Home Blog Page 436

शिवशाही बसने माऊलींचे पंढरपूर कडे प्रस्थान

0

 

आळंदी : सतरा दिवसांच्या मुक्कामानंतर तीर्थक्षेत्र आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुका आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आलेल्या शिवशाही बस मधून आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाने पंढरपूर कडे हरीनामाच्या गजरात मार्गस्थ झाल्या. सोमवारी पहाटे नित्य पुजा व आरती पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली, साडे सहा ते साडे आठ धोंडोपंत दादा अत्रे फडाची कीर्तन पाडुन माऊलींचे आषाढी एकादशीच्या निमित्ताने 40 वारकर्यांच्या उपस्थित दोन शिवशाही बस मधुन पंढरपूर कडे प्रस्थान झाले.
2 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुकांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. मात्र करोनामुळे शासनाच्या निर्देशानुसार सतरा दिवस माऊलींच्या पादुकांचा मुक्काम आळंदीत आजोळघरी होता. यावेळी वारीच्या वाटेवर जे काही परंपरेनुसार रिंगण सोहळा सोडून बाकीचे कार्यक्रम असतात ते सर्व माऊलींच्या मंदिरात प्रतिनिधीक स्वरूपात पार पडले.
शिवशाही बसमधून माऊलींसोबत चाळीस वारकरी जाणार आहेत. त्यामध्ये संस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, विश्वस्त योगेश देसाई यांच्या सहीत माऊलींचे मानकरी, सेवक, वारकरी यांचा समावेश आहे.
पंढरपूर तालुक्यात दुपारी 2 वाजता वाखरी येथे पोचतील, तेथे इतरही मनाच्या पालख्या बसमधून येणार आहेत. तेथे सर्व संतांची भेट होऊन पुन्हा पंढरीत पादुका विसावतील. त्यानंतर 24 जुलैला पौर्णिमेला काला करून पादुका आळंदीकडे मार्गस्थ होतील.

आ. समीर कुणावार यांचे निधीतुन ७ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

0

 

हिंगणघाट दि.19 जुलैकेन्द्राने राज्यात दिलेल्या ६ हजार ५०० कोटि रूपयाच्या लसीमुळे राज्याचे वाचलेली रक्कम आरोग्यासाठीच उपयोगात आणली पाहिजे,केंद्र सरकारमधे स्व.अटलजी पंतप्रधान असतांना आरोग्य हा राज्याचा विषय असतांना राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या अनेक योजना सुरु करण्यात आल्याची माहितीही रुग्णवाहिका लोकार्पण समारोहप्रसंगी माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक विकास निधीतुन देण्यात आलेल्या सात रुग्णवाहिकांचे लोकार्पणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आले.
यावेळी त्यांनी लोकाभिमुख कार्याची स्तुती केली,समिर कुणावारांचे रूपाने त्यांनी मतदारसंघाला कार्यसम्राट आमदार लाभले असल्याचा उल्लेख करीत त्यांनी कुणावार यांचे कौतुक केले.
आज दिनांक १८ जुलै रोजी स्थानिक निखाडे शभागृह येथे उपरोक्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी भाजपाचे राज्य सचिव राजेश बकाने, हिंगणघाट नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसतांनी,जि प सभापती माधव चंदनखेडे,पंचायत समिती सभापती सुरेखा टिपले,सौ शारदा आंबटकर,सिंदी येथील नगराध्यक्षा सौ बबिता तुमाणे,समुद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गजानन राऊत,भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष भुपेंद्र शहाणे,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष नितीन मडावी इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान राज्य सचिव राजेश बकाने,नागराध्यक्ष प्रेम बसंतांनी,जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे,हिंगणघाट तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,समुद्रपुर तालुकाध्यक्ष संजय डेहणे, राकेश शर्मा इत्यादींनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्थानिक नगरसेवक, उपस्थित जि प सदस्य,पंचायत समिती सदस्य,आरोग्य विभागाचे अधिकारी व भाजपा कार्यकर्ते यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले
सदर रुग्णवाहिका उपजिल्हारुग्णालय हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय तसेच समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी,गिरड व प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदी (रेल्वे),हमदापूर,हिंगणघाट तालुक्यातील पोहणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे देण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात रुग्णांची मोठी हेळसांड झाली रुग्णवाहिकेअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला यावेळी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद नजरे समोर ठेऊन आपल्या स्थानीक आमदार निधीतून १कोटी २७लक्ष रुपये दिल्याचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले,या वेळी पुढाकार घेऊन डाँ. चाचारकर,डॉ.माधुरी कुचेवार तसेच आरोग्यविभागाचे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याने हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून अनेकांचे प्राण वाचविता आले याचे समाधान असल्याचे कुणावार यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे यांनी केले व आभार प्रदर्शन शहराध्यक्ष आशिष पर्बत यांनी केले.

