Home Blog Page 468

ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या नविन उपकेंद्राचे इमारती वैद्यकीय अधिकारी विना बेवारस

0

 

हंसराज उके अमरावती

अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च करून ग्रामीण भागातील खेडेगावात नविन उपकेंद्राच्या इमारती उभ्या झालेल्या असुन गेले त्या उपकेंद्रामधे वैद्यकीय अधिकारी,स्टाॅप नर्स, व इतर कर्मचारी नसुन कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकां मधे
चर्चा होत आहे.आज कोरोणाच्या
काळात या उपकेंद्राच्या इमारती उपयोग काय ? असा प्रश्न जनसामान्य नागरिका पुढे उभा आहे.कोरोणा महामारिच्या जिव घेण्यात बिमारीत होत नसेल तर
या भव्यदिव्य बांधण्यात आलेल्या
उपकेंद्राच्या इमारतीचा उपयोगच
काय?अशी चर्चा जनसामान्य नागरिका मधे होत असल्याचे दिसुन येत आहे आज जर या उप केंद्रात जर आरोग्य योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आरोग्याला पोषक योजनेचा लाभ घेता आला असता
तसे न होता ग्रामीण भागातील खेडेगावातील सर्वसामान्य नागरिक हा शहरातील खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी जावं लागलं आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील पैसा या दवाखान्यात जातं आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अर्थीक प्रश्र्न उभा राहिला आहे व गेले दिड वर्षांपासून कोरोणा सारख्या महाभयंकर बिमारी मुळें रोजगार गेले शासन एकीकडे अनेक योजना राबविण्यात पण या मुठ योजना सर्वसामान्यांसाठी पर्यंत पोहोचत आहे की नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अर्थीक मदतीची आज तरी गरज आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला या आर्थिक योगदान होईल तरी शासनाने ग्रामीण भागात लक्ष देण्याची गरज आहे.

हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था न झाल्यास प्रहार पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा रुग्णमित्र गजू कुबडे यांचा इशारा

0

 

सचिन वाघे वर्धा

12.5.21
. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात 200 ऑक्सिजनयुक्त बेड्सची व्यवस्था वाढत्या कोविड रुग्ण संख्येमुळे करण्यात यावी जर या भागातील जनतेची ही न्यायोचित मागणी मान्य न झाल्यास प्रहारच्या स्टाईलने कोणत्याही क्षणी उग्र आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची असेल असा खणखणीत इशारा प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी दि 12 मेला जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
या बाबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना दिलेल्या निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दि.19 एप्रिल व 22 एप्रिलला २०० बेड्सच्या निर्मितीसाठी निवेदन सादर केले होते.निवेदनातून दिलेल्या इशाऱ्यानुसार श्री कुबडे यांनी दि 26 एप्रिलला कोविड संदर्भातील शासकीय नियमांचे पूर्ण पालन करून स्वतःच्या घराच्या छतावर बसून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाची सांगता करण्या पूर्वी सायंकाळी 6 वाजता येथील उपविभागीय अधिकारी श्री खंडाईत यांनी व्हिडीओ कॉल करून श्री कुबडे यांच्याशी चर्चा केली व या मागणी साठी थोडा अवधी देण्याची विनंती केली होती.त्यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून येथील ठाणेदार श्री संपतजी चव्हाण यांनी प्रत्यक्ष गजू कुबडे यांचे घरी येऊन उपोषण सोडविले होते.
वरिष्ठ अधिकारी यांच्या विनंतीनुसार त्यावेळी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.परंतु सदरची मागणी ही येथील सर्वहारा,गोरगरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे.त्यामुळे त्यांनी सातत्याने 200 बेड्सची मागणी लावून धरलेली आहे. याबाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन ही मागणी मंजूर करावी अशी श्री कुबडे यांनी कळकळीची विनंती आहे.
जर ही न्यायोचित मागणी येत्या आठ दिवसात मान्य न झाल्यास प्रहारच्या स्टाईलने कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला जिल्ह्यातील /तालुक्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींच्या घरा समोर तीव्र आंदोलन छेडील व त्याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे.सदर निवेदन देतेवेळी कुबडे यांचे सोबत प्रशांत आवारी,मोहन पेरकुंडे उपस्थित होते.

