Home Blog Page 529

यावल ते किनगाव रस्ता बनला मृत्युचा सापळा दोन वर्षात २२ निरपराधांचा झाला अपघातात दुदैवी मृत्यु सा . बा .वि . भोंगळ कारभार

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे ,

तालुक्यातील बु्ऱ्हाणपुर ते अकंलेश्र्वर राज्य मार्गावरील यावल ते किनगाव रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन या मार्गावरील रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे .या मार्गावरील मागील दोन वर्षात झालेल्या रस्त्यावरील विविध अपघातामध्ये २२ निरपराध लोकांचा अपघातात बळी गेला असुन , वारंवार या मार्गावर होणाऱ्या अपघाता संदर्भात यावलच्या निष्क्रीय सार्वजनिक बांधकाम विभागास स्थानिक पातळीवर समाजसेवी संघटना व राजकीय पक्षांच्या माध्यमातुन अनेक निवेदन देवुन देखील काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसुन आले नसुन, सार्वजानिक बांधकाम विभागाच्या या अंधेर नगरी चौपट राजा अशा कारभारा विषयी सर्वसामान्य नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान यावल ते किनगाव या मार्गावरील १३ किलोमिटरच्या रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन , यामुळे वाहनचालकांना वाहने चालवितांना वाहनधारका तारेवरची कसरत करावी लागते , प्रसंगी वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघातास सामोरे जावे लागते , यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत आणी निष्क्रीय कारभाराच या आजपर्यंत झालेले अपघात आणी त्यात मरण पावलेले लोकांच्या मृत्युस जबाबदार असल्याची संत्पत प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे . आता तरी लोकप्रतिनिधींनी यावलच्या निंद्र अवस्थेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास बाहेर आणावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .

कोरपावली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कॉंग्रेसचे विलास अडकमोलतर उपसरपंचपदी हमीदा पटेल यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असुन ,सरपंचपदाची माळ काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हा मीडिया प्रमुख तरूण पदाधिकारी विलास नारायण अडकमोल यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्या काकू हमीदाबी पिरण पटेल यांची मतदानाव्दारे निवड करण्यात आली आहे . यावेळी उपसरपंचपदा साठीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हमीदाबी पिरण पटेल यांना ६तर प्रतिस्पर्धी दीपक चुडामण नेहेते यांना ५मते मिळाल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी पी. आर. कोळी यांनी विजयी घोषीत केले . काँग्रेसच्या हमीदाबी पटेल यांचा १मताने विजयी झाला .यावेळी ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी,ग्राम पंचायत सदस्या हफशान तडवी, हुरमत तडवी, दीपक नेहेते, कविता कोळंबे, भारती नेहेते, सपना जावळे, आफरोज पटेल हे सर्व ११ सदस्य सरपंच उपसरपंच निवडीच्या बैठकीला उपस्थित होते . या निवडणुक निर्णय अधिकारी यांना याकामी ग्रामसेवक प्रवीण सपकाळे यांनी सहकार्य केले ,यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा पॅनल प्रमुख पिरण पटेल, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बारसु रामदास नेहेते, नारायण अडकमोल, ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, मुक्तार पटेल, इस्माईल तडवी, प्रेमचंद महाले, संदीप नेहेते, शांताराम महाजन,अजित तडवी, अब्दुल तडवी ,उमेश जावळे ,इकबाल मेंबर, गफ्फार मेंबर, सिकंदर तडवी, मुकदर तडवी, मुज्जफर पटेल, कय्युम पटेल, महंमद पटेल, जावेद पटेल,सुनील अडकमोल, भीमराव इंधटे, विनोद अडकमोल, भैय्या अडकमोल, उपस्थित होते पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहित सुशील घुगे, अस्लम खान सह पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला, या निवडीबद्दल सरपंच , उपसरपंच यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, अजबराव पाटील, हाजी शब्बीर खान , संदीप सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

सरपंच ग्रामपंचायत मध्ये बसताच जण हितार्थ कामावर एक्शन,

0

 

