Home Blog Page 426

पत्रकारांच्या विधायक कामाने पत्रकारांविषयी समाजाच्या दृष्टीकोनात बदल होत आहे ; जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन -मोहन चौकेकर

0

 

बुलढाणा : समाजामध्ये काही प्रमाणात पत्रकारांप्रती प्रतिकुल भावना व कपाळावर आठी दिसू दिसून येते. परंतु बीड, रोहा, रायगड, रत्नागिरीसह अ.भा. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या राज्यातील काही जिल्हा पत्रकार संघांनी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना केलेली तातडीची मदत ही अभिनंदनीय व कौतुकास्पद बाब असून अशा कामाने पत्रकारांप्रती समाजाच्या दृष्टीकोनात बदल व मतपरिवर्तन होण्यास मदतच होईल’’ असे प्रतिपादन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या महत्वपूर्ण ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.

दीड तास चाललेल्या या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील प्रसिद्धीप्रमुख सहभागी झाले होते.

जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना मार्गदर्शन करतांना एस.एम.देशमुख पुढे म्हणाले, 82 वर्षाची परंपरा असलेली मराठी पत्रकार परिषदेने नेमलेले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हे परिषदेचे कान व डोळे असून दिवसातून काही मिनिटे परिषदेला द्या, आपण पाठविलेली बातमी छापून आली नाही म्हणून खचून जावू नका, बातमी पाठवित रहा, प्रसारमाध्यमांशी सलोख्याचे संबंध ठेऊन संपर्कात रहा व त्यांना पत्रकारांसाठी करीत असलेल्या परिषदेच्या कामाची माहिती देऊन भूमिका समजावून सांगा. आपले काम लेटर पॅड, व्हिजीटींग कार्ड यापूरते मर्यादित न ठेवता विधायक कामात सक्रिय राहून एका जिल्ह्याचे काम दूसऱ्या जिल्ह्यात कळेल या दृष्टीने कार्यरत रहावे असे आवाहन करीत लवकरच 36 जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना ओळखपत्र प्रदान करण्यात येतील व येत्या 3 डिसेंबर रोजी उत्कृष्ठ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखाची निवड करण्यात येईल अशी घोषणा एस.एम.देशमुख यांनी समारोप प्रसंगी केली.

परिषदेचे मुख्य विश्वस्त किरण नाईक यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले, प्रसिद्धी प्रमुखांनी प्रत्येक तालुक्याशी सतत संपर्कात रहावे. जनसंपर्क म्हणून काम करावे. परिषदेच्या माध्यमातून चांगले काम करतांना आपण सतत यशस्वी ठरलो आहोत. पुरपरिस्थितीबाबत परिषदेने केलेले कामाचे राज्यभर कौतुक झाले व परिषदेचा दराराही वाढला. आपण केलेल्या चांगल्या कामाची प्रसिद्धीबाबत कुठेही कमी पडता काम नये असे शेवटी किरण नाईक यांनी आवाहन केले. परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक मार्गदर्शन करतांना म्हणाले, परिषदेच्या प्रतिमेचा प्रभाव शासनावर पडला पाहिजे. पत्रकार हे समाज प्रबोधनाबरोबरच पुरग्रस्तांना मदत करून समाजकार्यातही अग्रेसर असतात हे आपण दाखवून दिले आहे. आपले शिस्तबद्ध काम वृत्तपत्रातून प्रकाशित व्हावे यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. विशेष म्हणजे या बैठकीत परिषदेचे सर्व नेते व काही जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी आपल्या भाषणात खान्देशातील वृत्तपत्र, पोर्टल, व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर परिषदेच्या वृत्तांना मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल, परिषदेच्या वृत्तांना प्राधान्य देणाऱ्या खान्देशच्या पत्रसृष्टीचे कौतुक केले. या बैठकीत सर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या अडचणी व शंकांचे परिषदेच्या नेत्यांनी निराकरण केले. या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहन चौकेकर यांच्यासह २९ जिल्ह्यांमधील २९ जिल्हा प्रसिद्धीप्रमुख हजर होते. पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा प्रमुखांना केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. बैठकीचे संचलन करीत शरद पाबळे यांनी आभार मानले. ✍️ मोहन चौकेकर

व्यवस्थापन शास्त्र केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्षात अमलात असे आणावे याचे मूर्तीमंत उदाहरण व्यवस्थापन गुरु कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील – मोहन चौकेकर

0

 

शेगावचे नाव कानावर पडले की प्रत्येक मराठी माणसाच्या मनात श्रद्धा भाव उत्पन्न होतो . मनातल्या मनात प्रत्येक जण हात जोडुन श्री गजानन महाराजांची मुर्ती मनःचक्षुंसमोर आणून नतमस्तक होतो ..!!

