Home Blog Page 528

साखरखेर्डा येथील ठाणेदाराचा बाणेदारपणा कायम!स्वतः गाडीत फिरून दुकाने बंद करण्याचे केले आव्हान ! जिल्ह्यात सोमवार ७ सकाळी पर्यंत सर्व दवाखाने वगळता सर्व दुकाने राहणार कडकडीत बंद !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता बुलढाणा जिल्ह्यामध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून ‘सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व च दुकाने शनिवार व रविवार या दोन सुट्टीच्या दिवसांमध्ये सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडकडीत बंद असणार आहे ‘दवाखाने व औषधे दुकाने24 तास सुरू राहणार असून दूध विक्रीसाठी सकाळ ते दुपारी आणि संध्याकाळी दोन तास वेळ राहील ’27 फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेपासून हि कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे ‘याबाबतचे शुद्धिपत्रक बुलढाणा जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी काढले आहे व एक दिवस संचारबंदी वाढवली आहे दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद असणार आहे ‘शनिवार व रविवार हे दोन दिवस सुट्टी असल्यामुळे तसेच जिल्ह्यामध्ये संचारबंदी असल्यामुळे गर्दी होण्याचा संभाव्य धोके लक्षात घेऊन ‘हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे ‘तालुक्यातील साखरखेर्डा येथे सुद्धा दोन दिवस कोणीही घराच्या बाहेर निघू नये व सर्व दुकाने बंद करण्याचे आव्हान खुद साखरखेर्डा चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांनी केली आहे,त्यांनी स्वतः गाडी मध्ये फिरून लाऊड स्पीकर च्या माध्यमातून हे आवाहन केले आहे,काही ठिकाणी आपण बघतो की कोणत्याही खात्याचे प्रमुख हे मध्ये कॅबीन मध्ये बसून आदेश सोडत असतात पण खुद ठाणेदार पल्या पोलिस कर्मचार्‍यांना सोबत घेऊन त्यांचा उत्साह वाढवताना दिसत आहे ‘ श्री आडोळे यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा दिसून आली आहे ‘

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांमागे इंडियन मुजाहिद्दीन?;  पोलिसांच्या तपासाला वेग……

0

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे.
ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती.
गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान घटनेनंतर अंबानींच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दुसरीकडे तपासदेखील सुरु करण्यात आला आहे.
रिपब्लिकने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई क्राइम ब्रांचने तपास हाती घेतला असून १० पथकं तयार करण्यात आली आहेत.
एक टीम परिसरातील सर्व सी.सी.टी.व्ही तपासणार आहेत.
तर दुसरी टीम वाहतूक मुख्यालयाती कॅमेरांमधील फुटेज तपासणार आहे.
एक टीम क्रॉफर्ड मार्केटमधील मुंबई पोलीस मुख्यालयातील सी.सी.टी.व्ही. तपासणार आहे.
चौथी टीम आजुबाजूच्या परिसरातील संशयास्पद लोकांची माहिती मिळवणार आहे.
तर एक टीम संशयितांची माहिती मिळवण्यासाठी फॉरेन्सिक टीमच्या संपर्कात आहे.
“नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है”, स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमध्ये पोलिसांना सापडलं पत्र दरम्यान इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित एका सदस्याची माहिती मिळवण्याची जबाबदारीदेखील एका टीमवर सोपण्यात आली आहे.
इंडियन मुजाहिद्दीनच्या या सदस्याने २०१३ मध्ये अंबानींच्या मरिन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकी देणारं एक पत्र पाठवलं होतं.
इतर दोन टीम आतापर्यंत हाती आलेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करत आहेत.
याशिवाय पोलीस बी.एम.सी. पार्किंगमधील फुटेजची तपासणी करत आहे.

विज कंपनिने सरु केलेली सक्तीचि वसुली थाबवावि

0

 

सुनिल पवार, नांदुरा. ता.प्रतिनिधि

संपूर्ण बुलढाणा जिल्हा लाकडाउन असतानाहि नांदुरा तालुक्यातील चादुरबिसँवा येथे विज कंपनी चे अभियंता व.सात आठ करमचारि यांची पुरन टिम चांदुरबिचवा गावामध्ये दाखल झाली घरोघरी जाऊन सक्ती चि वसुली करित आहेत तर काही लोकाचि बिल न भरल्या मुळे विज.कापण्यात सुद्धा आली आहे कोरोना माहामारि मुळे मारच२०२१पर्यंत गेल्या नहु ते.दहा महिन्यापासुन विज बिल पेंडिग आहे सरकार विजबिल माफ करेल अशी आशा गावकरी यांना होती त्यामुळे गावकरी याना विज बिल भरले नाही सरासरी१०ते१५हजार चे आसपास बिल हे पेंडिग आहे व.तरी सवँ शेतकरी व मजूर असल्याने एवढे विजबिल हे एक रकमि भरू शकत नाही त्यामुळे विज वितरन कंपनीच्या अभियंता करमचारि यांनी चांदुर येथे सक्ती चि वसुलि न करता पयाँयि टप्प्याने तडजोड करावी अशि मागनि येथील गावकरी करित आहे

