Home Blog Page 43

Sharadpawar :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी..

0

 

शहरात निघालेल्या शोभायात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सन्मानचिन्ह देऊन भव्य स्वागत…

प्रतिनिधी सचिन वाघे

Sharadpawar:हिंगणघाट : – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी चौक येथे *प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले* यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Accdent news/ बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच मृत्यू, १५ जण जखमी

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सहकार नेते वासुदेव गौळकार, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शहरात एकूण १३ शोभायात्रा काढण्यात आल्या सर्व शोभायात्रेचे अध्यक्ष व सदस्यांना यांना शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी स्वागत केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, विजय तामगाडगे, गुड्डू घवघवे, ॲड दिनेश झिलटे, सिद्धार्थ मस्के, रवी डेकाटे, रवी गिरसावले, सुनील भुते, राजू मेसेकर, मिना सोनटक्के, दिपाली रंगारी,

Sharadpawar:-आंचल वकील, किशोर चांभारे, जितेंद्र रघाटाटे, परम बावणे, सुनिल घोडखांदे, प्रवीण भूते, बच्चू कलोडे, कुणाल येसंबरे, नितीन भुते, सुभाष सोयाम, करीम खान पत्रकार, नदीम , गजू महाकालकर, बबलु शेख, अनिल भुते,पंकज भट, राजू मुडे, सुशिल घोडे, गोलू भूते, मो.शाहिद, नदीम अली, अमित रंगारी, राहुल जाधव, आकाश हुरले, सौरभ घोडखांदे, कुणाल घोल्हर, विपुल वाढई, अभिजीत साबळे, कुणाल भूते, मनीष मुडे, स्वप्नील पांडे, दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

Shivsena / शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-१४ एप्रिल २०२५ रोज सोमवारला सायंकाळी ठिक ०७:०० वाजता
*विश्वरत्न..!!*भारतरत्न..!बोधिसत्व..!!*परमपुज्य..!!*
महामानव..!!*युगपुरूष..!!*
महाविदवान..!!*स्त्रीउध्दारक..!!**
युगप्रवर्तक..!!*क्रांतीसुर्य..!!*
विश्ववंदनीय..!!*महान अर्थशास्त्री..!!महान इतिहासकार..!!*भारताचे कैवारी..!!*भारत भाग्य विधाता..!!*सिंबाॅल आफॅ नाॅलेज..!!*ज्ञानाचा अथांग सागर..!!!*कायदेपंडित..!!!*
विश्वभूषण..!!!*कामगारांचे नेते..!!!*महानायक..!!!*भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार..!!!*महान इतिहासकार..!!!*बँरिस्टर..!!!*
विश्वरत्न *डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* *यांच्या १३४ व्या जयंती दिना निमीत्त प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून पूजा करण्यात आली. सर्वांनी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन केले. सतिश धो‌बे यांनी उपस्थित सर्व शिवसैनिक, यूवासैनिक तथा पदाधिकारी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला औरंगाबाद येथून आलेले प्रमुख पाहुणे ऍड भुजंग कुमार धाबर्डे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याप्रसंगी थोडक्यात परमपूज्य *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर सतीश धोबे, ऍड भुजंग धाबर्डे, प्रकाश अनासाने यांनी माहिती विशद केली*.
“”*औरो को मिला हे वो मुक्कद्दर से मिला होंगा,*
*लेकिन हमे तो मुक्कद्दर भी आपके संविधान से मिला है*”” *_ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन..!!_
सदर कार्यक्रमात प्रकाश अनासाणे, मनोज वरघणे, शंकर मोहमारे, भास्कर ठवरे,गजानन काटवले, सौरभ कांबळे, पप्पू घवघवे, अनंता गलांडे, शितल चौधरी, भास्कर मानकर,नितीन वैद्य, दिलीप वैद्य ,अविनाश धोटे,चंदू भुते,अभिजित शिंगारे, धीरज धोटे, अमोल वादाफळे, दिनेश धोबे, उमेश धोंडे, विजय कोरडे, प्रशांत कांबळे ,नरेश तामगाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाळाभाऊ टेंभुर्णे, भास्कर भिसे, हिरामण आवारी,राजू मंडलवार ,नरेश खुरपुढे,आशिष वाघ ,उमेश धोबे, विलास धोबे,शकील अहमद, संजय तराळे,फिरोज पठाण,घनश्याम वाघमारे,विजय कोरडे, हेमंत भोयर,सचिन मुळे,संदेश मानकर,…. इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Accdent news/ बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच मृत्यू, १५ जण जखमी

0

 

Accdent news:सकाळच्या वेळी बुलढाण्यातील खामगाव ते नांदुरा महामार्गावर आमसरी फाट्याजवळ जोरदार बस अपघात घडला.

मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर अघळपघळ धडक झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

तर जवळपास १० ते १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Walmikkarad / वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर; रणजीत कासले यांच्या दाव्याने बीडमध्ये खळबळ

अपघाताच्या वेळी दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती, त्यामुळे बस आणि वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे (चक्काचूर) झाला. रस्त्यावर काचांचा खच पडला आणि विटा गवतात पसरल्या होत्या.

जखमी प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या अपघाताची माहिती मिळताच खामगाव पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तात्काळ खामगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Accdent news:अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना नेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांचे मदतकार्य सुरूच आहे.

Walmikkarad / वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर; रणजीत कासले यांच्या दाव्याने बीडमध्ये खळबळ

0

 

Walmikkarad:अप्रिल 2025 मध्ये, बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी एक धक्कादायक दावा केला आहे ज्याने एकीकडे हुरळून टाकले आहे.

त्यांनी आरोप लावला आहे की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर त्यांना देण्यात आली होती.

Prashantdikkar / स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत डिक्कर यांची निवड..संभाजीराजे छत्रपती यांनी सोपवली राज्याची जबाबदारी..

रणजीत कासले यांनी माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवरून हा दावा केला असून त्यामुळे बीडच्या वातावरणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

करणा मुंडे यांनीही यापूर्वी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची शक्यता व्यक्त केली होती.

हे प्रकरण राजकीय दृष्टिकोनातूनही प्रखर चर्चेचा विषय बनले आहे आणि वाल्मीक कराड याच्याशी संबंधित विविध आरोपांमध्ये एक नाट्यमय वळण येऊ शकते.

रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागातील पोलीस निरीक्षक होते आणि अलीकडेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माध्यमातून अनेक खळबळजनक दावे केले आहेत, ज्यामुळे बीडच्या समाजातील विविध घटकांमध्ये वादविवाद निर्माण झाला आहे.

रणजीत कासले यांनी दावले आहे की त्यांना बनावट एन्काऊंटरसाठी ५ कोटी, १० कोटी आणि ५० कोटींची ऑफर दिली जात होती.

त्यांच्या दाव्यानुसार, ASI या पदावरील पोलीस अधिकाऱ्याला लाखोंची रक्‍कम देऊन एन्काऊंटरसाठी हेरफेर केली जाते.

Beed:आणि चौकशीतूनही पोलिसांना मुक्त करण्याचे आश्वासन दिले जाते. या सर्व दाव्यांनंतर वाल्मीक कराड याच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

 

Yavalnews /बोराळे ग्रामपंचायतचे वतीने महामानव भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

Yavalnews :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सामाजिक समतेचे युद्ध आणि सत्तेच्या मार्गाने लढणारे थोर समाजसुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे केवळ कायद्याचे दस्तावेज नसून ते एक सामाजिक परिवर्तनाचे शक्तिशाली माध्यम ठरले असल्याचे मनोगत सरपंच सौ संध्या राजपुत यांनी व्यक्त केले.

प्रज्ञासूर्य ज्ञानसागर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने बोराळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या

Prashantdikkar / स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत डिक्कर यांची निवड..संभाजीराजे छत्रपती यांनी सोपवली राज्याची जबाबदारी..

यांची जयंती लोकनियुक्त सरपंच संध्याबाई उज्जैनसिंग राजपूत यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून आदरांजली वाहण्यात आली याप्रसंगी उपसरपंच दिपाली खिलचंद चौधरी,ग्रामपंचायत सदस्य गौतमाबाई भिमराव वानखेडे, मायाबाई कैलाससिंग राजपूत भारती नितीन

सिंग राजपूत,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उज्जैनसिंग राजपूत,पोलीस पाटील माधुरी राजपूत,अंगणवाडी सेविका रेणुका, वानखेडे,अंगणवाडी मदतनीस सुवर्णा राजपूत ,आशा वर्कर सुनेना राजपूत,संजय सिंग राजपूत ,अशोक वानखेडे , प्रदीप वानखेडे ,राजू वानखेडे,अमर

Yavalnews :वानखेडे,आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सुपडू संदानशिव कमलबाई तायडे,संदीप वानखेडे , हंसराज राजपूत, नितीन राजपूत व ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितित साजरी करण्यात आली .

Prashantdikkar / स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत डिक्कर यांची निवड..संभाजीराजे छत्रपती यांनी सोपवली राज्याची जबाबदारी..

0

 

इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा

Prashantdikkar:शेगांव/ शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर आक्रमक लढणारे प्रशांत डिक्कर यांची स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यानी स्वराज्य पक्ष मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुशजी कदम (मुंबई) यांचे प्रमुख उपस्थित प्रशांत डिक्कर यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशांत डिक्कर हे बुलढाणा जिल्ह्यातील तालुका संग्रामपूर लहानशा बोडखा गावातुन समोर आलेले नेतृत्व आहे. कोणताही राजकीय वारसा नसतांना परिस्थितीवर मात करीत १६ वर्षांपासून शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर संघर्ष करीत प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यभरात आपली ओळख निर्माण केली.