आमच्या विदर्भात श्री. गजानन महाराज या नावाने ओळखला जाणारा एक संत , विदर्भातल्या माणसाच्या हृदयात कायम घर करून असतो. श्री गजानन महाराजांचा फ़ोटो देवघरात नाही, असं एक घर सापडणार नाही ..!!

पण आज आपण श्री गजानन महाराजांबद्दल नाही तर एका वेगळ्याच एकविसाव्या शतकातील संताविषयी बोलणार आहोत ..!!

या संताचे नाव शिवशंकर .. वडील श्री गजानन महाराजांच्या मंदिरातले सेवेकरी .. वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन, शिवशंकर वयाच्या ९ व्या वर्षीच संस्थानाच्या सेवेत रुजु झाला. संस्थानात फ़रशी बसविण्याचं काम सुरु होतं. शिवशंकर या कामात गढुन गेला. ही सुरुवात होती एका प्रदीर्घ सेवायज्ञाची, जो आजतागायत सुरुच आहे ..!! गेली आठ दशकं सुरु आहे ..!!

शिवशंकरने फ़ॉर्मल शिक्षण असं कांहीच घेतलं नाही. तो जे काही शिकला ते संस्थानात सेवा देता देता ..!! श्रद्धा व सेवाभाव याच्या जोरावर माणुस किती प्रगती साधु शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचा ‘शेगावीचा राणा’ म्हणुन उल्लेख केला ते शिवशंकर भाऊ पाटील ..!!

भारतात राहु द्या पण महाराष्ट्रात देखील अनेकांना या व्यक्ती बद्दल फारशी माहिती नाही. पण त्यांच्या कार्याची दखल थेट अमेरिकेतल्या हॉवर्ड विद्यापीठाने घेतली आहे. व्यवस्थापनाचा एक आगळा नमुना म्हणुन, ‘व्यवस्थापन’ हा विषय शिकविणार्‍या हॉवर्ड विद्यापीठात चक्क शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो .. आणि या व्यवस्थापनाचं श्रेय जातं एका अ-शिक्षीत माणसाकडे, श्री. शिवशंकर भाउ पाटीलांकडे ..!!

संस्थानात ‘सेवाव्रती’ असलेले शिवशंकरजी, ट्रस्टचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांनी शेगावचा कायापालट घडवुन आणला ..!!

ज्यावेळी शिवशंकर भाऊनी संस्थेच्या कामाची सूत्रं घेतली तेव्हा संस्थेची उलाढाल अवघी ४५ लाख रुपयांची होती ..!! आज शेगाव संस्थानाची वार्षिक उलाढाल 200 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे ..!!

शिवशंकर भाऊंकडे ना शिक्षण ना कौटुंबीक वारसा ..!! त्यांचं बलस्थान म्हणजे मनातला सेवाभाव व समर्पणाची वृत्ती ..!! आणि या बलस्थानांच्या जोरावरच त्यांनी अशक्य वाटणारं शक्य करुन दाखवलं आहे ..!!

शेगावच्या मंदिराचं व्यवस्थापन बघीतलं की आपण ही तोंडात बोट घालतो आणि त्या चोख व्यवस्थेसमोर नतमस्तक होतो. आपल्याला येथे पावला पावलावर भेटतात ते सेवेकरी ..!!

सुमारे २० हजार सेवेकरी एका वेळेस येथे सेवा देत असतात. शिवशंकर भाऊ आपल्यातला सेवा भाव इतक्या प्रभावीपणे या सेवाव्रतींना प्रदान करतात की कुठलाही मोबदला न घेता हे सेवेकरी संस्थानात पडेल ते काम करत असतात. सगळे कष्ट उचलत असतात व आलेला भाविक श्रद्धेने नतमस्तक होवुन समाधानाने व निश्चिंत होवुनच परत जाईल, यासाठी कार्यरत असतात ..!!

शेगाव देवस्थान प्रसिद्ध आहे ते सोन्या चांदीने मढवलेल्या मुर्तींनी नव्हे, तर इथल्या स्वच्छतेमुळे ..!! संस्थानाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक ठिकाणची स्वच्छता ही सगळ्यांच्या नजरेत भरते ..!!

श्री गजानन मंदिर असो वा भक्तनिवास, आनंदसागर सारखा ६५० एकर इतक्या प्रचंड जागेत वसलेला प्रकल्प असो वा महाराष्ट्रातील सर्वोत्तम असणारं अभियांत्रिकी कॉलेज .. ह्या सगळ्याच ठिकाणी कागदाचा एकही कपटा आणि झाडावरून गळलेलं पान मिळणं मुश्कील, इतकी कमालीची स्वच्छता राखली जाते ..!!