इंद्रायणी तीरावर “विठू माझा लेकुरवाळा” हे भिंतचित्राचे लोकार्पण

0

 

पुणे- आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकल्पनेतुन आणि शिवतेज मित्र मंडळ यांच्या सौजन्याने पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्त निवासाच्या भिंतीवर विठू माझा लेकुरवाळा हे भिंतचित्र साकरण्यात आले असून या चित्राचे लोकार्पण सोहळा श्री.सदगुरु मनोहर मामा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख अॅड.विकास ढगे पाटील,आळंदी पोलिस स्टेशनचे ज्ञानेश्वर साबळे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,नगरसेवक प्रशांत कुर्‍हाडे,शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंद मुंगसे,माजी नगरसेवक रमेश गोगावले तसेच शिवतेज मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि मामांचे भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या भिंतीवरील चित्रात श्री विठ्ठल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वासुदेव, वारकरी विणेकरी, तुळसधारी वारकरी महिला प्रतिनिधी साकरण्यात आले आहे हे चित्र अक्षय भोसले, धीरज पोटफडे, मोहन पाटोळे, नवनाथ कोरके, सुजल ओव्हाळ आणि माणिक तोरवार या कलाकारांनी साकारले आहे.

शेगांव शहरातील समस्त्त मातंग समाजाच्या वतीने पुण्यतिथी संपन्न.

0

 

सर्व प्रथम साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सकल मातंग समाजाच्या हस्ते करण्यात आले व आयोजक लहुजी शक्ती सेना युवा जिल्हा अध्यक्ष आशिष दादा सावळे यांच्या वतीने तसेच समस्त मातंग समाजाच्या वतीने पुष्प हार अर्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे मातंग समाजाचे नेते लक्ष्मण गवई यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला व आभार प्रदर्शन केले.या वेळी विजय भाऊ सावळे मुकेश भाऊ गवई विनोद भाऊ सोनोने संतोष भाऊ भालेराव दिलीप भाऊ तायडे जितू भाऊ मानकर अजय तायडे, प्रेम सावळे, आकाश तायडे, नागेश गवई ,भिकू सारवान, आकाश पाटील , श्री तायडे, मंगेश तायडे, विवेक तायडे, रोहित तायडे, निखिल तायडे व इतर समाज बांधव उपस्थित होते.

सुनगांव येथील वार्ड क्रमांक १ मधील धापा नसलेली नाली ठरतेय जीवघेणी

0

 

