Home Blog Page 556

पारंपारिक पद्धतीने अर्ज दाखल करत उमेदवारांत समाधानाचे वातावरण

0

 

सचिन पगारे
नांदगाव (नाशिक)

नांदगांव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी दि. २३ डिसेंबर पासून इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली परंतु आॅनलाईन अर्ज दाखल करताना उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आयोगाने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दि. ३० डिसेंबर रोजी आॅफलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना संधी दिली. यामुळे काही उमेदवारांनी आॅनलाईन तर काही उमेदवारांंनी आॅफलाइन अर्ज दाखल करुन संधीचे सोने करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तहसील आवारात बहुसंख्य उमेदवार आपला अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. नांदगांव तहसील इमारतीत निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया सूत्रबद्धपणे पार पाडली. यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाने विशेष भूमिका बजावली.

अनुसूचित जाती, ओ बी सी प्रवर्ग,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण (ओपन) यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

ग्रामीण मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला अनेक रंग असतात, ढंग असतात. यात मतदानात वापरण्यात येणार्‍या रंगबेरंगी मतपत्रिकांचीही भर पडली आहे! येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या 527 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानात 4 रंगांच्या पत्रिकांचा वापर करण्यात येणार आहे.

विधान परिषद वगळता बहुतेक निवडणुकांत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर सामान्य बाब ठरली आहे. याला ग्राम पंचायतच्या लढती देखील अपवाद नाहीत. शहरी मतदारांच्या तुलनेत ग्रामीण मतदार उत्साहाने मतदान करतात. कार्यकारी सोसायटी, बाजार समित्यांसारख्या लढतीत पॅनल टू पॅनल किंवा सहजपणे दोन्ही पॅनलमधील उमेदवारांना योग्यतेनुसार मतदान करतात. याउप्परही त्यांच्या सुविधांसाठी खास निर्णय घेण्यात आला आहे. आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना महिला उमेदवार किंवा विविध प्रवर्गातील उमेदवार सहज ओळखता यावा यासाठी 4 रंगांच्या मतपत्रिकांचा वापर करण्यात येणार आहे.

आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार अनुसूचित जातींच्या जागेसाठी फिक्या गुलाबी रंगाची, अनुसूचित जमातीच्या जागेसाठी फिक्या हिरव्या रंगाची, ओबीसी प्रवर्गाच्या जागेसाठी फिक्या पिवळ्या रंगाची तर सर्वसाधारण (ओपन) जागेसाठी पांढर्‍या रंगांची मतपत्रिका वापरण्यात येणार आहे. ही पत्रिका मतदान यंत्रावर चिटकविण्यात येते. मतदान यंत्रांची तपासणी झाल्यावर कार्यकर्त्यांच्या हजेरीत ही प्रक्रिया पार पाडली जाते. यामुळे यंदाची निवडणूक ही प्रचारात व मतदानात रंगीबेरंगी ठरणार आहे.

यावल तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी चौथ्या दिवसी४०३ उमेदवारी अर्ज दाखल

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील ग्राम पंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीला वेग आले असुन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवसी४०३ उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे . यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीचा सार्वत्रीक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी यासाठी १ लाख४० हजाराहुन अधिक मतदार हे ४६९ नवनिंवाचित उमेदवारांना निवडुन देण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावतील याकरीता यावल येथील तहसील कार्यालयात आज सकाळ पासुनच आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या गर्दीमुळे यावल तहसीलची जुने कार्यालयापासुन नवीन प्रशासकीय इमारतीवरील मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते . दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चौथ्या दिवसी किनगाव ग्राम पंचायत साठी २३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज अट्रावल ग्रामपंचायती करिता२o अर्ज , हिंगोणे ग्रामपंचायतीसाठी २१ अर्ज , मोहराळे करीता २२ अर्ज , भालोद करीता २० उमेदवारी अर्ज , डोंगर कठोरा ग्रामपंचायतीसाठी २१ अर्ज , कोरपावली साठी १८ उमेदवारी अर्ज , महेलखेडी ग्रामपंचायतसाठी १५ अर्ज , सावखेडा सिम ग्रामपंचायत साठी १४ अर्ज आणी शिरसाड १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन , या ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन , दरम्यान बोरावल ग्राम पंचायतीसह भालशिव ग्राम पंचायत वढोदे प्र . यावल , वढोदे प्रगणे सावदा , आडगाव आणी चिंचोली या६ गावातुन एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत उद्या दिनांक ३० डिसेंबर हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दिवस असुन , दिनांक ३१ डिसेंबर रोजी छाननी व दिनांक ४ जानेवारी २०२१ ला उमेदवारांचे अर्ज माघार व चिन्ह वाटप होणार आहे .

