Home Blog Page 422

आदिवासी बांधवाचे सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध. आमदार राजेश एकडे

0

 

सुनील पवार. नांदुरा ता.प्रतिनिधी

नांदुरा दि.९/८/२०२१.रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित आदिवासी बांधवाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि मलकापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश एकडे होते आदिवासी बांधवांनाच्या सर्वागीण विकासासाठि कटिबद्ध असल्याचे मनोगत आमदार राजेश एकडे यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी नांदुरा तालुका काँग्रेस कमीटिचे अध्यक्ष भगवान भाऊ धांडे जिल्हा पुनर्वसन समीतीचे सदस्य पुरूषोत्तम झालटे.सुभाष पाटिल. नारायण झालटे. बाबुसिंग डाबेराव.गूलाबराव सोळंके. विनोद.डाबेराव भागवत भोलकर बूटेसर. मीनाताई तडवी. अधक्ष .सुगदेव सोळंके. राज समन्वयक आदिवासी जनता दल गोकुळसिंग चव्हाण दीलिप मोरे व बहुसंख्य आदिवासी बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते

यावल शहरातील आठवडे बाजाराजवळी पेट्रॉलपंपाच्या ९० वर्षाचा करार संपुष्टात आलेल्या बेकायद्याशीर पंप चालकास जिल्हाधिकारी यांची नोटीस

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील आठवडे बाजार शेजारील शासनाची सि.स.नं. ३८५१/अ या जागेचा ९० वर्षाचा करार संपुष्टात येऊन ही या जागेवर अनधिकृतरित्या पेट्रोल पंप सुरू आहे.याशिवाय या जागेवर पेट्रोल पंपाचे मंजूर आराखडयामध्ये विनापरवानगीने बदल करण्यात आला आहे. सदर पंपचा वाणिज्य प्रयोजनार्थ सुरु असलेला बिनशेती वापर बंद का करण्यात येऊ नये ? अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीसह, पंप चालक शंकरलाल रामरतन अँड ब्रदर्स, व राजेंद्र राधाकृष्ण जाखेटे यांना नुकतीच (ता.४) बजावण्यात आली आहे.
तसेच सदर जागेसंदर्भात शर्तभंग झाला असून सि.स.नं. ३८५१/ अ ही ४२९१४ चौ.मि. जागा सरकार जमा का करण्यात येऊ नये याविषयी येत्या पंधरा दिवसात खुलासा करण्याची नोटीस येथील पालिका मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन बजावण्यात आली आहे. तर सदर पेट्रोल पंप चालक राजेंद्र जाखेटे यांनी पेट्रोल पंप साठी कॅबीन, व शौचालय, सेफ्टी टॅक बांधकामासाठी वापरलेली चार ब्रास वाळू परवानगी न घेता अवैध वापरली आहे. सदर प्रकरणी पंप चालक राजेन्द्र जाखेटे व वाळू वाहतूकदार भागवत भिकन पाटील यांचे वर अवैध वाळू वाहतूकीबाबत वनविलंब कार्यवाही तत्काळ सुरू करावी असे आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी येथील तहसीलदारांना केले आहेत. अवैध पेट्रोल पंप संदर्भात येथील सामाजीक कार्यकर्ते शेख अलीम मोहंमद रफीक, शेख अजहर शेख शमसो६ीन, शेख रफीक शेख फारूक यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती या तक्रार निवेदनाची दखल घेत पंप संबधीतांना पंप चालकास नोटीस बजावण्यात आली असुन, यामुळे कुणी कुणी या पंपास पुनश्च कार्यरत करण्याकामी आर्थिक देवाण घेवाण केली आहे याची ही चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे .

हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी यांनी केला पदाचा दुरुपयोग

0

 

हिंगणघाट – दीनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान हिंगणघाट नगरपालिकेकडून राबविण्यात येते हिगणघाट नगरपालिका अंतर्गत बेघर नि dhवारा चे देखभाल व व्यवस्थापन करणे करिता ऑनलाइन टेंडर जाहिरात देण्यात आलेली होती व त्यामध्ये प्रेरणा वस्ती स्तर संघ संस्था सर्व अटी व शर्तीनुसार पात्र ठरली असून उपरोक्त बेघर निवारा चे देखबाल व व्यवस्थापन करणे करिता कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) दिनांक 26- 4 -2021 ते 26 -3- 2022 पर्यंत काम करण्याचा आदेश झालेल्या करारानुसार देण्यात आला होता करारनाम्यातील अटीनुसार बेघर निवाऱ्याची देखभाल केलेल्या कामाचा मासिक अहवाल सादर करण्यात यावा असे सांगितले होते. तरीसुद्धा मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी पदाचा दुरुपयोग करून अगोदरच दिनांक 25- 3 -21 ला 17855 रुपये 55343 रुपये 85532 रुपये 82728 असे एकूण 241458 रुपयांचा चेक दिला इतकेच नाही तर त्याच दिवशी बँकेतून पैसे ही काढले यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार दिनेश वर्मा समाजसेवक यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