बडगाव (म.) सरपंच अवैध वीटभट्टी अवैध मार्गाने चालवित असून, 3 वर्षांपासून जबाबदार अधिकारी कारवाई करू शकले नाहीत

0

 

गोदिया-शैलेश राजनकर

लांजी (श्रेयश तिडके). जबाबदार जर अवैधरीत्या व्यवसाय करतील तर मग जनतेकडून यातून काय शिकायला मिळेल, जेव्हा प्रमुख बेकायदेशीर कामात सामील असेल तेव्हा जनतेकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते. असेच एक प्रकरण लांजी तहसील अंतर्गत बडगाव (म) येथील आहे ज्यात सरपंच अवैध धंद्यात गुंतलेले आहेत आणि हे कृत्य महसूल नियमांच्या विरोधात आहे, जरी पूर्वीचे अधिकारीदेखील लक्ष न दिल्याने हे कार्यवाही केली जात नाही तरी हे बेकायदेशीर आहे सरपंचांकडून ० rains पावसापासून सतत व्यवसाय सुरू असतो, प्रशासकीय विभागाने केलेल्या तपासणीत हा उपेक्षा कसा आहे.

– असा अवैध व्यवसाय चालू आहे
सरपंच रामेश्वर लिल्हारे यांनी 01 हजार विटांना 825 रुपये देऊन जवळपास 08 मजुरांची स्थापना केली आहे, बडगाव (म) ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सध्या अशा वीटभट्ट्या सध्या शेतात कार्यरत असून तिसरा भट्टा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सरपंच रामेश्वर लिल्हारे यांची ही कारवाई उघडकीस आणून सांगा की, वरील वीटभट्टी साइटवर सरपंचांनी सुमारे -०-60० हजार विटा बनवल्या आहेत, परवान्याशिवाय वीटभट्टी तयार करणे बेकायदेशीर आहे व शासकीय नियम पाळले जात आहेत. घर बांधण्यासाठी विटा बनवण्याच्या मुदतीची मर्यादा ओलांडल्यामुळे, परवानाधारक आणि कुंभाराच्या वीटभट्टी व्यवसायावर याचा विपरित परिणाम होत आहे, प्रशासनाने याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, परवानाधारक व्यापा of्यांचा हक्क घेतला जात आहे. लांब.
प्रशासनाचे निष्काळजीपणा उघडकीस आले
लांजी तहसील अंतर्गत बडगाव (एम) गावचे सरपंच रामेश्वर लिलहरे यांनी कबूल केले आहे की सरपंच पदावर असताना त्यांच्याकडून अवैध धंद्याची कामे केली जात आहेत आणि या जवळपास years वर्षात त्याने काही प्रमाणात माती खाण केले आहे., वीट घेण्यास परवानगी भट्टी वगैरे घेतले नाहीत, त्यानंतर हे उघडकीस आले आहे की 3 वर्षे प्रशासन या संदर्भात कोणतीही कार्यवाही करू शकत नाही, आता त्यास सरपंचांचे बेकायदेशीर व्यवसाय धोरण म्हणा किंवा सुप्त प्रशासनाचे दुर्लक्ष.

– कृती वर लक्ष
आधीच्या प्रशासनाकडून किंवा खनिज व महसूल विभागाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही की अधिकारी काही बाबतीत शिथिल वृत्ती बाळगतात. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लोकांना याची खात्री आहे की काही ठोस कारवाई केली जाईल, शक्यतो अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्याच्या हलगर्जीपणाच्या कारणामागील कारण अद्याप समजू शकले नाहीत, परंतु ही माहिती खनिज विभाग किंवा महसूल विभागाला दिली जावी. गेल्या 03 वर्षात अशा अनेक अवैध वीटभट्टी व्यापा .्यांवर प्रक्रिया केली गेली.

– ते म्हणतात
१ / 3-4- 3-4 वर्षे विटभट्ट्या चालवत आहेत, जिल्हा उद्योगाला मान्यता दिली आहे. जिल्हा उद्योगाने सांगितल्याप्रमाणे एक माणूस आला होता, त्यांनी सांगितले होते की तहसीलदार व महसूलकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. 8 मजूर काम करत आहेत, 1 हजारांना 825 रुपये देतात.
रामेश्वर लिलहरे, सरपंच, बुडगाव (म.)

