Home Blog Page 542

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ला तथागत युवा फाउंडेशन चा जाहीर पाठिंबा !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

दि.३ फेब्रुवारी रोजी, इस्लाम्पुर येथे तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन निता आनंदा बनसोडे महाराष्ट्र सचिव महीला आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यकर्त्यांसह संपूर्ण ऑल इंडिया यूथ फेडरेशन (AIYF)
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AIYF) मा.हरीश भाऊ कांबळे जिल्हा अध्यक्ष
ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन,कोल्हापूर
मा.प्रशांत भाऊ आंबी राज्य सेक्रेटरी *किसान पुत्र संघर्ष यात्रा* दवऱ्यावर असता कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे
दि. 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2021 यांचे दि.३ फेब्रुवारी रोजी, तथागत युवा फाउंडेशन ग्रुप महाराष्ट्र राज्य, यांचेकडून इस्लामपूर, ता.वाळवा,जिल्हा- सांगली येथे स्वागत करण्यात आले व किसान पुञ संघर्ष याञा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AIYF) जाहीर पाठींबा देण्यात आला…! यावेळी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य महीला आघाडी सचिव निता बनसोडे, मा.तुषार शिंदे जिल्हा अध्यक्ष,मा.अनिकेत भाऊ पवार वाळवा तालुका अध्यक्ष,करण कांबळे,आकाश कांबळे,मोन्टी कांबळे,डिगांम्बर कांबळे,अनिल कांबळे अहमद इनामदार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चिखली शहरातुन जाणार्या महामार्गावर रबलींग स्ट्रीप टाकुण वाहनांना स्पिड लिमिड बांधा

0

 

चिखली येथील महाबिज,दवाखाने,हाॅटेल समोर रबलींग स्ट्रीप टाका–स्वाभिमानीची मागणी

स्वाभिमानी संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

चिखली–शहरातुन जाणार्या खामगांव चौफुली ते मेहकर फाटा या महामार्गावर अनेक अपघात झाले अनेकांना जीव गमवावा लागला आहे.सतत होत असलेले अपघात पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा सरसावली असुन या महामार्गावर महत्वाच्या व वर्दळीच्या ठीकाणी रस्त्यावर रबलींग स्ट्रीप टाकण्यात यावे,शहरातुन जात असलेल्या वाहणांना गती क्षमता(स्पिड लिमिट )बांधुन देण्यात यावी,रस्ता कडेला बॅरीगेट लावण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानीचे नितिन राजपुत, विनायक सरनाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि०३फेब्रुवारी रोजी केली आहे.
चिखली शहरातुन जाणार्या खामगांव चौफुली ते मेहकर फाटा मधोमध आपघाताच्या प्रमाणामधे वाढ झाली आहे.या रस्त्यावर या एक दिड महिण्यामधे महाबिज समोर अनेक वेळा अपघात झाले परवा सुद्धा एका हाॅटेल समोर आपघात झाला आहे.या झालेल्या अपघातांमधे अनेकांना जिव गमवावा लागला आहे.सदर रस्त्यावर भरधाव वेगाने वाहणे चालत असतात तर याच महामार्गावर हाॅटेल्स असल्याने या ठिकाणी नियमीत लग्न समारंभ होत असल्याने गर्दि होत असती.भारतीय राज्य घटनेनुसार भारतीय नागरीकांना मुलभुत सुविधा पुरवीणे हे शासनाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे परंतु प्रशासनाकडुन कर्तव्यात कसुर होत असल्यानेच अनेकांना जिव गमवावा लागला असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.या झालेल्या वेगवेगळ्या आपघातामधे कहिना आपला मुलगा,भाऊ,वडील,पती नातेवाईक गमवले आहे.तर काहिंना कायमचे अपंगत्व आले आहे.तसेच अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे.यापुर्वी सुद्धा रस्त्यावर ठिकठीकाणी गतिरोधक टाकावे अशी मागणी करण्यात आली होती.परंतु दररोज होत असलेले अपघात पाहता खामगांव चौफुली ते मेहकर फाटा ठिकठिकाणी असलेल्या हॉटेल्स,पेट्रोल पंप व वर्दळीच्या ठिकाणी कलर रबल्लीग स्ट्रीप टाकण्यात यावे,शहरातुन बाहेर पडे पर्यत वाहनांना गती क्षमता बांधुन देण्यात यावी,तशा प्रकारचे फलक रबल्लींग स्ट्रीप समोर लावण्यात यावे,ज्या ठीकाणी बॅरीगेट नाहित अशा ठीकाणी तात्काळ बॅरीगेट लावावे,बॅरीगेट लावण्यात कसुर केल्याप्रकरणी संबंधीतावर मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करावे व होणार्या अपघातांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी पालकमंत्री, जिल्हाधिकारी,तहसिलदार,
राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता,यांच्याकडे करण्यात आली आहे.सदर मागण्यांची दखल घेऊन कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानीचे नितिन राजपुत, विनायक सरनाईक,अनिल चौहान,राम अंभोरे, सुधाकर तायडे,रविराज टाले,यांच्यासह आदिंनी दिला आहे.