गजानन सोनटक्के
सुनगांव प्रतिनिधी:-

सुनगांव येथील वार्ड क्रमांक एक मधील मोठ्या नालीवरील सुस्थितीत असलेला धापा गेल्या दोन महिन्यापासून सुनगाव ग्रामपंचायतने काढून टाकला तेव्हापासून दिनांक 18 जुलै पर्यंत सुद्धा सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनाने धापा टाकलेला नाही. आज दिनांक 18 जुलैला संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सुनगाव येथील च रामदास वसुले हे आपल्या मोटर सायकल ने येत होते. त्यांना नाली वरील धापा नसल्याचे निदर्शनास आले व त्यांनी दुरूनच आपल्या गाडीचे ब्रेक लावले परंतु तरीही मोटरसायकल तुटलेल्या नालीमध्ये जाऊन पडली त्यामुळे रामदास वसुले यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. रामदास वसुले हे आपल्या मोटरसायकल सह नालीमध्ये पडलेले तेथील नागरिकांना दिसताच वसंता मगर,गणेश भड,कुसुम भगत हे धावतच त्या ठिकाणी गेले व त्यांनी रामदास वसुले यांना नालीच्या बाहेर काढले व त्यांच्या गाडीला सुद्धा बाहेर काढले. अशीच घटना दिनांक आठ जुलै रोजी वसंता मगर यांचा नातू खेळता खेळता तुटलेल्या नाली मध्ये पडला होता. तेव्हा वसंता मगर आणि गणेश भड यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तसेच वार्ड क्रमांक एकच्या सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना धापा दुरुस्तीची विनंती केली तरीही आज पर्यंत धापा दुरुस्त झाला नाही. त्यातच ही मोठी दुर्घटना होता होता तळली. या दुर्घटनेमुळे येथील नागरिकांनी आठ दिवसाच्या आत ग्रामपंचायत ने नाली वरील सिमेंट धापा न टाकल्यास येथील नागरिक पूर्ण नाली मातीने भरुन टाकतील असा इशाराच ग्रामपंचायतीला दिला आहे.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती ने दिलेल्या निवेदनास यश

0

 

सिल्लोड प्रतीनीधी:-  आयुषी कुुलकर्णी

जिंठा येथील गांधी चोंक ते मोगरशाह नाना दर्गा रोड चे काम सुरु जे की जे काम अर्धवट व शिवमरोती मंदिर बालाजी मंदिर समोरील काम सोडलेले होते ते आज करण्यात आले कारण मागील आठवड्यात जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्री मंगेश जी गोंदवले साहेब यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती चे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण चव्हाण देशमुख व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती च्या महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्ष श्रीमती अंजना ताई राजपुत यांनी उपोषण ना चा इशारा देताच रोड चे काम सुरू करण्यात आले तसेच अजिंठा पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधु यांचे विशेष आभार मानतो जया नी आपल्या इलेक्ट्रॉनिक मिडीया दैनिकांत बातमी लाऊन सहकार्य केले

अवकाळी पाऊसामुळे शेतकरी हावलदिल.पिके झाली जमीन जमिनदोस्त

0

 

 

सिल्लोड प्रतिनिधी :- आयुषी कुलकर्णी

आसडी रहिमाबाद सह परिसरात शनिवार झालेल्या वादळी पावसाने मक्का पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबत कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
परिसरावर शनिवारी झालेल्या वादळी पावसाने मक्का पिके होतेच नव्हते करून सोडल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शनिवारी रात्री 11:00 वाजता सुरू झालेल्या वादळी वार्‍या सह 1 तास चाललेल्या पावसाने मका, कपाशी,मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.मक्का व मिरची उंची मोठी असल्याने पाऊस व वार्‍या मुळे आडव्या झाला असल्याने आत्ता हे पीक हात चे गेल्या मुळे पुढे काय असा प्रश्न उभा राहिला आहे.परिसरात नगदी पीक म्हणून मक्का पिका कडे पाहिले जात असल्याने गेल्या ४ वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
कोरोना पार्श्वभूमीवर आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजा ला आत्ता नैसर्गिक संकटाने ही आपल्या विळख्यात घेतल्याने दुष्काळात १३
वा महिना म्हणी प्रमाणे झाले आहे. लागवड केलेल्या क्षेत्रापैकी साधारण ४० ते ५० टक्के क्षेत्र पावसाने वार्‍याने बाधित केले आहे पिकांचे ही नुकसान झाल्याने मक्का व मिरची ही पिके उत्पन्न न देता खर्चात भर टाकून जाणारी ठरणारी आहे.
शनिवार रात्री झालेल्या वादळी पावसाने मका व बाजरी पिकांची पुरती वाट लावली आहे लागवड केलेल्या क्षेत्रापैकी ५० ते ६० टक्के क्षेत्र बाधित झाल्याने या पिकावर झालेला खर्च ही वसूल होईल की नाही असा प्रश्न पडला असल्याने वार्षिक गणित कसे जुळेल ही मोठी समस्या होऊन बसली आहे तरी शासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे.

