Home Blog Page 421

पुरात वाहून गेलेल्या व्यकतींच्या कुटुंबियांना शासनाची मदत

0

 

दिनांक 11 ऑगस्ट
हिंगणघाट
मागील महिन्यात पुरात वाहून गेलेल्या समुद्रपुर तालुक्यातील दोन मृताकांच्या परिवारास आज महसुल विभागाकड़ून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे शुभहस्ते धनादेशाद्वारे दोन्ही कुटुंबियांना ४ लाख रक्कमेचे धनादेश सोपविण्यात आले.
याप्रसंगी नायब तहसीलदार श्री संजय महाजन,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन मडावी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
समुद्रपुर तालुक्यात सततधार पावसामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील तास येथील संतोष शंभरकर या वृद्ध इसमाचा मृत्यु झाला,यासह समुद्रपुर येथील रहिवासी असलेल्या श्रीमती रंभाबाई मेश्राम या महिलेचासुद्धा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.
आज दि.११ रोजी मृतकांचे परिवारातील सदस्यांना एकूण ४ लाख रूपयांची मदत देण्यात आली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी जननायक वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नायगांव येथे आदिवासी दिवस उत्साहात साजरा

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

 

कार्यक्रमात आदिवासी तडवी भील परिवाराचे पिढ्यानंपिढ्या चालत आलेल्या पारंपारिक पद्धतीने आदिवासी तडवी भील “साजोनी”हे नृत्य प्रकार सादर करण्यात आले व संस्कृती जतन व संवर्धन या निमित्ताने ने सर्वं आदिवासी बांधवाना बघावयांस मिळाले
तसेच ऍडव्हकेट कु.कविता जांहगीर सावळे व ऍडव्हकेट कु.कविता मकुंदा पवार या दोघं जळगाव कोर्टाच्या वकील तरुणीनीं विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जागतिक आदिवासी दिनात आपला सहभाग नोंदवला

*प्रसंगी आदिवासी तडवी भील जतन व संवर्धना चे जानकार व नायगाव येथील युवा समाजसेवक सचिन तडवी,विद्रोही कवी बी-राज,मुबारक तडवी, मुस्तुफा तडवी, तडवी,सर्फराज तडवी,फकिरा तडवी,खलील तडवी,दिलदार तडवी,वजीर तडवी, अजित तडवी सर, मेहरबान तडवी सर, किशोर सावळे,सोना सावळे, जुम्मा बांगी, साबीर तडवी,सागर तडवी असलम तडवी, पिरखा तडवी,खलील तडवी,आशिक तडवी, मजित तडवी,ग्रा.पं चे सरपंच,उपसरपंच सदस्य व समस्थ आदिवासी तडवी भील समाज बांधव उपस्थित होते*

नांदुरा तहसीलदार राहुल तायडे साहेब याना बुलढाणा जिल्हा उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार मिळाल्या बद्दल. भा.बौ.महासभा चे वतीने सतकार करण्यात आला

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधी

नांदुरा तहसीलदार आयु.राहुल तायडे साहेब यांना बुलढाणा जिल्हा उतकुषठ तहसीलदार पुरस्कार मिळाल्या बद्दल साहेबांचे भा.बौ.महासभा ता.नांदुरा च्या. वतिने स्वागत करण्यात आले उपस्थितामधे जिल्हा उपाध्यक्ष. एल एफ. मेढे. ता.अध्यक्ष दिलीप मेढे. ता.महासचिव. पंडित इंगळे. कोषाध्यक्ष. निरंजन तायडे. अशोक तायडे. अशोक इंगळे. नांदुरा सुधाकर तायडे. पो.पा.शेंबा समाधान रणित. शाहीर समाधान इंगळे. निबांजि हेलोडे. भास्कर सुरडकर. समता सैनिक दलाचे. सुपडाव नरवाडे हिम्मत राव गवई. डि.टि.दाडगे. दादाराव दोडे तसेच वंचित बहुजन आघाडिचे ता.अधक्ष. अजाबराव वाघोदे. मधुकर तायडे. देवानंद सरदार.व इतर बरीच मंडळी उपस्थित होती

रुग्णमित्र गजू कुबडे 48 तासाच्या आतच उपोषणाची घेतली दखल !

0

दि.11 ऑगस्ट
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थे बाबत वारंवार अर्ज विनंती करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अनेक गरजू गरीब रुग्णांची आरोग्याबाबत हेळसांड होऊन त्यांना महागडे उपचार घेण्यासाठी खासगी दवाखान्यात किंवा सावंगी,सेवाग्राम वा नागपूरला जावे लागते हेच ध्यानात ठेऊन रुग्णमित्र गजू कुबडे यांनी या उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या त्रुटी बाबत जिल्हा प्रशासनाने अनेकवार निवेदन देऊन लक्ष वेधले परंतु त्यांच्या निवेदनाची दखल ना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली ना आमदार-खासदारांनी घेतली.अखेर शेवटी ९ आगस्टच्या क्रांती दिनाचा मुहूर्त साधत गजू कुबडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले.आणि या उपोषणाला पूर्ण ४८ तास होण्याच्या आधीच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.व दि १० ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता तहसीलदार श्रीराम मुंदडा यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन गजू कुबडे यांच्या सोबत मागण्यांबाबत चर्चा केली.यावेळी वैद्धकीय अधिकारी डॉ चाचरकर उपस्थित होते.या चर्चेनंतर तहसिलदार मुंदडा यांनी आरोग्य उपसंचालक नागपूर,व जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांच्यासोबत मोबाईल वरून या मागण्यांबाबत चर्चा केली.त्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वैद्धकीय अधिकारी डॉ चाचरकर यांनी गजू कुबडे याना उपोषण मंडपात लेखी पत्र दिले.
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटचे वैद्धकीय अधीक्षक डॉ चाचरकर यांनी गजू कुबडे यांच्या न्याय मागण्यां बाबत सुरू करण्यात आलेल्या कार्याविषयी दिलेल्या लेखी पत्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार,पोष्टमार्टेम साठी उपलब्ध असलेल्या व्यक्तीला तांत्रिक प्रशिक्षणासाठी जिल्हा शल्य चिकित्सक येथे पाठविण्यात आले असून तो वापस येत पर्यन्त खासगी व्यक्तीस जबाबदारी देण्यात आली असून त्याला शासनाकडून मानधन देण्यात येणार आहे,पूर्णकालीन प्रसूती तज्ञा ची व्यवस्था करण्यात आलेली असून गरोदर स्त्रियांची सोनोग्राफी सेवा खासगी सोनोलॉजिस्ट कडून मोफत करण्याबाबत उपजिल्हा रुग्णालयासोबत करार झालेला आहे.या रुग्णालयातील दोन डॉकटर हे परसेवेवर असून त्यांना पुर्ववत या ठिकाणी रुजू करण्या बाबतचा अहवाल तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे फिजिशियन ची जागा ही संपूर्ण जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने तातडीने उपलब्ध होऊ शकणार नाही त्या बाबत शासनाकडे नियमित पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या लेखी निवेदना नंतर गजू कुबडे यांनी तहसीलदार श्रीराम मुंदडा यांचे हस्ते व चेतन काळे यांना डॉ चाचरकर यांचे हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
यावेळी प्रहारचे सर्वश्री विनोद खंडाळकर वर्धा जिल्हा रुग्ण सेवक,जगदीश तेलहांडे ,अजय खेडेकर उपसरपंच जाम व प्रहार युवा तालुका प्रमुख समुद्रपूर,मोहन पेरकुंडे,सागर आत्राम,सूरज कुबडे,समीर मानकर,सतिष गलांडे,राजेश लखाणी,,दिवाकर वाघमारे,रोशन थूटे,केशव लेंडांगे,पिंटू हिवंज,अजय लढी,विनोद धोबे, संतोष जोशी,सुधीर मोरेवार, विजय पडोळे,नितेश भोमले,गोलू उजवणे,सोनू सोरते,रुपराज भगत,दिवाकर घंगारे,राजू बोभाटे, भोजराज नेहारे,प्रवीण जायजे,अक्षय मोहड,बालु चौव्हाण,तबरेज पठाण,सुरज डफ, अनिल हाते, धीरज नंदरे,अमित गोजे,राहुल चौधरी,रितेश गुडढे,राजेश तांदूळकर, प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

नारखेड येथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथा चे वाचन

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधी

९आँगषट वार सोमवार नांदुरा तालुक्यातील नारखेड या गावी बुद्ध आनी त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यासाठी संकल्प.सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उपस्थित समता सैनिक दलाचे जवान आद.गजानन वाकोडे. सतीष वानखडे प्रमुख मार्गदर्शक आद. बौ.शिवराम इंगळे सर आनि संदीप खंडेराव व समस्त बौद्ध उपासक उपासिका हजर होते कार्यक्रमाची सुरवात त्रिसरण पंचशीलाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप खंडेराव यांनी केले तर इंगळे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले शेवटी एकमताने ग्रंथ वाचन सुरू करण्याचा संकल्प.करून सरनतय गाथेने शेवट करण्यात आला

यु ट्युब’ आणि ‘पोर्टल’ चालविणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न धसास लावण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ‘महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेत’ सहभागी व्हा — एस.एम.देशमुख – मोहन चौकेकर

0

 

बुलढाणा : सध्याच्या काळात सोशल मिडियाचं महत्त्व नव्यानं सांगण्याचं कारण नाही. सोशल मिडियानं आपलं जीवन व्यापून टाकलं असल्यानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना देखील सोशल माध्यमाची गरज वाटायला लागली आहे. त्यामुळेच मोठयातले मोठे चॅनल देखील आमच्या ‘यु ट्यूब चॅनल’ला सबस्क्राईब करा अशा जाहिराती करीत आहे. सोशल मिडियाचा वापर आणि ‘युट्यूब चॅनल’ला लोकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता पुढील काळ युट्यूब आणि पोर्टलचा आहे. म्हणूनच काळाची पाऊले ओळखून मराठी पत्रकार परिषदेने ‘महाराष्ट्र सोशल मिडीया परिषद’ ही संलग्न शाखा सुरु केली असून परिषदेच्या नव्या व्यवस्थेच्या माध्यमातून ‘युट्यूब’ आणि ‘पोर्टल’ चालविणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न धसास लावण्यासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेचा हिस्सा होऊन एकजुटीने आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

एस.एम. देशमुख यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, नव्या पिढीतील पत्रकार मोठ्या संख्येने या नव्या सोशल व्यासपीठाचा वापर करतांना दिसत आहेत. नवीन माध्यमं समोर येत असतानाच या सोशल माध्यमातील पत्रकारांना भेडसावणारे प्रश्न देखील समोर येत आहेत. व्यक्तिगत पातळीवर एकटा पत्रकार या समस्यांचा मुकाबला करू शकत नाही अथवा आव्हानांना सामोरं जाऊ शकत नाही. संघटीतपणेच नव्या माध्यमातील आव्हानांना सामोरं जाता यावं यासाठीच आपण “महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद” ही मराठी पत्रकार परिषदेची शाखा सुरू केली आहे.

मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची सर्वात जुनी अशी संस्था आहे. परिषदेने गेल्या 82 वर्षात पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य योजना, बाळशास्त्री जांभेकर स्मारकासह पत्रकारांचे असंख्य प्रश्न मार्गी लावले आहेत. परिषदेने जे प्रश्न हाती घेतले ते चिवटपणे लढा देत सोडविले आहेत.. सोशल मिडिया परिषद देखील याच जिद्दीने काम करणार आहे. सोशल मिडिया परिषदेच्या शाखा सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू करण्यात येत आहेत. अगोदर जिल्ह्याची टीम निवडली जाईल. त्यानंतर ही जिल्ह्याची टीम तालुका शाखा स्थापन करील. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सोशल मिडिया परिषद ही मराठी पत्रकार परिषदेचीच एक शाखा असल्याने जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषद परस्पर पूरक आणि एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार आहेत.

सोशल मिडिया परिषदेचे राज्य निमंत्रक म्हणून बापुसाहेब गोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोशल मिडियातील ज्यांना परिषदेच्या नव्या प्रवाहात सहभागी व्हायचं आहे त्यांनी शरद पाबळे (9822083111), बापुसाहेब गोरे (9822222772) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी केले आहे. ✍️ मोहन चौकेकर

आदिवासी घरकुल ड ची प्रलंबित यादी मार्गी लागावी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे

0

 

यावल ( प्रतिनिधि) विकी वानखेडे

: गिरडगाव येथे आज महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांचा सत्कार प्रसंगी सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य व गावांतील ग्रामस्थ मंडळी हजर होते निवेदनात आदिवासी घरकुल ड ची प्रलंबित यादी मार्गी लागावी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही मुद्दे नमुद करण्यात आली मंत्री महोदयांनी तुमच्या निवेदन याची दखल घेतली जाईल शब्द दिला: उपस्थित मंडळी सरपंच अल्काबाई मधुकर पा, पोलीस पाटील अशोक रघुनाथ प्रशांत पाटील पा, सरपंच पति मधुकर जगन्नाथ पा ,व्य कोजी पा शुक्राम पा शेषराव पा ,रोहिदास पा,सुधाकर पा, प्रमोद पा, नामदेव पा ,लाखीचंद भिल्ल किरण भिल्ल बशीर तडवी ,गुलजार,तडवी,नागो,पा अनिल पा संजय पा मुंन्ना बाई,तडवी विकास,पा ओम प्रशांत पाटील गिरीड गाव: महेश पा

अमरावती जिल्हा ट्रेड युनियन्स कौन्सीलच्या महीला धडकल्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात…

0

 

हंसराज उके अमरावती

९आगस्ट क्रांती दिनी भारत बचाव दिन पाळण्याची हाक दिली
===============संविधान विरोधी व जन विरोधी मोदी सरकारच्या
विरोधात ९ आगस्ट २०२१भारत बचाव दिनाचे औचित्य साधत
संयुक्त कामगार संघटना कृती समिती व संयुक्त संघटना समन्वय समिती
अमरावती यांचे वतीने
संविधान विरोधी व जन विरोधी मोदी सरकारच्या धोरणा विरोधात ९ आगस्ट भारत बचाव दिन
पाळण्याची हाक दिली आहे त्याच अनुषंगाने आंदोलनाचा भाग म्हणून आज आम्ही अमरावती जिल्ह्यातील संयुक्त कामगार संघटना व संयुक्त किसान संघटनेच्या वतीने भारत बचाव दिन पाळत जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाद्वारे कामगार शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या मागण्यांचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देवून केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी कामगार व सर्व सामान्य जनता संकटात
सापडली आहे मुठभर लोकांच्या हितासाठी मोदी सरकार कायदे करून शेतकरी कामगारांचे अधिकार हिसकावून घेत आहे देशातील सार्वजनिक संपत्ती विकून खाजगी क्षेत्राला पुरस्कृत करीत आहे या धोरणापासुन प्रवृत करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या ऐतिहासिक दिनी ९ आगस्ट क्रांती दिनी देशभरामध्ये भारत बचाव दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या मागण्यासाठी व देशात संविधान राजकिय सलोखा कायम ठेवण्यासाठी भारत बचाव दिनी खालील मागण्या आपण केंद्र सरकारला त्वरित सोडविण्याचे आदेश करावे शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे त्वरित मागे घ्या , कामगार विरोधी चार श्रम संहिता मागे घ्या, विज विधेयक २०२० रद्द करा , पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा व महागाईवर नियंत्रण आणा, अंगणवाडी, आशा व शालेय पोषण कामगारांना शासकीय कर्मचा-यांनाचा दर्जा द्या तोल पर्यंत त्यांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लागु करा, सार्वजनिक उद्योग व शासकीय विभागांचे खाजगी करणं व निर्जंतुक थांबवा विनाशकारी अत्यावश्यक संरक्षण सेवा अध्यादेश २०२०ई डी एस ओ मागे घ्या, बांधकाम कामगार घरकाम कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा लागु करा, केंद्र व राज्य सरकार मधील रिक्त पदे त्वरित भरतु प्रकीया थांबवुन युवकांना रोजगार घ्या, कामगार कपात वेतन कपात बंद करा व कोरोना काळात बंद नौकर्या कपात मातीची भरपाई घ्या, आयकर मर्यादेखाली उत्पन्न गटातील सर्व कुटुंबांना ७५००रुपये थेट अर्थसाहाय्य घ्या, आरोग्य क्षेत्रासाठी जी डी पीच्या ६टक्के तरतूद करा , नविन शिक्षण धोरण २०२०मागे घ्या शिक्षणाचे
खाजगी करणं व बाजारिकरण थांबवा शिक्षणावर जीडीपी६ टक्के खर्च करा सर्वांना पुर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत घ्या इत्यादी मागण्या वरील युनियनचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ डॉ संजय कुटे यांचं नाव आघाडीवर.

0

 

आ. संजय कुटे होणार नवे प्रदेशाध्यक्ष ?

गजानन सोनटक्के जळगाव जा

भाजपचे (BJP) महाराष्ट्रातील मोठे नेते हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे नेते तिथे आहेत. तेव्हापासून भाजपमधील वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्यांच्या चर्चा सुरु आहेत. भाजपचा महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार यानिमित्त या बैठका सुरु असल्याचं समजतं आहे भाजपकडून जी नावं दिली जात आहे किंवा ज्या नावांची चर्चा सुरु आहे त्या सगळ्यात आघाडीवर जे नाव आहे ते डॉ. संजय कुटे यांचं. हे नाव पुढं आणण्यासाठी भाजपचं नेमकं काय राजकारण असणार आहे हे आपणं जाणून घेणं गरजेचं आहे.

संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्मपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. मुळचे बुलडाण्यातील आहेत. मागील काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात आहेत.

महाराष्ट्रात भाजपवर जर कोणाचा पगडा असेल पूर्णपणे तर तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे. संजय कुटे हे फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळेच त्यांचं नाव हे अध्यक्षपदासाठी फडणवीसांकडून पुढे केलं जात असल्याचं सूत्रांकडून खात्रीलायकरित्या समजतं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी संजय कुटे यांचं नाव का आहे चर्चेत?

संजय कुटे यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे करण्यासाठी ओबीसी राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पाहिले तर लक्षात येईल की, सगळे मराठा समाजाचे नेते होते.

आता महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती हाताळायची असेल तर ती परिस्थिती बघता जर ओबीसी नेतृत्व पुढे आणायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाचा हा बदल होऊ शकतो. कारण एकीकडे पंकजा मुंडे यांनी फडणवीसांविरोधात एक प्रकारे एल्गारच पुकारला आहे. त्यामुळे नवं ओबीसी नेतृत्व पुढे आणायचं असेल तर संजय कुटे हे अगदी योग्य नाव असल्याचं फडणवीसांना वाटतं आहे. म्हणूनच त्यांचं नाव पुढे केलं जात आहे.

संजय कुटे हे सध्या महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत. दरम्यान, भाजपच्या नेत्यांची अचानक दिल्ली वारी का सुरु आहे याबाबत अधिकृत काहीही कारण देण्यात आलेलं नाही. पण अशावेळी संजय कुटे हे दिल्लीत असणं हे कुठेतरी संकेत देणारं आहे की, ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत.

ओबीसी मतदार भाजपचा नेहमीच मोठा मतदार राहिलेला आहे. ओबीसी समाजाचं राजकारण आता महाराष्ट्रात तापू लागलं आहे. त्यामुळे आता एक नवी खेळी पक्षाकडून केली जाऊ शकते. मात्र असं असताना अनेक दिग्गज नेते हे ओबीसी आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यासारख्या नेत्यांना डावलून संजय कुटे यांचंच नाव सध्या का चर्चेत आहेत? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या शेवटचा जो मंत्रिमंडळ विस्तार केला होता त्यावेळी त्यांनी संजय कुटे यांना देखील त्या मंत्रिमंडळात घेतलं होतं. त्यावेळी त्यांना कामगार आणि ओबीसी मंत्रालय देण्यात आलं होतं. पण मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ अवघ्या 3 ते 4 महिन्याचा होता. कारण त्यानंतर लागलीच विधानसभा 2019 च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.

जिल्हा परिषद शिक्षिकेचा मुलांना चालना देणारा उपक्रम

0

गजानन सोनटक्के जळगाव

जळगाव जामोद तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोठ्या शाळांपैकी सुनगाव जिल्हा परिषद शाळा ही एक मोठी शाळा आहे सध्या दीड ते दोन वर्षापासून कोरोना परिस्थिती चालू असताना शाळेमध्ये 8वा वर्ग चालू करण्याची मुभा असताना 8वा वर्ग शिक्षणासाठी सुरू झालेला आहे तरी येथील कार्यरत असलेल्या शिक्षिका अस्मिता शिरसागर ह्या नेहमीच मुलांसाठी काहीतरी नवीन करीत असतात त्या निमित्त नियमित शाळेत येणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींना या शिक्षिकेने आपल्या स्वखर्चातून मुलांना पेन पेन्सिल वह्या कंपास इत्यादींचे वाटप केले त्यामुळे मुले ही नक्कीच शाळेत येतील व अभ्यास करतील असे आहे तरी हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेतील मुलांना चालना देण्यासारखा उपक्रम आहे