Home Blog Page 546

नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता- अहवाल सादर

0

 

 

भंडारा,दि.20ः- महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणारी घटना भंडारा जिल्हा रुग्णालयात घडली होती. 9 जानेवारी रोजी रुग्णालायतील नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.

सुन्न करणारी घटना ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

त्या घटनेचा अहवाल तब्बल 11 दिवसांनी सादर झाला,तो सुध्दा दोन नर्सेसवर जबाबदारी सोपवून.

 

ही बातमी वर क्लिक करून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8150

09 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली.

त्यांनी हा 50 पानांचा अहवाल सादर केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घडना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. अहवालातही शॉर्ट सर्किटचाच उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच, दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्या दिवशी नवजात बाळांच्या अतिदक्षता युनिटमध्ये आग लागली होती.

तेव्हा तिथे कुणीही नव्हते. जर त्यावेळी युनिटमध्ये दोन्ही परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे मत समितीने नोंदवले.

दुर्लक्ष करणाऱ्यांना शिक्षा होणारच- राजेश टोपे
याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले की, ‘रिपोर्टचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल.

रिपोर्टच्या फायन्डींगच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षा होईलच यात शंका नाही मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासनही राजेश टोपे यांनी दिले.

ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खरात यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी येथील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खरात यांनी काँग्रेस पक्षावर तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला ।तसेच दुसऱ्यांदा सलग ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल .महिला व बालकल्याण सभापती ज्योती अशोकराव पडघन यांनी त्यांचा निवासस्थानी सत्कार केला ‘यावेळी सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दरेगाव ग्रामपंचायत सदस्य राहुल भाऊ साबळे ।सिंदखेड राजा तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस समाधान काकडे इतर कार्यकर्ते यावेळी हजर होते !

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये वीजचोरी करणाऱ्या ७७ जणांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई .12 लाखाचा दंड वसूल !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा वीजचोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले.

असून ही वीज चोरीअकोला येथील विशेष पथकाने महिनाभरात 77 जणांविरुद्ध कारवाई करत जवळपास 12 ते 13 लाखाचा दंड वसूल केला आहे सिंदखेड राजा तालुक्यात सह शहरात वीज चोरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत असून नेहमी रोहित्रात बिघाड होत आहे ‘परिणामी महावितरण ज्यांच्याकडे मिटर आहे अशांना अंदाजी अव्वाच्यासव्वा बिल आकारते .

एक क्लिक वर पूर्ण बातमी

https://www.suryamarathinews.com/post/8147

वीज चोरी करणाऱ्या मुळे मीटर वाल्यांना त्रास सहन करावा लागतो ‘रोहित्र बिघडलं की गावात महिना महिना अंधार असतो

।त्यामुळे अकोला येथील विशेष पथकाने सिंदखेडराजा तालुक्यामध्ये धडक मोहीम हाती घेतली यामध्ये मीटरमध्ये छेडछाड करणे मेन लाइनवर अकोडा टाकणे ‘विविध प्रकारच्या वि चोरीच्या घटना.

अकोला येथील विशेष पथकाने उजेडात आनून ‘तालुक्‍यातील 77 जणांविरुद्ध कारवाई करून जवळपास 12 ते 13 लाखाचा दंड वसूल केला आहे यामध्ये शहरातील सहा वाइन बार ‘ लॉज या ठिकाणी कारवाई केली आहे विज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यामुळे विजेची चोरी न करता रीतसर मीटर घेऊन महावितरणला सहकार्य करावे असे आव्हान महावितरण तर्फे करण्यात आली आहे !

वीज चोरी करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही ही मोहीम प्रत्येक गावात राबविण्यात येणार असून वीजचोरी करणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सुद्धा महावितरण’ने सांगितले आहे !

साखरखेर्डा येथे दोन गटात हाणामारी , एक गंभीर जखमी

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

ग्राम पंचायत निवडणूक निकाल लागल्यानंतर १८ ला रात्री दोन गटात हाणामारी झाली असता एक गंभीर जखमी झाला आहे .