गोंदिया शैलेश राजनकर

फुलचुर ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच मिलन भाऊ रामटेक्कर आपल्या कार्यालयात येताच एक्शन मूड मध्ये,त्यांनी फुलचुर ग्रामपंचायत मधील काही लोकांच्या समस्या येकूण त्या वर व आलेले गावकरी बंधूंच्या सोबत होत असलेल्या तीन समाश्यांचा निराकरण करण्यात यशस्वी झाले,पहिली समस्या ग्रामवासीयांना पिण्याच्या पाण्याची कोणत्या कारणा मुळे गैर सोय होत आहे,तर त्यांनी पागोली नदीवर लावलेल्या पम्प हाऊस मध्ये जाऊन पाहणी केली,व समनधीत अधिकाऱ्याला बोलावून या या पम्प हाऊस ची रिपेरिंग करून जनतेला स्वच्छ पाणी मिळेल अशी व्यवस्था लवकरात लवकर करावी,दुसरी समस्या ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला राईस मिलचा घाण पाणीचा डपका तयार झाला व तो जमा घाण पाण्याची दुर्गन्ध पसरत असल्या मुळे गाव कऱ्यांना त्रास होतो, व राईस मिलची राखड तेही रस्त्याच्या बाजूलाच टाकण्यात येत असल्यामुळे, त्या रस्त्यावरून बाईक सवार,पायदळ चालणारे याच्या डोळ्यात किंवा वारा आलं कि ती राख लोकांच्या घरात शिरते,म्हणून त्यांनी सरळ त्याच वेळेस राईस मिल मध्ये जाऊन समनधीत मालकाला सूचना दिली कि आपण आपल्या राईस मिल मधील पाणी व राखडी ची स्वतः दोन महिन्याच्या आत व्हिलेवाट लावा, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल, व त्यांनी सुद्धा आम्ही आपल्या शब्दाचा मान ठेवत लवकरात लवकर राखड व पाण्याची व्यवस्ता करू,त्यानंतर अवेध दुरसंचार टॉवर परवानगी न घेता उभं करण्यात आलं त्याला त्वरित टॉवर काढा व पोलीस ठाण्यात सुद्धा समनधीत टॉवर विरोधात तक्रार करण्यात आली कि आपण सात दिवसाच्या आत जर अवैध टॉवर काढणार नाही तर ग्रामपंचायत तर्फे हा टॉवर काढण्यात येईल, असे ताबळतोब निर्णय घेण्यात आले,व त्यांनी सर्वाना सांगितलं कि आज माझा पहिला दिवस आहे जसजसे मला जनतेच्या हिताचे काही नवीन योजना आल्या असतील त्याला आपण सर्वांनी मिळून कार्यवीनंत करू,कारण मला जनतेनी या फुलचुर गावाच कस नवनिर्माण होईल या करीता माझ्यावर विश्वास ठेऊन मला निवडून आणलं, व मी माझी जवाबदारी खुद लक्ष देऊन इथल्या जनतेला न्याय मिळेल अस काम करणार यात दुमत नाही,व मी सर्व फुलचुर ग्रामवासीयांच मनापासून आभारी आहे कि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला सरपंच पदाचा मान दिल्या बद्दल मनापासून आभारी आहे,

किनगाव जवळ पपई ने भरलेला आयशर ट्रक पलटी १५ मजुरांचा जागीच मुत्यु एकाच कुटुंबातील १० जणांचा समावेश

0

 

यावल प्रतिनिधी  विककी वानखड़े

धुळे जिल्ह्यातुन पपई भरून येणारी आयशर
यावल तालुक्यातील किनगावजवळ उलटली असून
यात काम करणारी १५ मजूरांचा गुदमरून जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. याचअपघातातील दोन जण गंभीर असल्याने मृतांचा
आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत वृत्त असे की नेर (धुळे) येथून पपईने भरून
आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास
किनगाव नजिक मोठाअपघात झाला आहे. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मयत सर्व रावेर तालुक्यातील आभोडा, केहाळा व रावेर शहरातील असल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण मजूर असल्याचे समजते. गाडीत एकूण २१ जण होते. यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात नेले आहे.अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी अपघातस्थळ गाठलेअसूनत्यांनीअपघातातीलमृतांच्या आकड्याला दुजोरा दिला आहे. अपघातात मृत
झालेल्यांचे मृतदेह यावल येथील ग्रामीण रूग्णालयात
आणण्यात आलेली आहेत. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यानी भेट दिली असुन अपघाताची सविस्तर माहिती घेण्यासाठी ते यावल येथे दाखल झाले आहे . यावलच्या ग्रामीण रुग्णालयात विभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलग , विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळेआमदार शिरीष चैधरी अनिल भाऊ चैधरी आनंद भाऊ बाविस्कर यानी भेट दिली

जातेगांव येथे १४ फेब्रुवारी काळा दिवस म्हणून पाळला : पूलवामातील शहिदांना श्रध्दांजली.