लक्ष्मण कान्हेरकर यांच्या वाढदिवसानिम्मित फळ वाटप

0

 

 

टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष मा श्री पै जालिंदर भाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री पै तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप खामगांव येथील टायगर ग्रुप चे सक्रिय कार्यकर्ते तथा तरुण महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी मा श्री पै लक्ष्मण भाऊ कान्हेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा सामान्य रुग्णालय तालुका खामगांव येथे रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले तसेच दोन डिलेव्हरी पेशंन्ट यांना दोन बाॅटल बी निगोटिव्ह ब्लड देण्यात आले तसेच टायगर ग्रुप ग्राम शाखा उमरा भिसे येथे वृक्षारोपण सुध्दा करण्यात आले आहे प्रमुख उपस्थिती (सामाजिक कार्यकर्ते)
मा श्री पवनभाऊ माळवंदे , टायगर ग्रुप कार्यकर्ते
गगन सेठ छाबरा, पियुषभाऊ चव्हाण, रोहित भाऊ माळवंदे अंकुशभाऊ हटकर, सुमितभाऊ कांटे , सुरज लोंढे ,राम देवकते, स्वप्निल तांबे क्रृष्णा गवळी क्रृष्णा काकडे , पवन गवळी, प्रशांत वरघटे,अमोल वानखेडे राहुल सुरोसे रुपेश काकडे कुनाल कुंदलवार मंगेश शिंदे शुभम राऊत आशिष कुटे नंदु कान्हेरकर तथा टायगर ग्रुप ग्राम शाखा जनुना, जवळा, वाडी,पहुरजिरा, मांडका अलमपुर, निमगाव, नांदुरा, येथील टायगर ग्रुप चे सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते

आझाद हिंदच्या संघर्षमय आंदोलनाला यश… श्रीक्षेत्र माऊली जन्मभूमी आपेगाव च्या दिंडी प्रस्थान सोहळ्यास शासन प्रशासनाची अखेर परवानगी..

0

 

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

श्री क्षेत्र माऊली जन्मभूमी आपेगाव च्या दिंडी प्रस्थान सोहळ्याला आज नगर प्रशिक्षना देत सुरुवात…

ज्ञानोबा माऊली,ज्ञानराज माऊली तुकाराम…
टाळ मृदुंगाच्या गजरात आपेगाव नगरी दुमदुमली…

बुलडाणा:
माऊली जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव येथे माऊली माता पिता दिंडी प्रस्थान सोहळ्यापूर्वी 18 जुलैला सकाळी 11 वाजता माऊली मातापित्यांच्या पादुका अभिषेक नामदार संदिपान भुमरे व विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आपेगावात नगर प्रदीक्षना करीत मिरवणुक काढण्यात आली.