आपलं कार्य फक्त तितकंच मर्यादित न ठेवता ४२ पेक्षा जास्त उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले गेले आहेत ..!! आजबाजूच्या १००० गावांपेक्षा जास्त गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी संस्थेने उचलली आहे ..!!

इथे प्रत्येक गोष्टीचं आधुनिकीकरण अगदी २१ व्या शतकाप्रमाणे केलं गेलं आहे ..!! मग ते अगदी सामान नेणाच्या ट्राँली पासून असो किंवा आग, नैसर्गिक आपत्तीच्या सुमारास आपत्कालीन दिशादर्शक रस्ते बांधणीने असो ..!! दर्शनाच्या रांगेत उभं असताना पायाला चटका लागू नये म्हणून दिलेला स्पेशल रंगाचा लेप असो वा रांगेत प्रत्येक ठिकाणी बसण्याची व्यवस्था ते मातृरूम पासून २४ तास सेवेत असणारी वैद्यकीय मदत असो ..!!

संस्थानचे आर्थिक आणि इतर व्यवहार, ‘सॅप’ प्रणालीशी अगदी २००६ पासून जोडलेले आहेत ..!! ‘श्रीगजानन महाराज संस्थान’ ही अशी Software प्रणाली वापरणारी जगातील पहिली NGO ..!!

संस्थानचे व्यवहार चोख आणि पारदर्शक असावेत म्हणून, मुख्य विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी ती प्रणाली बसवून घेतली ..!! मंदिराच्या अकौंट्स विभागात साधा पांढरा शर्ट, लेंगा व टोपी घातलेले अनेक कर्मचारी SAP प्रणालीवर काम करताना दिसतात ..!! संस्थानचे Web Server, SAP Servers आहेत ..!!कॉलेज व्यवस्थापन स्वत: त्यांची निगा बाराही महिने आणि चोवीस तास राखते ..!!

संस्थानचा पैसा म्हणजे ‘भक्तांचा पैसा’ ही धारणा असल्याने, प्रत्येक बाबतीत स्व-निर्भर राहण्याचा प्रयत्न दिसून येतो ..!! Software दुरुस्ती आणि वार्षिक देखभालीचा अवाढव्य खर्च संस्थेबाहेर देण्यापेक्षा, शिक्षकांनी स्वत: देखभाल केली तर संस्थेच्या पैशाची मोठी बचत होते आणि शिक्षकांचे ज्ञानदेखील अद्ययावत राहते याची जाणीव अगदी प्रत्येकास आहे ..!!

स्वत:चे भव्य Incubation Center, उत्तम उद्योजक निर्माण करण्यासाठी काढले आहे .. सेंटर देखणे आणि अत्याधुनिक सुविधायुक्त आहे. तेथे नवउद्योजकास जागेपासून संशोधनाच्या सर्व सोयी दिल्या जातात ..!! त्यासाठीचा सर्व खर्च संस्था स्वत:च्या अंगावर घेते ..!! संशोधन पूर्ण झाले तर उद्योजकास मार्केटिंगसाठी मदत देखील करते. तो लवकरात लवकर स्व-निर्भर होईल असे बघते ..!!

शेगाव संस्थानचे स्वत:चे अत्याधुनिक किचन बघण्यासारखे आहे. दर ताशी चाळीस हजार पोळ्या करणारे मशीन तेथे आहे. ते मशीन जर बंद पडले तर ताशी दहा हजार पोळ्या बनवणारी दोन मशिन्स पर्यायी व्वस्था म्हणून आहेत. एका बाजूने कणिक घातली, की दुसर्‍या बाजूने भाजलेली पोळी बाहेर पडते ..!! एका वेळी शंभर किलोंचा भात, पंच्याहत्तर किलो भाजी, पन्नास किलो डाळ, शंभर डिशेस शिरा-पोहे-उपमा इत्यादी सर्व करणारी अवाढव्य मशीन्स अव्याहत भक्तांना अन्न पुरवत असतात ..!! सर्व मशिनरी स्टेनलेस स्टीलमध्ये बनवली गेलेली आहे. तेथे कमालीची स्वच्छता आहे. अन्नगृहाला अव्याहत शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रचंड मोठे RO Plants उभारले आहेत ..!! तेथे बनवलेले पदार्थ संस्थानच्या स्पेशल गाड्यांतून गावातील वेगवेगळ्या भोजनगृहात, भक्त निवासात, कँटिन इत्यादीमध्ये तत्परतेने पोचवले जातात .. त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचा अंदाज घेऊन, वेगवेगळ्या ठिकाणावरून डिमांड स्वयंपाकघरास मोबाईलवरून कळवली जाते ..!! आणि त्या अंदाजाने अन्न बनवून पुरवले जाते .. त्या कामाची अवाढव्यता शब्दांत वर्णन करण्यासारखी नाही ..!! पण ती द्रौपदीची थाळी अव्याहत अन्नदान करत असते. तेथील व्यवस्थापन भल्याभल्यांना (म्हणजे व्यवस्थापन तज्ज्ञांना ..!!) तोंडात बोट घालायला लावणारे आहे. कोठेही गोंधळ नाही, अन्नाची नासाडी नाही, कोणीही उपाशी राहणार नाही ..!!

