Home Blog Page 429

सुनगाव येथे युवकांनी वाचविले विहिरीत पडलेल्या व गोमातेचे प्राण

0

 

गजानन सोनटक्के जळगाव
जा

तालुक्यातील सुनगाव येथील वावडी हर्दो शिवारातील प्रेमसिंग पवार यांच्या शेतात आज बाजूला गाय चरतर असताना बाजूला असलेल्या नव्वद फूट विहिरीमध्ये अचानक पडली व तो आवाज येताच बाजूला काम करीत असलेले ज्ञानेश्वर कपले दगडू धुळे व योगेश मिसाळ हे युवक विहिरीकडे धावले ही एकच गडबड पाहता शेतात काम करीत असलेले आदिवासी बांधव सुद्धा विहिरीकडे धावले व ज्ञानेश्वर कपले आणि योगेश मिसाळ यांनी तात्काळ दोर चराटआणून जीवाची पर्वा न करता विहिरीमध्ये उतरले वीहिरीला 30 ते 35 फूट पाणी होते परंतु वेळीच दक्षता घेतल्याने मातेसमान असलेल्या व गोमातेचे प्राण वाचविण्यात या युवकांना यश आले तरी जीवाची परवा न करता या युवकांनी दक्षता दाखवून या गोमातेचे प्राण वाचविले त्यामुळे सुनगाव परिसरात त्यांचे कौतुक होत आहे

जळगाव जामोद येथे कृषिदूतांची कार्यशाळा

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा.तालुका प्रतिनिधी:-

लॉकडॉऊनमध्ये सर्व शैक्षणिक आस्थापने, शाळा, महाविद्यालय बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे देखील वर्क फ्रॉम होम या पद्धतीने कार्य चालू आहे. याच पाश्र्वभूमीवर स्वा. वि. गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषिदूतांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन कार्यशाळा आयोजित केली. यादरम्यान विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती, तांत्रिक शेती तसेच जैविक शेती याबाबत माहिती पटवून दिली . सदर कार्यशाळा सदन कास्तकार समाधानभाऊ बगाडे यांच्या बांधावर घेण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन साक्षी इंगळे, वैष्णवी आटोळे,प्रगती मुळतकर, सोमल घोगरे या विद्यार्थ्यांनि केलें.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उद्यानविद्या महाविद्यालयातिल प्राचार्य वाय आर गवई सर, उपप्राचार्य एस एस धर्माळ सर,ए डी सुने सर , जे आर साळी सर व समुपदेशक पी एस वानखडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

चुंचाळे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिपक कोळी तर उपाध्यक्षपदी तुकमान तडवी यांची निवड करण्यात आली

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य दिपक कोळी तर उपाध्यक्षपदी लुकमान तडवी यांची निवड करण्यात आली आहे .
चुंचाळे तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ नुकताच संपल्यामुळे कोराना संसर्गाचा प्रभाव लक्षात घेत टप्याटप्याने पालक सभेतून सदस्य निवड करण्यात आली व दिनांक ३१ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाची निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली त्यात अध्यक्षपदी दिपक कोळी यांना ११ पैकी ९ मते मिळाली त्यांना शाळेचे मुख्यध्यापक गिरीष सपकाळे यांनी विजयी घोषीत करत अध्यक्षपदी निवड केली तर लुकमान तडवी यांची उपाध्यंक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडीला समितीचे मावळत्या अध्यक्ष जरीना तडवी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या , यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे शाल व श्रीफळ देऊन चुंचाळे तंटा मुक्ती अध्यक्ष धनसिंग राजपुत यांनी सत्कार केला नवनिर्वाचीत सदस्य माधुरी मिथून गजरे,राजश्री सुकदेव पाटील,सोनाली योगेश पाटील,रजीया महेबुब तडवी,आरीफा इरफान तडवी,अशोक मधुकर धनगर,सुरेश आत्माराम पाटील,नथ्थु फत्तु तडवी,अमिर अजीत तडवी यांची निवड करण्यात आली यावेळी इतबार तडवी,भिका तडवी,पप्पु पाटील,रहिमान तडवी,योगेश पाटील,सुकदेव पाटील,इरफान तडवी,मिथून गजरे उपस्थित होते निवडणुक प्रक्रियेसाठी मुख्यध्यापक गिरीष सपकाळे यांनी काम पाहिले तर मंजित तडवी,सुरेखा त्रिपाटी,राहुल वाणी,राजु सोनवणे यांनी सहकार्य केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री दीपक कोळी यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता शालेय भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांना विसिद्ध शालेय सुविधा पुरविण्याचा सुद्धा त्यांनी मानस व्यक्त केला

 

 

अखेर सत्य जिंकले भ्रष्टाचारा खतपाणी देणाऱ्या ग्रामसेवकाची बदली ग्रामपंचायत रूपी वडाला आलेल्या बांडगुळाचे पोषण कसे होणार.?

