Home Blog Page 435

डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयात आमदार अभिजीत वंजारी याँचा सत्कार

0

 

सचिन वाघे वर्धा  हिंगणघाट

विधान परिषदेचे नागपूर विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार अॕड.अभिजीत वंजारी यांनी डाॕ.बी,आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली.यावेळी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्प देऊन डाॕ.बी.आर.आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचीव श्री. अनिल जवादे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विधान परिषदेकरीता पदवीधर मतदार स़ंघातून निर्वाचीत झाल्यानंतरची त्यांची हिँगणघाट शहराला ही पहिलीच सदिच्छा भेट होती.याप्रसंगी विचार मंचावर नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डाॕ.शकील सत्तार , काॕग्रेसचे नेते डेहने पाटील,किसान अभियानचे प्रविण उपासे श्री.महाजन ,पत्रकार इकबाल पहिलवान , अब्दुल अमिन ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.राजू मंगेकर प्राचार्य एस.एम.राऊत,मुख्याध्यापक देवतळे यांची उपस्थिती होती,
सत्काराला उत्तर देतांना बेरोजगार संघटनेचे प्रश्न ,पदवीधर मतदारांचे प्रश्न ,शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न ,संस्था संचालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे असे त्यांनी सांगितले. २००५ पूर्वी नियुक्त परंतु २००५ नंतर अशंता किंवा १००% अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी,अटीची पुर्तता करणाऱ्या विनाअनुदानीत शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत असेही त्यांनी सांगितले.विदर्भातील विद्यार्थी mpsc, Upsc च्या परीक्षेला बसतात परंतु पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ते कमी पडतात .अशा होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाव ,त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पदवीधर भवन बांधन्याची संकल्पना आपण जिल्हा नियोजन बैठकीत मांडलेली असून त्यात लवकरच यश मिळेल असे ते म्हणाले.सुशिक्षित पदवीधर बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे व त्यासाठी त्यांना उद्योगाकडे वळविणे व त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण प्राप्त करून देणे यावर आपला भर असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या दरम्यान जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लवकर लागू करावी यासाठी अॕड.अभिजीत वंजारी यांना निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमाचे संंचालन आणि आभारप्रदर्शन श्री .गोपाल माँडवकर यांनी केले.

साकळी शिवारातुन विना परवाना अवैध गौण खनिजची चोरटी वाहतुक करणारा डंपर महसुलच्या पथकाने जप्त करून दंडात्मक कार्यवाही

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी शिवारातुन विना परवाना अवैध गौण खनिजची चोरटी वाहतुक करणारा डंपर महसुलच्या पथकाने जप्त करून दंडात्मक कार्यवाहीसाठी यावल पोलीस स्थानकात जमा करण्यात आला आहे.
याबाबत महसुल प्रशासनाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार दिनांक १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास साकळी शिवारातील वढोदे प्रगणे यावल क्षेत्रात तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या गस्ती पथकाच्या माध्यमातून धडक मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत नायब तहसीलदार आर. डी. पाटील, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, अव्वल कारकुन निशा चव्हाण लियाकत तडवी, विरावली तलाठी यांच्या पथकाला डंपर क्रमांक एमएच १९ झेड८९७५या वाहनातुन वाळुची वाहतुक करतांना आढळुन आले. याबाबत विचारणा केली असता वाहनचालक किरण वसंत धनगर (राहणार कासवे तालुका यावल) याने कासवे येथील राहणारे गुणवंत वसंत बादशाह यांचे मालकीच्या डंपर मध्ये असलेल्या वाळुचा परवाना नसल्याचे सांगीतले. यावेळी डंपर वाहनात विनापरवाना गौण खनिज २ ब्रास वाळुची वाहतुक करतांना दिसुन आले म्हणुन महसुलच्या पथकाने कार्यवाही करीत हा डंपर पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी ताब्यात घेवुन त्यास यावल पोलीस स्टेशनला जमा केले आहे.