संस्थानचे अनेक भक्त निवास आहेत. तेथे शेकडो खोल्या अगदी AC सारख्या सुविधांसकट आहेत. सवलतीच्या किंमतीत तेथे राहण्याची सुविधा मिळते. सुविधा इतकी, की कोठेही तक्रार करण्यास वाव नाही. येणाऱ्या भक्तास खात्रीने समाधान मिळते. भक्तांची फसवणूक कोठेही होणार नाही याची काळजी घेतली जाते. शेगाव हे खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहे ..!!

आणि हे सर्व शक्य झाले आहे ते शिवशंकर भाऊ पाटील या ‘कर्मयोगी’मुळे ..!! आजही भाऊ १२ तासांपेक्षा जास्त काम करतात. कोणतीही प्रसिद्धीची हाव नाही ..!! ना मोठेपणा मिरवण्याची हाव, ना सत्तेची लालसा, ना पैशाचा मोह ..!! शिवशंकरभाऊ पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये पाणी आणि चहाचा थर्मास देखील घरून घेऊन येतात ..!!

आधुनिक शेगावच्या या निर्मात्याचा किती हा निर्मोहीपणा ..!! ‘गण गण गण गणात बोते’ या महाराजांच्या उक्ती प्रमाणे, गणांचा (भक्तांचा) पैसा गणात बोणाऱ्या (रुजवणाऱ्या) महाराजांच्या ह्या भक्तास त्रिवार नमस्कार ..!

*!! गण गण गणात बोते !!*
*जय गजानन*
🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹

७०० कोटींच्या चेकमधले नको असलेले ६३० कोटी परत करणारे शिवशंकरभाऊ पाटील – मोहन चौकेकर

0

.
जागतिक बँकेचे चेयरमन विक्रम पंडित तेव्हा जागतिक अशा सिटी बॅंकेचे चेअरमन होते. त्यांना शिवशंकरभाऊंच काम माहित होता.त्यांनी शेगावच्या पाणीपुरवठा योजना साठी बॅकेच्या मार्फत ७०० कोटींचा चेक दिली होता. विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला. किती खर्च येईल याचा हिशोब करण्यात आला. हिशोब लागला ७० कोटींचा संस्थानला ७० कोटींची आवश्यकता होती. ७० कोटी वापरण्यात आले आणि ६३० कोटी परत करण्यात आले.

हे संस्थान महाराष्ट्रातलं अन् ६३० कोटींचा चेक परत करणारे ते व्यक्ती म्हणजे शेगाव संस्थानचे प्रमुख शिवशंकरभाऊ पाटील.

श्री गजानन महाराज २३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगाव येथे प्रकटले. ८ सप्टेंबर १९१० रोजी ते समाधीस्थ झाले. त्यांच्या हयातीतच, १९०८ मध्ये श्री गजानन महाराज संस्थान नावाचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त म्हणून बारा विश्वस्थांची नियुक्ती करण्यात आली.

यात्रा थांबू देवू नका, पैसा साचू देवू नका, निसिम्म भावनेने सेवा करा या तत्वांवर ट्रस्टचा कारभार सुरू करण्यात आला.

या संस्थानची सुत्रे पुढील काळात शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हातात आली. त्या काळात संस्थानची वार्षिक उलाढाल ४५ लाख होती. भाऊंनी संस्थानमध्ये कामे करण्यास सुरवात केली. काही वर्षांमध्ये संस्थानची वार्षिक उलाढाल हि शिवशंकर भाऊंनी १३७ कोटींच्या घरात नेवून ठेवली.

पण या कोटींच्या व्यवहारात शिवशंकर भाऊंच्या कामांची किंमत करता येणार नाही, कारण आजतागायत संस्थानचा चहाच काय पाणी देखील शिवशंकर भाऊंनी पिलेलं नाही. ते मंदिर परिसरात असतात तेव्हा आपलं पाणी देखील घरातून आणतात.

आलेला पैसा साचू द्यायचा नाही या विचारातून शिवशंकरभाऊंच्या माध्यमातून मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला. आज शेगाव संस्थानबद्दल सांगायच झालं तर इथे सर्वात देखणं आणि तितकच नावाजलेलं अस इंजिनियरिंग कॉलेज आहे, भक्तनिवासाची सोय कौतुकास पात्र अशी आहे आणि आनंदसागर सारखा ६५० एकर मध्ये पसरलेला परिसर असो या परिसरात आज कागदाचा एक तुकडा देखील पडलेला दिसत नाही. स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण या तत्वांवर त्यांनी संस्थानचा कारभार संभाळला.

