Home Blog Page 439

पिकविमा मिळावा या मागणीकरिता सुनगाव येथील नागरिकांनी दिले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा. प्रतिनिधी:-

सुनगाव येथील शेतकऱ्यांनी दिले जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांना सन 2020 व 21 च्या पिक विमा मिळणेबाबत दिनांक 12 जुलै रोजी देण्यात आले निवेदन. मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस मूग उडीद ही पिके पूर्ण नष्ट झाली तर मून सोयाबीन पिके ही घरी सुद्धा आणले नाही महसूल विभाग व कृषी विभागाने या शेतकऱ्यांचा पीक पाहणी पंचनामा केला असता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याची आनेवारी ही 37% नक्की आलेली आहे शासन निर्णय शेतकऱ्यांना आणेवारी कमी आल्यामुळे पिक विमा मिळणे आवश्यक होते परंतु शेतकऱ्यांना आज पर्यंत सुद्धा पिक विमा मिळाला नाही सुनगाव येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे ही विनंती केली की शासन दरबारी व विमा कंपनी यांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा सदर निवेदन देण्याकरिता सुनगाव येथील सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, अशोक काळपांडे, मोहनसिंग राजपुत,प्रविण धर्मे,पत्रकार गणेश भड,पत्रकार गजानन सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे,किसन ताडे, प्रमोद नानग्दे,त्रिलोक राजपुत,प्रमोद वानखडे,संजय राजपूत,मंगेश वंडाळे,श्रीराम राउत,अतुल गिर्हे, लक्ष्मण धुळे, पंकज भगत, मधुकर धुळे, किसना ताडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी या वेळी उपस्थित होते

सुनगांव येथील विद्युत पुरवठा नेहमी खंडित राहत असल्या कारणामुळे नागरिकांचे विद्युत वितरण विभागाला निवेदन देत दिला उपोषणाचा इशारा…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस कंटिन्यू सकाळी सात ते दुपारी दोन वाजे दरम्यान सुनगाव येथील विद्युत पुरवठा बंद केला होता तरीही दिनांक 9 जुलै रोजी महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाईन बंद ठेवली होती. तरीही सुनगाव येथील विद्युत पुरवठा हा चालू बंद स्थितीत असतो. उमापूर येथील सब स्टेशनला फोन लावल्यास फोन लागत नाही लागल्यास महावितरणचे कर्मचारी नागरिक उडवाउडवीची उत्तरे देत असतात. सुनगांव येथील वसुली 90 टक्के असून सुद्धा कर्मचारी वसुलीशिवाय दुसरे कोणतेच काम करताना दिसत नाहीत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्या कारणामुळे वेल्डिंग व्यवसाय गिरण्या बँकेचे व्यवहार घरातील गृहिणींची कामे त्यात सर्वात मोठा विषय म्हणजे गावाला होत असलेला पाणीपुरवठा यावर सर्वात मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्रस्त होऊन सुनगाव येथील नागरिकांनी दिनांक 12 जुलै रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना निवेदन दिले असता सहाय्यक अभियंता कातखेडे यांनी सुनगाव येथील नागरिकांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर सुनगावचे सरपंच रामेश्वर अंबडकार तसेच पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे आक्रमक झाले असता सहाय्यक अभियंता कातखेडे नरमले व त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले सुनगाव येथील नागरिकांनी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना अशी मागणी केली की सुनगाव चा विद्युत पुरवठा जळगाव जामोद येथील शनिमहाराज मंदिराजवळील नवीन सब स्टेशन वर किंवा जामोद येथील सब स्टेशन वरून टाकण्यात यावा तसेच सुनगाव येथील ग्रामपंचायतीने मागील वर्षी या बाबत ठराव दिला होता परंतु एक वर्ष होऊनही या कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही सुनगाव च्या समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास सुनगाव येथील नागरिक हे दिनांक 22 जुलै पासून जळगाव जामोद येथील सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण नास बसतील असे निवेदन देण्यात आले निवेदनावर सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे,अशोक काळपांडे, प्रवीण धर्मे, मोहनसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे,सखाराम मिसाळ,पत्रकार गणेश भड,पत्रकार गजानन सोनटक्के, मंगेश वंडाळे,त्रिलोकसिंह राजपुत, लक्ष्मण धुळे,किसन ताडे,देविदास गिर्हे,प्रमोद वानखडे,मधुकर धुळे,गजानन येउल,श्रीराम राउत,संजय राजपुत यांच्यासह बहुसंख्य सुनगाव येथील नागरिक उपस्थित होते.

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते बायपॅप मशीन चे वितरण.ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोदला भेट दिल्या 3 बायपॅप मशीन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:-

कतार येथे वास्तव्यास असलेले आ. डॉ. संजय कुटे यांचे बंधू विनोद कुटे यांच्या माध्यमातून लखनऊ येथील श्रीजान-एक सोच या संस्थेद्वारे ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथील डॉक्टर व स्टाफला अतीशय उपयुक्त अश्या 3 बायपॅप मशीन चे मोफत वितरण आज दिनांक 13 जुलै रोजी आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे लवकरच ऑक्सीजन प्लांट सुरू होऊन दहा बेडचे आय सी यु वॉर्ड 3 नवीन व्हेंटिलेटर सह जनतेच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. त्याकरिता सदर बायपॅप मशीन रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. लखनऊ येथील आरोग्य सेवा, स्किल डेव्हलपमेंट, शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीजान एक सोच या संस्थेचे ग्रामीण भागातील विविध उपक्रमांना यापुढेही असेच सहकार्य आपल्या भागात मिळत राहणार असल्याने आमदार डॉ. संजय कुटे यांनी त्यांचे बंधु विनोद कुटे व श्रीजान संस्थेचे मनःपूर्वक आभार यावेळी मानले.यावेळी सौ सीमाताई डोबे नगराध्यक्षा, नंदकिशोर अग्रवाल, रामदासजी बोंबटकार,सचिन देशमुख,अभिमन्यू भगत,गजानन सरोदे,राजेश गोटेचा,आशिष सारसर,अनिल कपले, सुरेश इंगळे,रमेश कोथळकार, डॉ दीपक केदार, डॉ नंदूभाऊ तायडे,गौरव डोबे,अक्षय देशमुख, यांसह ग्रामीण रुग्णालय स्टाफ उपस्थित होता.

बहुचर्चित दारुबंदी हटाव, वर्धा जिल्हा बचाव आंदोलन समितीची अखेर स्थापना

0

 

सचिन वाघे वर्धा

दि.13.7.21वर्धा :– दारुबंदी हटाव, वर्धा बचाव आंदोलन आता महत्वपूर्ण वळणावर पोहोचले असून आंदोलन जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याकरिता जिल्हास्तरीय आंदोलन समितीची स्थापना करण्यात आली आहे
हे आंदोलन पक्ष, जात, धर्म, लिंग, राजकारणनिरपेक्ष ठेवण्यावर सर्वांचे एकमत असून आंदोलनाच्या प्रचार, प्रसारासाठी तन, मन, धन आणि वेळ देऊ शकणे ह्या महत्वपूर्ण निकषावर समितीचे सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत.

त्यांची नावे व संपर्क क्रमांक –

सचिन म्हैसकर – 8329302715

राहुल करंडे – 9096968243

अमित डांगे – 9175869921

श्याम परसोडकर – 9822362355

मनिष पुसाटे – 9860469894

सिद्धांत कांबळे – 9175904295

चंद्रशेखर घाटे – 8600931287

अरुण पाटील – 9503333058

सितम मंदरेले – 9890417874

राहुल पाटील – 9890653710

किरण पट्टेवार – 8975517593

दारुबंदी हटाव आंदोलनाचा कुणालाही वैयक्तिक लाभ घेऊ द्यायचा नसल्याने समितीमध्ये अध्यक्ष, सचिव किंवा इतर पदे न ठेवता सर्वांना सदस्य हे एकच पद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक सदस्य हे विविध राजकीय पक्षाचे सदस्य असूनही केवळ दारुबंदी हटविणे ह्या एकाच उद्देशपूर्तीकरीता आपसातील मतभेद दूर सारून एकत्र आले आहेत. जिल्हास्तरीय समितीकडून लवकरच तालुकास्तरीय दौरे केले जाणार असून तालुकास्तरीय समित्या गठीत करण्यात येतील, त्यामुळे आपल्या तालुक्यात सदर आंदोलनाच्या यशस्वितेकरिता श्रम, शक्ती, बुद्धी, वेळ खर्च करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांनी जिल्हास्तरीय समितीतील कोणत्याही सदस्यांशी संपर्क साधून आपल्या तालुक्यात बैठक आयोजित करावी अशी दारुबंदी हटाव, वर्धा बचाव आंदोलन समिती तर्फे जाहीर विनंती करण्यात येत आहे. दारुबंदी हटाव आंदोलन समितीतर्फे शक्य त्या सर्व प्रचार, प्रसार माध्यमांचा वापर करून वर्धेकर जनतेचे मोठे प्रबोधन करण्यात येणार आहे. दारूबंदीने होत असलेल्या अन्याय आणि शोषणाची जाणीव झाल्यास हे आंदोलन लोकआंदोलन होण्यास वेळ लागणार नाही.

#दारुबंदी_साईड_इफेक्ट्स
#दारुबंदी_हटलीच_पाहिजे
#रोजगार_आमचा_अधिकार
#दारुबंदी_हटाव_वर्धा_बचाव

यावल येथे शेतात कामास गेलेल्या मजुर महीलेच्या हातास सर्पदंश ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील राहणाऱ्या एका शेतमजुर महीलेस शेतात काम करतांना सर्पदंश झाल्याची घटना घडली असुन सदर महीलेस उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , दिनांक १२ जुलै रोजी यावल येथील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या सौ . राधाबाई अमृत पाटील वय३५ वर्ष या कांततोडी शिवारातील निमजाई माता मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या सोमाजी गुरव यांच्या शेतात दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असतांना सौ .राधाबाई पाटील यांच्या डाव्या हाताला सापाने दंश केल्याची घटना घडली असुन, सर्पदंश झालेल्या महीलेस सोबतच्या सहमजुरांनी तात्काळ यावलच्या ग्रामीणच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असुन , यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके व वैद्यकीय कर्मचारी जॉन्सन सोरटे यांनी तात्काळ उपचार केले असुन , सद्य परिस्थितीला सर्पदंश झालेल्या महीलेची परिस्थिती ठीक असल्याचे वृत्त वैद्यकीय सुत्रांकडुन मिळाले आहे . दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने तालुक्यात सर्वत्र शेतीच्या विविध कामांना वेग आला असुन यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांनी सर्पदंश पासुन बचावा करिता योग्य ती दक्षता व काळजी घ्यावी असे आवाहन शेतकरी व शेतमजुरांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी केले असुन , शेतात काम करीत असतांना किंवा ईतर ठीकाणी सर्पदंश झाल्यास त्या व्याक्तीस कुठल्याही तंत्रमंत्र करणाऱ्याकडे घेवुन न जाता तात्काळ आपल्या जवळ दवाखान्यात उपचार करावे जेणे करून त्या व्यक्तिचा जिव वाचु शकेल असे ही डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी सांगीतले आहे .

कासारखेडा शिवारात जंगलातील विहीरीत पडुन पाण्यात बुडुन आदीवासी युवकाचा दुदैवी मृत्यु पोलीसात अक्समात मृत्युची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा जंगलातील कासारखेडा शिवारातील शेतातील विहीरीत पडुन पाण्यात बुडुन आदीवासी तरूणाचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली असुन याबाबत पोलीसात नोंद करण्यात आलेली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की दिनांक ११ जुलै रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास मोहम्मद हबीब तडवी वय२२ वर्ष राहणार कासारखेडा तालुका यावल हे व आम्ही जंगलातुन येत असतांना कासारखेडा शिवारातील मनुदेवी मंदीर रोडा वरील सायबु तडवी यांच्या शेतातील विहीरीजवळ जावुन पहात असतांना अचानक मोहम्मद तडवी याचा तोल जावुन तो खोल व पाण्याने भरलेल्या विहीरीत जावुन पडल्याची घटना घडली असुन त्याच्या सोबत असलेल्यांनी तात्काळ ही सुचना त्यांच्या कुटुंबास दिली त्या वेळेस रात्री त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी विहीरीच्या घटनास्थळी पाहणी केली असता शोध घेण्याच्या प्रयत्न केले असता विहीरीस असलेले पाणी व रात्रीचा अंधार या मुळे तडवी याचा शोध घेता आला नाही नंतर सकाळी मोहम्मद तडवी याचा मयत अवस्थेत मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले , मयताचा त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी. बी . बारेला व डॉ . शुभम तिळके यांच्या उपस्थित करण्यात आले असुन, यावल पोलीस स्टेशनमध्ये इतबार बशीर तडवी यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .

यावल येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघासह्११ संघटनेचे विविध मागण्यांसाठी तहसील समोरआंदोलन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आरक्षण बचाओ लोकतंत्र बचाओ या मागणीसाठी एक दिवसी धरणे आंदोलन केले या आंदोलनास राज्यातील ११ संघटनांनी आपला पाठींबा दर्शविला आहे . दरम्यान आंदोलन करणाऱ्या संघटनेसह आदी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार आर डी पाटील यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की , राज्यातील अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती , भटके विमुक्त आणी विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी सरकारी निम सरकारी व शासकीय आणी सार्वजनिक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण रोखण्याच्या धोरणाच्या विरोधात दिनांक १८ फेब्रवारी २०२१ते २० / ४ /२o२१ आणी ७ मे२०२१च्या शासन निर्णयाच्या विरोधात . महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणी नोकरीतील आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात , सार्वजनिक उपक्रमातील अस्थापनामध्ये नियमाप्रमाणे बिंदुनामावली अदययावत न करता व अनुशेष भरती न करता होणाऱ्या नियमबाह्य भरती प्रक्रीयेच्या विरोधात व ओबीसी प्रवर्गास पदोन्नतीतील आरक्षण लागु न करण्याच्या धोरणाच्या विरोधात . महाराष्ट्र अन्यायकारक शेतकरी विरोधी केन्द्रीय कायदे लागु करण्याच्या धोरणाच्या विरोधात , त्याचप्रमाणे कामगारांचे संवैधानिक अधिकारी नष्ठ करण्यासाठीच्या कामगार हिताचे कायदे रद्द करून निर्माण केलेल्या काळ्या कामगार कायद्याच्या विरोधात तसेच मराठा आरक्षण लागु करणे , अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना शासकीय कर्मचारी न मानता त्यांना नियमित वेतनश्रेणी न घेण्याच्या विरोधात अशा एकुण १४ निर्णयांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आनंद जाधव सर व मनोज तायडे सर यांनी केले तर या आंदोलनास प्रोटान संघटनेचे बी बी सुरवाडे, महेन्द्र तायडे, प्रभा तायडे , भारत मुक्ती मोर्चाचे पंकज तायडे , पंकज डांबरे , बबलु गजरे , स्वप्नील पारधे , मंथन महीरे, भिमआर्मीचे निलेश सपकाळे , आकास सुरवाडे , अतुल पारधे , आकाश बिऱ्हाडे यांच्यासह चेतन गजरे, भुषण बागुल , ऑल इंडीया दलीत पँथर सेनेचे भुषण साळुंखे , योगेश भालेराव, अमोल भालेराव , राष्ट्रीय किसान मोर्चाचे कुंदन तायडे , भिमराव साळवे , अमर कोळी , भारतीय युवा बेरोजगार मोर्चाचे ज्ञानदेव भालेराव , सागर बहारे , बुद्धीष्ट इन्टरनॅशनल नेटवर्कचे संतोष तायडे , वैभव सोनवणे , चेतन भालेराव , रोहन निकम ,हर्षल गजरे , पंकज डांबरे , पंकज तायडे , बबलु गजरे आदींनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला .

आमदार संजय गायकवाड यांची आमदारकी काढून घ्या,भगवान ईगळे

0

 

सुनील पवार नांदुरा. ता.प्र.

दि.१२जुलै खामगाव ता.चितोडा येथे सार्वजनिक शांतता भंग करने जातीय दंगल घडवून देशाच्या अखंड तेला तडा जाईल असे देश विघातक क्रूत् केलयामुळे लोकप्रतिनिधि कायदा नुसाराआमदार संजय गायकवाड यांच्या वर गुन्हा दाखल करून त्यांचि आमदारकी काढून घ्या अशी मागणी व.ब.आ.जि.उ.भगवान ईगंळे यांनी केले आहे.राज्यपाल भगतसिंग कश्यारि.यांना तहसिलदार नांदुरा ह्याच्या मार्फत निवेदन देण्यात आले त्यावेळि प्रसार माध्यमशि बोलताना केले ह्यावेळि व.ब.आ.भारतीय बैद् महासभा चे रा.चरमकार म हासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार नांदुरा यांना दिलेल्या निवेदनावर व.ब.आ.चे.ता.अध्यक्ष अजाबराव वाघोदे. मधुकर तायडे. धरमेश तायडे. भिमराव तायडे. प्रविन गुरचळ मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

कुनघाडा(रै)केंद्राची मुख्याध्यापक सभा संपन्न.विद्यार्थी गुणवत्तेवर सविस्तर चर्चा.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:आज दिनांक १२ जूलै रोजी चामोर्शी तालुक्याअंतर्गत कुनघाडा रै केंद्राची मुख्याध्यापक सभा केंद्राचे केंद्रप्रमुख गुरूदास गोमासे व गट साधन केंद्र चामोर्शीचे साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली.मुख्याध्यापक सभेमध्ये कोविड कालावधीतीत शिक्षण या विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.त्यामध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या शाळेत दाखल करणे,स्वाध्याय उपक्रम,कृतिपत्रिका आणि नियोजन,आभ्यासमाला उपक्रम,सेतू उपक्रम (ब्रिज कोर्स),शाळा सिद्धी,महापोर्टल करियर,शाळा बाहेरची शाळा,मोफत पाठ्यपुस्तक योजना,शाळा बाह्य विद्यार्थी शोध आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करणे,शाळा व्यवस्थापन समिती सभा आणि सक्रिय सहभाग,गोष्टींचा शनिवार,नवोदय परिक्षा,वेध शिष्यवृत्ती,दिक्षा ऍपचा विद्यार्थीना उपयोग,शासनाचे उपक्रम व डायट गडचिरोली संस्थेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे,इत्यादी विषयांवर मुख्याध्यापक यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रसंगी डायट गडचिरोली संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी सभेला उपस्थित मुख्याध्यापक यांच्याशी ब्रिज कोर्स विषयी दुरध्वनी वरुन संवाद साधून मार्गदर्शन केले.सभेला कुनघाडा रै केंद्राचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

स्वच्छता निर्मुलन व निर्जतूकिकरण फवारणी साठी निवेदन सादर सूरज मेहरे व दर्पण टोकसे यांच्या मार्फत निवेदन दिले

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी:-प्रज्वल यावले

आज दि. १२/०७/ ला मा. पवार साहेब उपमुख्यधिकारी नगरपालिका आर्वी यांना मायबाई वार्ड व वाल्मीक वार्ड ( बालाजी वार्ड ) येथे पावसामुळे प्रचंड दुर्गंधी व रोगराई पसरत असल्यामुळे तरी इतल्या नगरपालिकाच्या आरोग्याचे दुष्टीने आपण न. प. आर्वी आरोग्य विभाग मार्फत मायबाई वार्ड व वाल्मीक वार्ड ( बालाजी वार्ड ) येथे स्वच्छता निर्मुलन व निर्जतूकिकरण फवारणी करण्यात यावे म्हणून सूरज मेहरे व दर्पण टोकसे यांनी निवेदन दिले. सुरेंद्र भिवगडे सर , सचिन मनवरे,अरुण लांडगे, योगेश बावणे अनिल पखाले ,मनोज वानखेडे, अनिकेत सिंगाने, निखिल हूमे,विशाल बडगे,सोनू हुमे,विकेश हुमे, अभिषेक ढोले, अनिकेत कुबेटकर उपस्थित होते….