Home Blog Page 492

पुढील आठवडयात येणाऱ्या पवित्र रमजानच्या आगमनामुळे केळीला मिळाला १६०१ चा भाव शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

0

 

 

यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

काळ बदलायला  वेळ लागत नाही या उक्तीप्रमाणे आजच्या स्थितीत केळीचा काळ बदलला आहे आणि म्हणून काही महिन्यांपूर्वी केळी कोणी घेईना अशी बिकट अवस्था केळी उत्पादक शेतकऱ्यांची झाली होती, अशी स्थिती झाली असतांना मात्र आता एका आठवडयावर येवुन ठेपलेल्या मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजानच्या उपवासामुळे केळीची मागणी परपरांतात वेगाने वाढल्याने आजचा काळ हा केळीचा आल्याने केळी घ्या केळी अशी वेळ आली आहे. त्यात ही उच्च प्रतीची दर्जेदार केळी तर जास्त भाव खावुन जात आहे. तेजीत कापणी भाव मिळाला नाही तर केळी नसल्यामुळे  भाव  मात्र कासव गतीने वाढत आहे.
मनवेल येथील शेतकरी धनसिंग सोमा पाटील यांचा उच्च प्रतिच्या
केळीला १६०१ रुपयाचा भाव मिळाला आहे. मागील काळात केळी ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रसंगी पटेल त्या भावात केळीची कापणी केली तर गेल्या काही दिवसापासुन केळीला चांगली मागणी वाढलेली आहे . दरम्यान आता बदलत्या वेळेनुसार केळी मिळत नसल्यामुळे व्यापारी भाव वाढुन देत असल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असुन , येत्या काही दिवसात केळीच्या भावात अजुन मोठी वाढ होण्याची शक्यता केळीचा व्यवसाय करणारी मंडळी व बाजार पेठेतील जाणकारांचे मत आहे .

परतवाडा पोलीसांच्या कार्याला सलाम

0

विमल रामभाऊ भोरे यांना रोख रक्कमेसह पर्श केली परत
====================
हंसराज उके अमरावती
====================
आज तारीख ७/४/२०२१ला बस
स्टाँड परतवाडा परिसरात ड्युटीवर असलेल्या साहय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल खानंदे बँच नबंर ९७५व महिला पोलिस शाहीण शबास खान बँच नबंर ९१६यांना परतवाडा बस स्टँड परिसरात दुपारी बारा च्या सुमारास पेट्रोलिगं वर असताना
एक पस्र सापडली व त्या पस्रमधे
विमल रामभाऊ भोरे यांच्या नाव आधार ओळख पत्राचे ह्या रा.हरम
नावाच्या आधार ओळख पत्राची मिळाल्याची माहिती परतवाडा पोलिस स्टेशनचे करतव्यदक्ष पोलिस निरीक्षक सदानंद मानकर यांना दिली पोलीस निरीक्षक मानकर यांनी सदर पस्र मिळाल्याची माहिती शोशल मिडीयावर टाकत सदर महिला पस्र धारक विमल रामभाऊ भोरे
माहिती देण्याचे आव्हान केले त्यावर हरम येथील विमल भोरे या
परतवाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या पस्र परत मिळाल्यामुळे त्यांनी पोलीसांचे आभार मानले गरीब महिलेचे पैसे व पस्र परत केल्याचे समाधान व्यक्त आणि विमल भोरे यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचाऱ्यांना व करतव्यदक्ष सदानंद मानकर यांच्या कार्याला सलाम.

अपंग बेरोजगाराचे कर्ज प्रकरण मंजूर करा अन्यथा बँकाना घेराव घालणार

0

 

हंसराज उके अमरावती

अपंग जनता दल सामाजिक संघटना चा इशारा

अमरावती..शासन निर्णय प्रमाणे अपंग बेरोजगाराना रोजगारासाठी बीज भांडवलं योजना सुरु असून या योजने मध्ये अपंग बेरोजगार यांना एक लाख पन्नास हजार रुपये कर्ज मिडते यामध्ये शासना कडून 30 हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येते व एक लाख वीस हजार बँक देते असे एकूण एक लाख पन्नास हजार मंजूर झाल्यावर बँक मार्फत अपंगांना देण्यात येत असून अमरावती जिल्ह्यात अनेक अपंग बेरोजगार यांनी जिल्हा परिषद समाज कल्याण अपंग विभागात अर्ज केले आहे व त्यांनी सर्व अर्ज तपासून संबंधित बँकना मंजूर साठी पाठविले आहे पण बँक ये अपंग बेरोजगार यांना कर्ज मंजूर करत नाही आहे व त्यांना उडवा उडवीचे उत्तर देऊन त्याची दिशा भुल करत आहे
अपंग बेरोजगार यांनी पैसे खर्च करून कर्ज प्रकरण तयार केले व अपंग विभाग दिले पण बँक मॅनेजर याचा उडवा उडवीचे उत्तर मुडे अपंगांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून दिनांक 15 /04 / 2021 परंत अपंग बेरोजगार चे बँक ने कर्ज मंजूर केले नाही तर अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती चा वतीने संबंधित बँका ना अपंग घेराव आंदोलन करणार असा इशारा अध्यक्ष शेख अनिस पत्रकार यांनी दिला आहे

नांदुरा-जळगाव (जामोद) रस्त्यावर लवकरच आरओबींची निर्मिती होणार – खासदार रक्षाताई खडसे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

कोरोनाचा कठीण काळ असला तरीही देशांतर्गत कोणतीही विकासकामे बंद नाहीत. याचीच प्रचिती म्हणून आज खासदार रक्षाताई खडसे यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात नांदुरा-जळगाव (जामोद) रस्त्यांवरील आरओबी निर्मिती कारण करण्याबाबतच्या कामांना गती देण्याचे आणि कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. महामार्गांचे चौपदरीकरण होण्याचे दिवास्वप्न प्रत्यक्षात साकार होते आहे याचेच हे जिवंत उदाहरण! नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्यांवर वाढत्या ट्राफीकच्या समस्येने आणि सुरु असलेल्या रस्त्यांचा कामांमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील कामांना जलद गती देण्यात यावी अशी भागातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मागणी आहे. त्याअनुषंगाने आज खासदार रक्षाताई खडसे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक ठेवून सुस्तावल्या अवस्थेत सुरु असलेल्या कामांबाबत आढावा घेतला.

जनसामान्यांना चांगले रस्ते लवकरात लवकर उपलब्ध होण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा आहे. त्यामुळे सुरु झालेले काम कासव गतीने होऊ लागताच जागृत नागरिक व शेतकरी हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कामे लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशीलपणे कृतिशीलता दर्शवित असतात. आज नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्याला प्रत्यक्ष भेट देऊन नांदुरा गेट क्रमांक १६ बाबत महामार्ग व रेल्वे अधिकाऱ्यांशी खासदारांनी चर्चा केली. तसेच नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्यांवरील आरओबीसह डिजिटल माहिती फलक, सिक्युरिटी कॅमेरा, बसण्यासाठी पत्र्याचे शेड, शौचालय, सुरक्षा भिंत तसेच शेतीसाठी अंडर पास रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा खासदार रक्षाताई खडसे यांनी घेतला. गेट क्रमांक १९ महार्गाच्या कामकाजामुळे बंद झाल्यामुळे पर्यायी रस्ता नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वेसह महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. यावेळी सेंट्रल रेल्वेचे सिनिअर डी.एन.इस्ट अधिकारी किशोर सिंग यांच्यासह महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकनेते विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालयात “भाजपा स्थापना दिन” साजरा

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा:- भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 अप्रिल 1980 रोजी भारतीय जनसंघ व जनता पक्ष यांची मिळून झाली. आज पक्षाचा 41 वा स्थापना दिवस असल्याने बुलडाना येथे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा आमदार विजयराजजी शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय “शिवालय” येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साजरा झाला.

भारतीय जनता पक्षाच्या उभारणी व विचारधारेत ज्यांचे भरीव योगदान आहे अश्या भारतीय जन संघाचे संस्थापक स्व.श्यामाप्रसादजी मुखर्जी व पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे प्रथमतः पूजन करून लोकनेते विजयराजजी शिंदे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करून या महापुरुषांना उपस्थित सर्वानी अभिवादन केले. यावेळी “भारतीय जनता पक्षाचा विजय असो” , “भारत माता की जय” आदि घोषनांनी कार्यलय परिसर दणानून गेला होता.
यावेळी बोलताना मा.आमदार विजयराजजी शिंदे यांनी बोलताना सांगितले की ,”भारतीय जनता पक्षास गौरवशाली व संघर्षशिल इतिहास आहे. पक्षाचे अनेक महापुरुषांच्या परिश्रमातुन विशाल अश्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.पक्षाची राष्ट्रवादाची विचारधारा व अंत्योदय सिद्धांत यांच्या आधारावर पक्ष जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेला आहे तसेच पंत प्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात येणाऱ्या काळात देश “आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करेल यांत शंका नाही” असे मत व्यक्त केले.
यावेळी महिला मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेड़ेकर,मा.नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले,प्रा.जगदेवराव बाहेकर, तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,नगरसेवक अरविंद होंडे,प्रा.प्रभाकर वारे, दत्ताभाऊ पाटिल,प्रकाश राजगुरे,विनायक भाग्यवंत,नंदिनीताई साळवे,पद्मनेताई,गणेश पांडे,विधि आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड मोहनदादा पवार,ऍड दशरथसिंग राजपूत,शेख रशिद ई कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

सेलू तालुक्यातील सोन्ना, वलंगवाडी येथील प्रा. आ. उपकेंद्रात कोविड लस मोहिमेस प्रारंभ

0

 

अजहर पठान सेलू/परभणी

कोरोनाच्या या लाटेला सामोरे जाण्याची तयारी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोविड 19लस मोहिमेस सॉन्ना, वलंगवाडी येथील ग्रामस्थांनी लस टोचून घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोंन्ना गावचे सरपंच श्री. प्रमोद गायके, ग्रामसेवक खरात, ग्रां प. सदस्य श्री. गोविंद मगर, तलाठीश्री. सोडगिर्वार, भा ज पा. किसान मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. दगडोबा जोगदंड पाटील यांनी लस टोचून घेण्याचे महत्व पटवून लस टोचून घेण्याचे आवाहन केले. लसीकरण यशस्वितेसाठी डॉ. मुक्तेश्वर पारवे, आरोग्य सेविका एस आर. सुडके, एफ एम. पर्ले, प्रा. शिक्षक श्री. प्रवीण सानप, आशाताई आशमती काळे, गंगुताई शेळके गणेश त्तार्डे, अशोक मगर, दत्ताबुवा गीरीआदींनी परिश्रम घेतले

जिल्हयात ऑक्सीजन निर्मिती व रिफीलींग उद्योगासाठी पुढे यावे

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन
परवाना देण्यासाठी विभाग तत्पर

बुलडाणा:-जिल्ह्यात एकुण ऑक्सीजनची मागणीनुसार पुरवठयाचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे.

जिल्ह्यासाठी मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा माऊली उद्योग,अकोला, मे. इसीस गॅसेस,जालना यांचेकडून निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सदर पुरवठा अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी आरोग्य विभागाचया समन्वयाने काम करीत आहे.

तसेच जिल्ह्यामध्ये ऑक्सीजनचे एकही उत्पादन व रिफीलर नाहीत जिल्ह्यात खाजगी व शासकीय हॉस्पीटलमध्ये आवश्यक असणारा मेडीकल ऑक्सीजन हा बाहेरुन जिल्ह्यामधून मागविण्यात येत आहे. कोव्हीड – 19 या विषाणुजन्य आजारात रुग्णाचे वाढते प्रमाण पाहता भविष्यात मेडीकल ऑक्सीजनची जास्त गरज भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित वेळीही ऑक्सीजनची शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांना गरज राहते. जिल्ह्यातील घाऊक औषध विक्रेता किंवा ज्यांना सदर व्यवसाय करावयाचा आहे, त्यांनी पुढे यावे. ऑक्सीजन निर्मिती किंवा रिफीलींगचा उद्योग जिल्ह्यातच निर्माण करावा. त्यासाठी त्यांनी सदर कार्यालयातील सहायक आयुक्त औषधे अशोक बर्डे, औषध निरिक्षक गजानन प्रल्हाद घिरके, यांचेशी संपर्क साधावा. जेणेकरुन असे व्यावसायीक पुढे आल्यास ऑक्सीजन उत्पादन, रिफीलींग तसेच घाऊक व्यवसाय करणाऱ्यांना कार्यालयातील अधिकारी परवाना मिळणेसाठी त्वरीत मदत करतील. अशा उद्योगांना परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग तत्पर आहे. तसेच जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी रुग्णहिताच्या दृष्टीकोनातुन समोर येवून सामाजिक हित जोपासावे असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषधे प्रशासन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे

संडास च्या वादावरून दोन कुटुंबात हातापायी

0

 

सचिन वाघे वर्धा हिंगणघाट प्रतिनिधी,

दोन कुटुंबियामिळून घरी एकच संडास असल्याने झालेल्या वादातुन एकमेकांना गंभीर मारहाण केल्याची घटना आज सकाळी शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड येथे घडली.
स्थानिक संत ज्ञानेश्वर वार्ड येथील रहिवासी अनिल भलमे (४०) यांचे कुटुंबिय एकाच घरी राहतात, जुने वडीलोपार्जित घर आहे. दोन्ही कुटुंबिय मिळून एकच संडास असल्याने कुटुंबियात संडासचे वापरावरुन नेहमी वाद होत असतो.
आज सकाळीसुद्धा संडासचे वापरावरुन दोन्ही कुटुंबियांत वाद झाला. वादाचे पर्यवसान लाठीकाठीसह हल्ल्यात झाले.
यात कुटुंबियांपैकी नाना भलमे याचेवरकाठी व विटेने वार करीत गंभीर जखमी करण्यात आले,
जखमी नाना भलमे यास उपचारार्थ स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात पाठविले.

वडाळी येथे कोरोना लसीकरणास चांगला प्रतिसाद

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

प्राथमिक आरोग्य केंद्र

नांदुरा च्या वतीने आज दि, 6/4/2021 रोजी वडाळी ता.नांदुरा येथे कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली, या लसीकरणा मध्ये ग्रामपंचायत वडाळी येथील आज 154 व्यक्तींनी कोरोना लस घेतली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथील डॉ. नारखेडे मॅडम, डॉ. चंदनगोडे सर, सोळंके मॅडम, आरोग्य सेवक चव्हाण सर, आरोग्यसेविका तायडे मॅडम, अवतार मॅडम तसेच वडाळी येथील आशा गोदावरी वक्ते, जि. प. प्राथमिक शाळा, वडाळी येथील शिक्षक अवचार मॅडम, होनाळे मॅडम, धनोकार मॅडम, तसेच ग्रामपंचायत वडाळी चे नवनिर्वाचित सरपंच सौ. विद्याबाई ज्ञानेश्वर वक्ते, गोविंदा वक्ते, विशाल वक्ते, मनोज आत्माराम वक्ते, आदींनी ज्येष्ठ नागरिक तथा 45 वर्ष वयावरील व्याधिग्रस्त नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले.

0

नांदुरा:-(प्रफुल्ल बिचारे पाटिल)

सध्या शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोरोना संसर्ग, लसीकरण आणि सामाजिक मूल्यांबाबत कृतिशील जनजागृती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका दौऱ्यावर खासदार रक्षाताई खडसे असतांना शेंबा, टाकारखेडा, बेलुरा, तरवाडी, खैरा, फुली आणि कंडारी आदी गावांना सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातील गावकऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव संसर्ग व कोविड चाचणीबाबत जागृत करण्यात आले. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेचा आढावा घेऊन विविध सरकारी योजनांबाबत पूर्ण मार्गदर्शन खासदारांनी गावकऱ्यांना केले. आज नांदुरा तालुका रेस्ट हाऊस येथे खासदार रक्षाताई खडसे व भाजपा नेते मा. चैनसुखजी संचेती माजी आमदार मलकापूर यांच्या उपस्थितीत अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
खारे पाणी पट्टीतील जमीन सिंचनाकृत करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पोकरा योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी खासदारांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. त्याचबरोबर शिधा पत्रिका धारक नागरिकांना रेशन मिळण्याबाबत आणि पिण्याच्या पाण्याची वीज कापणी थांबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यात कोरोनाच्या लढ्यासाठी औषधींचा व इंजेक्शनचा तुटवडा भासल्यास तत्परतेने त्या उपलबध करून दिल्या जातील; रुग्णांसाठी अवश्यक असलेली सर्व मदत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वेगाने कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम गावा-गावात राबविण्यात येण्याबाबत खासदारांनी ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करून जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळा सुरु झाला असून त्यानुसार गावा-गावातील पाणी टंचाईवर प्राधान्याने उपाय योजना राबविल्या जाव्यात. यासोबतच पुढील वर्षासाठी सोयाबीन बियाणे तुटवड्याबाबत आढावा घेण्यात आला असून १४ हजार क्विंटल सोयाबीन बियानाची मागणी पुढील वर्षासाठी करण्यात आलेली आहे. पोकरा योजनेअंतर्गत ट्रॅक्टर वितरण सुरु झाले असून खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. पोकरा योजनेसाठी ६९ गावांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी आधार क्रमांक व खाते क्रमांकांसाठी केवायसी केली जात असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच गावकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी गावांना समक्ष भेटी द्या असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे व चैनसुखजी संचेती यांनी अधिकाऱ्यांना केले. यावेळी पोलीस निरीक्षक, बी.डी.ओ. नगरपंचायत सदस्य, कृषी अधिकारी,शहर अध्यक्ष श्याम राखोंडे, नांदुरा तालुका अध्यक्ष संतोष मुंढे, सुधीरभाऊ मुर्हेकर, महिला शहर अध्यक्ष सारिका डागा, बेटी पढाओ, बेटी बचाओ अध्यक्ष ज्योती तांदळे, शंकरसा ताकवाले, दत्ताभाऊ सुपे, प्रमोद हिवाळे, संजयभाऊ फणसे, ब्रम्हानंद चौधरी, उमेश शंकरसा ताकवाले, लक्ष्मण झांबरे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस विजय पाटील, प्रविणभाऊ मानकर, तालुका व शहर भाजपा अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.