Home Blog Page 548

भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा. भाजपची ज्ञानेश वाकुडकर विरोधात पोलिसात तक्रार.

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित समाजसेवक व लेखक ज्ञानेश वाकुडकर यांचेवर तातडीने गुन्हे दाखल करा अश्या मागणी ची तक्रार आज दिनांक 17 जानेवारी रोजी माजी मंत्री तथा आमदार डॉ संजय कुटे यांचे मार्गदर्शनात भाजपच्या वतीने जळगांव जामोद पोलिसांना दिली. देशाचे माजी पंतप्रधान , भारतरत्न स्व अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले संपूर्ण जीवन देश सेवेसाठी , समाजासाठी दिले. अश्या आदर्श पुरुषांबद्दल तथाकथित स्वयंघोषित समाजसेवक व लेखक ज्ञानेश वाकुडकर रा नागपूर याने त्यांच्या चरित्राबद्दल अतिशय घृणास्पद लिखाण केले. त्यांची तुलना मंत्री धनंजय मुंडे यांचेसह केली. विदर्भ मतदार या वृत्तपत्रात त्यांचा याबाबत लेख प्रकाशित झाला. यावर न थांबता वाकुडकर याने सदर लिखाण व्हाट्सएप व विविध सोशल मीडियावर पसरविले. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात असे लिखाण म्हणजे देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराचा अपमान आहे. आम्ही सर्व त्यांची प्रेरणा घेऊन काम करत आहोत, ते आमच्यासाठी देवाप्रमाणे आदर्श आहेत , त्यांच्या विरोधात अश्या प्रकारच्या अपमानास्पद लिखाणामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. अश्या विकृत मानसिकता असलेल्या ज्ञानेश वाकुडकर याच्या तीव्र शब्दात निषेध करीत असून संपूर्ण भारताच्या नागरीकांच्या भावना दुखवणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्याला अटक करा अशी तक्रार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांचे मार्गदर्शनात भाजपा च्या वतीने जळगांव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. यावेळी निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ शहराध्यक्ष अभिमन्यू भगत भाजपा जिल्हा युवा मोर्चा सचिन देशमुख,राजेंद्र गांधी,रामेश्वर राउत, पंचायत समिती सभापती महादेवराव धुर्डे,निलेश शर्मा,राम इंगळे,अशोक काळपांडे, गुणवंत कपले,प्रतिक खिरोडकार, शरद खवणे,मोहित सरप,रमेश कोथळकार, अंबादास निंबाळकर, जयकुमार पारस्कर, शैलेंद्र बोराडे, मंगेश बावस्कर, कैलास डोबे, राम शिंदिकर, पुरुषोत्तम खत्ती, सुधीर ठाकरे, अरुण खिरोडकार,सुरेश इंगळे,संजय देशमुख, यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे विविध आघाडीमधील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आदी भाजपा तालुका, शहर, भाजयुमो, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूनगाव गट ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान उसरा येथे शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील यांच्यावर हल्ला

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.

जळगाव जामोद तालुक्यातील उसरा येथे दिनांक 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीवरून एका कुटुंबाने श्रीकृष्ण हरिभाऊ शिंबरे यांच्या पॅनल ला मतदान केले नाही म्हणून वाद करीत पंधरा जणांनी विरोधकांच्या घरात घुसून तलवार कुराड, फावडे,लाठ्या- काठ्यांनी हल्ला केला यामध्ये शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले तसेच यामध्ये दत्ता पाटील यांची पन्नास ग्राम सोन्याची चेन हिसकावली याप्रकरणी 15 जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस गुन्हे दाखल केले आहेत सविस्तर असे की जळगाव जामोद तालुक्यातील उसरा येथील अनिकेत उमेश पाटील, आशिष पंढरी घाईट, शुभम दत्तात्रय घाईट, वैभव पंढरी घाईट,उमेश राजकुमार घाईट हे 15 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अनिकेत पाटील यांच्या घरासमोर उभे असताना शिंबरे कुटुंबाने तेथे येऊन त्यांना असे म्हटले की तुम्ही आमच्या पँनलला मतदान का करत नाहीत असे म्हणून शिवीगाळ केली तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले तसेच संध्याकाळी साडेसहा ते सात सातच्या सुमारास दत्ता पाटील यांच्यासह सर्वजण घरात बसलेले असताना श्रीकृष्ण हरिभाऊ शिंबरे,प्रमोद उर्फ बाळु शिंबरे,श्रीकांत श्रीकृष्ण शिंबरे, धनंजय शिंबरे, चेतन शिंबरे, यश प्रमोद शिंबरे, शालिनी श्रीकृष्ण शिंबरे, निता प्रमोद शिंबरे, कल्पना धनंजय शिंबरे, कांचन श्रीकांत शिंबरे व इतर पाच जणांनी तिथे येऊन हातात तलवार,कुराड,फावडे, लाठ्या-काठ्या घेऊन मतदानाच्या कारणावरून वाद करीत हल्ला केला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील यांच्या डोक्यावर तलवारीने वार केला यामध्ये दत्ता पाटील हे गंभीर जखमी झाले या गंभीर अवस्थेमध्ये त्यांच्या गळ्यातील 50 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावत चेतन शिंबरे यांनी सोन्याची चैन लंपास केली. तर या हाणामारी मध्ये राजकुमार पाटील उमेश पाटील,पंढरी घाईट, यांना फावडे व कुराडीने जबर मारहाण केली. यावेळी वाचवण्याकरिता आलेल्या महिलेसोबत उपरोक्त आरोपींनी तिची छेडछाड केली. या हाणामारी मध्ये दत्ता पाटील यांच्यासह त्यांना तात्काळ उपचारासाठी खामगाव येथील सिल्वर सिटी येथे हलविण्यात आले या सर्व प्रकाराची तक्रार अनिकेत पाटील यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी श्रीकृष्ण हरिभाऊ शिंबरे, प्रमोद उर्फ बाळू शिंबरे, श्रीकांत शिंबरे,धनंजय शिंबरे, चेतन शिंबरे, यश शिंबरे, शालीनी शिंबरे, निता शिंबरे,कल्पना शिंबरे,कांचन शिंबरे यांच्यासह इतर पाच जणांवर कलम 307,397,398,452,354,354ब,143,144,148,149,294,506,135, भादवि नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय सतीश आडे व विकास गव्हाड करीत आहे

ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्यावरील पोलीस कर्मचार्‍याचे निधन

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

तिरोडा,दि.१६ : धापेवाडा गट ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पोलीस बंदोबस्तात कर्तव्यावर असलेले दवनीवाडा पोलीस ठाण्याचे नायक पोलीस शिपाई रूपचंद झनकलाल ढोमने (वय 57) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना शुक्रवार, 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5.15 वाजता घडली. ते मूळचे मुशानी (नवेगाव) येथील रहिवासी होते.
धापेवाडा गट ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पडावी, निवडणुकीदरम्यान गावात सुव्यवस्था कायम राहावी, या हेतूने नापोशि ढोमने यांची ड्यूटी धापेवाडा गेटवर लावण्यात आली होती. आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असताना मतदान प्रक्रिया संपण्यास अर्धा तास बाकी असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. लगेच स्थानिक डॉक्टरकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनी गोंदियाला नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे उपचारासाठी त्यांना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नापोशि ढोमने हे माजी सैनिक होते. जूनअखेर त्यांची सेवासमाप्ती होती. त्यांच्या अचानक निधनामुळे दवनीवाडा पोलीस ठाण्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी रताळी येथील महिला सरसावल्या ! महिलांचे ठाणेदारास निवेदन ! कारवाई करण्याची मागणी

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील रताळी गावामध्ये अवैध दारू विक्री त्यांचा जोर वाढला असून त्यामुळे दारू पिण्यासाठी तरुण व माणसे व्यसनाच्या आहारी जाऊन भांडण व चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे याबाबत महिलांनी सुमन ज्ञानेश्वर सरकटे यांच्या नेतृत्वामध्ये साखरखेडा पोलीस स्टेशन येथे दिनांक 11 .12 .2020 ला निवेदन दिले होते परंतु निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असा आरोपही या महिलांनी केला आहे दारुमुळे महिलांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे घरामध्ये वादविवाद होतात तसेच गावांमध्ये सुद्धा भांडणे होतात असे जर प्रकार चालू राहिला तर एखाद्याचा खून सुद्धा होऊ शकतो !तरी गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांना अटक करून कारवाईची मागणी यावेळी रताळी येथील महिलांनी निवेदनाद्वारे केली आहेकारवाई न झाल्यास बुलढाणा येथे उपोषण करू असा इशारा सुद्धा महिलांनी यावेळी दिला आहे !या निवेदनावर वर्षा राजू खिल्लारे ‘अर्चना परमेश्वर गवई ‘मीना संजय खिल्लारे ‘कमलाबाई सरकटे वैशाली जाधव राधाबाई पंडित जाधव रंजना सौभागे सत्यभामा पाटील जोत्सना जाधव वंदना जाधव शारदा सोभागे अलका जाधव आशा सोभागे शालू जाधव केराबाई इंगळे नंदा सरकटे कविता सरकटे नंदाबाई दिलीप सरकटे मिनाबाई मोरे गोदावरी जाधव ज्योती सरकटे विमल खिल्लारे सुजाता जाधव कलावती पाटील आशा सौभागे पंचफुला जाधव ज्योती जाधव ‘ पुष्पा सरकटे ।लीला सरकटे ‘साधना सरकटे ‘शांताबाई खिल्लारे ‘कल्पना जाधव ‘आशा सरकटे ‘रुक्मिना खिल्लारे ‘ अरुना सरकटे ‘आधी महिलांच्या या निवेदनावर सह्या आहेत आता यावर पोलिस काय कारवाई करतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल !

 

पतीसोबत घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून विवाहिती घर सोडून निघूल गेली

0

 

मलकापूर : पतीसोबत घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून एकता नगर येथील विवाहिता लहान बाळाला सोबत न घेता घर सोडून निघून गेल्याची घटना शनिवार दि.2 जाने रोजी घडली. मलकापूर शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून विवाहितेचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील बेपत्ता विवाहितेचे वडील विनायक विश्वनाथ वाघमारे यांनी दि. 7 जाने. रोजी, दिलेल्या फिर्यादीवरून त्याची मुलगी मयुरी भीमराज इंगळे वय 25 वर्षे हिचे शहरातील भीमराज इंगळे यांच्या सोबत सन 2019 मध्ये लग्न झाले होते. परंतु लग्ना नंतर दोघीणमध्ये नेहमीच छोट्या मोट्या कारणा वरून वाद होत असत त्या मुळे मयुरी ही आपल्या वडिलांच्या घरी राहावयास आली होती. दिनांक 2 जाने रोजी पती भीमराज इंगळे यांच्या सोबत 3 वाजेच्या दरम्यान फोन वरून झालेल्या वादामुळे मयुरी रागाच्या भरात आपल्या बाळाला सोबत न घेता घर सोडून निघून गेली. ती अद्याप पावेतो आलेली नाही अशी तक्रार दिली या वरून शहर पोलीस स्टेशन तर्फे मिसिंग क्रमांक 01/2021 प्रमाणे मिसिंग नोंद करीत सादर महिलेचा शोध सुरू केला आहे.
सदर महिलेचे वर्णन, रंग गोरा, सळपातळ बांधा, उंची 5.5 इंच, पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, व त्यावर लाल रंगाचे स्वेटर, कपाळावर डाव्या बाजूला तीळ असे नमूद असून सदर महिलेचा शोध सुरू आहे

साखरखेर्डा येथे ७२. ६५% मतदान !तालुक्यात एकूण ७४ . ६५ % पेक्षा जास्त मतदान !किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील एकूण ३९ग्रामपंचायत साठी आज दिनांक १५जानेवारीला मतदान घेण्यात आले अनेक ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले !
तालुक्यातील एकूण ६४ हजार ८३५ मतदारां पैकी एकूण ४८ हजार ३९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलायामध्ये पुरुष २५ ७४७ ‘ तर महिला 22,९८५ एकूण टक्केवारी, ७४ . ६५%पेक्षा जास्त असू शकते !टक्केवारी मध्ये बदल होऊ शकतो !
अतिशय संवेदनशील व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या
साखरखेर्डा ग्राम पंचायत निवडणूकीत ७२:६५ टक्के मतदान झाले असून ११ हजार ५९१ मतदारांपैकी ८ हजार ३०६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला .
साखरखेर्डा येथील ग्राम पंचायत निवडणूकीत ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते . १७ सदस्या करीता झालेल्या मतदानासाठी सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या . सकाळी ७:३० वाजता काही उमेदवारांनी चिन्ह दिसत नसल्याची तक्रार मतदान केंद्र प्रमुखाकडे केली होती . काही काळासाठी मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती . परंतू उमेदवार प्रतिनिधी यांनी चिन्ह दिसत आहे असे सांगितल्या नंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली . या गोंधळात ३० मिनीटाचा वेळ गेला . विज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने मतदान करतांना चिन्ह स्पष्ट दिसत नव्हते . दुपारी ११ वाजेपासून जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत मतदारांची प्रचंड गर्दी वाढल्याने ठाणेदार यांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खुपचं कसरत करावी लागली . वार्ड क्रमांक एक मध्ये २२२७ पैकी १५२१ मतदारांनी मतदान केले . वार्ड क्रमांक दोन मध्ये २०५८पैकी १४९५ मतदान झाले . वार्ड क्रमांक तीन मध्ये १४०८ पैकी ९५९ मतदारांनी मतदान केले . वार्ड क्रमांक चार मध्ये २१८४ पैकी १६१५ मतदारांनी मतदान केले . वार्ड क्रमांक पाच मध्ये १८८१ पैकी १३४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . वार्ड क्रमांक सहा मध्ये १८६९ पैकी १२१३ मतदारांनी मतदान केले . या निवडणुकीत ४३३४ पुरुष आणि ३८१२ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला . या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल रवींद्र पाटील , जिल्हा परिषद सदस्य राम जाधव यांची सुन ज्योती सचीन जाधव , भाजपा नेते उल्हास प्रभाकर देशपांडे , विद्यमान सरपंच महेंद्र पाटील , माजी सभापती राजू ठोके यांच्या मातोश्री लिलाबाई श्रीपत ठोके , माजी उपसभापती सुनील जगताप यांच्या पत्नी सुमन सुनिल जगताप , सय्यद रफीक , शेख रफीक तांबोळी हेही निवडणूक रिंगणात उतरले होते ! साखरखेर्डा ग्राम विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनल मध्ये सरळ झाली आहे .आता ठिक ठिकाणी लोकांचे घोळके दिसत असून विजय कोणाचा अशी चर्चा सध्या रंगत आहे !

पत्रकार किशोर इंगळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित

0

 

सुनील पवार नांदुरा

बुलढाणा नांदुरा :- दयाभाई खराटे स्मृती अभिवादन सभेत पत्रकारिता गौरव पुरस्कार व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त महेश भवन,मलकापूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते,तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व मान्यवरांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पत्रकारिता गौरव, समाजगौरव, कलावंत सन्मान पुरस्कार तसेच हॅलो महाराष्ट्र न्युज,चे संपादक तथा, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष श्री,किशोर इंगळे याना डॉ,बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,व समाजरत्न दयाभाई खराटे फाऊंडेशन मलकापूर द्वारा देऊन सन्मानित करण्यात आले,

आडगावराजा च्या तरुणाईचा अभिनव ऊपक्रम!! वाढदिवसाचा खर्च न करता अभ्यासिकेला देणार पुस्तके भेट!!

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील राजे लखुजीराव जाधव यांचे पुञ अचलोजी राजे जाधव यांचे ऐतिहासिक गाव आडगावराजा येथील तरुण युवकांनी मकर संक्राती च्या मुर्हतावर एकञ येऊन वाढदिवसा चा खर्च टाळुन गावातील ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले अभ्यासिकेला पुस्तके भेट देत आपला वाढदिवस साजरा करण्यचा अभिनव ऊपक्रम आडगावराजा येथिल तरुणाईने घेतल्याने या ऊपक्रमाचे गावातील नगरिकांनी अभिनंदन केले आहे.
आडगावराजा येथे ३ जानेवारी रोजी सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्ताने गावातील जिल्हा परिषद ऊच्च केंद्रीय प्राथमिक शाळेत ज्ञान ज्योति सावित्री बाई फुले अभ्यासिकेचे ऊदघाटन करण्यात आले.यावेळी गावातील नागरिकांनी लोकवर्गणी तुन सुरु केलेल्या अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्यात आली .याचबरोबर गावातील तरुण युवकांनी एकञ येऊन वाढदिवसा निमित्ताने केक व ईतर खर्च केल्यापेक्षा गावातील अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्याचा निर्णय घेतला . मकर संक्रातीच्या शुभ मुर्हतावर एकञ येत गावातील तरुणांनी यापुढे वाढदिवसाला केकसह होणार खर्च न करता शाळेतील अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्याचा अभिनव ऊपक्रम आज मकर संक्रांतीच्या शुभ मुर्हतावर घेतला गावातील तरुणांईने घेतलेल्या या निर्णयाने गावातील नागरिक आनंदीत झाले असुन अभ्यासिकेला पुस्तके मिळाल्याने या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या मुलींना या पुस्तकांचा फायदा होईल हे नकीच

माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी समाज भूषण अर्जुन गवई यांची निवड !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील माजी सैनिक तथा समाज भूषण अर्जुन गवई यांची माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे !
ही नियुक्ती 12 जानेवारीला राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंती दिनी माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन करण्यात आली आहे !
त्यांच्या या निवडीमुळे सिंदखेड राजा तालुक्यातील संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधील माझी सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे !
माजी सैनिक अर्जुन गवई हे अगोदरच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढे असतात त्यातच माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आणखीन जबाबदारी त्यांच्यावर वाढली आहे !आपण तन-मन-धनाने माजी सैनिकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही यावेळी नवनियुक्त विदर्भ अध्यक्ष अर्जुन गवई यांनी बोलताना दिली आहे !

शिंदी येथे शेतातून ठिबक सिंचनचे ३५ हजार किंमतीचे 11 बंडल चोरीला !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

अगोदरच शेतकरी शेतातील विजेच्या समस्येमुळे त्रस्त आहेआणि शेतातील शेतीचे साहित्य चोरीला जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडला आहे ! शिंदी येथील प्रयोगशील शेतकरी विनोद खरात यांनी शेतामध्ये ठिबक करण्यासाठी दुकानातून नवीन ठिबक सिंचनचे 11 बंडल खरेदी केले होते त्याची किंमत 35000 रुपये होती !त्यांनी हे सर्व बंडल एका शेतातील झाडावरती ठेवून दिले होते .काही दिवसांनी शेतामध्ये ठिबक लावायचे असल्यामुळे त्यांनी ठेवलेले ठिबकचे बंडल बघितली असता त्या ठिकाणी ते आढळून आले नाहीत !शेजारीपाजारी सर्व ठिकाणी शोध घेतला असता कुठेही ठिबक चे बंडल आढळली नाही ‘शेवटी शोधाशोध झाल्यानंतर शेतकरी विनोद खरात यांनी ठिबक ची बंडल चोरीला गेल्याची साखरखेर्डा पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दि . १० जानेवारीला दिली !यावेळी पोलीस कॉन्स्टेबल श्री चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला !शेतातील साहित्य चोरीला जात असल्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे ।पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री चव्हाण करत आहे !