Home Blog Page 537

संग्रामपुर मित्र परिवाराच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी

0

 

संग्रामपुर मित्र परिवाराच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन पळशीपुरा येथे करण्यात आले होते महाराष्ट्राचे दैवत्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले संग्रामपूर पळशीपुरा येथे छ शिवाजी महाराज , संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन गुलपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक नारायण ठाकरे गुरुजी हे होते तर व्यासपीठावर संग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंककर पुरोहित ,जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, शेख याकुब , डॉ अनिल वानखडे , रवि पहुरकर , शेख हमीद, राहुल शिरसोले , सह सर्व धर्मिय जेष्ठ नागरिकांची उपस्थीती होती यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या जिवन चरित्रावर जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी , संग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक शंक्कर पुरोहित , शेख हमीद यांनी प्रकाश टाकुन संतांचे गुण अंगिकारण्याचे आव्हाण केले प्रास्ताविक शिक्षक हरिभाऊ तायडे यांनी संचालन वैभव गायकी यांनी केले आभार प्रदर्शन अभिषेक गावंडे यांनी मानले कार्यक्रमाला बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

पोटाची खळगी भरण्याकरिता आजही बहुरूपी ची सोंग घेऊन घरोघरी फिरावे लागते !शासनाने मानधन देण्याची गरज -बहुरूपी साहेबराव शिंदे यांची मागणी –

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

असे म्हणतात टिचभर पोटा साठी काय काय करावे लागते !याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे साहेबराव शिंदे होय ।उटी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील साहेबराव तळीराम शिंदे हे बहुरूपी चे सोंग घेऊन सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या गावी आली असता त्यांच्याशी खास बातचीत केली व त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला !साहेबराव तुळशीराम शिंदे हे उटी तालुका मेहकर येथील रहिवासी आहे हे गेल्या 35 वर्षापासूनते बुलढाणा जिल्ह्यातील आपल्या घराचा गाडा आपल्या घरच्या लोकांचे पोट भरण्या करता विविध बहुरुपी सोंग घेऊन प्रत्येक घरोघरी भिक्षा मागत असतात ‘ते सांगतात की मला चार मुले आहेत ते आपापल्या कामात व्यस्त आहे ‘माझ्या पंजोबा पासून आमच्या घराला बहुरुपी सोंग घेऊन भिक्षा मागत असतो ‘मुलांना बहुरूपी ची सोंग घेऊन घरोघरी जाऊन भिक्षा मागायची लाज वाटते त्यामुळे मलाच घरोघरी जाऊन भिक्षा मागावी लागते ‘आज साहेबराव शिंदे यांचं वय 75 वर्षाचे आहे .घरी एकही गुंठा जमीन नाही ।ते सांगतात की माझे पणजोबा वडील हे महादेव, पार्वती ।पोलीस ,शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,हनुमान,राम,अशा विविध देवाचे तसेच महापुरुषाचे वेशभूषा करून ‘गावोगावी जाऊन लोकांचे कलेच्या माध्यमातून मनोरंजन करून आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असे ‘परंतु आता अँड्रॉइड मोबाईलचा जमाना आला व सर्व कला लोप पावत चालली ‘सर्व काही मोबाईल वर दिसत असल्यामुळे ‘बहुरूपी चे सोंग कोणी बघत नाही .अशी खंत यावेळी साहेबराव शिंदे यांनी व्यक्त केली ‘तसेच शासनाने करूनच या काळामध्ये एक रुपयाची सुद्धा मदत केली नाही त्यामुळे शासनाने बहुरूपी यांना तीन हजार रुपये मानधन महिन्याचे द्यावे अशी मागणीही यावेळी साहेबराव शिंदे यांनी केली !