माऊली माता-पित्यांना निरोप देण्यासाठी माऊली जन्मभूमी आपेगाव संस्थान चे विश्वस्त,अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर दादा, शिवाजी महाराज शेलूकर, नामदार संदिपान भुमरे,आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे, विदर्भ प्रदेश संपर्कप्रमुख शेख सईद, आझाद हिंद शालेय पोषण आहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लियाकत खान, महिला उपाध्यक्ष वर्षाताई ताथरकर यांच्यासह देशातील गुरुवर्य विष्णु महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांचे भक्तगण प्रामुख्याने उपस्थित होते.
माऊली जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव मधून माऊली माता पिता दिंडीला निरोप देण्यात आला आहे. आज माऊली माता-पिता दिंडी सोहळ्याचा मुक्काम भाऊसाहेब देवराव पाटील यांच्या शेतात आहे.
तर उद्या सकाळी पाच वाजता पंढरपूरकडे होणार असून दुपारी दोन वाजता वाखरी येथे सर्व पालक यांचा सोहळा एकसंघ होणार आहे. तर उद्याच संध्याकाळपर्यंत पंढरपूर येथे दिंडी पोहोचणार आहे.
माऊली जन्मभूमी आपेगाव माता-पिता दिंडी प्रस्थान सोहळ्यात अकरा वारकर्‍यांना परवानगी मिळाली असून पंढरपूरच्या मुख्य नगर प्रदक्षिणेत सुद्धा माऊली माता पिता दिंडी सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जाम च्या विकासा साठी निधी उपलब्ध करून देईल आमदार समीर कुणावार जाम येथील व्यायामशाळे चे लोकार्पण

0

 

सचिन वाघे वर्धा

समुद्रपूर जाम या गावाची ओळख देशभर च नाही तर या चौरस्ताची ओळख देशाच्या बाहेर सुद्धा आहे परंतु सदर गाव हे विकासा पासून दूर आहे तेव्हा आता मी विशेष लक्ष देत आहो. सर्वात अगोदर पाण्याचा प्रश्न हाती घेऊन 1कोटी 80 लाखाची योजना मंजुरी साठी टाकली आहे दिवाळी च्या अगोदर नागरिकांना पाणी मिळेल व इतर ही जाम च्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणाचा माझा पर्यन्त राहील. असे मत जाम येथील व्यायामशाळे च्या लोकार्पण समारंभात कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले.
आमदार समीर कुणावार यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जाम येथे भव्य व्यायामशाळा उभारली त्या शाळेचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला उध्दघाटक म्हणून आमदार समीर कुणावार होते तर अध्यक्ष स्थानी पी व्ही टेक्स्टाईल चे व्यवस्थापक भुपेंद्र शहाणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय युवा मोर्चा चे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समनव्यक प्रा. मेघश्याम ढाकरे, जाम चे सरपंच सचिन गावंडे, उपसरपंच अजय खेडेकर, पोलिस पाटील कवडू सोमलकर ,तंटामुक्ती गाव समिती चे अध्यक्ष गजानन मुंगसे ,पवार साहेब व सर्व सदस्य गण मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कुणावार म्हणाले डॉ. बाबासाहेबच्या संविधानाने आम्हाला ज्या खुर्च्या दिल्या त्या बसण्यासाठी नाही तर जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दिल्या तेंव्हा लोकांचे – युवकाचे जे प्रश्न आहे ते सोडविण्या साठी माझा प्रयन्त आहे युवकांनी खेळा च्या माध्यमातून तसेच अभ्यासाच्या माध्यमातून विविध स्पर्धात्मक परीक्षेला समोर जाऊन जाम येथील युवकांना चांगल्या नोकऱ्या लागल्या पाहिजे या करिता एक चांगली अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
तर भुपेंद्रजी शहाणे यांनी जाम गावाच्या विशेष समाजाभिमुख कामे करण्याचा सतत प्रयत्न राहील असे सांगितले.
या वेळी सरपंच सचिन गावंडे यांनी जाम मध्ये विकास कामाची तडफड पाहून आमदार समीर कुणावर यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सचिन गावंडे यांनी केले तर संचालन ग्रामविकास अधिकारी ए एस धोटे, यांनी केले तर आभार गजानन मुंगसे यांनी मानले
कार्यक्रमाचे यशस्वीते साठी ग्रामपंचायत सदस्य सनी निवटे, राहुल पाटील,अभिलाष गिरडकर,सौ चंदाताई खेळकर, सौ साधनाताई पुसदेकर,कविताताई आटोळे,पंचफुल। खेकारे,रमाबाई शंभरकर,अनिल खुडसंगे, मोहन सराटे,रणजित वाढइ इत्यादींनी परिश्रम घेतले.