Home Blog Page 441

डांभुर्णीत आत्या भाऊ फुई भाऊंच्या दारुच्या नशेत झालेल्या हाणामारीत तान्या बारेलाचा लाकडी दांडयाने खुन

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील डांभूर्णी येथील आदीवाशी पावरा वस्तीत रहीवाशी असलेले तान्या लोटन बारेला वय ५०वर्ष व त्याचा आतेभाऊ अखिलेश बळीराम बारेला वय ३६वर्ष यांच्यात घरगुती बोलचाल झाली असता त्याचे रुपांतर वादात झाले व संशयित आरोपी अखिलेश बळीराम बारेला राहणार पिपल झपा एम.पी  याने लाकडी दाडुक्याचा वापर करुन तान्या लोटन बारेला याला मारहाण केली असता तो मृत झाला.ही घटना आज दि.९रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली .या घटनेची माहीती पोलिस  पाटील यांनी पोलिसांना कळवताच यावल पोलीस  स्टेशनचे पोलिसनिरिक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शना खाली पोलिस उप निरिक्षक जितेंद्र खैरनार सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व त्यांचे सहकारी गणेश ढाकणे,सतीष भोई,विजय परदेशी,हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन तान्या बारेलाचा मृतदेह पीएम साठी रूग्णालयात पाठवण्यात आला पुढील तपास करतांना संशयीत आरोपी अखीलेश बारेला यास दारुच्या नशेत घरातुन पकडून यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तान्या बारेला हा रोजनदारी करुन आपला ऊदरनिर्वाह भागवत होता याचे पश्चात पत्नी,मुलगा१,मुली पाच व पाच जावाई असा परीवार आहे.
डांभुर्णी गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .

आदिवासीला जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

 

गजानन सोनटक्के जळगाव

तालुक्यातील चाळीस टापरी येथील रहिवासी-सखाराम ग्यानसिंग मूजाल्दा वय 26 वर्ष , हा सूरेश गमा सोळंकी याचे सोबत दिनांक 6 जुलै 2021 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन तक्रार दिली की मी व सुरेश जळगाव येथे स्विट किराना दूकानावर सामान घेण्यास आला असता आरोपी सागर दिलीप राठी सूनगाव याने त्याला दूकानाबाहेर बोलावले मी सागर दिलीप राठी याचे जवळ गेल्यावर त्याने फिर्यादीस साले लगोटे आदीवाशी तूम्ही जास्त माजले तूम्ही माझे कषी केंद्राचे दूकानाची बदनामी करता असे म्हणुन रागात फिर्यादी चे खिशातील ओपो मोबाइल 9730913649 क्रमाकाचे सिम असलेला रोडवर फेकून दिला व फि म्हणाला कि क्रूषी अधिकारी यांचे कडे चाल म्हणून फिर्यादी त्याचे मागे मागे दूर्गा चौकातील पूजा सेंटर जवळ मेन रोडवर आला असता आरोपी याने फि हा आदीवासी समाजाचा असल्याचे माहीत असतांना देखील फिर्यादीला तूम्ही लंगोटे आदीवासी सूधारणार नाही अशी जातीवाचक शिवीगाळ करून त्याने त्याचे पायातील चप्पल काढून फिर्यादी चे डावे गालावर मारली व फिर्यादी स अपमानीत केले तसेच तूम्ही आदीवासी जसे लंगोट वर होते तसेच लंगोटवर आणनार अशी धमकी दिली . त्यानंतर आम्ही घरी निघून गेलो व आज रोजी शाळा सोडल्याचा दाखला घेवून पो स्टे रिपोर्ट देण्यास आलो .अश्या फिर्यादी चे तोंडी रीपोर्ट वरुन पोलिसांनी आपला नंबर 561/ 2021 कलम 323,506 भादवि सहकलम 3 ( 1 ) ( 1 ) ( S ) , 3 ( 2 ) ( va ) अ तपास यांचेकडे देण्यात आला .

मृद व जलसंधारण विभागाच्या निविदेत गौडबंगाल!

0

 

173 कोटीचा घोटाळा असल्याचा
जितेंद्र एन. जैन यांचा आरोप

अजहर शाह

बुलढाणा:-मृद व जलसंधारण विभागाने सन 2020 – 2021 या आर्थिक वर्षात काढलेली 173 कोटींची निविदा शासनाच्या धोरणाशी पूर्णपणे विसंगत आहे.मोठ्या कंत्राटदारांना हाताशी धरुन मलिदा लाटण्यासाठी या विभागातील अधिकारी वर्गाने शासनाच्या परिपत्रकाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा नेते जितेंद्र एन. जैन यांनी केला आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या निविदेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जैन यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, मृद व जलसंधारण विभागाने 149 कामांना एकत्रित करुन केवळ 25 कामांची 173 कोटी रुपयांची निविदा काढली. लहान कंत्राटदाराना सदर कामे मिळू नये यासाठी या विभागाने वेगवेगळ्या गावातील व तालुक्यातील कामे एकत्र करून एकच मोठ्या रकमेची निविदा काढली आहे. केवळ मॅनेज केलेल्या मोठ्या कंत्राटदाराना काम मिळावे यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांने ही चुकीची प्रक्रीया शासनाची फसवणूक करून राबवली असल्याचा आरोप निवेदनकर्ते जितेंद्र एन. जैन यांनी केला आहे. लहान लहान, वेगळीवेगळी तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता घेऊन कामे काढली असती तर शेकडो कंत्राटदारांना रोजगार मिळाला असता.. परंतु शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांने सर्वांना मूर्ख बनवण्याचा प्रकार केला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोरोना आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे शासकीय निधी अभावी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व विभागाची कामे कमी करण्यात आली आहेत..कित्येक जिल्ह्यात निधीअभावी निविदा सूचना प्रकाशित न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. परंतु बुलढाणा जिल्ह्यात मात्र कोट्यवधी रुपयांच्या निविदा सूचना काढून मलिदा लाटण्याचा प्रकार केला जात असल्याचा गंभीर आरोप जैन यांनी केला आहे. आजरोजी सगळीकडे बुलढाणा जिल्ह्यात व महाराष्ट्रात सर्व विभागाची कामे10 ते 35 टक्के कमी दराने कंत्राटदार निविदा भरत असताना या निविदा एवढ्या उच्च दरात कशा आल्या असा सवालही जैन यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सदर 173 कोटींची निविदा प्रक्रिया व इतर निविदा प्रक्रियांची सखोल चौकशी करण्यात यावी, सदर प्रकरण 100 कोटीच्या वरचे असल्याने सी बी आय, एन आय किंवा ईडी मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, या निविदा प्रक्रियेच्या काळात ज्या कंत्राटदारांनी या निविदा भरल्या, कामे घेतली त्या कंत्राटदारांचे कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचे, अधीक्षक अभियंता अमरावती, मुख्य अभियंता नागपूर तसेच मंत्रालयीन कर्मचारी व मंत्री यांच्यासह त्यांच्या सर्व स्विय सहाय्यक यांच्या मोबाईल चे सी डी आर व्हाट्सअप मेसेज ची चौकशी करण्यात यावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व कामे स्थगित करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा नेते जितेंद्र जैन यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

*चौकशी न झाल्यास E D कडे स्वतः तक्रार करणार- जितेंद्र एन. जैन*

कोरोना संसर्ग आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे सामान्य माणसासह सरकारही हतबल झाले असतांना मृद व जलसंधारण विभागात कोट्यवधीच्या शासकीय निधीचा चुकीच्या पद्धतीने अपव्यय केला जातोय. लहान कंत्राटदारांना कामापासून वंचित ठेवून केवळ काही विशिष्ट कंत्राटदारांना फायदा मिळवून देऊन स्वतःचे खिसे भरण्यासाठी मृद व जलसंधारण
विभागातील अधिकारी वर्ग चुकीच्या पद्धतीने काम करतोय.. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे तशी मागणी केली आहे.. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, मृद व जलसंधारण मंत्री यांनाही सदर निवेदन/ तक्रार पाठवली आहे. सदर प्रकरणाची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारकडून चौकशी लावली गेली नाही तर आपण स्वतः ईडी कडे तक्रार करणार असल्याचे जितेंद्र एन जैन यांनी म्हटले आहे.

नायगाव येथील ग्रामसेवकांचा मनमानी कारभार उपसरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार

0

 

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

नायगाव ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक हे सरपंचांना हाताशी धरून संगनमताने मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार उपसरपंचासह सहा सदस्यांनी जळगाव जिल्हा परिषदेकडे केलेली आहे यात ग्रामपंचायत कार्यालयाचे कुठलेही काम करताना आम्हाला विश्वासात घेत नाही,मनमानी करून सर्व निर्णय ते स्वतः घेतात, मासिक सभेला सुद्धा वेळी हजर राहात नाही व नंतर येऊन सर्व विषय त्यांच्या मर्जीनुसार प्रोसिडिंग वर नमूद करतात, मासिक सभेमध्ये मागील विषय घेत नाही, त्यामुळे यात काहीतरी घोटाळा आहे असे स्पष्ट होते, याबाबत विचारणा केली असतांना संबंधितांकडून अरेरावीची उत्तरे मिळतात. अशा प्रकारची लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. दरम्यान तक्रारदारांनी सदर ग्रामसेवक व सरपंचांच्या कारभाराविषयी अनेकदा वरीष्ठांनकडे लेखी तक्रार अर्ज करूनही अद्यापही या कुठलीही कारवाई झालेली नाही तरी सदर ग्रामसेवकांवर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत लेखी निवेदनानुसार सविस्तर असे की नायगाव ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती विचारली असता, ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांचे कडून स्पष्ट नकार मिळतो. प्रत्येक प्रश्न हा लेखी अर्ज करूनच विचारावा असे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. तर मासिक सभेमध्ये झालेल्या खर्चाची बिले मागणी करूनही अवलोकनासाठी सभेपुढे ठेवत नाही. ग्रामपंचायतीचा कर- वसुली भरणा बँकेत केला जात नसून तो परस्पर खर्च केला जातो. त्यानुसार आम्ही सभेच्या अजेंड्यावर जमा-खर्च नमूद करण्याची मागणी केलेली आहे. ती सुद्धा मागणी अमलात आलेली नाही तसेच तसेच ग्रामपंचायतीच्या विविध विषयांची योग्य अशी माहिती मिळत नाही. कामापेक्षा जास्तीचा खर्च दाखवून बाकी रक्कम गहाळ केली जात आहे. ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहूनही दडपशाही ने कारभार करतात या गैरकारभाररास त्वरित आळा बसावा व ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व बदली करण्यात यावी. या मागणीसाठी उपसरपंच सौ सोनल रामदास पाटील यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे.दि.३१ मे २०२१ रोजी सदर तक्रारी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (जळगाव) यांच्याकडे देण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे सदर ग्रामपंचायतीच्या गैरकारभार विषयी संबंधित पदाधिकाऱ्यांनी दि.२९ जून २०२१रोजी तहसीलदार (यावल) यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे या तक्रार अर्जात म्हटल्या,नुसार ग्रामपंचायतीच्या मालकीची शेती गट क्रं.२६९ अशी मालमत्ता आहे सदर शेताच्या बांधावर ७० ते ८० झाडे होती ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतांना फक्त सदर झाडांच्या फांद्यांची छाटणी करायचे असे ठरले होते मात्र प्रत्यक्षात सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी संगणमत करून सदर शेताच्या बांधावरील सर्व झाडे कुठलीही परवानगी न घेता तोडून टाकली आहे.
त्याचप्रमाणे यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांना तब्बल तीन तक्रारअर्ज दिलेले आहे त्यात म्हटल्यानुसार असे की, मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या आदिवासी बारेला कुटुंबियांच्या नावे घरकुल योजनेअंतर्गत काही घरकुल मंजूर करुन बांधकाम सुरू आहे तथापि सदरील बारेला कुटुंब यांचे गावाच्या मतदार यादीत सुद्धा नाव नाही व त्यांचा साधा रहीवासही नाही अशा लोकांना घरकुल मंजूर करून गावातील पात्र लोकांना सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी घरकुल योजनेपासून वंचित ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे गावालगत निमछाव नावाची आदिवासी वस्ती उदयास आलेली असून या ठिकाणी बोगस घरकुलांची सर्रासपणे बांधकाम सुरू आहे तसेच पैशांची मोठ्या प्रमाणात देवाण- घेवाण सुद्धा झालेली असून याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी दि.२३ जून २०२१ रोजीच्या निवेदनात मागणी केलेली आहे. असे अजब व गज़ब व्यवहार सदर ग्रामपंचायतीत सुरू आहे अशी रितसर तक्रार दि.२९ जून २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पी.डी. सैंदाणे व सरपंच यांच्या गैरकारभाराविरुद्ध व उपसरपंच व सहा ग्रामपंचायत सदस्य यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. तरी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल अशी मागणी तक्रारदार पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
★ग्रा.पं.ची वरीष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी-संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पी.डी. सैंदाणे व सरपंच यांच्या गैरकारभाराविरुद्ध उपसरपंच सौ सोनल रामदास पाटील तसेच उत्तम सपकाळे, ज्योती देशमुख, रमाबाई कोळी, राजू तडवी, महेंद्र तडवी, अलिशानबाई तडवी या सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या लेखी तक्रारीवरून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील व तर अधिकार्‍यांच्या पथकाने चौकशीसाठी दि.५ रोजी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली मात्र चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही
कोट घेणे
★ शिपाई चालवतात मासिक सभा-सदर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहतात. यावेळी ते आपल्या गैरहजेरीत ग्रामपंचायत शिपाई यांना मासिक सभा घेण्यासंदर्भात सांगून जातात त्यानुसार सदर ग्रामपंचायतीची मासिक सभा शिपाई घेत असतात हे ग्रामपंचायतीचे फार मोठे दुर्दैव आहे. अशा या ग्रा.पं.च्या कारभाराकडून गावाच्या कुठल्या प्रकार सर्वांगिन विकासाची अपेक्षा करावी ? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. यासह ग्रामसेवक व सरपंच यांचे अनेक प्रकारचे गैरव्यवहार आम्ही लेखी निवेदनाद्वारे वरिष्ठ प्रशासनाकडे कळविले आहे मात्र अद्याप यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही तथापि येत्या काळात सदर प्रकरणावर कुठलीही नि:पक्षपातीपणे कारवाई न झाल्यास आम्ही तक्रारदार सर्वजण जिल्हा परिषद ,जळगाव समोर आमरण उपोषण करू
असे उपसरपंच सौ सोनल रामदास पाटील यांनी सांगितले आहे.

टिपर व दुचाकी अपघातात महिला जागीच ठार

0

 

सुनिल पवार. नांदुरा

नांदुरा जळगाव रोड महामार्गावरिल रेल्वे गेट नजिक टिपर व दुचाकी अपघातात दुचाकीवरिल महिला जागिच ठार झाल्या चि घटना८जुलै सकाळी१०वाजता घडली याबाबत सविस्तर असे कि ध्यानेश्वर वेरुळकर वय५५वषँ रा.येरळी. ता.नांदुरा हे.आपली पत्नी मंगलाबाई वेरुळकर वय४५यांचे सोबत दुचाकी ने.नांदुरा वरुन येरळी कडे जात असताना रेल्वे गेट जवळील गतिरोधक जवळ मागुन येनारे एम.एच.२८बी.बी.४१७७या.टीपरने दुचाकी ला जोरदार धडक दिली. यामध्ये मंगलाबाई वेरुळकर हि.महिला जागिच ठार झाली. अपघाताची वार्ता. कळताच नांदुरा पोलीस. पि.एस. आय.कीशोर घोडेस्वार. ओमसाई फा.चे विलास निबोळकर. पो.का.अमोल राऊत. सुनील गायकवाड यांनी रुग्णवाहिकेसह तात्काळ धाव घेतली महिलेचा म्रुत्यदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला

जम्परोप असोशिएशन महाराष्ट्र चेअरमन पदी विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ विठ्ठल जाधव यांची नियुक्ती

0

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] जन्मरोप असोसिएशन महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांची झुम ॲपची बैठक संपन्न झाली झुम ॲपच्या बैठकीत (आय पी एस ) विशेष पोलीस महानिरिक्षक महाराष्ट्र राज्य तथा राष्ट्रीय एकात्मतता शांतता धार्मिक सलोख्यासाठी कार्यरत असलेल्या शांतीदुत परिवाराचे संस्थापक डॉ विठ्ठल जाधव यांची सर्वानुमते जम्परोप असोसिएशन संघटनेच्या चेअरमन पदी जम्प रोप असोसिएशनचे अध्यक्ष मंदार पनवेलकर यांनी नियुक्ती पत्राव्दारे केली सेवा निवृत विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ विठ्ठल जाधव यांचे कौतुक होत असुन सर्व स्तरावरुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे

राधेश्याम फाउंडेशन चा चौथा वर्धापन दिन सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्ये उत्साहात संपन्न झाला.

0

 

सिलोड प्रतिनिधी (सागर जैवाळ)

राधेश्याम फाउंडेशन चा चौथा वर्धापन दिन सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी राधेश्याम फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष वैशालीताई चाकणकर यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट व महिलांना उद्योग कसे उभा करता येतील याची माहिती सांगितले . तसेच सर्व जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी आपली उपस्थिती ठेवली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा छायाताई घोरपडे, रोहिणीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष हनुमंत घाडगे पाटील, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संदीप कानडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिलीप वाघमारे, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सागर जैवाळ, विशाल जगताप, सुनिल पवार, चंद्रकांत वाघुले, जयश्री आहेर, भावना हगवणे, शुभांगी गलांडे, रेश्मा शेख तसेच सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले . सर्व पदाधिकारी ने सांगितले की संस्थापक अध्यक्षा वैशाली ताई चाकणकर यांनी जबाबदारी दिलेली आम्ही समक्ष पार पाडून जनतेला व गोरगरिबांना न्याय व हक्कासाठी लढणार असे सांगितले .

बनकीन्होळा येथील गाव नदीवर सिंचन प्रकल्प उभारण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा

0

 

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

औरंगाबाद (आयुषी कुलकर्णी )

बनकीन्होळा ता. सिल्लोड येथील निल्लोड धरणाला जाणाऱ्या गाव नदीवर ब्रिज कम केटीवेअर या पद्धतीने सिंचन प्रकल्प तसेच सदरील नदीवर संरक्षण भीत उभारण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
गुरुवार ( दि.8 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बनकीन्होळा गावात भेट दिली. यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना गावात बोलावून घेत सिंचन प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने गावातील नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रस्ता व सिंचन कामसंबंधी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

यावेळी कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यतीन कोठावळे, सिंचन शाखा अभियंता आर . के . दांडगे, श्री. गद्दीमे, सिंचन अभियंता व्ही.के. गायकवाड, सरपंच प्रल्हाद फरकाडे , उपसरपंच नंदू फरकाडे, माजी सरपंच शिवाजी फरकाडे ,अंकुश फरकाडे, विजय फरकाडे, पंडित फरकाडे आदिंची उपस्थिती होती.
बनकिन्होळा येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी गाव नदीतून जावे लागते. याठिकाणी पूर्वी असलेले सिंचन प्रकल्प मोडकळीस आलेले असून येथील नळकांडी पुलात कचरा अडकल्याने पाणी दुसऱ्या बाजूला वाहते यामुळे परिसरातील शेतांचे नुकसान होते. यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते शिवाय नदीत पाणी असतांना स्मशानभूमी कडे तसेच या परिसरात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी सदरील जागेवर ब्रिज कम केटीवेअर, तसेच गाव हद्दीपर्यंत नदीवर संरक्षण भिंत उभारण्यासाठी तात्काळ कारवाईचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावल सराफा दुकानात भरदिवसा दरोडा प्रकरण हे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी गांर्भीयाने घेतल्याचे सांगुन आरोपींचा शोध लागेल आ . चंद्रकांत पाटील

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील काल शहरातील सराफा दुकानात पडलेल्या दरोडया प्रकरणी आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दुकानास भेट दिली व दरोड्या प्रकरणी सराफा व्यापारी यांच्या कुटुंबांशी संवाद साधला व विविध विषयावर चर्चा केली. दरम्यान काल संपुर्ण यावल शहराला व तालुक्यास हादरून सोडणाऱ्या भरदिवसा पडलेल्या दरोडा व यातील लाखोंची लुट व या प्रकरणी घडलेले थरार या विषयाची आपण मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करीत असतांना यावल शहराचे शिवसेनाप्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या मालकीच्या सराफा दुकानावर पडलेल्या दरोडया विषयी माननिय जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी त्वरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर हा विषय टाकण्यात आला असुन, स्व:ताहा मुख्यमंत्री यांनी या विषयास गांर्भीयाने घेतले असुन या विषयी वरिष्ठ अधिकारी यांना त्यांनी त्वरित चौकशी करून तात्काळ आरोपींच्या शोध घ्यावा असे आदेश दिल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगीतले व सराफा व्यवसायीक कवडीवाले यांच्या कुटुंबास धिर दिला व सोन्याचे दागीने गेली याचा दुखः आहे पण सुदैवाने सोन्यासारखी आपली माणसे वाचली याचा आपण विचार करावा तसेच ज्या युवकांनी सराईत गुन्हेगारांना पकडण्याचा जो धाडस दाखवले त्यांचे विशेष कौत्तुक मुक्ताईनगरचे आमदार चंदकांत पाटील यांनी यावेळी सांगीतले .

बिबट्याच्या दहशतीने त्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मा. आमदार विजयराज शिंदे यांनी गाठले उप वनसरंक्षण कार्यालय

0

 

अजहर शाह

मोताळा:- तालुक्यातील रोहिणखेड, उबाळखेड व अंत्री शिवारात मागील 15 ते 20 दिवसां पासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक शेतकऱ्यांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहे.वन विभाग या घटनां कडून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांत मोठी दहशत निर्माण झाली आहे.या दहशतीच्या त्रस्त व काही जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी आज 7 जुलै 2021 रोजी मा. आमदार विजयराज शिंदे यांच्या कडे धाव घेऊन याबाबतची व्यथा मांडली.
यावेळी मा. आमदार विजयराज शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोन वर चर्चा करून योग्य कार्यवाही बाबत विचारणा केली मात्र समाधान कारक उत्तर न मिळाल्याने जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा उप वन संरक्षक श्री.गजभिये यांचे कार्यलय गाठून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
याबाबत बोलतांना विजयराज शिंदर यांनी सांगितले की,”पेरणी करून बसलेला शेतकरी पावसाची वाट बघत आहे त्यातच पीककर्ज,पीक विमा,कर्जमाफी अश्या अनेक समस्यानी शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे.त्यात वन्य प्राण्यांच्या अश्या त्रासाने या भागातील शेतकरी भयभीत झालेले आहे” वन विभागाचे अधिकारी या सर्व घटने कडे दुर्लक्ष करत असल्याची बाबही त्यांनी उप वन सरंक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमा प्रत्यक्ष पणे दाखविल्या.
त्यामुळे धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना वन विभागाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी आग्रही मागणी विजयराज शिंदे यांनी लेखी पत्राद्वारे उप वनसरंक्षण यांच्याकडे केली आहे.
उपवन संरक्षक यांची कार्य तत्परता
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून उप वन संरक्षक श्री.गजभिये यांनी तातडीने चार पाच दिवसांसाठी रोहिणखेड येथे “रेस्क्यू टीम” पाठविण्याच्या सूचना दिल्या असून कॅमेऱ्याने ट्रॅपिंग सुद्धा केले जाईल व लवकरात लवकर बिबट्याचा बंद केले जाईल असे सांगितले.त्याच प्रमाणे जखमींना सुद्धा लवकरच आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले.
या आश्वासना नंतर दहशतीत असलेल्या असलेल्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडत मा.आमदार विजयराज शिंदे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी डॉ वैभव इंगळे,प्रकाश आवटे,भूषण गुजर,सुशांत गुजर,संजय सरोदे,सुभाष बैरागी,गणेश मख, सादिक राऊफ,राजू सरोदे ई ची उपस्थिती होती.