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत येथील वादग्रस्त ग्रामसेवकाची अखेर बदली करण्यात आल्याची माहीती पंचायत समितीच्या सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे दरम्यान ही बदली त्या ग्रामसेवकाचे नायगाव येथील कार्यकाळ संपल्याने त्यांची तालुकाअंतर्गत साकळी ग्रामपंचायती प्रशासकीय पातळीवर बदली झाल्याचे कळते , या संदर्भातील वृत्त असे की नायगाव येथे १६ फ्रेब्रुवारी २०१६ ला ग्रामसेवक म्हणुन पी पी सेंदाणे हे नायगाव ग्रामपंचायतीला हजर झाले होते. हजर होताच त्यांनी काही मंडळी स हाताशी धरून मनमानी कारभार सुरु केला. आजपर्यंत त्यांनी नायगाव ग्रामपंचायतीला सर्व बाजुने धुवून खाल्ले नायगाव च्या विकासात खिळ घातली. या सर्वात गंभीर विषय म्हणजे आर्थिक स्वार्थापोटी गावातील मतदारांना सोडून बाहेरगावाहून आलेल्याना परप्रांतांच्या नांवावर घरकुल मंजुर करून दिले गेले या संदर्भात तक्रारी झाल्यावर देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही यावल पंचायत समितीच्या दिसुन आती नाही . दरम्यान हा सर्व प्रकार पाहुन ही मंडळी गप्प का होती. याचा अर्थ काय समजावा.आताच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही पारदर्शकता व स्वाभीमान जपणारे सदस्य निवडून आले आणि त्यांनी या सर्व आर्थीक गोंधळाचा आवाज उठवून गैरकारभारा विरुद्ध गटविकास अधिकारी , सिईओ. ग्रामविकास मंत्रालय पर्यंत तक्रारी केल्या. आवाज उठवला.पण तरीही या महाशयांना वाचवण्यासाठी, ज्यांना या पासून फायदा होता असे महानग ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पण शेवटी सत्य जिंकले. सत्याचा विजय झाला. फक्त बदलीने समाधान न मानता यांची चौकशी होवून शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून असे धाडस पुन्हा कोणी ही करणार नाहीत अशी संत्पत भावना ग्रामस्थांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
आता गावातील तरूण, उच्च शिक्षित आणि गावाच्या विकासाचा विचार करणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे की, पाच पाच वर्षे मलिदा खाणाऱ्या ग्रामसेवकांला सहकार्य करणाऱ्या धेंड्यांना शोधून त्यांची ठेचून नांगी ठेचली पाहिजे. कोणाही व्यक्तीपेक्षा गाव नक्कीच मोठा असतो अशी प्रतिक्रीया सामाजीक कार्यकर्त रामदास पाटील यांनी व्यक्त केली आहे .

हिंगणघाट पोलिस स्टेशनचा पोलिस कर्मचाऱ्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

0

 

