Home Blog Page 420

यावल येथील कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिनसाजरा

0

 

यावल( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात *मराठी विभाग, विद्यार्थी विकास विभाग व आय. क्यू. ए. सी.* यांच्या संयुक्त विद्यमाने *विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त* व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषवले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. एस. आर .गायकवाड यांनी नामविस्तार दिन साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सदर कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .उपप्राचार्य प्रा. एम .डी . खैरनार यांनी विचार व्यक्त केले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार करताना कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी विरोध दर्शविला नाही. सर्वांनी एक मताने निरक्षर असूनही काव्य प्रांतात अनमोल कर्तुत्व सिद्ध करणाऱ्या जातिवंत शेतकरी असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. प्रा. प्रवीण पाटील यांनी बहिणाबाईंच्या काव्यावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रतिपादन केले की, बहिणाबाईंच्या प्रत्येक कवितेत जीवन संदेश आहे. त्या दैववादी नसून कर्मवादी होत्या. त्यांच्या कवितेतून निसर्ग, मानव समाज, कृषी क्षेत्र व सण उत्सव यांचे उत्कट चित्रण येते .विशेष म्हणजे त्यांच्या कविता बोलीभाषेमध्ये असून लयबद्ध आहेत.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संध्या सोनवणे यांनी बहिणाबाईंच्या कवितेतील चिंतनशीलता , सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भावमयता, आशय घनता ही साहित्यिक वैशिष्ट्ये स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले. आभार डॉ. एस. पी . कापडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा .संजय पाटील, डॉ. पी. व्ही पावरा, डॉ. एच. जी .भंगाळे, मिलिंद बोरघडे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावल विस्तारीत वसाहतीच्या श्रीस्वामी केन्द्र आवारातील बाल उद्यानाचे काम अतुल पाटीलांच्या प्रयत्नांनी पुर्णत्वास

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहरातील विस्तारीत क्षेत्रातील वसाहती मधील फालकनगरच्या श्री स्वामी समर्थ केन्द्रच्या आवारात सुन्दर व भव्य असा बागीच्याचे कार्य हे पुर्णत्वास आले असुन, याबागीच्या ( उद्याना ) चे कार्यापुर्ण झाल्या मुळे या क्षेत्राच्या नागरीकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी उद्यानाच्या कामास भेट दिली व उद्यानाच्या कामाबाबतची सविस्तर माहीती देतांना प्रस्तुत प्रतिनिधी बोलतांना सांगीतले की मागील अनेक दिवसांपासुन शहराच्या विस्तारीत वसाहतीमध्ये फालक नगर क्षेत्रातील श्री स्वामी समर्थ केन्द्रच्या आवारात लहान चिमूकल्या बालकांसाठी यावल नगर परिषदच्या माध्यमातुन ४५ लाख रुपयांच्या वेशिष्टपुर्ण निधीतुन फालक नगर वस्तीच्या सुन्दरते अधिकभर टाकणाऱ्या आकर्षक अशा उद्यानाचे कार्य हे पुर्णत्वाकडे गेले असुन , या उद्यानात विविध प्रकारची लहान चिमकुल्या बाळांसाठी अत्याधुनिक खेळणे, सहज खेळतांना व्यायाम करता येईल अशी यंत्रे या सुन्दर व आकर्षक उद्यानात लावण्यात आली आहे . या परिसरातील नागरीकांनी मागील काही दिवसापुर्वी या ठीकाणी उद्यान निर्माण व्हावे अशी मागणी नागरीकांनी केली होती या मागणीचा पाठपुरावा माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांच्या प्रयत्नांनी हे शक्य झाल्याने नागरीकांनी पाटील यांचे आभार मानले.

परसाडे या आदीवासी वस्तीवर सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नसीमा तडवी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत किशोरवयीन ( ११ ते १९ वर्ष वयोगटातील ) मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून ग्रामीण भागात गावागावात जाऊन विशेष मार्गदर्शनपर शिबिर घेऊन एक सुत्य असा उपक्रम राबवित आहेत.परसाडे या गावात कोविड१९च्या नियमांचे पालन करून शिबीर घेण्यात आले.
किशोरवयीन वयोगटातील मुला-मुली मध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या दरम्यान त्यांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होत असतात. परंतु आपल्या समाजात लैंगिक ह्या विषयावर मोकळेपणाने बोललेच जात नाही. पालक व शिक्षक ही ह्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसून येत नाही. व त्यांच्या मनातील प्रश्न व शंकाचे समाधान होत नाही. परिणामी लैंगिक विषयावर असलेला गैरसमजुती वाढीस लागून त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे तरुण असतील. त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे निरोगी व सशक्त असायला हवे. म्हणून किशोरवयीन वयोगटातील मुला-मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून डॉ.नसीमा तडवी गावागावात जाऊन किशोरवयीन मुलींसाठी हा उपक्रम राबवित आहेत.परसाडे येथे गावात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शिबिरास मोठ्या संख्येने आदिवासी मुलीं सहभागी झाल्या होत्या. डॉ. नसीमा तडवी यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी विषयी समस्या आदी विषयाबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. व मुलींच्या शंका व समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले. तर काही मुलींसोबत त्यांच्या आई (माता) सुद्धा आलेल्या होत्या त्यांनीही मुलींच्या समस्या सांगितल्या त्यांच्या ही शंका व समस्यांचे निराकरण डॉ. तडवी यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व किशोरवयीन मुलींची मोफत रक्त (H.B.) तपासणी करण्यात आली. व आवश्यकतेनुसार सर्वांना लोह आणि कॅल्शियम ची मोफत औषधी देण्यात आली. तसेच डॉ. तडवी यांच्याकडून किशोरवयीन मुलींसाठी नाश्ता व्यवस्थाही करण्यात आली होती. कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल माता व किशोरवयीन मुलींनी डॉ. तडवी यांचे आभार व्यक्त केले.डॉ. नसीमा तडवी या नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कामे करीत असतात. कोरोना च्या दुसऱ्या लाटे च्या काळात सर्वसामान्य जनतेला लॉकडाउन चा फटका बसलेला होता. या परिस्थितीत डॉ. नसिमा तडवी यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले लसुन बर्डी या आदिवासी पाड्यात गरीब व गरजू आदिवासी बांधवांना (कुटुंबांना) जीवनावश्यक अशा किराणा किटचे वाटप केले होते. तर काही दिवसापूर्वीच त्यांनी लोहारा येथील मज्जितला इन्वर्टर भेट दिला होता. त्यांच्या या अशा सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आरोग्य सेविका मेहमूदा तडवी , गटप्रवर्तक सरला तडवी,आरोग्यसेवक भुषण पाटीसंजय तडवी, अंगणवाडी सेविका संगीता तडवी आशासेविका,हिराबाई तडवी,फरीदा तडवी,समीर तडवी,सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन व आदींचे सहकार्य लाभले

हिंगणघाट नगरपालिका कर्मचारी चा जलशुद्धीकरण टाकी मध्ये बुडून मृत्यू

0

 

हिंगणघाट स्थानिक नगरपालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्रातील फिल्टर टाकीच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. राष्ट्रपाल ठमके वय 57 हे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून आज सकाळी ते जल शुद्धीकरण केंद्रात ड्युटीवर होते. यावेळी नगरपालिकेचे अन्य दोन कर्मचारी जलशुद्धीकरण केंद्राच्या समोरील भागात काम करत होते. ते टँकजवळ गेले असता राष्ट्रपाल ठमके यांची चप्पल मोबाईल त्यांना टँक वर ठेवून असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शोध घेतला असता ठमके हे टाक्यात मृतावस्थेत आढळून आले. घटनास्थळी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी ,मुख्याधिकारी अनिल जगताप तसेच पाणीपुरवठा अभियंता दिनेश तपासे यांनी भेट दिली.पोलिसांनी या मृत्युची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहरात पोलिसावर गोळीबार, आरोपी फरार

0

 

हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात काल रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान पोलिस जमादार कमलाकर धोटे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. यात आरोपी अज्ञात इसमाचा हात पकडल्याने गोळी हवेत फायर झाली. गोळीबार करणारे अज्ञात आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.असून हिंगणघाट पोलिसात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. काल रात्री अकराच्या सुमारास नंदोरी चौकामध्ये दोन इसम दुचाकीने थांबले व त्यांनी चौकात आल्यावर उभे असलेले माजी नगरसेवक अनिल भोंगाडे यांना वरोरा कुठून जाते अशी विचारणा केली. अनिल भोंगाडे यांनी त्यांना तुम्ही कुठून आले व तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही असे विचारले असता ते उडवाउडविचे उत्तरे देत होती. या दरम्यान हिंगणघाट पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलिस जमादार कमलाकर धोटे हे साध्या कपड्यांवर आले व अनिल भोंगाडे जवळ थांबले असता त्यांना यातील ऐकाणे या रोडवर पोलिस असते का चेकिंग असते का असे विचारले. जमादार यांना दोघांवर शंका आली त्यांनी लगेच आपला मोबाईल नंबर त्यांना दिला व मला एक मिस कॉल द्या समोरं अडचण आली तर मी त्यांच्याशी बोलील मी देखील पोलिस आहे असे सांगितले. व आरोपींचा मोबाईल नंबर मिळविला . या दरम्यान अनिल भोंगाडे लघुशंका करण्यास गेले व जमादार धोटे यांनी तुमच्या बॅगेत काय आहे अशी विचारणा केली. व बॅगेला हात लावण्याचा प्रयत्न केला असतां अचानक यातील एकाने आपली रिव्हॉल्वर काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र जमादार धोटे यांनी त्याचा हात धरल्याने ती गोळी हवेत फायर झाली व एक काडतूस खाली पडली . यादरम्यान धोटे ओरडल्याने अनिल भोंगाडे धावत आले व जवळ पडली असलेली विट त्या दोघांना फेकून मारली. या दरम्याने एकाने भोंगाडे यांच्यावर अवजार चालविण्याचा प्रयत्न केला मात्र भोंगाडे यांनी परत विट हाती पकडली असल्यानं ते दुचाकीवरून पळून गेले. गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेत आहे .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चंद्रपूर मनपा मध्ये सोडल्या कोंबड्या

0

 

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे ह्या करिता अमृतजल योजने अंतर्गत कंत्राटदाराला 2015 मध्ये 354 कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आला परंतु आज 5 वर्ष लोटून गेले तरी ह्या योजनेच्या कंत्राटदाराने काम तर पूर्ण केले नाही आणि जे काम केले ते पण पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केले.
चंद्रपूर शहरा मध्ये पाईप लाईन टाकलेल्या भागात जे गट्टू लावण्यात आले ते गट्टू पूर्ण पणे जमिनीच्या आत गेले ह्याचाच अर्थ काम एकदम निकृष्ट दर्जाचे झाले.
ह्या विषयाला घेऊन वारंवार प्रत्येक झोन मध्ये नागरिकांच्या प्रश्नाला घेऊन निवेदन देण्यात आले परंतु मनपा चंद्रपूर ने दुर्लक्ष केले म्हणून ह्या विषयाला घेऊन आज दिनांक 12/8/2021 ला अमृत जल योजनेच्या भोंगळ कारभार आणि ह्या भोंगळ कारभार बघून अधिकारी दुर्लक्ष करीत असलेल्या मुळे आज महापालिका चंद्रपूर येथे कंत्राटदारावर चौकशी लावावी ह्या करिता धिक्कार आंदोलन करण्यात आले आणि अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी महापालिकेत कोंबड्या सोडण्यात आले सदर आंदोलन राष्ट्रवादी युवक चंद्रपूर चे जिल्हा सचिव अभिनव देशपांडे ह्यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.

अपंगांना स्वयंरोजगारासाठी मंजुर जागा रद्द केल्यास सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार

0

 

अपंग जनता दल सामाजिक संघटना चा म.न.पा. आयुक्त यांना इशारा

अमरावती: अपंगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर केलेली जागा रद्द केल्यास 15 ऑगस्ट रोजी अमरावती महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा अपंग जनता दलाने दिला आहे. आज या संदर्भात अपंग जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अपंगांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी 2016 मध्ये स्थानिक अपंग बेरोजगारांना नझुलची जागा स्वयंरोजगारासाठी मंजूर करण्यात आली होती, पण आता काही राजकीय लोकांचीही या जागेवर नजर गेली आहे यामुळे दिव्यांगांसाठी मंजूर केलेली जागा रद्द करण्याचे षडयंत्र महानगरपालिकेत सुरू आहे. ही जागा रद्द केल्यावर 15 ऑगस्ट रोजी अपंग जनता दलाचे महासचिव राजिक शाह व नासीर बेग ये दोन पदाधिकारी अमरावती महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात सामूहिक आत्मदहन आंदोलन करतील. असे निवेदन राजीव शहा, दिलबर शहा, नासिर बेग नजीर बेग, शेख बब्बू, राजीक शहा, मयूर मेश्राम,राहुल वानखेडे, शेख रुस्तम, फारूक शहा, सुफियान खान, इरफान खान, विकास धोटे, विद्या तायडे, बेबी शिंदे, वाचाला शिंदे, ललिता महेंद्र, जानकी पाटेकर, प्रज्वल गवळी, मनीष जगताप, वैशाली मोहोड, अश्विन वंजारी, हर्षद माहुरे संजय उगले, हर्ष सहारे, सतीश मरोडकर, प्रमोद शेबे, केशवराव कोठे, सीताराम डहाळकर, अमित तेभुर्णे इत्यादी उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील शेतीसाठीची अतिक्रमणाचा मालकी कायम पट्टे वाटप करा-के.जी.शाह