चिखली गटविकास अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना दाखवली केराची टोपली

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रशांत ढोरे पाटील यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी साहित्य खरेदी संदर्भात झालेल्या गैरव्यवहाराबाबत ग्रा. पं.सचिवांना पाठीशी घालत असल्याने जाधव साहेब गटविकास अधिकारी चिखली यांची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली असता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी स्वयंस्पस्ट कार्यपूर्ती अहवाल अभिप्रायासह शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु गटविकास अधिकारी चिखली यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली असल्याचे प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे,
चिखली तालुक्यातील पंचवीस ग्रा. पं.नी कोरोना साहित्य खरेदीत गैर व्यवहार केल्याच्या वारंवार तक्रारी गटविकास अधिकारी पं. स.चिखली यांच्याकडे ग्रामस्थांनी व शेतकरी संघर्ष समितीद्वारे करण्यात आलेल्या असतांना देखील गट विकास अधिकारी जाधव यांनी सदर ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याने व कोरोना साहित्य खरेदी संदर्भात झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी संघर्ष समितीद्वारे त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आलेली असल्याने त्या अनुषंगाने
उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडून सदर प्राप्त झालेल्या तक्रारीची तात्काळ कार्यवाही करण्यात यावे असे आदेश जारी केले असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पं. स. गटविकास अधिकारी यांना सदर विषयांकित प्रकरणी प्रशांत ढोरे पाटील शेतकरी संघर्ष समिती चिखली यांची तक्रार संदर्भीय विषया नुसार कार्यालयात प्राप्त झालेली असून सदर तक्रारींचे तात्काळ अवलोकन व्हावे व संदर्भीय तक्रार अर्जामध्ये नमुद मुद्यांची तात्काळ चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येऊन केलेल्या कार्यवाही बाबतचे प्रशांत ढोरे पाटील यांना पंचायत समिती स्तरावरून कळवण्यात यावे तसेच आपला स्वयंस्पष्ट कार्यपूर्ती अहवाल अभिप्रायासह शासनाकडे व जिल्हा परिषद कार्यालयात सात दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले होते,सदर आशयाचे पत्र पं. स. गटविकास अधिकारी चिखली यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कडून देण्यात आले होते परंतु आध्याप पर्यंत देखील तक्रार अर्जात नमूद मुद्यांची कुठली ही चौकशी केलेली नसून कुठलीच माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेली नसून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सह जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला देखील चिखली गट विकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखवलेली असल्याचे प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.

चिखली आगाराची साखरखेर्डा रात्री मुक्कामी असणारी बस गेल्या आठ महिन्यापासून बंदच ! प्रवाशांचे हाल ! बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

कोरोना काळामध्ये सर्वच दळणवळणाची साधने बंद होती एसटी महामंडळाने सुद्धा एसटी बस ह्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता !परंतु महाराष्ट्र शासनाने अनलॉक उघडल्यानंतर एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा रस्त्याने धावू लागल्या !व यामुळे प्रवास करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला ‘परंतु अनलॉक उघडल्यानंतर ही चिखली आगराची महत्त्वपूर्ण रात्रीच्या वेळेला फेरी असणारे चिखली – मेरा खुर्द -शिंदी ते साखरखेर्डा मार्गे धावणारी बस गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे !त्यामुळे रात्रीच्या वेळी मेरा खुर्द ,अंत्रि खेडेकर, मेरा बुद्रुक, शिंदी – साखरखेर्डा या मार्गाने येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहे,चिखली आगाराची चिखली ते साखरखेर्डा ही बस अतिशय महत्त्वपूर्ण आहे !औरंगाबाद -जालन्याहून रात्रीच्या वेळेस येणारे प्रवासी हे मेरा खुर्द येथे बसची वाट पहात थांबत असतात ‘तसेच साखरखेर्डा येथे जाणारे प्रवासी सुद्धा त्याच बस ची वाट बघत असतात ‘ही बस चिखली आगारातून ७ वाजता रात्रीच्या वेळेला निघतेव साखरखेर्डा येथे रात्रभर मुक्कामी असते व सकाळी सहा वाजता ही बस परत चिखलीला जाते ।सकाळच्या वेळेला औरंगाबाद – जालना – चिखली बुलढाणा याठिकाणी जाणारे प्रवासी हे त्या बसनेच प्रवास करत असतात ‘त्यामुळे ही बस बंद असल्यामुळे प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे चिखली आगाराने त्वरित चिखली ते साखरखेर्डा रात्रीच्या वेळेला मुक्कामी असणारी बस सुरू करावी अशी मागणी या वेळी प्रवाशांनी केली आहे !

नगरपालिका कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक ; न प कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव: येथील गांधी चौकामध्ये असलेल्या नगर पालिका कार्यालयाच्या इमारतीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शेगाव नगरपालिका कार्यालयात दररोज प्रमाणे कामकाज सुरू होते अज्ञात समाजकंटकांनी दुपारी साडेबारा एक वाजे दरम्यान नगरपालिका इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक करून दरवाज्याचे काच फोडले.
या घटनेमुळे नगरपालिका कार्यालयात उपस्थित कर्मचारी व इतर कामानिमित्त आलेल्या शहरवासीय मध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसत होते या घटनेच्या निषेधार्थ शेगांव नगरपालिका कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले त्यामुळे नगरपालिका कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. या घटनेच्या विरोधात शेगांव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने शेगाव शहर पोलीस स्टेशनला जाऊन लेखी स्वरूपात तक्रार वजा निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये नगरपालिका इमारतीवर दगडफेक करून प्रवेशद्वाराचे तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे या तक्रारी वजा निवेदनावर विजयकुमार आश्रमा, एसएस बोबडे, एस पी इंगोले ,पालीवाल, देशमुख यांच्यासह ईतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

मनसेचा_१_दिवसीय_धरणे_आंदोलन

0

 

गोंदिया. दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी मंगळवारी सकाळी ११:०० वाजता पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, जिल्हाअध्यक्ष हेमंत लिल्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन घेण्यात आले, या आंदोलना मध्ये कोरोनाच्या काळात लाॅकडाऊन नंतर जेमतेम सामन्य जनता कसेबसे आपल्या कामधंदा किंवा व्यापाराच्या गाढ्या सावरत असतांनाच केंद्र सरकारने पेट्रोल, गॅस, डिझेल दर वाढविले ते कमी करावे तसेच राज्य सरकारने लाॅकडाऊनच्या काळात ३ महिन्याचे वाढीव वीज बील माफ करण्यात यावे, या संदर्भात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जाहीर निषेध करण्यात आले. आणि बिरसी विमानतळ येथील प्रकल्पग्रस्त कामगार यांना कामावरून काढून टाकले, एकूण ४४ युवकांना या प्रकल्पात सुरक्षा म्हणून कामावर घेतले त्यांच्या या सेवेला आता १३ ते १४ वर्ष झालेले आहे एवढ्या वर्षांनंतर आता. या सर्वांना परत कामावर घेण्यात यावे. तसेच गोंदिया शहरातील प्रमुख व अन्य मागण्या छोट्या गोंदिया येथील प्राथमिक व हायस्कूलची जिर्ण इमारतीला ७० ते ८० वर्ष झाले असून ती इमारत पाडून नवीन इमारत तयार करण्यात यावी, गोंदियातील मोक्षधाम परिसरा समोर घण कचरा (डम्पींग यार्ड) ची व्यवस्था शहरातून बाहेर करण्यात यावे,
जिल्हा अधिकाऱ्याच्या शासकीय इमारतीचे व रोडाचे (सौंदर्यीकरण) बांधकाम विना टेंडर परवानगी करण्यात आले. त्यातील दोषी कार्यकारी अभियंता जावेद यांच्यावर कार्यवाही करण्यात यावे, जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभाग कार्यालयात ऐ.सी. न लावता दोन वेळा बिल काढणाऱ्या अधिकारी व ठेकेदावर गुन्हा दाखल करण्यात यावे, गोंदिया शहराला लागत एकमेव पांगोली नदी चे सौदर्यकरण करण्यात यावे ह्या सर्व मांगाना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे घेवून, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, जिल्हा उपाध्यक्ष लेखू रहांगडाले, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभुषण बैस, गोरेगांव तालुका अध्यक्ष शैलेश जांभूळकर, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे, गोंदिया शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, जिल्हा सचिव निखिल ढोंगे, अमोल लांजेवार,राणासिंह नागपुरे, रोहित उके, अमित अग्रवाल, दिलीप ढेकवार, हेमराज ठाकरे, मंगेश चौबे, प्रकाश फंटीग, नितिन पटले, सागर गौतम, सुरेश पटले, कमरुदीन शेख, उत्तम गुरवेले, अभव श्यामकुवर, प्रदिप नैकाते, पंकज वंजारी, सकिम शेख, दिनेश हेमणे अरविंद पण्डेले, विजय चंदेल, सुभाष निरवाडे, अशोक उपवंशी,सुधाकर कांबळे, रजनिस धमगाये, अंकित भैरम, झुल्लासिंह बरेले लोकेश बनाफट, निखिल गडपायले, संदीप चवरे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

बर्ड फ्लू च्या धास्तीने चिकन ऐवजी ग्राहकाची मासे व बोकडाला पसंदी !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यातील भानखेड येथील वीस कोंबड्यांचा मृत्यू झाला होता व त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्या नंबर बर्ड फ्ल्यूमुळे त्या मृत्युमुखी पडलेल्या होत्या !त्यामुळे चिकन खाणाऱ्या मंडळीचा पुरता हिरमोड झाला आहे :चिकन खाणारे ग्राहक हे आता मासे व बोकडाच्या मटणाच्या कडे वळले आहे .हे चित्र सध्या दिसत आहे ! सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या साखरखेर्डा येथील मटन बाजारामध्ये मंगळवारी बोकड्याचे मटन व मासोळी घेण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी झाली होती !व चिकन घेणाऱ्यांची संख्या ही तुरळक होती !त्यामुळे बर्ड फ्लू च्या धास्तीने चिकन खाणारे खवय्ये दुसरीकडे वळण्याची दिसते !त्यातच करून मुळे वर्षभर सर्वच दुकाने बंद असल्यामुळे अनेक लोकांचा हिरमोड झाला होता!काही का असेना खवय्ये बोकड व मासोळी घेण्यासाठी मटण मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहे हे मात्र खरे !

साखरखेर्डा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळे न्यायाधीशाच्या भूमिकेत ! अनेक घरगुती तंटे जागच्याजागी मिटवले !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे मागील ठाणेदार संग्राम पाटील यांच्या जागी बुलढाणा येथून आलेले श्री जितेंद्र आडोळे ‘यांना जेमतेम दोन महिने झाले असतील ‘या दोन महिन्याच्या अल्पशा कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या !त्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुकी होय !ग्रामपंचायत म्हटलं तर शुल्लक कारणांवरून भांडणे होतात अनेक ग्रामपंचायत चे वाद साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये आले होते ‘ वाद म्हटल्यावर एकमेकाची पोलिसात तक्रार केल्यानंतर दाखल होणारे गुन्हे आणि त्यानंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये जाते ‘परंतु या सर्व गोष्टींचा विचार करताना ठाणेदार श्री या आडोळे यांनी दोन्ही फिर्यादीने अगदी बारीक गोष्टी समजून समजून पुढे भांडणाचे कशाप्रकारे रूपांतर होते !या सर्व गोष्टी ती पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या प्रत्येक तक्रार करत्याला ते सांगत असतात ‘आणि त्याचाच परिणाम म्हणून मोठमोठ्या वादात होऊ घातलेले भांडणाचे रुपांतर क्षणातच त्यांनी मिटवले ।दारू पिऊन नवरा बायकोचे होणारे वाद त्यांनी सहज मिटवले !एवढेच नव्हे तर अतिशय गाजलेले प्रकरण अंडे का फंडा होय ।मुलाला दोन बॉयलर अंडे पत्नीने दिले म्हणून नवऱ्याने पत्नीला मारले व पत्नी ने थेट पोलिस स्टेशनच गाठले ।या ठिकाणी ठाणेदार श्री आडोळे यांनी फिर्यादी महिलेच्या भावाची भूमिका तर मुलाच्या मामाची भूमिका चातुर्याने निभावून ।महिलेच्या नवऱ्याला बॉयलर अंडे आणून दिले व प्रकरण मिटवले !असे अनेक घरगुती प्रकरण मोठमोठाले संवेदनशील प्रकरण ठाणेदार श्री आडोळे पोलीस स्टेशन मध्ये मिटवून ‘इतर पोलिस स्टेशनला एक आदर्श घालून देत आहेत :या ठिकाणी ते न्यायाधीशाची भूमिका पार पाडत आहे !यामुळे श्री आडोळे यांचे संपूर्ण परिसरामध्ये कौतुक होत आहे 1 – – – — — — — — — !प्रत्येक फिर्यादी हा न्याय मिळेल या आशेने पोलीस स्टेशन मध्ये येत असतो त्या प्रत्येकाचे तक्रारीचा निपटारा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे प्रकरण समस्या मिटली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहे !निश्चितच यामुळे लोकांचा पोलीस स्टेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल – – – – –श्री जितेंद्र आडोळे ठाणेदार (साखरखेर्डा पोलीस स्टेशन )

गजानन महाराज मंदिराच्या प्रथम प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन निमित्त महाप्रसादाचे वाटप

0

 

अजहर शाह मोताळा

मोताळा :- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ उभारण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराच्या प्रथम प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिना निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री च्या भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला जागतिक महामारी असलेल्या कोरोना आजाराने भक्तांना देवा पासुन प्रदीर्घ अश्या लॉकडाउन काळात मंदिर बंद असल्याने दूर ठेवले होते परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असताना लॉकडाउन काळात भक्त आणि देवा मध्ये झालेला दुरावा कमी करण्यासाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ उभारलेल्या श्री च्या भव्य मंदिरात गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भक्ती पूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढून श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती
याचं श्री गजानन महाराज यांच्या प्रथम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन निमित्त भक्तांची भगवंताची भेट व्हावी व लॉकडाउन काळात झालेला दुरावा दूर करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने पंचक्रोशीतील भाविक-भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी सदस्य यांनी कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेता मंदिर परिसरात विविध उपाययोजना केल्या होत्या

शेतातून ४५,००० रुपयाचे बैल चोरीला, पांग्री काटे येथील घटना !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील पांग्री काटे या गावांमध्ये दोन बैला चोरीला गेल्याची घटना दिनांक 31 जानेवारीच्या मध्यरात्री घडली .
त्यामुळे पशु मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ‘अगोदरच शेतकरी अतिवृष्टीमुळे तसेच नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे बळीराजा शेतीची मशागत करण्याकरता गाय ‘बैलांचे संगोपन करतो ‘ काळजी घेतो ‘परंतु याकडे सुद्धा चोरट्यांची लक्ष आहे ‘ जनावराची सुद्धा चोरी केले जातेही दुर्दैव आहे ‘पांग्री काटे येथील विश्वास तुळशीराम बोरे ‘यांचा गावाजवळच जनावराचा गोठा आहे तुळशीराम बोरे ‘ हे नेहमीप्रमाणे आपली जनावरे गोठ्यामध्ये बांधले असतांना ’31 जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे लाल रंग असलेले पंचेचाळीस हजार रुपयाचे दोन बैल ‘चोरून नेले सकाळी ‘नेहमीप्रमाणे चारा पाणी करण्यासाठी विश्वास तुळशीराम बोरे हे गोठ्यामध्ये गेली असताना त्यांना बैल आढळून आले नाही .त्यांनी चोहीकडे शोधाशोध केली असताना कुठेही बैलाचा थांगपत्ता लागला नाही ‘