पीक कर्ज वाटपला गती देण्यात यावी याकरता स्टेट बँक व्यवस्थापकांना निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

गेली एक ते दीड महिना झाले जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे… तरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पिक कर्ज मिळत नाही आहे.त्यात जळगाव जामोद तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले आहे.कुठेतरी शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळाला पाहिजे याकरता शेतकरी हा बँकांचे उंबरठे जी झीजवतो परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानी मुळे /चुकीच्या कार्यपद्धतीमुळे अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत सुद्धा ती कर्ज मिळाले नाही.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील कर्ज निल व्हावे आणि नवीन बँकांचे व्यवहार चालू व्हावे याकरता खूप शेतकऱ्यांनी वन टाइम सेटलमेंट मध्ये पिक कर्ज भरली.परंतु अशाही काही शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक कर्ज मिळाले नाही कुठेतरी ही सर्व पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणी करता आज युवा सेना जिल्हा समन्वयक ईश्वर वाघ, युवानेते अक्षयभाऊ पाटील , अल्पसंख्यांक शहर प्रमुख चांद कुरेशी, उपशहरप्रमुख मंगेश कतोरे, दिपक बावस्कर, गोपाल ढगे, सतीष हुरसाळ, विनोद पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

अखिल भारतीय काँग्रेस असंघटित कामगार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोदच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद, अखिल भारतीय काँग्रेस असंघटित कामगार संघटना जिल्हा बुलढाणा च्या वतीने सोमवार रोजी उप विभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले कि अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेस च्या वतीने ९/८/२०२१ ला कामगारांच्या हक्कांसाठी संसद भवन दिल्लीला घेराव घालण्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार काँग्रेस बुलढाण्याच्या वतीने मागण्यांची पुर्तता होण्यासाठी जिल्हास्तरावर निवेदन देण्यात आले की खालील मागण्यांची पुर्तता होण्यासाठी कार्यवाही करावी, असंघटित कामगार काँग्रेस च्या मागण्या खालील प्रमाणे आहेत, १ शहरी रोजगार हमी कायदा अंमलात आणावा, २ मनरेगा योजने मधील माफिया गिरी संपुष्टात आणावे, ३-प्रवासी मजुर व कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, ४-असंघटीत कामगारांना थेट आर्थिक मदत करण्यात यावी, ५- असंघटित कामगार मंडळामध्ये कामगारांची नोंदणी प्रकिया त्वरित सुरू करावी, ६- केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदा रद्द करावा,वरील मागण्या ची पुर्तता होण्यासाठी निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थितांमध्य हाजी मुज़म्मिल अली खान माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस अल्प संख्याक विभाग, बाबु जमादार माजी शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी जळगाव जामोद, गोविंदा इंगळे माळी समाज नेते नांदुरा,अजय राजपूत, इमरान खान, अ. राज़ीक, शहर अध्यक्ष युवक काँग्रेस, राजु शेख शहर अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, हारिस भाईजी, मंसुर शेख, अमान खान, इमरान खान, शेख ईरशाद, निसार भाई, कादर खान, रशीद ठेकेदार, न्ईम शेख, ज़हिर शेख, राजा जमदार,, मुदस्सिर भाई, अबरार शेख, मुज़म्मिल शेख, शेख मोहसिन भाई, मो. बिस्मिल्ला, अवेज़ शेख उपस्थित होते.

अनिल जवादे यांच्या नेतृत्वात शाळा पूर्वरत व नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.

