Home Blog Page 466

पाणी टँकर वाटप वरून भाजप नगराध्यक्ष करत आहे पक्षपात नगरसेविका सौ.सीमा मेश्राम यांचा आरोप ?

0

 

सचिन वाघे वर्धा
17.5.21
हिंगणघाट :- प्रभाग क्रमांक 6 ( अ ) या भागातील परिसरातील भीषण पाणी टंचाई पाण्याच्या टँकरची मागणी बद्दल वारंवार नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांना सांगून सुद्धा कोणतेही सहकार्य केले नाही प्रज्ञा नगर, आदर्श नगर ,संत कृपा नगर ,साई नगर ,निखाडे भवन, गजानन नगर, या भागात भीषण पाणी टंचाई असून विहीर आटले आहेत येथील नागरिकांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागते या भागात नळ कनेक्शन जोडलेले नाही नगरपालिके द्वारे टॅंकरने पाणीपुरवठा होत नाही नगराध्यक्षांचे म्हणण्यानुसार कोरोना असल्याने एसडीएम यांच्या आदेशाने त्यामुळे पाणी देता येत नाही अशा परिस्थितीत येथील नागरिकांनी जगावे तरी कसे ? या बाबतीत जातीने लक्ष देऊन नळ कनेक्शन सुरू करावे किंवा टॅंकरने या भागात पाणीपुरवठा करावा जेणेकरून या उन्हाळ्यात नागरिकांना जीवन जगणे सुसह्य होईल सौ सीमा श्रीकृष्ण मेश्राम(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेविका) यांनी मा.मुख्याधिकारी यांना पत्र तसेच जनतेच्या समस्या विषयी नगर अध्यक्षाचा पक्षपात निदर्शनास आणून दिला

मराठा मुस्लिम व धनगर आरक्षण द्या अन्यथा तिव्र आंदोलन करू पीआरपीचे महामंत्री जगनभाई सोनवणे. यांची मागणी

0

 

यावल तालुका( प्रतिनिधी)विकी वानखेडे

मराठा मुस्लिम व धनगर समाला आरक्षण मिळावे यासाठी किनगाव येथे पीआरपी व संविधान आर्मीसह विविध संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी जगन सोनवणे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचीका दाखल करावी, मोदी सरकारने संसदेत कायदा पारीत करून केंद्र सरकारने राष्ट्रपती महामहिमांच्या स्वाक्षरीने मराठा समाजाला न्याय द्यावा. मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला ही आरक्षण द्यावे. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेवर बंदी घालावी. कारण अभिनेत्री बबिताने मेहतर समाजाचा जातीवाचक व खालच्या पातळीवर जाऊन आपमान केल्याप्रकरणी ॲस्ट्रासीटीचा गुन्हा दाखल करावा.
कोळी समाजाला जाती प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे या मागण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह मुंबईला सुद्धा लॉकडाऊन उठल्यावर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी घोषणा नेते जगनभाई सोनवणे यांनी केली. यावेळी पीआरपीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश बग्गन, यावल तालुकाप्रमुख राहुल साळुंके, पी.आर.पी.जिल्हाउपाध्यक्ष रतन वानखेडे, युवा तालुकाध्यक्ष नाना साळुंके, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह  किनगाव खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य बबलु कोळी, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाप्रमुख हरीष सुरवाडे, किनगाव खुर्दचे सरपंच भुषण नंदन पाटील, किनगाव बुद्रुकचे सरपंचपती संजय पाटील, उपसरपंच अनिल रामराव पाटील, संविधान आर्मीचे रावेर तालुका प्रमुख चंदु भागेस्वर,  माजी ग्रामपंचायत सदस्य मुकेश साळवे, अनिल भोई, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थीत होते.

यावल येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभेतील लोकप्रिय खासदार स्व . राजीव सातव यांना भावपुर्ण श्रद्धांजली

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

स्व . राजीव सातव यांच्या रुपात देशातील युवकांना प्रेरित करणारी संस्था आज आपल्यातुन हरपली असुन , पक्षात कधी ही भरून न निघणारी ही क्षती असल्याचे मनोगत व्यक्त करून स्व . सातव यांना शोकसंदेश देवुन आज काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली . यावल येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात आज सकाळी १०वाजता कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेतील अत्यंत लोकप्रिय व सर्वांना प्रिय असे खासदार व उत्कृष्ट संसदरत्न स्वर्गीय राजीव सातव यांचे काल पुणे येथे उपचार सुरू असतांना दुखद : निधन झाले , आज सकाळी त्यांच्या कळमनुरी जिल्हा हिंगोली गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले , त्यांच्या या आकाली निधनाने संपुर्ण काँग्रेस पक्ष परिवार दुखाच्या संकटात बुडाला असुन , यावल येथे त्यांना आज काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे व इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष कदीर खान , पुंडलीक बारी , अनिल जंजाळे , समाधान सोनवणे , नईम शेख , सकलेन शेख , उस्मान खान यांच्यासह आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित स्व .सातव यांना भावपुर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली . यावेळी प्रभाकर अप्पा सोनवणे व भगतसिंग पाटील यांनी स्वर्गीय राजीव सातव यांनी केलेल्या सामाजीक व राजकीय जिवन पटलावरील त्यांच्या उल्लेखनिय कार्यांचा गौरव करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .

देशात झालेत्या पेट्रोल डिझेल व रासायनिक खतांची वाढ कमी करणात यावी यासाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेस वतीने निवेदन देण्यात आले आहे

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

केंद्र सरकार वाढविलेले इंधनाचे दर आणि रासायनिक खातांचे दर हे सर्वसामान्‍य नागरीकांचे व शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यासारखे झाले आहे. यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना निवेदन देवून इंधनदरवाढीचा निषेध व्यक्त केला आहे.
निवेदन देतांना याची उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.देवकांत पाटील, यावल शहराध्यक्ष हितेंद्र गजरे, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, समन्वयक  किशोर माळी, शहर उपाअध्यक्ष वीरेंद्रशिंह सिसोदिया, सचिव भूषण खैरे, तालुका संघटक भूषण नेमाडे, सद्दाम शेख आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात या केल्या आहेत मागण्या :
रासायनिक खतांच्या किंमतीत जी दरवाढ झाली आहे, ती कमी करावी. देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी.
यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रातीलभाजपा सरकारचा जाहीर निषेध नोंदवत आहोत. यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्कत्र शेतकरी बांधवांकडुन पेरणीपूर्व शेतमशागतीच्या कामांना गती देण्यात आली आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या बी- बियाणे, खतांसाठीच्या आर्थिक बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तयारी केली जात आहे. परंतु केंद्रशासनाकडून रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात व येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे.
तसेच गेल्या वर्षांपासून कोरोना प्रादूर्भाव त्याचप्रमाणे खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान होऊन ही उत्पादनात घट आली आहे. शिवाय शेत मालाला योग्य भाव न मिळल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्याच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. परंतु यंदाचा खरीप हंगाम तोंडावर असतांनाच खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किंमतीत मोठी दरवाढ केली असून बियाण्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे खते व बियाण्यांच्या विक्रीत, किंमतीत, पुरवठ्यात मोठा काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी.
त्याचप्रमाणे देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ ही सुद्धा कमी करण्यात यावी.
अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे .

रुधानातील तरुणाला यू-ट्यूबचा सिल्व्हर अवार्ड

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

संग्रामपूर गावातील अतुल रामदास भोपळे
या युवकाच्या चॅनलला यूट्यूब कडून सिल्व्हर अवार्ड मिळाला, त्याबद्दल सोशल मीडियावर हजारो लोकांनी
शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन व्यक्त केले. समाज माध्यमात वेगळ्या पद्धतीने यश मिळवून त्यात करिअर करणारा
अतुल हा संग्रामपूर जिल्ह्यातील सिल्वर
अवार्ड चा मानकरी ठरला आहे. पुरंदर नाही, त्यासाठी सातत्याने काम करावे तालुक्यातील रुधाना या गावात राहणाऱ्या लागते. वेळ हा द्यावा लागतो. त्यांनी अतुल भोपळे bsc ची ध्यास आणि स्मार्ट वर्क करून २०२०
पदवी मिळवलेली आहे.

याच्या जोरावर मध्ये काम सुरु केले.
नोकरीही केली. परंतु खाजगी ठिकाणी सतत अकरा महिने युट्युब चॅनलचे काम काम करत असताना खूप संकटांना केले. ऑनलाईन माहिती घेण्यासाठी सामोरे जावे लागले. एवढे शिक्षण घेऊन त्याच्या चॅनलला एक लाखापेक्षा जास्त
संग्रामपूर सारख्या शहरा मध्ये दहा ते पंधरा लोक जोडली गेली आहेत. हजारात काय होणार? म्हणून नोकरी कोणतीही ऑनलाईन माहिती हि हक्काची सोडून घरी येऊन युट्युब चॅनल आणि असते, हा त्याचा उद्देश असून त्यांनी
वेबसाईट, ब्लॉग्स सुरु केले.

भरपूर प्रकारची ऑनलाईन माहिती
प्रत्येक गोष्ट लगेच तात्काळ प्राप्त होत युट्युब वर व्हिडीओ तयार करून लोकांपर्यंत पोचवली. खूप लोकांना अगदी घरी बसून देखील तुम्ही विदेशी एखाद्या योजनेची किंवा कोणतीही
कंपन्यांसाठी काम करू शकता. तुम्हाला
ऑनलाईन माहिती घेण्यासाठी अडचण लिखाणाची आवड असेल तर ब्लॉग येत असते, अशी सर्व माहिती लोकांना निर्माण करून पैसे कमवू शकता किंवा
मोफत त्यांच्या आम्ही शेतकरी या युट्युब तुमच्यामध्ये विविध कला असेल तर चॅनल वर दिली आहे. त्यामुळे लोक युट्युबवर दाखवून जगासमोर मांडू जागरूक झाले आणि त्यांच्या युट्युब शकता. समाजमाध्यमांद्वारे कमाई सुद्धा
चॅनलला लोक जोडले गेले. त्यामुळे करू शकता, त्यात करिअर करून तुम्ही
एक लाख सबस्क्रायबर झाले. युट्युब ने पूर्णपणे सेटल होऊ शकता. कारण
अमेरिकेहून, दुबई मध्ये नंतर थेट पुणे- जगावर संकट आले तरी सर्व काही
रुधाना गावात त्यांना युट्युबचा ऑनलाईन चालूच असते असे
अतुल
सिल्वर बटन अवार्ड हा पाठवण्यात भोपळे यांचे म्हणने आहे.
आला. हेच काम सध्या कोरोनाच्या शेवटी अतुल बेरोजगारांना तसेच,
महामारीत घरी बसून युट्युवचे काम तरुणांना किंवा ज्यांच्याकडे वेळ शिल्लक
करतात आणि युट्युब कडून शुभमला असतो त्यांना सांगतो कि, तुम्ही वेळ
प्रत्येक महिन्याला पगार सुद्धा मिळत वाया न घालवता तो चांगल्या गोष्टींसाठी
आहे.
वापरवा व आपली एक वेगळी ओळख
(आजच्या डिजिटल युगामध्ये करिअरच्या निर्माण करावी. तेव्हाच आपला महाराष्ट्र
अनेक संधी.) आज ऑनलाईनच्या बेरोजगारीतून बाहेर पडेल. यातूनच
जगामध्ये मध्ये निर्माण झालेल्या आहेत. सुशिक्षित बेरोजगार ही संकल्पना समूळ
इंटरनेटमुळे सर्व जग जोडले गेले आहे. नष्ट होण्यास मदत होईल.

म्युकर मायक्रोसिस साठी लागणारे इंजेक्शन सरकारने तातडीने उपलब्ध करून द्यावे आमदार समीर कुणावार

0

 

सचिन वाघे वर्धा

16.5.21
हिंगणघाट
सध्या सुरू असलेल्या कोरोणाच्या महामारी नंतर उदभवणाऱ्या पोस्ट कोविड हा जो रोग आहे कोरोणा नंतरचा या रोगाचे प्रमाण पूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि देशामध्ये सुरु आहे.
आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा हे म्युकर मायक्रोसिसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोणाच्या नंतर आता आढळून आलेले आहे. या रुग्णांनमुळे आताच काही दिवसापूर्वी हिंगणघाट तालुक्यातील टेंभा गावातील उपसरपंच श्री. नागाजी ढगे यांचे निधन सुद्धा या म्युकर मायक्रोसिस मुळे झालेले आहे. आणि आता सुद्धा एक नवीन पेशंट हिंगणघाट मध्ये म्युकर मायक्रोसिस चा रुग्ण समोर आला असून त्याला सुद्धा इंजेक्शनची गरज आहे तो सावांगी (मेघे) रुग्णालय येथे भरती आहे.
तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक पेशंट सावंगी (मेघे) आणि सेवाग्राम ला म्युकर मायक्रोसिसचे भरती असून अजून पर्यंत शासनानी ऑक्‍सिजनचा साठा उपलब्ध करून दिला नाही. यासंदर्भात आमदार समीर कुणावार यांनी आज मा. सुधीरजी मुनगंटीवार आणि विरोधी पक्ष नेता मा. देवेंद्रजी फडणवीस व जिल्हाधिकारी महोदया यांच्याशी सुद्धा चर्चा केली की तातडीने इंजेक्शन चा साठा शासनाकडून मागणी करा. यासंदर्भात वर्धा जिल्ह्यात म्युकर मायक्रोसिसची वाढती रुग्ण संख्या बघता येथे औषधीचा साठा उपलब्ध नसून तातडीने इंजेक्शन साठा उपलब्ध करून देण्यात यावा तसेच म्युकर मायक्रोसिस या रोगासाठी लागणारा दोन लक्ष रुपयांचा खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मंजूर करण्यात यावा व या रोगांचा महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये समावेशन करून तसा जी.आर. (GR) काढण्यात यावा अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे, तसेच पालकमंत्री मा. सुनील जी केदार यांना पत्र देऊन इंजेक्शनची मागणी केली आहे की तातडीने वर्धा जिल्ह्याला म्युकर मायक्रोसिसचे इंजेक्शन उपलब्ध करून द्या. व शासनाने घोषणा केली आहे परंतु अजून पर्यंत इंजेक्शन साठा वर्धा जिल्ह्याचा उपलब्ध झाला नसून त्यामुळे अनेक रुग्णांचे मरण समोर येत आहे. तरी तातडीने म्युकर मायक्रोसिस या रोगावर दखल घेण्याची गरज आहे.
पालकमंत्री मा. सुनीलजी केदार यांनी सुद्धा लक्ष घालण्याची गरज असून भरपूर प्रमाणात म्युकर मायक्रोसिस चे पेशंट आढळले असून अजून पर्यंत इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तरी पालकमंत्री महोदयांनी याच्या मध्ये हस्तक्षेप करून म्युकर मायक्रोसिसचे तातडीने इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी आमदार समीर कुणावर यांनी सर्वांना विनंती केली आहे.
तसेच अजून पर्यंत राज्याने वर्धा जिल्ह्याचा ऑक्सिजन कोठा वाढवून देण्याबाबतची मागणी केली होती तसेच वर्धा जिल्ह्याला मिळणार ऑक्‍सिजनचा साठा यांचा जो कोठा आहे १६ टन हा वाढवून देण्याची सुद्धा आमदार समीर कुणावार यांनी वारंवार मागणी राज्य सरकारला केली व केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेबांना सुद्धा केली परंतु अजून पर्यंत मा. मुख्यमंत्री साहेब, मा. राजेशजी टोपे साहेब तसेच पालकमंत्री मा. सुनीलजी केदार साहेबांनी यांच्यामध्ये हस्तक्षेप करावा हा वर्धा जिल्ह्यामधील ऑक्सिजनचा कोठा तातडीने वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावे कारण हा ऑक्सिजनचा कोठा कमी असल्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तरी यांची मागणी वारंवार करून सुद्धा याची दखल घेत नाही त्याबद्दल आश्चर्य वाटत आहे तरी म्युकर मायक्रोसिस साठी लागणारे इंजेक्शन राज्य सरकारने तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी सदर पत्राद्वारे केली .*म्युकर मायक्रोसिस साठी लागणारे इंजेक्शन सरकारने तातडीने उपलब्ध करून द्यावी..*
*आमदार समीर कुणावार

हिंगणघाट
16.5.21
सध्या सुरू असलेल्या कोरोणाच्या महामारी नंतर उदभवणाऱ्या पोस्ट कोविड हा जो रोग आहे कोरोणा नंतरचा या रोगाचे प्रमाण पूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि देशामध्ये सुरु आहे.
आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा हे म्युकर मायक्रोसिसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोणाच्या नंतर आता आढळून आलेले आहे. या रुग्णांनमुळे आताच काही दिवसापूर्वी हिंगणघाट तालुक्यातील टेंभा गावातील उपसरपंच श्री. नागाजी ढगे यांचे निधन सुद्धा या म्युकर मायक्रोसिस मुळे झालेले आहे. आणि आता सुद्धा एक नवीन पेशंट हिंगणघाट मध्ये म्युकर मायक्रोसिस चा रुग्ण समोर आला असून त्याला सुद्धा इंजेक्शनची गरज आहे तो सावांगी (मेघे) रुग्णालय येथे भरती आहे.
तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक पेशंट सावंगी (मेघे) आणि सेवाग्राम ला म्युकर मायक्रोसिसचे भरती असून अजून पर्यंत शासनानी ऑक्‍सिजनचा साठा उपलब्ध करून दिला नाही. यासंदर्भात आमदार समीर कुणावार यांनी आज मा. सुधीरजी मुनगंटीवार आणि विरोधी पक्ष नेता मा. देवेंद्रजी फडणवीस व जिल्हाधिकारी महोदया यांच्याशी सुद्धा चर्चा केली की तातडीने इंजेक्शन चा साठा शासनाकडून मागणी करा. यासंदर्भात वर्धा जिल्ह्यात म्युकर मायक्रोसिसची वाढती रुग्ण संख्या बघता येथे औषधीचा साठा उपलब्ध नसून तातडीने इंजेक्शन साठा उपलब्ध करून देण्यात यावा तसेच म्युकर मायक्रोसिस या रोगासाठी लागणारा दोन लक्ष रुपयांचा खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मंजूर करण्यात यावा व या रोगांचा महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये समावेशन करून तसा जी.आर. (GR) काढण्यात यावा अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे, तसेच पालकमंत्री मा. सुनील जी केदार यांना पत्र देऊन इंजेक्शनची मागणी केली आहे की तातडीने वर्धा जिल्ह्याला म्युकर मायक्रोसिसचे इंजेक्शन उपलब्ध करून द्या. व शासनाने घोषणा केली आहे परंतु अजून पर्यंत इंजेक्शन साठा वर्धा जिल्ह्याचा उपलब्ध झाला नसून त्यामुळे अनेक रुग्णांचे मरण समोर येत आहे. तरी तातडीने म्युकर मायक्रोसिस या रोगावर दखल घेण्याची गरज आहे.
पालकमंत्री मा. सुनीलजी केदार यांनी सुद्धा लक्ष घालण्याची गरज असून भरपूर प्रमाणात म्युकर मायक्रोसिस चे पेशंट आढळले असून अजून पर्यंत इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तरी पालकमंत्री महोदयांनी याच्या मध्ये हस्तक्षेप करून म्युकर मायक्रोसिसचे तातडीने इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी आमदार समीर कुणावर यांनी सर्वांना विनंती केली आहे.
तसेच अजून पर्यंत राज्याने वर्धा जिल्ह्याचा ऑक्सिजन कोठा वाढवून देण्याबाबतची मागणी केली होती तसेच वर्धा जिल्ह्याला मिळणार ऑक्‍सिजनचा साठा यांचा जो कोठा आहे १६ टन हा वाढवून देण्याची सुद्धा आमदार समीर कुणावार यांनी वारंवार मागणी राज्य सरकारला केली व केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेबांना सुद्धा केली परंतु अजून पर्यंत मा. मुख्यमंत्री साहेब, मा. राजेशजी टोपे साहेब तसेच पालकमंत्री मा. सुनीलजी केदार साहेबांनी यांच्यामध्ये हस्तक्षेप करावा हा वर्धा जिल्ह्यामधील ऑक्सिजनचा कोठा तातडीने वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावे कारण हा ऑक्सिजनचा कोठा कमी असल्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तरी यांची मागणी वारंवार करून सुद्धा याची दखल घेत नाही त्याबद्दल आश्चर्य वाटत आहे तरी म्युकर मायक्रोसिस साठी लागणारे इंजेक्शन राज्य सरकारने तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी सदर पत्राद्वारे केली.

म्युकरमायक्रोसिस या आजाराच्या लढाईशी लढण्याला आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे. विदर्भ विकास आघाडीचे संस्थापक अनिल जवादे यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

15.5.21
(हिंगणघाट)
जीवघेण्या कोरोणा संसर्गाशी नागरीक संघर्ष करीत असतांनाच कोरोणाचा संसर्ग झालेल्यांना आणि त्यातून मुक्त झालेल्या रूग्णांना म्युकरमायक्रोसिस(काळी बुरशी) या आजाराची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.प्रत्येक जिल्ह्यात या आजाराचे रूग्ण आढळून यायला लागलेले आहेत.हा रोग अतिजलद पसरणारा रोग असून तो मुख्यता नाक,डोळे आणि मेंदू ह्यांना बाधीत करीत असतो .हा आजार कॕन्सर पेक्षाही भयानक असून या आजारावर वेळीच उपचार झाले नाही तर रूग्णांना डोळे ,दृष्टी व प्राणही गममावा लागू शकतो .त्यामुळे आरोग्य यंत्रणेने वेळीच सतर्क होऊन या आजाराविषयीची नागरीकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे.तसेच कोरोणा झालेल्या आणि त्यातून बरे झालेल्या रूग्णांसाठी उपजिल्हा रूग्णालयात स्वतंत्र पोस्ट कोव्हीड ओपीडी सुरू करावी.बुररशीरोधक इंजेक्शनची अगोदरच व्यवस्था करून ठेवावी. वेळीच रूग्णाला हे इंजेक्शन दिल्या गेले तर त्यावरील शस्रक्रीया व पुढचा अनर्थ टळू शकतो.सध्या या रूग्णाचे प्रमाण कमी दिसत असले तरी त्याचा प्रसार जर जलदगतीने झाला तर मृत्यूचे थैमान माजेल म्हणूनच आरोग्य यंत्रणेने वेळीच जागृत होऊन या आजारावरील उपचाराची अगोदरच व्यवस्था करून ठेवावी अशी मागणी विदर्भ विकास आघाडीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल जवादे यांनी केले आहे.

यावल शहरातील लॉक डाऊनच्या काळात मुख्य बाजारपेठेतील एक कापड दुकान सुरू असल्याने ग्राहकासह दुकानदारास पोलीसांनी ठोकवला पाच हजाराचा दंड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कोरोना विषाणु संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व जळगाव जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊनचे निर्बंध लावल्याने या काळात जिल्हाधिकारी यांनी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आदेश दिले असुन या नियमावलीनुसार किराणा व आदी व्यवसायीकांसाठी सकाळी ७ते ११ वाजे पर्यंत नागरीकांसाठी जिवनावश्यक वस्तुची आपली दुकाने सुरू ठेवावी अशा सुचना देण्यात आल्या असुन , या सुचनांचे काही रेडीमेड कापड विक्रेते व आदी अनावश्यक व्यापारी आपली दुकाने बाहेरून बंद करून आतुन सुरू ठेवुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत असुन असाच एक प्रकार आज यावल शहरातील मेन रोड वरील मुख्य बाजार पेठेतील एका कापड दुकानात घडला आहे .
जीवणावश्यक वस्तुच्या दुकानांसहअन्य दुकानानां परवानगी नाही शनिवारी सकाळी येथील मुख्य रस्त्यावरील रुपकला साडी सेंटरच्या दुकानाचे शटर बाहेरून बंद तर आतून दुकानदारी सुरूअसल्याचे पोलीसांना माहित पडल्यावरून पोलीसांनी दुकानात प्रवेश केला असता सुमारे २५-३० ग्राहकांना खरेदी करतांना पाहुन पोलीस अचंबीत झाले. यावेळी पोलीसांनी दुकानदारासह २५ जणांना
प्रत्येकी दोनशे रुपये दंडाप्रमाणे पाच हजार रुपयाचा पोलीसांनी दंड वसुल
केला आहे. मात्र अनेक ठीकाणी अशा घटनांमध्ये व्यवसायीकांची दुकाने ही सिल केली जाते इथं मात्र तसे झाले नसल्याचे दिसुन आले असुन पोलीसांनी केलेली ही अर्धवट कार्यवाही तर नाही न ? असा प्रश्न यावल शहरात नागरीकांकडून उपस्थित करण्यात येत आहे

तरोडा बु.शेतशिवारात 10 हरीण मृतावस्थेत आढळले.जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील घटना…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील वन परिक्षेत्रातील तरोडा बुद्रुक येथील शेत शिवारामध्ये काही हरिण काळवीट मृतावस्थेत पडलेली असल्याची माहिती जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळाल्यावरून आज सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे ६ काळवीट मादी व ४ नर जातीचे हरीण मृतावस्थेत आढळून आले. शेगाव, जळगाव जामोद या तालुक्यात हरिणांचा वावर असून या तालुक्यांमध्ये जंगल (बंदी) असल्याने प्राण्यांची संख्या जास्त आहे. यामुळे या परिसरात शिकाऱ्यांचाही वावर आहे. यामध्ये शनिवारी जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील हरणांचे मृतदेह पडून असल्याचे समजताच वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता सदर शिवारातून ६ काळवीट मादी जातीचे आणि ४ नर जातीचे हरिण मृतावस्थेत मिळून आले. सदर प्राण्यांचे शव गोळा करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सदर हरणांचा शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदर प्राण्यांचे पोस्टमार्टम केल्यानंतर शरीराचे भाग गोळा करून सदर नमुने सीलबंद करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली..हरिणांचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला याचा शोध घेतल्या जात आहे. हरिणांवर विष प्रयोग करण्यात आलेला असून सदर घटनेला स्थानिक वनपाल दंडे जबाबदार असून त्याचे विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेचे नेते गजानन वाघ यांनी केली आहे.

साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या प्रसिद्ध असलेली भेंडवळची मांडणीचे भाकित जाहीर

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या भेंडवळ घटमांडणी ची परंपरा अखेर कायम राहिली आहे आधी हे घटमांडणी रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र अनेक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव व प्रशासनाच्या परवानगीने चार ते पाच जणांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन चे पालन करत पुंजाजी महाराज वाघ व शारंगधर महाराज वाघ यांनी काल अक्षय तृतीयेचे रात्री घटमांडणी करून आज सदर मांडणीचे भाकीत वर्तविले आहे
यानुसार यावर्षी पाऊस चांगला होणार असून पीक परिस्थिती साधारण राहणार आहे राजा हा कायम राहणार असला तरी अर्थव्यवस्था कोलमडलेलिच राहील माणसा सह पिकावर रोगराईच संकट येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताण तणाव असणार असून घुसखोरी वाढण्याची शक्यता आहे यावर्षी तुर हे सर्वात चांगले पीक असेल तर कापसाचे पीक कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील उडीद मुगाचे पीक साधारण असून नासाडी राहील हे तिळ तेलवान साधारण असून भावात तेजी राहिल भादली हे रोगराईचा प्रतीक असून या वर्षात रोगराईमुळे प्रमाण अधिक असेल लाख व वाटाणा हे पिके साधारण सर्वसाधारण असून गहू हरभरा करडी या वर्षात चांगले राहणार आहे

यावर्षी पाऊस
करव्या मध्ये भरपूर पाणी असल्यामुळे गेल्या जून महिन्यात साधारण दुसऱ्या जुलै महिन्यात चांगला पाऊस येत्या ऑगस्ट महिन्यात थोडा कमी व सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस असून पूरपरिस्थिती व पिकांची नासाडी राहणार असे भाकीत पुंजाजी महाराज वाघ व सहकारी शारंगधर महाराज वाघ यांनी यावेळेस जाहीर केले