Home Blog Page 424

पुनर्वसन करतांना शेतकरी व ग्रामस्थांचे हित जोपासा-पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे

0

 

 

अरकचेरी व पेनटाकळी प्रकल्पच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात घेतला आढावा

अजहर शाह

बुलडाणा:-पेनटाकळी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसन करतांना ग्रामस्थांचे हित जोपासावे. तसेच अरकचेरी प्रकल्पात बाधित शेतजमिनीचे भूसंपादन करतांना तेथील शेतकऱ्यांचे हित जोपासत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या पश्चजलामुळे बाधित झालेल्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे पांढरदेव येथील घरांचे पुनर्वसन तातडीने होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, पुनर्वसन करतांना एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून या गावांचे पुनर्वसन करावे. पुढील 15 दिवसात गावकऱ्यांना प्लॉट वाटप करून त्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करावा. या गावाच्या पुनर्वसनाकरिता लागणार निधी लवकरात लवकर मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.
संग्रामपूर तालुक्यातील अरकचेरी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेत जमिनीचा सर्व्हे करून सयूंक्त मोजणी करण्यात यावी. हे काम करत असतांना कुठल्याही शेतकऱ्यांवर व ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी दिल्या. बेठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

विध्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व दिले पटवून

0

 

अजहर शाह

मोताळा :- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या स्वातंत्र्यवीर गणपती इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद या विद्यालयात स्थानिक विद्यार्थी कृषी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतात . या कृषी तंत्रज्ञानचा फायदा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना व्हावं या उद्देशाने विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन केले. रिधोरा शिवारातील दिगंबर चांगो मानकर यांच्या शेतात जाऊन विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांनी अति महत्वाच्या विषयावर माहिती दिली व चर्चा केली ते म्हणजे माती परीक्षण.दर सहा महिन्याला शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती परीक्षणाकरता प्रयोगशाळेत घेऊन जावी जेणेकरून शेतातील मातीची सुपीकता आपल्या लक्षात येईल व भरगोस उत्पादन घेण्यात शेतकरी सक्षम होईल असे विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.तसेच शेतातील मातीचा नमुना कसा घ्यावा याच प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले.
या वेळी परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य सहकार्य सुद्धा केले.विद्यालयातील विद्यार्थी योगेश गणेश देशमुख याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते व या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी योग्य सहभाग दिला.तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कृषी महाविद्यालय चे प्राचार्य श्री योगेश गवई कार्यक्रम अधिकारी श्री अविनाश आटोळे कार्यक्रम समन्वयक कु विद्या कपले यांचे मार्गदर्शन लाभले व महाविद्यालयातील माती विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ.न.एस.सदांशीव यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रभाग क्र 1जळगांव जामोद मधिल वायली वेस पासून,रुपलाल महाराज नगर तसेच नादर शहा प्लॉट मधून कब्रस्थान व बुऱ्हाणपूर रोड पर्यंत जाणारा जोडरस्ता बांधकाम करिता निधी उपलब्ध करुन नेण्यात यावा

0

 

गजानन सोनटक्के जळगांव जा

मा आ श्री गोपिकीशन बाजोरिया साहेब यांच्याकडे नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांची मागणी
दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी मा आ श्री गोपीकिशन बाजोरिया साहेब यांच्या दौऱ्या दरम्यान नगरसेवक तथा काँग्रेस सेवादल चे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण केदार यांनी प्रभाग क्र 1 मधून बुऱ्हाणपूर रस्त्याला जोडणारा जोड रस्त्याच्या बांधकाम करिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली असता मा बाजोरिया साहेब यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला व निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
ह्याप्रसंगी शिवसेना जिल्हा उप प्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख तथा गटनेते गजानन वाघ,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा न प गटनेते अर्जुन घोलप,नगरसेवक रमेश ताडे,कलीम खा हुसेन खा,खरेदी विक्री संस्थाचे संचालक संजय भुजबळ, युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप तालुका प्रमुख विशाल पाटील,शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख शेख चांद कुरेशी,शेख शरीफ कुरेशी, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते

भा.बौद्ध महासभा ता.नांदुरा चे वतीने ग्राम.खेरडा.येथे बुद्ध आणि धम्म या ग्रंथास भेट दिली

0

 

सूनिल पवार. नांदुरा ता.प्रतिनिधी

भा.बौद्ध महासभा ता.नांदुरा चे वतीने ग्राम.खेरडा येथे बुद्ध आनि त्या चा धम्म या.ग्रंथास सदीछा भेट दिली यावेळी ता.अधक्ष दिलिप मेढे. कोषाध्यक्ष निरंजन.तायडे उपाअध्क्ष. अशोक इंगळे सचिव अमोल मेढे. यशवंत वाकोडे.. निबांजि वाकोडे. तसेच रमेश वाकोडे धम्म ग्रंथासाठि गावकरी मंडळी बर्याच संख्येने उपस्थित होते या वेळी संजय सपकाळ व निरंजन तायडे यांनी प्रवचन केले इतर मान्य वरानि धम्म समजावून सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरंजन तायडे तर सुत्रसंचालन निबांजि वाकोडे यांनी केले व आभार धम्मपाल वाकोडे यानि केले

अकरावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी मध्यरात्री पासून बेपत्ता. पिंपळगाव काळे येथील घटना….

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा. प्रतिनिधी.

अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना दिनांक ६ ऑगस्ट रोजी पहाटे तीनला पिंपळगाव काळे येथे उघडकीस आली आहे. सदर घटनेची फिर्याद मुलीच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.फिर्यादी मुलीचे वडील पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर फिर्यादी ची मुलगी ही अकरावीत शिकत आहे. ती दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी शेतातून घरी आली.व रात्री जेवण करून सर्व झोपले असता आज पहाटे ३ वाजता फिर्यादी चा मुलगा पाणी पिण्यासाठी उठला असता त्याला ती अंथरुणावर दिसली नाही. त्यामुळे त्याने वडिलांना व आईला उठवले सर्वांनी तिचा गावभर शोध घेतला.मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी दिनांक ६ आँगष्ट च्या सकाळीच पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोण्यातरी अज्ञात इसमाने रात्रीतून आपल्या मुलीचे अपहरण केले असल्याची तक्रार जळगांव पोलीस स्टेशनला दिल्यावरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगांव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनास पी.एस.आय.प्रल्हाद मदन करीत आहे.

आमदार अंबादास दानवे यांच्या प्रयत्नातून घाणेगाव येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचा शुभारंभ — मोहन चौकेकर

0

 

संभाजीनगर / औरंगाबाद

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दादा दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा योजनेअंतर्गत गंगापुर तालुक्यातील घानेगाव येथील स्मशानभूमी सुशोभीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पटील बाळासाहेब दानवे प.स सभापती सुनील केरे पाटील यांच्या हस्ते करणयात आले.
याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश निश्चित उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर नवले संचालक श्रीलाल गायकवाड संतोष जोशी लक्ष्मण बहिर प्रवीण काळे गोविंद वल्ले विभाग प्रमुख प्रदीप सोनवणे सरपंच केशव गायके प्रकाश गोरे शाखाप्रमुख संतोष गायकवाड सुभाष बनकर सागर सातपुते बंडू दूबे सुरेश गायकवाड सोपान सातपुते हरिश्चंद्र मोरे सागर दुबे नारायण बनकर सचिन काळवणे तात्याराव राऊत विलास दौंड आदी शिवसैनिक पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. ✍️ मोहन चौकेकर

आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून आपेगाव येथे सिमेंट काँक्रीट रोड व पेवर ब्लॉक बसवणे कामाचे भूमिपूजन संपन्न – मोहन चौकेकर

0

 

संभाजीनगर / औरंगाबाद

शिवसेना प्रवक्ते,जिल्हाप्रमुख , आमदार अंबादास दादा दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा योजनेअंतर्गत गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथे सिमेंट काँक्रीट रोड व पेव्हर बॉल्क बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पटिल, बाळासाहेब दानवे, प.स सभापती सुनील केरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आपेगाव परिसरातील नागरिकांना चांगला रस्ता नसल्यामुळे येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता या भागातील नागरिकांनी तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी चांगला रस्ता व्हावा यासाठी आमदार अंबादास दानवे यांच्याकडे मागणी केली होती या मागणीची तात्काळ दखल घेऊन जनसुविधा योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड व पेव्हर ब्लॉक बसविणे कामाची त्वरित सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश निश्चित, ज्ञानेश्वर नवले, संचालक श्रीलाल गायकवाड, संतोष भाऊ जोशी, लक्ष्मण बहिर, प्रवीण काळे, गोविंद वल्ले, विभागप्रमुख प्रदीप सोनवणे मा सरपंच मनसुख जाधव मच्छिंद्र शेवगट रामेश्वर जाधव चंद्रकांत जाधव अशोक जाधव कृष्णा जाधव अशोक घोगरे नितीन आढाव रामेश्वर जाधव सतीश जाधव चव्हाण मॅडम ग्रामसेवक आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

उत्कृष्ठ तहसीलदार म्हणून सन्मानित झाल्याबद्दल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार राहुल तायडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार

0

 

नांदुरा:-(प्रफुल्ल बिचारे):

तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री. राहुल तायडे हे गेल्या २-३ वर्षांपासून नांदुरा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या कर्तव्याचे ते काटेकोरपणे पालन करतात परंतु याव्यतिरिक्त ही ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. जसे की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे, समाजउपयोगी कार्यात भरभरून मदत करणे.या सर्व कर्यांची दखल घेत दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजी नांदुरा येथील तहसीलदार श्री राहुल तायडे यांना बुलडाणा येथे मा.जिल्हाधिकारी एस राममूर्ती,अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते महसूल वसूली,महाराजस्व अभियान,सातबारा संगणकीकरण,नैसर्गिक आपत्तीत, कायदा व सुव्यवस्था,दंडाधिकारी यांची कामे इत्यादी महत्त्वाची भूमिका योग्यरीत्या पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल उत्कृष्ठ तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आले.यामुळे भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांचा शाल,श्रीफळ,हार,टोपी घालून सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री अनंत लाहुडकार, दिलीप इंगळे, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल बिचारे,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका उपाध्यक्ष योगेश धोटे,भागवत दाभाडे,नांदुरा शहर उपाध्यक्ष नजीर रजवी,अरुण सुरवाडे, सुशील इंगळे,रतन डोंगरदिवे व इतर पत्रकार उपस्थित होते.

वंचीत बहुजन आघाडी , जळगांव जा चे विवीध मागण्यांसाठी निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

वंचीत बहुजन आघाडी जळगांव जा च्या वतीने दि. ०६/०८/२०२१ ला नागरीकांच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात जुलै महीन्यात अतीवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. शेतजमीन भरडुन गेली. शेतातील पिके नेस्तनाबुत झाली. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात शेतीत ऊसाचे पिक वाया गेले. शेतात सुपीक मातीच राहली नाही. शेतकरी व शेतमजुर आर्थीकदृष्ट्या खचुन गेलेत. परीणामी पुरग्रस्त उस उत्पादक शेतकरी ज्या साखर कारखान्याचा सभासद आहे त्या कारखान्यानी शेतक-यास उचीत आर्थीक मदत द्यावी. पुरग्रस्त नागरीकांना जिवन जगण्यासाठी आवश्यक सुवीधांची तात्काळ पुर्तता करावी. शेतक-याच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना वाढीव मदत द्यावी. दुबार पेरणी शक्य नसलेल्या ठिकाणी शेतमालाच्या बाजारमुल्या प्रमाणे एकरकमी मदत जाहीर करावी. ज्यांची घरे पुराच्या पाण्यात वाहुन गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.पुराच्या पाण्यात नागरीकांची महत्वाची कागदपत्रे जसे आधार कार्ड , रेशनकार्ड , मतदान कार्ड , शैक्षणीक दाखले हे सर्व मिळण्यासाठी शासकीय स्तरावर एकाच ठिकाणी विनामुल्य व्यवस्था करावी. पुरग्रस्त भागात साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजना कराव्यात.
तसेच जळगांव जा. तालुक्यातील शेतक-यांची पिक कर्जाची प्रकरणे बॅंकांमधे प्रलंबीत आहेत करीता बॅकांना आदेश देवुन तात्काळ पिककर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश बॅंकाना द्यावे. ब-याच शेतक-यांनी दुबार पेरणी केलेली आहे अशा शेतक-यांना पंचनामा करुन हेक्टरी मदत द्यावी. सन २०२०-२१ वर्षातील पिकविम्याची रक्कम सरसकट विनाविलंब शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. कोरोना काळातील घरघुती व शेतीचे विजबिल माफ करण्यात यावे अशा विवीध रास्त मागण्यांसाठी वंचीत बहुजन आघाडी जळगांव जा. च्या वतीेने शासनाला तहसीलदार साहेब जळगांव जा. यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी जेष्ठनेते रामकृष्ण रजाने माजी राज्यसचीव , बाबुराम तायडे माजी अध्यक्ष , नारायण पवार , मधुकर भगत , सुगदेव वानखडे , तालुकाध्यक्ष संतोष गवई , ज्ञानेश्वर कोकाटे , प्रदीप मोरखडे , विजय सातव सचीव , विशाल तायडे शहराध्यक्ष , विजय सोनोने , राजाराम पवार , बाबुराव पवार , विलास इंगळे , राहुल धुंदाळे , मंगेश करांगळे , साहेबराव वानखडे , विनोद वानखडे , योगेश वानखडे , अश्विन वानखडे , गौतम वाकोडे , धम्मदिप धुंदाळे , दिनकर इंगळे , ओंकार इंगळे , चिंतामण मांडोकार , रामदास दामोदर ,अंबादास पारवे , संजय इंगळे , सुनिल इंगळे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देतांना हजर होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा मार्गावर एका ठिकाणी छापा टाकुन ६३ हजार रूपयांचे गावठी दारूचे रसायन व एका चारचाकी मोटर वाहनासह एका संशयीताला ताब्यात घेतले आहेत.

0

 

यावल प्रतिनिधि विकि वानखेड़े

दरम्यान, यावल तालुक्यात अन्न व औषद्य प्रशासन विभागाच्या अर्थपुर्ण दुर्लक्षित कारभारामुळे तालुक्यात सर्वत्र महिन्याला लाखो रुपयांच्या गुटक्याची सर्रासपणे विक्री होत आहे. त्याचे काय असा प्रश्न नागरीक करीत आहे. मागील तीन ते चार वर्षापासून शेजारच्या गुजरात आणि मध्यप्रदेश या परप्रांतातुन विविध खाजगी वाहनाने गुटक्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जात असून सर्रासपणे तालुक्यातील यावल शहर फैजपुर शहर व इतर मोठी गावे या ठिकाणी सुमारे ३० ते ४० लाखांचा गुटका पानमसाला मोठ्या प्रमाणावर विकण्यात येत आहे. अगदी सहज कोणत्याही पानटपरी असो किंवा गल्लीबोळातील छोट्यातली छोटी किराणा दुकान या ठिकाणी काही मिळो न मिळो मात्र गुटका पानमसाला हा आर्वाजुन मिळत असतो.

सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार खालपासुन तर वरपर्यंत सर्वांना वेळेवर हप्ते मिळत असल्याने याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य उत्पादनची काल झालेली कार्यवाही म्हणजे अर्थकारणाचे हिशोबाचे गणीत चुकत्याने उशीरा सुचलेले शहाणपण असेच म्हणावे की काय असा प्रश्न नागरीक करीत आहे. दरम्यान आज ही यावल शहरात आणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावटी दारू व पनीची दारू खुलेआम शहरातील विविध ठिकाणी व गावागावात राजरोसपणे विक्रीला जात असल्याने अनेक अल्पवयीन मुलं ही व्यस्नाधीन होत असुन त्यांच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. त्यावेळी राज्यउत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई ही नुसता देखावा असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.