Home Blog Page 542

वडाळी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी

0

 

प्रतिनिधी- सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ सागर भिलोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शिक्षक के.टी.पाटोळे व एस. टी.वाघ यांनी विद्यार्थीनींकडून राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन केले.उपाध्यक्ष मधूकरअण्णा नंद,सचिव पोपटरावजी कोरडे,संचालक नारायण जोरवर ,तूळशीराम पाटील, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी,पत्रकार सिताराम पिंगळे,व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.पी. सदगीर,पी.एस.डफाळ यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एम. ए.वाघ यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी समस्त विद्यार्थी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रहार संघटनेकडून विशेष सत्काराचे आयोजन

0

 

प्रतिनिधी-सचिन पगारे
नांदगांव नाशिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील सैन्यात नव्याने नियुक्त झालेल्या यूवकांचा जाहिर सत्कार करण्यात आला. येथील प्रहार संघटनेकडून या विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यात आला. गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच ग्रामपालिका येथे ही ध्वजारोहण करण्यात आले.तसेच या विशेष दिवसाचे औचित्य साधून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथे प्रहार संघटनेने सत्कार समारंभाचे आयोजन केले. या सत्कार समारंभासाठी नव्याने सैनिक म्हणून नियुक्त झालेले वैशाली वाल्मिक पवार व समर्थ विलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.वैशाली पवार ही परिसरातील पहिली महिला सैनिक म्हणून ओळखली जात आहे. वैशाली पवार व समर्थ चव्हाण यांनी नुकतेच स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत यश मिळवले आहे. यांचे विशेष कौतुक करण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेकडून या समारंभाचे आयोजन करण्यात आले.या समारंभाचे सुत्रसंचालन संदीप पवार यांनी केले. प्रहार संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सुर्यवंशी यांनी या दोघांचा सत्कार केला तसेच देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.नारायण पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रहार संघटना अध्यक्ष जनार्दन भागवत, चंद्रभान झोडगे,वैभव शिंदे,गणेश पवार, राहूल पवार, दिपक पगारे, सचिन पगारे,वाल्मिक वर्पे,भरत पाटील,अशोक पगारे,वाल्मिक पवार, विलास चव्हाण,गणेश जूंधरे आदी उपस्थित होते.

कोरोना लॉकडाऊन काळात,विद्युत ग्राहकाची फसवणूक केल्याबाबद ऊर्जा मंत्री श्री,नितीन राऊत व विद्युत कंपन्यांचे संचालक यांच्या वर विद्युत ग्राहक जनतेची फसवणूक केल्या बद्दल – फ़ोजदारी गुन्हा दाखल करा

0

 

 

अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य भर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे,

त्या अनुसंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हयाच्या वतीने कोरोना काळात तीन महिन्याच्या लॉक डाऊन काळातील राज्यातील विद्युत ग्राहकांना अवास्तव अशी भरमसाठ वाढीव वीजबिल पाठविण्यात आले, वीज ग्राहकांना वीज बिला मध्ये दिलासा देण्याचा खोटा आश्वासन देऊन सर्व सामान्य जनतेला महिनो महिने झुलवत ठेवणे व त्यानंतर विद्युत ग्राहकांना वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीज बिल वसूल करणे हि केवळ राजकीय आश्वासनाची फसवणूक नाही तर वीज कंपन्यांशी संगमत करून करण्यात आलेली जनतेची आर्थिक लूट आहे,व फसवणूक करण्यात आली या करिता मा, राज साहेबा यांच्या आदेशाचे पालन करत गोंदिया जिल्ह्या तर्फे हि ऊर्जा मंत्री श्री,नितीन राऊत याच्या सह महावितरण कम्पनी प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक व मानसिक आघात पोहोचविण्याचा फ़ोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले,या प्रसंगी गोंदिया जिल्हा अध्यक्ष मनिष चौरागडे,जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा,गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे,तिरोडा तालुका अध्यक्ष श्रीकांत ढबाले,गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे,तिरोडा तालुका अध्यक्ष फटींग क्षितिज वैध, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते,

अनेक तरुनांचा, महाराष्ट्र नवनिर्माण,सेनात,जाहीर, पक्ष,प्रवेश

0

 