शेगाव संस्थानचे भक्त निवासच्या खोल्या या पंचतारांकित हॉटलेल्सना लाजवतील अशा आहेत. अवध्या पंधरा रुपयांमध्ये आनंदसागर पाहता येते. आनंदसागरची संपुर्ण संकल्पना शिवशंकर भाऊ यांनी उभा केली. महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळांसोबत मुख्य पर्यटन स्थळ म्हणून आनंदसागरचा उल्लेख केला जातो. विदर्भाच्या सांस्कृतिक अस्मितेते मानाचा तुरा खोवण्याच काम हे शिवशंकर भाऊंचीच कमाल आहे. आनंदसागरमध्ये रुपया आणि रुपयांचा जमाखर्च लिहून ठेवण्यात येतो.

संस्थानमार्फत ४२ पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आजूबाजूच्या १००० गावांमध्ये वैद्यकिय सेवा पुरवण्यात येतात. सामान वाहणाऱ्या ट्रालीपासून ते आपात्कालीन सुविधापर्यन्त सर्व गोष्टींनी अत्याधुनिक परिसर म्हणून शेगावचा परिसर ओळखला जातो.

आज विदर्भात पाण्याचा प्रश्न भेडसावतो मात्र शेगाव नगरपरिषदेला ७ कोटी ७७ लाख रुपये दिल्यामुळे आज शेगावची नळयोजना सुरू होवू शकली. ते काम देखील शिवशंकर भाऊ यांच्या निर्णयांमुळे झाले.*
*शेगाव संस्थानचा उल्लेख आज जगभर होत असतो, सांगली कोल्हापूर येथे झालेल्या पुरामध्ये त्यांनी एक कोटींचा धनादेश दिला. आज भारतभरच्या देवस्थानाच्या, संस्थानांच्या बाजारूपणामुळे देवाच्या सिंहानसापासून संपुर्ण देवच सोन्याचे झाले. सोन्या चांदीने देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, अशा वेळी मंदिर परिसर उभारणारे आणि अडल्यानडलेल्यांना मदत करुन एक आदर्श असे संस्थान उभा करणारे शिवशंकर भाऊ माणसातल्या देवाप्रमाणेच भासतात.

हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत शहीद कैलास पवार अनंतात विलिन ! चिखलीत उसळला शोकसागर – मोहन चौकेकर

0

 

चिखली: सियाचीन ग्लेशियर येथे खडा पहारा देणारा चिखली शहरातील कैलास पवार हा जवान १ ऑगस्टला कर्तव्य बजावत असतांना शहीद झाला.आज दि.४ ऑगस्टला सकाळी औरंगाबाद येथून त्यांचे पार्थिव येत असतांना ठिकठिकाणी त्यांना नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत श्रद्धांजली अर्पण केली.चिखली येथील गजानन नगर भागात त्यांच्या राहत्या घरी त्यांचे अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दुपारी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रेला सुरवात झाली उपस्थितीतांनी कैलास पवार अमर रहे चे नारे देत भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.शहरातील प्रमुख मार्गाने निघालेली अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक चालत होते.तालुका क्रिडा संकुलच्या भव्य मैदानात कैलास पवार यांना उपस्थितीतांनी मानवंदना दिली.पोलीस विभाग आणि भारतीय सेनेच्या वतीने हवेत तिन फैरी झाडुन सलामी दिली.अंत्यत दुखद वातावरणात दुपारी २ वाजता कैलास पवार यांना त्यांचे वडील आणि भाऊ यांनी मुखाग्नी दिला.

चिखली येथील गजानन नगर भागात रहाणारे कैलास पवार हे २०१६/१७ ला भारतीय सैन्यात दाखल झाले होते. अंत्यत कठोर प्रशिक्षण घेऊन त्यांनी कर्तव्य बजवण्यासाठी तयार झाले होते.शालेय जीवनापासुनच देशसेवेची आवड असल्याने कैलास ने एनसीसी मध्ये दाखल होउन तयारीला सुरवात केली होती.भारत पवार यांना दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब होते यामध्ये कैलास मोठा असल्याने आपण आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करुन देशाची सेवा करण्याचा जनु चंगच बांधला होता.त्यानुसार सैन्यात दाखल झाल्यावर घरची परिस्थिती बेताची असल्याने घरात कर्ता पुरुष म्हणुन वडिलांना काळजी करु नका असे सांगत घर बांधण्याचे स्वप्न बघत होता तसेच घरी आल्यानंतर एकुलत्या बहिणीच्या वाढदिवसाला गाडी गिफ्ट  करणार असल्याचे देखील बहिणीला शब्द दिला होता.

