Home Blog Page 533

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन व नगर परिषद कर्मचारी यांच्या प्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी ! महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ची मागणी !कमी पगारात घर कसे चालवावे !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 27 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायत आहेत यामध्ये ६०, ००० ग्रामपंचायत कर्मचारी सेवा देत आहेत सेवा बजावत आहेत,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी वेतन श्रेणी व पेन्शन बाबत अनेकदा शासन दरबारी मोर्चे काढले विविध मंत्र्यांना निवेदन सुद्धा दिले परंतु या मागणीकडे शासनाने पुरते डोळेझाक केली आहे ‘ग्रामपंचायत कर्मचारी हा गावातील मुख्य दुवा असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो ‘गावाला स्वच्छ पाणीपुरवठा करणे ‘ गावात दिवाबत्तीची सोय करणे ‘गावात स्वच्छता राखणे आदी कामे ग्रामपंचायत कर्मचारी इमाने-इतबारे करत असतो ‘मात्र त्याला काहीच मिळत नाही मिळते ते फक्त .उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार वेतन ‘एवढ्या कमी वेतनावर ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या संसाराचा गाडा ओढत असतो ‘या पगारामध्ये घरातील सदस्यांचा असणारा दवाखाना ,मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न,वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ असे अनेक काम आज रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे ‘दिनांक 10 ऑगस्ट 2020 च्या कामगार विभागाच्या राजपत्र नुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू केली आहे परंतु त्याला ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची अट असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संकटात सापडला आहे तरी सदर उत्पन्नाची अट शिथिल करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची 10 टक्के रक्कम शासनाकडून लागू करावे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करून न्याय द्यावा अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सिंदखेड राजा यांच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे ‘

एअरटेल -आयडिया नेटवर्क समस्येमुळे अनेक कामे खोळंबली !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

गेल्या तीन ते चार दिवसापासून आयडिया एअरटेल मोबाईल कंपन्यांची नेटवर्क नसल्यामुळे अनेक शासकीय काम खोळंबले आहे ‘दिनांक आठ फेब्रुवारी ला सकाळी पाच तासापासून एअरटेल नेटवर्क गायब होते ‘त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला ‘अनेकांचे फोन लागत नाही नव्हते आणि नेटवर्क नसल्यामुळे येत नाही नव्हते ‘अनेक ग्रामपंचायत चे कामे सुद्धा खोळंबली होती ‘सतत एअरटेल आयडिया नेटवर्क नसल्यामुळे शिंदी येथील नागरिक हैराण झाली आहे ‘तरी अशा नेटवर्क समस्या तातडीने दखल घेऊन नेटवर्क सुरळीत करावी अशी मागणी शिंदी येथील सरपंच विनोद खरात यांनी केली आहे !आयडिया एअरटेल चे सतत नेटवर्क नसल्यामुळे तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने नागरिक विचारत आहेत !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख थांबवा- तहसीलदारांना निवेदन

0

नांदुरा ( प्रफुल्ल बिचारे पाटिल) :-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात जन्माला आल्याने सर्व जण स्वतःला भाग्यवंत समजतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेले कष्ट,त्यांचे पराक्रम, त्याग, ध्येय याला तोड नाही. अशा महापुरुषांच्या नावाने नांदुरा शहरातील एका चौकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे व त्याठिकाणी सुंदर देखावा निर्माण केला आहे. मात्र त्या चौकाला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा उल्लेख काही सुशिक्षित, प्रतिष्ठित दुकानदार आपल्या दुकानाच्या शापील जाहिराती, होल्डिंग, कॅरी बॅग व थैली वर एकेरी उल्लेख शिवाजी चौक कसा करतात. अशा महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही त्यामुळे तमाम शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या जात आहे.
म्हणून तहसीलदार हे तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे बाबीकडे लक्ष देऊन संबंधित दुकानदार यांना करत असलेली चूक लक्षात आणून देऊन एकेरी नावाचा उल्लेख त्यांनी करू नये यासाठी आपण आपल्या स्तरावरुन कारवाई करावी यासाठी नांदुरा शहरातील तमाम शिवसैनिक व भीमसैनिक यांच्यावतीने तहसीलदार नांदुरा यांना निवेदन देण्यात आले आहे. असा एकेरी नावाचा उल्लेख पुन्हा त्यांच्या कडून झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कुणाल वाकोडे,अर्जुन वाकोडे, गणेश पानझाडे, शुभम भिडे, हरिओम ताटे, प्रेम भामन्द्रे, विशाल बगन, देवा वाकडे,सुरज राखोंडे, धम्मा वाकोडे, पंकज गवई , रोहित पहुरकर, गौरव सातरोटे, अभिजित वाकोडे,राष्ट्रपाल सपकाळ,मुकेश,सागर सूर्यवंशी वाकोडे इत्यादी भरपूर लोक उपस्थित होते.

उद्या ठरणार सूनगाव ग्रामपंचायत चा कारभारी (सरपंच)

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारी रोजी झाली होती व या वर्षीची निवडणूक जरा हटकेच राहिली त्यादृष्टीने सरपंच निवडणुकीची तारीख उद्या नऊ फेब्रुवारी म्हणजेच मंगळवार रोजी ठरलेली आहे ग्रामपंचायत निवडणूक भाजपा व महाविकास आघाडी यांचे एकमेकासमोर आव्हान होते तरीसुद्धा जनतेकडून या निवडणुकीतून 8 जागा भाजपाला मिळाल्या व 8 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या व एक अपक्ष असा निवडणुकीचा निकाल राहिला सुरुवातीला सरपंच पदाचे आरक्षण काढलेले रद्द झाल्याने बराच गोंधळ उडाला त्यामुळे सरपंचपदाची खात्री नसल्याने उमेदवार खर्च करताना संकोच करताना दिसले होते मात्र आता सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाल्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या सोयीसाठी हा राखून ठेवलेला खर्च होतांना दिसत आहे त्यातच सुनगाव येथील महाविकास विकास आघाडीचा एक सदस्य 18 जानेवारी पासून भूमिगत आहे व तसे दोन्ही गटाकडून सदस्य सहलीला गेलेले आहेत त्यातही सरपंच पदाचे दावेदार असलेले काही उमेदवार बंडाच्या तयारीत आहेत पक्षामधून मधून संधी मिळत नसेल तर काही जणांना सोबत घेऊन विरोधी गटामध्ये मध्ये जाऊन का होईना मात्र सरपंच पद मिळवायचे असा चंग अनेकांनी बांधला आहे व गावातील पुढारी विरोधी गटातील मधील काही सदस्य गळाला लागतील का यासाठी रणनीती तयार करत आहे गळाला लावण्यासाठी सरपंच पदाचे आमिष देणे किंवा लक्ष्मी दर्शन असे आमिष दाखविण्यात येत आहे व सरपंच पदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांची गाव पुढाऱ्यांकडून मनधरणी चालू आहे परंतु सरपंच मात्र आमचाच असा दावा दोन्ही गटाकडून होत आहे तर सहलीला गेलेल्या सदस्यांची गाडी ठरवून दिलेल्या वेळेच्या पाच मिनिटे आधी ग्रामपंचायत कार्यालय येथे धडकणार आहे ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच पदाची निवडणूक होणार आहे तरी या परिस्थितीत भाजपा गटाचा सदस्य बनतो किंवा महाविकास आघाडी चा सरपंच बनतो याकडे लक्ष लागले आहे परंतु सरपंच कोणत्याही गटाचा होवो मात्र सूनगाव येथील विकास कामे करावी ही अपेक्षा मात्र येथील जनतेने ठेवली आहे

देशाच्या अन्नदाता शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठीच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी कॉंग्रेसचे शेतकरी मेळावा संपन्न,

0

 

यावल ( प्रतिनिधी ) केन्द्र शासनाच्या दडपशाहीमुळे देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या काळया काद्याला तात्काळ रद्द करावे या मागणी करीता गेल्या अडीच महीन्यापासुन दिल्ली येथे शेतकरी बांधव हे आंदोलनास बसले असता त्यांना पाठबळ व पाठींबा देण्यासाठी आज यावल येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आल्याचे वक्तव्य कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी व्यक्त केले .आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी यावल येथे यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या आवारात आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवाच्या संघर्षमय आंदोलनास पाठींबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते . या शेतकरी मेळाव्याच्या सुरुवातीस दिल्ली येथे आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनात मृत्युमुखी झालेल्या १५५ शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . देशाला स्वातंत्र मिळाले त्या स्वातंत्र चळवळीला कॉंग्रेस पक्षाने एतिहासीक असे संघर्ष करून देशाला स्वातंत्र मिळुन दिले असुन ,आता देखील केन्द्रातील दडपशाही मार्गाने काळे कायद्या करणाऱ्या केन्द्रसरकारच्या तावडीतुन देशाच्या अन्नदाता शेतकरी बांधवांना मुक्त करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे मनोगत कॉंग्रेसच्या मान्यवरांनी व्यक्त केलीत. याप्रसंगी शेतकरी मेळाव्यास उपस्थित तालुक्यातील शेतकरी बांधवांचे तसेच नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले पक्षाचे सदस्य व भावी सरपंच यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आले, या मेळाव्यास माजी आमदार रमेशदादा चौधरी , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान , जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , जिल्हा परिषद सदस्य आर जी नाना पाटील , डी .जी . पाटील , श्रीधर चौधरी , राहुल बाहेती, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , नगरसेवक असलम शेख नबी , समीर शेख मोमीन , हाजी गफ्फार शाह, अनुसुचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे , काँग्रेस महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष शबाना तडवी , शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष कदीर खान यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते . मेळाव्याची प्रस्तावना प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केली तर सुत्रसंचलन अमोल भिरूड यांनी केले .

