Home Blog Page 425

यावल नगर परिषदने पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी : युवक राष्ट्रवादीची निवेदनाद्वारे मागणी.

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

। येथील नगर परिषदच्या माध्यमातुन राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुललाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल शहर शाखेतर्फे अध्यक्ष हितेंद्र गजरे यांनी नगर परिषद यावल कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे

येथे यावल शहरातील मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना नगरपालिकेकडून घरकुलाचे बांधकाम पंधरा दिवसाच्या आत चालू करण्यात यावे, अन्यथा आपले घरकुल रद्द करण्यात येईल अशा नोटिसा लाभार्थ्यांना देण्यात आल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी बांधकाम परवानगी, त्या कामी कागदपत्राची पूर्तता, आर्थिक व्यवस्था, अशा बाबींची पूर्तता करावी लागते. परंतु मागील दीड वर्षापासून या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन असल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लाभार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वाळू उत्खननावर बंदी असल्याने बांधकाम करण्यास लाभार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहे. अशा विविध अडचणींमुळे लाभार्थ्यांची घरकुल बांधकाम सुरुवात झालेली नाहीत. नागरिक बांधकाम करण्यास इच्छुक असून देखील त्यांची नावे नगरपालिकेकडून वगळण्यात येणार असल्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. मंजुर यादीत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा कागदपत्र व इतर आर्थिक अडचणी असलेल्या इच्छुक लाभार्थ्यांना अधिक वेळ मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. ज्या लाभार्थ्यांची कामे सुरू आहेत, अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ते देण्यात यावे. असे निवेदन येथील नगर परिषदेला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र गजरे, समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नरेंद्र शिंदे आदींनी दिले.

मनोजभाऊ दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जामठी ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या वतीने वृक्षारोपण संपन्न – मोहन चौकेकर 251 वृक्ष लागवड करून होणार निसर्ग संवर्धन 

0

 

दांडगे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा नोंदविला वृक्षरोपनात सहभाग

जामठी:-निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून,निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल बुलढाणा मा.मनोजभाऊ दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जामठी ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या वतीने वृक्षारोपण सोमवार दि.02/08/2021 ला संपन्न झाले.यावेळी ज्ञानदेवराव बापू दांडगे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड क्रॉप सायन्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा वृक्षारोपण यात सहभाग नोंदविला होता व त्यांच्या हस्ते सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच कोरोनाच्या कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. याचे महत्व पटवून देण्यासाठी व याच गोष्टीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा मनोजभाऊ दांडगे नेहमी वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतात याचेच उदाहरण म्हणून त्यांनी जामठी ग्रामपंचायत व वनविभाग जामठी यांच्या संयुक्त विद्यमाने जामठी माळरानात सरकारी जागेत 251 वृक्ष लागवड करून झाडे लावा,झाडे जगवा संदेश सर्वाना दिला आहे.याआधी सुद्धा जामठी ग्रामपंचायत ने विविध सामाजिक उपक्रम केले आहे.
याप्रसंगी मनोजभाऊ दांडगे,सरपंच बिलाल गायकवाड,ग्रामसेवक शिंदे साहेब,तलाठी शेवाळे मॅडम,राष्ट्रवादी युवा नेते संतोष भाऊ दांडगे,दांडगे ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य डवले सर,मराठी पूर्व व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक खर्चे सर सह सर्व शिक्षक वृंद,वनपरिक्षेत्र अधिकारी टेकाळे साहेब,वनपाल आंबेकर साहेब,वनरक्षक मुळे साहेब,ग्रामपंचायत उपसरपंच कौतिकराव नरोटे,सदस्य,माजी सरपंच भगवान तायडे,राष्ट्रवादी नेते जक्का सेठ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली विधानसभा उपाध्यक्ष रामेश्वर पाटील तायडे,रामकृष्ण तायडे पोलीस पाटील जामठी,राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष निर्मला ताई तायडे,माजी सरपंच मंगेश तायडे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेल चे तालुका कार्यध्यक्ष बुलढाणा गणेश तायडे पाटील,मनोहर तायडे पाटील,रमेश पाटील तायडे,विलास संतोष राव तायडे,समाधान पाटील तायडे,संजय माणिकराव तायडे,जितेंद्र पाटील तायडे,संदीप तायडे पाटील,संदीप भाऊ सोनुने,गजानन तायडे पाटील,आलीम खान,अमीन खा साहब,अजू पाटील तायडे,संदीप भाऊ तायडे,विष्णू भूक धांडे,गणेश पवार,समाधान कल्याणकर,तेजराव रावळकर, राजू भाऊ सोनुने,अमीन खान,विजय तायडे पाटील,हर्षल तायडे,मोहन तायडे,राजेश तायडे,भरत तायडे,भागेश तायडे,समाधान म्हस्के,विनोद रावळकर,अंकुश तायडे,महेश तायडे,शुभम तायडे,विठ्ठल तायडे,दिनेश अवसारमोल,नारायण गायकवाड, विनोद गणेश तायडे,विनोद गायकी,विजय समाधान तायडे,विशाल तायडे,रवी तायडे,गजानन मालोदे, राजेंद्र शेषराव तायडे,टिनू तायडे,अनिल गायकवाड,तुळशीराम पवार,विनोद गायकवाड, शुभम तायडे,विनोद प्रकाश तायडे,जफ्फर सेठ,सिकंदर बर्डे,अमोल तायडे,हरी गायकवाड, मोहम्मद खान,सुभाष तायडे,विलास थोरात,नामदेव अंभोरे,मधुकर तायडे,सुजित तायडे,सुजित तायडे,गोपाल तायडे,पांडुरंग रावळकर, श्रीकृष्णा थोरात,रामदास कडूबा तायडे,पिंटू पवार,गणेश ठाकूर,बाळू तडवी,अंगणवाडी सेविका जामठी,आशा सेविका,गावातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. ✍️ मोहन चौकेकर

शिवसेनेची तब्बल 22 दिवसांची शिवसंपर्क मोहीम संपन्न – मोहन चौकेकर

0

 

संभाजीनगर / औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्याच आदेशाने पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे , शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई , चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर / औरंगाबाद जिल्हाभरात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली 11 जुलै चे 1ऑगस्ट पर्यंत शिवसंपर्क मोहीम राबविण्यात आली, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी या ठिकाणी या मोहिमेचा समारोप करण्यात आला. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने तसेच जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने अनेक संघटनात्मक उपक्रम बैठका , विकास कार्यांचा धडाका या मोहिमेत करण्यात आला आला. संभाजीनगर/ औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल 68 पंचायत समिती गण ,34 जिल्हा परिषद गट, 4 नगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग संभाजीनगर / औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल 115 पैकी 106 वॉर्ड , कॅन्टोन्मेंट परिसरातील 7 वॉर्डसह , मुस्लिम समुदायाच्या 3 बैठका , यासह विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्त्यांनी या मोहिमेच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला अनेक विकासकार्याची सुरुवात समाजोपयोगी उपक्रम या मोहिमेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडी, युवासेना , सर्व अंगीकृत संघटनां या मोहिमेत सहभागी झाल्या त्यात प्रामुख्याने वाहतूक सेनेचे 3 शाखा सुरू करण्यात आल्या साडेतेरा हजार (13500 ) शिवसैनिक या अभियानात प्रत्यक्ष सहभागी झाले त्याचप्रमाणे इतर उपक्रमच्या माध्यमातून दोन लक्ष (२,०००००) नागरिकांपर्यंत ही मोहीम जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी पोहोचवली या मोहिमेत प्रामुख्याने मा मंत्री महोदय संदीपान भुमरे , मा मंत्री महोदय अब्दुल सत्तार , महिला आघाडी संपर्क संघटक मानिषाताई कायंदे,आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट , रमेश बोरणारे , उदयसिंह राजपूत सहसंपर्कप्रमुख त्रिंबक तुपे , उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे , अविनाश पाटील,बाबासाहेब जगताप , संतोष काळवणे , राजू राठोड , संतोष जेजुरकर , जयवंत ओक , अनील पोलकर , राजेंद्र राठोड , अवचित वळवळे , विनायक पांडे , आनंद तांदुळवाडीकर , बाप्पा दळवी , तालुका प्रमुख दिनेश मुथा , राजू वरकड , केतन काजे ,
सुभाष कानडे , हनुमान भोंडवे , सचिन वाणी , आबा काळे
शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे , विश्वनाथ स्वामी , बाबासाहेब डांगे विधानसभा संघटक राजू वैद्य ,सुशील खेडकर , गोपाळ कुलकर्णी , डॉ अण्णा शिंदे , गणेश अधाने ,दिलीप मचे, माजी महापौर नंदकुमार घोडेले माजी उपमहापौर
युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ , ऋषिकेश खैरे , सभागृहनेता विकास जैन युवासेना जिल्हाअधिकारी हनुमान शिंदे महिला आघाडीच्या संपर्क संघटक कला ओझा , सहसंपर्क संघटक सुनीताताई आऊलवार ,जिल्हा संघटिका सुनीता देव, राखीताई परदेशी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य ,नगरपालिका लोकप्रतिनिधी, महानगरपालिका लोकप्रतिनिधी आदी शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.
या शिवसंपर्क मोहिमेमुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले. ✍️ मोहन चौकेकर