0

 

 

प्रतिनिधी -सचिन पगारे
नांदगांव नाशिक

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीर मधील पूलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीसाठी १४ फेब्रुवारी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .येथील शिवाजी चौकात सदर कार्यक्रमाचे आयोजन पिनाकेश्वर माजी सैनिक संघटनेने केले तसेच याठिकाणी तमाम ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर मधील पूलवामा येथील जवानांवर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गावातील पिनाकेश्वर माजी सैनिक संघटनेकडून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब चव्हाण यांनी केले. पिनाकेश्वर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संपत पगारे आणि पदाधिकारी यांनी शहिद जवानांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. मनोज गर्जे, संदीप पवार,नारायण पवार ,विजय पाटील यांनी आपले मत व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली. याठिकाणी माजी सैनिक कृष्णा शिंदे,रामदास पवार,मनोज बागूल,विष्णू झोडगे ,विष्णू पवारआदीसह ग्रामस्थ व तरुण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण सुनगाव येथे वाहिली शहिदांना श्रद्धांजली…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

देशाला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. देशभर या शहिदांचे स्मरण करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.यानिमित्त जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी श्रध्दांजली पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी शिव स्वराज्य गृप,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जय शिवराय जगदंबा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.सुत्रसंचालन गणेश वसुले यांनी केले. तर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी अशोक काळपांडे, महादेवराव धुर्डे, गुणवंराव कपले,नवनियुक्त सरपंच रामेश्वर अंबडकार,मोहनसिंह राजपुत, पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत, रवी बानाईत,संदिप धुळे, अतुल गिर्हे, विशाल वसुलकार,रमेश वंडाळे, आनंद धुळे, स्वप्निल वंडाळे,स्वप्निल तेटु,योगेश गवई,पंकज भगत, प्रविण रौदळे,शुभम कापरे,राजु येउल,रवि घोलप,रामदास धुळे, गणपत अंबडकार, विठ्ठल तेटु,शरद वानखडे, ऋषिकेश येउल, गौरव घोपे, रवि दामधर, समाधान धुळे, विनोद ढगे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

साकळी येथे शिवसेना युवा सेना तर्फे कोरोना संसर्गाच्या काळात आपले जिव धोक्यात घालुन वृत्त लेखणातुन व आरोग्य जनजागृती करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांचा सन्मान व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला  

0

 

संपुर्ण जगासह आपल्या देशात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या संकटकाळात नागरीकांना प्रत्येक दिवसाची माहीती देवुन खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीकोणातुन आपले स्वत:चे जिव धोक्यात घालुन वृत्तसंकलनाच्या माध्यमातुन जनजागृतीचे कार्यकरणाऱ्या पत्रकारांचा, आशा सेविका मदतनीस,आरोग्य कर्मचारी,युवा सेना शिवसेना पक्षाचे आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या युवा सेना शिवसेना पक्षातर्फे सत्कार सोहळा आज साकळी येथे संपन्न झाला.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या या पत्रकारांच्या व आशा सेविका मदतनीस आरोग्य कर्मचारी सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सौ.लताताई सोनवणे, उपजिल्हाप्रमुख मुन्ना भाऊ पाटील ,यांच्या हस्ते हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पूजन करून कोरोणा योद्ध्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे यावेळी ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे,युवा सेना प्रमुख प्रवीण सोनवणे, उपप्रमुख विनायक आप्पा पाटील, स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी , प्रदीप वानखेडे ,दीपक कोळी ,सुधाकर धनगर , प्रकाश चौधरी, आशिष झुरकाळे, त्याच बरोबर सूत्रसंचालन डॉक्टर सागर पाटील, व युवा सेना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर रहावे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे शिवजयंती साधेपणाने साजरी करावी

