Home Blog Page 431

भीम आर्मी ने दिले प्रांताधिकारी फैजपूर यांना निवेदन,आरोपींना कठोर शिक्षेची मागणी व फास्टट्रॅक वरती खटला चालवण्याची केली मागणी

0

 

यावल ता (प्रतिनिधी)विकी वानखेडे

फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयास दिले भीम आर्मी ने निवेदन,
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,
हत्याग्रस्त पिडीत विवाहितेला योग्य तो न्याय मिळावा.
यावल तालुक्यातील न्हावी येथील माहेरवाशीण असलेली अल्पवयीन तरुणी करीना भालेराव(निकम) यांचा जळगांव येथील दांडेकर नगरातील सागर निकम या तरुणाशी ११ जुलै रोजी विवाह सोहळा संपन्न झाला,मात्र लग्न सोहळ्याच्या दहा दिवसातच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणी करीना भालेराव(निकम) यांनी राहत्या घरात आत्महत्या केली…..
त्यांनी अजुन म्हटले आहे की, सदर पीडित तरुणी हि अल्पवयीन असल्याने ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम नसतांना हि तिचा विवाह करण्यात जे कि भा.दं.स. च्या बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ विरुद्ध आहे..तसेच जळगांव येथील रहिवासी सागर निकम व त्यांचा परिवार यांनी पीडित तरुणी अल्पवयीन असून देखील कायद्याविरुद्ध जाऊन विवाह केला व सदर विवाहित तरुणी करीना भालेराव(निकम) यांचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले,,,जे कि हत्या केल्या प्रमाणेच आहे.सदर घटना हि,हृदयाला खिन्न करणारी व मानवतावादी समाजाला काळिमा फासणारी आहे. सदर घटनेचे गंभीर्य बघता योग्य ती चौकशी करून हत्तेती सर्व आरोपींना कठोर शिक्षा कशी देता येईल याचा विचार करावा व सदर खटला हा जलदगती न्यायालयात चालवावा जेणेकरून भविष्यात असले कृत्य करणाऱ्या समाजविघातक कृत्यांना चपराक बसेल. सदर निवेदन देते वेळी
भीम आर्मी राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे,राज्य सचिव सुपडू संदानशिव,यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे,महासचिव प्रशांत तायडे, हिंगोना शाखा अध्यक्ष सत्यवान तायडे,कारखाना शाखा चे संतोष तायडे,जितू वाघ,संजय जाधव,दीपक अहिरे,ललित तायडे,गोविंदा भालेराव आदी उपस्थित होते.

श्री शिवाजीमहाविद्यालयात कारगील विजय दिन साजरा

0

 

अजहर शाह

मोताळा:-२६ जुलै ला स्थानिक श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोताळा येथे कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला.देश सेवा करण्याचे कार्य माझ्या नशीबाने मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो असे मत माजी सैनिक मा.सदाशीव घाटे यांनी कारगील विजय दिनी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना व्यक्त केले.तर प्रा.डॉ.सुनिल मामलकर यांनी सैनिक सिमेवर जागरूक असल्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित असतो.असे मत मांडले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूण बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पांडे सर यांनी प्रत्येकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात तन,मन व धन अर्पण करून कार्य केल्यास ती देश सेवाच घडते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अविनाश मेहरकर, यांनी केले तर संचालन प्रा.पुरुषोत्तम चाटे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अरुण गवारे सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मेहरकर सर व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केले. छायाचित्रण प्रा.नागेश गाट्टूवार यांनी केले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.भास्कर भिसे,डॉ.चित्रा मोरे मॅडम,प्रा.विलास हिरनवळे, प्रा.डॉ.सुप्रिया बेहरे मॅडम,डॉ.प्रविण ठेंग , डॉ.अभय ठाकूर प्रा.राम बनकर ,प्रा.निलेश राहाटे,प्रा.दादा मनगटे,प्रा. ब्राह्मणकर,प्रा.चन्नेकर,डॉ. राहुल उके,प्रा.शुभम साखरे व शिक्षकेत्तर कर्मचारी आणी राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी याची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयाची दुरावस्था 9 आगस्ट पासून आमरनचा इशारा ! रुग्णमित्र गजू कुबडे

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 26 जुलै
येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अनेक प्रकारांची दुरावस्था असून सध्याच्या कोविडच्या भिषण काळातही या उपजिल्हा रुग्णालयातील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी शासनस्तरावरून कोणतीही हालचाल होत नाही हे या भागातील जनतेचे दुर्दैव आहे.हा आरोग्यविषयक अन्याय दूर न झाल्यास ९ आगस्ट पासून तीन दिवसाचे आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी आज उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
गजू कुबडे यांनी निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, येथील उपजिल्हा रुग्णालयात पोष्टमार्टेम करणारा कोणताही कायम स्वरूपी कर्मचारी नसल्याने मृतकाच्या नातेवाईकांना विनाकारण अनेक तास आपल्या प्रिय व्यक्तीचे पार्थिव घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे नातेवाईकांना विनाकारण मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
त्याच प्रमाणे एवढ्या मोठ्या उपजिल्हा रुग्णालयात पुर्णकालीन प्रसूती तज्ञ नसल्याने अनेक प्रसूतीकाना एकतर येथील खासगी दवाखाण्यात भरती होऊन महागडा खर्च करावा लागतो किंवा सावंगी अथवा सेवाग्राम येथे नाईलाजाने जावे लागते.यातच एखादी महिला गंभीर अवस्थेत असेल तर तिला आपला जीवही गमवावा लागतो.अशीच दुर्दैवी घटना येथील रुग्णालयात चार ते पाच महिन्यांपूर्वी घडली आहे.
त्याच प्रमाणे येथे फिजिशियन ( वैद्य) ही महत्वपूर्ण जागा मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.त्यामुळे अनेक रुग्णांना तपासणी अभावी अन्यत्र जावे लागते.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेले परंतु परसेवेवर मागील अनेक वर्षांपासून दुसरीकडे आपली सेवा देणाऱ्या 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी वापस बोलविण्यात यावे किंवा त्यांची येथील सेवा खंडित केल्यास या 2 जागा रिक्त होईल त्यामुळे सरकारला नवीन जागा भरता येतील त्यामुळे अनेक गरजू व गरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल.
या सर्व जनतेच्या जिव्हाळ्याच्या व अतिशय महत्वाच्या गंभीर विषया बाबत सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या महत्वपूर्ण प्रश्नाकडे त्वरीत लक्ष दिल्यास येथील गोरगरीब शेतकरी,शेतमजूर,गिरणी कामगार व अत्यल्प उत्पन्न गटातील जनतेला मोठा फायदा होईल असे वाटते.
या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण वेळीच लक्ष द्यावे अन्यथा प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन छेडावे लागेल. येत्या 9 आगस्ट या क्रांती दिनापासून 3 दिवसांचे आमरण उपोषण या मागणी संदर्भात करणार असल्याचा इशारा श्री गजू कुबडे यांनी दिला असून व यानंतरही मागणीवर विचार न झाल्यास प्रहार च्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घेण्याची विनंती महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाला गजू कुबडे यांनी निवेदनातून केलेली आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे हिंगणघाट तालुका प्रमुख जगदीश तेलहांडे,सुरज कुबडे,मोहन पेरकुंडे,राजेश लखाणी,अमोल रामगुंडे,धीरज नंदरे,किशोर देवढे,पवन वाघमारे,अमोल धारने,संतोष जोशी,सुधीर मोरेवार,राजेश तांदुलकर,प्रशांत आवारी भूषण कुंभारे,गोलू कुंभारे,शांताराम तराळे, विक्की सोनकुसरे,गोलू उजवणे,पिंटू वडतकर, अमोल पोतदार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

महावितरण कंपनीच्या भोंगळ व हुकुमशाही पद्धत व शक्तीच्या विजवसुलीच्या विरोधात ग्रामीण सेवा फाउंडेशनचे उपोषण व मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना निवेदन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या हुकुमशाही व भोंगळ कारभारामुळे आदीच कोरोना संकटामुळे सर्वसामान्य माणुस हा आर्थिक संकटात सापडला असुन , यात महावितरणाच्या कारभाराच्या विजवसुलीची सक्तीची सुरू असलेली मोहीमच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फौंडेशनचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष जलीलदादा सत्तार पटेल उपोषण करणार सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना काळ असल्याने सामान्य जनता शेतकरी, शेतमजूर,दलित, आदिवासी, या सहित सर्वच घटकांच्या लोकांना रोजगार नाही हाताला काम नाही त्यात इमाने इतबाराने काबाळ कस्त करून लोक पोट भरत असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी आणि कर्मचारी हुकमशाही करून जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दबंगगिरी करून सामान्य जनतेचे १०० टक्के विजबिल चे पैसे भरा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन कट करू असा दम भरत असून अनेक वर्षानुवर्षे नेहमी नियमित वीज भरणा करणाऱ्या जनतेचेही वीज कनेक्शन कट करत असून आणि वीज वेवस्थापणात अनिमियत्तता व वारंवार भारनियमन ( लोडशेडींग ) करून वीजबिल सक्तीची वसुली करून वीजबिल न भरल्यास विजकनेक्शन कट करण्याची धडक मोहीम राबवत असून या महावितरणाच्या गोंधळलेल्या मोहीमेत सर्व सामान्य जनता भरडली जात असून, अशा प्रकारच्या होत असलेली ही कार्यवाही त्वरीत न थांबल्यास आपण दि. २७ जुलै २०२१ मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या यावल येथील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे मा.सरपंच जलील सत्तार पटेल यांनी दिला असुन , या संदर्भातील माहीती ही निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य
ऊर्जामंत्री ना नितिन राऊत ( महाराष्ट्र राज्य ) तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र नानाजी पटोले यांना पाठविण्यात आली आहे .

धम्मसावली बुद्ध विहार हैबतपूर पुनर्वसन येथे वर्षावास प्रबोधन व आंबेडकरी कविसंमेलन संपन्न

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर व धम्मसावली बुद्धविहार व बोधीसत्व ‌वाचनालय हैबतपुर पुनर्वसन तह. आर्वी च्या वतीने आंबेडकरी आंदोलनाची कविता काव्यधारा व वर्षावास प्रबोधन आयोजित करण्यात आले होते.
स्थळ= धम्मसावली बुद्धविहार बोधीसत्व वाचनालय
हैबतपुर पुनर्वसन ता. आर्वी
दिनांक= रविवार २५/०७/२०२१
संध्याकाळी कवीसंमेलन आयोजीत.
अध्यक्ष= छत्रपाल तामगाडगे
सुत्रसंचलन= प्रवीण कांबळे
कवी.रंगराज गोस्वामी
कवी.सुरेश भिवगडे
कवी.संजय पाटील
कवी.सचिन मनवरे
माणिक खोब्रागडे
प्रा राजेन्द्र कांबळे व कविता सादर केल्या.
भगत ताई यांनी रमाई गीत सादर केले . प्रमूख अतिथी दर्पण टोकसे सूरज मेहरे
मधुकर सवाळे , नारायण पाटील आदी प्रमूख अतिथी होतें
या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन निळाई त्रैमासिकाचे संपादक प्रा. प्रविण कांबळे यांनी केले. याप्रसंगी निळाई परिवाराचे वतीने बोधीसत्व वाचनालय येथे ग्रंथसंच दान देण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुरेश भिवगडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी हैबतपूर पुनर्वसन उपासक उपासीका व बोधीसत्व वाचनालय येथील विद्यार्थी मित्रांनी सहयोग दिला. येथिल यांनी सहकार्य केले.

शाश्वत शेतीसाठी , अधिक उत्पादनासाठी आणि मातीच्या सुपिकतेसाठी माती परीक्षण गरजेचे

0

सिल्लोड प्रतिनिधी सागर जैवाळ

_कृषिदूताचा ग्रामस्थ शेतकऱ्यांना सल्ला_
महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी संलग्नित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी-औद्योगिक कार्यानुभव  कार्यक्रम जुलै 2021 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील कृषिदूत योगेश परसराम नवल याने रहिमाबाद येथील शेतकऱ्यांना मृदा परीक्षणासाठी माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
रासायनिक खतांचा अति वापर , वर्षानुवर्षे पीक लागवड यामुळे मातीची सुपिकता कमी होत आहे तसेच त्यासाठी माती मध्ये कोणती मूलद्रव्ये कमी आहेत तसेच कोणते घातक घटक आहेत याची माहिती असणं हे खूप गरजेचं आहे . ही माहिती माती परीक्षणामुळे मिळू शकते व त्यानुसार आपण मातीमध्ये योग्य ती मूलद्रव्ये सोडू शकतो.जास्तीत जास्त सेंद्रिय खते वापरण्याचा सल्ला योगेशने या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला. याप्रसंगी त्याने मृदा परीक्षणासाठी माती नमुना शास्त्रीय पद्धतीने कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच सदर माती नमुना हा कृषी महाविद्यालयात परीक्षणासाठी पाठवण्यात आला .शेतकऱ्यांनी त्याचे कौतुक करत अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी दादाराव मोरे, भगवान मोरे ,वैभव मोरे, गणेश मोरे , इत्यादी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी योगेशला  प्रा.ए. डी.फापळे, प्रा. बी.बी.मुंडे आणि प्रा.मोनिका नाफडे-भावसार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

यावल तालुक्यात विविध ठीकाणी कृषीदुत यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठीची माती परीक्षण मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

गोदावरी फाउंडेशन व्दारे संचलीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदूत आशुतोष मुकेश येवले याने ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत यावल तालुक्यातील यावल शहर ग्रामीण शिवारात माती परीक्षण प्रात्यक्षिक दाखवत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर उल्हास पाटील माती-पाणी तपासणी प्रयोगशाळा येथून मृदा चाचणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी कृष्णात पाटील राहुल पाटील- सोनवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कृषिदूत आशुतोष मुकेश येवले याने शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे मातीत आढळणारे विविध पोषक घटक व त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कसे अबाधित ठेवता येईल यावर सखोल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सध्याचा मृदेचा होणारा रास व माती परीक्षण शिबिरांची खेडोपाडी असणारी आवश्यकता यावरही येवले यांनी सूतोवाच केले. त्याचबरोबर माती परीक्षण कसे आणि का करावे याचे बहुमोल मार्गदर्शन केले. त्याला प्राचार्य शैलेश तायडे, प्राध्यापक मोनिका नाफाडे-भावसार, प्राध्यापक मोनिका भावसार यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले.

किनगाव येथे कृउबा समिती आवारात मा. आ . सोनवणे यांच्या उपस्थित घर तिथं शिवसेनिक व गाव तिथ शाखा या शिवसंपर्क अभियानाची बैठक संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील चोपडा विधानसभा क्षेत्रातील किनगाव-डांभूर्णी व साकळी-दहीगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसैनिकांची माजी आमदार प्रा . चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. या अभीयान बैठकीत शिवसेनिकांनी आपला सहभाग नोंदवला, शिवसेना शिवसंपर्क अभियान बैठक आज रविवार दिनांक २५/०७/२०२१ रोजी दुपारी २ वाजता किनगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न झाली, या शिवसेना शिवसंपर्क अभियान मोहीम अंतर्गत घर तिथं शिवसेनिक व गाव तिथ शाखा हे अभीयान माजी आमदार तथा चोपडा रावेर लोकसभा मतदारसंघाचे सह संपर्क प्रमुख प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या आमदार सौ .लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे. सदर बैठकीस चोपडा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे युवा सेनेचे तालुकाप्रमुख गोटुभाऊ सोनवणे, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेना आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख भारसिंग तेरसिंग बारेला , लिलाधर पाटील , योगेश पाटील , रोहीदास महाजन , किशोर माळी , आडगावचे सरपंच रशीद तडवी , सुर्यभान पाटील , लक्ष्मण बडगुजर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदधिकारी यांना पक्षाअंतर्गत संघटना बांधणी व आदी विविध विषयांवर माजी आमदार व प्रा .चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन करण्यात आलीत .
तरी शिवसेनेच्या या शिवसंपर्क अभीयान सर्व शिवसैनिकांनी व शिवसेना पदाधिकारी यांनी बैठकीस प्रामुख्याने उपस्थित राहुन या अभीयानास यशस्वी केले .

डॉ.शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानांतर्गत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.२५ जुलै भारतीय जनता पार्टी हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी(रेल्वे)
विधानसभा क्षेत्रात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान अंतर्गत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन स्थानिक तुळसकर सभागृहात आज रविवार ,दि.२५ जुलै रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तड़स यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन तसेच प्रतिमा पुजन करुन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मंचकावर विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार, विधान परिषद आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे,लोकसभा संयोजक जयंत कावळे,जिल्हा महामंत्री अविनाश देव,नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,जिल्हा परिषद सभापती मृणाल माटे ,जिल्हा कोषाध्यक्ष भूपेंद्र शहाणे,प.स.उपसभापती योगेश फुसे, भाजपा सेलू तालुका अध्यक्ष श्री. अशोक कलोडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा महामंत्री किशोर दिघे यांचे प्रस्ताविकानंतर
सर्व उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.
प्रशिक्षण वर्गादरम्यान हिंगणघाट शहर, हिंगणघाट ग्रामीण, समुद्रपूर, सिंदी(र.) असा मंडळनिहाय आढावा घेण्यात आला.यावेळी येत्या १ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत बूथनिहाय रचना करण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार रामदास तडस,जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे,भूपेंद्र शहाणे,भाजयूमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर,जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांनी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानाची माहिती देऊन पदाधिकाऱ्यांना पक्षबांधणीचे दृष्टिने बूथनिहाय रचना करण्यास सांगितले.
कार्यक्रमा दरम्यान समुद्रपुर येथील नगरपंचायतचे माजी अध्यक्ष गजानन राऊत यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा महामंत्रीपदी तर भाजपा गोवारी समाज मोर्चाचे शहर अध्यक्षपदी दिनेश नेवारे यांची नियुक्ति करण्यात आली.यासोबतच भाजपा शहर नाभिक समाज मोर्चाचे अध्यक्षपदी विलास अंबरवेले यांची नियुक्ति करण्यात आली,महत्वाचे म्हणजे वंजारी समाज महिला समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अरुणाताई हेमके यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.उपरोक्त पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.
हिंगणघाट तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,शहर अध्यक्ष आशिष पर्बत, माजी पंचायत समिती सभापती गंगाधरराव कोल्हे, अल्पसंख्यांक मोर्चाचे बिस्मिल्लाह खान,शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा अनिता मावळे,सिंदि (रेल्वे) येथील नगराध्यक्षा सौ. बबिता ताई तुमाने, विनोद विटाळे, बाळू इंगोले, हिंगणघाट शहरातील नगरसेवक नगरसेविका हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी (रेल्वे) सर्कलमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती , सदस्य इत्यादी मान्यवर मंडळी यांनी प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहून कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच मंचसंचालन किशोर दिघे यांनी केले तर तालुकाध्यक्ष संजय डेहणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हिंगणघाट शहरात नेहरू वार्ड येथे शिव सेना शाखेची स्थापना.

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 25 जुलै शिव संपर्क अभियाना अंतर्गत नेहरू वार्ड इथे शाखा उद्घघाटन कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी
मा.श्री राजेंद्रजी खूपसरे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख वर्धा)
यांच्या हस्ते शाखा उद्घघाटन करण्यात आले.
मा. श्री अभिनंदन मुनोत (वर्धा जिल्हा युवा सेना जिल्हाधिकारी) मा. श्री चंद्रकांत जी घुसे (उपाध्यक्ष नगर परिषद)
मा. श्री सुरेश मुंजेवार (नगरसेवक)
मा.श्री सतीश धोबे
श्रीमती.सुनीता पाचोरी (नगरसेविका)
श्रीमती. नीता दुबे (नगरसेविका)
मा. श्री सतीशजी ढोमणे (शिवसेना शहर प्रमुख)
मा. श्री. मुन्नाजी त्रिवेदी (शिवसेना शहर संघटक)
श्री. रोहित रंगीलालजी बक्षी (शिवसेना उपशहर प्रमुख)
श्री. आदर्श गुजर (शिवसेना वैद्यक कक्ष प्रमुख)
श्री. शंकर मोहमारे (माजी नगरसेवक)
श्री विक्रम देवगिरकर (सराफा लाईन अध्यक्ष)
श्री. बालू भाऊ अनासने
श्री. संजयजी पिंपळकर
श्री. अनिल कावडकर

शाखाप्रमुख: श्री प्रजय ढोमणे
उपशाखाप्रमुख: श्री शुभम त्रिवेदी
सचिव: श्री ग्यानू जोशी
उपसचिव: श्री चेतन प्रधान
कोषाध्यक्ष: श्री अंकित त्रिवेदी
सदस्य: बबलु त्रिवेदी, अखिलेश ढोमणे, यश त्रिवेदी, अक्षय ढोमणे, शशांक पेंडके, अर्थव त्रिवेदी, संग्राम त्रिवेदी, अनिष पेंडके, गोपाल जोशी, सोनु त्रिवेदी, अखिल ठाकुर, निखील ठाकुर, शाम अग्रवाल, शांतनु हिंगमिरे, विजय खाटिक व समस्त नेहरू वार्ड कार्यकर्ता.