Home Blog Page 428

साहित्यरत्न थोर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त डी. जे. ग्रुप महाराष्ट्र राज्य व पंचशील ग्रुप आर्वी च्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा उपक्रमा अंतर्गत अभिवादन.

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी  प्रज्वल यावले

आज दि. ०१/०८/२१ ला डी. जे. ग्रुप महाराष्ट्र राज्य व न्यू बॉईज पंचशील ग्रुप आर्वी च्या वतीने थोर साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सूरज घ. मेहरे व दर्पण प. टोकसे यांच्या नेतृत्वखालील आर्वी शहरात वाल्मीक वार्ड, मायबाई वार्ड, रेल्वे स्टेशन, कन्नोमार नगर , अंतरडोव पुनर्वसन, पिंपळा पुनर्वसन आणखी बऱ्याच ठिक ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबवण्यात आला व थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले….
दीपक भाऊ ढोणे, विलास भाऊ बेंडे, विशाल बडगे, अभी भीवगडे,अरुण लांडगे योगेश बावणे, अनिल माहुरे, मनवरे काका, दुर्गेश वाघमारे, संजय डोंगरे, मनोज वानखेडे, अनिल पखाले, संघम वानखेडे, अनिकेत शिघाने, व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .. .

हिंगणघाट गौतम वार्ड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली

0

 

सचिन वाघे वर्धा

दि. 1 ऑगस्ट
हिंगणघाट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्य गौतम वॉर्ड येथे मातंग समाज मंदिर येथे मनसे जिल्हाअध्यक्ष अतुल वांदिले यांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.

सुनगाव शेतशिवारात आदिवासी शेतमजुराचा मृतदेह सापडला विहिरीत / मृत्यु संशयास्पद..

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी संतोष राठी यांच्या शेतशिवारातील विहिरीमध्ये त्यांच्या शेतात कामाला असलेला शेतमजूर नामे तेरसिंग मनुसिंग गोचऱ्या याचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली सदर मृतक इसम हा संतोष राठी यांच्या शेतामध्ये आपल्या छोट्याशा कुटुंबासह राहत होता तो संतोष राठी यांच्या शेतातच शेतमजुरी करीत होता.आज सकाळी दिलीप राठी शेतामध्ये चक्कर मारण्याकरिता आले असता त्या ठिकाणी मृतक तेरसिंग गोचऱ्या हा त्याच्या कुटुंबासह शेतात मिळून आला नाही दिलीप राठी यांनी शेतात फिरून पाहणी केली असता तो मिळून आला नाही दिलीप राठी यांनी शेतामधील विहिरीला किती पाणी आहे हे पाहण्याकरिता विहिरीत डोकावले असता त्यांना काहीतरी पाण्यावर तरंगताना दिसले त्यांनी निरीक्षण केले असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. त्या ठिकाणी कोणी नसल्याचे पाहताच दिलीप राठी ही दुसरीकडे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असता तीर सिंग कहा पे है और उसकी लाडी और बच्चे कहा पे है असे बोलले असता मृतक तेरसिंग ची पत्नी गीता ही आपल्या नातेवाईकांसह संतोष राठी यांच्या शेतात गेले असता त्यांनी व्हेरी डोकावून पाहिले असता त्यांना मृतक तेरसिंग याचे प्रेत विहिरीत तरंगत असल्याचे दिसून आले व तो तेरसिंग ही है असे बोलले असता तसेच तेरसिंग याची पत्नी गीता हिने जळगाव पोलीस स्टेशन गाठले व पती विहिरीत पडल्याची फिर्याद दिली फिर्यादीच्या रिपोर्ट वरून जळगाव जामोद पोलीस स्टेशन ने मर्ग दाखल करून घेतला मर्ग नंबर ५४/२०२१ कलम 174 नुसार दाखल करण्यात आला. सदर घटनेची फिर्याद मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात ए एस आय शेषराव पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे, पोलीस कॉन्स्टेबल गवई यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सदर मृतकाचे प्रेत जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनास पाठविले. सदर मृतक तेरसिंग गोचऱ्या याने आत्महत्या केली की काही त्याच्यासोबत घातपात झाला असा संशय येत आहे. पुढील तपास बिट जमदार अशोक वावगे करित आहेत

महावितरणच्या उपव्यस्थापक सुभाष चक्रे निरोप समारंभ

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती- उपव्यस्थापक श्री.सुभाष  चक्रे यांना दिनांक ३०/७ /२०२१ प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे अभियंता ग्रामीण विभाग कार्यालय अमरावती व इतर भागात
जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून सर्व सामान्य माणसाला चांगले सेवा दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता मा.अनिरुध्द आलेगावकर होते या निरोप समारंभाचे सत्कार मुर्ती अभियंता सुभाष चक्रे व सौ.चक्रे
मॅडम यानां शाल व श्रीफळ देऊन सत्कार करुण आपल्या भाषणात श्री चक्रेसाहेबा बद्दल त्यांचे कामांचे कौतुक केले व अभियंता सुभाष चक्रे यांना पुढील कामाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी महावितरण मधील कार्यरत अनेक संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते श्री सुभाष चक्रे साहेबांच व्यत्कीमहत्व हे महत्वाचे पदावर असताना सुद्धा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यानां योग्य न्याय
दिला गेला पाहिजे कोणावरही अन्याय होता
कामा नये अशी भूमिका सेवा निवृत्त होई पर्यंत सेवा दिली.