राज्यमंत्री सत्तार यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त प्राचार्य चापेंच्या वाढदिवसानिमित्त 151 वृक्षांची लागवड

0

 

आयुषी कुुलकर्णी( औरंगाबाद)

सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड करतांना सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे कृष्णा लहाने,प.पु.स्वामी अखंडानंद गिरी महाराज ,प. पु.ओंकारगिरी महाराज,प.पु.दयानंद महाराज शेलगाव ,ह.भ.प. नामदेव महाराज वाकी, ब्रह्मकुमारी छाया दीदी ,प.पु.दिगंबर दादा ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर ह.भ.प.संतोष महाराज आढावणे ह.भ.प.रामेश्वर महाराज पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुन गाढे,दीपाली ताई भवर आदी

*सिल्लोड*: वृक्ष लागवड काळाची गरज असून सध्याची परिस्थिती पाहता आक्सीजन निर्मिती करणाऱ्या झाडांची जास्तीत जास्त लागवड करावी असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सेवानिवृत्त प्राचार्य सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव चापे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.कृष्णाजी लहाने सर व शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळचे वतीने निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड येथे आयोजित १५१वृक्षांचे वृक्षारोपण व वृक्षदिंडीच्या कार्यक्रमात बोलताना केले .
यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांचे सामाजिक ,शैक्षणीक, अध्यात्मीक व इतर क्षेत्रात योगदान आहे ,वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून यथोचित सन्मान होत आहे असे ते म्हणाले, यावेळी प.पु.स्वामी अखंडानंद गिरी महाराज ,प. पु.ओंकारगिरी महाराज,प.पु.दयानंद महाराज शेलगाव ,ह.भ.प. नामदेव महाराज वाकी, ब्रह्मकुमारी छाया दीदी ,प.पु.दिगंबर दादा ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर ह.भ.प.संतोष महाराज आढावणे ह.भ.प.रामेश्वर महाराज पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुन गाढे,दीपाली ताई भवर,रेखाताई विश्वासराव गाढे,नगर परिषदगटनेते नंदकिशोर सहारे,नगरसेवक प्रशांत क्षीरसागर नायब तहसीलदार संजय सोनवणे, नायब तहसीलदार सागर मुंडदा, पो निरीक्षक राजेंद्र बोकडे, पो उपनिरीक्षकआडे, पो उपनिरीक्षक अंधारे, ह.भ.भ. ज्ञानेश्वर महाराज सासमकर ,ह.भ.प.भगवान महाराज जंजाळ ह.भ.प.समाधान महाराज बसंते,ह.भ.प. अजबराव महाराज मिरगे ,ह.भ.प.मनोज महाराज भाग्यवंत ,ह.भ.प.रविंद्र महाराज राजहंश, ह भ प गजानन महाराज, जुनिअर शाहरुख शफी अन्सारी, सा.का.अमोल भोकणाल,ह भ प गणेश महाराज थोरात ,ह भ प विष्णु महाराज कुदळे,ह भ प दादाराव महाराज राऊत, डॉ. गजानन काकडे ह.भ.प.कमलाकर महाराज पिंगाळकर,संतोष पाटिल देवरे, सुरेश पाटील सुलताने ,डा.निलेश मिरकर डा.अक्षय खंडेलवाल,डा्.विकास गोठवाल ,डा. पाखरे साहेब, राजेंद्र ठोंबरे ,सयाजी वाघ,जगन्नाथ काकडे, प्रवीण मिरकर,दत्तात्रय भवर ,प्राध्यापक घारोळे , प्राध्यापक शिंदे , रमेश शेठ कासलीवाल ,अनिल बोरा, अनिल मिटकरी, अनिल गाढे , हरिचंद्र काकडे, दत्तू पाटील बडक , धोंडीबा काकडे ,पंकज पाटील संतोष चाबुकस्वार, श्रीमती संगीता पाटील, श्याम कुमार सोनवणे ,सुखदेव काटकर दादाराव खिल्लारे,शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळ सर्व कर्मचारी तसेच माऊली वारकरी शिक्षण संस्थचे शिक्षक व विद्यार्थी, सामाजिक, राजकीय, व्यापारी व इतर क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा जैवाळ यांनी आभार प्रदर्शन कृष्णा लहाने यांनी केले.