0

 

दि.9 ऑगस्ट
हिंगणघाट – कोरोणाच्या प्रादुर्भावामुवे गेल्या दिड वर्षापासून शाळा बंद आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असून विद्यार्थ्यांचे मानसिक संतूलन बिघडत चालले आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शाळा पूर्वरत सूरू कराव्यात.तसेच केंद्र सरकारने जाहिर केलेले नवीन शैक्षणिक धोरण हे गरीबांना शिक्षणापासून वंचीत ठेवणारे असल्यामुळे ते रद्द करावे यासाठी भारतीय सविंधान जागृती अभियान आणि विदर्भ राज्य विकास आघाडीचे अध्यक्ष श्री.अनिल जवादे यांच्या नेतृत्वाखाली डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी पालक संघ आणि विदर्भ राज्य विकास आघाडी व भारतीय संविधान जागृती अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी श्री,अनिल जवादे यांनी आपल्या मनोगतातून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे दिड वर्षापासून शाळाँना कुलूप आहे..आॕनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे निट आकलन होत नाही..अनेकांकडे अध्यावत मोबाईल नसल्यामुळे तसेच ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.आॕनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना आपले भवितव्य दिसत नसल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य निट राखण्याच्या योग्य त्या उपाय योजना करून त्यांच्या उज्वलभवितव्यासाठी शाळा सुरू करणे गरजेचे आहे.तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण हे संविधानातील समता ,न्याय या मुल्यांविरोधी भूमिका घेणारे असून खाजगिकरणाला बळ देणारे, शिक्षणाचे व्यापारीकरण करणारे,गरीब आणि श्रीमंत आसे दरी निर्माण करणारे विषमतावादी धोरण आहे.य्यामुळे हे धोरण रद्द करावे समान शिक्षणाचा कायदा तयार करावा असे विचार व्यक्त केले.यावेळी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष श्री किशोर मुटे ,विद्यार्थी पालक संघाचे सर्व पदाधिकारी भारतीय संविधान जागृती अभियान आणि विदर्भ राज्य विकास आघाडीचे पदाधिकारी श्री.गोरख भगत ,श्री.महेश माकडे,श्री.दिनेश वाघ ,श्री.गोपाल मांडवकर इत्यादी आणि बहुसंख्येने विद्यार्थ्यांच्या पालकांची या धडक मोर्चात उपस्थिती होती.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेंच्या निषेधार्थ रुग्णमित्र गजू कुबडे यांचे उपोषण सुरू !

0

दि.9ऑगस्ट
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अनेक सुविधेच्या अभावाच्या निषेधार्थ प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी आज क्रांती दिनाच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषणाला बसण्यापूर्वी राष्ट्रधवज तिरंग्याचे पूजन व प्रणाम करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.त्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबसाहेब आंबेडकर, अमर शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी या उपोषणाला निसर्गमित्र चेतन काळे हे सुद्धा या तीन दिवसांच्या उपोषणात सहभागी झालेले आहेत.
या उपोषणासंदर्भात येथील उपजिल्हा रुग्णालयात पूर्णकालीन प्रसूती तज्ञ,फिजिशियन,परसेवेवर अन्यत्र असलेल्या दोन्ही डॉकटर यांना येथे रुजू करण्यात यावे,रेडिओलाजिस्टची नियुक्ती करण्यात यावी,व कायम स्वरूपी पोष्टमार्टेम् करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी या प्रमुख मागण्यांसाठी गजू कुबडे यांनी तीन दिवसाचे उपोषण सुरू केले आहे.
या उपोषण मंडपात आज सकाळपासून जिल्हा प्रमुख जयंत तिजारे,प्रमोद म्हैसकर, ता.प्रमुख समुद्रपूर, मोहन पेरकुंडे, जगदीश तेलहांडे ता.प्रमुख हिंगणघाट,सूरज कुबडे,समीर मानकर,राजेश लखणी,विनोद खंडाळकर,दिवाकर वाघमारे,अजय लढी,विनोद धो बे,संतोष जोशी,सुधीर मोरेवार, विजय पडोळे,नितेश भोमले,गोलू उजवणे,सोनू सोरते,मंगेश मिस्किन,रुपराज भगत,दिवाकर घंगारे,राजू बोभाटे, भोजराज नेहारे,प्रवीण जायजे, तबरेज पठाण,सुरज डफ, अनिल हाते, धीरज नंदरे,अमित गोजे,राहुल चौधरी,रितेश गुदढे प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूर्या मराठी साठी सचिन वाघे वर्धा

सणासुदीच्या महिन्यात मोहता गिरणी कामगारांना आमदार कुणावार यांनी केले जीवनावश्यक वस्तुंचे वितरण

0

 