त्याला तातडीने चिखली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . दोन्ही गटातील परस्पर विरोधी तंक्रारीवरून पोलीसांनी गुंन्हा दाखल केला आहे .

साखरखेर्डा येथील शे . रशिद शेख निसार यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये तंक्रार दिली की , शे तौफिक शेख गुलशेर यासह आठ व्यक्तींनी घरात घुसून लाठ्या काठ्यांनी शे रशिद यास आणि पत्नी , बहीन यांना मारहाण केली .

या हाणामारीत शेख रशिद हा गंभीर जखमी झाला . त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने पोलीसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले .

परंतू मार जबर असल्याने डॉक्टरांनी तातडीने चिखली येथे हलविण्याचा सल्ला दिला .

काल १९ ला चिखली येथे जाऊन पोलीसांनी जबाब नोंदवला असता घरात घुसून मारहाण केली. आणि घरातील सामानाची नासधूस करुन कपाटातील ३५ हजार रुपये चोरुन नेल्याची माहिती शे . रशिद यांनी पोलीसांना दिली .

ही बातमी पण पहा आवर्जून

https://www.suryamarathinews.com/post/8143

त्याच्या जबाबावरुन पोलीसांनी आठ व्यक्ती विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत .

तर विरुध्द गटातील रिझवानाबी या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीसांनी शेख रशिद सह सात ते आठ व्यक्तींविरोधात विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत .

पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक दीपक राणे करीत आहेत .

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष – माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

0

 

 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांपैकी 5 हजार 721 ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.

तीनही सत्ताधारी पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवत भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी व्यक्त केली.

श्री. पाठक यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, 14 हजार 228 ग्रामपंचायतीपैकी 13 हजार 866 जागांचे निकाल हाती आले असून त्यापैकी भाजपाने 5 हजार 721 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

एक क्लिक वर दुसरी बातमी आवश्यक ओपन लिंक

https://www.suryamarathinews.com/post/8140

 

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवले होते.

त्याच यशाची पुनरावृत्ती यावेळी झाली आहे. भाजपाचे ग्रामीण भागातील वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून पुन्हा सिध्द झाले आहे.

सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी एकत्रित निवडणुक लढवूनही त्यांना भाजपाच्या आव्हानांचा सामना करता आलेला नाही असेच हे निकाल सांगतात, असे श्री. पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखलेल्या योजना तसेच मोदी सरकारने प्रत्यक्षात आणलेल्या अंत्योदयाची योजना यामुळे ग्रामीण भागातील जनतेने भाजपावर विश्वास प्रकट केला आहे असेही श्री. पाठक यांनी म्हटले आहे.

भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वृद्धेचा गळा दाबून खून

0

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

ही वृद्ध घरात एकट्या असलेल्या ८० वर्षीय वृद्धेचा गळा दाबून खून करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात घडली.

भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खुन्याचा शोध सुरू केला आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात मंगळवारी (१९ जानेवारी) भरदिवसा दुपारच्यावेळी चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने ८० वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला.

सावित्राबाई मोगल शेळके असे या वृद्धेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.

कौठेकमळेश्वर गावात संगमनेर रस्त्याच्याकडेला सावित्राबाई मोगल शेळके ही वृद्धा हारात एकटी राहात होती.

 

तिचे घराजवळ गोळ्या-बिस्कीटचे छोटे दुकान असून तिचा शिवणकाम व्यवसाय करत होती. ती मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घरात एकटीच असताना अज्ञात चोरट्याने तिच्या घरात प्रवेश केल.

घरात घुसून दागिने चोरीच्या उद्देशाने त्याने वृद्धेचा गळा दाबून खून केला.

त्याच वेळी या वृद्धेच्या घराजवळ राहणारी एक पाच वर्षाची बालिका गोळ्या घेण्यासाठी त्या ठिकाणी आली असता तिने हा प्रकार बघितला.

व त्यानंतर चोरट्याने या बालिकेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडले व तिच्या अंगावर गोधड्या आणि कापडे टाकून तो घरातून पसार झाला.

5 वर्षीय बालिकेचा कानातील दागिने ओरबडल्याने कान जखमी झालेली व घाबरलेली ही बालिका त्यानंतर आजी-आजी म्हणत तिच्या घराकडे पळाली.

त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी वृद्धेच्या घराकडे धाव घेतल्यावर संपूर्ण प्रकार उघड झाला.

स्थानिक रहिवाशांनी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.तो पर्यंत चोट्या पसार झाला होता.

त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पोलीस फौजफाटा घेवून घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी ठसे तज्ञांचे पथक व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.

दुसरी बातमी पण एका क्लिक बातमी

https://www.suryamarathinews.com/post/8117

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार अधिक तपास करीत आहे.

 

 

 

चोरटा एक होता की एकापेक्षा अधिक याचा शोध पोलीस घेत आहेत. भरदिवसा दुपारच्यावेळी चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने वृद्धेचा गळा दाबून खून करण्याची घटना घडल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.

गावात पूर्ण पणे या घटनेचे चर्चा सुरू आहे

सेलू येथे महाराणा प्रतापसिंह महाराज पुण्यतिथी साजरी

0

अजहर पठाण
सेलू/प्रतिनिधी

आज दि 19.012021रोजी सेलु शहरात अ.भा क्षत्रिय राजपूत महासभा सेलू च्या वतीने हिंदूसूर्य हिंदु कुलभूषण

श्री महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 424वी पुण्यतिथी निमित्त सेलू येथे महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित अ.भा क्षत्रिय महासभा जिल्हाध्यक्ष व भाजपा युवामोर्चा जिल्हाचिटणीस नागेश ठाकूर,
श्री.योगेश महाराज साळेगावकर,
विठ्ठलसिंह ठाकूर, धनंजयसिंह बैस, संतोष ठाकूर, न.प सदस्य बाळूकाका झमकडे, विनोद तरटे, मनीष कदम,

भाजपा युवामोर्चा तालुका अध्यक्ष शिवहारी शेवाळे, कांग्रेस कार्याध्यक्ष अर्जुन बोरूळ मा.न प सदस्य मिलिंद सावंत ,विक्रमसिंह ठाकूर , सौ.रुपाली ठाकूर,शुभम महाजन, सोमेश्वर राऊत,

येथे क्लिक करून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8134

अनुराग आंबती, अमोल बाबर ,अक्षय बागल, संतोष राऊत, इंद्रजीत ठाकूर,अनिकेत मस्के, विष्णू बागल, ,युवराज जटाळ, शाम राऊत, कुणाल टाक

अनिल लोकपाल,अक्षय कुलथे, विषु ठाकूर,पप्पू पवार,वेदांत राजवा11डकर, शुभम कदम,उमेश सासोडे, विशाल चव्हाण, साई ठाकूर,

युवराज नाईक,संतोष सावजी,शुभम साखरे, चैतन्य नावाडे, आतिष तिवारी, विक्रम ठाकूर, आदी उपस्थित होते

सुरक्षा रक्षकांचे धरणे विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन

0

 

गोदिंया-शैलेश राजनकर

गोंदिया,दि.19 : बिरसी विमानतळावर सुरक्षारक्षक म्हणून गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कारण नसताना कमी करण्यात आले.

त्यामुळे आपल्याला नोकरीवर पुन्हा घेण्यात यावे किंवा आमची जमीन परत करण्यात यावी, यासाठी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आंदोलनात कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि मुले देखील सहभागी झाले.
बिरसी येथील विमानतळाचा विकास करण्यात आला. त्याची 2007 पासून सुरूवात करण्यात आली.

याठिकाणी स्थानिक नागरिकांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आले. ते सुरक्षा रक्षक आत्तापर्यंत कार्यरत होते. 13 वर्षे त्यांनी इमानेइतबारे नोकरी केली.

त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण यावरच अवलंबून आहे. मात्र आता विमानतळ प्रशासनाने डीजीआर परिपत्रक 1994 अंतर्गत सेवानिवृत्त सैनिकांना घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

ही बातमी वर क्लिक करा

https://www.suryamarathinews.com/post/8131

डीजीआर परिपत्रकाचा आधार घेत स्थानिक सुरक्षा रक्षकांना काढून सेवानिवृत्त सैनिकांना घेण्यात येणार आहे. स्थानिकांना नोकरीचे आमिष देवून त्यांची जागा हस्तगत केली.

मात्र आता त्यांना नोकरीवरून काढून अन्याय करत आहे. आपल्याला कामावर पूर्ववत घेण्यात यावे किंवा आपली जागा परत देण्यात यावी,

या मागणीला घेवून सुरक्षा रक्षकांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली.

विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांसह तान्हुले मुले देखील सहभागी झाले आहेत.

जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार सुहासआण्णा कांदे यांना निवेदन

0

 

सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण-जातेगाव परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सदर समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार सुहास आण्णा कांदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि विविध समस्यांबाबत चर्चा केली.

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण ,जातेगांव, गोंडेगाव व ढेकू येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने तालूक्याचे आमदार सुहासआण्णा कांदे यांची भेट घेतली.

बोलठाण येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रलंबित स्मशानभूमीसाठी आवश्यक जमीनीच्या मागणी संदर्भातील निवेदन सदर शिष्टमंडळाने आमदार कांदे यांना दिले आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या समस्यांवर चर्चा केली.

आमदार कांदे यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध समस्या जाणून घेतल्या व शिष्टमंडळास लवकरात लवकर मदतीचे आश्‍वासन दिले.

ही बातमी खूप महत्त्वाची आहे आवर्जून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8125

यावेळी शिवनाथ बोबडे, राजेश बोबडे, कैलास वाळेकर, संजय गोंधळे, जनार्दन बोबडे, बाळू वाळेकर, प्रकाश बोबडे, जीवन बोबडे, पोपटआप्पा गर्जे,पोपट आप्पा बोबडे, विजय गोंधळे, रमेश आप्पा बोबडे, बाळकृष्ण बोबडे, शिवनाथ वाळेकर, भोलेहर गवंडर, सुधीर होनराव, नंदू गोंधळे, स्वप्नील बोबडे, सागर बोबडे, विलास वाळेकर, जगदीश गर्जे, रमाकांत तांबोळी ,महेश वाळेकर, गणेश तांबोळी अनिलआप्पा गर्जे आदी उपस्थित होते .

रेणुका गुरव यांनी आपल्या पतीच्या विजयाचा असा जल्लोष साजरा केला

0

 

 

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक
897 555 1991

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पतीदेव विजयी होताच बायकोने चक्क पतीदेवांला खांद्यावर घेवून मिरवणूक काढली.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू ग्रामपंचायतीमधील ही दृश्य आहे.

पुण्यात या दृश्य पाहून लोकांचे डोळे पांगुण गेले ही महत्व ठरणारी गोष्ट ठरली आहे.

निवडणूक जिंकलेल्या नवऱ्याला चक्क खाद्यांवर उचलून बायकोनेच मिरवले आहे. ही दृश्य फोटो पाहून महिल्याना आनंद होताच असेल व सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचा जोरात व्हायरल होत आहे.

ही बातमी पण  महत्वाची आहे  क्लिक करून नक्की पहा

 

https://www.suryamarathinews.com/post/8103

 

या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचे लक्ष वेधले होते.

निकालानंतर विजयाची मिरवणूक आणि जल्लोषाचा गुलाल उधळायला सर्वचजण सज्ज होते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती.

मात्र, पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीत पती निवडून आल्यानंतर पत्नीने असा पण जल्लोष केले की पतीला चक्क खांद्यावर उचलून पतीची मिरवणूक काढली.

पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील एका उमेदवाराच्या विजयाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. कारण, येथे कार्यकर्त्यांऐवजी चक्क पत्नीनेच पतीला खांद्यावर उचलून घेतले होते.

गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ६ जागावर वर्चस्व मिळवले.

या घवघवीत यशामागे महिलांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयायाचा हटके जल्लोष केला.

 

 

पती संतोष यांना खांद्यावर उचलून पत्नी रेणुकाने गावात आनंदाने मिरवणूक काढली. पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी २२१ मतं मिळवत विरोधी उमेदवाराला पराभूत केले.

या उत्साही पती-पत्नीचे फोटो गावात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.