मिल कामगारांच्या समस्या घेऊन कामगार नेते डॉ. उमेश वावरे यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 2 आगस्ट ला मोहता मिल कामगारांच्या मागणा घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यलयासमोर 1 दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे .

सावता परिषदेच्या वतीने फेसबुक लाईव्ह प्रवचनमाला

0

 

सिलोड प्रतिनिधी सागर जैवाळ

संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवन चरित्राचा जागर करण्यासाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या संकल्पनेतून सात दिवसीय प्रवचनमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू उबाळे (मामा) व महिला जिल्हाअध्यक्ष मंजूषा ताई महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संतशिरोमनी सावता महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा सर्वत्र मोठया व्यापक प्रमाणावर साजरा होत असतो. तथापि, मागील दोन वर्षांपासून कोव्हीडच्या कठोर निर्बंधामुळे जाहीर स्वरूपाचे उपक्रम अथवा उत्सव घेता येत नाहीत. मात्र अशाही परिस्थितीत सावता महाराजांच्या जीवन चरित्राचा जागर झाला पाहिजे. त्यांच्या विचार-आचार आणि कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी या फेसबुक लाईव्ह प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सावता परिषद फेसबुक पेजवरून दि.१ ऑगस्ट रोजी गायनाचार्य ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे (बारामती), दि.२ ऑगस्ट रोजी विनोदाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे(नेवासा), दि.३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनीताताई महाराज आंधळे(आळंदी), दि.४ ऑगस्ट रोजी किर्तनकेसरी ह.भ.प. प्रा. सागर महाराज बोराटे(नातेपुते), दि.५ ऑगस्ट रोजी भाषाप्रभु ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील(भिवंडी), दि.६ ऑगस्ट रोजी समाजप्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी(नंदुरबार), दि.७ ऑगस्ट रोजी प्रेममुर्ती ह.भ.प. समाधान महाराज शर्मा(केज) या महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकार मंडळींचे सावता महाराजांच्या अभंगावर रोज सांयकाळी ७ ते ८ या वेळेत प्रवचने होणार आहेत.
शनिवार दि.७ ऑगस्ट रोजी सावता महाराजांच्या पुण्यतिथीदिनी सकाळी ११ वा. सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. दत्तात्रय मामा भरणे शुभेच्छा संदेश देणार आहेत. सावता महाराजांच्या संजीवन समाधीचे लाईव्ह दर्शन ठिक ११.३० वाजता तर दुपारी ठीक १२ वा. भजनसम्राट ह.भ.प. सदानंद महाराज मगर(पैठण) यांच्या स्वरांनंद कला अकॅडमी प्रस्तुत संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.प्रा. प्रभू महाराज माळी हे करणार आहे
तरी या फेसबुक लाईव्हद्वारे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचे असे अवाहन सावता परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष जगदीश बुलबुले व युवा जिल्हाध्यक्ष सागर जैवळ ,जिल्हा कार्यअध्यक्ष प्रमोद गायके यांनी केले आहे.

धानोरा गावातील पूर्णा नदीतील वाळु चोरी झपाट्याने — सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांची मागणी

0

 

सागर जैवाळ सिल्लोड प्रतिनिधि

होत आहे व धानोरा फाटा ते धानोरा रस्त्याची दुरव्यवस्था झाली आहे याला कारणीभूत सिल्लोड वरून अनेक टिप्पर येतात आणि वाळु चोरी करून नेतात यामूळे धानोरा फाटा ते धानोरा रस्ता अतिशय खराब झाला आहे याकडे धानोरा ग्रामपंचायत व लोक प्रतिनिधि व महसूल विभाग व पोलीस प्रशासन आणि गावातील पोलीस पाटील दुर्लक्ष करीत आहे तरी त्वरीत वाळु ऊपसा थांबवावा अशी सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांची मागणी

सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड कन्नड रस्त्यावर असलेल्या धानोरा फाटा ते धानोरा गाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून संबंधित ग्रामपंचायत चे दुर्लक्ष करत आहे. तालुक्यातील धानोरा हे गाव सिल्लोड कन्नड रस्त्यावर असून या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते.मात्र येथील रस्त्यांची अवस्था अशी झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते झाली आहे. . गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू होणार होते,अद्यापही काम सुरु झाले नाहि सध्या पावसाळा सुरू असल्याने थोडा जरी पाऊस झाला या रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे डबके साचतात. त्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर कित्येक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात.त्यामुळे धानोरा फाटा ते धानोरा हा रस्ता वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनला आहे. संबंधित विभागाने या रस्त्याला कामाला मंजुरी देऊन सुद्धा या रस्त्याचे काम सुरू का झाले नाही ?????

वड्री जवळ आदिवासी वस्तीवर राहणाऱ्या कुपोषीत बालकाचा मृत्यू; वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांचा दुजोरा

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल तालुक्यातील वड्री जवळच्या आदिवासी वस्तीवर राहणार्‍या एका आठ महिन्याच्या कुपोषित बालकाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज शनिवार ३१ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे. यावृत्ताला यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला यांनी दुजोरा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील वड्री धरण येथील आदिवासी वस्तीमधील आकाश जवानसिंग पावरा (वय-आठ महिने) हा बालक गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. आज शनिवार ३१ जुलै रोजी पहाटे सहा वाजता त्याची प्रकृती अत्यंत खालावली. त्यामुळे त्याला त्याच्या पालकांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ग्रामीण रूग्णालयात डॉ. अक्षय नालगे यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली असता बालक कुपोषीत असून त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते. त्याला श्वास घेण्यासही खूप अडचणी येत होत्या असे त्यांना आढळून आले. परिणामी वैद्यकीय अधिकारी यांनी बालकाला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले.

या अनुषंगाने शासकीय रूग्ण वाहिकेने बालकाला सकाळी १० वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बालकाला येथील बालरोग तज्ञ डॉ. अतूल गाजरे यांनी तपासणी केली. यातच बालकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी बालकाच्या मृतदेहावर शवविच्छेदन केले. दरम्यान, तालुक्यातील कुपोषीत बालकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी दुजोरा दिला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे यावल येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १३ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत कुपोषणग्रस्त बालकांची आकडेवारी विचारली होती. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकासच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांची अक्षरश: भंबेरी उडाली होती. यावल तालुक्यातील ३१६ कुपोषणग्रस्त तर ३९ बालके कमी जास्त वजनाची बालके असल्याचे समोर आले होते. ही आकडेवारी पाहून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दोन्ही अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. यानंतर आज तालुक्यात कुपोषीत बालकाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना करणार याकडे लक्ष लागले आहे.

चिंचळा तर्फे मित्रता दिनाच्या झाड लावून शुभेच्छा .

0

 

झाडे ही पृथ्वीवरील मौल्यवान नैसर्गिक संसाधने आहेत. आपण झाडांना इजा करु नये आणि झाडे आणि जंगले तोडणे थांबवावे. हे वायू प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग आणि दुष्काळ यासारख्या बर्‍याच प्रदूषणांना कमी करण्यात मदत करेल. आपण आपल्या आसपासच्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यास सुरुवात केली पाहिजे आणि त्यांचे काळजीपूर्वक संवर्धन केले पाहिजे. झाडे ही देवाने दिलेली अनमोल भेट आहे. माणूस आणि प्राणी दोघांनाही झाडांपासून अनेक गोष्टी मिळतात. वृक्ष लागवड ही जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे परंतु बर्‍याच लोकांना झाडाचे महत्त्व कळत नाही. झाडे आमचे जिवलग मित्र आहेत. आपण आनंदी किंवा दु:खी असो, झाडे नेहमीच आपल्यासाठी उपयुक्त असतात. लोक झाडांच्या मदतीने जगतात, झाडे चांगली हवा देतात, पाऊस पुरवतात. पावसाशिवाय पाणी, पिके होणार नाहीत. म्हणून मानवी जीवनासाठी झाडे आवश्यक आहेत. झाडांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. आज बरेच लोक झाडे नष्ट करतात जे शहाणे लोक नाहीत. त्यांना भविष्याचा विचार नाही. झाडांशिवाय आपली पृथ्वी वाळवंट होईल. बरेच लोक पैसे मिळवण्यासाठी झाडे तोडतात. केवळ झाडांचे आयुष्यच नाही तर प्रत्येकाचे आयुष्यही नष्ट होईल. बर्‍याच देशांमध्ये झाडे तोडण्यास बंदी आहे. झाडे तोडणाऱ्या आणि त्यांना नुकसान पोहोचविणाऱ्यांविरोधात मोठी पावले उचलली पाहिजेत. वृक्षांच्या महत्त्वविषयी जनजागृती लोकांमध्ये व्हायला हवी.

समीर सोनोने के नेतृत्व में टीम महाराष्ट्र पहुंची उदयपुर

0

 

रूरल गेम्स चैंपियनशिप प्रतियोगिता में सहभागी हो रही टीम महाराष्ट्र

अकोला प्रतिनिधि

यूथ रूरल गेम्स असोसिएशन राजस्थान द्वारा उदयपुर में आयोजित रूरल गेम्स नैशनल चैंपियनशिप 2021 में सहभागी होने टीम महाराष्ट्र समीर अनिल सोनोने के नेतृत्व में उदयपुर पहुची है . 29 30 31 जुलाई तीनदिवसीय प्रतियोगिता में आउटडोर और इनडोर दोनों तरहा के खेल होने है . इस नैशनल चैंपियनशिप में देश भर के खिलाड़ी सहभागी होने जा रहे है . अकोला से टीम महाराष्ट्र के खिलाड़ी समीर अनिल सोनोने के नेतृत्व में सहभागी हुए है .