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांती प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य टिकून राहून प्रगती होते. तरी नवीन भरती होणाऱ्या पोलिसांनी ही बाब प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर रहावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
स्थानिक प्रभा सभागृह येथे अनुकंपा तत्वावर पोलीस शिपाई पदावर नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे आदी उपस्थित होते.
आगामी येणारी शिवजयंती कोविड आजाराच्या पार्श्वभूमी वर साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले, शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात यावी. याबाबत सर्वत्र जनजागृती करावी. माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी पोलिस यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. गुणवत्तेच्या आधारावर निवड होणे ही बाब ती उमेदवारांच्या बाबतीत महत्वाची असते.
यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कार्यक्रमा मागील आयोजनाची भूमिका विषद केली. याप्रसंगी पोलीस विभागातून पोलीस अंमलदार या पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर एमपीएससी विभागीय परीक्षेतून निवड झालेले अंमलदार यांचा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये रमेश दळवी, नानाभाऊ काकड, विष्णू बोडखे, शेख अख्तर शेख सत्तार व संदीप बालोद यांचा समावेश आहे.
तसेच अनुकंपा तत्त्वावर भरतीतील उमेदवारांना पोलीस शिपाई या पदावर नेमणूक देण्यात आली आहे. अशा सर्वांना पालकंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस दलात ३१ जणांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. संचलन पोलीस शिपाई निलेश रत्नपारखी यांनी तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनगाव येथे नवनियुक्त सरपंच रामेश्वर भाऊ अंबडकार यांनी स्वीकारला पदभार तर उपसरपंचपदी सगीराबाई तडवी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारीला झाली होती त्यादृष्टीने 18 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागला होता व 9 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची निवडणूक ठरली होती त्यादृष्टीने भाजपाकडून रामेश्वर भाऊ अंबडकार यांचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता व महाविकास आघाडी यांच्याकडून कौशल्या दिनेश ढगे यांचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता व भाजपाकडून उपसरपंच पदासाठी सगीराबाई उमेद तडवी व महा विकास आघाडी यांचेकडून दीपिका रामसिंग राजपूत यांचा उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता त्यामध्ये श्री रामेश्वर भाऊ अंबडकार यांना 9 मते पडली त्यामुळे त्यांचे सरपंच पदी निवड झाली व उपसरपंच पदी संगीराबाई उमेद यांना 9 सुद्धा मते मिळाली त्यामध्ये त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाली त्यानंतर ग्रामपंचायत येथे श्री रामेश्वर भाऊ अंबडकार यांनी आपल्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला व तसेच सगिरा भाई उमेद तडवी यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला यावेळी नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य संतोष शत्रुघ्न वंडाळे बळीराम धुळे ज्योती उत्तम ढगे योगिता उमेश कुरवाडे विमल समाधान काळपांडे नंदा रियाज तडवी श्याम भुरा निहाल यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गुणवंतराव कपले जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई काळपांडे पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे रमेश वंडाळे राजेश झंवर अनिल ढगे नारायण भाऊ अंबडकार माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश अंबडकार मोहनसिंह राजपूत अनिल ढगे ज्ञानेश्वर धुर्डे ऋषी येउल राजेश येउल लक्ष्मणराव काटोले सूनगाव ग्रामपंचायतीचे सचिव चौधरी साहेब व ग्रामपंचायत कर्मचारी व सूनगाव येथील भाजपा कार्यकर्ते हजर होते

बोदवडचे पत्रकार गोपाळ व्यास यांना अपमानास्पद वागणुक देणाऱ्या पोलीस निरिक्षकांचे भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघातर्फ निषेध

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

बोदवड येथील लोकमतचे प्रतिनिधी गोपाळ व्यास आपल्या वृत्तसंकलनाच्या कार्यासाठी गेले असता पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक यांनी अपमानास्पद वागणुक दिल्याच्या घटनेचा भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ , महाराष्ट्रच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असुन , पोलीस निरिक्षक गायकवाड यांच्यावर तातडीने कारवाई करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे . या संदर्भात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघा महाराष्ट्रच्या वतीने पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , बोदवड येथील राहणारे दैनिक लोकमतचे प्रतिनिधी गोपाळ व्यास हे एका गुन्ह्याच्या संदर्भातील वृत्तसंकलनासाठी बोदवड पोलीस स्टेशनला गेले असता व्यास यांनी अगोदर प्रसिद्ध केलेल्या एका बातमीचा त्यांच्यावर संताप व्यक्त करीत पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड यांनी गोपाळ व्यास यांना धक्के देत पोलीस स्टेशन मधुन बाहेर निघ असे म्हणत अरेरावी केली व तुला किती बातम्या छाप्याच्या आहेत छाप माझे काही होत नाही व या पुढे या ठीकाणी यायचे नाही असा दमही दिला, अशा प्रकारे एका जबाबदार पत्रकार यांच्याशी अशी वागणुक देण्याऱ्या पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड यांचा जाहीर निषेध भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ , महाराष्ट्रच्या वतीने व्यक्त करण्यात येत असुन , अशा बेजबाबदार पोलीस निरिक्षकांवर वरिष्ठ पातळीवर योग्य ती तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली असुन , या निवेदनावर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब जी . पटेल , प्रदेश सचिव जिवन चौधरी , डी .बी . पाटील , सुनिल गावडे , शब्बीर खान सरवर खान , काबीज शेख समद , विक्की वानखेडे , बेबाबाई सुधाकर धनगर , लतीफ तडवी , सुधाकर धनगर आदी पत्रकारांच्या स्वाक्षरी आहे .