Home Blog Page 469

नांदुरा शासकीय कोविड रुग्णालयाला अत्यावश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

नांदुरा शहर व तालुक्यातील रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी,नांदुरा डी.सी.एच.सी.ला अत्यावश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी सूचना आमदार श्री.राजेश एकडे यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाने केली आहे. आमदार श्री. राजशे एकडे यांच्या सूचनेनुसार दिनांक २० मे २०२१ रोजी अप्पर जिल्हाधिकारी श्री.धनंजय गोगटे व जिल्हा शल्यचिकित्सक श्री.प्रशांत पाटील आमदार श्री.राजेश एकडे यांच्यासह नांदुरा कोविड सेंटरची पाहणी करून आढावा घेतला.आमदार राजेश एकडे यांच्या पाठपुराव्याने नांदुरा कोविड सेंटर ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रमा केअर मध्ये सुरू असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिनस्त राहणार आहे.नांदुरा कोविड सेंटर चे रूपांतर डी.सी.एच. सी.मध्ये होणार आहे,डी.सी.एच.सी.च्या नॉम्स नुसार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असणार आहे.५० बेड च्या डी.सी.एच.सी. मध्ये आता ३० ऑक्सिजन बेड करण्यात येतील व त्या साठी आवश्यक ऑक्सिजन सेंटर पाईप लाईन तात्काळ बसविण्यात येईल, मुबलक औषध साठा देखील उपलब्ध राहणार आहे.आमदार श्री.राजेश एकडे यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्याने नांदुरा शासकीय डी.सी.एच.सी.सेंटर सुरू होत आहे.आमदार श्री राजेश एकडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाने डी.सी.एच.सी.सेंटरला १० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून दिले असून स्थानिक विकास निधी(आमदार निधी) अंतर्गत आणखी १० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध होणार आहेत.
यावेळी मलकापूर येथील उपविभागीय महसूल अधिकारी श्री.मनोज देशमुख, तहसीलदार श्री.राहुल तायडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे,डॉ.चेतन बेंडे, डॉ.एल.जैस्वाल,नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.गोपुसेठ बरालीय, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे, नांदुरा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर डामरे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैजापूर येथे थाळी नाद आंदोलन..

0

 

वैजापूर दि २१(ऋषी जुंधारे)

केंद्र शासनाकडून शेतीसाठी उपयुक्त लागणाऱ्या खतांचे भाव गगनाला भिडले असून त्यातच केंद्र सरकरने देशात मुबलक कडधान्य असतानाही कडधान्य आयात केले आहे.आधीच देशातील शेतकरी कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असतानाच अनेक शेतकरी मरणाच्या दारात उभे असतांना शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळून देण्याऐवजी शेतकऱ्यांचे रक्त शोषण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याने राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या आदेशानुसार गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाकडून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध सामाजिक अंतर ठेवून थाळी नाद आंदोलन करण्यात आले.या दरम्यान वैजापूर तालुक्याचे प्रहारचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके व उपतालुका प्रमुख गणेश सावंत,विशाल शिंदे,सागर गुंड यांनी वैजापूर तहसीलदार यांना सकाळी निवेदन देऊन सायंकाळी तालुका भर कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील प्रमुख ठिकाणी केंद्र सरकार विरुद्ध शांततेत थाळी नाद आंदोलन केले.

सुनगांव येथिल आदीवासी व मेंढपाळ वस्ती जवळील डम्पिंग ग्राउंड चे विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन

0

 

 

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायतचा अजब गजब कारभार निदर्शनास आला आहे एकीकडे शासनाचे नदी स्वच्छ अभियान चालू असताना याउलट गावाजवळीलच आंबे लोन नदीचे उगमस्थान असलेल्या जुना पानी या नाल्यापासुन 500 फुट अंतरावर नदीपात्रा लगत सुनगाव ग्रामपंचायतीने डम्पिंग ग्राउंड बनविले आहे सुनगाव ग्रामपंचायतने 20 19 मध्ये गावातील केरकचरा जमा करण्यासाठी कचरा गाडी खरेदी केली आहे व दीड ते दोन महिने पासून केरकचरा हा शासनाच्या नियमाप्रमाणे चक्क नदीपात्रा जवळ टाकलेला आहे व गावातील केरकचऱ्याचे सुका व ओला कचरा याचे वर्गीकरण न करता हा संपूर्ण कचरा एकत्रित केल्या जातो त्या कचरा मध्ये दवाखान्यातील स्क्रॅप मटेरियल जसे इंजेक्शन सुई व काचेची बॉटल व घरातील केरकचरा यामध्ये प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात असतात हा कचरा ग्रामपंचायतच्या कचरा गाडीमध्ये एकत्रित करून जुना पानी असलेल्या नदी पात्रा जवळ मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे परिणामी या कचऱ्याची दुर्गंधी जवळ असलेल्या आदिवासी परिसरात पसरत आहे व कचरा नदीपात्राजवळ असल्याने आदिवासी व परीसरात गुरेढोरे व मेंढपाळ ची जनावरे या कचऱ्यात आपणास काही खायला मिळते का म्हणून कचरा धुंडाळीत असतात परिणामी कचऱ्यात असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या काचेचे बॉटल सुया गुरेढोरे यांच्या तोंडात जाऊन गुरेढोरे मृत्युमुखी पडण्यास कारणीभूत ठरत आहे व पशू पक्षी यांचे जीवनमान दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या हवेमुळे परिसरातील शेतीमध्ये पसरत आहे व या नदीपात्रातून भरपूर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे त्यामुळे हा कचरा रस्त्यात पसरत आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे येणाऱ्या काळात पावसामुळे नदीला पूर येऊन परिसरातील कचरा हा नदीमध्ये पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये साचणार आहे परिणामी नदी दुषित होणार आहे खालच्या गावातील परिसरात पसरून तेथील नदि पात्र दुषित होणार आहे तरी अशा सुनगाव ग्रामपंचायतकडून पर्यावरणाच्या हानी होणाऱ्या गंभीर बाबीकडे पंचायत समिती प्रशासना कडून योग्य ती कारवाई करावी अशी जुना पानी येथिल आदिवासी व धनगर मेंढपाळ यांनी केली आहे सदर डंपिंग ग्राउंड तेथुन न हटवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास सोनोने वआदीवासि / मेंढपाळ यांनी सांगितले

दारुच्या नशेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या दगडी येथील घटना

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील मनवेल येथून जवळच असलेल्या दगडी येथील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दारुच्या नशेत गळफास घेऊन जीवन संपविले.
विजय वंसत ठाकरे वय ३५ या रोजंदारीवर काम करणाऱ्या शेतमजुर तरूणांने त्याचा राहत्या घराच्या पाईपला दारुच्या नशेत दोरखंड बांधुन जीवन संपविले.मयताच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुली असा परीवार आहे.मयताचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आहे असुन यावल पोलिस स्टेशनला पांडुरंग गणपत ठाकरे यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
गावात सुरु असलेल्या अवैध हातभट्टी दारुच्या आहारी जावुन अनेक तरुण हे व्यसनाधीन होत असल्यामुळे अनेक मोलमजुरी करणाऱ्यांचे घर उध्वस्त होत असल्याने गावातील दारुबंदी झाली पाहीजे अशी संतप्त भावना परिसरातील शेकडो महिलांकडुन व्यक्त केली जात असुन ही हात भट्टीच्या दारूचे धंदे तात्काळ बंद न झाल्यास महीला वर्ग आंदोलनाच्या पवित्र्यात आहे .

यावल शहरातुन दिड वर्षापुर्वी ११ वर्षीय मुलीच्या झालेल्या अपहरणाचे आजोबाला फोन आल्याने उघडकीस आले पोलीस शोध कार्यासाठी उत्तर प्रदेशला रवाना

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील धोबीवाडा परिसरातील एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे दिड वर्षापुर्वी एका व्यक्तीने अपहरण केल्याची घटना आज उघडकीस आली आहे याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीसांचे पथक त्या मुलीच्या शोध कार्यासाठी उत्तर प्रदेश येथे रवाना झाली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार भिमसिंग गंगाराम कोळी , वय ६५ वर्ष , राहणार धोबीवाडा यावल यांची११ वर्षीय टूविंकल किरण कोळी नांवाची नात ही दिनांक १९ / ११ / २o१९ रोजी सकाळी ११ , ४५ वाजता कै. सिताबाई दामोदर देवकर या शाळेत इत्तया चौथीच्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी गेली असता ती शाळेत वेळेवर पहोचली पण ती दफ्तर ठेवुन बाहेर गेली ती आलीच नाही शाळेच्या इतर विद्यार्थीनी सांगीतले की तिला कुणीतरी व्याक्ती ही ऑटोरिक्शात बसवुन घेवुन गेला नंतर मग ती शाळेत पहोचलीच नसल्याने कुमारी ट्रक्विंकल हीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ति मिळुन आली नाही , भिमसिंग कोळी यांनी त्यांच्या जळगाव येथील सुप्रीम कॉलनी राहणाऱ्या त्याचे मुली व जावाई यांच्याकडे ही शोध घेण्यात आले असता त्या ठीकाणी भिमसिंग कोळी यांचे जावाई व मुलगी तिथ त्यांच्या घरी मिळुन आली नाही . वरील घटनेमुळे कोळी व त्यांची पत्नी गेल्या काही दिवसापासुन बिघडलेल्या मानसिक स्थिती होतो , मात्र दरम्यान दिनांक २४ / ४ / २०२१ रोजी अचानक माझी अपहरण झालेल्या नात टूक्विकंल हिचा सकाळी ४ वाजता फोन आला त्यावेळी तिने सांगीतले की मी उत्तर प्रदेश येथील नविनसिंग उर्फ गुड्ड रामा शंकरसिंग , राहणार बलकजगंज देरवा चौक , सरकारी दवाखान्यामागे गौरखपुर येथे असल्याचे तिने सांगीतले , संबंधीत व्याक्ती हा तुझ्या वडीलांकडे सोडतो असे सांगुन त्यांने मला भुसावळ येथुन रेल्वेने ईथ आणल्याचे तिने सांगीतले , या सर्व घटनेची माहीती कुमारी ट्विंकल कोळी हिने आजोबास सांगीतल्याने अखेर त्यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये आपली नातचे अपहरण झाल्याची तक्रार दिली असुन , पोलीसांनी गुन्हा दाखल करून या घटनेची गांभीयांने दखल घेत , पोलीसांचे पथक मुलीने सांगीतलेल्या ठीकाणी तिच्या शोध कार्यासाठी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांचे दोन सदस्यी पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाले आहे .

राज्यातील अन्नदाता शेतकरी बांधवांना पिकांसाठी लागणारे रासायानिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती कमी करा मनसेने पाठविले कृषीमंत्र्यांना पत्र.

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विक्की वानखेड़े

संपुर्ण देशावर कोरोना विषाणुसंसर्गाचे संकट ओढवले असुन , या महामारीच्या काळात सर्वसामान्यापासुन तर देशाचा अन्नदाता बळीराजा देखील दुहेरी आर्थीक संकटात आले असतांना केन्द्र शासनाच्या गोंधळलेल्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे यंदाचे खरीप हंगामाच्या पिकपेरणीनंतर लागणारी रासायनीक खतांची वाढलेली किमत ही शेतकऱ्यांचे कमरडे मोडणारी आहे . या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी राज्याचे कृषीमंत्री ना . दादासाहेब भुसे यांना निवेदन पाठवुन या भरमसाठ वाढलेल्या खतांच्या किमती या नियंणत्रात आणाव्यात अशी मागणी केली आहे . याबाबत दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळ्कर यांनी राज्याचे कृषीमंत्री यांना म्हटले की , यावर्षी सर्वच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यानी भरमसाठ किमती वाढवल्या असुन , पन्नास किलोच्या बॅगवर सुमारे ६००ते ७०० रुपये मोठी वाढ केलेली असुन, ऐरवी रासायनिक खतांची नैसर्गीक वाढ बघता१ooते २ooरूपये प्रमाणे वाढ होणे हे अपेक्षीत होते पण ही मोठया प्रमाणावर वाढलेली खतांची वाढ शेतकऱ्यांची पिकपेरणी संदर्भातील आर्थिक नियोजन कोलमडणारी असुन , या विषयाला घेवुन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे . इतक्या मोठया प्रमाणावर रासायनिक खतांच्या किमती वाढण्याची ही पहीलीच वेळ असुन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी किसान सम्मान योजनेअंतर्गत दिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानात केवळ एकच खताच्या बॅगवर खर्च होणार आहे . खतांच्या वाढलेल्या दिडपट किमतीमुळे शेतकरी बांधव कमालीच्या अडचणी येणार असुन , शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला आहे ते आधार भुत किमती मात्र जैसे थेच आहे . राज्याचे कृषीमंत्री म्हणुन शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीच्या तोंडावर वाढलेल्या किमती मुळे आर्थीक बोजा वाढणार असुन या संदर्भात आपण केन्द्रीय कृषीमंत्री यांच्याशी बोलुन तात्काळ ठोस पाऊल उचलावित अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांसाठी हितासाठी व न्याय मिळुन देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्यात येईल असे मनसेचे चेतन अढळकर यांनी म्हटले आहे .

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

संपुर्ण देशावर कोरोना विषाणुसंसर्गाचे संकट ओढवले असुन , या महामारीच्या काळात सर्वसामान्यापासुन तर देशाचा अन्नदाता बळीराजा देखील दुहेरी आर्थीक संकटात आले असतांना केन्द्र शासनाच्या गोंधळलेल्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे यंदाचे खरीप हंगामाच्या पिकपेरणीनंतर लागणारी रासायनीक खतांची वाढलेली किमत ही शेतकऱ्यांचे कमरडे मोडणारी आहे . या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी राज्याचे कृषीमंत्री ना . दादासाहेब भुसे यांना निवेदन पाठवुन या भरमसाठ वाढलेल्या खतांच्या किमती या नियंणत्रात आणाव्यात अशी मागणी केली आहे . याबाबत दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळ्कर यांनी राज्याचे कृषीमंत्री यांना म्हटले की , यावर्षी सर्वच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यानी भरमसाठ किमती वाढवल्या असुन , पन्नास किलोच्या बॅगवर सुमारे ६००ते ७०० रुपये मोठी वाढ केलेली असुन, ऐरवी रासायनिक खतांची नैसर्गीक वाढ बघता१ooते २ooरूपये प्रमाणे वाढ होणे हे अपेक्षीत होते पण ही मोठया प्रमाणावर वाढलेली खतांची वाढ शेतकऱ्यांची पिकपेरणी संदर्भातील आर्थिक नियोजन कोलमडणारी असुन , या विषयाला घेवुन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे . इतक्या मोठया प्रमाणावर रासायनिक खतांच्या किमती वाढण्याची ही पहीलीच वेळ असुन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी किसान सम्मान योजनेअंतर्गत दिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानात केवळ एकच खताच्या बॅगवर खर्च होणार आहे . खतांच्या वाढलेल्या दिडपट किमतीमुळे शेतकरी बांधव कमालीच्या अडचणी येणार असुन , शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला आहे ते आधार भुत किमती मात्र जैसे थेच आहे . राज्याचे कृषीमंत्री म्हणुन शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीच्या तोंडावर वाढलेल्या किमती मुळे आर्थीक बोजा वाढणार असुन या संदर्भात आपण केन्द्रीय कृषीमंत्री यांच्याशी बोलुन तात्काळ ठोस पाऊल उचलावित अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांसाठी हितासाठी व न्याय मिळुन देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्यात येईल असे मनसेचे चेतन अढळकर यांनी म्हटले आहे .

माझा वार्ड माझी जबाबदारी युवा उद्योजक , समाज सेवक अमोल हरडे मित्रपरिवा कडून स्वीकारले आव्हान !

0

 

 

सचिन वाघे वर्धा
19.5.21
हिंगणघाट :- कोरोना महामारी च्या काळात हिंगणघाट नगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्वर वार्ड मध्ये पाण्याचा दुष्काळ असतो याबाबत नगरपालिकेकडून कोणतेही नियोजन होत नाही, ही परिस्थिती लक्षात घेता वार्डातील मित्रपरिवार च्या मदतीने युवा उद्योजक समाजसेवक अमोल हरडे यांनी मोफत पाणी सेवा सुरू केली आहे त्याच्या या कार्याचे वॉर्डातील नागरिका कडून कौतुक होत आहे . मोफत पाणी सेवा संपर्क नंबर 9588648832,9527687818

मतदार संघातील शेत व पांधन रस्त्याचा डी.पी.आर. तयार करून मंजुरीसाठी पाठपुरावा करणार-आमदार राजेश एकडे

0

 

तालुका मलकापुर अंतर्गत धरणगाव ते मेन रोड धरणगाव या पांधन रस्त्याचे भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.मतदार संघातील एक-एक शेत रस्ता पूर्णत्वास जात असल्याचा मनस्वी आनंद असून मतदार संघातील शेत व पांदण रस्त्याचा डी.पी.आर. तयार करून सदर डी.पी.आर. मंजूर करण्याच्या अनुषंगाने यापुढे पाठपुरावा करणार अशी प्रतिक्रिया आमदार श्री.राजेश एकडे यांनी यावेळी दिली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ.मंगलाताई संतोष रायपुरे हया होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ.अरविंदजी कोलते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री.संतोषभाऊ रायपुरे, मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ चौधरी, मलकापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. माधवराव गायकवाड, पंचायत समिती सदस्य श्री.सुरेश पाटील, धरणगावच्या सरपंच सौ.संगीताताई प्रमोद पाटील,उपसरपंच श्री.अमित झनके, श्री.बाळू पाटील, श्री.ज्ञानदेव ढगे, श्री.अर्जुन पाटील, श्री.उमाकांत चौधरी, श्री युवराज रायपुरे, श्री.प्रमोद पाटील,श्री. कृष्णा पाटील.श्री.विजन झनके, श्री.स्वप्नील कोल्हे,श्री.गजानन कोळंबे,श्री.पांडुरंग पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदोन्नतीतील आरक्षण देणारा आदेश पुनश्च लागू करा- रामूबकसं

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट- दि.19/05/2021ला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या केंद्रीय कर्मचारी युनियन ने पदोन्नतीतील आरक्षण देणारा आदेश लागू करण्याचे निवेदन तहसीलदार श्रीराम मुंदडा यांना देण्यात आले.
दि 07/05/2021चा शासनादेश रद्द करून पदोन्नतीच्या कोट्यातील 33टक्के आरक्षित पदे मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नती देऊन भरणेबाबत शासन आदेश निर्गमित करावा. भारतीय संविधानाच्या कलम 16 नुसार शासनाला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,भटके विमुक्त व इतर मागासवर्गीय यांना शासन सेवेतील रिक्त पदांवर आरक्षण देणारा कायदा बनविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे परंतु 07/05/2021ला दिलेल्या शासन आदेशाने ही मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या कोट्यातील33 टक्के आरक्षित रिक्त पदावरील पदोन्नती नाकारली जात आहे आणि रिक्तपदे 33 टक्के आरक्षित कोट्यातील आहेत आणि पदोन्नती मात्र खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची करावयाची असा हा अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्गीयाशी भेदभाव करणारा हा शासन आदेश आहे, आरक्षित कोट्यातील रिक्त पदांवर खुल्या संवर्गातील कर्मचारी व अधिकारी यांची पदोन्नती करणे हा भारतीय संविधान व मा सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान आहे. असा अन्यायकारक कायदा रद्द न केल्यास याचे देशात तीव्र प्रतिसाद पडतील असे प्रतिपादन पँथर प्रतीक वासेकर यांनी केले.
निवेदन देताना दलित युवा पँथर चे अध्यक्ष प्रतीक वासेकर, एकता प्रतिष्ठान चे अखिल धाबर्डे, बहुजन क्रांती मोर्चा चे इंजि निखिल कांबळे, प्रज्वल गायकवाड, सक्षम मेश्राम, यथार्थ बनमरे, अश्वजित मेश्राम, साहिल जवादे, नितीन अंबाडे, लक्ष्मीकांत जवादे, गेमदेव मस्के, संदेश थुल उपस्थित होते.

जुन्या वादातुन एकमेकांच्या मोटरसायकली जाळल्या

0

 

सचिन वाघे वर्धा
19 .5.21
हिंगणघाट :- मोटरसायकल जाळल्याच्या संशयावरुन परिसरातच रहात असलेल्या मोटरसायकलस्वारांवरती हल्ला करुन त्यांची मोटरसायकल जाळल्याची घटना काल स्थानिक शास्त्री वार्ड येथे घडली.
याचवेळी फिर्यादीने सुद्धा याआधी आरोपीची मोटरसायकल जाळली यावरून त्याला अटक झाली होती या प्रकरणात गुंतागुंत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार,काल दि.18 रोजी फिर्यादि पीयुष सुनील लोणारे आपल्या मित्रासह सायंकाळी 7 वाजताचे दरम्यान आरोपी देवराव पुरके रा.शास्त्री वार्ड यांचे घरापासून पल्सर मोटरसायकल क्र.एमएच-32 एटी – 6920 ने जात असता परिवारातील बाप-लेकांनी तसेच बहिनीने “आमची मोटरसायकल तुच जाळली” म्हणत चाकू,कुराडीने जीवघेणा हल्ला केला.
या दरम्यान फिर्यादिने आपली मोटरसायकल तेथेच सोडून पळ काढला.परंतु त्याचा मित्र अमित राऊत याला मारहाण करीत फिर्यादिची मोटरसायकल आरोपी देवराव पुरके, सचिन पुरके, सारिका मंडाळे यांनी पेट्रोल टाकून जाळली. आरोपींविरोधात कलम 307, 324, 435, 294, 427, 506 188- 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर फिर्यादी सौ लक्ष्मी देवराव पुरके हिच्या तक्रारीवरून आरोपी पियुष लोणारे, अमित राऊत यांचे विरोधात कलम 326, 506, 188- 34 नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटणकर करीत आहे.