जनमत दारूबंदी हटवून वर्धा जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आना !

0

 

सचिन वाघे वर्धा
दि.19 जुलै
दारू बंदी हटाव वर्धा जिल्हा समितीचे आमदारांना साकडे दारूविक्री आणि अर्थव्यवस्था यांचा थेट संबंध आहे. मद्यप्राशन ही पूर्वापार चालत आलेली मनुष्याच्या इतर क्रियाकलापांसारखी एक नैसर्गिक व सामान्य क्रिया आहे. मात्र,48 वर्षांपूर्वी गांधी जिल्हा असण्याच्या सबबीखाली वर्धा जिल्ह्यात अनैसर्गिक दारूबंदी करण्यात आली. त्यामुळे, वर्धेकरांचे दारू पिणे बंद झाले नसून उलट दारूचे अनावश्यक आकर्षण जनतेत निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दारूनिर्मिती आणि विक्री सुरू असून ह्या अवैध दारूनिर्मिती आणि विक्रीमुळे काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था आपल्या जिल्ह्यात विकसित झाली आहे. सामान्य, गोरगरीब लोकांना हलक्या दर्जाची, नकली व महाग दारू प्यावी लागत असून त्यामुळे लाखो लोकांच्या आरोग्याचा व त्यावरील महागड्या उपचारांचा प्रश्न उभा ठाकला आहे. विषारी दारूमुळे शेकडो मृत्यू झाले असून मृतांवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे जीवन उध्वस्त झाले आहे.

एकाच देशात, एकाच राज्यात विविध राज्य किंवा जिल्ह्यांना वेगळा न्याय लावणे भारतीय राज्यघटनेशी पूर्णतः विसंगत आहे. जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 तिथे रद्द झाले असले तरी वर्धा जिल्ह्यात ते दारूबंदीच्या रूपाने अप्रत्यक्षपणे लागू आहे. दारूबंदीने जिल्ह्याचा विकास पूर्णपणे खुंटला असून 10 वर्षाची 1 पिढी मानल्यास गेल्या 5 पिढ्या दारूबंदीने बरबाद केल्या आहेत. पोलिसदलाचे गुन्हेगारीकरण व पोलिसांची भ्रष्टाचारी अशी प्रतिमा दारूबंदीने निर्माण केली असून पोलिस दलाला पूर्वीची प्रतिष्ठा व दरारा प्राप्त करून देण्यासाठी देखील दारूबंदी हटविणे आवश्यक आहे.

अवैध दारूविक्रीच्या धंद्यात मोठे माफिया उतरले असून ह्या धंद्यातून त्यांनी प्रचंड माया गोळा केली असून ह्या काळ्या पैशाच्या बळावर त्यांनी राजकारणात उतरून लोकप्रतिनिधीची मोठमोठी पदे बळकावली आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून असे अवैध धंदे करणारे, गुन्हेगार, चारित्र्यहीन लोक प्रस्थापित होऊ पाहत असल्याने देशाच्या लोकशाही रचनेला मोठा धोका निर्माण झाला आहे. अवैध दारूच्या आधारे येथे इतर अवैध व्यवसाय देखील फोफावले असून सामान्य नागरिकांचे ह्या नव्या व्यवस्थेद्वारे प्रचंड शोषण केले जात आहे.

थोडक्यात, दारूबंदी अनैसर्गिक अव्यवहार्य आहे आणि ती त्वरित जिल्ह्यातून उठवून येथील जनतेचे जीवन सुसह्य करण्याची तातडीची गरज आज आहे. गांधीजी केवळ वर्धा जिल्ह्याचे नव्हे, तर देशाचे राष्ट्रपिता मानले जातात आणि म्हणून त्यांच्या बहाण्याने केवळ एका जिल्ह्यात दारूबंदी लावणे म्हणजे त्यांच्या कर्तुत्वाला संकुचितपणा आणणे आहे. संपूर्ण देशात दारूबंदी नसेल तर वर्धा जिल्ह्यात ती लावणे देखील महापुरुषांना कमीपणा आणणारे आहे आणि वर्धेकरांवर अत्याचार करणारे आहे. त्यामुळे, वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याविषयी आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित करावा तसेच मा. मुख्यमंत्र्यांशी व इतर संबंधित सर्व व्यक्ती व संस्थांशी संपर्क साधून दारूबंदी उठविण्याकरिता प्रयत्न करावेत व वर्धेकर जनतेला न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन “दारूबंदी हटाव, वर्धा बचाव आंदोलन समिती”ने वर्धेचे आमदार श्री. पंकज भोयर यांची जिल्हा विश्रामगृहात भेट देऊन दिल. ह्या संदर्भात आमदारांनी समितीचे म्हणणे ऐकून घेतले व शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