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दि. ०७ रविवार रोजी अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकारी यांची ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेची बैठक संपन्न झाली

0

 

यावल तालुक्याची नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. व्यासपिठावर अध्यक्ष स्थानी कवि रमजान गुलाब तडवी , प्रमुख पाहुणे प्रा. के के वळवी सर , संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र बारेला , जिल्हा सचिव प्रकाश वसावे यांच्या उपस्थित घेण्यात आली. बैठकीत मान्यवरानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेच्या कार्या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. नुकताच चार्टर अकाउंटंट (सी.ए.) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेत अंजुमन रमजान तडवी हे परिक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल संघटने तर्फे जिल्हा सल्लागार व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा .के के वळवी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेची यावल तालुक्याची नविन कार्यकारिणीची नियुक्ती पुढील प्रमाणे
यावल तालुका अध्यक्षपदी – अब्दुल रशीद तडवी , सचिव -असलम तडवी , उपाध्यक्ष पदी – मुजाहिदा हुसेन तडवी व अठान भुगवाड्या , कार्यध्यक्ष पदी – युनुस अयुब तडवी , सह कार्यध्यक्ष – हकीम तडवी , प्रसिद्धी प्रमुख – सलिम तडवी , सहसचिव -​ रहीम रशिद तडवी, कोषाध्यक्ष – कादर फत्तु तडवी , संघटक – फुलसिंग किसन बारेला, आरिफ तडवी, सलमा युनुस तडवी व हुसेन नाजिर तडवी , सल्लागार – याकूब आमद तडवी, प्रा. प्रल्हाद पावरा , सुरपाल बारेला व ताराचंद सावसाकडे या सर्वाना मान्यवराच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला संघटनेचे जिल्हा संघटक नवाज जहांगीर तडवी , डॉ. जयेश पाडवी सर , कोषाध्यक्ष प्रदीप बारेला , न्याजूद्दीन तडवी ,
हुसेन रुबाब तडवी , नामदार तडवी , हुसेन नजीर तडवी यांच्यासह इतर सदस्य उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जहाबीर तडवी सर यांनी केले तर आभार रहिम तडवी यांनी मानले.

फोटो – ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेची यावलतालुका अध्यक्षपदी – अब्दुल रशीद तडवी​

श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनी करण्यात आला पत्रकारांचा सत्कार…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

सुनगाव येथील श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटर यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पत्रकार गजानन सोनटक्के पत्रकार अनिल भगत पत्रकार गजानन खिरोडकार पत्रकार शिवदास सोनोने या पत्रकार मंडळींचा पुष्पगुच्छ तसेच शाल डायरी व पेन देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य पती अशोक काळपांडे माजी सरपंच पुंडलिक पाटील यांचाही पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर शालिग्राम कपले यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच गावातील नागरिकांना वर्धापन दिनानिमित्त श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटर च्या वतीने मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच आजच्या या दिवशी श्रीराम रेडिमेट अंड क्लॉथ सेंटर ने ग्राहकांसाठी खरेदीवर विशेष धमाका ऑफर ठेवली होती यावेळी श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटरचे संचालक दिनेश मिसाळ यांनी गावातील नागरिकांसाठी चहा व फराळाची व्यवस्था केली होती तसेच या वर्धापन दिनानिमित्त दिनेश मिसाळ, पाडुरंग मिसाळ, राजेश मिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे, गुणवंराव कपले,माजी सरपंच पुंडलिक पाटील, शेषराव वंडाळे, डॉ. शालीग्राम कपले,गजानन धुळे, पवन पालीवाल,वासुदेव गायगोल,वनिता मिसाळ, अमोल धुळे,लक्ष्मण मिसाळ यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

डोणगांव येथे भारत मुक्ती मोर्चा च्या वतिने माता रमाई जंयती साजरी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील डोणगांव येथील त्रिरत्न बुध्दविहारात दि . ७ फेब्रुवारी रोजी भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने माता रमाई यांची जयंतीनिमित्त आभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मा.भागवत जाधव हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बामसेफचे मा. आर.बी.डोंगरदिवे व मा.बि.एस.सदार हे होते तर प्रमुख उपस्थिति मा.मुरलीधर लांभाडे जि.संयोजक राष्ट्रीय किसान मोर्चा, मा.सुखनंदन हांडे सर,मा.शेख शफीसर प्रोटान ; मा.गजानन भगत,मा.परमेश्वर रोटे हे मान्यवर उपस्थीत होते..

यावेळी मा.डोंगरदिवे सर,सदार सर,लांभाडेसाहेब,हांडेसर शेख सर यांचे आभिवादन पर भाषणे झाली .

अध्यक्षीय भाषणात भागवत जाधव यांनी माता रमाईचा जिवन संघर्ष कसा होता याविषयी बोलतांना ते म्हणाले की जर माता रमाई यांनी जर ठरवले असते तर त्या काळात त्या हजार हजार रुपयाच्या साड्या नेसुन चांगले दागीणे घालून जगातल्या नामवंत बॅरिस्टर यांच्या पत्नी म्हणुन राहु शकल्या असत्या पंरतु भारतात जो समाज हजारो वर्षापासुन बहिष्कृत व शोषीत आहे त्या समाजाला माणुस म्हणुन जगण्यासाठी जो संघर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केला होता तो यशस्वी होण्यासाठी व माणसाला माणुस म्हणुन जगण्यासाठी स्वतच्या व परिवाराच्या व संसाराच्या सर्व हौस नाकारुन संपुर्णपणे आंदोलनला सह्योग करणाऱ्या माता रमाईमुळेच यांच्या त्यागामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिण्या पर्यंतचा प्रवास करू शकले म्हणुन आज आपण मानव म्हणुन जगत आहोत याच्यामागे केवळ माता रमाई यांचा त्याग,समर्पण, व बहुजन समाजाविषयी तळमळ आहे हे आपण विसरता कामा नये..

यावल भुसावळ रोडवर ट्रॅक्टर मोटरसायकलचा भिषण अपघात दुचाकीस्वार जागीच ठार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,

यावल तालुक्यातील अंजाळे घाटात सायंकाळी ट्रॅक्टर व दुचाकी मोटरसायकलच्या झालेल्या भिषण अपघातात एक व्यक्ति जागीच मरण पावल्याची घटना घडली असुन या संदर्भात पोलीसात ट्रॅक्टर चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की भालशिव तालुका यावल येथील राहणारे प्रदीप चावदस तायडे २९ वर्ष हे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भुसावळकडुन भालशिव या आपल्या गावी दुचाकी वाहन क्रमांक एमएच १९डीएम९४२९या वाहनाने जात असतांना भुसावळ रोडवरील अंजाळे घाटात समोर येणाऱ्या ट्रक्टर क्रमांक एमएच १९पी२९५३वरील चालक ज्ञानेश्वर शिवराम कोळी राहणार चोरवड तालुका रावेर यांने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता समोरून येणाऱ्या प्रदीप चावदस तायडे हा ट्रॅक्टरखाली चेंगरला गंभीर जख्मी होवुन जावुन जागीच मरण पावला आहे . याबाबत शांताराम चावदस तायडे रा भालशिव यांनी फिर्याद दिल्याने वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अजमल पठान हे करीत आहे .दरम्यान मयत प्रदीप तायडे याचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले .

साकळी मनवेल थोरगव्हाण रस्ता काटेरी झुडप्यांच्या विळख्यात लोकप्रतिनीधीचे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे

0

 

यावल  तालुक्यातील साकळी मनवेल थोरगव्हाण रस्त्यावर काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असुन वाहनधारकांना याचा मोठा त्रास सोसावा लागत आहे .या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनीधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी परिसरातील वाहनचालक व ग्रामस्थ करीत आहे.
काही दिवसापुर्वी थोरगव्हाण गावापासुन काटेरी झुडपे काढण्यासाठी कामासाठी जे.सी.बी आणले होते मात्र या जेसीबीने अपुर्ण काटेरी झुडपे काढण्यात आले असल्यामुळे पुनश्च वाहनधारकांना या अत्यंत धोकादायक अशा काटेरी झुडप्यांचा त्रस्त सुरू झाले आहे.या संदर्भात अधिक माहीती घेतली असता शासनाच्या वतीने या रस्त्याच्या काटेरी झुडपे काढण्यासाठी प्राप्त झालेल्या संपुर्ण नीधि सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन काढण्यात आला असल्याची आतील माहीती एका जबाबदार लोकप्रतिनीधीनी सांगीतली असुन, या गोंधळलेल्या माहीती मुळे त्या झुडपे काढण्याच्या पैशांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे .
साकळी मनवेल थोरगव्हाण ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजुने काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे कीरकोळ अपघातचे प्रमाण सातत्याने वाढले आहे.
थोरगव्हाण ग्रामपंचायत मार्फत यावल सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या पंधरा दिवसापासुन काटेरी झुडपे तोडण्यात यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले असुन ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन या वाहनधारकांच्या गंभीर अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे.
साकळी मनवेल थोरगव्हाण या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असुन लोकप्रतिनीधीचे दररोज ये जा सुरुच असते मात्र काटेरी झुडपे काढण्याचा समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहनचालक व सर्व सामान्य नागरीकां कडुन दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कारभारा बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आहे.