Home Blog Page 433

लयभारी साहित्य समुह इ बुक प्रकाशन आणि ऑनलाईन कवी संमेलन सोहळा संपन्न

0

 

लयभारी साहित्य समूह आयोजित , आषाढी एकादशी निमित्त , पंढरीची वारी हा उपक्रम पंधरा दिवस घेऊन , पंढरीची वारी ह्या विषयावर काव्यलेखन केले . आणि 78 कवितांचा इ बुक मध्ये समावेश केला . आणि आषाढी एकादशी दिवशी ज्येष्ठ कवयित्री शामला पंडीत , कवयित्री रंजना मांगले , कवी संतोष रायबान सर यांच्या हस्ते इ बुक प्रकाशन सोहळा झाला . त्या सोहळ्याचे मुख्य आयोजन प्रमोद सूर्यवंशी यांनी केले . तर त्याच दिवशी ऑनलाईन झूम कवी संमेलनाचे नियोजन समूह संचालक अनिल केंगार यांनी केले . आणि कवी संमेलनाचे सूत्रसंचालन धनंजय माने यांनी आपल्या शैलीतून बहारदार केले . आणि कार्यक्रमाला रंगत आणली .वर्षा फटकाळे वराडे , संगीता महाजन , कु. वर्षा शिदोरे, सौ.कविता वालावलकर, सौ.शामला पंडित (दीक्षित)
सौ.वसुधा कोडगीरे, सौ.वैभवी मराठे , सौ.भाग्यश्री बागड, सौ.अनिता नागे/पाठे, सौ.रंजना मांगले , सौ.आम्रपाली धेंडे, सौ.सुचित्रा कुंचमवार , सौ.कल्पना निं.अंबुळकर , सौ.प्रांजली काळबेंडे , सौ.शशिकला गुंजाळ , सौ.वसुधा नाईक , सौ.योगिता जाधव
सौ.नूतन पाटील , सौ.संगीता चव्हाण सौ.अंजली राजाध्यक्ष, सौ.सुनीता बहिरट, श्रीमती संगीता जामगे, विकास पाटील, श्री. हरिदास मा.गौतम, श्री.मधुकर गायकवाड, श्री.रोहिदास होले , श्री.गजानन दराडे, श्री.वसंत गवळी, श्री.रविकांत जाधव, श्री.सचिन पाटील, श्री. आमीर पटेल, विशाल पाटील, राकेश बुधाजी डाफळे ,अविनाश शिंदे
संगीता महिरे साळवे ह्या सर्व सारस्वतांच्या काव्यातून इ बुक प्रकाशन सोहळा आणि ऑनलाईन झूम कवी संमेलन यशस्वीरित्या पार पडले .

यावल येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ता आदीवासी मुला मुलींना पौष्टीक आहार वाटप

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सक्षम नेतृत्व कर्तबगार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदीवासी मुलामुलींना पौष्टीक आहार वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक२२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार असे सक्षम नेतृत्व करणारे महाविकास आघाडीतील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सकाळी ११ वाजता शहराला लागुन असलेल्या गोळीबार टेकळी या आदीवासी वस्ती पाडयावरील लहान मुला मुलींना पौष्टिक आहार व खाऊचे वाटप करण्यात आलीत . याप्रसंगी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन आपला सहभाग नोंदविला यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम .बी . तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास सामाजीक व न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे ,
यावल शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार , फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे, भालोद चे राहुल चौधरी , बापु जासुद, हेमंत येवले , अब्दुल सईद शेख रशीद ,गनी भाई , पवन धोबी , आरीफ खान , विरेन्द्रसिंग राणा , अशोक भालेराव , दिपक तडवी , विजय साळी , नाना कोळी हे प्रामुख्याने उपस्थित होते तर पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महत्वाचे परिश्रम घेतले .

अट्रावलच्या शिक्षकाचे नाशिक येथे वाळलेले झाड त्यांच्याकारवर कोसळुन जागीच मृत्यु परिसरात सर्वत्र हळतळ

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील अट्रावल येथील मुळ रहिवासी आणी नाशिक येथील येथील शिक्षक नितीन सोमा तायडे ( वय ३२) यांचे वलखेड ( जि. नाशिक) फाट्यावर रस्त्याच्या कडेला असलेले वादळी वारा आणी पाऊसाच्या गोंधळात वाळलेले झाड त्यांच्या कारवर कोसळून झालेल्या विचित्र भिषण अपघातात त्यांचे दुदैवी निधन झाले ते पिंपरूळ जिल्हा नाशिक येथील आश्रमशाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत होते . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, बहिण, मेहुणे असा परिवार आहे. त्यांचे मृतदेह नाशिकहुन त्यांच्या मुळ अट्रावल येथे आणण्यात आले व त्यांचे आज सकाळी अट्रावल तालुका यावल येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले , मयत शिक्षक नितिन तायडे येथील बस आगारातील सेवानिवृत्त चालक सोमा तायडे यांचे पुत्र होत. तर अट्रावल मुंजोबा देवस्थान विश्वस्त समिती सदस्य दीपक तायडे यांचे बंधू होत. नितिन तायडे यांच्या अशा दुदैवी अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

पावसामुळे परिसरातील पिकांवर पडले पांढरे ठिपके / परिसरातील शेतकरी भयभीत

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

दिनांक 21 जुलै मध्यरात्री झालेल्या पावसानंतर 22 जुलै रोजी सकाळी परिसरातील सूनगाव सह जळगाव जा तालुक्यात कपाशी सोयाबीन व इतर सर्वत्र पिकावर झालेल्या पावसामुळे पांढऱ्या रंगाचे ठिपके पिकावर आढळून आले.

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरासह तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले जळगाव जामोद तालुक्यात पेरणीच्या वेळी पावसाने अचानक दांडी मारल्याने परिसरात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते व त्यानुसार दुबार तीबार पेरणी झाली परंतु सात ते आठ दिवसानंतर झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे तरी काल झालेल्या पावसामुळे परिसरात पिकांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके आढळून आले हे ठिपके पावसामुळेच पडलेले आहे असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यानुसार जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथे तालुका कृषी अधिकारी वाकोडे यांनी कपाशी पिकाच्या शेतात जाऊन पाहणी केली व कपाशी पिकाचे काही पाने व झाडे गोळा करून ती कृषितज्ज्ञ यांच्याकडे पाठविण्यात आले या पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांमुळे निसर्गाकडून काहीतरी रोगाचा प्रादुर्भाव झाला की काय अशी चर्चा शेतकऱ्यांत आहे परंतु या पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांमुळे पिकांवर काही दुष्परिणाम होणार का ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे

अखेर महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर सूनगाव वासीयांचे उपोषण मागे

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा

तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस सतत सकाळी सात ते दुपारी दोन वाजे दरम्यान  विद्युत पुरवठा बंद केला होता तरीही दिनांक 9 जुलै रोजी महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाईन बंद ठेवली होती. कधीही सुनगाव येथील विद्युत पुरवठा हा चालू बंद स्थितीत असतो. उमापूर येथील सब स्टेशनला फोन लावल्यास फोन लागत नाही लागल्यास महावितरणचे कर्मचारी नागरिकाना उडवाउडवीची उत्तरे देत असतात. सुनगांव येथील वसुली 90 टक्के असून सुद्धा कर्मचारी वसुलीशिवाय दुसरे कोणतेच काम करताना दिसत नाहीत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वेल्डिंग व्यवसाय, गिरण्या ,बँकेचे व्यवहार घरातील गृहिणींची कामे ,ऑनलाइन अभ्यास,त्यात सर्वात मोठा विषय म्हणजे गावाला होत असलेला पाणीपुरवठा यावर सर्वात मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्रस्त होऊन सुनगाव येथील नागरिकांनी दिनांक 12 जुलै रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना निवेदन दिले होते परंतु त्याची महावितरणने कोणतीच दखल घेतली नाही, त्यामुळे सुनगाव येथील  नागरिकानि  सुनगाव चा विद्युत पुरवठा जळगाव जामोद येथील शनिमहाराज मंदिराजवळील नवीन सब स्टेशन वर किंवा जामोद येथील सब स्टेशन वरून टाकण्यात यावा तसेच सुनगाव येथील ग्रामपंचायतीने मागील वर्षी या बाबत ठराव दिला होता परंतु एक वर्ष होऊनही या कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही सुनगाव च्या समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यामुळे सुनगाव येथील नागरिक हे  आज दिनांक 22 जुलै पासून महावितरण कार्यालया समोर उपोषण थाटले आहे  या उपोषणास सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेव धुर्डे माजी पं.स.सदस्य अशोक काळपांडे , प्रवीण धर्मे, मोहनसिंग राजपूत, ग्राप सदस्य बळीराम धुळे, ग्राप सदस्य संतोष वंडाळे,सखाराम मिसाळ, पत्रकार गणेश भड ,पत्रकार अनिल भगत  उपोषणास बसले होते परंतु अखेर सूनगाव गावास सुरळीत विद्युत पुरवठा केल्या जाईल व प्रलंबित असलेली कामे पूर्ण केल्या जातील व त्या कामासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्या जाइल असे लेखी आश्वासन( पत्र) महावितरणचे अभियंता कातखेडे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी जामोद उपकेंद्रा चे अभियंता गोलाईत साहेब व कर्मचारी उपस्थित होते

कृषी विभागाने जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पोकरा योजनेचा लाभ मिळवून द्यावा आमदार समिर कुणावार यांचे आवाहन

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.२२ जुलै हिंगणघाट तालुक्यातील १५ तसेच समुद्रपुर तालुक्यातील ११ गावांचा पोकरा योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फळबागा तसेच सिंचन योजनेसारख्या अनुदान मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी जास्तीतजास्त प्रयत्न करावे असे आवाहन आढावा बैठकीच्या वेळी आमदार समिर कुणावार यांनी केले.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा)अंतर्गत आज दि.२२ रोजी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली
आढावा सभा आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेचे आयोजन स्थानिक पंचायत समीती सभागृह येथे करण्यात आले.
या सभेत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवड झालेल्या गावातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आढावा सभेच्यावेळी आमदार समीर कुणावार,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे,समुद्रपुर पंचायत समितीच्या सभापती सौ सुरेखाताई टिपले,हिंगणघाट पंचायत समिती सभापती सौ शारदाताई आंबटकर,जिल्हा परिषद सदस्य सौ ज्योत्स्नाताई सरोदे,गटविकास अधिकारी दिनेश चौधरी इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते,तालुका कृषी अधिकारी नंदकुमार घोड़मारे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.सदर आढावा सभेमध्ये समुद्रपुरचे तालुका कृषी अधिकारी एमजी सोनटक्के,हिंगणघाट तालुका कृषी अधिकारी आर बि.गायकवाड,मंडल कृषी अधिकारी सुपारे,जीबी बनसोडे,सीबी कारंजेकर,आर मेश्राम यांनी उपस्थिति होती.

हत्या करून मृतदेह फेकला रेल्वे ट्रॅकवर परसोडी येथील घटना,तीन आरोपींना अटक

0

 

सचिन वाघे वर्धा वर्धा .

२२ / ७ परिसरात खळबळ जुन्या वादातून एका व्यक्तीची राॅडणे हत्या करून मृतदेह वरुड रेल्वे लाईन वर फेकून दिला, ही घटना १८ रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असुन मंगळवारी याचा उलगडा झाला,यासंबंधात तिन आरोपींना दहेगाव पोलिसांच्या हमदापुरचे बीट अमलदार पो.हवा.इजास खान , पो.हवा.मनोज बाराहाते यांनी ३ तासात आरोपींना अटक करून सक्तिने विचारपुस करताच आरोपींनी गुन्हा कबुल केला. तिघांनी मिळून मृतकाला मारून वरूड (पवनार) येथे रेल्वेलाइन वर रात्री ११ .३० वाजता फेकून दिले व हत्येचेवेळी उपयोगात आणलेले हत्यार नदीत फेकले अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.
मृतकाचे नाव दिगांबर नामदेव कन्नाके (रेल्वे)(५०)आहे . प्राप्त माहितीनुसार मृतक दिगांबर आणि आरोपी संदीप राऊत यांच्यात जुना वाद होता, ३ दिवसापूर्वी दिगांबर हा शेतातील कामे आटोपून घरा कडे जात असताना आरोपी संदीप राउत , राजु राउत आणि किशोर राउत यांनी रस्त्यावर अडवुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली तसेच त्यांच्या डोक्यावर राॅडनेही मारहाण केली. दरम्यान आरोपीनी जख्मी दिगांबरचा मृत्यू झाल्याने वरुड रेल्वे परिसरात रेल्वेच्या पटरीवर फेकुन दिला. यांचा तपास दहेगाव पोलिसांनी केला असता हि सर्व बाब उघड झाल्याने आरोपींना हत्येचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली हि हत्या जुन्याच वादातुन झाली आहे की यात आणखी काही दुसरे कारण आहे याचा पुढील तपास पोलीस करीत आहे.सदर गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पत्रकार भवणासाठी जागा उपलब्ध करून द्या राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाची नगर परिषद नांदुरा कडे मागणी- मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. समाजातील सर्वच छोट्या मोठ्या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. तसेच नांदुरा शहरात पत्रकार परिषद घेण्यासाठी सुद्धा हक्काची जागा नाही. यामुळे नांदुरा शहरात पत्रकार भवन बांधून मिळावे यासाठी मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री राजेश एकडे साहेब यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली असता. नगर परिषद कडून जागा उपलब्ध करून घ्या मी पत्रकार भवन बांधून देतो असे आश्वासन आमदार साहेबांनी दिले. म्हणून आज दिनांक २२ जुलै २०२१ रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्रकार भवनाच्या जागेच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल बिचारे,तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडेराव,तालुका संघटक श्रीकांत हिवाळे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,शहर उपाध्यक्ष नजीर रजवी,रतन डोंगरदिव,अरुण सुरवाडे,सुशील इंगळे व इतर पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.

