Home Blog Page 535

६ फेब्रुवारी ला गायीका आशा चरवे यांचा आडगावराजा येथे भिम गितांचा संगितमय कार्यक्रम ।

0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

आडगावराजा येथे दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या दरम्यान श्रामणेर शिबीराचे आयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भदन्त गुणरत्नजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे . या दरम्यान ६ फेब्रुवारी २०२१ शनिवारी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायीका आशा चरवे
यांचा भिम गितांचा संगितमय कार्यक्रम राञी ८ ते ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे त्याचबरोबर !! सुप्रसिद्ध गायीका आशा चरवे यांनी कुटुंबासह धम्म दिक्षा घेतल्या मुळे त्यांचा बौद्ध बांधवाच्या वतिने जाहिर सत्कार करण्यात येणार आहे !! तरी या कार्यक्रमासाठी परीसरातील ऊपासाक उपासीकांनी हजर रहावे असे आवाहन आडगावराजा येथील माजी श्रामणेर संघ व बौद्ध ऊपासक ऊपासीकांनी केले आहे !

विधवा महिलांना आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत चेक चे आ.डॉ. संजय कुटे यांच्याहस्ते करण्यात आले वाटप…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगांव जामोद तहसील कार्यालयात आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दारिद्रय रेषेखालील आर्थिक दुरबल कुटुंबातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून 20 हजाराचे चेक जळगांव जामोद तहसील मधील हॉटेलमध्ये वाटप करण्यात आले.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत कुटुंब प्रमुखाचा नैसर्गिक मृत्यू झालेल्या विधवा महिलांना आमदार डॉ. संजय कुटे यांचे हस्ते 20 हजाराचे चेक वाटप करण्यात आले. जळगांव जामोद तालुक्यातील 21 दुर्बल घटक तसेच दारिद्रय रेषेखालील विधवां महिलांना प्रत्येकी वीस हजार या प्रमाणे मदत शासनातर्फे देण्यात आली.यावेळी माजी कामगार मंत्री आ. डॉ. संजय कुटे, उपविभागीय अधिकारी सौ. वैशाली देवकर, तहसीलदार शिवाजीराव मगर, नि. नायब तहसीलदार खाडे,सौ. बंगाले, वडोदे, भारंबे, यांचे सह तहसील चे अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

घरगुती गँस,पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात जळगाव जामोद शिवसेनेच्यावतीने निवेदन देत केला केंद्र शासनाचा निषेध…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

सतत होत असलेल्या घरगुती गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल च्या किमतीच्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे असे असताना सुद्धा केंद्र सरकार इंधनाचे दर दररोज वाढतच आहे त्यातच आतापर्यंत लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेच्या हातचा रोजगार गेलेला असताना केंद्र शासन काही केल्या ह्या दररोज गगनाला भिडत असलेल्या किमती काही केल्या कमी करत नाही. आंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर कमी असताना सुद्धा देशासह महाराष्ट्रात दररोज डिझेल पेट्रोल व घरगुती गॅसचे दर वाढत आहे त्यामुळे गरीब लोकांना केंद्र सरकार तर्फे उज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले आहे या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांकडे सिलेंडर भरण्याकरिता पैसे नाहीत त्यामुळे त्यांना शेतातील लाकडे आणून त्यावर उदरनिर्वाह करावा लागत आहे परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यामुळे महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तरी शासनाने ह्या वाढत असलेल्या इंधनाच्या किमती ताबडतोब कमी करण्याबाबत उपाय योजना कराव्यात सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीतून मुक्त करावे अशा आशयाचे निवेदन दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर तुकाराम काळपांडे शिवसेना जिल्हा उपप्रमुख, गजानन वाघ शिवसेना तालुका प्रमुख,पुंडलिक पाटील, उपतालुका प्रमुख सुनील मोरखडे उपतालुकाप्रमुख,देविदास घोपे उपतालुका प्रमुख, रमेश ताडे नगरसेवक तथा शिक्षण सभापती जळगाव जामोद,संजय भुजबळ, शांताराम धोटे,अशोक टावरी,गजानन दातीर,मुस्ताक भाईजान, दिलीप आकोटकार, संतोष बोरसे, शिवाजी मेहसरे,अक्षय भालतडक,भगवान बाजारे,राजेश पांधी,पंडित माटे,कैलास राजपुत, विशाल पाटील, वैभव जाणे,वसंता रोजतकर,अंबादास चौधरी,गुड्डू काजी,युवराज देशमुख, रमेश हागे, यांच्यासह भाऊ सांगे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

नगरपंचायत निवडणूकी पुर्वी मतदार यादीतील स्थलांतरीत ,व मयत मतदारांची वगळणी करावी, रामेश्वर गायकी

0

संग्रामपूर येथे नगरपंचायत असून सध्या शहरात कित्येक वर्षापासून रहिविशी नसलेल्या व मयत मतदारांचे नावे मतदार यादीत असल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते त्याकरीता स्थलांतरीत व मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावे अश्या प्रकारचे निवेदन पत्रकार रामेश्वर गायकी यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयात निवडणूक विभागाचे ना.तहसीलदार विजय चव्हाण यांना दिले आहे.
निवेदनात असे नमुद केले आहे की,संग्रामपूर येथील ग्रामपंचायत रद्द होवून सन २०१५मध्ये नगरपंचायत होवून पहिली निवडणूकही पार पडली.संग्रामपूर शहरात १७वार्ड असून सर्व प्रकारची शासकीय ,निमशासकीय कार्यालये,शाळि ,महाविद्यालये ,बॕंका,पतसंस्था, सहकारी संस्था व इतर कार्यालये आहेत .यामध्ये नोकरी करणाऱ्यांची संख्या भरपूर प्रमाणात असल्याने तसेच नव्याने नोंदणी करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.परंतु गेल्या १०ता १५वर्षापासून संग्रामपूर येथून अनेक अधिकारी ,कर्मचारी बदलून गेलेत तरी त्यांची व त्यांच्या कुटुबातील नावे,तसेच शहरातील अनेक मुलींचे लग्न होवून सासरी गेल्यात,अनेक मतदार मयत झालेत तरी त्यांची नावे अजुनही मतदार यादीत आहेत.ती कमी झालीच नाहीत तसेच मतदानाचे वेळी स्थलांतरीत मतदारांना आणण्यासाठी स्पेशल गाडी देवून आर्थिक व्यवहार सुद्धा होत असतात.काही मतदार येत सुद्धा नाहीत त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते तरी स्थलांतरीत झालेल्या सर्व मतदारांची व मयत मतदारांची नावे नगरपंचायत निवडणूकी पुर्वी मतदार यादीतुन वगळण्यात यावीत सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलडाणा,व उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना पाठविल्या आहेत.सदर निवेदनावर पत्रकार रामेश्वर गायकी यांची सही आहे.

आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले कुलूप कर्मचारी झाले बंदिस्त

0

 

गजानन सोनटक्के
प्रतिनिधी जळगाव जामोद

दिनांक 5 फेब्रुवारी रोजी डॉक्टर आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वात शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी रास्तारोको करीत महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा दिला व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकार द्वारे लॉक डाऊन च्या काळात वीज देयके कमी करण्यात येतील व 100 युनिट पर्यंतचे वीज देयके माफ करण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती परंतु आता वीज देयके माफ तर केलीच नाहीत उलट वीज देयके भरावे लागतील असे ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केले व राज्यातील 78 लाख वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू झाले आहे याविरोधात आज 5 फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयाला माजी मंत्री व आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कुलूप ठोकले व कर्मचाऱ्यांना बंदिस्त केले तसेच आमदार कुटे म्हणाले आमचे लढाई सरकारच्या विरोधात आहे परंतु कर्मचाऱ्यांनी सरकारच्या दबावाखाली न येता नागरिकांना सहकार्य करावे व वीज कनेक्शन कापण्यास जाऊ नये तसे केल्यास गाठ भारतीय जनता पार्टी सोबत आहे व त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी महावितरण व शासन जबाबदार राहील असा इशारा सुद्धा यावेळी संजय कुटे यांनी दिला डॉक्टर कुटे म्हणाले या लॉक डाउन च्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला चार महिने काम नव्हते कोणतीही आवक नसताना तरुणांच्या नोकऱ्या गेल्या अशा काळात विज बिल वाढवून एक प्रकारे कहरच केला व विविध प्रकारचे त्यावर करवाढ केली ऊर्जा मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची जनतेने कुठल्याही प्रकारची मागणी केले नसताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी करोणा च्या काळातील वीज बिल माफ करू अशी घोषणा केली त्यांनीच दिलेले आश्वासन, घोषणा ते पूर्ण करत नाहीत म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे ही घोषणा फक्त मोठेपणा दाखवण्यासाठी केली असा आरोप सुद्धा यावेळी संजय कुटे यांनी केला तसेच पुढे म्हणाले अन्य प्रदेशात आलेला विज बिलांवर पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे आणि यामुळे जनता सरकार विरोधात वेगळ्या स्वरूपात रोष व्यक्त करत आहे यावेळी नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, , तसेच शेकडो वीज ग्राहक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

येथील शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले पशुवैद्यकिय चिकित्सालय शोभेची वस्तु

0

 

( प्रतिनिधी )विकी वानखेडे.

यावल तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणजे ब-हाणपूर अंकलेश्वर माहामार्गा लगत असलेले किनगाव हे गाव आहे तर किनगावला लागुण असलेल्या आदीवासी१७ गावांचा संपर्क या गावांशी असुन , या दृष्टीकोणातुन जिल्हा परीषदेने येथे भव्य असे प्रथमश्रेणी पशुवैद्यकिय दावाखाना उभारला आहे मात्र या दवाखाण्यात गेल्या २ महीण्यांपासून येथे गुरांना आरोग्यसेवा देण्यासाठी पशुधनअधिकारी नसल्यामुळे परीसरातील गुरांना उपचार मिळत नाही म्हणून परीसरातील शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत किनगाव येथे प्रथमश्रेणी पशुवैद्यकिय दवाखाना असल्यामुळे किनगावला लागुन असलेले चिंचोली,आडगाव, मालोद , नायगाव ,कासारखेडे,मनापुरी,गिरडगाव,डोणगाव आणी वाघोदा या गावांच्या गुरांना आरोग्य सेवा देण्यासाठी हा प्रथमश्रेणी दवाखाना सुरू करण्यात आला आहे मात्र येथे पशुवैद्यकिय अधीकारीच नसल्याने परीसरातील शेतकरी बांधवांकडुन प्रशासनाच्या कारभाराविषयी तिव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करीत आहेत.किनगाव येथे असलेल्या पशुवैद्यकिय दवाखाण्यात वैद्यकिय अधीकारी नाही हे तर सोडा परंतु या दवाखाण्यात घाणीचे साम्राज्य इतके वाढले आहे की गुरांचे आरोग्य सुधारणेतर लांबच उलट जर येथे उपचारासाठी गुर आली तर गुरांनसह मानसांच्या आरोग्यालाही धोका होऊ शकतो इतकी वाईट परीस्थीती या पशुवैद्यकिय दवाखाण्याची झाली आहे शासनाने येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकिय अधीकारी दिले नाहीत म्हणून येथे प्रभारी पशुवैद्यकिय अधीकारी आहेत व त्यांना किनगावच्या पशुवैद्यकिय दवाखाण्यात पुर्णवेळ देता येत नाही व परीसरातील गुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर परीसरातील गुरांनवर लाळखुरगटीचा आजार आहे मात्र उपचारा अभावी गुरांचा जिव धोक्यात आला आहे तसेच शासनाच्या वेळापत्रकानुसार हा दवाखाना फेब्रूवारी ते सप्टेबर या कालावधीत सकाळी ७ ते १२ व दुपारी ४ ते ६ अशी वेळ आहे तर आँटोबर ते जानेवारी या कालावधीत दवाखाण्याची वेळ सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ३ ते ५ वाजेपर्यंत अशी वेळ असतांना मात्र हा दवाखाना नेहमी बंदच असतो म्हणून गुरांचे आरोग्य अधीक धोक्यात आले आहे तरी वरीष्ठ आधीकारी यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन किनगाव पशुवैद्यकिय दावाखाण्यात तात्काळ कायमस्वरूपी पशुवैद्यकिय आधीकारी नियुक्त करावा व परीसरातील गुरांच्या आरोग्याशी होत असलेला हा खेड थांबवावा अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत.

