Home Blog Page 419

हिंगणघाट संत गोमाजी वार्ड येथे जुन्या वादातून चौघांनी मिळून केला एकाचा खून

0

 

हिंगणघाट — घटनेची हकीकत संत गोमाजी वार्ड येथे इरफान खान रशीद खान पठाण यांचा आरोपी हर्षल गिमेकर ,नितीन तडस ,जावेद शेख उर्फ कालू, योगेश नरड उर्फ जादू यांच्यासह जुना वाद विवाद होता तसेच दि, 13 – 8 – 2021 सायंकाळी 5 वाजता सुमारास इरफान खान रशीद खान (मृतक ) याचा हर्षल गिमेकर उर्फ भुर्‍या यांच्यासोबत वाद होऊन त्याला दोन-तीन थापड मारल्या आरोपी हा राग मनात धरून असल्याने इरफान खान रशीद खान पठाण ( मृतक ) व फिर्यादी हे रात्री 11.30 ते 12 सुमारास राणा हॉटेल येथून जेवण करून घरी परत जात असताना यातील आरोपी हर्षल गिमेकर उर्फ भुऱ्या याने संत गोमाजी वार्ड हिंगणघाट येथील हनुमान मंदिर जवळ नितीन तडस ,जावेद शेख उर्फ कालू ,योगेश नरड उर्फ जादू यांच्या सोबत बसून असता इरफान खान रशीद खान पठाण (मृतक )यास तू बहुत बडा भाई हो गया क्या ? तुने भुऱ्या को क्यू मारा ? असे म्हणून इरफान खान रशीद खान पठाण( मृतक) सोबत शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन वाद-विवाद केला . इरफान खान रशीद खान पठाण (मृतकाने )त्याच्या खिशातील चाकू काढून हर्षल गिमेकर उर्फ भुऱ्या याला डालू क्या ? असे म्हटले असता हर्षल गिमेकर उर्फ भुऱ्या हनुमान मंदिर जवळ गेला व तेथून लोखंडी पाईप घेऊन मृतक याच्या डोक्यावर मारला व नितीन तडस , जावेद शेख उर्फ कालू ,योगेश नरड उर्फ जादू यांनी चाकू सारख्या धारदार शस्त्राने व दगडाने मृतक यांना जबर मारहाण करून जीवाने ठार मारले आरोपी विरोधात कलम 302 ,504, 506, 34 भादवी सह गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

अपंगांचा स्वयंरोजगारासाठी मंजुर केलेली जागा रद्द केल्यास अपंग बेरोजगार कायदा हातात घेणार

0

 

अपंग नेते शेख अनिस पत्रकार याचा निवासी जिल्हाधिकारी नितीन व्याहारे यांना इशारा

जिल्हा प्रतिनिधी. हंसराज उके अमरावती

अमरावती :- अपंगांचा पुर्नवसन व रोजगार मिळावा म्हणून नवीन अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या कायदा अस्तित्वात आणण्यात आला . या कायद्यामध्ये अपंगांना रोजगारापासून वंचित ठेवल्यास संबंधीत विभागावर कारवाईची तरतुद असून सुध्दा महानगरपालिकेने सन २०१६ मध्ये अपंग संघटनेच्या मागण्यांवरून अपंगांना स्वयंरोजगारासाठी जागा स्थायी समितीच्या मंजूरीने ७ x ७ रस्त्याच्या कडेला असलेल्या जागा मंजूर केल्या होत्या व त्या जागेचे भाडे सुद्धा अपंगांनी भरले होते व स्वयंरोजगार सुरू केले होते . परंतु जिल्ह्यातील काही राजकीय व हप्तेखोर लोकांनी अपंगापासून जागेचे हप्ते मागण्यास सुरूवात केली होती . न दिल्यास खोट्या तक्रारी करून व महानगरपालिकेवर दबाव टाकून त्यांचे जागा रद्द करण्याचा षडयंत्र रचला असून अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा अस्तित्वात असून सुध्दा या जागा महानगरपालिकेने कशा रद्द केल्या हा विचार अपंग बेरोजगारांना निर्माण झाला असून या कायद्याचे अवहेलना महानगरपालिकेकडून होत आहे म्हणून अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या कायद्यानुसार अपंगाची दिशाभूल केल्यामुळे कलम ९ २ चे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटना , जि.अमरावती वतीने अपंग बेरोजगार कायदा हातात घेणार असून यावी सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहील असं इशारा अपंग जनता दाल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती देण्यात आला असून या वेळी मयूर मेश्राम जिल्हा अध्यक्ष , राजिक शाह , महासचिव ये उपस्थित होते

पोलिसांनवर गोळीबार करण्याऱ्या 2 बिहारी आरोपींना अटक

0

 

हिंगणघाट दि.13 ऑगस्ट
स्थानिक नंदोरी चौकात 2 अज्ञात गुंडांनी दि.11 ऑगस्ट बुधवारला रात्री पोलिस हवालदार कमलाकर धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच गुंडानी काल 12 ऑगस्ट ला गुरुवारी रात्री नजीकच्या येणोरा शिवारात पुन्हा एकदा पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली, यावेळीसुद्धा गोळीबार करणारे दोन्ही गुंड फरार होण्यात यशस्वी झाले होते परंतु पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास यापैकी एक अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला तर दुसरा आरोपी जिशान शेख उर्फ जितेंद्र गुप्ता(21) या आरोपीस शहरातील रेल्वेलाइन परिसरातून ताब्यात घेण्यात आले.हे दोन्ही आरोपी मुळचे बिहारी असून हल्ली अहेरी (गडचिरोली) येथील रहिवासी आहेत.
सुदैवाने या दोन्ही गोळीबाराचे घटनेत पोलिसांसह कुणीही जखमी झाले नाही.
बुधवारी शहरातील नंदोरी चौकातील घटनेतील पोलिस कर्मचारी थोडक्यात बचावल्यानंतर हिंगणघाट पोलिसांद्वारे या गुंडांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू असताना काल गुरुवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हिंगणघाट पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरील येनोरा शिवारात 2 अज्ञात तरुण संशयास्पद परीस्थितीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सदर गुंडांचा शोध घेत पोलिस पथक येणोरा शिवारात पोचले,येथे पोलिस उपनिरीक्षक लगड यांच्या पथकाला आरोपी फिरतांना आढळले,पोलिस पथकाचे त्यांचा पाठलाग करण्यात आला असता यावेळी या गुंडांनी पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यावेळीसुद्धा यात कोणीही जखमी झालेले नाही.प्रत्यूत्तरादाखल गुंडांनी पोलिस पथकाचे उपनिरीक्षक लगड यांनीसुद्धा आरोपिच्या दिशेने गोळी झाडली. गुंडानी दुचाकी तसेच मोबाइल तेथेच सोडून शेत शिवारातून पळ काढण्यात आरोपी यशस्वी ठरले होते.
सदर शोधमोहिम सुरु असतांना येनोरा येथील गावकऱ्यांनीसुद्धा पोलिसांना सहकार्य केले. परवा तसेच काल गुरूवारी घडलेल्या गोळीबाराचे घटनेने संपूर्ण तालुक्यातच दहशत पसरली असून पोलिसांना या गुंडाना पकड़णे आव्हानच ठरले होते.
पोलिसांनी या परिसरात काल जोरदार शोधमोहिम चालविल्यानंतर रात्रभर ही शोधमोहिम चालूच होती,सदर घटनेनंतर हा संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला,आज शुक्रवारी पहाटेच्यावेळी या दोन आरोपीपैकी एक आपले दुचाकी वाहन घेण्यासाठी घटनास्थळी पुन्हा परत येताच अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला,दुसऱ्या आरोपीलासुद्धा हिंगणघाट येथील रेल्वेस्टेशन परिसरात पकडण्यात आले. दोन वेगवेगळ्या घटनेनुसार भाहका कलम 3,25 अंतर्गत तर नंतरच्या गुन्हानुसार 307, 353 ,34 भादवी सहकलम 3, 25, 27 भाहका नुसार गुन्हा नोंद करण्यात आला
सदर कारवाई पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड , दिपेश ठाकरे,अभिषेक बागड़े,गिरधर पेंदोर,परमेश्वर आगाशे,पोहवा सादिक शेख,शेखर डोंगरे,कैलाश दाते,विवेक बंसोड़,प्रशांत भाईमारे,रवि वानखेड़े,सचिन भांलशंकर , निलेश तेलरांधे,विशाल बंगाले,सचिन घेवंदे इत्यादिसह पोलिस चमुने केली आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

माकपच्या सत्याग्रह आंदोलनाचा दणका कर्मचारी यांचेवर गुन्हा दाखल

0

 