सुनील, पवार, नांदुरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक,अध्यक्ष, माननीय, राजसाहेब, ठाकरे यांच्या विचाराशी, प्रेरित,होउन,तशेच,महाराष्ट्र च्या, नवनिर्माणासाठि,अनेक, तरुणाचा,मनशेत,जाहीर, प्रवेश,दि,26जानेवारी, प्रजाकसताक,दिनाचे, औचित्य साधून, स्थानिक,रेस्टहाउस,नांदुरा येथे,अनेकांचा,मनसे,सरचिटनीस, सहकार,विभाग,तथा,मनसे,शाडो,मंत्री विठलराव,लोखंडकार,जिल्हा, अथक्ष, मदनराजे,गायकवाड, यांच्या, सूचनेनुसार, म,न,रा,प,का,सेना, प्रदेश,सचिव, प्रदिप,गायकी, तालुकाध्यक्ष भागवत उगले, ता,उपा,काडेंलकर,या च्या, उपस्थितित,मनशे,शहर,अध्यक्ष, सागरजगदाळे,व,शहर संघटक, विशाल बगन,यांच्या नेतृत्वात,अनेक तरुनांचा, मनशेत,भव्य, पक्षप्रवेश,या,वेळी, थनंजय,देशमुख, गनेशअवचार,अकित,अवचार,भागवत,बगाडे,प्रशांत, साबे,सतोश,सोनवाल,आकाश,ईगळे,अजय,गोहर,,तमाम, मनशे सौनिक,व,पदाधिकारी, उपस्थित, होते

कोरोना काळात रक्तदान शिबिर घेऊन ८१ बॉटल रक्त रक्तपेढीला दिल्याबद्दल अमर पाटील यांचा सत्कार

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे सरकारने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत संभाजी ब्रिगेडच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त नांदुरा येथे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी त्यांचे सहकारी व मां जिजाऊ सावित्री विचारमंच मिळून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात तब्बल ८१ बॉटल रक्तदान झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणत रक्तासाठी उपलब्ध करून शासकीय रुग्णालय खामगाव यांना सहकार्य केल्याबद्दल या कार्याची दखल घेत शासकीय रक्तपेढी खामगाव यांच्या मार्फत अमर रमेश पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रीय सल्लागार पदी ऊर्मिलाताईं ठाकरे यांची नियुक्ती

0

 

खामगाव नुकतेच दि.२३-०१-२०२१ रोजी नाशिक येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री मा.श्री.बबनरावजी घोलप
(नानासाहेब) यांनी खामगाव स्थित रहिवासी असलेल्या मुलूख मैदानी तोफ,वीरांगना झलकारीबाई राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त..अनेक शैक्षणिक,
सामाजिक,साहित्यिक पुरस्काराच्या राजश्री.. वनश्री ऊर्मिलाताईं ठाकरे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ,महिला आघाडीच्या राष्ट्रीय सल्लागार पदी निवड केली आहे.
या अगोदर गेल्या दहा वर्षापासून त्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कार्यन्वित होत्या.गेल्या सव्वीस वर्षापासून त्या या चळवळीत कार्ये करित असून त्यांनी आपल्या
कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे.म्हणूनच मा.श्री.बबनराव घोलप उर्फ नानासाहेब यांनी त्यांच्या कामावर विश्वास टाकून संघटनेचे सर्वोच्च पद राष्ट्रीय सल्लागार पदी नियुक्ती करून गौरन्वित केले आहे.

या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शिक्षक गजानन खंडारे यांचे अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथीलय शवंतराव चव्हाण माध्यमिक व स्वर्गीय भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय राजेगाव येथील शाळेवर कार्यरत शिक्षक गजानन संपतराव खंडारे.

राहणार शेंदुर्जन यांचे शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी तसेच नियमबाह्य केलेली भरती प्रक्रिया तसेच ‘शाळेतील मुख्याध्यापकावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल.

असताना सुद्धा तसेच मुख्याध्यापक यांचे वेतन थकित वेतन सह पूर्ववत सुरू करण्यासाठी दिलेला अमरावती शिक्षण उपसंचालक यांनी आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा.

तसेच संस्थाचालक आरोपी असताना व त्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा अमरावती उपसंचालक यांच्या कार्यालयाने बारावी विज्ञान शाखा सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी.

 

 

एक क्लिक करून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8285

 

या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीस कडक शासन करावे या मागणीसाठी 26 जानेवारी पासून श्री गजानन खंडारे हे आपल्या दोन लहान मुलं पत्नी यांच्यासह अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत.

तरी जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार यावेळी शिक्षक श्री गजानन खंडारे यांनी व्यक्त केला आहे .

अमरावती येथील शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर असलेल्या उपोषणास यावेळी पत्रकार सचिन खंडारे येथील सामाजिक कार्यकर्ते बबन सरकटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल मोरे तसेच हिवरा आश्रम येथील गजानन मोरे यांनी भेट दिली !

रामाळा तलावातील मासे मृत्युने तलावाचे प्रदुषण अधोरेखीत

1

 

तलावात येणारे सांडपाणी थांबवुन तलाव प्रदुषणमुक्त करण्यास खोलीकरणास सुरूवात न केल्यास इको-प्रो चा आंदोलनाचा इशारा

इको-प्रो ची प्रदूषण नियंत्रण मंडळ कडे तक्रार

चंद्रपूरः शहरातील एकमेव ऐतीहासीक गांेडकालीन रामाळा तलाव वाढते प्रदुषणामुळे मासे मृत असल्याची घटना समोर आली आहे.

तलावाच्या काठावर मासे मृत आढळुन आल्याने रामाळा तलावाचे प्रदुषण अधोरेखीत झालेले आहे.

आज सकाळी इको-प्रो सदस्य रामाळा तलावाच्या काठावर असतांना सभोवताल पाण्यात मृत मासे तरंगताना आढळुन आले.

इको-प्रो सदस्यांनी तलावात उतरून पाहणी केली, काठावरील कचÚयामुळे तसेच इकाॅर्नीया वनस्पतीखाली असल्याने बरेच मृत मासे दिसुन येत नव्हते, जवळुन बघताच संपुर्ण तलावात मासे तरंगताना दिसत होते.

परंतु सदर ठिकाणी मागील काही दिवसापासुन मासे मृत होत असल्याचे दिसुन येत आहे.

आज फक्त विसर्जन स्थळावर पाहणी केल्यानंतर बरीच मासे मृत झालेली आढळुन आली. यास कारण म्हणजे कायम तलावात येणारे सांडपाणी जे मच्छीनालाच्या माध्यमाने तलावात येत असते.

त्यामुळे तलावाचे प्रदुषण वाढ होउन जलजीव यांना धोकादायक ठरत आहे. सोबतच भुजल सुध्दा दुषीत होत आहे. सदर तलावाच्या काठावर पाण्यास सुटलेल्या दुर्गधीमुळे हवा जोरात असेल तेव्हा परिसरात हा दुर्गध पसरत असतो त्याचा नागरीकांना त्रास सहन करावा लागतो.

 

इको-प्रो सातत्याने तलावाच्या प्रदुषणाकडे लक्ष वेधत वारंवार जिल्हा प्रशासनाकडे मागणी लावुन धरत आहे. मागील वर्षी सुध्दा याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ कुणाल खेमणार यांनी तलाव खोलीकरण बाबत बैठका घेतल्या होत्या.

त्यात इको-प्रो तलाव संवर्धनासाठी सुचविल्याप्रमाणे तलाव सुकवुन खोलीकरण करणे, अतिक्रमण रोखण्यास सुरक्षा भिंत बांधणे, मच्छीनाला वळती करणे, नाल्यावर जल शुध्दीकरण संयत्र उभारणे, तलावात वेकोलीचे वाया जाणारे पाणी पाईपलाईन टाकुन तलावात शुध्द पाणी आणणे यावर चर्चा झाली होती.

यानुसार वेकोलीचे पाणी तलावात आणण्याचे काम वेकोली कडुन करण्यात येत आहे. खोलीकरणास सुरूवात करण्यात आली मात्र पावसाला सुरूवात झाल्याने प्रत्यक्ष कामाची सुरूवात होउ शकली नाही.

आणी त्यापुर्वी कोवीडमुळे सुध्दा तलावाच्या कामाकडे लक्ष देण्यात आले नाही.

यंदा सुध्दा नोव्हे मध्ये जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांची भेट घेत तलावाचे महत्व वाढते प्रदुषण, इकाॅनीर्या वनस्पतीची समस्याबाबत निवेदन देत खोलीकरणाची मागणी केली होती.

मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालय कडून याबाबत कार्यवाही सुरू असताना सुद्धा यंदा तलाव खोलीकरणास अदयाप निर्णय झालेला नाही.

तलावाचे पाणी सोडणे आणी खोलीकरण करण्यास अधिक काळ लागणार असल्याने पावसाळा पुर्वी ही सर्व कामे होणे गरजेचे आहे.

तलाव खोलीकरण, संवर्धनासाठी दरवर्षी बैठका होतात मात्र निर्णय घेतेवेळेस कामासाठी पुरेसा वेळ हाती राहत नसल्याचे दिसून येते, यामुळे इको-प्रो ने आपल्या मासीक बैठकीत काही दिवसापुर्वीय वेळेची गरज लक्षात घेऊन नाइलाजास्तव ‘आंदोलनाची’ भुमीका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सोबतच ही बातमी पण पहा

https://www.suryamarathinews.com/post/8251

 

 

 

 

आज मासे मृत झालेल्या घटनेने तलावाचे वाढते प्रदुषण अधोरेखीत झाले आहे.

तलावाचे तसेच सभोवतालच्या परिसराचे सुध्दा पर्यावरण धोक्यात येत आहे. जलजिव सुरक्षीत नाहीत, प्रदुषणामुळे जलीय वनस्पती इकाॅर्नीया ची वाढ होत आहे, नैसर्गीक सौदर्यास खिळ बसल्याने सभोवतालचा परिसराचे महानगरपालीका तर्फे करण्यात आलेल्या सौदर्यीकरणाचे पर्यटनीय दुष्टया महत्व कमी होत आहे, गोंडकालीन ऐतिहासीक वारसा संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे,

आदी बाबीचा विचार करता इको-प्रो संस्था आता रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीच्या मागणी करीता आक्रमक झालेली असुन आज परत तलावाच्या पात्रात इको-प्रो सदस्य उभे राहुन मृत मासे हातात पकडुन तसेच ‘सेव रामाळा तलाव’ चे फलक हातात घेत निदर्शने केलीत तसेच आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी यांनी फोनवरून माहीती देत तक्रार सुध्दा केलेली आहे.

आज इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे नेतृत्वात इको-प्रोचे कार्यकर्ते तलावाचे निरीक्षण करतांना इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, संजय सब्बनवार, अडगुरवार, हरीश मेश्राम, प्रमोद मलीक, कपील चैधरी, अब्दुल जावेद, राजु काहीलकर अभय अमृतकर, मनीष गांवडे, सुनील पाटील, सौरभ शेटे, जयेश बैनलवार, अमोल उटटलवार, सचीन धोतरे, पुजा गहुकर, प्रगती मार्कडवार, शंकर पोईनकर, अनिल, अरूण गोवारदिपे, प्रदत्ता सरोदे सहभागी झाले होते.

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप भाऊ वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0

 

जिल्हा परिषद शाळा चुंचाळे येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप भाऊ वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन मुख्यध्यापक गिरीश सपकाळे सर यांनी केले केले
अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेश दादा पाटील हे होते तर प्रास्ताविक राजू सोनवणे सर यांनी केले, आभार राहूल वाणी सर यांनी मानले सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आमिर तडवी, पंडित मराठे, मधूकर कोळी यांच्या सह अध्यक्ष यांचे प्रतिनिधी लुकमान तडवी, सदस्य प्रतिनिधी फत्तू तडवी,विश्राम पाटील,इतबार तडवी, सरपंच प्रतिनिधी संजय पाटील, शिक्षक मज्जित तडवी त्रिपाठी मॅडम ग्रामसेवक यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते

यावलच्या तिन ग्रामसेवकांचे उत्कृष्ठ ग्रामस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी म्हणुन प्रशस्तीपत्राने गौरव

0

 

 

यावल येथील पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले तिन ग्रामसेवकांना आज महसुल प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदा उत्कृष्ठ ग्रामस्थरीय मतदार नोंदणी अधिकारी (बिएलओ )म्हणुन प्रशिस्तीपत्र गौरविण्यात आले आहे . आज दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधुन निवडणुक आयोगाच्या वतीने राबविण्यात मतदार नोंदणी अभीयांनात मालोद , मोहराळे ,बोराळे या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले राजु अन्वर तडवी , चितोडा आणी चिखली येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेल्या रूपाली तळेले आणी बोरखेडा येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले लक्ष्मीकांत उर्फ हितु महाजन यांना यंदाचे उत्कृष्ठ बिएलओ म्हणुन फैजपुर येथील प्रांत कार्यालयातील सभागृहात विभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते आणी यावलचे तहसीलदार महेश पवार , यावल येथील निवडणुक शाखेतील नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ठ ग्रामस्थरीय मतदार नोंदणी अधिकारी (बिएलओ )प्रशस्तीती पत्र देवुन गौरविण्यात आले आहे .