Home Blog Page 525

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे कोरोना मुक्त ।पुढील १२ दिवस विलगीकरणात !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री .नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे .हे कोरोना मुक्त झाले ’17 फेब्रुवारी रोजी ना . डॉ . राजेंद्रजी शिंगणे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता ‘त्यानंतर ते मुंबईतील बीचकॅन्डी हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी दाखल झाले होते ‘यशस्वी उपचारानंतर नामदार डॉक्टर शिंगणे यांना 22 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता डिस्चार्जर मिळाला ।पुढील बारा दिवस ते विलगीकरण कक्षामध्ये आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे .नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खाते असल्यामुळे .गेल्या दीड वर्षापासून ते सतत कोरोनाच्या काळामध्ये औषधे च्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच मेडिकल दुकानदारांनी औषधाचा साठा करू नये यासाठी सतत संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत राहिले ‘तसेच कोरोना च्या काळामध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे त्यांना .सकाळ समूहातर्फे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्र्याच्या हस्ते ‘कोरोना योद्धा म्हणून सन्मानाने सुद्धा करण्यात आले होते .आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांचे मंत्रिमंडळातील सहकारी ‘ ना .राजेश भैय्या टोपे ना . जयंत पाटील ना .अनिलजी देशमुख ना .बच्चू कडू यांना सुद्धा कोरोना ची लागण झाली आहे हे सर्व मंत्री कोरोना च्या काळामध्ये सतत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लोकांच्या रक्षणासाठी फिरत राहिले ‘ ना .डॉ .राजेंद्रजी शिंगणे हे कोरोना मुक्त व्हावे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रार्थना सुद्धा केली होती !

राष्ट्रीय समाज पक्षाची यापुढे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी !

0

 

. । पक्षाचे नेते अतुलभाऊ भुसारी यांची माहिती . ।

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

या पुढील काळातील बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुका व बुलढाणा जिल्हा परिषद पंचायत समिती चा निवडणुका होतील त्या सर्व राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे.राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वाभिमानाने लढणारा पक्ष असून काही छोटे पक्ष आमच्या सोबत आले तर त्यांना सोबत घेऊ अन्यथा बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुका व जिल्हा परिषद ,पंचायत समिती , नगर परिषद च्या निवडणूक स्वबळावर लढण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची तयारी आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष असून त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही
राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मध्ये उत्साह वाढवा व. आगामी काळातील पक्षाची ध्येधोरणे याची रूपरेषा तयार करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार आदरणीय श्री.महादेवरावजी जानकर साहेब , पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार साहेब.श्री. रत्नाकरजी गुट्टे साहेब, अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व पक्षाचे महासचिव आदरणीय श्री.बाळासाहेब दोडतले साहेब , जिल्हा प्रभारी श्री.गजानन गोरोळे पाटील व अमोल काकड भगवान बावने राज्य कार्यकारिणी सदस्य यांचे नेतृत्वाखाली , मार्गदर्शनात व उपस्थिती मध्ये लवकरच बुलढाणा जिल्ह्यात पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल असे राष्ट्रीय समाज पक्षाचे बुलढाणा चे नेते अतुल भाऊ भुसारी पाटील सि.राजा तालुका अध्यक्ष रामप्रसाद लव्हकरे यानी सांगितले आहे !

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी भाजपाच्या वतीने सिंदखेड राजा येथे जेलभरो आंदोलन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

