमरावती :- अपंगांचा पुर्नवसन व रोजगार मिळावा म्हणून नवीन अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या कायदा अस्तित्वात आणण्यात आला . या कायद्यामध्ये अपंगांना रोजगारापासून वंचित ठेवल्यास संबंधीत विभागावर कारवाईची तरतुद असून सुध्दा महानगरपालिकेने सन २०१६ मध्ये अपंग संघटनेच्या मागण्यांवरून अपंगांना स्वयंरोजगारासाठी जागा स्थायी समितीच्या मंजूरीने ७ x ७ रस्त्याच्या कडेला असलेल्या जागा मंजूर केल्या होत्या व त्या जागेचे भाडे सुद्धा अपंगांनी भरले होते व स्वयंरोजगार सुरू केले होते . परंतु जिल्ह्यातील काही राजकीय व हप्तेखोर लोकांनी अपंगापासून जागेचे हप्ते मागण्यास सुरूवात केली होती . न दिल्यास खोट्या तक्रारी करून व महानगरपालिकेवर दबाव टाकून त्यांचे जागा रद्द करण्याचा षडयंत्र रचला असून अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा अस्तित्वात असून सुध्दा या जागा महानगरपालिकेने कशा रद्द केल्या हा विचार अपंग बेरोजगारांना निर्माण झाला असून या कायद्याचे अवहेलना महानगरपालिकेकडून होत आहे म्हणून अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या कायद्यानुसार अपंगाची दिशाभूल केल्यामुळे कलम ९ २ चे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटना , जि.अमरावती वतीने अपंग बेरोजगार कायदा हातात घेणार असून यावी सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहील असं इशारा अपंग जनता दाल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती देण्यात आला असून या वेळी मयूर मेश्राम जिल्हा अध्यक्ष , राजिक शाह , महासचिव ये उपस्थित होते