Home Blog Page 423

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील विविध मागणीसाठी गजू कुबडे सोमवारपासून उपोषणावर

0

 

हिंगणघाट दि. 8 ऑगस्ट
हिंगणघाट उपविभाग क्षेत्र व आसपासच्या गोरगरीब जनतेच्या सुविधेसाठी असलेल्या येथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधेच्या पूर्ततेसाठी सोमवार दि 9 आगस्टपासून तीन दिवसांचे लाक्षणिक उपोषण करणार आहे.
महाराष्ट्र्र शासनाने ५० कोटी रुपयांची या उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभारलेली आहे.परंतु सद्यस्थितीत हे उपजिल्हा रुग्णालय हे अव्यवस्थेंचें आगार झालेले आहे.
या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी परिसरातील गोरगरीब जनता येत असते त्यामुळे या रुग्णालयाच्या सोयी सुविधेसाठी कोणताही नेता किंवा आमदार-खासदार तोंड उघडत नाही व ही दुर्दैवाची गोष्ट आहे असा त्यांचा आरोप आहे.
या उपजिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत प्रहारचे गजू कुबडे हे मागील दोन वर्षांपासून सरकार दप्तरी विविध मार्गाने समस्या मांडत आहेत.
प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडत नाही हे पाहून आता ९ आगस्टच्या क्रांती दिवसाचे निमित्ताने गजु कुबडे हे तीन दिवसांच्या आमरण उपोषणाला बसणार आहे. उपोषणाला आज सोमवारी सकाळी १० वाजे पासून उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर बसणार आहे.
यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास प्रहारच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गजू कुबडे यांनी दिलेला आहे.

विद्युत शॉक लागून म्हशींचा मृत्यू ,शेतकऱ्याचे हजारोचे नुकसान, भरपाई मिळण्याची मागणी -संग्रामपूर एमआयडीसी जवळील घटना.

0

 

संग्रामपूर -जळगांव जा रोडवरील एमआयडीच्या जवळील पडीत शेतात असलेल्या विद्युत पोलवरील विद्युत वाहिनीचा स्पर्श लागून दुधाळू म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 /आगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे ९०हजाराचे नुकसान झाले आहे. मात्र शेतकरी फेकल्याने त्याचा जीव वाचला. संग्रामपूर एमआईडीच्या परिसरात पेट्रोल पंप च्या मागील बाजूस लागूनच निरोड शिवारातील गट 46 हे लियाकत खाॕ ताजदर खाॕ यांचे शेत असून लागूनच एमआयडीसी चे पडीत जागा (शेत) असून त्यामध्ये म्हैस चरायला गेली असता विजेचा तार लोंबकळत होता त्यातून विद्युत पोलला सपोर्टिंग असलेल्या तारेला वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने म्हशीचा मृत्यू झाला. त्यात शेतकऱ्यांचे अंदाजे 90 हजाराचे नुकसान झाले. शेतकरी म्हैस पाहण्यासाठी गेला असता त्याला विजेचा झटका लागून फेकला गेल्याने त्याचा जीव वाचला. सदर घटना हि विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्ष पणामुळे घडलीचा आरोप शेतकऱ्यांनी केले आहे. त्यामुळे ह्या गरीब दुध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला विद्युत वितरण कंपनी कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

 

जागृती बुद्ध विहार येथे वर्षावासा निमित्त ग्रंथ वाच नाला सुरुवात

0

 

शेगाव तालुक्यातील ग्राम लासुरा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे पठन व वाचनाला सुरुवात करण्यात आली.
बौद्ध धर्मीय लोक आषाढ महिन्या मध्ये बुद्धाच्या संस्कृतीनुसार धम्म ग्रंथाचे वाचन करून धम्मा बद्दलची शिकवण अंगीकारून ज्ञान संपन्न करतात त्याच अनुषंगाने लासुरा येथील जागृती बुद्ध विहार समिती च्या वतीने यावर्षी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाचे वाचन म पठाण करण्यात येत आहे
यामध्ये वैशिष्ट असे की या ग्रंथाचे वाचन व पठण शालेय शिक्षण घेणारी मुलं करीत आहे याचे सर्व गावांमध्ये कौतुक होत आहे या ग्रंथाचे श्रवण करण्याकरिता गावातील महिला व पुरुष बहुसंख्यांनी उपस्थित राहतात
ग्रंथाचे वाचक मयूर धुरंधर सुमित जवंजाळ व विश्लेषक शुभम गवांदे हे करीत आहे या मुलांना मार्गदर्शन जागृती बुद्ध विहार समिती सातत्याने करीत आहे

आमदार राजेशभाऊ एकडे यांचा जनसंपर्क कार्यालय व निमगाव येथें संत शिरोमणी सावता महाराज याचे पुण्यतिथी निमित्त अभिवादन