सियाचीन ग्लेशियरमध्ये १ वर्ष सेवा देऊन घरी परतण्याचे वेध लागलेल्या कैलासचा काळाने वेध घेतला आणि मनाशी असलेले स्वप्न तसेच रहाले.

वयाच्या १९ व्या वर्षी सैन्यात दाखल झालेल्या कैलासचे आता लग्नाचे वय झाल्याने आई वडील त्याच्या लग्नाचे विषय घरी बोलत होते कैलास सहा महिन्याच्या सुट्टीवर येणार म्हंटल्यावर घरी आनंदाचे वातावरण होते आई देखील सुनेचे सुख मिळणार  या कल्पनेने भारावली होती काही स्थळ पहाले देखील होते परंतु ही माऊली मात्र कैलासची विरमाता झाली आणि त्याच्या पार्थिवावरील तिरंगा स्विकारण्याचा मान मिळाला.यावेळी दुखद प्रसंगी देखील कैलास पवार यांच्या आई वडिलांना देखील आपल्या मुलाच्या देशसवेवर गर्व करीत होते. दि.१ ऑगस्टला शहीद झालेल्या कैलासच्या आईच्या डोळ्याती अश्रू मात्र थांबता थांबत नव्हते.शहिद  पालकमंत्री,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक, खासदार   आमदार   यांनी पुष्पचक्र अर्पण केले.लष्कराकडून कैलास यांच्या परिवाराला ध्वज प्रदान करण्यात आला.     याप्रसंगी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शासनाच्या वतीने आपल्या संवेदना प्रकट केल्या. तर आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनीही आपली संवेदना प्रकट केली.    यावेळी उपस्थित चिखलीकर शोकसागरात बुडाले कैलास यांना शेवटचा निरोप देतांना आभाळाचेही डोळे दाटून आले होते. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती,जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, आमदार श्वेताताई महाले,आमदार संजय गायकवाड,आमदार संजय रायमूलकर,नगराध्यक्षा प्रिया बोंन्द्रे ,रविकांत तुपकर, माजी आमदार राहुल बोंद्रे , शशिकांत खेडेकर, रविकांत तुपकर, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, नगराध्यक्ष प्रियाताई बोन्द्रे, उपाध्यक्ष वजीराबी शेख अनिस, माजी उपाध्यक्ष कुणालभाऊ बोंद्रे, डाॅ निलेशभाऊ गावंडे युवा नेते सुरेंद्रभाऊ ठाकुर , नपचे पाणीपुरवठा सभापती गोपालभाऊ देव्हडे, उपविभागीय अधिकारी हांडे, तहसीलदार अजित  येळे,  जिल्हा सैनिक अधिकारी पडघान, जिल्हा परिषद सदस्य जयश्री शेळके, ज्योती ताई पडघान, नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस, कर्नल विनोद गवई, यांच्यासह राजकीय सामजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील, व्यापारी, पत्रकार, नगर परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तहसील, नगर परिषद, पोलीस कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व परिसरातील नागरिक, महंत भन्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. ✍️ मोहन चौकेकर

उनाड वारा साहित्य परिवार आणि लयभारी साहित्य समूह

0

 

प्रियंका पवार (मुम्बई प्रतिनिधि)

यांच्या संयुक्त विद्यमाने , ३१ जुलै रोजी स्व . गायक मोहम्मद रफी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या , स्पर्धेत १९ स्पर्धकांनी सहभाग घेऊन , मोहम्मद रफी साहेबांच्याच गाण्यातून रफी साहेबांना श्रद्धांजली वाहिली . साहित्याच्या ग्रुपला चारोळी , कविता , पत्रलेखन , लेख , गझल हे साहित्य आपण पोस्ट करत असतो , काव्यरसिक साहित्य वाचत असतो , साहित्यिकांच्या मनातील भाव ओळखून , त्यांच्या अंगी असलेली गायन कला जाणून , या पेक्षा ही वेगळं काहीतरी म्हणून , ३१ जुलै रोजी स्व . गायक मोहम्मद रफी साहेबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून , या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन अविनाश शिंदे , अनिल केंगार यांनी केले . या स्पर्धेत प्रिया भालके , रझिया जमादार , मीना पांचाळ , डॉ . गणेश भोसले , आनंदहरी सर , संजय जाधव , मेहबूब जमादार , वंदना हटवार राऊत , स्वाती लोहकरे , धनंजय माने , प्रमोद सूर्यवंशी , सौ , सुनिता बहिरट , रुकसाना मुल्ला , वर्षा फटकाळे वराडे , आम्रपाली धेंडे , संतोष रायबान , शबाना मुल्ला , रोहिणी गंधेवार , संगीता इंगवले या स्पर्धकांनी सहभागी होऊन , स्पर्धेला रंगत आणली . कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रोते , यांनीही कार्यक्रमाला आपल्या शैलीतून दाद दिली . रसिक श्रोते असल्याशिवाय कार्यक्रमाला पण रंगत येत नाही . या कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून मा . प्रवीण बनसोडे यांनी आपल्या निवेदन शैलीतून , कार्यक्रमाला चार चाँद लावले . आणि या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून गायक मा . दिपकराज साळुंखे यांनी काम पाहिले . प्रथम क्रमांक डॉ . गणेश भोसले , द्वितीय क्रमांक संगीता इंगवले , तृतीय क्रमांक विभागून प्रमोद सूर्यवंशी , रुकसाना मुल्ला , उत्तेजनार्थ वर्षा फटकाळे वराडे , शबाना मुल्ला , मेहबूब जमादार . अशा प्रकारे स्पर्धेचा निकाल जाहीर करून , सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन , परीक्षकांनी रफी साहेबांची गाणी गायली .