२ / याबाबत अद्याप कोणतीही माहिती नव्हती, ही बाब आता संज्ञानात आली आहे, नियमानुसार कारवाई केली जाईल.
आरपी मार्के, तहसीलदार लांजी

सावखेडासिमच्या जंगलात शेतकरी तरूणास मधमाश्यांनी हल्ला करून केले गंभीर जखमी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

तालुक्यातील दहिगाव गावापासुन तेथून जवळच असलेल्या सावखेडासिम शिवारात सावखेडासिम येथील राहणाऱ्या संदीप हरी बर्डे या ३५ वर्षीय तरुणास सातपुड्याच्या जंगलातील निमळाव रस्त्यावर आपल्या शेतात कामास जात असताना अचानक आगे मोहोळा वरील मधमाशांनी हल्ला घालून शरीरावर विविध ठीकाणी जावा घेत त्यास जबर जखमी केल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संदीप हरी बर्डे हा युवक आपल्या शेतात कामासाठी जात असतांना यांच्या शेत शिवाराजवळ अचानक मद्यमाश्यांनी हल्ला करीत बर्डे यास गंभीर जख्मी केले .जख्मी संदीप वर सावखेडा सिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास घरी परत पाठवले आहे .

यावलचे शुक्रवारी भरणारे आठवडे बाजार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बाजार प्रशासनाने रद्द केले आहे

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

येथील शहरात शुक्रवारच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन नगर परिषद प्रशासनाने बाजार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .दरम्यान मागील काही दिवसांपासुन महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या टप्याने पुनश्च आगमन केले असुन , जळगाव जिल्ह्यात देखील सातत्याने बाधीत रुग्णांची संख्या वाढली असुन या मुळे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले असुन , यातच यावल तालुक्यातील मोठया गावांना भरणारे आठवडे बाजारासह यावल शहरात शुक्रवारच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार देखील नगर परिषद प्रशासनाने घेतले असुन, अशा प्रकारची जाहीर दवंडी देखील शहरात करण्यात येत आहे . सदरच्या यावल शहरात भरणारे आठवडे बाजारात जळगाव जिल्ह्यातुन विविध ठीकाणाहुन् मोठया प्रमाणावर व्यापारी व शेतकरी बांधव हे जिवनावश्यक वस्तुंची विक्री करण्यासाठी येत असतात याच पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पुढील आदेश येण्यापर्यंत प्रशासनाने आठवडे बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . याची तालुक्यातील शेतकरी बांधव आणी व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले आहे .

न्हावी परिसरात अवैद्य वाळुची वाहतुक करणारे डंपर यांच्यासह इतरांवर एमपीडीएअंतर्गत गुन्हे दाखल करीत कारवाई करावी :महसुल संघटनांची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

तालुक्यातील न्हावी गाव परिसरात काल रात्रीच्या सुमारास वाळुची विना परवाना बेकाद्याशीर वाहतुक करणाऱ्या वाहनाचा प्रांत अधिकारी यांनी
आपल्या शासकीय वाहनाने पाठलाग करतांना वाळुची बेकाद्याशीर वाहतुक करणाऱ्या डंपर वाहनाने धडक देवुन कर्तव्य बजावणारे प्रांत अधिकारी कैलास कडलग आणी शासकीय वाहन चालक उमेश तळेकर यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेर्धात आज यावल तहसील कार्यालयाने आपले काम बंद आंदोलन करून , या खळबळजनक व दबंगगीरीच्या घटनेस जबाबदार दोषींना एमपीडीएअंतर्गत तात्काळ कारवाई कार्यवाही व्हावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सर्व फैजपुर विभागातील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना , महसुल कर्मचारी संघटना , तलाठी कर्मचारी संघटना , वाहन चालक संघटना व चतृर्थ कर्मचारी संघटना यांनी आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील न्हावी गाव परिसरात काल दिनांक २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या शासकीय वाहना क्रमांक एमएच १९ एम ०७०८ हिने जात असतांना डंपर वाहनासह एक एक्स यु व्ही वाहन क्रमांक एमएच १९ बिएल१o१oही वाहन त्यात६ते ७ आणी गाडी आरोपी महेन्द्र धनराज तायडे राहणार कोळन्हावी ता . यावल ही गाडी तालुक्यात फिरून अधिकारी यांची माहीती देणारे आणी अवैद्य वाळुची वाहतुक करून शासकीय कर्मचारी यांच्यावर ह्ल्ले करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे १०ते १२ अज्ञातांचा आणी हितसंबधीतांचा शोध घेवुन तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्याकडे करण्यात आली असुन या प्रसंगी यावल तहसीलदार महेश पवार , रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील रावेरच्या नायब तहसीलदार देशमुख , के.पी. चौधरी यांच्या स्वाक्षरी आहे .

जातेगांव ग्रामपंचायत सरपंचपदी शांता चांगदेव पवार तर उपसरपंचपदी पंढरीनाथ काशिनाथ वर्पे

0

 

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे दि. २५ रोजी सरपंचपदाची निवड प्रक्रिया पार पडली.यात सरपंचपदी शांता चांगदेव पवार तर उपसरपंचपदी पंढरीनाथ काशिनाथ वर्पे यांची नियुक्ती करण्यात आली.
नांदगाव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकासाठी १५ जानेवारी निवडणूक घेण्यात आली होती.या निकालानंतर सरपंच सोडत जाहीर करण्यात आली होती. आरक्षणा बाबत बोलठाण येथील रिपीटीशन दाखल झाल्यानंतर १६ फेब्रुवारीपर्यंत सरपंच पदासाठी स्थगिती देण्यात आली होती.त्यानंतर सरपंच पद निवडीसाठी २५ व २६ फेब्रुवारी हे दोन दिवस निश्चित करण्यात आले होते.दिनांक २५ रोजी तालूक्यातील ३९ गावांची निवड प्रक्रिया झाली.तालुक्यातील घाटमाथ्यावरील प्रमुख समजल्याजाणार्‍या जातेगांव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी दोन गटांतील दोन सदस्यांनी आपला सरपंच पदाचा अर्ज दाखल केला होता.तर दोन सदस्यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता.या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन पॅनलच्या शांता पवार यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी पंढरीनाथ वर्पे यांची नियुक्ती झाली.निवडणूक निर्णय अधिकारी आर.जे.चोळके , किशोर अहिरे व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हि प्रक्रिया पार पडली.परिवर्तन पॅनलकडून नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस निरीक्षक अनिल कातकडे, पंकज देवकाते, कांदाळकर,अनिल गांगुर्डे यांच्यासह पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

 

 

सुनगाव येथे रोजगार सेवकांचा मनमानी कारभार एमआरजीएस अंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना काहीही करून घ्या अशी धमकी

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सूनगाव ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या एमआरजीएस कामामध्ये घरकुल लाभार्थी वृक्ष लागवड वृक्ष संगोपन इत्यादी कामे केली जातात या कामासाठी पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत सूनगाव येथे अनिल कोथळकर रोजगासेवक नियुक्त आहे परंतु रोजगार सेवक हा अनेक लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवत आहेत व कामाबाबत होणारे मस्टर काढण्यास विलंब करत आहे व सदर लाभार्थ्यांना घरकुल संबंधित व वृक्षलागवड संबंधित असलेल्या मजुरांचे आधार कार्ड पेंडिंग ठेवत आहे आहेत व त्याबाबत मस्टर काढण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत दिरंगाई करत आहे व मजुरांना काहीही करून घ्या अशा प्रकारची धमकी देत आहे तरी या बाबतची तक्रार ग्रामपंचायत ला एमआरजीएस अंतर्गत कामे करणाऱ्या महिला मजुरांनी दिलेली आहे या तक्रारीवर शारदा बोबडे विमल शेषराव धुळे यमुना कातोरे द्रौपदी गजानन ढगे या महिला मजुरांच्या सह्या आहे या तक्रारीची दखल घेऊन ग्रामपंचायत व पंचायत समिती जळगाव जामोद येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी

 

 

राशन दुकानात नितकुषँठ दरजाचे,राशन

0

 

सुनील पवार, नादुंरा

आघाडी सरकारवर जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे सविस्तर माहिती अशी की या महिन्याचे धान्य शासनाने गोरगरिबांना रेशन दुकानातून पाठविले आहे त्यात एक किलो गँम ज्वारि एककिलो तांदूळ एक किलो गहू आनि मका असे प्रत्येक व्यक्ती प्रमाने देना त येत आहे सदर मिळत असलेले सर्व धान्य सडलेले बुजलेले धान्य जनावर हि खात नाही आनि ते धान्य रेशन दुकानातून रेशनकार्ड काना वाटप करण्यात येत,आहे यावरुन शासनाकडून गोरगरीब जनतेची,चेष्टा करित आहे असे जनतेतून बोलल्या जात आहे