भारतीय महाक्रांती सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार ! समाजकारणाची आवड असणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधण्याचे आवाहन .

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

भारतीय महाक्रांती सेनेची सध्या जिल्हा पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. समाजकार्य करण्यास इच्छुक युवक व्यक्तींनी तातडीने संपर्क करण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष ज्ञानेश्वर ताकोते पाटील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रा वैभव दाभाडे यांनी केले आहे
भारतीय महाक्रांती सेना एक सामाजिक संघटना असून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या भागात भारतीय महाक्रांती सेनेचे सामाजिक कार्य प्रशंसनीय आहे कोरोना काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक गरजूंना भरघोस मदत करण्यात आली आहे या काळात सर्वप्रथम भारतीय महाक्रांती सेनेच्या माध्यमातून समाजासाठी देशासाठी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला होता.सर्वप्रथम विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात त्या त्या विभागात जाऊन कोरोना काळात सुद्धा कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला होता. भारतीय महाक्रांती सेना समाजासाठी देशासाठी कार्य करत आहे.
विदर्भात व बुलढाणा जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी तसेच बुलढाणा जिल्ह्यात संघटनेचे पदाधिकारी शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, यांची निवड करण्याची प्रक्रिया होत आहे समाजासाठी धडपडणाऱ्या कार्य करु इच्छीत असणाऱ्या युवकांसाठी भारतीय महाक्रांती सेना सतत पुढे असते अशाच युवकांना एक सुवर्णसंधी भारतीय महाक्रांती क्रांती सेनेच्या माध्यमातून मिळत आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर 7066432459

कुवरदेव येथील वनामधून अवैधरित्या गोंध तस्करी करताना 3 आरोपी अटकेत तर 6 जण फरार.आरोपीजवळुन 21 हजार रुपयांचा सलाई गोंद जप्त…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद वनविभागामार्फत जामोद येथील राखीव वनपरिक्षेत्रातील कुवरदेव येथील वनातून अवैध रित्या सलाई गोंद काढून वाहतूक करणाऱ्या आरोपी क्रमांक 1 कृष्णा तुळशीराम बारकल वय 21 वर्षे राहणार कुंवरदेव तालुका जळगाव जामोद आरोपी क्रमांक 2 अनिल सुकलाल जमरा वय 21 वर्षे राहणार कुंवरदेव तालुका जळगाव जामोद आरोपी क्रमांक तीन कैलास राजू वय 19 वर्षे राहणार कुंवरदेव तालुका जळगाव जामोद यांना वन विभागाने अटक केली तर इतर 6आरोपी फरार आहे अटक केलेल्या आरोपीकडून 210 किलो सलाई गोंद जप्त केलेला असून त्याची किंमत 21 हजार रुपये आहे सदर आरोपीवर वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1 )अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच त्यांना आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथील न्यायालयामध्ये उपस्थित केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

संग्रामपुर मित्र परिवाराच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी

0

 

संग्रामपुर मित्र परिवाराच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन पळशीपुरा येथे करण्यात आले होते महाराष्ट्राचे दैवत्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले संग्रामपूर पळशीपुरा येथे छ शिवाजी महाराज , संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन गुलपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक नारायण ठाकरे गुरुजी हे होते तर व्यासपीठावर संग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंककर पुरोहित ,जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, शेख याकुब , डॉ अनिल वानखडे , रवि पहुरकर , शेख हमीद, राहुल शिरसोले , सह सर्व धर्मिय जेष्ठ नागरिकांची उपस्थीती होती यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या जिवन चरित्रावर जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी , संग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक शंक्कर पुरोहित , शेख हमीद यांनी प्रकाश टाकुन संतांचे गुण अंगिकारण्याचे आव्हाण केले प्रास्ताविक शिक्षक हरिभाऊ तायडे यांनी संचालन वैभव गायकी यांनी केले आभार प्रदर्शन अभिषेक गावंडे यांनी मानले कार्यक्रमाला बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

पोटाची खळगी भरण्याकरिता आजही बहुरूपी ची सोंग घेऊन घरोघरी फिरावे लागते !शासनाने मानधन देण्याची गरज -बहुरूपी साहेबराव शिंदे यांची मागणी –

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

असे म्हणतात टिचभर पोटा साठी काय काय करावे लागते !याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे साहेबराव शिंदे होय ।उटी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील साहेबराव तळीराम शिंदे हे बहुरूपी चे सोंग घेऊन सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या गावी आली असता त्यांच्याशी खास बातचीत केली व त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला !साहेबराव तुळशीराम शिंदे हे उटी तालुका मेहकर येथील रहिवासी आहे हे गेल्या 35 वर्षापासूनते बुलढाणा जिल्ह्यातील आपल्या घराचा गाडा आपल्या घरच्या लोकांचे पोट भरण्या करता विविध बहुरुपी सोंग घेऊन प्रत्येक घरोघरी भिक्षा मागत असतात ‘ते सांगतात की मला चार मुले आहेत ते आपापल्या कामात व्यस्त आहे ‘माझ्या पंजोबा पासून आमच्या घराला बहुरुपी सोंग घेऊन भिक्षा मागत असतो ‘मुलांना बहुरूपी ची सोंग घेऊन घरोघरी जाऊन भिक्षा मागायची लाज वाटते त्यामुळे मलाच घरोघरी जाऊन भिक्षा मागावी लागते ‘आज साहेबराव शिंदे यांचं वय 75 वर्षाचे आहे .घरी एकही गुंठा जमीन नाही ।ते सांगतात की माझे पणजोबा वडील हे महादेव, पार्वती ।पोलीस ,शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,हनुमान,राम,अशा विविध देवाचे तसेच महापुरुषाचे वेशभूषा करून ‘गावोगावी जाऊन लोकांचे कलेच्या माध्यमातून मनोरंजन करून आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असे ‘परंतु आता अँड्रॉइड मोबाईलचा जमाना आला व सर्व कला लोप पावत चालली ‘सर्व काही मोबाईल वर दिसत असल्यामुळे ‘बहुरूपी चे सोंग कोणी बघत नाही .अशी खंत यावेळी साहेबराव शिंदे यांनी व्यक्त केली ‘तसेच शासनाने करूनच या काळामध्ये एक रुपयाची सुद्धा मदत केली नाही त्यामुळे शासनाने बहुरूपी यांना तीन हजार रुपये मानधन महिन्याचे द्यावे अशी मागणीही यावेळी साहेबराव शिंदे यांनी केली !

चिखली गटविकास अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना दाखवली केराची टोपली