पिकविम्या साठी एल्गार संघटनेचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

शेतकऱ्यांना पिकविमा विज बिल माफी याच्यासह विविध मागण्यांसाठी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी हजारो अन्याय ग्रस्त शेतकरी एल्गार संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पीक विम्याचे क्लेम फॉर्म घेऊन हजारो शेतकरी कॉटन मार्केट येथे जमले होते तेथून मोर्चाला सुरुवात होऊन हा मोर्चा स्थानिक दुर्गा चौकात येऊन धडकला त्या ठिकाणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे क्लेम फॉर्म जमा करण्यात आले जर का शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही तर यापुढे मोर्चाची धडक निवेदन देवुन 11 दिवसात मागण्याची पुर्तता न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी प्रशासनास दिला— निर्धारित वेळेत पिक विमा न मिळाल्यास 15 फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन- प्रसेनजीत पाटील(खुटं मोर्चा सभेत ऐलान—)जळगाव जामोद 37 पैसे पीक आणेवारी जाहीर झाली असून तालुक्यातील पिक विमा धारक शेतकरी नियमाप्रमाणे पिक विमा मिळण्यास पात्र आहेत, परंतु पीक विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे जर निर्धारित वेळेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर 15 फेब्रुवारी पासून उपविभागीय कार्यालयासमोर एल्गार संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आज चार फेब्रुवारी रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी मोर्च्याच्या सभेत ला संबोधित करताना दिला आहे.रिलायन्स विमा कंपनी ही पात्र लाभार्थ्यांना हक्काचा विमा क्लेम देण्यास टाळाटाळ करत आहे म्हणून आज हा मोर्चा एल्गार संघटनेच्या वतीने प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर आपापले ट्रॅक्टर घेऊन जमले होते तसेच अनेक शेतकरी हे हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते सदर मोर्चा हा शहरातील विविध मार्गांनी एसडीओ कार्यालयावर जात असताना स्थानिक दुर्गा चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, यावेळी एल्गार संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून पिक विमा देण्याची तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाला समर्थन व्यक्त केले, यावेळी मंचावर प्रसेनजीत पाटिल,प्रशांत डिक्कर,विजय पोहनकार,रमेश बानाईत,आसिफ .राजेंद्र देशमुख,गौतम गवई,परशुराम येऊल, रवि धुळे,संतोष देशमुख,राजू पाटिल अवचार,अनंता वाघ,श्रीकृष्ण जाधव,भागवत अवचार,आशिष वायझोड़े,ईरफान शेट्टी,मुजहिर मौलाना,रोशन देशमुख आदींची उपस्थिती होती

पुणे येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषद मध्ये शरजील उस्मानी या व्यक्ती ने हिंदू समाजावर केलेल्या वक्तव्या बद्दल अटक करून गुन्हा दाखल करण्या बाबत

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

पुणे शहरामध्ये दिनांक ३१ जानेवारी ला एल्गार परिषदेच्या माध्यमातून शरजील उस्मानी या व्यक्तीने एका १४ वर्षांच्या मुलाला धावत्या ट्रेनमध्ये काही लोकांनी चाकुने मारत असतांना त्याला कोणीही वाचविले नसल्यामुळे उस्मानी याने सरळ “हिंदू समाज सळाहुआ समाज है” अशा उल्लेख करुन त्याने हिंदू समाज बांधवांच मनदुखावल्या गेला या हिंदू समाजाला बदनाम करण्याच काम या व्यक्ती व्दारे करण्यात आलं अनेक वेळा प्रवास करतांनी अपघात होत असतात किंवा मारामारी सुध्दा होतांनी बघितले पण तो कोणी किंवा हिंदू किंवा मुस्लिम आहे. म्हणुन जाणून मारत नसतो. व प्रवास करणारा व्यक्ती प्रवास करतांनी कोणाच्या भांगळीत पडण्यास नकार देतो म्हणून दुर्लक्ष करुण निघून जातात. याचा अर्थ हिंदू समाजावर दोषा रोपन करने हे चुकीचे आहे. त्या ट्रेन धर्मा अन्य धर्माचे लोक ही प्रवास करत असतात पण हिंदू धर्मालय टार्गेट करुन हा उस्मानी हिंदू V/s मुस्लिम अशा वाद पेटविण्याचा उद्देशाने आला व त्याने हिंदूना डिवचनाचा काम करुन आपलं उद्देश पुर्ण करुन या दोन्ही धर्मात भाडंन लाऊन प्रसार झाला. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हा तर्फे निवेदन सादर करून शरजील उस्मानी अशा माथेफीथू व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावे ही. विनंती
जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा,गोंदिया तालुका अध्यक्ष,सुरेश ठाकरे,गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे,गोरेगाव तालुका अध्यक्ष,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,

पदमपूर परिसरात भुकेमुळे तीन वर्षीय बिबट्याचा मृत्यू

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

आमगाव- तालुक्यातील पदमपूर गाव परिसरात वाघ नदीच्या कटेवर संरक्षित वन कम्पार्टमेंट 489 मध्ये एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना 2 फेब्रुवारीला समोर आली असून हा नर जातीचा बिबट्या आहे. या बिबट्याचा भूकेने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

गोंदिया जिल्ह्यात बिबट्या आणि वाघांची शिकार झाल्याची दोन मोठी प्रकरणे समोर आली आहेत. यातच आमगाव तालुक्याच्या पदमपुर येथील वाघ नदीच्या परिसरात संरक्षित वनात वन विभागातील कर्मचारी व वन मंजूर वन परिसरात गस्त करत असताना त्यांना एक बिबट मृतावस्थेत आढळा. या विषयी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत त्या मृत बिबट्या ला आमगाव येथी वन विभाग कार्यलयात आण्यात आनले. या घटनेमुळे विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

बिबटाची करंट लावून शिकार तर करण्यात आली नाही ना या बाजुने देखील वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली आहे. मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची उत्तरीय तपासणी केल्यावर त्याच्या मृत्यु भुकेमुळे झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. उत्तरीय तपासणी आमगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. कोटांगले व डॉ. रहांगडाले यांनी केली. या घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्राधिकारी अभिजीत इमलकर, क्षेत्रसहायक बी. पी. राउत, वनरक्षक नितीन लांजेवार, ढगे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे यांना गोंदियावरून पाचरण करण्यात आले होते. हा बिबट तीन वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. त्या मृत बिबट्याचा पंचनामा करत त्यांचे शव विच्छेदन करण्यात आले असून त्याचे वनविभागा द्वारे अंतसंस्कार करण्यात आले.

खाऊचा जमवलेला निधी भव्य श्रीराम मंदिरासाठी देऊन चिमुकल्या हिंदवीने उचलला खारीचा वाटा

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

लहान मुले ही देवाघरची फुले असतात असे म्हटले जाते. निरागस लहान बालकांमधील अद्वितीय गुणांचा जेव्हा परिचय होतो तेव्हा त्याची उपमा दुसर्‍या कशालाही देता येणार नाही. दुसऱ्यांना मदतीचा हात देण्याची त्यांची सेवाभावी वृत्ती फ़ार कौतुकास्पद ठरते.
मुलं जरी वयाने लहान असली तरी इतरांना मदतीचा हात देण्याबाबत ती निवडक ठरतात व त्यांच्यातील सहकार्याची बीजे परिपक्व होत जातात. याचाच उत्तम दाखला म्हणजे नांदुरा खुर्द येथील कु. हिंदवी प्रकाश बावस्कार हिने आपला खाऊचा निधी श्रीराम मंदिर उभारणीच्या पवित्र कार्यासाठी देऊन अत्यंत कमी वयातील आपल्या औदार्य वृत्तीचा परिचय करून दिला.
अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या भव्य श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडून स्वेच्छेने केलेली आर्थिक मदत स्वीकारली जात आहे. साकारल्या जात असलेल्या भव्य श्रीराम मंदिरास आपला सुद्धा हातभार लागावा या उद्देशाने नांदुरा खुर्द येथील चार वर्षीय कु. हिंदवी प्रकाश बावस्कार हिने गेल्या अनेक दिवसांपासून साठवून ठेवलेला आपला खाऊचा निधी हा नि:स्वार्थीपणे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन समितीच्या सदस्यांकडे सोपवीला. एवढ्या कमी वयात सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलणाऱ्या हिंदवीच्या या सेवाभावी गुणांचा सर्वांना परिचय झाला. अत्यंत कमी वयात हिंदवीने दाखविलेल्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.