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधि

दि७आँगषट२०२१रोजी माननीय आमदार श्री राजेशभाऊ एकडे यांच्या जनसंपर्क कार्यालय व.निमगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी मा.आमदार श्री राजेशभाऊ एकडे यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष माननिय लालाभाऊ इंगळे जिल्हा काँग्रेस कमीटिचे सरचिटणीस निलेशभाऊ पाऊलझगडे काँग्रेस नेते बंटी बावसकर सर.जिल्हा पुनर्वसन समीतीचे सदस्य तथा पातोंडा येथील.सरपंच पुरूषोत्तम भाऊ झाल्टे.काँग्रेस कमीटिचे उपाअध्क्ष आकाश वतपाळ. मधुकरभाऊ चरखे राजु हाडे. तुळशीराम चरखे. सचिन वावगे. विनोद भोपळे बाळुभाऊ भोपळे. नंदु इंगळे. निलेश भोपळे वबहुसंखेने कार्यकरते व नागरीक उपस्थित होते

स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ असेल – रविकांत तुपकर –मोहन चौकेकर

0

 

चिखलीत स्वाभिमानीचे हेल्पलाईन सेंटर व जनसंपर्क कार्यालय सुरू
चिखली : – चिखली तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी व बेरोजगार तरुणांच्या प्रशासकीय व इतर पातळीवरील कोणत्याही समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर हे हक्काचे व्यासपीठ व्हावे. आलेल्या प्रत्येक समस्याग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील यंत्रणा काम करेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर व जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.

चिखली येथे स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर व जनसंपर्क कार्यालयाचे सोमवार २ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना तुपकर बोलत होते. बुलडाणा येथे मागील दोन वर्षांपासून स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर सुरु आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे हजारो नागरिक, वियार्थी बाहेर जिल्ह्यात अडकून पडले होते. त्यावेळी बुलडाणा येथील हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून अडकून पडलेल्या नागरिकांना पासेस तयार करून त्यांना घरपोच पोहचविण्याची महत्वाची भूमिका पार पाडली. या शिवाय कोरोना बाधित शेकडो रुग्णांना रुग्णालयात भरती करून त्यांना बेड उपलब्ध करून देणे, रुग्णांना इंजेक्शन मिळवून देणे हे महत्वाचे काम स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून आम्ही केले. याशिवाय दररोज शेकडो शेतकरी, युवक व विद्यार्थी आपल्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम बुलडाणा येथे अविरतपणे सुरु आहे. बुलडाणा येथील सेंटरमध्ये ‘ऑन द स्पॉट’ शेतकरी व तरुणांच्या समस्या सोडविल्या जातात. याच धर्तीवर चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांना, तरुण व विद्यार्थ्यांना आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आता बुलडाणा येथे येण्याची गरज राहणार नाही. त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, शासकीय कार्यालयातील कामे चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून सोडविल्या जातील असेही रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा मा. आमदार स्व.गणपतराव देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच नितीन राजपूत यांचे चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ‘स्वाभिमानी’चे बबनराव चेके,विनायक सरनाईक, भारत वाघमारे, रामेश्वर अंभोरे, भागवत म्हस्के, अनिल वाकोडे, अनिल चव्हाण, अंकुश सुसर, विष्णू आखरे, नितीन अग्रवाल, संदीप मुळे, दत्ता पाटील, रशीद पटेल, विजय बोराडे, सचिन शिंगोटे, संतोष शेळके, सुधाकर तायडे, विठ्ठल चौथे, अमोल मोरे, अमोल तिडके, रवि मेहेत्रे, राधाकिसन भुतेकर, इरफान शेख, विठ्ठल सोळंकी, काशिनाथ बकाल, मयूर बोर्डे, भीमराव हिवरकर, सागर ठाकरे, बाळू पवार, बाळू पाटील, रविराज टाले, अविनाश झगरे, अच्युतराव वाघमारे, छोटू झगरे, उमेश राजपूत, प्रफुल्ल देशमुख, भागवत धोरण, शुभम डुकरे, निलेश नारखेडे, देवेंद्र आखाडे, गौतम सदावर्ते, दशरथ सदार, युनिस शहा सालीम शहा, अरविंद दांदळे, सोनू काळे, कैलास उतपुरे, मिथुन सावळे, मोहन चव्हाण, शुभम शेळके, नाना खटके, सुदर्शन वाघमारे, गोपालराव जाधव यांच्यासह स्वभिमानीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ✍️ मोहन चौकेकर