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रशांत ढोरे पाटील यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी साहित्य खरेदी संदर्भात झालेल्या गैरव्यवहाराबाबत ग्रा. पं.सचिवांना पाठीशी घालत असल्याने जाधव साहेब गटविकास अधिकारी चिखली यांची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली असता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी स्वयंस्पस्ट कार्यपूर्ती अहवाल अभिप्रायासह शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु गटविकास अधिकारी चिखली यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली असल्याचे प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे,
चिखली तालुक्यातील पंचवीस ग्रा. पं.नी कोरोना साहित्य खरेदीत गैर व्यवहार केल्याच्या वारंवार तक्रारी गटविकास अधिकारी पं. स.चिखली यांच्याकडे ग्रामस्थांनी व शेतकरी संघर्ष समितीद्वारे करण्यात आलेल्या असतांना देखील गट विकास अधिकारी जाधव यांनी सदर ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याने व कोरोना साहित्य खरेदी संदर्भात झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी संघर्ष समितीद्वारे त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आलेली असल्याने त्या अनुषंगाने
उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडून सदर प्राप्त झालेल्या तक्रारीची तात्काळ कार्यवाही करण्यात यावे असे आदेश जारी केले असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पं. स. गटविकास अधिकारी यांना सदर विषयांकित प्रकरणी प्रशांत ढोरे पाटील शेतकरी संघर्ष समिती चिखली यांची तक्रार संदर्भीय विषया नुसार कार्यालयात प्राप्त झालेली असून सदर तक्रारींचे तात्काळ अवलोकन व्हावे व संदर्भीय तक्रार अर्जामध्ये नमुद मुद्यांची तात्काळ चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येऊन केलेल्या कार्यवाही बाबतचे प्रशांत ढोरे पाटील यांना पंचायत समिती स्तरावरून कळवण्यात यावे तसेच आपला स्वयंस्पष्ट कार्यपूर्ती अहवाल अभिप्रायासह शासनाकडे व जिल्हा परिषद कार्यालयात सात दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले होते,सदर आशयाचे पत्र पं. स. गटविकास अधिकारी चिखली यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कडून देण्यात आले होते परंतु आध्याप पर्यंत देखील तक्रार अर्जात नमूद मुद्यांची कुठली ही चौकशी केलेली नसून कुठलीच माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेली नसून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सह जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला देखील चिखली गट विकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखवलेली असल्याचे प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.

चिखली आगाराची साखरखेर्डा रात्री मुक्कामी असणारी बस गेल्या आठ महिन्यापासून बंदच ! प्रवाशांचे हाल ! बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

कोरोना काळामध्ये सर्वच दळणवळणाची साधने बंद होती एसटी महामंडळाने सुद्धा एसटी बस ह्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता !परंतु महाराष्ट्र शासनाने अनलॉक उघडल्यानंतर एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा रस्त्याने धावू लागल्या !व यामुळे प्रवास करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला ‘परंतु अनलॉक उघडल्यानंतर ही चिखली आगराची महत्त्वपूर्ण रात्रीच्या वेळेला फेरी असणारे चिखली – मेरा खुर्द -शिंदी ते साखरखेर्डा मार्गे धावणारी बस गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे !त्यामुळे रात्रीच्या वेळी मेरा खुर्द ,अंत्रि खेडेकर, मेरा बुद्रुक, शिंदी – साखरखेर्डा या मार्गाने येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहे,चिखली आगाराची चिखली ते साखरखेर्डा ही बस अतिशय महत्त्वपूर्ण आहे !औरंगाबाद -जालन्याहून रात्रीच्या वेळेस येणारे प्रवासी हे मेरा खुर्द येथे बसची वाट पहात थांबत असतात ‘तसेच साखरखेर्डा येथे जाणारे प्रवासी सुद्धा त्याच बस ची वाट बघत असतात ‘ही बस चिखली आगारातून ७ वाजता रात्रीच्या वेळेला निघतेव साखरखेर्डा येथे रात्रभर मुक्कामी असते व सकाळी सहा वाजता ही बस परत चिखलीला जाते ।सकाळच्या वेळेला औरंगाबाद – जालना – चिखली बुलढाणा याठिकाणी जाणारे प्रवासी हे त्या बसनेच प्रवास करत असतात ‘त्यामुळे ही बस बंद असल्यामुळे प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे चिखली आगाराने त्वरित चिखली ते साखरखेर्डा रात्रीच्या वेळेला मुक्कामी असणारी बस सुरू करावी अशी मागणी या वेळी प्रवाशांनी केली आहे !

नगरपालिका कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक ; न प कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव: येथील गांधी चौकामध्ये असलेल्या नगर पालिका कार्यालयाच्या इमारतीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शेगाव नगरपालिका कार्यालयात दररोज प्रमाणे कामकाज सुरू होते अज्ञात समाजकंटकांनी दुपारी साडेबारा एक वाजे दरम्यान नगरपालिका इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक करून दरवाज्याचे काच फोडले.
या घटनेमुळे नगरपालिका कार्यालयात उपस्थित कर्मचारी व इतर कामानिमित्त आलेल्या शहरवासीय मध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसत होते या घटनेच्या निषेधार्थ शेगांव नगरपालिका कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले त्यामुळे नगरपालिका कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. या घटनेच्या विरोधात शेगांव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने शेगाव शहर पोलीस स्टेशनला जाऊन लेखी स्वरूपात तक्रार वजा निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये नगरपालिका इमारतीवर दगडफेक करून प्रवेशद्वाराचे तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे या तक्रारी वजा निवेदनावर विजयकुमार आश्रमा, एसएस बोबडे, एस पी इंगोले ,पालीवाल, देशमुख यांच्यासह ईतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

मनसेचा_१_दिवसीय_धरणे_आंदोलन

0

 

गोंदिया. दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी मंगळवारी सकाळी ११:०० वाजता पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, जिल्हाअध्यक्ष हेमंत लिल्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन घेण्यात आले, या आंदोलना मध्ये कोरोनाच्या काळात लाॅकडाऊन नंतर जेमतेम सामन्य जनता कसेबसे आपल्या कामधंदा किंवा व्यापाराच्या गाढ्या सावरत असतांनाच केंद्र सरकारने पेट्रोल, गॅस, डिझेल दर वाढविले ते कमी करावे तसेच राज्य सरकारने लाॅकडाऊनच्या काळात ३ महिन्याचे वाढीव वीज बील माफ करण्यात यावे, या संदर्भात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जाहीर निषेध करण्यात आले. आणि बिरसी विमानतळ येथील प्रकल्पग्रस्त कामगार यांना कामावरून काढून टाकले, एकूण ४४ युवकांना या प्रकल्पात सुरक्षा म्हणून कामावर घेतले त्यांच्या या सेवेला आता १३ ते १४ वर्ष झालेले आहे एवढ्या वर्षांनंतर आता. या सर्वांना परत कामावर घेण्यात यावे. तसेच गोंदिया शहरातील प्रमुख व अन्य मागण्या छोट्या गोंदिया येथील प्राथमिक व हायस्कूलची जिर्ण इमारतीला ७० ते ८० वर्ष झाले असून ती इमारत पाडून नवीन इमारत तयार करण्यात यावी, गोंदियातील मोक्षधाम परिसरा समोर घण कचरा (डम्पींग यार्ड) ची व्यवस्था शहरातून बाहेर करण्यात यावे,
जिल्हा अधिकाऱ्याच्या शासकीय इमारतीचे व रोडाचे (सौंदर्यीकरण) बांधकाम विना टेंडर परवानगी करण्यात आले. त्यातील दोषी कार्यकारी अभियंता जावेद यांच्यावर कार्यवाही करण्यात यावे, जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभाग कार्यालयात ऐ.सी. न लावता दोन वेळा बिल काढणाऱ्या अधिकारी व ठेकेदावर गुन्हा दाखल करण्यात यावे, गोंदिया शहराला लागत एकमेव पांगोली नदी चे सौदर्यकरण करण्यात यावे ह्या सर्व मांगाना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे घेवून, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, जिल्हा उपाध्यक्ष लेखू रहांगडाले, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभुषण बैस, गोरेगांव तालुका अध्यक्ष शैलेश जांभूळकर, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे, गोंदिया शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, जिल्हा सचिव निखिल ढोंगे, अमोल लांजेवार,राणासिंह नागपुरे, रोहित उके, अमित अग्रवाल, दिलीप ढेकवार, हेमराज ठाकरे, मंगेश चौबे, प्रकाश फंटीग, नितिन पटले, सागर गौतम, सुरेश पटले, कमरुदीन शेख, उत्तम गुरवेले, अभव श्यामकुवर, प्रदिप नैकाते, पंकज वंजारी, सकिम शेख, दिनेश हेमणे अरविंद पण्डेले, विजय चंदेल, सुभाष निरवाडे, अशोक उपवंशी,सुधाकर कांबळे, रजनिस धमगाये, अंकित भैरम, झुल्लासिंह बरेले लोकेश बनाफट, निखिल गडपायले, संदीप चवरे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..