Home Blog Page 489

वैजापूर येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन वैजापूर येथे महात्मा फुले पुतळा परिसर येथे नगराध्यक्षा सो शिल्पाताई परदेशी श्री दिनेश भाऊ परदेशी आमदार प्रा श्री रमेश बोरणारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक स्वप्निल जेजुरकर राजेश गायकवाड आबासाहेब जेजुरकर बाबासाहेब गायकवाड अ भा माळी महासंघ तालुका अध्यक्ष अशोक देवकर उपाध्यक्ष एकनाथ बनकर संतोष गायकवाड प्रसिद्धीप्रमुख ऋषी भाऊ जुंधारे ज्ञानेश्वर शिरसाट समता परिषद तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदें शहराध्यक्ष पुंडलिक गायकवाड दिलीप अनर्थे विलास मस्के बाळासाहेब शेवाळे आदी उपस्थित होते

अखेर विद्युत तार तुटला सुदैवाने जिवीत हानी टळली ..महावितरण कोणाच्या जीवाची वाट बघत आहे !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

/ दिनांक ११/४/२०२१
तालुक्यात असलेल्या आडगावराजा येथे ५० वर्षापूर्वी विद्युत तार जोडणी करण्यात आली मिञ जिर्ण तार झाल्यामुळे अचाणक तार तुटतात असाच आज दिनांक ११/४/२०२१ रोजी सकाळी ९ च्या सुमारास रेणुका देवीच्या समोरील तार तुटला आणी नागरीकांनी धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला नाहीतर जिवीत हाणी झाली असती.
आडगावराजा येथील विद्युत तार बदलून नवीन तार बसविण्यात यावे यासाठी सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांनी सातत्याने लेखी निवेदने दिली तरीही याची दखल घेतल्या गेली नाही शेवटी सरपंच सौ.कासाबाई कहाळे यांनी आंदोलनाचा ईशारा विद्युत वितरण विभागाला दिला त्या वेळेस या विभागाने दखल घेऊन झुकलेले तार व वाकलेले पोल दुरुस्त केले माञ सदर कंञाटदाराने विद्युत तार बदलले नाही जिर्ण तारालाच ताण दिला आणी तार सरळ केले .त्या मुळे जिर्ण तार तसेच राहिले आणी सातत्याने तारतुटण्याचे प्रमाण थांबले नाही आज दिनांक ११/४/२०२१रोजी९ च्या सुमारास रेणुका देवी च्या मंदिरासमोर विद्युत सुरु असतानच अचानक तार तुटला आणी मंदिरासमोर असलेल्या नागरीकांनी धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला नाहीतर जिवीत हानी झाली असती. या जिर्ण तारा संबधित कंञाटदाराने बदलल्याच नाही त्या मुळे असला प्रकार सातत्याने आडगावराजात होत असुन यामुळे कधी विद्युत चालू असताना तार तुटुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या मुळे जिर्ण तारा बदलावेत अशी मागणी गावकरी करीत आहेत.

… .. ‘सरपंच यांचे म्हणणे खालील प्रमाणे ‘
विद्युत वितरण विभागाने एक कंञाटदाराला जिर्ण तार बदलून पोल सरळ करण्याचे काम दिले होते परंतु सदर कंञाटदाराने फक्त झुकलेले तार सरळ करुन पोल सरळ केले माञ जिर्ण ताराला ताण बसल्यामुळे हा प्रकार होत असुन संबधित कंञाटदाराकडुन अर्धवट काम विद्युत वितरण विभागाने करण्याची कडक सुचणा देण्यात यावी अन्यथा अचानक विद्युत चाअसताना तार तुटुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुदैवाने आज दिनांक ११/४/२०२१ रोजी जिवीत हानी टळली परंतु भविष्यात अचानक तार तुटुन जिवीत हानी झाल्यास यास विद्युत वितरण विभाग जबाबदार राहिल

सौ.कासाबाई मानसिंग कहाळे
सरपंच आडगावराजा तथा अध्यक्ष सरपंच संघटना सिंदखेडराजा तालुका