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासह 9 जणाविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

(सूर्या मराठी न्यूज ब्यूरो)

यवतमाळ – यवतमाळ येथे आज विमा कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, विधानसभा प्रमुख संतोष ढवळे, महेश पवार यांच्यासह 9 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेमोसमी पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने अत्यल्प भरपाई दिली. लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांसह शिवसैनिकांनी स्टेट बॅंक चौकातील इफको टोकियो पीकविमा कंपनीवर मोर्चा काढला होता.

उर्वरित शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विम्याविषयी बातचीत करताना मॅनेजरने समाधानकारक उत्तर दिले नाही.
त्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या संतोष ढवळे यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले सोयाबीन कंपनीचे व्यवस्थापक सचिन सुरोशे यांच्या अंगावर फेकून त्यांना मारहाण केली. भावना गवळी यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.

त्याच प्रकरणावरून भावना गवळी यांच्यासह नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरकायद्याची मंडळी जमवणे, अंगावर जाणे, मारहाण करणे असे आरोप करण्यात आले आहेत. या मारहार मधे 9 जना विरुद्ध गुन्हा दाखल कण्यात आले आहे

कोविड लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे – जिल्हाधिकारी कोरोना लसीकरण तयारीसाठी जिल्हास्तरीय बैठक

0

 

सर्व खाजगी डॉक्टर, स्टाफ यांची नोंदणीक करावी
निवडणूकीच्या धर्तीवर

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

राहणार लसीकरण कार्यक्रम
बुलडाणा दि.29 : कोविड या साथरोगाच्या नियंत्रणासाठी लवकरच लसीकरण देशात सुरू होणार आहे. याबाबत राष्ट्रीय व राज्य पातळीवर नियमित तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राहणार आहे. तरी या लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाबाबत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद मुजील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद यांनी सादरीकरण केले. सादरीकरणावेळी ते म्हणाले, लसीकरण टप्पेनिहाय करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम हेल्थ वर्करमध्ये डॉक्टर, नर्सेस, सर्व खाजगी डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यामध्ये कोविड कालावधीत काम केलेले पोलीस अधिकारी – कर्मचारी, महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व लोक, त्यानंतर चौथ्या टप्प्यात 50 वर्षाच्या आतील दुर्धर आजार असलेले नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. मात्र लसीकरणासाठी को विन ॲपवर नोंदणी आवश्यक आहे. सर्व खाजगी डॉक्टर, नर्सेस त्यांचा स्टाफ, यंत्रणेतील हेल्थ वर्कर, पोलीस, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता यांची नोंदणी करावी. नोंदणीसाठी महसूल यंत्रणेने पुढाकार घ्यावा. आपआपल्या तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरची नोंदणी होईल, याची काळजी घ्यावी.
तसेच लसीकरण स्थळ हे तीन भागात असावे. यामध्ये पहिल्या भागात प्रतीक्षा खोली, दुसऱ्या भागात प्रत्यक्ष लसीकरण खोली, तर तिसऱ्या भागात निरीक्षण खोली असणार आहे. निरीक्षण खोलीमध्ये 30 मिनीटापर्यंत लसीकरण केलेल्या व्यकतीला ठेवण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर तारिख, स्थळ व वेळेचा एसएमएस पाठविण्यात येणार आहे. एसएमएस दाखविल्यानंतर लसीकरण बुथमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. याठिकाणी ओळखपत्र तपासण्यात आल्यानंतर लसीकरणासाठी एकावेळी एकाच व्यक्तीला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या डोससाठी एसएमस पाठविण्यात येणार आहे. लसीकरणानंतर एसएमएसमध्ये एक लिंक येणार असून त्यामधून प्रमाणपत्र जनरेट होणार आहे. प्रत्येक लसीकरण स्थळ लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर सॅनीटाईज करण्यात येणार आहे. लसीकरण स्थळ हे समाज मंदीर, शाळा, मंगल कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, एखादी खाजगी जागा असणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा. लस ही इंजेक्टीबल असून डिस्पोजेबल सिरींजची असणार आहे. ही सिरींज एकावेळी एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे. तसेच लसीकरण स्थळामध्ये कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सोशल डिस्टसिंगचे कडक पालन करण्यासाठी त्यापद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच लसीकरणानंतर वेस्ट मॅनेजमेंटचीही व्यवस्था असणार आहे. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधिक्षक, संबंधीत यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आता ऑफलाईन स्विकारणार उमेदवारी अर्ज.तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रातही सूट…

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

 

 

इंटरनेट चा स्पीड कमी, सर्व्हड डाऊन यासह इतर तांत्रिक अडचणींमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहत आहेत. असे उमेदवार वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज पारंपारिक पद्धतीने अर्थात ऑफलाईन स्वीकारणाचा निर्णय घेतला आहे. शिवाय उद्या, 29 डिसेंम्बर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळही वाढवून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करण्यात आली आहेत. प्राप्त माहितीनुसार इंटरनेटमुळे अनेकांच्या अर्जाचा घोळ होत होता. वरील निर्णयाच्या अनुषंगाने आता इच्छूकांना अर्ज करणे सोपे झाले आहे. नामनिर्देशनपत्रे आणि कोरे नमुने तत्काळ उपलब्ध करावे, असेही आदेश निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. सदर आदेशावर राज्याचे निवडणूक आयोग सचिव किरण कुरुंदकर यांची स्वाक्षरी आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्रातही सूट

_ऑनलाईन प्रणालीचा मंदावलेला वेग लक्षात घेता आता २९ डिसेंबर आणि ३० डिसेंबर २०२० या दोनही दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने जात पडताळणी प्रमाणपत्राचा अर्ज स्विकारण्याच्या सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितींना दिले आहेत. ज्या अर्जदारांचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिले आहेत, त्यांची माहिती विहीत नमुन्यात पाठविण्याचेही नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची किंवा जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑफलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे.

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ अटक ५ फरार साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त, lcb ची कारवाही

0

देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा केलेल्या कारवाईमध्ये तीन लाख ६३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये जुगाराचा डाव चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच देऊळगाव राजा पोलिसांना लागताच पोलिसांनी सापळा रचून सदर जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून बारा जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे कारवाई केली आहे या कारवाईमध्ये आरोपी विनोद गणेश मेहेत्रे राहणार सिंदखेड राजा कोंडीबा रामभाऊ भोजने राहणार सिंदखेड राजा गुलाम नबी शेख नजीर राहणार जालना सय्यद मोसिन सय्यद कट्टू राहणार सिंदखेड राजा दिलीप गणपत ढोबळे राहणार सावखेड भोई सय्यद युसूफ सय्यद उस्मान राहणार देऊळगाव राजा सिद्धांत आनंदराव खांडेभराड राहणार देउळगाव राजा यांच्यासह अधिक सात आरोपी वर कायदेशीर कारवाई केली असून यातील पाच जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदर कारवाईमध्ये नगदी एक लाख १७ हजार पाचशे रुपये ७ मोबाईल सहा मोटर सायकल असा एकूण ३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा lcb पथकाने हस्तगत केला. या कारवाही साठी बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चवरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बुलडाणा आणि खामगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गीते यांच्या आदेशाने पीएसआय शेळके, जिंदमवार, आढाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, गोरले, भुजबळ, भिसे यांनी केली आहे. याबाबत अधिक तपास देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संभाजी पाटील व श्रीकृष्ण गवई करीत आहेत.

यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या उमेदवारी दाखलच्या तिसऱ्या दिवसी७४ अर्ज दाखल

0

 

 

यावल तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुक रणधुमाळीला वेग आला असुन आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसी एकुण ७४ ईच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी दाखल केले आहे . दरम्यान मागील तिन दिवसाच्या शासकीय सुटीच्या विश्रांतीनंतर दिनांक २८ डिसेंबर पासून पुनश्च ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशिब आजमावणाऱ्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसी ईच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयावर एकच गर्दी केली होती . यावल तालुक्यात एकूण ४७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुक दिनांक १५ जानेवारीस पार पडणार असुन , उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दिनांक ३० डिसेंबरपर्यंत असुन ४ जानेवारी २०२१ रोजी उमेदवाराच्या अर्जांची छाणणी व त्याच दिवसी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे . आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकुण ७४जणांचे अर्ज प्राप्त झाले असुन , यात सर्वाधीक उमेदवारी अर्ज १ १हे वड्री ग्रामपंचायत व१० अर्ज कोरपावली ग्रामपंचायती करीता दाखल झाले असून , बामणोद व बामणोदसाठी प्रत्येकी ९ उमेदवारी अर्ज , मोहराळे गृप , पिंपरूड , ग्रामपंचायती करीता ६ अर्ज , हिंगोणे , सांगवी बु॥ , प्रत्येकी ५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे . यात अंजाळे गृप , महेलखेडी , अट्रावल , मारूळ गृप , डोंगर कठोरा ,विरोदे , विरावली , डोणगाव या ग्रामपंचायतीकरिता प्रत्येकी १ उमेदवाराने आपले अर्ज दाखल केले आहे .कोळवद , पिपंरूड प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल असुन , किनगाव बु॥साठी ३ आणी नायगावकरीता ४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे .

जळगाव जामोद तालुक्यातील शासकीय तूर नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन होणार – प्रसेनजीत पाटिल

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील नाफेड मार्फत होणाऱ्या शासकीय खरेदी साठी नाव नोंदणी प्रक्रिया दिनांक २८/१२/२०२० पासून सुरु होणार होती. नोंदणी करिता शेतकर्यांनी रात्रीपासून रांगा लावल्या परंतु सकाळी हजारो लोक नोंदणीसाठी आले आणि झुंबड़ उडाली.मका खरेदी साठी १७०० शेतकर्यांनी नोंदणी केली असतांना जागेअभावी अद्याप फक्त ३०० शेतकर्यांचा मका खरेदी केल्या गेला त्यामुळे तूर खरेदी वेळी सुद्धा हेच होईल या भितीमुळे लवकर नंबर लागावा या उद्देशाने शेतकर्यांन्नी पहिल्याच दिवशी तूफान गर्दी केली होती. त्यातही एका व्यक्तिकडे एका पेक्षा जास्त सातबारे असल्यामुळे व काही नेतेमंडळी व व्यापारी यांनी वशील्याने आपले नंबर लावून घेतलेव जवळपास एकाच दिवशी 2600ते 2700 नोंदणी झाल्याचे आढळून आले जळगाव जामोद खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने प्रसेनजीत पाटिल यांच्याशी चर्चा करून झालेली नोंदणी प्रक्रिया रद्द करून नव्याने ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसाठी नवीन ऍप निर्माण करण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.

एल्गार संघटनेच्या चळवळीला यश आणेवारी 37 पैसे काढली

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:-

यावर्षी सर्व पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले १०% पिक सुद्धा हाती लागले नाही. या सर्व परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुक़सानीचे अध्यापही कुठलाच मोबदला मिळाला नाही सोबतच नजरअंदाज व सुधारित आनेवारी ५० पैश्यांच्या वर काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळुन शेतकऱ्यांना पिकवीम्या पासून वंचित ठेवन्याचा प्रयत्न केला जात आहे.. या संदर्भात दोन वेळा मोर्चा व निवेदनाच्या स्वरुपात प्रशासनाला जाब विचारण्याच काम मा.प्रसेनजीतदादा पाटिल यांच्या नेतृत्वात व हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केल्या गेल. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने अंतिम आनेवारीत जळगाव जामोद तालुका ५० पैश्यांच्या आत बसवन्याच आश्वासन देण्यात आलेले आहे.. तरी या निगरघट्ट प्रशासनाला त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी एल्गार संघटनेच्या वतीने मा.प्रसेनजीतदादा पाटिल यांच्या नेतृत्वात दिनांक २८/१२/२०२० पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याची हाक एल्गार संघटनेने दिली होती . त्याला प्रतिसाद देत हजारो शेतकर्यांनी साखळी उपोषणात सहभागी होत आनेवारी ५० पैश्यांच्या आत यावी ही मागणी प्रशासनाकडे रेटून धरली.प्रसेनजीत पाटिल यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत जो पर्यंत चालू आर्थिक हंगामाची आनेवारी ५० पैष्याच्या आत आल्याचे घोषित होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली. शेवटी प्रशासनाने मागणी मान्य करत जळगाव जामोद तालुक्याची आनेवारी ३७ पैशे काढल्याचे पत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांना दिले. यावेळी विजय पोहनकार,प्रशांत डिक्कर,बंडू पाटिल वाघ, बाळु पाटिल डिवरे,अजहर देशमुख,विजय तायड़े, ईमरान खान, गणेश मानखैर, सुरेश पाचपोर, राजू पाटिल,आशिष वायझोड़े, संतोष भारसाकळे,अरुण दाभाड़े, समिर आर्यन, निजाम राज, सिद्धार्थ हेलोडे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. हा शेतकरी एकजुटीचा विजय असल्याच्या भावना यावेळी प्रसेनजीत पाटिल यांनी व्यक्त केल्या.