Home Blog Page 440

आर्वी शहरातील घरकुल योजनेचे चे उर्वरित अनुदान उपलब्ध करून द्या

0

 

 

 

आर्वी तालुका प्रतिनिधी:- प्रज्वल यावले

न. प. ला प्राप्त झालेला निधी वितरित करण्याचे तात्काळ निर्देश द्या

जनता नगर येथील सार्वजनिक वैष्णवी गार्डन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर छत्री व – हायमास्ट -खेडने सौंदर्य करण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या

नगरविकास-तथा ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे कडे दिलीप पोटफोडे यांची मागणी
वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते अभिजित फाळके पाटील यांच्या पुढाकाराने मुंबई च्या मंत्रालयात बैठक
आर्वी : नुकतीच वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगर परिषद अंतर्गत झालेले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागील दोन वर्षांपूर्वीपासून 1476 लाभार्थी यांचे रखडलेले अनुदान तात्काळ मिळण्यासाठी दिनांक 07/07/2021 ला मुंबई येथील मंत्रालयात नगरविकास -तथा ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दालनात वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते अभिजित दादा फाळके पाटील यांच्या पुढाकारात युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे-शहर अध्यक्ष कमलेश चिंधेकर आर्वी शहरातील -व विभागातील विविध समस्या- विषय घेऊन धडकले यात प्रामुख्याने आर्वी शहरात 2018- 2019 ला 1476 DPR 1-आणि DPR -2 मध्ये घरकुल मंजूर झालेत आणि नागरिकांनी काम सुरु केलेत आर्वी शहरातील पात्र लाभार्थी नागरिकांनी रीतसर प्रक्रिया करून प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ घेतला आणि घर बांधण सुरु केले काही पात्र लाभार्थ्याना एक टप्पा कोणाला दोन तर कोणाला तीन टप्पे मिळाले परंतु कोरोना 2019 मध्ये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढला केंद्र आणि राज्य सरकार अडचणीत आले कोणाच काम लेन्टर पर्यत तर कोणाची स्लॅप हाईट तर काहींचा जोता च पूर्ण झाला आणि पूर्ण दोन वर्ष अतोनात अडचणीचा सामना करत नागरिकांनी काढले परंतु आता लोकांची स्थिती फारच नाजूक झाली आहे भाड्याने राहणारे नागरिक भाडे न भरू न शकल्याने आता ताळपत्री टाकून राहत आहे तर काही आता ही भाड्या चा भुर्दंड सोसत आहे अशात एक आशेचा किरण दिसला कि न. प. ला 4 कोटी आलेत वितरण होईल याची वाट पहिली परंतु वितरण झाले नाहीत पुन्हा 8 कोटी आले परंतु वितरण झाले नाही अशात नागरिक मोठया अडचणीत आले आहे तरी तातडीने आलेल्या रकमेचा योग्य नियोजन करून तात्काळ पात्र लाभार्थी नागरिकांना उपलब्ध असलेली निधी वितरण करावा तसेच राज्य व केंद्र सरकार कडे बाकाया उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली तसेच
जनता नगर परिसरातील AMPS कॉन्व्हेंट लगत असलेल्या सार्वजनिक वैष्णवी गार्डन मध्ये महाराष्ट्र राज्याचे सर्व धर्माचे प्रेरक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा आहे परंतु त्यावर छत्री नसल्याने महाराजांच्या पुतळ्यावर ऊन वारा पाऊस याचा सरळ आघात होतो करिता महाराजांच्या पुतळ्यावर छत्री व्हावी परिसरातील महिला करिता सकाळ सायंकाळी फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक व्हावा लहान मुलांना खेडने उपलब्ध व्हावे महिला पुरुषां साठी व्यायाम साहित्य तसेंच याच उद्यानात नवरात्री उत्सव मोठया उत्सवात साजरा केला जातो तरी हायमास्ट असणे गरजेचे आहे या सर्व महत्वपूर्ण मागण्या प्रामुख्याने राज्याचे नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे कडे करण्यात आल्या शहरातील सर्व नागरिकांना घरकुल चा प्राप्त निधी वितरित करणे उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करावा जनता नगर सार्वजनिक वैष्णवी गार्डन मध्ये छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्यावर छत्री, लहान मुलांसाठी खेडने, नवरात्र उत्सव दरम्यान परिसर प्रकाश मय राहावं करिता हायमास्ट, महिलांना व पुरुषांना वॉकिंग ट्रॅक या साठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा करिता सर्व विषय गांभीर्याने घेत संबंधितांना मार्गी लावण्या बाबत निर्देश देण्यात यावे अशी मागणी या बैठकीत रेटन्यात आली

यावल शहरात रात्री मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी पादचाऱ्याच्या हातातील महागडा मोबाइल लांबविला

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकानातील भरदिवसा पडलेल्या धाडसी शस्त्र दरोडयातील आरोपींचा शोध सुरू असतांना येथील एका दुध डेअरीच्या मालकाच्या हातातुन महागडा मोबाईल चोरटयांनी मोटरसायकल येवुन हातातुन लांबविल्याची घटना घडली असुन, चोऱ्यांचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे स्पष्ठ झाले आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी दिनांक ११ जुलै रोजी ८ , ३० वाजेच्या सुमारास बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील पॅट्रोल पंपा समोरील आठवडे बाजार जवळ असलेल्या शबनम दुध डेअरीचे चालक शेख दानिश शेख युसूफ हा रस्त्याने जात असतांना मागील बाजुने मोटरसायकल वरून येणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी हातातुन२५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल घेवुन पोबारा केला . या बाबत शेख दानिश शेख युसुफ यांनी यावल पोलीसात मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असुन , पॅट्रोल पंपावरील लावण्यात आलेल्या सिसिटीव्हीच्या कॅमेऱ्यात मोबाइल चोरटे कैद झाले आहे . दरम्यान यावल शहरात व परिसरात चोरट्यांकडुन काही ठिकाणी घरात घुसुन चोरीचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे मात्र याची पोलीसात अधिकृतरित्या कुठही नोंद नसल्याची माहीती मिळाली आहे . दरम्यान पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या पंपावर समोर झालेल्या अशा प्रकारच्या लागोपाठ होणाऱ्या रस्तालुट व दरोडयाची घटना व मग ही चोरांकडुन मोबाइल लांबविण्याच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरीकांपासुन व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे .

कांग्रेस पार्टी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिमेला झाली सुरुवात…

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा.तालुका प्रतिनिधी
:-
दिनांक 11 जुलै रविवार रोजी जळगाव जामोद शहर आणि युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस तर्फे पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच दररोज वाढत असलेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी मोहिमेला सुरुवात झाली आहे दररोज वाढत असलेले पेट्रोल डिझेलचे भाव तसेच गॅस दरवाढीने सामान्य जनता त्रस्त झाली असून या महागाईमुळे कंबरडे मोडले आहे यानिमित्ताने केंद्र सरकारच्या निषेधार्थ या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली अभिजीत अवचार युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद पाटील अध्यक्ष निशिकांत देशमुख युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल राजीक, स्वप्नील देशमुख राजू मुल्लाजी मन्सूर शेख इम्रान भाई शेख जुनेद,मयूर हारीस, शफिक भाई अमोल मानकर दिनेश काटकर, हुसेन राही ,अब्रार अवेस भाई यांनी या स्वाक्षरी मोहीमेत जळगाव जामोद येथील पेट्रोल पंपावर सहभागी होऊन या इंधन दरवाढीविरोधात नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन केंद्र शासनाचा महागाईच्या विरोधात निषेध केला.

वर्धा जिल्हा दारूबंदी हटाव बैठकीत निवडणुकीत जाहीरनाम्याचा मुद्दा राहणार

0

 

सचिन वाघे वर्धा

वर्धा दि.11.7.21दारूबंदी हटाव, वर्धा बचाव आंदोलनाची दुसरी बैठक आज दिनांक ११ जुलै २०२१ ला शासकीय विश्रामगृह, वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र,या संदर्भात औपचारिक परवानगी घेतली नसल्याचे कारण सांगून प्रशासनाने बैठक घेऊ देण्यास नकार दिला.
अखेर दारूबंदी हटाव समर्थकांनी शासकीय विश्रामगृहा शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतच बैठक घेऊन कार्यक्रम संपन्न केला.

बैठकीला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. थेट चंद्रपुरहून देखील काही जणांनी हजेरी लावली. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकदेखील बैठकीत सहभागी होते. सर्वांनी दारूबंदी हटविण्याच्या समर्थनात आपल्या तीव्र भावनांना मोकळी वाट करून दिली व आपले मनोगत व्यक्त केले.

दारूबंदीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अवघ्या ६ वर्षात चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आली. जे निकष त्याकरिता वापरण्यात आलेत, ते जसेच्या तसे मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्याला लागू होतात. मात्र, लोकआंदोलनाचा रेटा नसल्याने आणि महिला मते जातील ह्या भीतीने राजकीय नेते आणि पक्ष हयाविषयी जाहीर चर्चा करत नाहीत. जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा फसव्या दारूबंदीला विरोध आहे. वर्धेतील दारूबंदी हटविण्यास सर्वात मोठा विरोध पोलिसांचा आहे कारण त्याने त्यांच्या अर्थशास्त्रावर मोठा परिणाम होणार आहे. दूसरा क्रमांक अवैध दारूविक्रेते आणि नंतरचा क्रमांक दारूबंदी हीच संसाराच्या अपयशाचे कारण समजणार्याो भ्रमित महिलांचा आहे. दारूबंदी हटल्याने दारू घरोघरी फुकटात पोहचवली जाणार नसून ज्याला हवी त्याला योग्य पैशात चांगल्या दर्जाची दारू प्यायला मिळणार आहे. विदर्भातीलच ३ जिल्ह्यात दारूबंदी लादून पश्चिम महाराष्ट्रीय नेत्यांनी विदर्भाचा आर्थिक विकास खुंटवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षापासून दारू निर्माण करून व विदेशात निर्यात करून तेथील जमीनदार शेतकरी श्रीमंत झालेत, मात्र वर्धा, गडचिरोली, चंद्रपुर जिल्ह्यातील जंगलात विपुल प्रमाणात आढळणार्या् मोहफुलापासून दारूनिर्मितीवर शासनाने बंधन घालून मुख्यत्वे विदर्भातील आदिवासी बांधवांवर अन्याय केला आहे. अवैध दारूविक्री करणार्यांिना दारूबंदीने प्रचंड श्रीमंत बनविले असून त्या संपत्तीच्या आधारे त्यांनी राजकारणात मोठमोठी पदे बळकावण्याचा सपाटा लावल्याने लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. दारूबंदीने जनमानसात पोलिसांची भ्रष्ट अशी प्रतिमा निर्माण केली असून त्यामुळे जनतेत पोलिसांचा आदर व धाक कमी झाला आहे. दारूबंदीने मोठे उद्योग जिल्ह्यात येण्यास कचरत असून त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती बंद आहे. हलक्या दर्जाच्या, महाग दारूने असंख्य वर्धेकरांचा जीव घेतला असून अशी दारू पिणार्यां च्या आरोग्यावर त्यांच्या कुटुंबियांना मोठा खर्च करावा लागत असल्याने महागाईच्या काळात मोठा आर्थिक भार पडत आहे.

आंदोलनाचा प्रचार प्रसार गतीने व्हावा हयाकरिता समितीची स्थापना करण्यात आली. हयापुढील टप्प्यात तालुकानिहाय बैठका घेतल्या जाणार असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिंनिधीना हयासंबंधी निवेदन देऊन समर्थन मागण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांच्या प्रस्तावित वर्धा जिल्हा दौर्या त त्यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन सादर करण्यात येईल. दारूबंदी आंदोलनाचा कुणालाही व्याक्तिगत फायदा होऊ द्यायचा नसल्याने आंदोलनाचे नेतृत्व सामूहिक ठेवण्याचे ठरले. आंदोलन करणार्यां ना राजकारण करायचे नाही, मात्र वर्धा जिल्ह्यातून दारूबंदी हटविणे हा सर्व राजकीय नेते व पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्याचा मुद्दा बनवायचा आहे. समितीच्या सदस्यांची नावे, संपर्क क्रमांक व पुढील वाटचाल लवकरच सार्वजनिक केली जातील. आंदोलनाला वैयक्तिकरित्या उपस्थित राहू न शकणार्यांूनी मोठ्या प्रमाणात कॉल, मेसेज करून आंदोलकांचे मनोधैर्य उंचावले. पाठिंबा देणार्यांथचे आयोजकांनी आभार मानले आहेत. बैठकीला प्रामुख्याने सचिन म्हैसकर, राहुल करंडे, मनीष पुसाटे, अमित डांगे, श्यामभाऊ परसोडकर, सीतम मन्द्रेले, चन्द्रशेखर घाटे, राहुल पाटील, किरण पट्टेवार, राहुल ढोक, नितिन फुलझेले, आशीष ठाकरे, दिनेश लांडगे, सिद्धान्त कांबळे, नितिन यादव, रमेश हिराणी, सुशील साहुरकर, जितेंद्र झाडे, पवन काकडे, दिनेश वाणी, प्रवीण मुडे आदींची उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान सर्व कोरोंना नियमांचे पालन करण्याची विशेष खबरदारी घेण्यात आली. पोलिसांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवून बित्तंबातमी गोळा करण्याचे त्यांचे कर्तव्य पार पाडले. हयापुढील काळात मोठ्या संख्येने समर्थकांच्या जुळण्याची शक्यता असल्याने दारूबंदी हटविण्याच्या मुद्द्याला मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचे समर्थन मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

देश भर में 1 करोड़ 20 लाख पौधे लगाने का संकल्प – दावते इस्लामी हिन्द

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट: दि.11.7.21 दावते इस्लामी हिन्द द्वारा देश मे पर्यावरण संरक्षण हेतु वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन भव्य पैमाने पर शुरू किया गया।
दावते इस्लामी देश के सभी राज्य और शहरो में धार्मिक व सामाजिक कार्य में अग्रसर है ।
पिछले साल सम्पूर्ण भारत भर में 1 करोड़ 20 लाख पौधे लगाने का संकल्प दावते इस्लामी द्वारा लिया गया था, जिसके चलते देश के अलग अलग राज्य, शहर और कस्बों में वृक्षारोपण की शुरूआत हुई।
जिसमे हिंगणघाट दावते इस्लामी द्वारा लाखो की संख्या तक आंकड़ा पहुंच चुका है और वे संकल्प आगे भी इसी तरह चल रहा है। पिछले साल लिया गया संकल्प पर्यावरण संरक्षण और ऑक्सीजन की कमी को मद्देनजर लीया गया था। जो इस बार भी देश भर में चल रहा है। उसी मिशन को आगे बढ़ाने हिंगणघाट दावते इस्लामी और मदरसा सदाक़तूल इस्लाम की और से जामा मस्जिद चौक पर कडू निम के पौधे लगाकर पर्यावरण बचाने, युवाओ ने बढ़चढ़कर हिस्सा लिया। और आगे भी इस मिशन को लेकर चलने का इरादा किया है। इस अवसर पर दावते इस्लामी हिंगणघाट ज़ोन, निगरान मोहम्मद बख्श कादरी, नदीम खान मामू, टाका मस्जिद सेक्रेटरी मक़सूद बावा, मदरसा सदाक़तूल इस्लाम के सेक्रेटरी आबिद रज़ा, अब्दुल कदीर बख्श, ज़मीर शेख, अल्ताफ भाई, अफ़रोज़ उर्फ सोनू भाई, आमीन मलनस, मुश्ताक़ भाई, इत्यादि उपस्थित थे।

गांजा वाहतूक करणार्‍यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई .

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.11.7. 2019  गुन्हे प्रकटीकरण पथक हवा बनसोड पोलीस स्टेशन हिंगणघाट यांना खात्रीशीर माहिती मिळाली की दि.10 जुलै सायंकाळच्या दरम्यान अंकुश मेश्राम राहणार महात्मा फुले वार्ड हिंगणघाट हा मोटर सायकल ने गांजा घेऊन हिंगणघाट शहरात येत आहे अशा माहितीवरून श्री दिनेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक श्री संपत चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत पाटणकर व पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल लगड यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा विवेक बनसोड व त्यांचे पथकासह कलोडे चौक हिंगणघाट येथे नाकेबंदी केली असता अंकुश अरुण मेश्राम वय 28 वर्ष राहणार महात्मा फुले वार्ड हिंगणघाट हा मोटरसायकलने वाहतूक करीत असताना मिळून आला त्याच्या ताब्यातून एका पिवळ्या रंगाची पिशवी मध्ये 557 ग्रॅम गांजा किंमत 5570 रुपये 1 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक MH32 एम एम 8762 1 विवो कंपनीचा मोबाईल नगदी 950 रुपये असा एकूण 62520 रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर कार्यवाही दरम्यान जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 586/2021 कलम 20 (ब) एन डी .पी. एस ॲक्ट सह कलम 3()1, 181, 130 / 177 मोवाका अन्वय गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि श्री प्रशांत पाटणकर करीत आहे सदर कारवाई पोउनि अमोल लगड पोहवा विवेक बनसोड ,पंकज घोडे ,सुहास चांदोरे,प्रशांत वानखेडे ,उमेश बेले, वीरेंद्र कांबळे, संदीप बदकी ,विजय काळे यांनी केली आहे

वाढत्या महागाईविरोधात जनजागृतीसाठी आज शहरात यावल तालुका काँग्रेसकडून सायकल रॅली काढण्यात आली

0

 

यावल  :  (प्रतिनिधी )विकी वानखेडे

वाढत्या महागाईविरोधात जनजागृतीसाठी आज शहरात यावल तालुका काँग्रेसकडून सायकल रॅली काढण्यात आली

देशात  सहा वर्षात नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केन्द्रातील सरकार हे सर्व पातळींवर निष्क्रीय ठरले आहे  घरगुती गॅस, पेट्रोल , डिझेलसह सर्वच जिवनावश्यक वस्तुच्या किमती गगनाला भिडल्या आहेत  नरेन्द्र मोदी यांनी सात वर्षापुर्वी सत्ता मिळवण्यासाठी जनतेला दाखललेले अच्छे दिनचे स्वप्न हे बुरे दिन ठरले

देशातील नागरीकांना जगणे कठीन झाले  आहे  मोदी सरकारची चुकीच्या व  उद्योगपतीधार्जिण्या धोरणामुळेच सामान्य लोकांचे जगणे कठीन झाले आहे  या  गोंधळलेल्या  शासनाच्या निषेधार्थ आज यावल शहरात काँग्रेसच्यावतीने महागाईविरूद्ध केन्द्र शासनाचा निषेध करण्यासाठी जनजागृती सायकल रॅली  काढण्यात आली

यावल जिनिंग प्रेसींग सोसायटीच्या आवारातुन निघालेल्या या सायकल रॅलीचे नेतृत्व आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार रमेश चौधरी , जिल्हा परिषद गटनेते तथा कौग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे , पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील यांनी केले

नगरसेवक मनोहर सोनवणे , नगरसेवक असलम शेख , नगरसेवक समीर शेख ,गुलाम रसुल दस्तगीर , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , हाजी गफ्फार शाह, कोरपावलीचे  सरपंच विलास अडकमोल, दहिगावचे  सरपंच अजय अडकमोल, बामणोदचे सरपंच राहुल तायडे , ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुक्तार तडवी , नईम शेख , पुंडलीक बारी , अभय महाजन , उमेश जावळे , वढोदेचे  सरपंच संदीप सोनवणे , इम्रान पहेलवान यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये भाग घेतला  या सायकल रॅलीचा समारोप यावल पंचायत समितीच्या आवारात झाला .

सयुक्त कुष्टरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम अंतर्गत असंसर्गजन्यरोग जागरुता अभियान

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडुन आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन सयुक्त कुष्टरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम अंतर्गत असंसर्गजन्यरोग जागरुता अभियान मोहिमेच्या अनुषंगाने तालुक्यात १ जुलै ते ३१ आँक्टोबंर २०२१ या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रां अंतर्गत उप केद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संशयीत रुग्णांचे मोफत निदान व उपचार केले जातील, या मोहिमेचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमंत बर्हाटे व क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे stls ,मिलिंद राणे sts यानी केले.यानी सर्वत्र प्रशिक्षण घेतले

यात त्वचारोग व कृष्ठरोग शोध मोहिमेत ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांचे पथक प्रत्येक घरोघरी जाऊन कृष्ठरोगाबाबत माहिती देऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करणार आहेत. सर्व्हेक्षणादरम्यान संशयीत रुग्ण आढळल्यास त्याचे मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन संपुर्ण कुटूंबाची तपासणी करण्यासाठी योगदान द्यावे. या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले असून ग्रामीण भागात पथकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. प्रत्येक गावनिहाय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आशा स्वंयमसेविका व आरोग्य सेवक घरोघरी जावून घरातील सर्व सदस्यांची फिक्कट लालसर न खाजवणारा, न दुखणाऱ्या बधीर चट्टयाची तपासणी करणार आहेत. पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख ठेवणार असून बाधीत रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहेत .
त्वचारोग व कुष्ठरोगावर वेळीच उपचार घेतल्यास तो बरा होत असल्यामुळे समाजामध्ये या रोगाविषयी असलेले समज गैरसमज बाजूला सारुन संशयीत रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेत तात्काळ निदान व उपचार घेतल्यास रोगप्रसाराला आळा बसू शकेल. तालुक्यातून अशा रोगांना हद्दपार करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेंमत बर्हाटे यांनी केले आहे.

जिगाव प्रकल्पला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसागर प्रकल्पअसे नाव द्या

0

 

सुनिल पवार नांदुरा

नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदिवर होऊ घातलेल्या जिगाव प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भिमसागर असे नाव देने म्हणजे त्याचे कार्य चा गौरव करने आहे त्त्यानि विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे शेती विशयक धोरन पाण्याचा प्रश्न असे मौलिक प्रश्न सोडविले आहे म्हणून या प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भिमसागर असे नाव देण्यात यावे या मागनिचे निवेदन प्रकल्प.ग्रस्थ.शैलेश वाकोडे. संतोष तायडे. किशोर ईगळे पुरुषोत्तम भातूरक. अमर पाटील. राहुल खंडेराव.सुनील पवार. दिलिप ईगळे. भिमराव वाघ. तुकाराम रोकडे. अरुन सुरवाडे यानि मानणिय तहसीलदार नांदुरा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे

आर्वी –तळेगांव महामार्ग येनार्या काही महिण्यात पुर्ण न झाल्यास स्थानिक जनप्रतिनीधीना येत्या निवडणूकीत त्यांची जागा दाखवुन देवु– आप चे अक्षय राऊत यांचा ईशारा

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी प्रज्वल यावले

आर्वी -आर्वी तळेगाव राष्ट्रीय महामार्गचे 3 ते 4 वर्षांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरु असून या राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून या महामार्गाच्या कामात भेसळ करीत आहे तरी सुद्धा स्थानिक प्रशासन या राष्ट्रीय महामार्गकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे येथील स्थानिक आमदार साहेब, स्थानिक खासदार साहेब, व वर्धा जिल्हा पालकमंत्री हे जाणून बुजून या परिसरातील नागरिकांना महामार्गवर जाणे येणे करताना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे व स्थानिक प्रतिनिधी आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची दिशाभूल करीत आहे तरी सुद्धा या सर्व प्रकाराचे फोटो व विडिओ ्यासोबत पाठवीत आहे या नंतर जर या सर्व प्रकाराची दखल जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, व राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी न घेतल्यास आम आदमी पार्टी आर्वी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व स्थानिक नागरिक रस्ता रोको आंदोलन करणार व येणाऱ्या नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणूक मध्ये काँग्रेस व भाजप ला त्यांची जागा दाखविणार तुम्ही या प्रकरणाची दखल घेऊन स्थानिक नागरिक यांना न्याय मिळवून दयावा.
अशी माहिती आम आदमी पार्टी चे जिल्हा सदस्य अक्षय राऊत यांनी पत्रकारद्वारे जाहीर केले.