साहेब लॉकडाऊन करा पण जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तरी कमी करा ! ..खाद्यतेलाचे भाव १५० आसपास ! …….!तळ हातावर पोट भरणार्‍या मजूर वर्गाची मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सध्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू आहे काही ठिकाणी संचारबंदी सुद्धा सुरू आहे तर शनिवार आणि रविवार ला कडकडीत बंद आहे ‘शिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा दहा ते पंधरा दिवस कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे .अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाची जिने अस्वस्थ करणारे आहे ‘
कारण अशी काही कामगार आहेत की जे कामाला गेल्यानंतर कमावलेल्या पैशातून अन्य धान्य आणून आपल्या घराचा प्रपंच भागवतात ‘
व कामाला गेले शिवाय आपली रात्रीची चूल पेटू शकत नाही अशी परिस्थिती सर्वसामान्य कामगार वर्गाची सध्या झालेली आहे ‘दहा ते बारा दिवस कामगार घरीही राहील ‘परंतु लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक दुकानदार आपले हात धुऊन घेतात ‘
त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढले आहेत .खाद्य तेलाचे भाव तर दीडशेच्या आसपास जाऊन पोहोचली आहे सध्या खाद्यतेलाचे भाव 140 ते 145/ रुपये दराने आहेत ‘साखरेचे भाव सुद्धा वाढलेले आहेत ।दवाखान्या मध्ये सुद्धा औषधी चे भाव वाढलेले आहे ‘
अशा परिस्थिती मध्ये जर खाद्य तेलाचे भाव साखरेचे भाव मिठाचे भाव मसाल्याचे भाव अव्वाच्या सव्वा दराने वाढत असतील तर सर्वसामान्य माणूस कसा काय जगू शकेल ।
सर्वसामान्य माणसाला जगायचं असेल तर आगोदर दुकानातील भाव कमी करावे अशी मागणी होत आहे .
अनेक दुकानदार लॉकडाऊन च्या काळामध्ये मालच नाही असे सांगून मनानेच किमती वाढवत आहे ‘यावर उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देण्याची गरज आहे ‘
– (सध्या माझे दुकान गेल्या पाच दिवसापासून बंद आहे त्यामुळे उपासमारीची वेळ माझ्यावर येऊन ठेपली आहे ‘इकडून तिकडून अन्य धान्य घेऊन आम्ही जगू शकतो परंतु जीवनावश्यक वस्तूंचे भाव तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ह्या किमती शासनाने कमी कराव्या व खुशाल दहा ते पंधरा दिवस लॉक डावून करावे ‘ — ..विलास तोडे ( रेडियम व्यवसायिक )

महात्मा फुले शिक्षणाचे आद्य प्रवर्तक.. प्राचार्य संतोष दसरे…

0

 

 

……. ( सिंदखेडराजा सचिन खंडारे )…..

. स्थानिक येथे दिनांक 11/04/2021 ला महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य संतोष दसरे सर यांनी महात्मा फुले हे स्त्री शिक्षणाचे व शिक्षणाचे आद्य प्रवर्तक आहे. असे त्यांनी वक्तव्य केलं. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक एम. बी. भगत सर, शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष प्रताप पागोरे सर, माजी उपसरपंच तथा पत्रकार दर्शनकुमार गवई, गौतम जाधव, रामा सोरमारे हे सर्वजण उपस्थित होते .

साखरखेर्डा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

क्रांतीसुर्य स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथे अभिवादन करण्यात आलेभीम नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महात्मा ज्योतिराव फुले यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले ।यावेळी इंडियन गॅस चे संचालक भाजपनेते अंकुर देशपांडे तसेच संजय जयस्वाल यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला ।यावेळी ‘माजी सरपंच कमलाकर गवई ‘माझी पंचायत समिती सभापती राजू ठोके सामाजिक कार्यकर्ते विशाल गवई ‘ग्रामपंचायत सदस्य दिलीप बेंडमाळी ‘धोंडीराम गवई ‘हे हजर होते

साखरखेर्डा पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धाड . माळखेड फाट्यावर अवैध दारू विक्री करतांना एकास अटक

0

 

(सिंदखेडराजा विशेष प्रतिनिधी)

पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माळखेड फाट्यावर चार देशी दारुचे बाॅक्ससह आरोपीस अटक केली आहे . गेल्या आठवड्यात ११ ठिकाणी पोलीसांनी धाड टाकून अवैध दारू साठा जप्त केला आहे .
साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक ठिकाणी देशी दारुची अवैध विक्री सुरु असल्याची माहिती ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी साखरखेर्डा येथील दोन ठिकाणी , लोणी , गोरेगाव , हनवतखेड , शेंदुर्जन , वर्दडा , पाठोपाठ माळखेड फाट्यावर छापा टाकला . आज सकाळी ठाणेदार जितेंद्र आडोळे , पीएसआय दिपक राणे , पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण , पोलीस का . अनिल वाघ , राजू मापारी यांनी छापा टाकला असता माळखेड फाट्यावरील तृप्ती हाॅटेलवर अवैध दारू विक्री करतांना संजय माधवराव देशमुख रा . लोणी यांच्याकडून ४बाॅक्स सखु संत्र्याच्या १९२ काॅर्टर किम्मत १३ हजार ४६० जप्त करण्यात आल्या आहेत . आरोपीस तंत्काळ अटकही करण्यात आली आहे . या अगोदर अनेक गावांत फाट्यावर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असता मागिल आठवड्यात ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . कोवीड काळात कडक लाॅकडाऊन असतांना काही व्यक्तींनी सुशिक्षीत बेकार युवकांना या धंद्यात ओढून आपली अर्थीक पोळी भाजून घेण्यासाठी दारु विक्रीचा व्यवसाय सुरु केल्याचे समजते . या दारु मुळे सर्वसामान्य व्यक्तींचे कुटूंब बरबाद होत आहे .

कारंजा चौक ठाकरे सायकल स्टोअर्स या दुकानाला आग लागून अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट प्रतिनिधी दि.११ शहरातील कारंजा चौक येथील सुरेश चंपत ठाकरे यांचे मालकीचे ठाकरे सायकल स्टोर्स या दुकानाला आग लागून अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाले.
आज रविवार सकाळी या दुकानातुन धुवा निघत असल्याने तेथे उपस्थित नागरिकांना दिसले.
उपस्थित नागरीकांनी दुकान मालकास घटनेची माहिती दिली.
याचवेळी अग्निशमन विभागाससुद्धा माहिती देण्यात आली. यावेळी सदर आगीत दुकानातील टायर ट्यूब्सचे ३ बोरे,छोट्या सायकल ५० नग, १८० टायर नग,स्पेयरपार्ट्स,२५ हजाराची कंप्रेसर मशीन इत्यादि जळून ५ लाख रूपयाचे नुकसान झाले. माहिती मिलताच दुकानमालक घटनास्थळी पोचले,
परंतु तोपर्यंत सर्व राख झाले होते.
अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोचत आग पूर्णतः विझविली. संचारबंदीमुळे श्री ठाकरे यांचे दुकान बंद असतांना सदर घटना घडली असून शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे डॅशिंग PSI प्रल्हाद मदन यांची पुन्हा एकदा अवैध देशी दारू वाहतूकदारांवर केली धडाकेबाज कारवाई…

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा.प्रतिनिधी:
जळगाव जामोद पोलीस स्टेशन ने पुन्हा एकदा अवैधरित्या देशी वाहतूक करणाऱ्या विरोधात केली धाडसी कारवाई दिनांक दहा एप्रिल च्या संध्याकाळी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की आसलगाव येथे दोन व्यक्ती मोटरसायकलवर अवैध रित्या देशी दारू घेऊन येतात व बाजारामध्ये थांबून देशी दारुची विक्री करतात अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांना माहिती देऊन पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे पोलीस नाईक गणेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यांना सोबत घेऊन आसलगाव येथे जाऊन मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोहन वानखडे यांचे घराकडे पायी जात असताना त्यांच्या घराचे शेरीमधून एका मोटरसायकलवर मोहन वानखडे व सुरेंद्र मेहंगे असे दोन जण दारू घेऊन येताना दिसले त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भरधाव गाडी चालवून ते गाडीवरून पडुन त्यांनी देशी दारुचा माल जागेवरच सोडून गाडी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला नंतर पोलिसांनी सदर देशी दारुचा माल ताब्यात घेतला व मोहन वानखडे यांच्या कुटाराच्या गोठ्याची पाहणी केली असता तेथे त्यांना देशी दारू संत्रा ५००० कंपनीचे १० बॉक्स व गाडी वरून पडलेला एक बॉक्स असे एकूण ११ बॉक्स देशी दारू चा माल किंमत २८ हजार ८८५ रुपयाचा माल मिळून आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत उपविभागीय पोलिस अधिकारी तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांचे सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पीएसआय सचिन वाकडे करीत आहेत.

भालशिव गांजा लागवड आरोपीस भुसावळ न्यायलयाकडुन मिळाली तिन दिवसाची पोलीस कोठडी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

काल तालुक्यातील भालशिव शिवारातील शेतात गांजा लागवड करणाऱ्या संशयीतास अटक करून आज भुसावळ न्यायलयात हजर केले असता त्यास तिन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे . याबाबत मिळालेली माहीती अशी की दिनांक ९ एप्रील रोजी यावल तालुक्यातील भालशिव शिवारात पोलीसांनी गुप्त माहितीच्या अधारावर चौकशी करून केलेल्या कार्यवाहीत चैत्राम गेंदा सोनवणे वय६० वर्ष यांनी स्वताच्या शेतात सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या ४२ किलो ५०० ग्राम गांजाची लागवड केल्याचे आढळुन आल्याने पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने कार्यवाही करीत गांजाची झाडे जप्त करून शेतमालक चैत्राम गेंदा सोनवणे यास अटक केली होती , त्यास आज पोलीसांनी भुसावळ न्यायलयात हजर केले असता न्यायधिशांनी संशयीत आरोपीस १२ एप्रील पर्यंत तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .

यावल पोलीसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी वाहनांचे होणार लिलाव वाहनांची ओळख पटविण्याची शेवटीची संधी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पोलीसांनी विविध अपघात किंवा इतर गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी मोटर वाहनांचा बेवारस असलेल्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने येत्या पाच दिवसात शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी पत्रकारांशी माहीती देतांना म्हटले आहे . दरम्यान यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रा मागील काही वर्षात घडलेले गुन्हे घात अपघात या विविध प्रकारच्या कार्यवाहीत पोलीसांनी जप्त केलेल्या किंवा हस्तगत केलेले वाहन पोलीसांनी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहकार्यातुन प्राप्त झालेल्पा दुचाकी मोटर वाहनांच्या चेचीस क्रमांकाचा आधार घेवुन वाहनमालकांचा शोध घेतले असता ते अद्याप तरी मिळुन आलेले नसल्याने सदर पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक दिवसांपासुन पडुन असलेले दुचाकी मोटर वाहन हे खराब स्थितीत आहे . तरी यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडुन वाहनांचे मुल्यांकन अनुसार येत्या चार ते पाच दिवसात या दुचाकी वाहनांचा शासकीय प्रक्रीयेनुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी दिली असुन, येत्या दोन दिवसात संबधीत नागरीकांना वाहनांची ओळख पटविण्याचे अखेरचे आवाहन करण्यात येत आहे . यावल पोलीसांनी जप्त केलेली वाहनाची क्रमांकवारी पुढीलप्रमाणे हिरो होन्डा ब्लॅक निळ्या रंगाचा पट्टा क्रमांक एमएच १९डब्लयु२२५०चेचीसक्रमांकo२डी २०एफ०९६१६ , हिरो होन्डा एमपी४६ एमजे२४८५चेचीसक्रमांक एमबीएलएचए११ एएनएफ९बी४३०१, तिसरे वाहन देखील हीरो होन्डाचेच असुन तिचा क्रमांक आहे एमएच १९ एजे१८२६व चेसीसक्रमांक०५ एफ सिओ५६७७ , हिरो होन्डा क्रमांक नसलेले वाहन चेचीसक्रमांक एमबीएलएचए१८बीएफएफएच५० २७०७ असे असुन पाचवे वाहन देखील हिरो होन्डा कंपनीचे असुन त्याचे क्रमांक एमएच १९ ए एफ५६७७ असे असुन चेचीसक्रमांक०७ सि०९ सि१९४० असे आहेत तर सहाव्या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकी वाहनाचे क्रमांक नसुन या वाहनाचे इंजीन क्रमांक एचए१०ई ए८९८४७४८७ असे आहे या क्रमांकानुसार जर या वाहनांची ओळख होत असेल तर त्या व्यक्तिने आपल्या आधार कार्ड सहीत आवश्यक ती वाहनाशी संबधीत कागदपत्रे घेवुन पोलीस स्टेशनला दोन दिवसात हजर व्हावे असे आवाहन पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी केले असुन् , या बेवारस स्थितीत असलेल्या दुचाकी वाहनांचा अखेर लिलाव करण्यात येणार आहे असे ही पोलीस निरिक्षक पाटील यांनी सांगितले आहे .