DrbaBasahebAmbedkar/बाबासाहेब आंबेडकर: आंबेडकर हे आडनाव कसे पडले?

राज्यात नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीतील परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार म्हणून प्रशांत डिक्कर जळगाव जामोद मतदारसंघातुन मैदानात उतरले होते. खंबीरपणे प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी सभांजीराजे सर्वशक्तीनिशी उभे राहिल्याने हि निवडणुक चांगलीच प्रतिष्ठेची ठरली होती.

या निवडणुकीत प्रशांत डिक्कर निवडुन आले नसले तरी मताधिक्य चांगले प्राप्त केले होते. त्यामुळे आजचा योगा योग असावा वाढदिवसाचे औचित्य पाहून आज दि.१४ एप्रिल रोजी सभांजीराजेंनी प्रशांत डिक्कर यांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून स्वराज्य पक्ष किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याचे सांगितले आहे.

Prashantdikkar:राज्याची जबाबदारी मिळाल्याने महाराष्ट्रात स्वराज्य पक्षाच्या विस्ताराला एक मोठी वाट मोकळी झाली असुन कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढाऊ नेतृत्वाला योग्य संधी मिळाली आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्वस्तरातून कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर वर्गातुन प्रशांत डिक्कर यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

DrbaBasahebAmbedkar/बाबासाहेब आंबेडकर: आंबेडकर हे आडनाव कसे पडले?

0

DrbaBasahebAmbedkar:साहत्या शतकाच्या प्रारंभी साताऱ्यात राहून कार्यरत असलेले बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांची जयंती साजरा करताना, त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण म्हणजे त्यांचे आडनाव कसे बदलले,

या तथ्याबद्दल पाहणे औचित्याचे ठरेल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाचे नाव कोकणातील आंबडवे होते. त्यांच्या कुटुंबाचे मूळ आडनाव सकपाळ होते.

SanjayRaut / छत्रपती शिवाजीचा अवमान; राजकीय वाद वाढला” :- संजय राऊत 

पूर्वीच्या काळात, लोक आपल्या गावाच्या नावावरून आडनाव घेत असत.

कोकणात अशा प्रकारे गावाच्या नावानंतर *कर* हा शब्द जोडण्याची पद्धत होती. बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांचे नाव सातारा येथील शाळेत “भीमराव रामजी आंबडवेकर” असे टाकले होते.

पण त्यांचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी त्यांना *आंबेडकर* हे सोपे आडनाव दिले. या प्रकारे *आंबेडकर* हे आडनाव जन्माला आले.

बाबासाहेबांच्या लहानपणीच्या नावाची कहाणीही रोचक आहे.

त्यांचे तेव्हा “भीमा” किंवा “भिवा” असे नाव होते. साताऱ्यातील शाळा आजही त्यांचे रजिस्टर जतन करते जिथे त्यांची “भिवा रामजी आंबेडकर” अशी स्वाक्षरी आहे.

कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची जबाबदारी

बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबेडकर हे आडनाव कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी दिल्याचे कारण म्हणजे *आंबडवेकर* हे आडनाव त्या वेळी किचकट वाटल्याने ते बदलण्यात आले.

DrbaBasahebAmbedkar:कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची तिसरी पिढी आजही मंगळवार पेठेतील व्यंकटपुरात कार्यरत आहे. ते बाबासाहेबांच्या काळातील एक महत्त्वाचे संबंध जोडतायत.

Pikvima / हिंगणघाट तालुक्यात मनसेच्या दणक्याने पीक विमाचे पैसे वाटपाला सुरुवात

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यातील पिक विमा कंपनीने गेल्या बरेच दिवसापासून वर्धा जिल्ह्याला पिक विम्याच्या पैशासाठी फार मोठी रुकावट दिली होती विदर्भाच्या बरेचसे जिल्ह्यात पैशाचा वाटप सुरू करून सुद्धा वर्धा जिल्ह्यात वाटप केलेला नव्हता.

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हिंगणघाट पिक विमा कंपनीला सात दिवसाचा अल्टिमेट देऊन निवेदन देण्यात आले होते पिक विमा कंपनीने मनसेकडून देण्यात आलेल्या अल्टिमेट मुळे पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यास सुरुवात केली आहे.

SanjayRaut / छत्रपती शिवाजीचा अवमान; राजकीय वाद वाढला” :- संजय राऊत 

तरी शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण सर्वतोपरी पसरलेला आहे व जनतेत मनसेमुळे वाटप सुरुवात झालेला आहे अशी चर्चा सर्वत्र पसरलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयंता कातरकर जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जिल्हा अधक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना वर्धा जिल्हा यांच्या

Pikvima :प्रमुख नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष राजू बोंबले तालुकाध्यक्ष पवन समुद्रपूर तालुका अध्यक्ष विठ्ठल तळवेकर तालुका संघटक हरिभाऊ महाजन हिंगणघाट शहराध्यक्ष केतन तायवाडे व तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले तालुका संघटक देवा काटकर सर्कल अध्यक्ष सागर घवघवे रमेश बावणे अनिकेत वानखेडे समुद्रपूर तालुका सचिव संजय हिंगणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Pikvima :पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले होते त्यानिमित्त जयंत कातरकर यांनी शेतकऱ्यांना पैशाचा वाटप केल्याबद्दल त्यांच्या खात्यात पैसा जमा होत असल्यामुळे पिक विमा कंपनी प्रबंधक यांचे आभार व्यक्त केले

SanjayRaut / छत्रपती शिवाजीचा अवमान; राजकीय वाद वाढला” :- संजय राऊत 

0

 

औरंगजेबाला समाधी, शिवरायांचा अवमान; अमित शहांचा कडेलोट करा

SanjayRaut:महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील एक महत्त्वाचे पैलू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

मात्र, अलिकडच्या काळात या महान व्यक्तिमत्त्वाच्या अपमानाच्या घटना आणि टीकांमुळे राजकीय वातावरण तीव्र झाले आहे.

Kalyannews/ कल्याण बलात्कार प्रकरण: आरोपी विशाल गवळीची आत्महत्या

नुकत्याच रायगड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादन केले,

मात्र त्यांनी महाराजांचा उल्लेख “शिवाजी, शिवाजी” असा केल्याच्या आरोपांवरून टीका झाली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमित शहा आणि शिंदे गटावर कडाडून हल्ला चढविला असून, ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्ञान गृहमंत्र्यांकडून घेण्याची इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही.

त्यांनी महाराजांचा उल्लेख ‘शिवाजी’ असा केल्याने हा महाराजांचा अवमान आहे.” संजय राऊत यांनी या विरोधात मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड रायगडवर येणार्यांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण होते, मात्र अलीकडच्या काळात हे स्थान राजकीय वादाचे केंद्र बनत आहे.

संजय राऊत यांच्या प्रमाणे शिंदे गटाचे नेते हे ‘फालतू नकली हिंदुत्व’ वाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाचा ढोंग करत असल्याचा आरोप आहे.

सातारा आणि कोल्हापूरच्या वंशजांना निमंत्रण न देता फक्त भाजपमध्ये हाजी हाजी करणार्यांना निमंत्रण देण्याची टीका त्यांनी केली.

SanjayRaut:या सर्व पार्श्वभूमीवर, अमित शहांच्या भाषणाने राजकीय वातावरण अधिक तीव्र केले आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक नेत्यांकडून या अपमानाच्या विरोधात कडाडून आवाज उठत आहेत.

Kalyannews/ कल्याण बलात्कार प्रकरण: आरोपी विशाल गवळीची आत्महत्या

0

 

Kalyannews:थाणे जिल्ह्यातील कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी तळोजा जेलमध्ये आत्महत्या करून दिली आहे.

ही घटना म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी भागातील एका अल्पवयीन मुलीवर घटलेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाचा एक भयंकर टप्पा आहे. 13 वर्षांच्या या मुलीवर बलात्कार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

Ravikanttupkar / “बँकांकडून पिळवणूक? रविकांत तुपकर यांचा इशारा, ‘हे कसे थांबवायचे ते शिकवू’”

आरोपी विशाल गवळीने त्याच्या सक्तीच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या शौचालयात टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

 

या प्रकरणातील सर्वात मोठा आरोपी म्हणजे विशाल गवळी. त्याने रिक्षा चालक म्हणून काम करून मुलीला त्याच्या घरात बोलावले होते.

त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली होती. तिचा मृतदेह बापगाव येथे फेकून देण्यात आला. या प्रकरणात विशालच्या पत्नी साक्षी गवळीनेही मदत केल्याचा आरोप आहे.

विशाल आणि त्याच्या पत्नीने मृतदेह पुसण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट करण्यासाठी एक कट रचला होता. विशालने मित्राची रिक्षा वापरून मृतदेह बापगाव येथे नेण्यात आला.

विशाल गवळी तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना पहाटे साडेतीन वाजता शौचालयात टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Kalyannews: ही घटना कल्याणच्या नागरिकांना हादरून टाकली आहे. आरोपीवर आधीच काही गुन्हे दाखल होते, त्यामुळे त्याच्यावर आक्षेपितपणे पाहिले जाते.