Home Blog Page 458

राष्ट्रीय महामार्गाने जाणारी दुचाकी टैंकरवर धडकून झालेल्या अपघातात एक ठार,एक गंभीर जखमी

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट,दि.१२ जून
नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सुगुणा कंपनी जवळ आज शनिवारी दुपारच्या टैंकरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सहपाठी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.
टैंकर क्र एमएच-२१ डब्ल्यू-६४४७ हा नागपुर येथून हैदराबाद जाण्यासाठी निघाला होता.या दरम्यान तालुक्यातील सेलु मुरपाड येथील वैभव नेहारे (२३) तसेच मयूर विलास कुमरे(२४) हे दोघे युवक पल्सर दुचाकी क्रमांक एम एच -३४ क्यू-३५ ९४ ने सुगुणा फॅक्टरीकड़े निघाले होते,त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन समोर जात असलेल्या टैंकरला धडकली. सदर झालेल्या अपघातात दुचाकी चालक वैभव नेहारे (२३) जागीच ठार झाला तर मागे बसून असलेला एक जण गंभीर जखमी झाला.
सदर अपघात तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वणी शिवारात घडली.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी पोहचून जखमीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मृतक तसेच त्याचा सहपाठी हे दोघेही सुगुणा फॅक्टरीमधे नोकरीच्या शोधात दुचाकीने निघाले होते,परंतु रस्त्यातच त्यांचा असा दुर्दवी अपघात घडला. सदर घटनेचा पुढिल तपास हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक वसंत शुक्ला,पोशी सौरभ गेडाम, महेंद्र आकरे करीत आहे.

कोरोनाचे कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या शिक्षकांना ५० लाखाची भरपाई द्यावी; प्राचार्य विनोद गायकवाड यांची मागणी

0

 

तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

कारोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न देता कोरोनाची ड्युटी करताना शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि जिल्ह्यातील शिक्षक संभ्रमित होते. जळगांव जिल्हयाचे जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कोरोना काळात फ्रंट लाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लस देण्याची मागणी केली आणि प्रशासनाने ती मान्य केली. तांत्रिक मुद्दे पुढे करून लस देणे टाळत असलेल्या प्रशासनाला प्रा.गायकवाड यांनी चांगलेच धारेवर धरले होते.
रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सर्व आरोग्य केंद्र आणि सर्वेक्षणाला नेमलेले शिक्षक, कोविड सेंटरवर, चेक पोस्ट, लसीकरण केंद्र या ठिकाणी शिक्षक आज फ्रंट लाइन वर्कर म्हणून काम करत आहेत. प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे शिक्षकांचे काही जिल्ह्यात बळी गेले आहेत. विमा कंपनी प्रत्यक्ष रुग्णांशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देते. मग शिक्षक या सर्व ठिकाणी काम करताना संपर्कात येत नाही काय, प्रत्यक्ष संपर्कात विमा लाभ मिळणार नाही का?. मग अशा प्रकारे बळी गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित करण्यात केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी हमी दिली जाते. लस देण्याबाबत सकारात्मकता दाखवली जाते, परंतु प्रत्यक्षात काम करत असताना मात्र सुरक्षिततेविषयी सोयी सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे शिक्षकांचा मृत्यू झाला आहे अश्या शिक्षकांच्या परिवाराला ५० लाख रुपये भरपाई द्यावी अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे गायकवाड यांनी केली आहे.

प्रशासन अधिकारी यांच्या सहकार्याने रेतीचोरी चौकशीची मागणी .

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट/,दि.११
अवैध रेतीवाहतुक तसेच रेतीचोरी प्रकरणी सततच्या बातम्या प्रकाशित होऊनही रेतीतस्कर आपला रेतीचोरिचा व्यवसाय बीनदिक्कतपणे करीत असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांपासून तर सर्वच अधिकारी अवैध रेतीव्यवसाय बंद करण्याचा दावा करीत असले तरीही लाखो रूपयांची चिरिमिरी मिळत असल्याने पोलिस यंत्रणा,परिवहन खाते तसेच महसुल खाते यांचे आशिर्वादाने रात्रीचे अंधारात हा रेतीचोरिचा खेळ अविरत सुरुच असल्याचे दिसुन येत आहे.
परवा दि.९ रोजी रात्री हिंगणघाट शहरात असाच एक प्रकार घडला.रात्री ८.३० चे दरम्यान शासकीय यंत्रणेने स्थानिक रेतीव्यापारी खियानी यांचा रेतीने भरलेला डंपर अडविला.
कारवाईसाठी सदर डंपर हिंगणघाट बस स्थानकाचे परिसरात आणला गेला.यावेळी शासकीय अधिकारी आपल्या वाहनासह तेथे पोचले,परंतु ४० हजार रूपयांची सरकारी खात्यात दक्षिणा चढ़विल्यावर सदर डंपर सोडण्यात आला.
सदर शासन अधिकाऱ्यांनी आपल्या सरंक्षणात रेती भरलेला डंपर तेथून पाठविल्यानंतर आपल्या शासकीय वाहनाने ते सुद्धा पसार झाले.अधिक माहिती घेतली असता डंपरमधे भरलेल्या जवळपास २५ टन रेतीची रॉयल्टी त्यांचेकड़े नव्हती.
झालेल्या प्रकाराची जोरदार चर्चा रेती व्यावसायिक वर्तुळात होत आहे

महाराष्ट्र प्ररेश असंघटीत कॉग्रेस कामगार कायदेविषयक सल्लागार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. नितिन चौधरी निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेस नियुक्ती कार्यक्रम आज दिनाक ११/६/२०२१ रोजी यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे हस्ते व योगेंद्रसिंग पाटील, बंटी भैय्या खान्देश काँग्रेस समन्वयक यांचे उपस्थित सोबत सौ मनीषाताई पाचपांडे प्रमुख उपस्थित खिरोदा येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम पार पडला यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व असंघटीत कामगार काँग्रेसचे राज्य अध्यक्ष मोहम्मद बदरू जमा यांचे सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कॉंग्रेस कामगारांची बैठक जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश भैय्या बारसे व कार्याध्यक्ष फय्याज हुसैन , प्रसन्न गुणवंतराव देशमुख जिल्हा समन्वयक व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख यांचे उपस्थितीत ॲड नितीन चौधरी यांची कायदेविषयक सल्लागार समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर ॲड. देवेंद्र आर बाविस्कर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर ॲड लोंढे यांची सचिवपदी तसेच कायदेशीर सल्लागार समिती वर, मदिना तडवी यांची अध्यक्ष यावल तालुका ,सौ प्रेरणा ताई भंगाळे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी व योगिताताई शुक्ला यांची जिल्हा उपाध्यक्षपदी उल्हास मुरलीधर नेमाडे, जगदीश धांडे यावल तालुका सचिव प्रशांत किरगे फैजपूर शहर मीडिया प्रमुख ,प्रदीप आदिवाल यांची जिल्हा समन्वयक रिक्षा चालक मालक प्रदीप मेढे यांची रावेर तालुका अध्यक्ष माथाडी कामगार, म्हणून अमीनाताई तडवी यांची जळगाव महानगर अध्यक्ष , असली रोष यांची भुसावळ तालुका समन्वयक ,हाफिज खान भुसावळ तालुका उपाध्यक्ष, मोहम्मद जावेद भाई भुसावळ, नईम हाजी यांची अध्यक्ष यावल शहर व्यापारी असोसिएशन व जुगल घारू यांची व्यापारी असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली
सोबत जळगाव चे प्रल्हाद सोनवणे , यावल चे समाजसेवक राजेन्द्र करांडे व रावेर चे दिलीप पंडित,लक्ष्मण भैय्या रल, राधेश्याम गुजराती, ( पहीलवान),हेमंत हसकर, गौरव जावरे, रोहित रल उपस्थित होते

चिमुकल्या मानव ने वाढदिवसनिमित्य केले किराणा वाटप

0

 

पातुरडा बु प्रतिनिधी

वाढदिवस म्हटले की केक,लहान मुलांची पार्टी,व इतर गोष्टी वर होणारा खर्च हे आपण प्रत्येक वाढदिवस मध्ये पाहतो मात्र पातुर्डा येथील माजी सरपंच निलेश चांडक यांचा मुलगा मानव निलेश चांडक या 5 वर्षीय मुलाने आपला वाढदिवसावर कोणताही अनाठायी खर्च न करता जे गरीब कुटुंब आहेत ज्यांना काम केल्यावरच 2 वेळच जेवण मिळते आशा काही कुटुंब ला आपल्या 5 व्या वाढदिवसानिमित्य किराणा सामान वाटप केले व कोणत्याही आपल्या मित्राला न बोलवता आपल्या परिवार मधील व्यक्ती सोबत गरीब कुटुंब ला वाटप केले मागील वर्षी ही मानव च्या वाढदिवस निमित्य सॅनिटायझर,मास्क व इतर कोरोना काळात लागणाऱ्या वरस्तू चा वाटप केला होता या विधायक कार्याची नागरीका कडून स्तुती होत आहे या वेळी मानव ची आजी,वडील,बहीन,भाऊ उपस्थित होते

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनादिवस ध्वजपुजन करून उत्साहात साजरा करण्यात आला

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस उत्साहाच्या वातावरणात पक्षातील विविध पदावर कार्यरत असलेल्या कार्यकर्ते व पदधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला .१० जुन१९९९ साली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्ष हा देशहीत , समाजहित व सर्व जाती धर्मांना बरोबर घेवुन चालणारा राष्ट्रवादी पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष असल्याची भावना यावेळी दिसुन आली , यावल तालुका येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या व्यापारी संकलनाच्या आवारात आज दिनांक १० जुन रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२वा स्थापन दिवस साजरा करण्यात आला , यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , राष्ट्रवादीचे नगर परिषदेतील नेतृत्व करणारे नगरसेवक अतुल पाटील , नगरसेवक अभीमन्यु विश्वनाथ चौधरी (हेन्द्री ) , नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राकेश कोलते ,डॉ . हेमन्त येवले, एस .पी . बोदडे, राष्ट्रवादी आदीवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष एम .बी . तडवी सर , कृषी उत्पन्न चे माजी संचालक दिनकर पाटील , युवक राष्ट्रवादीचे ॲड. देवकांत पाटील , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार , डॉ .जी .पी . पाटील , राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील , गिरधर काशिनाथ पाटील , गनी खान अफजल खान , वसंत पाटील , ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे , बापु जासुद, हितेश गजरे , मनोहर महाजन , दहीगावचे सरपंच अजय अडकमोल, कामराज घारू, अय्युब खान सर , द्वारकाबाई श्रीनिवास पाटील , सौ . शामल भावसार , सौ . उज्वला किरण , ॲड . निवृत्ती पाटील ,शांताराम पाटील , ललित पाटील , गणेश महाजन , एजाज देशमुख , श्रीराम सपकाळे , नरेन्द्र शिंदे , भरत पाटील यांच्यासह आदींनी उपस्थित राहुन राष्ट्रवादीच्या स्थापनदिनी पक्षध्वजाचे पुजन केले .दरम्यान या वेळी कोरोनाच्या संकटकाळात पक्षासाठी कार्य करणारे दुदैवीरित्या मरण पावलेल्या पक्षाच्या विविध पदधिकारी व कार्यकर्त्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली . याप्रसंगी पक्षाच्या स्थापन दिनानिमित्त उपस्थित राहीलेल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार प्रा . मुकेश येवले यांनी मानले .

किनगाव खुर्द येथे दलीत वस्तीत मंजुर निधीतुन इतस्त्र ठिकाणी काम, पीआरपीकडून चौकशीची मागणी

0

 

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

तालुक्यातील किनगाव खुर्द ग्रामपंचायती कडून दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजुर झालेल्या निधीतुन दलीत वस्ती सोडून दुसरी कडेचं कामे केली जात आहे अशी तक्रार पंचायत समिती कडे पीआरपी कडून करण्यात आली असुन कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे
येथील पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्या कडे पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे यावल तालुकाध्यक्ष राहुल बापू साळुके व जिल्हा उपाध्यक्ष रतन रमेश वानखेडे यांनी दिलेल्या निवेदना नुसार किनगाव खुर्द ता. यावल ग्रामपंचायती कडे सुमारे २० लाखांचा निधी हा दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत प्राप्त झाला आहे तेव्हा या निधीतुन दलीत वस्तीत विविध विकास कामे होणे आवश्यक होते मात्र, सदरची कामे ही फक्त कागदावरच असून प्रत्येक्षात जुन्या कामावर डागडूगी सुरु आहे. तसेच सदर काम दलीत वस्तीत न करता इतर ठिकाणी सुरू आहे. तेव्हा या कामांची त्वरित चौकशी होऊन काम थांबविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तेव्हा आठवड्याभरात चौकशी न केल्यास पंचायत समितीवर मोर्चा आणून जन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.-पुर्ण—फोटो आहे

उसरा परिसरात हरिणांचा हैदोस कपाशीचे कोवळे पिक फस्त शेतकरी त्रस्त वनविभागाने बंदोबस्त करण्याची गरज

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा:-_

सूनगाव परिसरातील उसरा शेतशिवारात वन्यप्राण्यांनी हौदोस सुरू केल्यामुळे हरीण व रोही नुकतीच लागवड केलेल्या कपाशी पीक फस्त करीत आहे त्यामुळे उसरा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहरींना पाणी कमी असल्याने सदर शेतकऱ्यांनी 12 ते 15 दिवसापुर्वीच ठिबकच्या साहय्याने कपाशीची लागवड केली आहे परंतू कपाशीचे जमिनिवर आलेले कोवळे पिकांसह ईतरही भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी कमालीचे संकटात सापडून गेले आहेत.अद्यापही पाऊसाचा पत्ताच नाही पेरलेल्या कपाशींच्या पिकांना ठिबक च्या सहाय्याने कसे -बसे रात्री -बेरात्री विहरीत थोडेपार असलेले पाणी देवुन पिके शेतकरी वाचवित आहेत , कोवळी कपाशीची रोपे जमिनीवर येताच माकडांसह हरिण व रानडुकरे रातभरातून कोवळ्या कपाशीचे शेंडेच खूरतडून फस्त करीत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त होवून गेले असून शेतकऱ्यांसमोर आता हे वन्यप्राण्यांचे संकट उभे ठाकले आहे सातपुडा पर्वतातून हरीणांसह रोही रानडुकरांच्या कळपांनी आपला मोर्चा शेतातील पिकांकडे वळविला असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान कमी करण्याकरीता शेतकरी बूजगावने व ईतर पारंपारिक उपाय करीत परंतू गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेत जंगलात वन्यप्राण्यांची संख्या जास्त प्रमानात वाढत असल्याने शेतातील पिकांचे नुकसानीचे प्रमाणही वाढले आहे. शेतात २५ ते ३० हरणांचे कळप कपाशीचे पिकात घुसून कपाशीचे उभे पिक फस्त करीत आहे या मुळे शेतकऱ्यांना नव्याने पुन्हा कपाशी पिकाची लागवड करावी लागत आहे आतातरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शिवारातील हरीण रोही रानडुकरांचे कळपांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी उसरा परिसरातील। शेतकरी करीत आहेत.

फुले वार्ड येथील गांजा विक्रेत्यावर पोलिसांची धाड़

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट/दि.९
शहरात अवैध दारुसह आता अंमली पदार्थाचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असून या अंमली पदार्थाचा छुपा व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांवर हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धाड़ घालून तब्बल ४.७३० किलोग्रॅम गांजा हस्तगत करीत आरोपीला अटक केली.
सदर अंमली पदार्थ(गांजा) ७० हजार ९५० रूपये किंमतीचा असून या प्रकरणी स्थानिक महात्मा फुले वार्ड येथील विजय उर्फ बावा माणिक कोथरे(४०) या आरोपीस काल दि.८ रोजी अटक केली असून मुख्य फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
सदर कारवाई एन.डी.पी.एस.कायद्यान्वये करण्यात आली.
सदर प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन आरोपीचे निवासस्थानी एका प्लास्टीक पोत्यामध्ये ४.७३० किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.
सदरचा गांजा हा फुले वार्ड येथील फरार आरोपी राकेश सिद्धार्थ जनबंधु याचा असल्याचे अटकेतील आरोपी बावा याने सांगितले.
सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत अपराध क्रमांक
५०५/२०२२ कलम २० (ब) २९ एन.डी.पी.एस.कायदयान्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद
करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि प्रशांत पाटणकर हे करीत आहे.
सदरची कामगीरी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत पाटणकर, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर, विरेन्द्र कांबळे, संदिप बदकी यांनी केली आहे.

आमदार राजेशजी एकड़े व मान्यवरांच्यां उपस्थिती मधे रुग्णवाहिका रुग्ण सेवेत दाखल

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी राज्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये याची दखल घेत जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती त्या अनुषंगाने नांदुरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड यांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध झाली असून नांदुरा शहरात दाखल देखील झाली आहे.सदर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते आज संपन्न झाला सदर रुग्णवाहिका रुग्णांसाठी देवदूत म्हणून काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.वसंतराव भोजने नांदुरा पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनिताताई डीवरे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,युवा सेनेचे श्री.ईश्वर पांडव,नायब तहसीलदार श्री.संजय मार्कंड, डॉ.अभिलाष खंडारे, डॉ.खोद्रे, डॉ.जैस्वाल, डॉ.घाटे,,डॉ.पायल पाटील,विजय पायघन, दादागावचे सरपंच श्री.गणेशराव काटे प्रामुख्याने उपस्थित होते.