शिष्टमंडळात श्री सचिन म्हैसकर, श्री राहुल करंडे, श्री मनीष पुसाटे, श्री किरण पट्टेवार, श्री प्रफुल येसनकर, श्री सिद्धान्त कांबळे, श्री करण गेडाम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. दारूबंदी हटविण्याच्या चळवळीत सर्व वर्धेकरांनी सामील होण्याचे आवाहन दारूबंदी हटाव समितीने केले आहे.

गावातील ग्रामस्थाना स्थाही पटे नाहीतर आमरण उपोषण कामगार नेते डॉ उमेश वावरे

0

 

सचिन वाघे वर्धा

दि.19 जुलै ग्रा,प,किन्हाळा ता,समूद्रपूर हयानी दि,21,7,2020, ला सर्वानी मते ठराव पारीत केला त्या ठरावाच्या अनुषगाने ग्राम पंचायतीची गावठान चि जमीन असून त्या वर अतिक्रमण झालेले आहे ।
सदर गावठान च्या जागेवर प्रत्येकास एक सारखे मोजून तेथील नागरिकाना प्लांट देण्यात यावे।
सदर अर्जदार प्रतंप्रधान आवास योजनेचे लाभार्थी असून सदर ग्राम पंचायत याचा कडे दुर्लक्ष करत आहे
हि बाब 15 दिवसाच्या आता निकाली काडावी अन्यथा आमरण उपोषन करण्यात येईल असा ईशारा कामगार नेते डॉ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत जिलाधिकारी वर्धा याना निवेदन देण्यात आले असून निवेदन देताना, मनिष कांबळे , दिलिपकहूरके ,जिवन उरकुडे, ,देवेन्द्र त्रिपल्लीवार , प्रणय पाटील, नुतन राठोड़, दिलीप बालक,अतीश माडवे, सुरेश दुधकोहके, निखिल बोबडे, मंगेश पाटील, प्रणय बावणे,तुषार पाटील, सचिन ठाकरे, गजानन नागेशे, मंगला वंतारी, कचरू बावणे, मालता बावणे, संजय बगडे, जितेन्द्र चौधरी,इदु वंतारी,सरला शेन्डे, विलास गेडाम,शिला गेडाम,संगीता बावणे,यशोदा दुधकुरे, संविता नागोसे, राहूल पाझारे, सुयोग्य पाटील, रोहीत झगडे,नागेश पाटील,रोशन पाटील, इत्यादि ग्रामस्थ उपस्थिति होते,,

शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांचा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिव संपर्क अभियान दौरा :