पाणी आडवा पाणी जिरवा, चिंचाळा येथील विद्यार्थी दिला संदेश

0

`जल संरक्षणाची करा तयारी, होणार आहे वर्षा भारी

पाणी है निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली अनमोल भेट आहे, आणि याचे मूल्य लावणे कठीण आहे. पाण्याशिवाय जीवनाचे महत्त्व नाही, आणि अस्तित्व ही नाही मग ते जीवन प्राण्यांचे असो वा मनुष्याचे. परंतु आजच्या आधुनिक युगात माणसाच्या निष्काळजीपणामुळे  धरतीवर पाण्याची कमी सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्याचा परिणामस्वरूप आज खूप सारे ठिकाण पाण्याच्या आभावाने कोरडे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणी लोक स्वच्छ पाण्यासाठी तळमळ करीत आहेत.
जर भविष्यात होणाऱ्या जल संकटांपासून वाचायचे असेल तर सर्वप्रथम सर्व लोकामध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल. आज मानवाने आपल्या चुकांमुळे निसर्गाला खूप क्षति पोहचवली आहे, म्हणून जर येणाऱ्या पिढ्यांचे अस्तित्व वाचवायचे असेल तर पुढील उपाय करणे आवश्यक आहे.
उपस्थित , पियुष भोगेकर, आदित्य निकुरे ,तृप्तेष माशिरकर, राहुल रामटेके,अनुराग भोगेकर , गणेश मानकर, मयुर नरूले

शैक्षणिक फी 50% माफ करणेबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन

0

 

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना चे सावट पसरले आहे. ज्यामुळे शाळा कॉलेजेस अजून सुद्धा बंदच आहे पण खासगी शिक्षण संस्था मार्फत फी आकारणे सुरूच आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचा 15% एवढी खासगी संस्थान कडून फी माफ करण्याचा विचार सुरू असला तरी शाळा कॉलेजेस बंद असल्याने आणि कोरोना मुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले असल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे उपकरणे आणि खर्च सर्व सामान्यांना अकरण्या जोगा नाही …
तरी खासगी संस्था कडून 50% एवढी शैक्षणिक फी माफ करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू व त्याची जवाबदारी शासनाची राहील अश्या आशयाचे निवेदन जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री साहेबांना आज 6 ऑगस्ट रोजी देण्यात आले.. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसिलदार किसन सुर्यवंशी यांनी स्विकारले
निवेदन देते वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटनीस वैभव अढाव

भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किर्तेश अग्रवाल
नगरसेवक आशिष भैया सारसर
युवा मोर्चा शहर संगटक गौरव डोबे
युवा मोर्चा शहर सरचिटणीस मयूर खंडाळे अभिषेक देशमुख
विनायक हिस्साल ओम कपले ऋषिकेश सुतोने श्याम टावरी कार्तिक दीक्षित आशुतोष भोपळे नीरज राजपूत पवन रोठे गौरव बैरागी योगेश केदार प्रथमेश फंडाळे मयूर मुळतकर अदनान खान

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे पायाभूत सुविधा वाढविणार – वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांचे आश्‍वासन

0

 

वसतीगृहाची क्षमता वाढवावी व रिक्‍त पदे तातडीने भरावी – आ. सुधीर मुनगंटीवार

 

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरच्‍या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्‍यासाठी संबंधित यंत्रणांना त्‍वरीत निर्देश देण्‍यात येईल तसेच याठिकाणी पायाभूत सुविधा वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांनी दिले.

दिनांक ४ ऑगस्‍ट रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांची भेट घेतली व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर बाबत विस्‍तृत चर्चा केली. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथील वसतीगृहाची क्षमता १०० हून १५० इतकी वाढविण्‍याबाबत तसेच साधन सामु्ग्री सुध्‍दा वाढविण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्‍यान केली. वसतीगृह क्षमता व साहित्‍य सामुग्री त्‍वरीत वाढविण्‍याचे आश्‍वासन यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री यांनी दिले. याठिकाणी वर्ग १ ते वर्ग ४ च्‍या संवर्गातील महत्‍वपूर्ण पदे मोठया प्रमाणावर रिक्‍त आहेत. सदर रिक्‍त पदे भरण्‍याबाबत आपण सातत्‍याने विधानसभेच्‍या माध्‍यमातुन शासनाचे लक्ष वेधले. उपमुख्‍यमंत्र्यांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत रिक्‍त पदे भरण्‍याचे निर्देशही दिले होते. मात्र सदर रिक्‍त पदे अद्याप भरण्‍यात आलेली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा फटका सर्वसामान्‍य रूग्‍णांना तसेच वैद्यकिय शिक्षणाला सुध्‍दा बसत आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर हे चंद्रपूरकरांचे स्‍वप्‍न आहे. यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देत त्‍वरेने कार्यवाही करण्‍याची विनंती आ. मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षणमंत्री यांना केली.

पारिजात इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व पंचायत समिती कृषी विभाग जळगाव जामोद यांच्या मार्फत कपाशी पीक पाहणी कार्यक्रम संपन्न…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रा.ली. व पंचायत समिती कृषी विभाग जळगांव जा यांच्या मार्फत शेतकरी ऋषिकेश मधुकर येऊल यांच्या शेतात कपाशी चा पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात आला…
कपाशी पीक पाहणी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर माननीय कृषी अधिकारी श्री रवी नावकार साहेब तसेच पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रा ली चे डॉ निकिता अवस्थी (पोर्टफोलिओ मॅनेजर,महाराष्ट्र) रिझवान पटेल (मार्केटिंग मॅनेजर,विदर्भ) आशिष खंडारे (टेरटरी मॅनेजर,बुलढाणा) योगेश येऊल (सेल्स ऑफिसर) तसेच, श्री सुखकर्ता कृषी केंद्र, सूनगांव याचे प्रो. प्रा. श्री गजानन वंडाळे, व प्रफुल कावरे, कृषिमित्र मोहन राजपूत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,,,,
तसेच श्री मधुकर येउल , रवी नानगदे, श्रीराम येउल असे 30 ते 35 शेतकरी उपस्थित असून त्यांना कृषी अधिकारी नावकर साहेब यांनी फवारणी करताना कशी काळजी घ्यावी त्या बद्दल मार्गदर्शन केले, व परिजातच्या डॉ निकिता यांनी शेतकरी बांधवांना प्रोडक्ट बद्दल माहिती दिली… आणि पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना सुरक्षा किट वाटप करण्यात आली….

युवक काँग्रेसचे मासिक बैठक संपन्न

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधी

दि.५/८/२०२१ला विधानसभा अध्यक्ष बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती बैठक मध्ये पुढे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक पाहता ग्राउंड लेवल पर्यंत काँग्रेस पक्ष कसा काम करेल आणि गाव तेथे शाखा चे नियोजन कसे करावे याचा.वर चर्चा झाली१बुथ१०यूथ या नियोजनाने युवक काँग्रेस.तालुक्यातील प्रत्येक बुथ पर्यंत पोहचनार जिल्हा यूवक काँग्रेसचे संभाजी भाऊ शिर्के यांनी यूवक काँग्रेस चे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले त्या वेळि विधानसभा उपाअध्क्ष राजु हाळे. वशिम भाई. ता.अ.डामरे. जिल्हा. सचिव. संदिप पाटील यूवक काँग्रेसचे शुभम लांडे शिवा.मानकर रुशिकेश देशमुख. वैभव साबे महेंद्र देशमुख गनेश देशमुख. सुपडा भगत. सरदार व यूवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

नगरपरिषदच्या वतीने शहीद जवान कैलास पवार यांच्या सन्मानार्थ स्मारक बनवणार – सौ. प्रियाताई कुणाल बोंद्रे – मोहन चौकेकर

0

 

चिखली : कारगीलच्या द्रास सेक्टरमध्ये तैनात असलैल्या भारतीय लष्करातील चिखली येथील जवान कैलास भारत पवार यांना सुटीवरुन घरी परतत असतांना ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने १ ऑगस्टं रोजी वीरमरण आले होते. आज दि 4 ऑगस्टं रोजी चिखलीच्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीदाप्रती आपल्या संवेदना व्यक्तं करतांना नगराध्यक्षा सौ. प्रियाताई कुणाल बोंद्रे व सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्या वतीने शहीद जवान कैलास पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिखली शहरामध्ये त्यांचे भव्यं स्मारक उभारणार असल्याचे एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
भारतीय जवान आपल्या प्राणांची बाजी लावून देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यांच्यामुळे आपण आपल्या घरात निश्चींतपणे राहू शकतो याचे भान प्रत्येक भारतीयाने बाळगणे आवश्यक आहे. स्थानिक गजानन नगर येथील रहिवाशी असलेला कैलास भारत पवार हा जवान कारगीलच्या द्रास सेक्टरमध्ये आपल्या कर्तव्यावर होता. आपला एक वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्यावर पुढील सहा महिण्यांसाठी घरी परतत असतांना ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने १ ऑगस्टं रोजी वीरमरण आले होते. आज दि 4 ऑगस्टं रोजी चिखलीच्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्थानिक स्व भाऊसाहेब फुंडकर मार्गावरील असलेल परीसरात शहीदासाठी स्मारक उभारण्यात येणार आहे त्यांसदर्भात आवश्यकं ती कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष सौ. प्रियाताई कुणाल बोंद्रे यांनी सांगीतले. ✍️ मोहन चौकेकर

स्व. संतोष पवार यांच्या नावे परिषदेचा पुरस्कार ; उत्तम कार्य करणारया जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना “संतोष पवार उत्कृष्ट जिल्हा प्रसिध्दी प्रमुख” पुरस्काराने सन्मानित करणार – मोहन चौकेकर

0

 

मुंबई दि. ५: सर्वोत्कृष्ट काम करणारया जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना मराठी पत्रकार परिषदेचे दिवंगत सरचिटणीस संतोष पवार उत्कृष्ट जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज केली..दरवर्षी ३ डिसेंबर रोजी म्हणजे परिषदेच्या वर्धापन दिनी या पुरस्काराची घोषणा करण्यात येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले..
मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील प्रत्येक जिल्हयात एक प्रसिद्धी प्रमुख नियुक्त केला आहे.. या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची महत्वाची ऑनलाईन बैठक आज पार पडली.. बैठकीत एस.एम.देशमुख यांनी ही घोषणा केली.. परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी बैठकीस मार्गदर्शन केले..
परिषदेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, मात्र या उपक्रमांना योग्य प़सिध्दी मिळत नसल्याने त्याची माहिती जनता आणि सर्व सामांन्य पत्रकारांपर्यत पोहोचत नाही..परिषदेच्या आणि जिल्हा संघांच्या कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी यासाठी प़सिध्दी प्रमुखांनी प़यत्न करावेत अशी सूचना किरण नाईक यांनी केली.. त्यासाठी सोशल मिडियाचा जास्तीत जास्त वापर केला जावा अशा सूचना त्यांनी केल्या.. .. प्रत्येक जिल्हयात जिल्हा संघाचा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप असावा आणि त्यावर परिषदेच्या पदाधिकारयांना घेतले जावे असे अध्यक्ष गजानन नाईक यांनी स्पष्ट केले.. ..
जिल्हा पत्रकार संघ आणि परिषद यांच्यातील महत्वाचा दुवा या भूमिकेतून जिल्हा प़सिध्दी प्रमुखांनी काम करावे असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले.
परिषदेच्यावतीने सर्व जिल्हा प़मुख, विभागीय सचिव, उपाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारयांना लवकरच ओळखपत्रं दिली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले..
बैठकीस राज्यातील २९ जिल्ह्याचे प्रसिध्द प्रमुख उपस्थित होते.
पूरग्रस्त भागातील जनतेला मदत व्हावी यासाठी विविध जिल्हा संघांनी विशेष प़यत्न केले, महाड आणि पोलादपूर मधील पूरग्रस्त पत्रकारांना रायगडच्या पत्रकारांनी मदत केली त्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी सर्व जिल्हा संघांना धन्यवाद दिले आहेत.. .
कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी सर्वांचे आभार मानले..

संतोष पवार यांचा अल्प परिचय
संतोष पवार हे माथेरानचे सकाळचे प्रतिनिधी होते.. त्यांचं स्वतःचे महाराष्ट्र माझा नावाचे चॅनल आहे.. रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष राहिलेल्या संतोष पवार यांनी परिषदेचे कोकण विभागीय चिटणीस आणि मग परिषदेचे सरचिटणीस म्हणून काम केले.. राज्य अधिस्वीकृती समितीवरही त्यांनी परिषदेचे प़तिनिधी म्हणून काम केले होते.. परिषद भक्कम व्हावी यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे..चांगले संघटक असलेल्या संतोष पवार यांना कोरोना झाल्यानंतर ऑक्सीजन न मिळाल्याने काही क्षणातच त्यांचे निधन झाले.. त्यांचे योगदान परिषद विसरू शकत नाही.. त्यामुळेच त्यांचे कायम स्मरण राहावे यासाठी मराठी पत्रकार परिषदेने संतोष पवार यांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. ✍️ मोहन चौकेकर