हिंगणघाट दि.९ ऑगस्ट
हिंगणघाट शहर श्रमिकांची वस्ती आहे,या शहरातील जुन्या काळातील मोहता गिरणी आता व्यवस्थापणाने बंद केली असून तेथे काम करणारे श्रमिक तसेच त्यांचे कुटुंबिय निराधार झाले आहेत,अशा निराधार कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून जवळपास २ हजार रुपये किंमतीचे जीवनावश्यक वस्तुचे किटवितरण तसेच नगदी स्वरुपात 500 रूपयाची मदत करीत असल्याचे प्रतिपादन करीत या निराधार झालेल्या कामगारांच्या पाठीशी सदैव राहणार असल्याचे आमदार समिर कुणावार यांनी सांगितले.
स्थानिक संत कंवरराम भवन येथे आयोजित ६०० कामगारांना जीवनावश्यक वस्तु वितरणप्रसंगी आ.कुणावार बोलत होते.
यावेळी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतांनी,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अंकुश ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर, आर पी आय चे शंकरराव मुंजेवार, नगरसेविका सौ. छायाताई सातपुते, सौ. रवीलाताई आखाडे,सौ.वंदना कामडी,पदमाताई कोडापे, शुभांगी ताई सुनील डोंगरे, समाजसेवक सुनील डोंगरे,नगरसेवक चंद्रकांत मावळे,राहुल सोरटे, किरण वैद्य,संजय बोथरा,भाजपा शहर अध्यक्ष आशिष परबत, नगरसेविका वैशाली सुरकार, सौ. शारदा ताई पटेल, नगरसेविका सौ सुनीताताई मावळे तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,समुद्रपुर तालुकाध्यक्ष संजय डेहणे, शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. अनिताताई मावळे, राकेश शर्मा,बालू वानखेडे तसेच शेकडो आर एस आर मोहता गिरणीचे कामगार तसेच कर्मचारी सदस्य उपस्थित होते.
सणासुदीच्या काळात आमदार कुणावार यांचेवतीने कामगारांना २ महीने पुरेल एवढ्या अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तु व नगदी स्वरुपात ५०० रुपये मदत मिळाल्याने कामगार यावेळी समाधान व्यक्त करतांना दिसत होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

शहीद जवान कैलास पवार ,किशोर काळूसे व स्व.शिवशंकर बाबा पाटील यांना चिखलीकरांनी वाहली सामुहिक श्रद्धांजली – मोहन चौकेकर

0

 

वीर जवान अमर रहे च्या..जयघोषणांनी दणदणाला परिसर

 

चिखली : भारत मातेच्या रक्षणासाठी सियाचीन येथे कर्तव्यावर असलेले चिखलीचे सुपुत्र वीर जवान शहीद कैलास भारत पवार , बीबीचे सुपुत्र  शहीद जवान  किशोर काळूसे यांना व  श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्व, कर्मयोगी, युगपुरुष ह.भ.प. स्व.शिवंशकरभाऊ पाटील यांना चिखली येथील गांधी नगर परिसरातील गांधी चौकात नागरिकांनी दि.08 ऑगस्ट रोजी  सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले. या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार छोटु कांबळे यांनी केले होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम शहीद जवान कैलास पवार यांचे बंधू अक्षय पवार यांनी पुष्पहार अर्पण करीत कँडल पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच माजी नगरसेवक शाम शिंगणे, नारायण भोलवनकर,पत्रकार छोटु कांबळे,विक्की धनवे, युवा सेना उपशहर प्रमुख शंभू गाडेकर ,शिवसेना उपशहर प्रमुख रवी पेटकर ,बटी कपूर , सादिक भाई,शंकर देशमुख, भागवत इरतकर सर ,  विष्णुपंत घोंगे ,भगवान घोंगे ,कमलबाई  धनवे ,सत्यभामा भोळवनकर,तुपकर काकू, सागर गायकवाड, सतनाम वधवा  निलेश रुद्राक्ष, बबलू पठाण, अनिल जावरे ,शिरसाट सर, प्रतीक शेटे ,सौमेश  पैठणकर, राहुल उंबरकर ,सतीश जाधव ,  लक्ष्मण मोरे ,कुवरसिंग ठाकुर ,मोनु मोरे ,पवन मोरे, यांच्यासह अनेक पुरुष व महिलांनी पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. वीर जवान अमर रहे ..भारत माता की जय..या जयघोषणांनी परिसर दनदणुन गेला होता. ✍️मोहन चौकेकर

स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात 9 ऑगस्ट क्रांती दिन जल्लोषात साजरा..

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथे काँग्रेस च्या वतीने जळगाव शहरात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रॅलीकरीता उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम दुर्गा चौक येथे शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले तदनंतर शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विशवस्त स्व. शिवशंकर भाऊ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहीद जवान तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सतत अकरा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार स्व. गणपतरावजी देशमुख यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
देशभक्तीपर गीतांसहित, देशभक्तीपर नार्यानी जळगाव जामोदचा परिसर दुमदुमून गेला