0

 

अजहर शाह

बुलढाणा:-बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव,सि राजा,दे राजा,मेहकर, व मोताळा या तालुक्यातील १९९० पूर्वीच्या शासकीय पड व गायरान जमीनिवरील शेतीसाठी असलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यात यावी या बाबत भूमी हक्क परिषद महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के जी शाह यांनी दि १०/०८/२०२१ रोजी मा,जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र एल इ एन १०९०/प्र, क्र /१७२/ज १ मंत्रालय मुंबई दिनांक २८ नोव्हेंबर १९९१ च्या शासन निर्णया नुसार बुलढाणा जिल्यात १९९०पूर्वी शासकीय जमिनीवर शेतीसाठी गायरान व पड जमीन अतिक्रमण क्षेत्र हे ४८३०,४६ हे आर आहे संबधित महसूल विभागाच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी २२ सप्टेंबर २०११ मध्ये योग्य गावं पातळीवरिल अतिक्रमण धारकांनचा जिल्हाअधिकारी कार्यालया कडे न पाठविल्या मुळे जिल्ह्यातील अतिक्रमण धारकनवर अन्याय झाला आहे या बाबत संघटनेने मा,मुख्यमंत्र्याला पत्र लिहले होते त्याची दखल घेऊन राज्याच्या महसूल व वन मंत्रालयाने महाराष्ट्र शासन पत्र का,जमीन -२०१९ स,क,९६/ज-९/ मंत्रालय मुंबई ०३२ दि २८/०१/२०२० रोजी हे पत्र मा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठून बुलढाणा जिल्ह्यातील शेती साठीची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्या बाबत आदेशीत केले होते या वरून जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व विभागाने सर्व एस डी ओ व तहसीलदार यांच्या कडून अहवाल मागितला होता परंतु कोविडं 19 ही महामारी आल्यामुळे हे प्रकरण बंद पडले ते नव्याने सुरू करावे व जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना न्याय द्यावा अन्यथा संघटनेच्या वतीने दिनांक-१/०९/२०२१ पासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर बेमुद्दत आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा भूमी हक्क परिषदेने दिला आहे

पक्षांचा अधिवास नष्ट केल्या प्रकरणी निसर्ग साथी चे एक दिवसीय धरणे आंदोलन

0

 

हिंगणघाट शहरातील पंचायत समिती परिसरातील कवठ वृक्ष जुलै अखेरीस पावसाने कोसळल्याने झाडांवरील पक्षांचा अधिवास सुरक्षीत ठेवून पक्षांचा प्रजनन संपेपर्यंत आक्टोबर पर्यत कवठ वृक्ष जैसे थे ठेवण्याचे आश्र्वासन प्रशासनाने निसर्ग साथी फाऊंडेशन ला दिले होते.हिंगणघाट शहरात गत 10 वर्षांपासून पर्यावरण तथा निसर्गातील पशु पक्षी संवर्धनासाठी निसर्ग साथी फाऊंडेशन कार्यरत आहे.
मात्र गत 4 – 5 दिवसांपूर्वी प्रशासनाने दिलेला शब्द फिरवुन झाडाच्या फांद्या कटर नी कापल्या तद्दतच वृक्षाखाली विस्तव पेटवल्याने वृक्षांवर निवासी पक्षांची पिले मृत्यू मुखी पडली तर काही घरटी उद्धवस्थ झाली.प्रशासनाने दिलेला शब्द फिरविल्याचे निषेधार्थ तथा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास्तव निसर्ग साथी फाऊंडेशन नी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले .या धरणे आंदोलनात निसर्ग साथी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडु, रुपेश लाजुरकर, गजू कुबडे, प्रभाकर कोळसे, गुणवंत ठाकरे, राकेश झाडे,विजयभाऊ थोरात ,साई खोब्रागडे , प्रविन कारळकर , परिक्षित ढगे ,दिनेश मुडे आदी निसर्ग साथी सहभागी झाले होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

हनुमान मंदिर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व रोजगार सेवक अर्जुन भाऊ कराळे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण

0

 

 

श्री क्षेत्र नागझरी ग्रामपंचायत यांच्यातर्फे आज रोजी दिनांक अकरा आठ रोजी वृक्षारोपणाचा नागझरी गावामध्ये हनुमान मंदिर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व रोजगार सेवक अर्जुन भाऊ कराळे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण चा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाला गावचे सरपंच गणेश भाऊ खरप उपसरपंच रमाताई सरदार. ग्रामपंचायत सचिव रुपेश बोबडे व ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सरदार संतोष पवार आणि बहुसंख्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.