एक घाव दोन तुकडे, राजकारणात येणार तेजस ठाकरे? — मोहन चौकेकर

0

 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचं राजकारणात लाँचिंग होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतून लक्षवेधी पोस्ट सोशल मीडियावर करण्यात येत आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आधी सामना दैनिकात हटके शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरुनही तेजस ठाकरे यांना भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. “एक घाव, दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे” यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तेजस यांना ठाकरे कुटुंबियांचे व्हिव्हियन रिचर्ड्स संबोधत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ही जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. या शुभेच्छांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिवियन रिचर्ड्स हे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर असून त्यांची फलंदाजी जगभरात चर्चेत होती. जगभरातील गोलंदांचा कर्दनकाळ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे व्हिवियन रिचर्ड्स हे नाव नसून मोठ्या स्थानाचं विशेषण संबोधलं जातं. म्हणूनच, नार्वेकर यांची जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग दिसून येण्याची दाट शक्यता आहे.
माझी जशी तोडफोड सेना आहे, तशी त्याची तोडफोड सेनाच असेल, असं बाळासाहेब ठाकरे तेजसबद्दल म्हणाले होते. भाजपा नेत्याने शिवसेना भवन पाडण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेलाही पूर्वीचा आक्रमक बाणा दाखवावा लागणार आहे. त्यादृष्टीने पक्षबांधणी करायची असेल तर युवासेनेच्या शिलेदारांमध्ये जोश भरण्याची क्षमता तेजसमध्ये असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचं आणि वरुण सरदेसाई यांच्यावर युवा सेनेचा भार देण्याची चर्चा शिवसेनेत सुरु असल्याची चर्चा आहे. तर तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवसेना नव्या दमाच्या नेतृत्वाला सोबत घेऊन महापालिका सर करण्यासाठी डावपेच आखत असल्याचं स्पष्ट होत आहे. ✍️ मोहन चौकेकर

शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रसंगी कृषिदुत रेणुका डोसे व संजना डाबेराव

0

 

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या स्वा.वीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी रेणुका डोसे व संजना डाबेराव यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव या उपक्रमाअंतर्गत जस्तगाव येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पीक नियोजन व शेतीविषयक शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतीसंबंधी वेगवेगळ्या मोबाईल अप्लिकेशन चा तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चा वापर कसा करावा व त्यामधून पिकांची पडताळणी व तज्ञांचे मार्गदर्शन कसे मिळू शकते तसेच बदलत्या काळासोबत आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास उत्तम शेतीबरोबरच समाधानकारक आर्थिक उत्पन्न मिळू शकते हे पटवून दिले.कृषी दूतांनी कपाशीच्या पिकावर असलेल्या किडीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या याविषयी चर्चा केली. कृषिदूतांच्या या कार्याला जस्तगाव येथील प्रतिष्ठित शेतकरी तेजराव पाटील, रामदास डोसे, विजय पुंडे, दामोदर डोसे तसेच इतर शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला.या उपक्रमासाठी कृषीदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रम अधिकारी व वनस्पतीशास्त्र विषयतज्ञ प्रा. अविनाश आटोले सर, कार्यक्रम समन्वयक वि.टी. कपले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

जोर जांभळीतील पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेचा मदतीचा हात -मोहन चौकेकर

0

 

सातारा :अतीवृष्टी आणि महापुराने वाई तालुक्यातील जोर जांभळी परिसराची पार दुर्दशा झाली.. दुर्गम भाग असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचायला देखील अनेक अडचणी आल्या.. ही वस्तुस्थिती ओळखून परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मराठी पत्रकार परिषदने त्या भागातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला.. त्यानुसार पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि लोणावळा पत्रकार संघाने ही जबाबदारी उचलली. जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर आणि महिला संघटक श्रावणी कामत यांनी पुढाकार घेत जोर जांभळी परिसरात मदत पोहोचविण्याचा निर्णय घेतला.. त्यानुसार जावळी पट्ट्यातील गोळेगाव आणि गोळेवाडी येथील पूरग्रस्तांना ब्लॅकेट, सॅनिटरी नॅपकिन, आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हरिष पाटणे आणि श्रावणी कामत यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मदत स्वीकारताना पूरग्रस्तांना अश्रू अनावर झाले.. पत्रकारांनी केवळ बातम्या न पाठविता सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून केलेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. स्थानिक नागरिक सुनील गोळे आणि जितेंद्र गोळे यांनी मराठी पत्रकार परिषदेला धन्यवाद दिले.
चिपळूण, महाड, कणकवली, सावंतवाडी आणि आता जावळी परिसरातील पूरबाधितांना मदतीचा हात देऊन मराठी पत्रकार परिषदेने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श पत्रकार आणि समाजासमोर ठेवल्याचे मत हरिष पाटणे यांनी व्यक्त केले.. दत्ता मर्ढेकर यांनी आभार मानले.. यावेळी वाई परिसरातील पत्रकार, ग़ामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.. ✍️ मोहन चौकेकर