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कर संग्रम चलन भरणा व बँक खात्यात रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेत झालेल्या अनियमितते बाबत संबंधितावर कारवाई व्हावी. या मागणीचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव अब्दुल मोहसीन यांचे नेतृत्वात. कर विभागात झालेल्या घोटाळ्याबाबत 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या रात्रीपासून सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात झाली होती. गुरुवार रोजी एस डी ओ इब्राहिम चौधरी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार सहारे साहेब व नायब तहसीलदार वासनिक साहेब यांनी सत्याग्रह आंदोलने या स्थळी भेट देऊन आंदोलनाची सांगता करण्याची विनंती केली. संबंधित रोजंदारी कर्मचारी यांच्यावर एफआयआर दाखल केली. प्रत आंदोलन करतांना उपलब्ध करून दिली. माकपच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पुढे असल्यामुळे सत्याग्रह आंदोलनाची सांगता न करता तूर्तास आम्ही आंदोलनाला स्थगिती देत आहोत व संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई न केल्यास परत उपोषण आम्ही करू असे उपविभागीय अधिकारी त्यांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आले कॉ. श्याम शिंदे तालुका सचिव यांनी सांगितले. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे, भास्कर कुंबरे, राम शिंदे, आशिष रावेकर, शहंशाह, मिलिंद चौरे, आकाश मगर, सुभाष लाड, विशाल शिंदे, सुरेश हळदे यांचेसह आंदोलनामध्ये वेळोवेळी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होत गेले.
……………………………………
लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलनाची दखल घेत धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रतापदादा अडसड यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले त्या बाबत अहवाल मांगण्यात आला.
…………………………………….
किसान सभेचे अनिल मारोटकर, दिलीप महल्ले, रामदास मते, प्रभाकर सुने, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, माजी नगराध्यक्ष संजय पोफळे, माजी नगरसेवक ओंकार ठाकरे, सुरेश राजगिरे, राष्ट्रवादी पक्षाचे साजिद भाई, हारूनभाई ठेकेदार, भाजपाचे नवल खीची, घनश्याम सारडा, भाकपचे गणेश अवझाडे, सतीश शिंदे, मनोज गावनेर, इस्राईल शह, गावातील नागरिक राजेंद्र राऊत, दादा जाधव, अशोक दैत, सुधाकर सोनोने, व तसेच पत्रकार मंडळींनी सुद्धा आंदोलनस्थळी भेट दिली व समर्थन दिले

देशातलं आत्तापर्यंतचं सर्वोत्कृष्ट मंत्रिमंडळ पंडित जवाहरलाल नेहरू यांचे…”, राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका! –मोहन चौकेकर

0

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या स्पष्ट आणि रोखठोक भूमिकेसाठी नेहमीच ओळखले जातात. त्यांच्या सर्व भूमिका या सडेतोड राहिल्या आहेत. मग ते कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करण्यापासून २०१९च्या निवडणुकांआधी त्यांच्या चुका दाखवत त्यांच्यावर टीका करणं असो. त्यामुळे राज ठाकरेंची एखाद्या विषयावरची भूमिका हा कायमच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. देशातील राजकीय परिस्थिती आणि राजकारण याविषयी भूमिका मांडताना नुकतंच राज ठाकरे यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी मत व्यक्त केलं आहे. एका चॅनल’ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी आपलं मत मांडलं आहे.

देशातील राजकारणाचा स्तर खाली गेल्याचं यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं. “राजकारणाचा स्तर फक्त मुंबईत, महाराष्ट्रात नाही तर देशभरात हा स्तर खाली गेलाय. आत्तापर्यंतची मंत्रिमंडळं बघितली, तरी हे लक्षात येईल. आत्तापर्यंत भारतातलं सर्वोत्कृष्ट मंत्रिमंडळ हे १९४७ ते ५२ साली केंद्रात होतं ते आहे. ते नेहरुंच्या काळातलं मंत्रिमंडळ होतं. जो त्या विषयातला तज्ज्ञ, तो त्या खात्याचा मंत्री. ते निवडूनही आले नव्हते. निवडणुका १९५२ साली झाल्या”, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्याचं देखील कौतुक केलं. “मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले, तेव्हा देशाचं अर्थकारण गतीने पुढे जायला लागलं. ते देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा देशाची आर्थिक प्रगती अधिक वेगाने झाली. त्यामुळे त्या त्या खात्याचा तज्ज्ञ व्यक्ती त्या खात्याचा मंत्री असावा. पण तो नुसताच हुशार असून फायदा नसून त्याचा हेतू देखील चांगला असावा”, असं राज ठाकरे म्हणाले.

हे जर नसते, तर देशात अराजक आलं असतं…

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी बोलताना देशातील कवी, साहित्यिक यांच्या कार्याचा देखील उल्लेख केला. “देशातले कवी, साहित्यिक या सगळ्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. हा देश त्यांच्यात गुंतून पडला. म्हणून जी वाट लागत गेली या देशाची त्याकडे दुर्लक्ष झालं. हे जर नसते, तर या देशात अराजक कधीच आलं असतं”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मला वाटतं की देशानं जर महाराजांचा विचार केला असता, तर बऱ्याचशा गोष्टी सुरळीत झाल्या असत्या. सुभाषचंद्र बोस जेव्हा सिंहगडावर आले, तेव्हा त्यांच्यासोबत काही कवी-साहित्यिक होते. तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांना सांगितलं की जे काही यापुढे लिहायचं असेल, ते या व्यक्तीविषयी लिहा. जितकं त्यांच्याविषयी लिहाल, तेवढं स्वातंत्र्य एक एख पाऊल जवळ येत जाईल”, असं देखील राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. ✍️ मोहन चौकेकर

नागपंचमी–मोहन चौकेकर

0

 

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘ नागपंचमी ’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते. या सर्व गोष्टींमागील इतिहास आणि शास्त्र आपण जाणून घेणार आहोत.

१. तिथी
नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो.

२. इतिहास
अ. सर्पयज्ञ करणार्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.
आ. ‘शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहातो. त्याला सहस्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती श्रीविष्णूच्या तमोगुणापासून झाली, असे म्हटले जाते. श्रीविष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेष बलराम झाला.
इ. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.
ई. पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

३ नागपूजनाचे महत्त्व
अ. ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत (१०.२९) श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो.
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् । शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं, कालियं तथा ।।
अर्थ: अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही.

४. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व
सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते.

५. नवीन वस्त्रे आणि अलंकार घालण्याचे कारण
सत्येश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात.

६. मेंदी लावण्याचे महत्त्व
नागराज सत्येश्वराच्या रूपात सत्यश्वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. ‘तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातांवर मेंदी काढते.

७. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास
पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.

८. नागपंचमी साजरी करतांना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ
अ. नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्यालहरी आकर्षित होतात.
आ. झोका खेळल्याने क्षात्रभाव आणि भक्तीभाव वाढून त्यातून सात्त्विकतेच्या लहरी मिळतात.
इ. उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते.
उ. ‘जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते, तिला शक्तीतत्त्व प्राप्त होते.
ऊ. या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे ‘भाऊ’ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते.
ए. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करून घेणे.
ऐ. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जिवाला ३६४ दिवस उपयुक्त ठरतात.

९. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना
नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते, त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी.

१०. निषेध
नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे आणि तळणे या क्रिया निषिद्ध असण्याचे कारण
कापणे, चिरणे आणि तळणे, या प्रक्रियांतून रज-तमाशी संबंधित इच्छालहरी, म्हणजेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध करणार्या लहरी वायूमंडलात ऊत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो. या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते; म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे, या कृती निषिद्ध मानल्या आहेत. ✍️ *मोहन चौकेकर*

हिंगणघाट पोलिसांवर येनोरा येथे पुन्हा एकदा गोळीबार

0

 

दि. 12 ऑगस्ट
हिंगणघाट : येथील नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी काल रात्री पोलिस जमादार श्री धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता.सुदैवाने या गोळीबारात ते थोडक्यात बचावले. त्यानंतर पोलिसांद्वारे या गुंडांची शोध मोहीम सुरू असताना आज 12 ऑगस्ट ला रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास हिंगणघाट पासून चार किलोमीटर अंतरावरील येनोरा या गावात दोन अज्ञात तरुण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस ,या गुंडांच्या शोधार्थ येणोरा गावात आले पोलिस दिसतात या गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नेम चुकल्याने यात कोणीही जखमी झालेले नाही. गुंडांनी दुचाकी तेथेच सोडून रस्त्याकडेला शेत शिवारातून पळ काढला.दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पळाले. 30 पोलिसांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले असून गावकऱ्यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविली जात आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन, अधिकाऱ्यांची भंबेरी, एकास अटक..! –मोहन चौकेकर

0

 

 

मंत्रालयातील दूरध्वनी बुधवारी (ता.11) रात्री खणाणला. समोरुन साक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज ऐकू येत होता. “हॅलो, सिल्व्हर ओकवरुन शरद पवार बोलतोय.. चाकणमधील जमीन प्रकरण मिटवा..” असे फोनवर सांगण्यात आले. हुबेहुब शरद पवार यांचाच आवाज असल्याने अधिकारीही काही क्षण गोंधळले.

मात्र, मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या काॅलची शहानिशा करण्यासाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वरच कॉल केला नि सगळा प्रकार समोर आला. कोणीतरी पवार यांच्या नावाने फेक कॉल केल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गावदेवी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हे प्रकरण गंभीर असल्याने ते गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.

पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने पुण्यातील जेऊर येथून एकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण आहे, त्याने कुणासाठी पवारांच्या आवाजात थेट मंत्रालयात कॉल केला होता, यासंदर्भात काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.

दरम्यान, शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे मंत्रालयात त्यांच्या नावे फोन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनीही या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ✍️ मोहन चौकेकर

दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या – मोहन चौकेकर

0

 

1. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर, टास्क फोर्सच्या शिफारसीनंतर राज्य सरकारचा निर्णय, अधिकृत आदेशाची प्रतीक्षा ; शाळा सुरू करण्याच्या निर्णयात सरकारचा सावळा गोंधळ

2. मुंबई-पुण्यातलं ट्रॅफिक 50 टक्के कमी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन ; सध्याच्या कामगिरीवर समाधानी नाही, प्रतिदिन 100 किमीचा महामार्ग बांधण्याचं माझं लक्ष्य, नितीन गडकरी यांचा विश्वास

3. राज्यसभेतील कालच्या अभूतपूर्व गोंधळावरुन राजकीय महाभारत, संसद भवन परिसरात गोंधळाचा निषेध

4. काँग्रेसविरोधात ट्विटरचा कारवाईचा सपाटा; राहुल गांधी यांच्यानंतर पक्षाचे अधिकृत अकाऊंट बंद ; केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप या नेत्यांचेही ट्विटर हँडल ट्विटरकडून बंद

5. राज्यातल्या समान विकासासाठी ‘नदी जोडो’ प्रकल्पावर भर देणार, माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं प्रतिपादन

6. महाविद्यालयीन तरुणांसाठी जिल्हा स्तरावर 30 टक्के लस राखीव ठेवावी, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा प्रस्ताव, महाविद्यालयीन फी संदर्भातही विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार

7. हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील तळीयेची पुनरावृत्ती, प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

8. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद ; राज्यात बुधवारी 5560 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर रिकव्हरी रेट 96.82 टक्के

9. अमरावतीच्या पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणाऱ्या पोलिसाचं निलंबन रद्द, परिसरात लागले शुभेच्छांचे बॅनर

10. भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, पावसामुळे खेळ थांबला, भारताची धावसंख्या 46/0, सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के, दिग्गज खेळाडू बाहेर ✍️ मोहन चौकेकर

वृत्तपत्रांची थकीत जाहिरात बिलं त्वरित चुकती करावीत ; एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी –मोहन चौकेकर

0

 

मुंबई :राज्यातील छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रात प़सिध्द झालेल्या सरकारी जाहिरातींची कोट्यवधींची थकबाकी सरकारकडून येणे बाकी आहे ही रक्कम सरकारने त्वरित चुकती करावी अशी मागणी मराठी परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे..
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील वृत्तपत्र व्यवसाय मोडकळीस आलेला आहे.. सर्वच वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत सापडलेली असल्याने त्यांच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.. सरकार वृत्तपत्रे आणि पत्रकारांसाठी कोणताच दिलासा देताना दिसत नाहीत.. उलट वृत्तपत्रातून प़सिध्द झालेल्या जाहिरातींची बिलं देखील दिलं जात नसल्याने संकट अधिकच उग्र झालं आहे..युतीच्या काळात विद्यमान अर्थमंत्री अजित पवार यांनी वृत्तपत्रांची बिलं त्वरित द्यावीत अशी मागणी विधान सभेत केली होती.. म्हणजे त्यांना विषयाचे गांभीर्य माहिती आहे.. आज अजित पवार स्वतः अर्थमंत्री असताना देखील बिलं दिली जात नसल्याबद्दल देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.. महाआघाडी सरकारने वृत्तपत्रांचा अधिक अंत न पाहता तातडीने वृत्तपत्रांची थकित बिलं चुकती करावीत अशी मागणी देशमुख यांनी केली आहे..
सरकारकडे वारंवार अर्ज, विनंत्या करून देखील सरकार पाच पाच वर्षे बिलं देत नसल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हयातील वृत्तपत्र मालक स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उषोषण करीत आहेत.. मराठी पत्रकार परिषदेने या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून स्वतः एस.एम.देशमुख काही वेळ या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या प़सिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.. पत्रकावर विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत…बीड जिल्हयातील वृत्तपत्रांची जवळपास दीड कोटींची थकबाकी सरकारकडून येणे आहे.. यातील काही बिलं तर २००० पासून प़लंबित आहेत.✍️ मोहन चौकेकर