राज्यातील पत्रकारांना तातडीने लस देण्यात येण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

0

 

 

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे गरजेचे

अजहर शाह बुलढाणा

बुलढाणा:-राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 मे पासून ते 20 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक यांना प्राधान्यांने लस दिली आहे. त्याच पद्धतीने राज्यातील प्रत्येक घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांना देखील लस देण्यात यावी अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे….

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपुर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ त्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्स चा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांचे लसीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा….

महाराष्ट्राने कोरोनाच्या लढाईत अनेक महत्वाचे निर्णय घेत कोरोनाला अटकाव करण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहे. सततच्या वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या संख्सेत घट व्हावी यासाठी आपण लसीकरणावर जोर दिला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपण प्राधान्याने लस दिली तशीच आता पत्रकारांना देखील तातडीने लस देणे गरजेचे आहे. देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे त्यामुळे आपण देखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्याचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात यावी अशी विनंती देखील केली आहे.

बाळापुर तालुक्यातील लोहारा येथे पोलिसांचे पथसंचलन

0

 

:-बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे रमजान ईद निमित्त उरळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे रोजी पथसंचलन करण्यात आले

बालापुर तालुक्यातील लोहारा येथे रमजान ईद निमित्त मंगळवारी उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून पथसंचलन करण्यात आले ग्रामपंचायत पासून सुरू करण्यात आलेल्या पथसंचलन गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आले यावेळी उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार वडतकार यांनी देशावरील कोरोनाचे संकट पाहता रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोरे, बिट जमादार राजाभाऊ बचे,पो.हे.काॅ जे एस सिंगारे, पो. काॅ ज्ञानेश्वर फाळके, शैलेश घुंगे,मेहेंगे आदी उरळ पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते

सुर्या न्यूज महाराष्ट्र ब्युरो चिफ हिंम्मतराव तायडे लोहारा

गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायत अडपल्ली,कालीनगर येथील सन २०१६-२०२१ या वित्तीय वर्षातील ठक्कर बाप्पा योजनेच्या कामात भ्रष्टाचार- जिल्हाध्यक्ष प्रा अशोक लांजेवार यांची चौकशी करण्याची CEO कडे मागणी.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,नक्षल ग्रस्त, आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.हा जिल्हा अतिमागास असल्याने केंद्र व महाराष्ट्र शासनाने सन २०१६ ते २०२५ पर्यंत जिल्हा परीषदेच्या प्राप्त लेखाशिर्षाकानुसार ठक्कर बापा,बिआरजीएफ, मनरेगा, १३, १४, १५ व वित्त आयोग, नक्षल योजना जिल्हा वार्षिक योजना, २५१५३०५४ इत्यादी योजनेमध्ये करोडो रुपयेचा निधी प्राप्त झाला.मात्र मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली, कालीनगर या ग्राम पंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी यांनी सदर निधीच्या वापरात करोडो रुपयेचा भ्रष्टाचार करून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसविले व सदर निधीचा विल्लेवाट लावलेला आहे.या संपूर्ण कामात प्रचंड गैरव्यवहार तथा भ्रष्टाचार झालेला आहे.
चौकशी करताना सर्व योजनांच्या मोजमाप पुस्तिका मधील काम केलेल्या कामाचे स्तळ दर्शविलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष मोका चौकशी करून तसेच झालेल्या खर्चाची देयके आणि कामावर असलेल्या मजुराचे हजेरी पट तपासण्यात यावे अशी मागणी लेखी तक्रार जिल्हाध्यक्ष प्रा अशोक लांजेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. कामात गैरव्यवहार,भ्रष्टाचार झालेला असून एकाच कामाचे स्तळ अनेक योजनेमध्ये दाखवून शासकीय निधीचा परस्पर अपहर केलेला आहे. यामध्ये ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी,शाखा अभियंता जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.

उपजिल्हा रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने 8 महिन्याच्या गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू

0

 

सचिन वाघे वर्धा
11.5.21 हिंगणघाट:- वासी येथे राहणारी सौ रुपाली लहू पर्बत वय 20 वर्षे या 8 महिन्याच्या गरोदर विवाहित महिलेला पोटात दुःखत असल्या कारणाने अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आणले असता उपस्थित डॉक्टरांनी रुग्णालयांत सद्या कोविड रूग्ण असल्याने गायनिक वॉर्ड बंद असल्याचे सांगून खाजगी रुग्णालयांत जाण्यास सांगितले. या दरम्यान खाजगी रुग्णालयांत गेल्यानंतर त्यांना सेवाग्राम येथे जाण्याचा खाजगी डॉक्टरांनी सल्ला दिला. म्हणून पुन्हा रूपाली हिला उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले तेव्हा तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांने अर्धा तास थांबायला सांगितले दरम्यान ती बेशुद्ध पडली.ताबडतोब वैदयकीय उपचार न मिळाल्याने सादर महिलेचा मृत्यू झाला. सदर विवाहित महिलेचे मागच्या वर्षी लग्न झाले होते. वासी या ठिकाणी आठव्या महिन्यांपर्यतचा तिचा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र वासी येथे सुरू होता 9 महिना सुरू होणार आहे सोनोग्राफी करून घ्या या सूचनेनुसार हिंगणघाट येथे माहेरी पोहचवण्यात आले. घरी तिची प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला दवाखान्यात आणले होते . वरील गरोदर महिलेचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणावरून झाला हे मात्र समजू शकले नाही. मात्र सोमवारला शवविच्छेदन केल्यावर महिलेचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. योग्य उपचार मिळाला असता तर तिचे व बाळाचे प्राण वाचविता आले असते.
8 महिन्याच्या गरोदर महिलेचा याप्रकारे मृत्यू झाल्याने वाशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांनी वाशी येथे जाऊन सदर महिलेच्या सासरी भेट दिली असता तिच्या सासरच्यांनी सांगितले की ती हिंगणघाट ला तिच्या आईकडे सोनोग्राफी करिता गेली होती. वास्तविकता जाणून घेण्यासाठी अनिल जवादे आपल्या सहकाऱ्यांसोबत पुरपीडित कॉलनी शुक्रवार बाजार येथे पोहोचले परंतु मृतक मुलीची आई एकटीच घरी असल्याने व तब्येत बरोबर नसल्यामुळे ती नांदगाव येथील तिच्या बहिणीकडे होती. त्या ठिकाणी मृतक गरोदर महिलेच्या आईने सर्व आपबीती जवादे यांना सांगितली. मृत महिलेच्या आई जवळ पैसे नसल्याने मृत महिलेची मावशी ज्या मालकाकडे मोलकरीण म्हणून काम करत होती त्या मालकाला 5 हजार रुपये उसने मागून तिच्या बहीणलेकीचा इलाज करण्याचा प्रयत्न केला परंतु ती आपल्या बहिणी लेकीचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा जीव वाचवू शकली नाही .हिंगणघाट शहरात गरिबांना योग्य इलाज मिळू शकत नाही कोरोना च्या नावाखाली अशा गरीब गरोदर महिलांचे प्राण वाचवू शकत नसेल तर जिल्हा रुग्णालय प्रशासन शेवटी फक्त धनदांडग्या लोकांकरिता आहे की गरिबांचाही विचार प्रशासन करणार आहे की नाही असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील डॉक्टर यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की कोरोना मुळे दवाखाण्यातील इतर ओपीडी बंद करण्यात आलेल्या आहे त्यामुळे इतर आजराचे पेशंट घेणे बंद आहे. असा निर्णय कोणाच्या परवानगीने घेतला हे मात्र कळू शकले नाही. हा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घेतला की कोरोना महामारीमुळे सर्व अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. असा निर्णय घेताना इतर आजारी लोकांचा विचार का केल्या गेला नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या सर्व अव्यवस्थेचा हा दुसरा बळी आहे. याअगोदर सावंगी झाडे येथे तीन दिवस मरून राहलेल्या मायलेकी. आणि ही दुसरी घटना!

पाणी टंचाई हिंगणघाट नगर पालिका कोमात डाॅ उमेश वावरे यांनी केले पाण्याचे वाटप

0

 

सचिन वाघे वर्धा

कोविड19 मुळे सपूर्ण वर्धा जिल्हा लाॅकडाॅऊन करण्यात आला शासनाने नियम पाळून लोक आपला घरी राहून शासनाला सहकार्य करतय आहे हिंगणघाट शहरा अमृत योजना स्वरूपात शहरात खुप मोठं मोठा टाक्या बांदनात आला . हे सर्व असताना सुद्धा दर उन्हाळ्यात पाणी टंचाई चा सामना जनतेला करावा लागतो नगर परिषद ला बाब माहीत असून सुद्धा यावर काही उपाय योजना नगर पालिका शासन करत नाही हि बाब गंभीर असून यानच्या जत्रास फक्त जनतेला होते. हि बाब लक्षात येता आज वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानी जावून संत तुकडोजी वार्ड सरकारी दवाखान्याच्या मागे पाण्याचे वाटप केले .हे काम नगर पालिकेचे असून लवकरात लवकर पाण्याचे टाॅकर चालू करावे अन्यथा सर्व लोकांना घेवून नगर पालिका वर मडके फोड आदोलन करण्यात येईल.
त्या प्रसंगी. मनीष कांबळे .दिलिपभाऊ कहूरके. बन्सोड सर .देवेंद्र भालशंकर. व वार्डतील नागरिक उपस्थित होते..

एक हात मदतीचा उपक्रमान्तर्गत कोरोना रुग्णांना “शिक्षकांकडून” मायेची सावली.

0

 

चामोर्शी तालुक्यातील सात केंद्रावर ‘सावलीची’ व्यवस्था.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

चामोर्शी:भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अनेक ठिकाणी रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.रुग्णांना बेड,ऑक्सीजन,औषधी,एम्बुलंस मिळत नाही तर बऱ्याच लसिकरण केंद्रात लस उपलब्ध नाही तसेच सावलीची व्यवस्था सुद्धा नाही.लसीकरनाच्या ठिकाणी भर उन्हात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.
संपूर्ण देशभरात या कोरोना विरोधातील लढाई अत्यंत जिद्दीने लढली जात असून यामध्ये विविध घटक सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रकारची मदत करीत आहेत.यामध्ये चामोर्शी तालुक्यातील शिक्षकवृंदानेही पुढे येत या लढ्यात आपलाही सहकार्याचा हात असावा या दृष्टीने सोशल मीडिया द्वारे मदतीचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत चामोर्शी मध्ये कार्यरत शिक्षक,प्राध्यापक सोबतच तालुका व जिल्ह्याबाहेरील १९८ शिक्षक व इतर दात्यांनी सुद्धा या मदतीत अमूल्य अशी भर घातली.
एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत जमा झालेल्या निधीतुन सर्वानुमते ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे कायमस्वरूपी पत्र्याचा शेड बांधला.तसेच चामोर्शी तालुक्या अंतर्गत येणारे ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे लसिकरण केंद्रासमोर हिरवी नेट बांधून सावलीची व्यवस्था केली.लसीकरनाच्या वेळी सामान्य लोकांची आरोग्य केंद्रात गर्दी असल्याने भर उन्हात त्यांना तासनतास उभे रहावे लागत आहे.त्यामुळे चक्कर येणे,बीपी वाढने व इतर समस्या तयार होत होत्या.आता या कायमस्वरूपी शेड व हिरव्या नेट ची व्यवस्था शिक्षकांकडून केल्यामुळे जनतेकडून समाधान व्यक्त होत आहे.सदर उपक्रम राबविण्यासाठी प्रविण पोटवार, आशिष जयस्वाल,प्रदिप भुरसे, सुजित दास,माणिकचंद रामटेके,संतोष गुट्टे व सचिन गायधने या शिक्षकांनी पुढाकार घेतला.त्याचप्रमाणे या उपक्रमात युवा संकल्प संस्था भेंडाळा जि. गडचिरोली यांनी हिरिरीने सहभागी होऊन खूप मोलाचा हातभार लागला. त्यामध्ये युवा संकल्प संस्था चे अध्यक्ष राहुल वैरागडे उपाध्यक्ष चेतन कोकावार, सुबिर मिस्त्री,विशाल बंडावार, प्रशांत कुसराम, वैभव मंगर यांनी सहकार्य केले व पुढेही याप्रकारची मदत सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.
उत्तम संस्कारातून नवी पिढी घडविणा-या शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला आदर्श आपल्या मदतीच्या कृतीतून समाजासमोर ठेवला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्या बद्दल ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.लिला मदने,डॉ.शेषराव भैसारे,औषध निर्माण अधिकारी प्रतीक पुनप्रेड्डीवार,राजेश ढाले,उमेश राठोड,कुशल कवठेकर,चन्द्रकांत गव्हारे आणि समस्त रुग्णालयीन कर्मचारीच्या वतीने या महत्वाच्या सोयीबद्दल आभार मानले आहे.तसेच “एक हात मदतीचा” या समाजपयोगी प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सर्व स्वरावरून अभिनंदन केले जात आहे.

यावल शहरातुन रात्री ३ वाजेपासुन तरूणी झाली बेपत्ता आईने खबर दिल्याने पोलीसात हरविल्याची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारी तरूणी अचानक घरून निघुन घेल्याची घटना घडली असुन , तरूणीच्या आईने पोलीसात माहीती दिल्याने मुलगी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात तरूणीची आई सुंनदा मधुकर वाघ , वय ४२ वर्ष हिने यावल पोलीसात दिलेल्या खबर मध्ये सांगीतले आहे की , माझी मुलगी लक्ष्मी उर्फ गायत्री मधुकर वाघ वय २१ वर्ष राहणार शिवाजीनगर यावल ही दिनांक १oमे रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने लाईट बंद असल्याने मला जाग आली असता बघीतल्यावर ती त्याच्या जागेवर झोपलेली मिळुन आली नाही म्हणुन आम्ही तीस प्रथम घरातील शौचालय व आधी ठीकाणी शोधाशोध घेतली असता ती मिळुन आली नाही अखेर ती कुणाला काहीही एक न सांगता घरातुन निघुन गेल्याचे दिसुन आले असुन , याबाबत सुनंदा वाघ यांनी पोलीसात खबर दिल्याने लक्ष्मी उर्फ गायत्री वाघ ही २१ वर्षीय रंग सावळा, शरीर सळपातळ चेहरा गोल नाक सरळ जाड , केस काळे ,डोळे काळे तिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पिवळ्या रंगाची पँट वयाच रंगाची ओढणी परिधान केली असुन याबाबत ती हरवल्याची नोंद करण्यात आली असुन सदरची मुलगीही कुणास मिळुन आल्यास किंवा दिसुन आल्यास यावल जिल्हा जळगाव पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

पोलिसाच्या आतही असतो माणुसकीचा झरा ! पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा !! ..ना वाढदिवस ‘एनिवर्सरी ‘फक्त आणि फक्त ड्युटी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

पोलीस म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो तो खाकी वर्दीतला माणूस !कठोर शब्दात बोलणारा तर कधी प्रेमाने बोलणारा !

होय खाकी वर्दीतला लोकांचे रक्षण करणारा आपली ड्युटी तन-मन-धनाने करणारा म्हणजे पोलिस! . सद्रक्षणाय ..खलनिग्रहणाय ! हे ब्रीदवाक्य खाकी वर्दीतील प्रत्येक पोलिसांच्या अंगावरती असते !

म्हणजेच चांगल्या माणसाची तुम्ही रक्षण करावं !दृष्ट लोकांना शासन करा !

परंतु काही वेळेस चांगल्या लोकांना शासन होतं तर काही दृष्ट लोकांना ही शासन होतं .ही गोष्ट वेगळी !

पोलीस तपासामध्ये दोन्ही बाजूंचा सारासार तपास करून योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करण्याचे काम करत असतात !

परंतु एका बाजूने न्याय देताना दुसऱ्या बाजूच्या लोकांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागतो .
अनेक वेळा दारू अड्ड्यावर ती किंवा जुगार अड्ड्यावर छापा मारतांना त्यांना लोकांच्या किंवा अवैध धंदे वाल्याच्या सामना करावा लागतो .

पोलीस कसाही असला तरी शेवटी तो पोलीस असतो .आणि ते आहेत म्हणून
महिला सुरक्षित आहेत .

मागील भाग सोडला तर गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र पोलिसांचे अवलोकन केले तर घर दार आई – वडील ‘ मुले . पत्नी .यांना सोडून कोरोनाच्या संकट काळामध्ये लोकांनी विनाकारण बाहेर फिरू नये म्हणून त्यांना धाक दाखविण्यासाठी हातात दंडुका घेऊन ! कोरोना पासून लोकांनी वाचाव म्हणून भर उन्हातानात रस्त्यावर पोलिस दादा उभी असतात !

आणि विनाकारण फिरणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारणा केली असता त्यातही त्याचे वाहन लवकर सोडले नसता लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते !कोरोना संकट काळामध्ये गेल्या दीड वर्षापासून पोलीस आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे रक्षण करीत आहे !

त्यामध्ये अनेक पोलिस दादांचा धोरणामुळे लोकांचे रक्षण करत असताना कोरोना ची लागण होऊन आपला जीव गमवावा लागला आहे ।

आणि दररोज पोलीस लोकांचे रक्षण करत असताना उपचाराअभावी मृत्यू ची झुंज देत आहेत :

अनेक तरुण पोलिसांचे नुकतीच लग्न झालेली असते लहान मुलं घरी असतात म्हातारे आई वडील असतात ‘ पत्नी असते .या सर्वांना घरी सोडून मंत्री असतील खासदार असतील आमदार असेल कुठे भांडण झाले असेल अशा सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ला जात असतात .त्यांचे रक्षण करत असतात !

असाच एक प्रसंग काल सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी गावात सायंकाळी घडला !अरे निमित्त होते बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणेजी काही कामानिमित्त
सरपंच विनोद खरात यांच्या शेतामध्ये पाहणी करण्यासाठी आले होते !

पाहणी करत असताना एका ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी सोडवत असताना थोड्या अंतरावर त्यांच्या ताब्यातील पाच ते सहा पोलीस कर्मचारी साखरखेर्डा येथील दुय्यम ठाणेदार राणे साहेब व मी पत्रकार सचिन खंडारे ‘असे आम्ही चर्चा करत बसलो होतो ‘अशातच एका पोलीस कर्मचाऱ्याला छोट्या मुलीचा फोन आला ‘पप्पा आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे केक कधी आणताय !

हे शब्द ऐकून पोलिसांनी आपल्या छोट्या मुलीला गमतीशीर उत्तर दिले की बाळा मला घरी यायला रात्रीचे ११ वाजतील ‘आणि त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा लग्नाचा सहावा वाढदिवस होता ‘यावरूनच पोलीस कुठल्याही प्रकारचा सण-उत्सव साजरा करता त्यांना येत नाही नेहमीच लोकांच्या रक्षणासाठी ते बाहेर असतात ‘लोकांचे रक्षण करत असतात .आणि तेवढेच ते कठोर असतात तेवढे ते मनाने मवू सुद्धा असतात !
अर्धा तासा चर्चा केल्यानंतर मी तिथून घरी आलो ‘परंतु अजूनही माझ्या डोक्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलीचा फोन घुमत होता !

खरंच पोलिसांना घर .दार पत्नी .मुल सोडून इतरांचे रक्षणासाठी झटत असतात ‘ पोलिसांमुळेच सर्वसामान्य लोक आज लग्न साजरे करतात वाढदिवस साजर करतात ‘आमदार . खासदार ‘ मंत्री ‘ कार्यक्रम साजरे करतात ‘परंतु अहोरात्र लोकांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या पोलिस बांधवांना मात्र कुठलाही सण उत्सव वाढदिवस साजरा करता येत नाही !

म्हणून पोलीस कितीही कठोर वागले तरी त्यांच्याही मनामध्ये मायेचा पाझर फुटत असतो ! ‘

पोलिसाच्या आतही असतो माणुसकीचा झरा ‘
पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा !