Home Blog Page 541

पिकविम्या साठी एल्गार संघटनेचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

शेतकऱ्यांना पिकविमा विज बिल माफी याच्यासह विविध मागण्यांसाठी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी हजारो अन्याय ग्रस्त शेतकरी एल्गार संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पीक विम्याचे क्लेम फॉर्म घेऊन हजारो शेतकरी कॉटन मार्केट येथे जमले होते तेथून मोर्चाला सुरुवात होऊन हा मोर्चा स्थानिक दुर्गा चौकात येऊन धडकला त्या ठिकाणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे क्लेम फॉर्म जमा करण्यात आले जर का शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही तर यापुढे मोर्चाची धडक निवेदन देवुन 11 दिवसात मागण्याची पुर्तता न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी प्रशासनास दिला— निर्धारित वेळेत पिक विमा न मिळाल्यास 15 फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन- प्रसेनजीत पाटील(खुटं मोर्चा सभेत ऐलान—)जळगाव जामोद 37 पैसे पीक आणेवारी जाहीर झाली असून तालुक्यातील पिक विमा धारक शेतकरी नियमाप्रमाणे पिक विमा मिळण्यास पात्र आहेत, परंतु पीक विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे जर निर्धारित वेळेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर 15 फेब्रुवारी पासून उपविभागीय कार्यालयासमोर एल्गार संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आज चार फेब्रुवारी रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी मोर्च्याच्या सभेत ला संबोधित करताना दिला आहे.रिलायन्स विमा कंपनी ही पात्र लाभार्थ्यांना हक्काचा विमा क्लेम देण्यास टाळाटाळ करत आहे म्हणून आज हा मोर्चा एल्गार संघटनेच्या वतीने प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर आपापले ट्रॅक्टर घेऊन जमले होते तसेच अनेक शेतकरी हे हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते सदर मोर्चा हा शहरातील विविध मार्गांनी एसडीओ कार्यालयावर जात असताना स्थानिक दुर्गा चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, यावेळी एल्गार संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून पिक विमा देण्याची तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाला समर्थन व्यक्त केले, यावेळी मंचावर प्रसेनजीत पाटिल,प्रशांत डिक्कर,विजय पोहनकार,रमेश बानाईत,आसिफ .राजेंद्र देशमुख,गौतम गवई,परशुराम येऊल, रवि धुळे,संतोष देशमुख,राजू पाटिल अवचार,अनंता वाघ,श्रीकृष्ण जाधव,भागवत अवचार,आशिष वायझोड़े,ईरफान शेट्टी,मुजहिर मौलाना,रोशन देशमुख आदींची उपस्थिती होती

पुणे येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषद मध्ये शरजील उस्मानी या व्यक्ती ने हिंदू समाजावर केलेल्या वक्तव्या बद्दल अटक करून गुन्हा दाखल करण्या बाबत

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

पुणे शहरामध्ये दिनांक ३१ जानेवारी ला एल्गार परिषदेच्या माध्यमातून शरजील उस्मानी या व्यक्तीने एका १४ वर्षांच्या मुलाला धावत्या ट्रेनमध्ये काही लोकांनी चाकुने मारत असतांना त्याला कोणीही वाचविले नसल्यामुळे उस्मानी याने सरळ “हिंदू समाज सळाहुआ समाज है” अशा उल्लेख करुन त्याने हिंदू समाज बांधवांच मनदुखावल्या गेला या हिंदू समाजाला बदनाम करण्याच काम या व्यक्ती व्दारे करण्यात आलं अनेक वेळा प्रवास करतांनी अपघात होत असतात किंवा मारामारी सुध्दा होतांनी बघितले पण तो कोणी किंवा हिंदू किंवा मुस्लिम आहे. म्हणुन जाणून मारत नसतो. व प्रवास करणारा व्यक्ती प्रवास करतांनी कोणाच्या भांगळीत पडण्यास नकार देतो म्हणून दुर्लक्ष करुण निघून जातात. याचा अर्थ हिंदू समाजावर दोषा रोपन करने हे चुकीचे आहे. त्या ट्रेन धर्मा अन्य धर्माचे लोक ही प्रवास करत असतात पण हिंदू धर्मालय टार्गेट करुन हा उस्मानी हिंदू V/s मुस्लिम अशा वाद पेटविण्याचा उद्देशाने आला व त्याने हिंदूना डिवचनाचा काम करुन आपलं उद्देश पुर्ण करुन या दोन्ही धर्मात भाडंन लाऊन प्रसार झाला. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हा तर्फे निवेदन सादर करून शरजील उस्मानी अशा माथेफीथू व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावे ही. विनंती
जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा,गोंदिया तालुका अध्यक्ष,सुरेश ठाकरे,गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे,गोरेगाव तालुका अध्यक्ष,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,

पदमपूर परिसरात भुकेमुळे तीन वर्षीय बिबट्याचा मृत्यू

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

आमगाव- तालुक्यातील पदमपूर गाव परिसरात वाघ नदीच्या कटेवर संरक्षित वन कम्पार्टमेंट 489 मध्ये एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना 2 फेब्रुवारीला समोर आली असून हा नर जातीचा बिबट्या आहे. या बिबट्याचा भूकेने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

गोंदिया जिल्ह्यात बिबट्या आणि वाघांची शिकार झाल्याची दोन मोठी प्रकरणे समोर आली आहेत. यातच आमगाव तालुक्याच्या पदमपुर येथील वाघ नदीच्या परिसरात संरक्षित वनात वन विभागातील कर्मचारी व वन मंजूर वन परिसरात गस्त करत असताना त्यांना एक बिबट मृतावस्थेत आढळा. या विषयी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत त्या मृत बिबट्या ला आमगाव येथी वन विभाग कार्यलयात आण्यात आनले. या घटनेमुळे विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

बिबटाची करंट लावून शिकार तर करण्यात आली नाही ना या बाजुने देखील वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली आहे. मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची उत्तरीय तपासणी केल्यावर त्याच्या मृत्यु भुकेमुळे झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. उत्तरीय तपासणी आमगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. कोटांगले व डॉ. रहांगडाले यांनी केली. या घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्राधिकारी अभिजीत इमलकर, क्षेत्रसहायक बी. पी. राउत, वनरक्षक नितीन लांजेवार, ढगे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे यांना गोंदियावरून पाचरण करण्यात आले होते. हा बिबट तीन वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. त्या मृत बिबट्याचा पंचनामा करत त्यांचे शव विच्छेदन करण्यात आले असून त्याचे वनविभागा द्वारे अंतसंस्कार करण्यात आले.

खाऊचा जमवलेला निधी भव्य श्रीराम मंदिरासाठी देऊन चिमुकल्या हिंदवीने उचलला खारीचा वाटा