टायगर ग्रुप कडून कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात , . …

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे ,,

यावल शहरातील नगरसेवक डॉ कुंदन फेंगडे यांच्या प्रेतणांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात, जिवनिवशयक वस्तु कपडे पाणी बोटल सह मोठ्या प्रमाणात साहित्य केले रवाना सन्माननीय पैलवान तानाजी जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष व सन्माननीय पैलवान ऋषिकेश बाबा भांडारकर टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर सांगली येथे पूरग्रस्तांसाठी टायगर ग्रुप खान्देश विभाग जळगाव जिल्हा तर्फे प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून प्रत्येक तालुक्यातून टायगर ग्रुप सदस्यांनी एकत्र येऊन थोडी का होईना मदत गोळा करून कपडे खाण्याच्या वस्तू धान्य पीठ पाणी बॉटल चा जीवन उपयोगी वस्तू टायगर ग्रुप मार्फत कोकणवासीयांना पवसवत आहात यावल तालुक्यामधून अंजाळे या गावातून सचिन सपकाळे यांनी पूर्ण टायगर ग्रुप च्या टीमने कोकणवासीयांना टायगर ग्रुप मार्फत मदत केली

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव व टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषिकेश बाबा भांडारकर टायगर व येथील नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या मागदर्शनाने महाजन गल्लीतील तरूणांच्या परिश्रमातून पुरग्रस्तांसाठी जिवनावश्यक वस्तूंचे कीट पाठविण्यात आले. यावेळी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर गृप यावलचे तालुका सदस्य उज्वल कानडे, भूषण फेगडे, निर्मल चोपडे, रितेश बारी, सागर इंगळे, मोरेश्वर फेगडे, मनोज बारी, जयवंत माळी, अनिकेत सोरटे, विलास चौधरी, हितु फेगडे, संजय फेगडे, सिद्धांत घारू, कोमल इंगळे, भूषण नेमाडे, सागर चौधरी, गल्लू नेमाडे, जुगल घारू, मयूर घारू, दीपक पाटील, नीरज तळेले, प्रथमेश घोडके आदी उपस्थित होते.

श्रद्धा व कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप असलेले असलेले श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन — मोहन चौकेकर

0

 

बुलडाणा : ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून निस्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. मागील तीन-चार दिवसांपासून मल्टीऑर्गन फेलीवरमुळे श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. कुठल्याही रुग्णालयात दाखल होण्यास भाऊंनी नकार दिल्याने त्यांच्या सूचनेनुसार भाऊंवर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेटअपसह ट्रीटमेंट करण्यात येत होती. काल (3 ऑगस्ट) सकाळी त्यांचा रक्तदाब कमी झाला.. तब्येत अधिक सिरीयस झाली.. मेडिकल टीमने शर्थीचे प्रयत्न केले..मात्र त्यांना यश मिळाले नाही. आज सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी भाऊंनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान या दुःखद घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे शेगावात दाखल झाले होते. मोजक्या लोकांच्याउपस्थितीत त्यांच्यावर संध्याकाळी साडे सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.*

‘ *सेवा परमो धर्म’ या तत्त्वानुसार* *निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ म्हणजे माणसामधला* *देवमाणूस..वयाच्या अठराव्या वर्षी श्री आज्ञेने शिवशंकरभाऊ मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यात सामील झाले. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या त्रिसूत्री नुसार काम करत शिवशंकरभाऊंनी मंदिर व्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवले आहे. कुठलाही मोबदला न घेता संपूर्ण निष्ठेने आणि श्रध्देने काम करणारे मंदिरातील हजारो सेवाधारी, डोनेशन सारख्या आर्थिक लाभला डावलून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थानच्या शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, भक्तनिवास, जागतिक किर्तीचा आनंदसागर प्रकल्प..आणि अशा अनेक सेवाकार्याची उभारणी शिवशंकरभाऊंनी केली. श्री गजानन महाराज संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची शिवशंकरभाऊंची निस्वार्थ शैली जगभरातल्या अर्थतज्ञ, नियोजन तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. असा हा कर्मयोगाचा दीपस्तंभ आज अकाली विझला आहे.. शिवशंकरभाऊंच्या अकस्मात निधनाने विदर्भाची पंढरी पोरकी झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. – मोहन चौकेकर

हिंगणघाट शहरात वाढत आहे डेंगू चे रुग्ण एकाचा मृत्यू

0

 

हिंगणघाट शहरात वाढत आहे डेंग्यूचे रुग्ण सर्व दवाखाने रुग्णाने हाउसफुल नगरसेवकाचे स्वच्छतेबाबत वार्डात दुर्लक्ष वार्डात नगरसेवक निवडून आल्यावर दिसत नाही . प्रतिनिधी यांना दिली माहिती शहरात स्वच्छतेबाबत नगरसेवकांचे कोणतेही नियोजन नाही.
2 ऑगस्टला नयन संजयराव लाकडे (वय ८) चिमुकल्याचा डेंग्यू या आजाराने सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला . शहरात अनेक डेंग्यू चे रुग्ण आहे यात लहान बालकांचा देखील समावेश आहे . नगरसेवकाचे स्वच्छतेबाबत कोणतेही लक्ष नाही. नगरपालिका अधिकारी यांना विचारले असता ते सांगतात आम्ही फवारणी केली आहे. वार्डातील लोक सांगतात आमच्याकडे फवारणी झाली नाही खरं कोण बोलत आहे ? नागरिकांचा तीव्र संताप असून या डेंग्यू रोगाच्या वाढत्या प्रकोपा करिता फवारणी करावी तसेच त्वरित तउपाय योजना करण्याची मागणी वार्डातील नागरिक करीत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

श्री.जी.एस.भगत यांनी वाढदिवसानिमित्य श्रेयस वाचनालयाला ग्रंथ खरेदी करीता दिली पाच हजाराची देणगी

0

 

हिंगणघाट– मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे.या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्यांच्या कार्य संस्कृतीवर सुद्धा प्रभाव पडतो . वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी व प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातच असावी लागते असे विचार भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष श्री जी.एस.भगत सर यांनी व्यक्त केले.ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रेयस वाचनालयाला ग्रंथ खरेदी करीता पाच हजार रूपयाची देणगी देण्यासाठी श्रेयस वाचनालयात आले असतांना आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला बौद्ध महासभेचे श्री.संजय वानखेडे,श्री.राजू फुलझेले,श्री.राजू नगराळे ,श्री.परशुरामजी वाघमारे,श्री.निळकंठ भिमटे,अॕड रमेश थुल,श्रेयस वाचनालयाचे प्रा.डाॕ.चंद्रकांत नगराळे,सौ.सुजाता नगराळे ,श्रेयस नगराळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री शशिमोहन थुटे यांनी केले.
सूर्या मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा

बैलजोडीच्या भाड्याच्या कारणावरून गळ्यावर चाकू मारून खून धानोरा येथील चित्तथरारक घटना…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथे दिनांक तीन ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान मृतक वामन राघोजी घुले हे चौकात बसले असता आरोपी ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकर राहणार धानोरा महासिद्ध हे मृतक वामन घुले यांच्यासोबत बैलजोडीच्या भाड्यावरून बोलचाल करीत होता त्यातच आरोपीने वामन घुले यांना शिवीगाळ करणे सुरू केले त्यावेळी वामन राघोजी घुले त्यांना मुलाने घरी नेले. परंतु थोड्या वेळाने पुन्हा वामन घुले चौकात आले असता आरोपी ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकार,विठ्ठल देऊळकार, श्रीराम देऊळकार, यांनी वामन घुले यांना शिवीगाळ केली तसेच विठ्ठल देऊळकार व श्री राम देऊळकर यांनी मृतक वामन घुले यांना पकडून ठेवले व आरोपी ज्ञानेश्वर देऊळकर यांनी मृतकाच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले त्यातच वामन घुले यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. सदर घटनेची फिर्याद सुभाष राजाराम खाडपे वय ४० वर्षे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला दिली सदर फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अपराध नंबर ६४८/2021 कलम ३०२,५०४,३४ भारतीय दंड विधान नुसार आरोपी एक ते तीन यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड हे करीत आहेत.