भारतीय जनता पार्टी सिंदखेडराजा तालुक्याच्या वतीने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भामध्ये जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये
भारतीय जनता पक्ष मतदार संघातील सर्व तालुके व,शहर,युवा मोर्चा,महिला आघाडी,तसेच सर्व आघाड्याचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस,सचिव,सदस्य बुध प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख ,जिल्हा पदाधिकारी ‘व सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते तथा शेतकरी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत तहसील कार्यालयासमोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे ‘ राज्यातील विजग्राहकांच्या व शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन करणार आहेत आवकाळी ग्रस्त आणि गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार रुपये मदत करू असे मुख्यमंत्री मा.ऊध्दव ठाकरे यांनी घोषणा केली होती या घोषणा प्रमाणे सरकारने मदत दिलीच नाही .आवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी 10 हजार रुपये मदत मात्र मोठा गाजावाजा करुन जाहीर करण्यात आली मात्र ही मदत देतांना असे निकष लावले की फार कमी शेतकऱ्यांना मदत मिळु शकली तसेच कर्ज माफी ही पुर्ण शेतकरी बांधववांना मीळु शकली नाही कर्ज माफी पासुन सुध्दा असंख्य शेतकरी अजुनपण वंचित आहेत .कोरोणा महामारीच्या काळातील विज बिल माफ करू अशी घोषणा करणारे हेच सरकार शेतकऱ्यांची विज तोडत आहे .शेतकरी आत्महत्या करत आहे.या सरकारच्या काळात शेतकरी हवालदिल झाला आहे.कोरोणा काळातील विज बिल माफ व्हायला पाहिजे. विदर्भातील शेतकरी बोंड आळीमुळे त्रस्त.झाला आहे.30लाख हेक्टर वरील पिकांची राज्य सरकारने अजुनही दखल घेतली नाही. हे शेतकरी अजून ही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 25 हजार रुपये एवढी मदत करणे आवश्यक आहे.
एकीकडे शेतकर्याना थकीत विज बिल भरण्यासाठी क्रुषीसंजीवनी योजना चालू करता ‘आणि ही योजना चालू असताना शेतकऱ्यांचा विजपुरवठा थकबाकी मुळे तोडता ?असला तुघलकी कारभार बंद करा अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन हे जेल भरो आंदोलन होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आव्हान या वेळी भाजपच्या वतीने सिंदखेड राजा भाजपा तालुका अध्यक्ष प्रा गजाननराव घुले यांनी केली आहे करण्यात आली आहे !

लोकसंघर्ष मोर्चा आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दे.माळी चा १० वर्षीय देवानंद राजगुरू द्वितीय. !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

शिवजयंतीनिमित्त लोकसंघर्ष मोर्चा जळगाव व्दारा आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धा 19 व 20 फेब्रुवारी 2021 ला पार पडल्या. यामध्ये देऊळगाव माळी ता.मेहकर येथील ग्रामीण भागातील देवानंद विष्णू राजगुरू याने 10 वर्षे वयोगटांमध्ये द्वितीया क्रमांक पटकावून गावाचे नाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा उंचावून दिले.
आयोजित स्पर्धेमध्ये दे.माळी येथील 9 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये देवानंद राजगुरू, कु.दिव्या मगर, प्रथमेश बळी, तेजस राजगुरू, कु.श्यामबाला काळे, विनायक मगर, कु.पुनम गिरी, विष्णू राजगुरू, विश्वनाथ मगर, यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यामध्ये सर्वांनीच चांगला खेळ खेळून परीक्षकाची मने जिंकली. यामधून देवानंद राजगुरू यांनी द्वितीय क्रमांक मिळवून विजय प्राप्त केला. त्यांच्या या यशाबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या यशाबद्दल दे.माळी सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशस्वीतेसाठी विष्णू राजगुरू सर, विश्वनाथ मगर सर यांनी मार्गदर्शन केले.

विवाह सोहळ्यासाठी २५ जणांची उपस्थिती असल्यामुळे अनेक नवरदेवांचा हिरमोड !तर काहींनी मंगल कार्यालय केली रद्द !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