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

लहान मुले ही देवाघरची फुले असतात असे म्हटले जाते. निरागस लहान बालकांमधील अद्वितीय गुणांचा जेव्हा परिचय होतो तेव्हा त्याची उपमा दुसर्‍या कशालाही देता येणार नाही. दुसऱ्यांना मदतीचा हात देण्याची त्यांची सेवाभावी वृत्ती फ़ार कौतुकास्पद ठरते.
मुलं जरी वयाने लहान असली तरी इतरांना मदतीचा हात देण्याबाबत ती निवडक ठरतात व त्यांच्यातील सहकार्याची बीजे परिपक्व होत जातात. याचाच उत्तम दाखला म्हणजे नांदुरा खुर्द येथील कु. हिंदवी प्रकाश बावस्कार हिने आपला खाऊचा निधी श्रीराम मंदिर उभारणीच्या पवित्र कार्यासाठी देऊन अत्यंत कमी वयातील आपल्या औदार्य वृत्तीचा परिचय करून दिला.
अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या भव्य श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडून स्वेच्छेने केलेली आर्थिक मदत स्वीकारली जात आहे. साकारल्या जात असलेल्या भव्य श्रीराम मंदिरास आपला सुद्धा हातभार लागावा या उद्देशाने नांदुरा खुर्द येथील चार वर्षीय कु. हिंदवी प्रकाश बावस्कार हिने गेल्या अनेक दिवसांपासून साठवून ठेवलेला आपला खाऊचा निधी हा नि:स्वार्थीपणे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन समितीच्या सदस्यांकडे सोपवीला. एवढ्या कमी वयात सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलणाऱ्या हिंदवीच्या या सेवाभावी गुणांचा सर्वांना परिचय झाला. अत्यंत कमी वयात हिंदवीने दाखविलेल्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नगरसेवकाच्या तक्रारीची दखल न घेता मुख्याधिकारी संबंधित लिपिक यांनी ठेकेदाराची संगनमत करून काढले घनकचऱ्याचे बोगस लाखोंचे बिल…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरामध्ये नगरपरिषदेच्या अंतर्गत उचलल्या जाणारा ओला व सुका कचरा कत्राट सन 2020-2021 करीता अंदाजे किंमत 74 लक्ष रुपयांमध्ये हे देण्यात आले आहे यामध्ये प्रत्येक प्रभागात मधून ओला व सुका कचरा संकलन करून डम्पिंग ग्राउंड येथे ये पोचविणे करिता हे कंत्राट जळगाव जामोद येथील देशमुख यांना देण्यात आले आहे परंतु सतत सदर पत्र मुख्याधिकारी व आरोग्य अभियंता पल्लवी इंगळे आणि नगर परिषदेमध्ये सत्तेत असलेले पक्ष पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष कंत्राटदार यांच्याशी स्वतःच्या फायद्या साठी संगत मत करून लाखोचे बोगस बिल काढले आहे.तसेच नगरपरिषदेचा कचरा आर्थिक हेतूने आरोग्याच्या दृष्टीने कचरा संकलन व्यवस्थित होत नाही कचरा संकलन गाड्या व मजूर वर्ग हा ठरल्याप्रमाणे त्याचे काम करतो त्यामुळे यासंदर्भातील शासन आदेशाची पायमल्ली करत असून लोकांच्या आरोग्याची खेळ करत आहे परंतु नगर सेवकांच्या वरील आशयाच्या तक्रारीची दखल न घेता स्वतःच्या आर्थिक फायदा या करिता सदर कंत्राटदाराचे बोगस बिल काढून एका प्रकारे अपहार करून कर्तव्यात कसूर केला आहे यामुळे मुख्याधिकारी आरोग्य अभियंता व संबंधित सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक यांनी संगनमत करून जनतेच्या आरोग्याशी खेळ केला आहे प्रसंगी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाचे नगरसेवक तथा शिक्षण सभापती रमेश ताडे यांनी केली आहे

पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन !30 टक्के महिला व तीन टक्के अपंगांना संधी !अर्ज करण्याचे पशुधन विस्ताराधिकारी श्री उदार यांचे आवाहन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत मागासवर्गीय विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रियाअकोला अकोला पंचायत समिती स्तरावर पशुधन विस्तार अधिकारी मार्फत सुरू झाली आहे सदर अर्जाचा नमुना पशुधन कार्यालयामध्ये उपलब्ध आहे .या अर्जाच्या व्यतिरिक्त इतर दुसरा कुठलाही प्रकारचा अर्ज स्वीकारले जाणार नाही सदर योजने अंतर्गत दिनांक 4 फेब्रुवारी 20 21 पासून अर्ज स्वीकारण्यात येतील अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 असणार आहे !अर्जदार हा मागासवर्गीय समाजाचा तसेच दारिद्र रेषेखालील असावा अर्जदाराकडे दुधाळ जनावरे शेळ्या कोंबड्या असणे आवश्यक आहे अर्जदारास १ मे 2000 हजार नंतर तिसरे अपत्य नसावे तसा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा अर्जासोबत नुकतेच काढलेले छायाचित्र जोडावे योजनेमध्ये तीस टक्के महिला व 3% अपंग अर्जदाराचा समावेश असावा लाभार्थ्यास या योजनेचा लाभ 2020 – 21 च्या प्राप्त तरतुदीचे अधिन राहून देण्यात येईल । वशिली बाजूला कुठल्याही प्रकारचे थारा नसूनअर्जदाराने अर्ज करावा !अशी आव्हान सिंदखेडराजा पशुधन विस्तार अधिकारी श्री उदार यांनी केली आहे !

नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी व राष्ट्र सेविका समिती यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

विविध सामाजिक उपक्रम व भारतीय सण-उत्सवांच्या माध्यमातून महिलांमध्ये एकात्मता व एकोप्याची भावना वाढविण्याचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी व राष्ट्र सेविका समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारचे सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने आज बुधवार दि. ०३/०२/२०२१ रोजी हळदी कुंकू व तिळगुळ, श्रीराम दीपोत्सव व महिला सक्षमीकरण या सांस्कृतिक, अध्यात्मिक व सामाजिक मांगल्याचे प्रतिक असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन नांदुरा येथील श्री राम मंदिर, नागलकर ले-आउट येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. उज्वलाताई चैनसुखजी संचेती तर मान्यवर म्हणून भाजपा महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा सौ. सिंधुताई खेडेकर, भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ. अलकाताई पाठक, भाजपा महिला आघाडी जिल्हा सोशल मीडिया संयोजिका नंदिनीताई साळवे ह्या उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आराध्य दैवत प्रभु श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन होऊन महिलांना हळदी कुंकू व तिळ गूळ वाटप उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचे महत्व प्रतिपादीत करण्यात आले. त्यानंतर अयोध्या येथे साकारल्या जाणाऱ्या भव्य श्री राम मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्याकडून महिलांना विविध सामाजिक बाबींवर महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
नांदुरा शहर व परिसरातील तसेच ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील असंख्य महिलांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळून महिलांच्या सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचे महत्व अधोरेखीत झाले. या कार्यक्रमासाठी सौ. शीतल ताई डागा यांनी रेखाटलेली प्रभू श्री राम यांची अद्वितीय रांगोळी ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी व राष्ट्र सेविका समितीच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.

सवडद येथे 13 फेब्रुवारी पासून गणेशोत्सव ! सप्त खंजेरी वादक संदिपाल महाराजांसह तिनही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम !

0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

करोना प्रादुर्भावामुळे समाजामध्ये भीतीचे, भयाचे वातावरण आहे. आजूबाजूला सतत ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे लोक घाबरतात. ज्यांच्या कुटुंबापर्यंत करोना पोहोचला आहे, ती कुटुंबे त्याहीपेक्षा जास्त घाबरलेली आहेत. भयभीत अशी स्थिती दुर्दैवाने निर्माण झाली आहे. करोनाने एकूण समाजव्यवस्था आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्टय़ा उद्ध्वस्त केली आहेच, पण मानसिकता आणि मानवी भावपटलावरही त्याचे ओरखडे उठले आहेत. हे भय, चिंता या साऱ्यातून समाजाला मानसिकदृष्टय़ा बाहेर काढणे हेसुद्धा एक आव्हान आहे. एकीकडे न दिसणाऱ्या विषाणूच्या विरोधात लढाई लढायची आहे, तर दुसरीकडे या भयगंडातून, नैराश्यातून थिजलेल्या समाजव्यवस्थेच्या चक्रालाही गतिमान करण्याचे आव्हान आहे. या सगळ्या लढाईमध्ये विज्ञान, वैज्ञानिक साधने, औषधे हे जसे उपयोगी ठरत आहेत, ठरणार आहेत; त्यासोबतच धार्मिक परंपरा, विधी, सण-उत्सव आणि त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा हीसुद्धा समाजाला नैराश्यातून बाहेर काढू शकते, भयमुक्त करू शकते. म्हणून उत्सवप्रिय समाजाला नियमांचे पालन करून हळूहळू त्या दिशेने घेऊन जाणे गरजेचे आहे. काही अंशी हे काम आपण करीत आहोत आणि म्हणूनच अखंड परंपरा असणारी वैष्णवांची वारी जरी या वर्षी होऊ शकली नाही, तरी वारकरी परंपरेला खंड न पडू देता संतांच्या पादुका पंढरपुरात गेल्या. शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठलाचा आषाढीचा सोहळा संपन्न झाला. यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा ही वारकरी समाजाला चेतना देणारीच ठरेल, तशी ऊर्जा निर्माण करणे ही आता गणेशोत्सव मंडळांचीसुद्धा जबाबदारी होऊन बसली आहे. याचेच औचित्य साधून सालाबादाप्रमाणे मौजे सवडद येथे श्री सिद्धिविनायक मंदिरावर तिन दिवसीय गणेश जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सोशल डिस्टसिंगचा वापर करून दि 13 पासून ह्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून पहिल्या दिवशी सकाळी 9 ते 12 डॉ. ज्ञानेश्वर तांगडे बालरुग्णायल साखरखेर्डा हे मोफत बालरोग तपासणी तथा मोफत औषधोपचार करणार आहेत. सायंकाळी 8 ते 10वा गणेश घुले औरंगाबाद यांचा विद्यार्थ्यांना उर्जा देणारा “सुंदर माझी शाळा” जागर बालकवितेचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे दि 14 फेब्रुवारी रोजी रात्रौ 8 ते 10 राष्ट्रीय किर्तनकार सप्त खंजेरी वादक संदिपाल महाराज यांचा कार्यक्रम तर दि 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बालकिर्तनकार सोहम महाराज काकडे यांचे काल्याचे किर्तन नंतर किशोर महाजन, ओमप्रकाश अग्रवाल, डॉ शेषराव देशमुख यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप रात्रौ 8 ते 10 गुरूदेव सेवा मंडळ वझर खामगाव यांच्या कार्यक्रमाने सांगता होईल. दरम्यान तिन्ही दिवस सकाळी 11 ते 5 ह. भ.प.अशोक महाराज घायाळ यांच्या अमृवाणीतून गणेश पुराण कथासार संपन्न होणार आहे. यामध्ये हरिपाठ, भजन असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने भाविकांनी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

गावंडे महाविद्यालय समोरील गतीवरोधकाला पांढरे पट्टे मारण्याची मागणी !गतीरोधक दिसत नसल्याने अपघाताचे सत्र सुरूच !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

गावंडे महाविद्यालयासमोरील गतीवरोध काला पांढरपट्टे नसल्यामुळे रोज अपघात घडत आहे !साखरखेर्डा येथुन पाचशे मीटर अंतरावर शिंगणे महाविद्यालय आहे येथे जवळपास सात ते आठ हजार विद्यार्थी विविध विषयात शिक्षण घेत आहे ‘महाविद्यालया मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी पालकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि साखरखेर्डा येथून हा रस्ता लव्हाळा मार्गे मेहकर – चिखली -खामगाव -तिकडे जाते त्यामुळे वाहनधारकांची संख्या या रस्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये आहे !तसेच दुचाकीस्वारांची संख्या खूप आहे ।दुचाकीस्वरांना दोन्ही गतिरोधक हे दिसत नसल्यामुळे हात सटकून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे ‘या गतिरोधक आवर आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून ४०च्या वर दुचाकीस्वार मोटर सायकल वरून पडले आहे !गावंडे महाविद्यालया समोरील गतीवरोधकावर अपघाताची मालिका सुरूच असून अनेकांना आपले हात-पाय गमवावे लागले आहे ‘अनेक मुले -महिला जखमी सुद्धा झालेले आहेत ‘तरी दोन्ही गतीरोधकावर कायमस्वरूपी पांढरे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी वाहनचालक करीत आहेत !

ओ टी एस पी योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे वाटप करण्याकरता लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहान !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

ओ टी एस पी योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे गट ‘शेळी गट वाटप करणे करता अनुसूचित जाती गटातील लाभार्थ्यांनी या योजने करता अर्ज सादर करावे असे आवाहन सिंदखेडराजा पशुधन विस्तार अधिकारी श्री उदार तसेच साखरखेर्डा येथील पशुवैद्यकीय डॉक्टर श्री शिंगणे यांनी केली आहे ‘सन 2020-2021मध्ये ओ टी एस पी योजनेअंतर्गत75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप करतात रुपये वीस लाख व शेळी गट वाटप करता रुपये दहा लाखाची तरतूद जिल्हा पशुसंवर्धन विभाग बुलढाणा यांच्याकडे प्राप्त झालेली आहे !तरी सदरहू दुधाळ जनावरे वाटप करण्याकरता सिनखेडराजा तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज पशुधन कार्यालय सिंदखेड राजा येथे सादर करावा !अर्ज करण्याची तारीख 1 फेब्रुवारी 20 21 पासूनअर्ज स्विकारण्याची सुरुवात होईल ।तर 28 फेब्रुवारी 2021 हे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख असेल !लाभार्थ्यांनी अर्जासोबत खालील प्रकारचे कागदपत्रे जोडावी !
1 )आधार कार्डची सत्यप्रत २) दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला 3) सातबारा व आठ अ ग्रामपंचायत नमुना ) ४ )प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत ५ )जातीच्या दाखल्याची सत्यप्रत ६ ) बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र ७)रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत ८ )अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ९) बँक पासबुक ची सत्यप्रत १० )अपत्याचे प्रमाणपत्र ११ )
रेशन कार्डाची सत्यप्रत !
इत्यादी कागदपत्रे लाभार्थ्यांनी अर्जासोबत जोडायची आहे !