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिवसंपर्क अभियान मोठ्या जोमाने सुरू झाले असून यामध्ये पंचायत समितीच्या आठही गणात हा दौरा करण्यात आला लोणी ,मोरगाव, धानोरा फशी, शिवणी रसुलापुर ,मंगरूळ चव्हाळा ,पिंपळगाव निपाणी ,पापड वाढोणा, माऊली चोर ,या गावी मीटिंग घेण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख शाम भाऊ देशमुख उपजिल्हाप्रमुख प्रमोद भाऊ कटाळे प्रमुख अतिथी सहसंपर्क प्रमुख माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील ,ज्योतीताई अवघड जिल्हाप्रमुख महिला आघाडी ,विष्णुपंत तिरमारे तालुकाप्रमुख ,छायाताई भारती महिला आघाडी तालुकाप्रमुख ,तसेच उपतालुका प्रमुख दिलीप भाऊ देवतळे, उमेश चौकडे ,शहर प्रमुख अरूण लाहबर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दौरा करण्यात आला यामध्ये प्रत्येक गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ शिवसैनिक ,सेवा सहकारी सोसायटी सदस्य, संजय गांधी निराधार योजना तालुका समितीचे सदस्य अरूण लाहबर, सौ उगलेताई ,श्रीकृष्ण दहातोंडे यांचा सत्कार करण्यात आला या दौऱ्याचा मुख्य उद्देश शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री उद्धव साहेब ठाकरे कर्जमाफी सारख्या मोठ्या सरकारच्या योजना घोषित करत आहे त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत शिवसैनिकांनी पोहचवुन त्याची माहिती जनतेला द्यावी यासाठी हे अभियान राबवण्यात आले असल्याचे जिल्हाप्रमुख श्री श्याम भाऊ देशमुख यांनी सांगितले तालुक्यातील लोणी येथील शाखाप्रमुख संजय गायगोले ,महाजन, मोरगाव येथील शाखाप्रमुख पप्पू थेटे ,धानोरा येथील शाखाप्रमुख प्रकाश पाटेकर शाखाप्रमुख मधु भाऊ कोठाळे पुंडलीकराव तर्हेकर, आशिष हटवार, गोकुल राठोड मंगरुळ चव्हाळा शाखाप्रमुख विनोद भाऊ पिंपळकर गजानन लायब्ररी, मोरेश्वर परळीकर, गजाननराव खांडेकर, डॉक्टर जांगडा, सालोड, पिंपळगाव येथील शाखाप्रमुख सुभाष मिसाळ रवि बांबटकर, सुनिल थोरवे, श्रीकृष्ण दहातोंडे राजु राऊत, सतिश पाडर, प्रमोद मिसाळ,वाढोणा रामनाथ शाखाप्रमुख विजुभाऊ अजबले, आशिष यलोरे, सुरेश क्षिररसागर ,रामहरी राऊत, बाळू काजे ,बंडू रोहणकर, विजु भोयर माऊली शाखाप्रमुख मंगेश सुरोशे,शिवाजी शिंदे, शिवाजी कोरडे, यांनी अभियान यशस्वी करण्याकरता प्रयत्न केले

पैशाच्या वादातून चारचाकी वाहन अंगावर घालून शिवीगाळ

0

 

नांदुरा: (प्रफुल्ल बिचारे)

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ४६ वर्षीय इसमाच्या अंगावर पैशाच्या वादातून चारचाकी वाहन घालून शिवीगाळ करीत खिशातील १२०० रुपये काढून घेतल्याची घटना लोणवडी ते माळेगाव गोंड फाट्यादरम्यान शंकर सोळंके यांच्या शेतामध्ये १७ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली.
लोणवडी येथील कैलास महादेव सातव यांनी नांदुरा पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये लोणवडी ते माळेगाव फाट्यादरम्यान सकाळी पायी फिरतअसताना आरोपी ज्ञानेश्वर जनार्दन गोंड, रा. माळेगाव गोंड यांनी त्यांची चारचाकी गाडी अंगावर घातल्याने खाली पडलो, तसेच रस्त्याच्या खाली शेतात नेऊन माझे ५ लाख रुपये दे, नाही तर गायब करून टाकीन, असे म्हणत शिवीगाळ केली. खिशातील १२०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम ३९४ अन्वये गुन्हा नोंदविला. याबाबत अधिक तपास नांदुरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार करीत आहेत.

राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाची पत्रकार भवनाची मागणी

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे):-

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. समाजातील सर्वच छोट्या मोठ्या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. तसेच नांदुरा शहरात पत्रकार परिषद घेण्यासाठी सुद्धा हक्काची जागा नाही. यामुळे नांदुरा शहरात पत्रकार भवन बांधून मिळावे याकरिता राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका उपाध्यक्ष योगेश धोटे,तालुका सचिव प्रफुल्ल बिचारे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,पवन चव्हाण, व इतर पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.

पदविका डिप्लोमा धारकांना संपवण्याचा कट व महाराष्ट्र कौन्सिलिंग यांनी लावलेले निर्बंध तातडीने स्थगित करण्यात यावा तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील.