कोरोना चा वाढता संसर्ग लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारी पासून लॉकडाउन घोषित करण्यात आली आहे ‘अनेक ठिकाणी निर्बंध सुद्धा घालण्यात आले आहे ‘यामध्ये सिनेमागृहे वायम शाळा तलाव नाट्यगृह आदी सर्व बंद करण्यात आली आहे ‘तर एसटी मध्ये सुद्धा 50 टक्के प्रवासी लाच परवानगी देण्यात आली आहे ‘तर मंदिरामध्ये फक्त दहा व्यक्तीलाच परवानगी आहे ।मागील वर्ष हे कोरोना च्या सावटाखाली गेले ‘त्यानंतर कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला व त्यानंतर हळूहळू राज्य सरकारने लॉक डाउन उठवल्यानंतर ‘सर्व काही सुरळीत झाले ‘यामध्ये महत्त्वाचे म्हणजे विवाह सोहळा होय ‘मागील लॉकडाऊन मध्ये साध्या पद्धतीने विवाह करणारे लॉक डावून उठल्यानंतर मात्र धाम धूम मध्ये लग्न करायचं या इराद्याने मैदानात उतरले होते ‘अनेक विवाह सोहळे हे ‘हजारो लोकांच्या उपस्थितीत पार सुद्धा पडले .त्यावेळी तशी परवानगी होती ‘अनेक नवरी व नवरदेव ज्या मुलांचे, मुलींची लग्न जुळलेत्यातील अनेक मुलांना असे वाटले की या वेळेस आपण धुमधडाक्यात लग्न करू ‘अनेकांनी महागडा डीजे .गाड्या सुद्धा बुक केल्या होत्या ‘अनेकांनी ॲडव्हान्स देऊन मंगल कार्यालय सुद्धा बुक केली होती .तर अनेक नवरदेवांनी नवरीच्या घरच्यांना फोन करून महागडा मंडप टाकण्याचे सुद्धा सांगितले होते ‘तर अनेक वधूपिता नी आपण अनेक नातेवाईकांना आंदन भांडे वाटप केले या आशेने आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात करू असे ठरवले होते ‘अनेकांनी डिझाईन व आकर्षक अशा महागडे पत्रिका सुद्धा छापल्या तर काही वाटल्यास सुद्धा ‘परंतु अचानक करुणा चा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रमध्ये वाढला बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढला ‘व जिल्हाधिकारी यांना 21 फेब्रुवारीपासून घोषणा करावी लागली ‘व वधू वरा कडील असे दोन्ही मिळून फक्त २५ जनांच्या उपस्थितीतचआता लग्नाचा कार्यक्रम उरकून घ्यावा लागणार आहे ।त्यामुळे ज्या वधू वरा कडील मंडळींनी लग्नाची तयारी केली होती त्यांचा मात्र पुरता हिरमोड झाल्याचे सध्या तरी दिसत आहे तर अनेक वधूपिता यांनी मंगल कार्यालय रद्द केले आहे ‘तर काहींनी जे झालं ते चांगलंच झालं अशी प्रतिक्रिया दिली आहे ।

जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती श्री रविंद्र सुर्यभान पाटील(छोटुभाऊ) यांच्या विकास निधीतून साकळी- दहिगाव गटात 52 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

0

 

तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

दि.21/2/2021 वार रविवार रोजी दु.१२ वा वार्ड क्र 3 मध्ये (पेवर ब्लॉक बसवणे भूमिपूजन
छोटू भाऊच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले .या वेळी त्यांच्या सोबत सकाळी चे पीक सवरक्षणं चे चेअरमन दीपक पाटील , माजी सरपंच मुसेखा इसेखा पठाण , साहेबराव बालगुजर , सलीम शेख आदीची उपस्थित होते .वार्ड क्र 3 विरावली मधील ग्रा प सदस्य ऍड देवकांत बाजीराव पाटील ,शोभा युवराज पतील, हमीदा टेनू तडवी , माजी ग्राम पंचायत सदस्य पवन पाटील , रणधीर पाटील , रंगुबाई तडवी या सह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी विकास कांमच्या भूमीपूजनासाठी गावातील कैलास पाटील , गोरख पाटील , गणेश पाटील ,दगडू तडवी ,बाळू पाटील ,संजू तडवी ,राजेश अडकमोल , हर्षल धनगर , दशरथ पाटील ,खगेश पाटील , हिरामण पाटील , नरेंद्र निळे , संभाजी पाटील , शरद पाटील , रमेश तडवी ,प्रदीप पाटील , दिलीप निळे , मोहित पाटील धिरज पाटील, संजू पाटील राजेश पाटील ईश्वर पाटील , बापू अजलसोंडे , सुमेरसिंग पाटील ,दर्पण पाटील , राहुल पाटील ,दिनेश फुलपगारे .
उपस्थितीत होत या प्रसंगी ऍड देवकांत पाटील सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले पवन पाटील उपस्थितांचे आभार मानले .
रविंद्र सुर्यभानपाटील(छोटुभाऊ)
सभापती:-शिक्षण,क्रिडा व जि. प.जळगांव यांचे
सर्व विरावली वासीयांच्या वतीने छोटू भाऊ चे मना पासून धन्यवाद !!

विरोधी पक्षनेते ना.देवेंद्रजी फडणवीस यांची लोकनेते विजयराजजी शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट

0

 

मोताळा:- बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्न व सहकार्याबद्दल ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज लोकनेते विजयराजजी शिंदे यांनी नागपुर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. त्याच प्रमाणे लोकनेते विजयराजजी शिंदे यांनी आगामी काळात होऊ घतलेल्या भारतीय जनता पक्ष बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे स्नेह पूर्वक निमंत्रण सुद्धा दिले.यावेळी निमंत्रणाचा स्विकार करून “आम्ही नक्की उपस्थित राहु” असे आश्वासन सुद्धा ना.फडणवीस साहेब यांनी दिले आहे. तसेच जिल्ह्यातील पक्ष संघटन,विकास कामे व इतरही अनेक विषयांवर ना.देवेंद्रजी फडणवीस व लोकनेते विजयराजजी शिंदे यांची सविस्तर चर्चा या भेटी दरम्यान झाली.
याप्रसंगी बुलडाणा नगर परिषद नगरसेवक मंदारजी बाहेकर व दत्ताजी पाटिल,प्रशांतजी नारखेड़े, यांचीही उपस्थिति होती.

छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांना अभिवादन करताना स्‍वराज फौंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी ,

0

 

तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी श्री संत संताजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय चुचाळे, तालुका यावल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अरमान तडवी व स्वराज फाउंडेशन चे अध्यक्ष भरत चौधरी यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच प्रतिमा पूजन, गोकुळ कोळी संजय तडवी ,यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास सलीम तडवी पत्तू तडवी, दीपक कोळी ,सुधाकर कोळी ,पंडीत कोळी ,अरुण चौधरी ,उपस्थित होते यावेळेस स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष भारत चौधरी ,त्यांनी शिवाजी महाराजांविषयी आपले विचार मांडले अशाप्रकारे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली

अट्रावल मुंजोबा यात्रेत कोरोना संसर्ग नियमांची पायमल्ली नवस फेडण्यासाठी १० जणांनी यावे मंदीर विश्वस्तांचे भाविकांना आवाहन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान मुंजोबा देवस्थान या ठिकाणी मराठी माघ महीन्यात दिनांक १३ फेब्रुवारी ते माघ पोर्णिमा २७ फेब्रुवारीपर्यंतचे यात्रा उत्सव सुरू झाले असुन , संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेली यंदाची यात्रा ही कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून नियमांचे अधिन राहुन यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असतांना देखील दर्शनासाठी भाविकांचा गर्दीचा ओघ पाहता मुंजोबा देवस्थान समस्त कोळी पंचकमेटी अट्रावल च्या वतीने सर्व भाविकांनी देवस्थानावर नव फेडण्यासाठी येतांना फक्त १० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असुन , भाविकांनी इतर दिवशीही देवस्थानाचे दर्शन घेता येईल , कोरोना विषाणु संसर्गा पार्श्वभूमीवर सदर शासनाच्या प्राप्त झालेल्या सुचनांचे पालन करून देव दर्शनासाठी नियमांचे काटेकोर पालन करून दर्शनासाठी यावे असे असतांना देखील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडुन व स्थानिक आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या व विश्वस्त मंडळाच्या दिरंगाईमुळे कोरोना विषाणु संसर्गाच्या नियमांना धाब्यावर ठेवुन यात्रेत भाविकांची मोठी गर्दी उसळली असुन , या गर्दी कडुन शासनाचे सर्व नियमांचे उल्लघंन होतांना दिसुन येत आहे . तरी उर्वरीत यात्रा उत्सवासाठी दर्शनासाठी भाविकांनी कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे असे आवाहन मुंजोबा देवस्थान विश्ववस्तच्या वतीने अध्यक्ष ललित किटकुल कोळी , दिपक तायडे , प्रभाकर कोळी, अनिल कोळी , जनार्दन कोळी , विक्रम कोळी, जगन कोळी आणी पोलीस पाटील पवन चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे .

गारपीटग्रस्त भागाची जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी नुकसान झालेल्या गहू कांदा हरभरा पिकाची पाहणी गहू हरभरा मका पिकासाठी हेक्टरी 59 हजार रुपये तर फळबाग कांदा नेट साठी 1 लाख रुपये तातडीची मदत द्या राका जिल्हाध्यक्ष ऍडवोकेट काझी यांची मागणी

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्यात दिनांक 19 व 20 रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 18 हजार हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नुकसान ग्रस्त सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, झोटींगा देऊळगाव कोळ, डोरव्ही आदी भागातील अवकाळी पा ऊस गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी राका जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी यांनी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसू बघितले क्षणात होत्याच नव्हते झाल्याने शेतकऱ्यांता च्या हातातोंडाशीी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने गहू हरभरा नका या पिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये तर फळबाग कांदा पिकासाठी 1 लाख रुपये तसेच नेट शेड साठी 1 लाख रुपये तातडीची मदत करावी अशी मागणी एडवोकेट नाझेर काझी यांनी केली असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांना सांगणार असल्याचे सांगितले
जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शेतात उभे असलेले हरभरा गहू मका चे पीक कांदा पिक अक्षरशा झोपली फळबाग पीक आंबा मोहर गळून गेला नेट शेड उध्वस्त झाले प्रचंड नुकसान झाले आतील पिकाचे प्रचंड नुकसान झाले टरबूज काकडी टोमॅटो मिरची आदी चे पिक या अवकाळी पावसाचा गाराचा मार लागल्याने खराब झाली गळून पडली आहे सिंदखेड राजा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकेल असा अंदाज आहे आज एडवोकेट नाझेर काझी यांनी मलकापूर पांग्रा देऊळगाव कोळ डोरली आदी भागातील शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतातील नुकसान पाहून तेथील परिस्थितीचा अंदाज आला शेतकऱ्यांनी झालेल्या गारपीट च आणि अवकाळी
आपबीती सांगितल्याने सर्वांच्या डोळ्यात आसवे आली त्यामुळे या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मदत करावी त्यानंतर सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसानी संपूर्ण मदत द्यावी अशी मागणी एडवोकेट नाझेर काझी यांनी केली यावेळी पाहणी करताना त्यांच्यासोबत राका तालुकाध्यक्ष शिवाजी राजे देशमुख राका विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदीप मेहेत्रे पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांचे स्वीय संभाजी पेटकर सरपंच भगवानराव उगले माजी सरपंच अहमद यारखा आदर्श कास्तकार बंडू उगले देऊळगाव कोळ सरपंच राजू गायकवाड संजय गायकवाड उद्धव गायकवाड डोरव्ही सरपंच बाळू पवार उपसरपंच मुरकुट माजी सरपंच उद्धव शेळके वसंत मुरकुट तुकाराम पंखुले रत्नाकर पंखुले दिनकर सोळंके गजानन शेळके प्रकाश मुरकुट अनिल मुरकुटे गणेश मुरकुटे अमोल साळवे आदी उपस्थित होते.