आर्वी-पुलगाव राज्य महामार्ग खूबगावच्या पुलावर जीवघेणा खड्डे

0

 

प्रज्वल यावले
आर्वी तालुका प्रतिनिधी

आर्वी-पुलगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडल्या जात असून या रस्त्याची दळण-वळण खूप मोठ्या प्रमाणात चालते,
तसेच आर्वी-पुलगाव मार्गावर असलेल्या खूबगाव लगतच्या पुलाजवळ अर्धा ते एक फुटाचा खड्डा पडलेला आहे. तसेच हा खड्डा उंचवटा दर्शवून आपले अस्तित्व दर्शीवित आहे.
सध्या पावसाळ्या सुरू झाला असून या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे या खड्डाची अर्धा ते एक फूट असलेली खोली प्रवाशांना समजून येत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.
संबंधित रस्त्याला बहुतांश ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, पण या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधले जात नाही का? असा प्रश्न येथील प्रवाशी जनतेला पडला आहे.या रस्त्यावर पडलेली खड्डे बंधकाम विभागाने दुरुस्ती करून घ्यावी, कारण या रस्त्याला प्रवाशी जनता त्रासली आहे,हे मात्र नाकी आहे…
आर्वी-पुलगाव रस्ताची खड्डे संबंधित यंत्रणेने रस्त्याची दखल घेऊन दुरुस्ती करून घ्यावी,अन्यथा एखद्याच्या जीवावर….बीतू शकते

सुनगांव येथील विद्युत पुरवठा नेहमी खंडित राहत असल्या कारणामुळे नागरिकांचे विद्युत वितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू

0

 

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस कंटिन्यू सकाळी सात ते दुपारी दोन वाजे दरम्यान सुनगाव येथील विद्युत पुरवठा बंद केला होता तरीही दिनांक 9 जुलै रोजी महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाईन बंद ठेवली होती. तरीही सुनगाव येथील विद्युत पुरवठा हा चालू बंद स्थितीत असतो. उमापूर येथील सब स्टेशनला फोन लावल्यास फोन लागत नाही लागल्यास महावितरणचे कर्मचारी नागरिक उडवाउडवीची उत्तरे देत असतात. सुनगांव येथील वसुली 90 टक्के असून सुद्धा कर्मचारी वसुलीशिवाय दुसरे कोणतेच काम करताना दिसत नाहीत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्या कारणामुळे वेल्डिंग व्यवसाय गिरण्या बँकेचे व्यवहार घरातील गृहिणींची कामे त्यात सर्वात मोठा विषय म्हणजे गावाला होत असलेला पाणीपुरवठा यावर सर्वात मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्रस्त होऊन सुनगाव येथील नागरिकांनी दिनांक 12 जुलै रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना निवेदन दिले होते परंतु त्याची महावितरणने कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे सुनगाव येथील नागरिकानि सुनगाव चा विद्युत पुरवठा जळगाव जामोद येथील शनिमहाराज मंदिराजवळील नवीन सब स्टेशन वर किंवा जामोद येथील सब स्टेशन वरून टाकण्यात यावा तसेच सुनगाव येथील ग्रामपंचायतीने मागील वर्षी या बाबत ठराव दिला होता परंतु एक वर्ष होऊनही या कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही सुनगाव च्या समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यामुळे सुनगाव येथील नागरिक हे आज दिनांक 22 जुलै पासून महावितरण कार्यालया समोर उपोषण थाटले आहे या उपोषणास सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे माजी पं सदस्य अशोक काळपांडे धुर्डे, प्रवीण धर्मे, मोहनसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे,सखाराम मिसाळ, पत्रकार गणेश भड अनिल भगत गजानन सोनटक्के उपोषणास बसले आहेत व जोपर्यंत मागण्या पूर्ण व विद्युत पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यत उपोषण सुरू राहणार असा इशारा सूनगाव नागरिकांनी दिला आहे