सचिन वाघे वर्धा

दि. 31 जुलै
हिंगणघाट येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा 29 जुलै रोजी दाखल झाला असून ,आरोपी पोलीस कर्मचाऱ्यास हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे.
अरुन हरिदास उघडे वय 49 बक्कल क्रमांक 649 राहणार तरोडा जिल्हा वर्धा असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हिंगणघाट येथील एका रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेने याबाबत काल हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अरुण उघडे विरुद्ध 354 अ, ड,500,506 कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यातील पीडित तक्रारदार महिलेचा मोबाईल हरवलेला असल्याची 1 महिन्यापूर्वी महिलेने हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणात आरोपी पोलिस कर्मचारी अरुण उघडे याने या महिलेचा मोबाईल मिळवून देतो असे सांगत महिलेसोबत जवळीकता निर्माण केली.. या दरम्यान आरोपी उघडे याने या महिलेस नवीन मोबाईल घेऊन दिला व यातूनच या दोघांची मैत्री घट्ट झाली. आरोपी पोलिस कर्मचारी उघडे हा या मैत्रीचा फायदा उचलत महिलेला माझ्यासोबत लग्न कर असा हट्ट करू लागला. यादरम्यान महिलेचा जबरीने हात पकडून तिला गाडीवर बसून माझ्या सोबत फिरायला चाल अशी जबरदस्ती देखील आरोपी पोलिस कर्मचाऱ्यानी केली असल्याने काल रात्री हिंगणघाट पोलिसात उशिरा याबाबत पीडित महिलेने तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी आरोपी पोलिस कर्मचारी अरुण उघडे विरुद्ध गुन्हा नोंदवला असून या अगोदर या कर्मचाऱ्याला दोन वेळा सस्पेंड केले आहे अशी माहिती मिळाली आहे. पुढील तपास पीएसआय गावडे करीत आहे.

तालुका स्तरावर अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु करा

0

 

अपंग जनता दल सामाजिक संघटना चे समाज कल्याण अधिकारी श्री. राजेंद्र जाधवर यांना निवेदन

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती :- अपंगांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या कायद्यामध्ये जिल्हा स्तरीय अपंग तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात याव्यात असे शासनाचे पत्र असून यामध्ये पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी हे तक्रार निवारण अधिकारी व जिल्हा स्तरावर मा . मुख्य कार्यकारी अधिकारी हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त करणारे शासन निर्णयाकडे व पंचायत समिती स्तरावर अपंग मार्गदर्शन व सल्ला केंद्र सुरु या शासन निर्णय या कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अपंगांना तालुका स्तरावर एकाच ठिकाणी अपंगांना योजना व सवलतीची माहिती मिळावी म्हणून अपंग सल्ला मार्गदर्शन केंद्र प्रत्येक पंचायत समिती कार्यालयामध्ये सुरु करण्यात यावे असे आदेश असून सुद्धा याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे . तरी आपण आपल्या स्तरावर अपंग तक्रार निवारण समित्या व अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र त्वरीत सुरु करण्यात यावे व जे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असेल त्यांचेवर त्वरीत अपंग हक्क अधिनियम कायद्याअंतर्गत त्वरीत कार्यवाही करावी असे निवेदन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर व अपंग विभाग प्रमुख पी. डी शिंदे यांना अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे मयूर मेश्राम. शेख बब्बू, राजिक शाह, कांचन कुकडे,जहीर खान, गणेश वानखडे,राहुल रामटेके,राहुल वानखडे हे उपस्थित होते.

जनतेने स्वयंस्फूर्त लस घेऊन,शासकिय नियमांचे पालन करावे -संत विवेक दासजी महाराज

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे) :-

कोरोनाची नुकतीच दुसरी लाट कमी झाली. असुन‌ त्या मध्ये अनेकजण मरण पावले. तर अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बुडाला अशा या भयानकर महामारी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व जागतीक संघटना कोरोनाची तीसरी लाट येणार असल्याचे बोलल्या जात आहे. नागरिकांनी स्वताच्या तसेच स्वतःच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी या लसीचे दोन डोज घेऊन शासकीय नियमांचे पालन जसे की वारंवार हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क अत्यावश्यक कामे वगळता विनाकारण घरा बाहेर न पडणे, गर्दीचे ठिकाणी न जाणे नियमांचे पालन करून स्वतःचे तसेच स्वतःच्या कुटुंबियांचे,आपल्या समाज बांधवांचे रक्षण करण्याचे आवाहन सद्गुरू कबीर आश्रम वाराणसी येथील संत विवेक दासजी यांनी केले आहे. सद्यस्थितीमध्ये मेहकर शहरांमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये संत विवेकजी यांनी कोविल्शीड चा दुसरा डोस घेतला असून त्यानी मेहकर व बुलढाणा जिल्ह्यातील लसीकरण व्यवस्थापनाचे वैद्यकीय अधिकारी तथा लसीकरण व्यवस्थापनाचे डॉ.श्याम ठोबंरे यांच्या कडून माहिती घेतली बुलढाणा जिल्ह्यामधील लसीकरणाचे काम खूप नियोजनबद्ध व प्रशंसनीय आहे व संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनतेच्या लसीकरणासाठी अहोरात्र झटत असलेल्या डॉक्टर, नर्स,आशासेविका व पोलीस प्रशासनाचे त्यानी अभिनंदन केले आहे.

डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील पेट्रोल पंप रद्द करा डाॅ उमेश वावरे ची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
30 जुलै
वर्धा शहरातील आत डाॅ बाबासाहेब आंबेडकर जवळ शिट क्र 02 भूखंड क्र 12 मौजा वर्धा येथे पेट्रोल पंप बांधकाम होत आहे. ते आंबेडकर पुतळ्या जवळ होणे अन्याय कारक आहे. त्यामुळे तिथे होऊ घातलेले सामाजिक कार्यस बाधा आनणारे आहे. व समाज बांधवाच्या भावना दुखवनारा आहे .शहरात एकोपा निर्माण व्हावा व सामाजिक विघटन होऊ नये हया करीता आपन ते पेट्रोल पंप अन्य ठिकाणी हलवा .
तसेच हया पेट्रोल पंप करीता ज्या अधिकारी परवानग्या दिल्या व त्या वर कठोर कारवाई करावी जर पेट्रोल पंप रद्द झाले नाही तर मोठाया प्रमाणात जन आदोलन करण्यात येईल. अशे निवेदन कामगार नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात श्रिमती प्रेरणा देशभ्रतार जिल्हा अधिकारी वर्धा यांना देण्यात आले त्या प्रसंगी अॅड रामकृष्ण सांभारे. मनीष कांबळे. जिवनभाऊ उरकुडे. राजेश खानकूरे. दिलीप कहूरके. महादेव शेन्डे. सुभाष खडारे .नंदकिशोर खोड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

एस एस एम विद्यालयाची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम        

0

 

सचिन वाघे वर्धा

दि. 30 जुलै हिंगणघाट :- प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस. एस. एम. विद्यालय, हिंगणघाट येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री रमेशराव धारकर प्रमुख अतिथी शाळेच्या प्रशासकीय प्रमुख सौ सु. स. देशपांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्र. ल.देशपांडे पर्यवेक्षक श्री भ.तु. धोंगडे सकाळ पाळी प्रमुख श्री रा.ता.कारवटकर  प्रामुख्याने  उपस्थित होते. .यावेळी उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.दरवर्षी शाळेतून विविध  स्पर्धा परीक्षामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यात येते 2021 मध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत शाळेतील  29 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये श्रुती सचिन वाघे, विशाल राजेश डफ,खुशी अनिल झाडे,गुंजन विलास कोल्हे,सृष्टी सचिन वाघे,भूमिका संजयराव तूमाने,संस्कृती विनोद पिटटलवार, तनुश्री आतिश काळे, सानिका घनश्याम खुनकर या विद्यार्थ्यांनी  घवघवीत यश प्राप्त करून निकालाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन  संस्थेचे अध्यक्ष श्री. गो. गो. राठी उपाध्यक्ष श्री श्या भा भीमनवर सचिव श्री र गं धारकर शाळेच्या प्रशासकीय प्रमुख सौ.सु.स.देशपांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्र.ल.देशपांडे पर्यवेक्षक श्री भ.तु. धोंगडे जेष्ठ शिक्षक तथा सकाळ पाळीचे प्रमुख श्री रा.ता.कारवटकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग व समाजातील सर्व स्तरातून होत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांनी  आपल्या यशाचे श्रेय   मुख्याध्यापक,  पर्यवेक्षक, सकाळ पाळीचे प्रमुख व सर्व शिक्षकांना तसेच आई वडिलांना दिले

यावल नगरपालिकेत एसीबीचा ट्रॅप; अधिकारी ताब्यात

0

 

 

यावल प्रतिनिधी | विकी वानखेडे

येथील नगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज दुपारी सापळा रचून एका अधिकार्‍याला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील नगरपालिकेत आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केली. यात जळगाव येथील पथकाने सापळा रचून पालिकेतील एका अधिकार्‍याला ताब्यात घेऊन जळगावकडे प्रयाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज कारवाई करण्यात आलेला अधिकारी हा वरिष्ठ असून त्याला लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात लाचलुचपत खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भातील अधिक तपशील देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नगरपालिकेतील लाचखोरीबाबत अनेकदा चर्चा होत असली तरी आज थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या अटकेचा संबंध नगरपालिकेतील राजकीय वादांशी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.