0

 

 

 

महाराष्ट्र राज्य पशु सेवादाता संघटना तालुका संग्रामपुर कार्यकारणी मंडळ जिल्हा बुलढाणा

पशुधन पदविकाधारकांना कायमस्वरूपी संपवण्याचा कट महाराष्ट्र काउंसलिंग यांनी रचलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषद मध्ये पर्यवेक्षक श्रेणी 2 दवाखाना येथील पद भरतात आणि शासनच यांना बोगस डॉक्‍टर म्हणतात यामध्ये शासनाचा प्रोटोकॉल चुकत आहे. वेळेस पदविका धारकांनी शासनास मदत केलेली आहे उदाहरणार्थ लसीकरण बिल्ले टोचणे कृत्रिम रेतन पशु जनगणना इत्यादी मदत करत आहे. परंतु शासनाने पदविका धारकाची पिडवणुक करून बोगस डॉक्टर म्हणून आमचे अस्तित्व कायमचे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.
आमचे पशुधन पदविकाधारक हे शेतकऱ्याच्या दारावर व शेतापर्यंत पशु सेवा पुरवितात म्हणून शेतकऱ्याचे पशुधन जिवंत आहे. आज भारत वर्षांमध्ये शंकर जनावराची पैदास कुत्रिम रेतन द्वारे तयार झाले आहे. याचे स्वयंपूर्ण श्रेय पदविका धारकांना जाते B.V.S.C /L.D.O हे डॉक्टर फक्त कागद काळे करणे आणि लाखो रुपयाचा पगार घेणार पुरताच मर्यादित आहे म्हणून आम्ही काम बंद संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू केले आहे.
संपाचे उद्देश काय हे शासनाकडे मागणी
1) पदवीकाधारक यांचे बेरोजगारी प्रमाण वाढत असल्याकारणाने विविध जागी जसे शासकीय विभागात रोजगारी च्या संधी उपलब्ध करा.
२) महाराष्ट्रात भारतीय पशु वैद्यकीय परिषद अधिनियम १९८४ कायदा रद्द करा.
३) पशुसंवर्धन पदविका धारक व्यक्तींना आरोग्य खात्यातील नर्सिंग प्रमाणे नोंदणीकृत करण्यात यावे.
४) पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदावर पदविका धारकाचे पद भरण्यात यावी.
५) पशुसंवर्धन पदविकाधारक बेरोजगार युवकांना शासनाने किमान १० लाख रुपयांचे कर्ज पशुपालन किंवा व्यवसाय करीता उपलब्ध करून द्यावे.

आळंदीत आयकाॅन क्लासेसच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

0

 

आळंदी : कोरोनाच्या महामारीत सर्वच पालक आर्थिक अडचणीत सापडले होते याची जाणीव ठेवून मुलांच्या भविष्यासाठी आयकाॅन क्लासेस चे संचालक प्रा.हरीश जगताप सर, नगरसेवक सचिन गिलबिले व मा.नगरसेवक दिनेश घुले यांच्या सौजन्याने आळंदी शहरातील आठवी, नववी, दहावी व अकरावीच्या मुलांसाठी मोफत ॲानलाईन क्लासेस सुरू केले होते. त्यात इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवार १६ जुलै रोजी लागला. त्यामध्ये समृध्दी आंधळे व स्नेहल गाडेकर या विद्यार्थिनींनी गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचा आयकॉन क्लासेस च्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ११,१११ रुपये बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला,तसेच ९७ पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रा.हरीश जगताप सर यांनी कठीण परिश्रम, सातत्य, संघर्ष, त्यातून मिळणारे यश, परिवाराची साथ व गुरूजनांचे मार्गदर्शन याविषयी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला नगरसेवक सचिन गिलबिले, मा.नगरसेवक दिनेश घुले, मा.नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, नगरसेविका शैला तापकीर, शहरप्रमुख अविनाश तापकीर, राहूल सोमवंशी, विपुल तापकीर, रामभाऊ कांबळे, उमेश गिलबिले, भाऊसाहेब कोळेकर, प्रशांत जगताप, वैभव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते