Home Blog Page 548

शिक्षक गजानन खंडारे यांचे अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथीलय शवंतराव चव्हाण माध्यमिक व स्वर्गीय भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय राजेगाव येथील शाळेवर कार्यरत शिक्षक गजानन संपतराव खंडारे.

राहणार शेंदुर्जन यांचे शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी तसेच नियमबाह्य केलेली भरती प्रक्रिया तसेच ‘शाळेतील मुख्याध्यापकावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल.

असताना सुद्धा तसेच मुख्याध्यापक यांचे वेतन थकित वेतन सह पूर्ववत सुरू करण्यासाठी दिलेला अमरावती शिक्षण उपसंचालक यांनी आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा.

तसेच संस्थाचालक आरोपी असताना व त्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा अमरावती उपसंचालक यांच्या कार्यालयाने बारावी विज्ञान शाखा सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी.

 

 

एक क्लिक करून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8285

 

या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीस कडक शासन करावे या मागणीसाठी 26 जानेवारी पासून श्री गजानन खंडारे हे आपल्या दोन लहान मुलं पत्नी यांच्यासह अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत.

तरी जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार यावेळी शिक्षक श्री गजानन खंडारे यांनी व्यक्त केला आहे .

अमरावती येथील शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर असलेल्या उपोषणास यावेळी पत्रकार सचिन खंडारे येथील सामाजिक कार्यकर्ते बबन सरकटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल मोरे तसेच हिवरा आश्रम येथील गजानन मोरे यांनी भेट दिली !

रामाळा तलावातील मासे मृत्युने तलावाचे प्रदुषण अधोरेखीत

1

 

तलावात येणारे सांडपाणी थांबवुन तलाव प्रदुषणमुक्त करण्यास खोलीकरणास सुरूवात न केल्यास इको-प्रो चा आंदोलनाचा इशारा

इको-प्रो ची प्रदूषण नियंत्रण मंडळ कडे तक्रार

चंद्रपूरः शहरातील एकमेव ऐतीहासीक गांेडकालीन रामाळा तलाव वाढते प्रदुषणामुळे मासे मृत असल्याची घटना समोर आली आहे.

तलावाच्या काठावर मासे मृत आढळुन आल्याने रामाळा तलावाचे प्रदुषण अधोरेखीत झालेले आहे.

आज सकाळी इको-प्रो सदस्य रामाळा तलावाच्या काठावर असतांना सभोवताल पाण्यात मृत मासे तरंगताना आढळुन आले.

इको-प्रो सदस्यांनी तलावात उतरून पाहणी केली, काठावरील कचÚयामुळे तसेच इकाॅर्नीया वनस्पतीखाली असल्याने बरेच मृत मासे दिसुन येत नव्हते, जवळुन बघताच संपुर्ण तलावात मासे तरंगताना दिसत होते.

परंतु सदर ठिकाणी मागील काही दिवसापासुन मासे मृत होत असल्याचे दिसुन येत आहे.

आज फक्त विसर्जन स्थळावर पाहणी केल्यानंतर बरीच मासे मृत झालेली आढळुन आली. यास कारण म्हणजे कायम तलावात येणारे सांडपाणी जे मच्छीनालाच्या माध्यमाने तलावात येत असते.

त्यामुळे तलावाचे प्रदुषण वाढ होउन जलजीव यांना धोकादायक ठरत आहे. सोबतच भुजल सुध्दा दुषीत होत आहे. सदर तलावाच्या काठावर पाण्यास सुटलेल्या दुर्गधीमुळे हवा जोरात असेल तेव्हा परिसरात हा दुर्गध पसरत असतो त्याचा नागरीकांना त्रास सहन करावा लागतो.

 

इको-प्रो सातत्याने तलावाच्या प्रदुषणाकडे लक्ष वेधत वारंवार जिल्हा प्रशासनाकडे मागणी लावुन धरत आहे. मागील वर्षी सुध्दा याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ कुणाल खेमणार यांनी तलाव खोलीकरण बाबत बैठका घेतल्या होत्या.

त्यात इको-प्रो तलाव संवर्धनासाठी सुचविल्याप्रमाणे तलाव सुकवुन खोलीकरण करणे, अतिक्रमण रोखण्यास सुरक्षा भिंत बांधणे, मच्छीनाला वळती करणे, नाल्यावर जल शुध्दीकरण संयत्र उभारणे, तलावात वेकोलीचे वाया जाणारे पाणी पाईपलाईन टाकुन तलावात शुध्द पाणी आणणे यावर चर्चा झाली होती.

यानुसार वेकोलीचे पाणी तलावात आणण्याचे काम वेकोली कडुन करण्यात येत आहे. खोलीकरणास सुरूवात करण्यात आली मात्र पावसाला सुरूवात झाल्याने प्रत्यक्ष कामाची सुरूवात होउ शकली नाही.

आणी त्यापुर्वी कोवीडमुळे सुध्दा तलावाच्या कामाकडे लक्ष देण्यात आले नाही.

यंदा सुध्दा नोव्हे मध्ये जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांची भेट घेत तलावाचे महत्व वाढते प्रदुषण, इकाॅनीर्या वनस्पतीची समस्याबाबत निवेदन देत खोलीकरणाची मागणी केली होती.

मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालय कडून याबाबत कार्यवाही सुरू असताना सुद्धा यंदा तलाव खोलीकरणास अदयाप निर्णय झालेला नाही.

तलावाचे पाणी सोडणे आणी खोलीकरण करण्यास अधिक काळ लागणार असल्याने पावसाळा पुर्वी ही सर्व कामे होणे गरजेचे आहे.

तलाव खोलीकरण, संवर्धनासाठी दरवर्षी बैठका होतात मात्र निर्णय घेतेवेळेस कामासाठी पुरेसा वेळ हाती राहत नसल्याचे दिसून येते, यामुळे इको-प्रो ने आपल्या मासीक बैठकीत काही दिवसापुर्वीय वेळेची गरज लक्षात घेऊन नाइलाजास्तव ‘आंदोलनाची’ भुमीका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सोबतच ही बातमी पण पहा

https://www.suryamarathinews.com/post/8251

 

 

 

 

आज मासे मृत झालेल्या घटनेने तलावाचे वाढते प्रदुषण अधोरेखीत झाले आहे.

तलावाचे तसेच सभोवतालच्या परिसराचे सुध्दा पर्यावरण धोक्यात येत आहे. जलजिव सुरक्षीत नाहीत, प्रदुषणामुळे जलीय वनस्पती इकाॅर्नीया ची वाढ होत आहे, नैसर्गीक सौदर्यास खिळ बसल्याने सभोवतालचा परिसराचे महानगरपालीका तर्फे करण्यात आलेल्या सौदर्यीकरणाचे पर्यटनीय दुष्टया महत्व कमी होत आहे, गोंडकालीन ऐतिहासीक वारसा संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे,

आदी बाबीचा विचार करता इको-प्रो संस्था आता रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीच्या मागणी करीता आक्रमक झालेली असुन आज परत तलावाच्या पात्रात इको-प्रो सदस्य उभे राहुन मृत मासे हातात पकडुन तसेच ‘सेव रामाळा तलाव’ चे फलक हातात घेत निदर्शने केलीत तसेच आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी यांनी फोनवरून माहीती देत तक्रार सुध्दा केलेली आहे.

आज इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे नेतृत्वात इको-प्रोचे कार्यकर्ते तलावाचे निरीक्षण करतांना इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, संजय सब्बनवार, अडगुरवार, हरीश मेश्राम, प्रमोद मलीक, कपील चैधरी, अब्दुल जावेद, राजु काहीलकर अभय अमृतकर, मनीष गांवडे, सुनील पाटील, सौरभ शेटे, जयेश बैनलवार, अमोल उटटलवार, सचीन धोतरे, पुजा गहुकर, प्रगती मार्कडवार, शंकर पोईनकर, अनिल, अरूण गोवारदिपे, प्रदत्ता सरोदे सहभागी झाले होते.

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप भाऊ वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0

 

जिल्हा परिषद शाळा चुंचाळे येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप भाऊ वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन मुख्यध्यापक गिरीश सपकाळे सर यांनी केले केले
अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेश दादा पाटील हे होते तर प्रास्ताविक राजू सोनवणे सर यांनी केले, आभार राहूल वाणी सर यांनी मानले सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आमिर तडवी, पंडित मराठे, मधूकर कोळी यांच्या सह अध्यक्ष यांचे प्रतिनिधी लुकमान तडवी, सदस्य प्रतिनिधी फत्तू तडवी,विश्राम पाटील,इतबार तडवी, सरपंच प्रतिनिधी संजय पाटील, शिक्षक मज्जित तडवी त्रिपाठी मॅडम ग्रामसेवक यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते

यावलच्या तिन ग्रामसेवकांचे उत्कृष्ठ ग्रामस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी म्हणुन प्रशस्तीपत्राने गौरव

0

 

 

यावल येथील पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले तिन ग्रामसेवकांना आज महसुल प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदा उत्कृष्ठ ग्रामस्थरीय मतदार नोंदणी अधिकारी (बिएलओ )म्हणुन प्रशिस्तीपत्र गौरविण्यात आले आहे . आज दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधुन निवडणुक आयोगाच्या वतीने राबविण्यात मतदार नोंदणी अभीयांनात मालोद , मोहराळे ,बोराळे या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले राजु अन्वर तडवी , चितोडा आणी चिखली येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेल्या रूपाली तळेले आणी बोरखेडा येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले लक्ष्मीकांत उर्फ हितु महाजन यांना यंदाचे उत्कृष्ठ बिएलओ म्हणुन फैजपुर येथील प्रांत कार्यालयातील सभागृहात विभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते आणी यावलचे तहसीलदार महेश पवार , यावल येथील निवडणुक शाखेतील नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ठ ग्रामस्थरीय मतदार नोंदणी अधिकारी (बिएलओ )प्रशस्तीती पत्र देवुन गौरविण्यात आले आहे .

निराधार महिलांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे उभे आहे-आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते १८ निराधार महिलांना प्रत्येकी २०,००० रु.चा धनादेश वाटप करण्यात आले.निराधार महिलांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे उभे आहे असे मनोगत आमदार राजेश काकडे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास जेष्ठ काँग्रेस नेते श्री.पदमभाऊ गावंडे(पाटील), जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री .भगवानभाऊ धांडे,नांदुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.गौरव पाटील,नांदुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर डांमरे,नांदुरा चे तहसीलदार श्री.राहुल तायडे, नांदुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री आशिष बोबडे, नांदुरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. नाईकनवरे,नांदुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.समाधान वाघ, तालुका भूमिअभिलेख चे श्री.सैतवाल,नायब तहसीलदार श्री,संजय मार्कंड यासह पात्र महिला लाभार्थी उपस्थित होत्या.

श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ” यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

0

 

आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु येथे गावचे प्रथम नागरिक “लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ” यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत होऊन संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले
कार्यक्रमास उपस्थित सौ संगीताताई गाडे, सौ निर्मलाताई पुंडे,श्रीमती भिमाबाई वानखडे,अन्सार पठाण दिनकर इंगळे,रमेश डीखोलकर, निलेश चांडक,विनायक चोपडे,सौ शारदाताई वानखडे,सौ गोकुळाताई बोपले,सौ प्रमिलाताई वानखडे,सौ मीराताई कुरवाळे,सौ वैशालीताई इंगळे,सौ पुनमताई मांडवगडे,भास्कर आढाव, साजिद शहा,कपिल गवई हे सर्व ग्रा प सदस्य. ग्राम विकास अधिकारी मेहेंगे साहेब,मंडल अधिकारी उकर्डे साहेब,तलाठी कस्तूरे साहेब,तांबट साहेब,कोतवाल साहेब,पोलीस पाटील गणेश सुराडकर,विलास इंगळे,संजय सातव,सै लियाकत, ज्ञानेश्वर पवार,विठ्ठल इंगळे,चंद्रकांत येनकर दीपक तेजवाल, अशोक देशमुख,डी आर परघरमोर,श्रीकृष्ण आमझरे, नंदाताई धनडोरिया,कमलताई वाघ,हे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी
रामकृष्ण करांगडे,सुभाष देशमुख,अमित पाटील पत्रकार श्याम इंगळे, किशोर दसोरे व गावकरी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी बैलगाडी मार्च भव्य बैलगाडी मार्च

0

 

दिल्ली येथे कृषी कायद्यांचा विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशात अनेक ठिकाणी येत्या २६ जानेवारी ला ट्रॅक्टर मार्च काढण्यात येणार आहे.
शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत म्हणून संग्रामपूर तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने २६ जानेवारीला शेतकऱ्याचं पारंपारिक वाहन बैलगाडी चा मार्च काढून माननीय तहसीलदार, संग्रामपूर यांना निवेदन द्यायचे आहे.
तरी संग्रामपूर तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी बैलगाडी मार्च मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे ही आग्रहाची विनंती.

सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सूचना –

१) बैलगाडी मार्चमध्ये येतांना आपण शेतकरी म्हणूनच सहभागी व्हावे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून नाही.

२)आपल्या बैलगाडी मार्च मुळे इतर कोणालाही काहीच बाधा निर्माण होणार नाही याची जाणीव असावी.

३)बैलगाडी मार्च मुळे प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नये उलट त्यांच्या सोबत सहकार्य वृत्तीनेच वागावे.

४)शेतकऱ्यांनी बैलगाडी मार्च मध्ये येतांना सोबत आपली न्याहरी/जेवण आणावे निवेदन दिल्यानंतर आपण सर्व सोबत न्याहरीचा लाभ घेऊ.

सर्व शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन सकाळी ०८:०० वाजता संग्रामपूर बसस्टॉपवर एकत्र येऊन तेथून तहसील कार्यालयाकडे अत्यंत शिस्तीत व शांततेत जायचे आहे.

वेळ:-०८ :०० वाजता
स्थळ:- बसस्टॉप संग्रामपूर

संपर्क-

9423761908
9657154425
7588846544
8788710071

विनीत:- समस्त शेतकरी बांधव संग्रामपूर तालुका.

युवासेना मलकापूर – नांदुरा विधानसभेच्या वतीने आज तहसीलदार साहेब नांदुरा यांना निवेदन देण्यात आले

0

 

सुनिल पवार नांदुरा

गेले 10 महिन्या पासून कोरोनाच्या महामारी मध्ये सर्व जग विस्कळीत झाले होते त्याच महामारी मध्ये आपल्या महाराष्ट्रातील शाळा/कॉलेज सुद्धा बंद पडले होते आणि ST महामंडळ च्या कारभार सुद्धा विस्कळीत झालेला होता परंतु आता शाळा कॉलेज क्लासेस इतर शैक्षणिक संस्था ह्या पूर्वरत चालू झाल्या आहे व काही चालू होत आहे म्हणून नांदुरा तालुक्यातील 110 खेडे गावातील अंदाजे 5000 विद्यार्थी विद्यार्थिनी संख्या असून त्याचा शैक्षणिक विचार करून नांदुरा तालुक्यातील ST बस सेवा पूर्वरत चालू करून विद्यार्थाना व नागरिकांना सहकार्य करावे जेणे करून त्याच्या नांदुरा शहरात शिक्षण आणि इतर कामा साठी येण्याचा मार्ग सुकर होईल असे निवेदन देण्यात आले ह्यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र वसंतराव भोजने विद्यार्थीसेना जि.प्रमुख मुन्नाभाऊ पांड,शिवसेना शहर संघटक संजय गुजर उपजिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना ईश्वर पांडव युवासेना उपशहर प्रमुख *सोनू चोपडे,अक्षय सुल्ताने,पुरुषोत्तम सोनवणे,धनंजय वातपाळ,सागर वावटळीकर,शुभम वानखडे,पंचम तायडे,बबलू ताठे,दीपक अंबेकर,मोहन अडाळकर,दैवेंद्र जयस्वाल,शिवा एखंडे,वैभव गावंडे,योगेश इंगळे व शिवसैनिक उपस्थित होते.

भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन चा उपक्रम स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे विद्यार्थी रोवणार जागतिक स्तरावर झेंडा…

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी:-

दि.२४ रामेश्वरम येथील भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन च्या सौजन्याने येत्या ७ फेब्रुवारी रोजी अत्यंत कमी वजनाचे शंभर उपग्रह अवकाशात झेपावणाऱ असून यातील दोन उपग्रह हे स्थानिक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केले आहेत. देशातील एकूण एक हजार विद्यार्थ्यांचा “स्पेस रिसर्च २०२१” या वैज्ञानिक उपक्रमात सहभाग असून ह्या उपक्रमाची जागतिक पातळीवर नोंद होणार असल्याने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ चे विद्यार्थी जागतिक स्तरावर आपला झेंडा रोवणार असून विविध प्रकारचे पाच उपक्रमांमध्ये त्यांच्या नोंदी होणार आहेत. ह्या प्रकल्पाविषयी माहिती देण्यासाठी दिनांक २४ डिसेंबर रोजी स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख संयोजक मिलिंद चौधरी यांनी उपस्थितांशी ऑनलाइन चर्चा केली. यावेळी संस्थाध्यक्ष ऍड.गिरीश माळपांडे, संचालक नंदकिशोर काथोटे,प्राचार्य, विद्यार्थी व पालकांची तसेच संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.संस्थेचे अध्यक्ष ऍड. गिरीश माळपांडे आणि या प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक मिलिंद चौधरी यांच्या समन्वयातून स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे दहा विद्यार्थ्यांच्या एका गटाची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे. ह्या प्रकल्पात दहा विद्यार्थ्यांचा एक गट असून हे बालवैज्ञानिक २५ ते ८० ग्रॅम वजनाच्या लहानात लहान असे शंभर उपग्रह तयार करणार आहेत. इतर शाळांमधील विद्यार्थी हे एक उपग्रह तयार करीत असून स्वामी विवेकानंद शाळेमधील विद्यार्थ्यांना दोन उपग्रह तयार करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यांनी बी.एम.पी.आणि डी. टी.एच.-11 असे दोन उपग्रह तयार केले असून बी एम पी हा उंची ,हवेचा दाब याविषयीचा अभ्यास करेल तर दुसरा डी.एच.टी.-11 हा हवेतील आद्रता विषयीचा अभ्यास करेल. हे सर्व उपग्रह एका किटमध्ये फिट करून सात फेब्रुवारी रोजी हे शंभर उपग्रह सकाळी १०.३० वाजता रामेश्वरम येथील केंद्रांमधून मधून अवकाशात झेपावणाऱ आहेत.ह्या किट सोबत पॅरॅशूट(लाइट हेलिएम बलून), जी.पी.एस. ट्रॅकिंग सिस्टम सह लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. सुमारे दहा किमी अंतर गेल्यानंतर या उपग्रहाचा केंद्राशी संपर्क तुटेल नंतर परत पंचवीस किलोमीटर पर्यंत ओझोन कक्षा पार करत पस्तीस किलोमीटर पर्यंत हे उपग्रह पोहोचणार असून नंतर परत पृथ्वीच्या दिशेने झेपावणार असून रामेश्वरम लगतच्या १२७ किलोमीटर परिसरात ते खाली कोसळतील.अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख मिलिंद चौधरी यांनी दि.२४डिसेंबर रोजी ऑनलाईन चर्चेदरम्यान दिली.

——————————————————

“प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दिसतो.”– ऍड गिरीश माळपांडे

भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या उपक्रमासाठी या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक मिलिंद चौधरी यांच्या सोबत संपर्क करून स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ मधील विज्ञानाविषयी प्रगती, रुची आणि अभिरुची असलेल्या दहा विद्यार्थ्यांचे एका गटाची त्यांनी निवड केली.इंजिनिअर, डॉक्टर होणे फार चांगली गोष्ट आहे ,पण त्याहून अधिक चांगली बाब म्हणजे शास्त्रज्ञ होणे. मला माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दिसतो असे मत ह्यावेळी संस्थेचे अध्यक्षऍड.गिरीश माळपांडे यांनी व्यक्त केले. येत्या ७ फेब्रुवारीला हे उपग्रह अवकाशात झेपावणाऱ असून ह्या सर्व कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना त्यांचे मोबाईलवर दिसणार आहेच परंतु मोठ्या स्क्रीन व ते प्रक्षेपण शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना व इतरांना दाखविण्याची व्यवस्था केली असल्याचेही यावेळी ऍड. माळपांडे यांनी सांगितले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना ह्या प्रोजेक्ट मध्ये सहभाग नोंदवून शाळेवर विश्वास टाकला त्याबद्दल त्यांनी पालकांचे आभार पण मानले. आपल्या शाळेमधून निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांच्या गटाचा प्रमुख कोण विद्यार्थी आहे? असे विचारले असता ऍड.माळपांडे यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थी हा या गटाचा प्रमुख आहे. आणि त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर सर्व उपस्थितांना त्याचा प्रत्यय व अनुभव देखील आला.

——————————————————-

रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ प्रकल्पात सहभागी विद्यार्थी :–

१)प्रणित विलास हागे २) देवयानी रवींद्र इंगळे ३) राज रामेश्वर पारस्कर ४)भूषण संतोष देशमाने ५)सृष्टी रवींद्र गावंडे ६)प्रांजल वासुदेव दुकाने ७)तेजस्विनी मधुकर ताठे ८)ओम सोनाजी हागे ९)वेदांत अरविंद आगरकर १०)आर्या दिलीप राठी

——————————————————

हे सर्व शंभर उपग्रह एकाच वेळी अवकाशात प्रक्षेपित केले जाणार असून हा एक जागतिक आशिया खंडातील आणि भारतीय स्तरावरचा विक्रम ठरणार असल्याने या उपक्रमाची ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद होणार आहे. या प्रकल्पातील सहभागी विद्यार्थ्यांच्या समूहाला कलाम कुटुंबीयांतर्फे सन्मानपत्र दिले जाईल, शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांना देखील व्यक्तिगत

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात तिन ठार;तर नऊ जखमी..

0

 

नांदुरा : – ( प्रफुल्ल बिचारे पाटिल )

भरधाव कंटेनरने काळी पिवळी ला धडक देवून झालेल्या भिषण अपघातात पती – पत्नीसह तिघेजण ठार तर 9 प्रवासी जखमी झाल्याची घटना.

आज दि .24 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा – वडनेर मार्गावरील वडी फाट्यानजीक घडली.

 

एका क्लिक वर  बातमी पहा

https://www.suryamarathinews.com/post/8254

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,काळी पिवळी क्रमांक एमएच 26 बी 9329 नांदुरा कडून मलकापूरकडे प्रवासी घेवून जात असताना वडनेर कडून नांदुराकडे भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनर क्रमांक आर जे 10 जीए 7599 च्या चालकाने वडनेर नजीक काळी पिवळीला जोरदार धडक दिली.

यावेळी झालेल्या भीषण अपघातात काळी पिवळी मध्ये बसलेले प्रवासी सुनिल सुभाष तायडे सौ.अर्चना सुनिल तायडे रा.वडनेर हे दोघे पती-पत्नी व भगीरथाबाई विठ्ठल दळवी रा.वडनेर या तिघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यु झाला.

तर सौ.आशा पुंडलीक जंगले रा.काटी , सौ.जय अनंतराव जंगले रा .काटी,रामचंद नथ्थू सातव रा.वडनेर , सौ.पुष्पा गजानन इंगळे रा.वडनेर , कु.श्रेया सुनिल तायडे , कु.तनिष्का रमेश होनाडे , रियांश सुनिल तायडे , सौ.कमल दिनकर पांडे,सौ.बेबाबाई राजाराम सातव दोन्ही रा.वडनेर हे 9 प्रवासी जखमी झाले आहेत .

_घटनेची माहिती मिळताच आदिंनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले.पुढील उपचाराकरीता खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान अपघातस्थळावरून कंटेनर चालकाने कंटेनर घेवून पळ काढला होता .त्याला नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे नांदुरा शहरात पकडण्यात आले .

याप्रकणी कंटेनर चालक जिवन नलबतसिंग मालवी वय 32 वर्ष रा.निपानी खुर्द जि.साजापूर राज्य मध्यप्रदेश याला नांदरा पोलिसांनी अटक केली आहे.