झीलच्या एमबीए विधार्थ्यांचे आंतरराष्टीय प्रोजेक्ट मध्ये उत्तुंग यश

0

 

झीलच्या एमबीए मध्ये शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्टीय प्रोजेक्ट मध्ये उतुंग यश संपादन केल्याबदल नुकताच या गुणवंत विधार्थ्यानाचा सत्कार करण्यात आला. ह्या प्रोजेक्ट मध्ये विध्यार्थ्यानी ऑनलाईन गूगल क्लासरूम च्या माध्यमातून पूर्ण केला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.पराग काळकर (अधिष्ठाता ,वाणिज्य व व्यवस्थापन शाखा,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),श्री रोहन सलगलकर,(व्यवस्थापकीय संचालक,अविरा इनसाइट्स, पुणे), श्री जयेश काटकर (सचिव, झील एजुकेशन सोसायटी,पुणे), श्री प्रदीप खांदवे (कार्यकारी संचालक,झील एजुकेशन सोसायटी,पुणे ) प्रा.उद्धव शिद (डायरेक्टर ऍडमिशन अँड अकॅडेमिकस ,झील एजुकेशन सोसायटी,पुणे ) तसेच डॉ.अश्विनी सोवनी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ.अश्विनी सोवनी यांनी नुसनतारा प्रोजेक्टची माहिती दिली.

यावेळी प्रा.जयेश काटकर यांनी या यशाबद्दल विधार्थ्यांचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.पराग काळकर यांनी प्रॅक्टिकल शिक्षण हि काळाची गरज आहे तरी विध्यार्थ्यानी अशा प्रोजेक्टच्या माध्यमातून कौशल विकसित करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

रोहन सलगरकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ऑनलाईन शिक्षणाचा वापर हा समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तसेच बदलण्याचा स्वीकार करण्यासाठी तसेच जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

झील एज्युकेशन सोसायटीच्या एमबीएच्या प्रथम वर्षातील विधार्थांची नुसनतारा या इंटरनॅशनल प्रोजेक्ट मध्ये भाग घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. या इंटरनॅशनल प्रोजेक्ट साठी झील एज्युकेशन सोसायटीतील एमबीए प्रथमवर्षात शिकत असलेल्या १८ विधार्थ्यांची निवड झाली होती.

सदरील प्रोजेक्टचा कालावधी हा २५ मार्च २०२१ ते १० जुन २०२१ एवढा होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना एआयबीपीएम या नामांकित संस्थेकडून “नुसनतारा प्रोजेक्ट” चे सर्टिफिकेट पण मिळाले आहेत.या प्रोजेक्ट मुळे विद्यार्थ्यांना जगभरातील १५ विद्यापीठातील विधार्थ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
सदर प्रोजेक्ट विध्यार्थ्यानी प्रा.डॉ.ऋषिकेश काकांडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला.

या प्रोजेक्ट मध्ये गीता टिळेकर, श्रद्धा विसपुते, विवेक उभे, विनया मारणे, गौरी भगत, शुभम जोशी, सायली दडवे, ऋषिकेश जंगम, रफीक़ मुलानी, मयूर कोल्हे, तन्वी धुरी, केल्विन सिबाचीनं, गौरी गायकवाड, अश्विन कांबळे, आकांक्षा रोकडे, आकांक्षा गाडे,विकी कामठे,अर्चना भागात या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या सर्व विद्यार्थ्यांनी जगभरातील १५ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थींसोबत काम करून हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर रिसर्च करून रिसर्च पेपर सादर केला आहे. उत्तम अशा रिसर्च पेपर ला स्कॉपस इंडेक्सड जर्नल्स मध्ये प्रकाशनाची संधी दिली जाणार आहे.तसेच सहभागी विद्यार्थ्यांना इंडोनेशिया आणि इतर अनेक देशात इंटर्नरशीप ची संधी सुद्धा मिळणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी,प्रा.विक्रांत नांगरे,प्रा.भावना खोत,प्रा.पांडुरंग पाटील,प्रा.धर्मेंद्र सिंग,प्रा.एकता तलवार आणि डॉ.आशिष व्यास यांचे सहकार्य लाभले.

शिल्पा सोनाले हिंगणघाट च्या नव्या उपविभागीय अधिकारी

0

 

हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांची उमरेड येथे बदली झाली असून यांच्या जागी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील शिल्पा संदेश सोनाले यांची बदली हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे झाली आहे ते सोमवारपासून कामावर रुजू होईल अशी माहिती मिळाली
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा