Home Blog Page 52

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात(samruddhi mahamarg)

0

 

अनिलसिंग चव्हाण ( संपादक )

समृद्धी महामार्ग:बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये दोन जणांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला, जेव्हा मुंबईतून अकोल्याकडे जात असलेल्या कारचा अचानक स्फोट होऊन ती पेट घेतली.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

अपघाताची घटना अशी घडली की नागपूर कॅरिडोरवरून जात असलेल्या कारचे चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय ३५) यांचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे कार मिडीयममधील क्रॅश बॅरिअरला धडकून त्याची पट्टी कारच्या समोरील भागातून घुसून आरपार निघाली.

यानंतर कारने तात्काळ पेट घेतले आणि प्रवाशांना बाहेर निघता न आल्याने अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) व राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२, दोन्ही रा. मुंबई) यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला. चालक अभिजीत हा गंभीर जखमी झाला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अपघातानंतर महामार्ग ॲम्बुलन्सचे डॉ. वैभव बोराडे, डॉ. यासीन शहा, चालक दिगंबर शिंदे यांनी तात्काळ जखमीला बीबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार कामी घेऊन गेले. अपघातातील मृत्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग क्यूआरव्ही टीम व महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळ गाठून सदर मृतदेह जळालेल्या अवस्थेत कारमधून बाहेर काढले.

समृद्धी महामार्ग:किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरवाडे व देऊळगाव राजा उपविभागाचे मनीषा कदम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई करीत आहेत. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत.

परोपकारीवृत्ती जोपासत दिव्यागांना साहीत्यवाटप करून शिवरायांची जयंती साजरी(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट : शिवजयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर द्वारा आयोजित दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

याकार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांनी दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करून दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचे कार्य केले आहे.

बातमी  लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Hingnghat:त्यांचे खासदार अमर काळे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटिल,शहराध्यक्ष बालू वानखेडे, सहकार नेते वासुदेव गौळकर,समाजसेवक सुनील डोंगरे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर,साहेबराव येडे,महिला शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी,सुचिता सातपुते, मीनाक्षी सोनटक्के, मीनाक्षी धाकने,विद्या गिरी, आचल वकील, दिपाली रंगारी, यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते..

रामदेव बाबांची घोड्यासोबत रेस: श्वास रोखणारा व्हिडिओ व्हायरल(ramdev-baba-60-years-old-horse-race)

0

 

ramdev-baba-60-years-old-horse-race:चिमूर क्रांती येथे घोडा यात्रा दरम्यान 60 वर्षीय रामदेव बाबा यांनी घोड्यासोबत रेसिंगचा एक अनोखा प्रयत्न केला, ज्यामुळे सर्व प्रेक्षकांचे ध्यान वेधले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

घटनेची पार्श्वभूमी चिमूर क्रांती येथे दरवर्षी घोडा यात्रा आयोजित केली जाते, ज्यामध्ये लोक विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. या वर्षी 60 वर्षीय रामदेव बाबा यांनी घोड्यासोबत रेसिंगच्या स्पर्धेत भाग घेतला, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

भ्रष्ट यंत्रणेचा गोंधळ जलजीवन विस्कळीत योजना ठरली पोल टाकी कशी कोसळली ग्रामस्थ हैराण!(brekingnews)

घटनेचे विवरण रामदेव बाबा यांनी त्यांच्या घोड्यासोबत रेसिंगच्या ट्रॅकवर धाव घेतली आणि त्यांच्या ऊर्जा आणि उत्साहाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. या स्पर्धेत अनेक तरुण आणि अनुभवी घोडेस्वार भाग घेत होते, परंतु रामदेव बाबा यांची धैर्यशीलता आणि कौशल्याने त्यांना विजेता बनवले.

प्रतिक्रिया आणि विश्लेषण
“रामदेव बाबा यांची ही कामगिरी खरोखर अद्भुत आहे. त्यांच्या वयातही त्यांनी घोड्यासोबत रेसिंग केली आणि विजय मिळवला, हे खरोखर प्रेरणादायी आहे,” असे एका प्रेक्षकाने सांगितले.

रामदेव बाबा यांनीही त्यांच्या यशाबद्दल बोलताना सांगितले, “मी ही स्पर्धा जिंकण्यासाठी खूप मेहनत केली आहे. माझ्या वयाची पर्वा न करता मी हे साध्य करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या कुटुंबीयांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळाला.”

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व्यापक परिणाम या घटनेने समाजात वयाची मर्यादा नसण्याची जाणीव करून दिली आहे. रामदेव बाबा यांच्या यशाने अनेक लोकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांनी दाखवून दिले आहे की वय ही कोणत्याही गोष्टीची मर्यादा नाही.

ramdev-baba-60-years-old-horse-race: श्वास रोखणारा व्हिडिओ रामदेव बाबा यांच्या रेसिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. या व्हिडिओने रामदेव बाबा यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

भ्रष्ट यंत्रणेचा गोंधळ जलजीवन विस्कळीत योजना ठरली पोल टाकी कशी कोसळली ग्रामस्थ हैराण!(brekingnews)

0

 

खामगाव ( इस्माईल शेख ): ग्रामस्थांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात जलजीवन योजना राबवित आहे. मात्र संबंधित ठेकेदार भ्रष्ट यंत्रणेमुळे सरकारच्या उद्देशाला छेद देत आहे.

मागीलवर्षी संग्रामपूर तालुक्यातील चिंचारी येथील पाण्याची टाकी कोसळल्यानंतर प्रकरण निस्तारण्याचे प्रकार सुरू झाले होते. परंतु याबाबत बिंग फुटल्याने कंत्राटदाराने पुन्हा पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याचा करारनामा जि.प. पाणी पुरवठा विभागाला करून दिला होता. याचे काय झाले याची माहिती मिळाली नाही.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

पण खामगाव तालुक्यातही असाच प्रकार घडल्याने भ्रष्ट यंत्रणेमुळे जलजीवन योजनेचा ब‌ट्ट्याबोळ होत असून ही योजनाली

ग्रामस्थांच्या मुळावर उठत असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात वृत्त असे की,

जलजीवन मिशन योजने अंतर्गत खामगाव तालुक्यातील अंत्रज या गावामध्ये पाण्याचे

टाकीचे बांधकाम सुरू असताना १५ फेब्रुवारी रोजी बांधकाम कोसळले. निकृष्ट दर्जाचे साहित्या वापरल्यानेच हा प्रकार झाला असावा. या घटनेने जिवितहानी झाली नसली तरी एकदोघांना दुखापत झाल्याचे समजते. या अगोदर सुद्धा २० – २० फ टाचे बांधकाम केल्यानंतर पिंजरा पाडण्यात आला होता.

या योजनेसाठी शासनाने ५ कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या निधीचाही गैरवापर चालू आह. एका पावसाच्या पाण्याने पाईपलाईन उघडी पडली आहे. यापूर्वी यामध्ये एक बैलजोडी अडकून मृत्यूमुखी पडली असल्याचे सांगण्या येत आहे.

brekingnews:याबाबत सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शिवजयंती निमित्त जय राजे मित्र मंडळाच्या वतीने भव्य ऐतिहासिक मिरवणूकीचे आयोजन(shivjayanti)

0

 

बुलडाणा जावेद शहा

shivjayanti:रायपूर प्र. दि. 17 फेब्रु शिवजयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भव्य ऐतिहासिक मिरवणूक लवाजम्यासह जय राजे मित्र मंडळ यांचे वतीने रायपूर ता बुलडाणा येथे काढण्यात येणार आहे.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

सविस्तर वृत्त असे की, जय राजे मित्र मंडळ रायपूर यांच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये विविध व्याख्याने, विविध स्पर्धा घेण्यात येतात. एका आठवड्यापासून शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली जाते. तसेच यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपल्या राजाची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

या मिरवणुकीचे विशेष म्हणजे आम्ही चिखलीकर ढोल पथक, महीला मावळे, घोडयावर विराजमान मा. जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे, मावळे, चोपदार, भजन, विविध रथ, राजमुद्रा व भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर आरूढ मुर्ती अशी ऐतिहासिक मिरवणूक काढली जाणार आहे.

shivjayanti:शिवजयंती विशेष म्हणजे रायपूर या गावात दिवाळी प्रमाणे दिपोत्सव करुन राजांचा उत्सव साजरा केला जातो. सर्व हिंदू -मुस्लिम बांधवांचा व सर्वधर्मीय समाजाचा सहभाग या जयंती मध्ये असतो. तरी सर्वांनी या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुदेव सेवा मंडळ द्वारा भव्य भजन खंजेरी स्पर्धा आयोजित(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट:- गुरुदेव सेवा मंडळ हिंगणघाट द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार त्यांच्या काळापासून ते आतापर्यंत प्रेरणा देत आहे.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

दरवर्षी नवीन लोक त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन सामाजिक कार्यात सहभागी होतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार सर्व धर्म समभाव विचार आहेत. ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांचे कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तरुण पिढी आत्मसात करीत आहे. असे मनोगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त करीत खंजेरी भजन स्पर्धेच्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

Hingnghat:याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष धनराज डंभारे, उपाध्यक्ष दादाराव कुबडे, सचिव मूलचंद खंदार, गजानन फाले, डॉ. संजय हिवरकर, नारायणराव खाडे, राजू चौधरी, श्याम कोरडे, दीपक वांढरे, दिनेश नेवारे, सुनिता हिवज यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेगांव डिजीटल मिडिया परिषद उपाध्यक्ष शेख अमीन यांचा उत्साहात झाला वाढदिवस साजरा..(shegaonnews)

0

 

डिजिटल मीडिया परिषद शेगाव तालुका उपाध्यक्ष तसेच सहसंपादक मराठी समाचार 24 न्युज, शेगांव तालुका प्रतिनिधी सूर्या मराठी न्यूजचे शेख अमीन यांचा आज विश्राम भवन शेगांव येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी अमीन शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

shegaonnews:यावेळेस डिजीटल मिडिया परिषद बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे, शेगांव तालुका अध्यक्ष विवेक शेगावकर, उपाध्यक्ष इस्माईल शेख, सचिव विजय खंडेराव, कोषाध्यक्ष गजानन ददगाळ, कार्याध्यक्ष संजय सुरवाडे, सहा संघटक अर्जुन कराळे.समाजसेवक प्रविण इंगळे, यशस्वी उद्योजक निखिल कांबळे, अल्पसंख्यांक नेते अस्लम साबरी, रियाझ जमदार हे उपस्थित होते..

स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष तर्फे निषेध मोर्चा.(hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

hingnghat:हिंगणघाट शहर व ग्रामीण शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा तर्फे प्रीपेड व स्मार्ट मीटर बसविल्यास धोके व अडचणी बाबत उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे ,तथा माझी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, तसेच तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय, हिंगणघाट यांना शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक पासून कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पर्यंत समाजाच्या हितासाठी शिवसेना परत एकदा रस्त्यावर पाई चालत जाऊन धडक मोर्चा द्वारे निवेदन देण्यात आले.

स्मार्ट आणि प्रीपेड मीटर योजनेवर चर्चा सुरू असताना, योजनेची संबंधित काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत. सरकार आणि महावितरण कंपनीने योजनेचे समर्थन करताना दिलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर वास्तव अधिक चिंताजनक आहे. स्मार्ट मीटर ची किंमत रुपये २६१०/- सिंगल फेज,व ४०५०/- थ्री फेज आहे. मात्र प्रीपेड मीटर साठी प्रत्यक्ष खरेदी मध्येही किंमत जवळपास दुप्पट म्हणजे ११९८७/- झाली आहे.

त्यामुळे ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक ताण येतो. याशिवाय मीटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पारदर्शक नाही. प्रीपेड मीटर साठी होणारा खर्च वीज दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकाकडून वसूल केला जाणार आहे. अंदाजे ३०/- पैसे प्रति युनिट वाढ हा ग्राहकांवर मोठा आर्थिक बोजा असेल.त्यामुळे वार्षीक तीन हजार कोटींचा अतिरिक्त भार पडेल.

तसेच ग्राहकांचे हक्क वीज कायदा २००३ च्या कलम ४७ (५) नुसार ग्राहकाला पोस्टपेड किंवा प्रीपेड मीटर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रात प्रीपेड मीटर साठी सक्ती केली जात आहे. त्यामुळे कायद्याचे उलंघन होत आहे. इंटरनेट किंवा स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या भागामध्ये रिचार्ज प्रक्रिया अडथळे येतील .अशा परिस्थितीत ग्राहकांना वारंवार डिस्कलेक्शनला समोरे जावे लागू शकते. राज्यातील २ कोटी लहान ग्राहकांना प्रीपेड मीटर योजनेचा कोणताही फायदा होणार नाही. उलट त्यांना अतिरिक्त खर्च आणि तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागेल .१०० युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना हा भार टाकला जात आहे.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

तसेच प्रीपेड मीटरच्या अंमलबजावणीनंतर महावितरणच्या अकाऊंट आणि बिलिंग विभागातील सुमारे २०००० आणि मीटर रिडिंग करणारे ३०००० रोजगार कायमचे कमी होणार आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती ही प्रभावित होणार आहे .या केंद्र सरकारच्या धोरणानुसार विज क्षेत्राचे खाजगीकरण हळूहळू सुरू आहे.

hingnghat:ही अत्यावश्यक सेवा रहण्याऐवजी खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी वस्तू बनेल. ज्यामुळे ग्राहकाचे शोषण होण्याची शक्यता दाट आहे.
या मोर्चात सहभागी उपतालूकाप्रमुख प्रकाश अनासाने ,माजी नगरसेवक मनीष देवडे, श्रीधर कोटकर, भास्कर ठवरे,मनोज वरघणे ,गोपाल मेघरे ,शितल चौधरी ,पप्पू घवघवे,अनंता गलांडे ,नितीन वैद्य ,गजानन काटोले, सुरेश चौधरी ,संजय पिंपळकर, शंकर भोमले ,नथूजी कुकडे, प्रशांत सुपारे, गजानन ठाकरे ,अमोल वादाफळे, हेमराज हरणे, विजय कोरडे ,बलराज डेकाटे, शंकर झाडे ,संजय रहाटे ,घनश्याम येडे ,गजानन सातारकर, फिरोज खान,राजू मंडलवार, हिरामण आवारी ,भास्कर कोल्हे ,शकील अहमद ,श्रीकृष्ण रामगडे,दिलीप वैद्य, श्रीरंग चंदनखेडे,प्रशांत कांबळे ,गजानन साखरकर, वसीम शेख, अतिक मिर्झा, रमेश तामगाडगे ,नरेश तामगाडगे ,सोनू भगत,लक्ष्मण कापकर ,विनोद दांरुडे ,अमोल चिंचाळकर, गुणवंत वानखेडे,विनोद दारूंडे, रवी बागडे ,गोवर्धन शाहू, भोला ठाकूर , चंगेज खान, राजेश बोंडे ,मारुती अराडे, दिनेश धोबे,सुनील आष्टीकर, संतोष गाले,विनोद मोहोड, प्रकाश भुसारी, किशोर इंगोले, सतीश मसराम,अरविंद झिलपे,शुभम धनगाये, नितीन कोल्हे, अनिल मानकर, अविनाश धोटे,राजू बोडे,दिलीप जाधव,मनोज सावंत,संजय गिरडकर, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

0

 

 

राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलढाणा द्वारा संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर अँड ज्यु क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड मध्ये आज त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट हे होते. सर्वप्रथम माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी स.शिक्षीका प्रियंका सरकटे यांनी बहारदार गिताने सुरुवात केली. तर आराध्य लहाने, ईश्वरी बांन्डे ,प्राची सुसर ई विद्यार्थीनी आपल्या गीत तसेच भाषणातुन माता रमाई त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आला.

यावेळी शाळेचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून माता रमाई यांचे कार्य त्यांचा जीवन त्याग व त्यांनी केलेले समाजासाठीचे काम व त्याग यासह अनेक विषयावर दैनंदिन जीवनातील उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडले. पुस्तके वाचली पाहिजे ज्ञान वृद्धिंगत केले पाहिजे. तरच समाज सन्मान करतो. त्यागमूर्ती माता रमाईचे जीवन कार्य आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारले पाहिजेत, अशा महान पुरुषांचे कार्यक्रम घेण्यामागचा हाच उद्देश असतो त्यांचे जीवन कार्य आपण अंगीकारावे, हेच त्यांना अभिवादन ठरेल असे ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष माननीय संदीप दादा शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गायकवाड यांनी केले कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती

रेती चोरीवर शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेध. ( mahsulnews)

0

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

mahsulnews:हिंगणघाट:- हिंगणघाट व समुद्रपूर तालूक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास २४ तास वाळू उपसा केला जात आहे. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सर्रास सुरु असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अश्याच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरविण्याचा शासनाचा हेतू हे असले रेती माफिया पायदळी तुडवीत आहे.

हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील येळी वाळू डेपो, दारोडा वाळू डेपो, खुनी (सेवा) वाळू डेपो, आजनसरा येथील सावंगी वाळू डेपो, साती वाळू डेपो, तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव वाळू डेपो अशी वाळू डेपो आहे. वना, वर्धा नदीवर असलेले जवळ जवळ सर्व वाळू घाट या रेती डेपोला जोडले आहेत.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

मात्र या डेपोवर रेती न टाकता हे डेपो धारक नदीत अनधिकृत रित्या पोकलन्ड मशीन, यांत्रिकी बोट लाऊन टिप्पर च्या माध्यमातून नदीपात्रातून २४ तास थेट विक्री करत असून प्रशासनाचे सुर्व नियम पायदळी तुडवीत आहे. जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपूर येथील रेती आणि हि ग्रुप पणे विक्री केली जात आहे.

वाळू डेपोवर वाळू टाकून ती शासनाच्या आकारण्यात येणाऱ्या दराने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. ज्या लोकांनी डेपो घेतला आहे ते शासकीय नियमानुसार काम करीत नाही. नियमानुसार रेती उपसा सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणे आवश्यक आहे. परंतु सायंकाळी सहा नंतर सुद्धा रेती उपसा चालू असतो. रेती साठा साठवून मोठ्या प्रमानात अनधिकृतरित्या विक्री सुरु आहे. त्यामुळे लाभ्यार्थ्यांना रेती मिळत नाही कारण त्यावर डेपो धारकाचे योग्य ते नियंत्रण नाही.

शेकापूर (बाई) च्या वाळू घाटावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून शासनाच्या करोडो रुपयाचा महसूलाचे नुकसान होत आहे. 20 ते 25 टिप्पर आणि ट्रक्टर शेकापूर रेती घाटावर चोरी ची वाहतूक करण्यासाठी तयार आहे. काही गाड्या जेसीपी च्या माध्यमातून रेती भरून निघाल्या आहे. याबाबत सबंधित अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा यावर कारवाई झाली नाही. अधिकारी वर्ग नेत्याच्या दबावात येऊन रेती माफियांना वाचविण्याचे काम करीत आहे. आणि वरिष्ठांना दाखवण्यासाठी एक, दोन ट्रक्टर वाल्यांवर कारवाई करीत प्रशासन जागृत आहे असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसत आहे.

रेती डेपो आडून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपऊन घेणार नाही. कारण शासन रेती तस्करीवर आळा लावण्यात असमर्थ ठरत आहे. अवैध्य रेती माफियावर कारवाई झाली नाही तर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी- (श.प) रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणत आंदोलन करेल. या आंदोलना नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील. असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

mahsulnews:यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, तालुकाध्यक्ष महेश पाटील झोटिंग, शहर अध्यक्ष बालु वानखेडे, समाजसेवक अशोक पराते, समाजसेवक सुनील डोंगरे, युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, माजी नगरसेवक दादा देशकरी, माजी नगरसेवक बालाजी बहलोद, विजय तामगाडगे, माजी जि.प. सदस्य घनश्यामजी येंडे, किशोर चांभारे, भोला निखाडे, मोहम्मद अली अजानी, नाना पुंड, रविभाऊ डेकाटे, उमेश नेवारे, संदीप चाफले, सौ. सरपंचां कविता वानखेडे, महिला कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, तालुकाध्यक्ष सुचिता सातपुते, शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, राऊत मॅडम, जील्हाउपाध्यक्ष मीना सोनटक्के, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, मीनाक्षी ढाकणे, सरचिटनिस सविता गिरी ओबीसी सेल शहर अध्यक्ष आचल वकील, सिद्धार्थ मस्के, शोहेब शेख, जितेंद्र रघाटाटे, अमित रंगारी, नितीन भूते, रमेश चतुर, रवी गिरसावले, सुनील घोडखांदे, तालीम कुमार पिसे, अमोल बोरकर, प्रवीण भूते, जगदीश वांदिले, पुरुषोत्तम कांबळे, अनिल भूते, गजानन महाकळकर, बच्चू कलोडे, सुशील घोडे, आकाश हूरले, दिनेश पिसे, कुणाल गोल्हर, हुकेश धोकपांडे, अमर धनविज, पंकज भट, सचिन घोडे, रवी बोरकर, राहुल बोरकर, नरेश चिरकुटे, दीपक चांगलं, वैभव बोरकर, मो. शाहिद, उपस्थित होते