Home Blog Page 557

संग्रामपुर मित्र परिवाराची सामाजीक बांधीलकीमुळे ३० रुग्णांना मिळाली दुष्टी , २११ नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप ; स्तृत्य उपक्रम

0

 

संग्रामपुर : येथील संग्रामपुर मित्र परिवार सामाजिक कार्यात अग्रेसर असुन शेवटच्या घटकाचा आधारवड असलेले संंग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ पुरोहित यांच्या संकल्पनेतुन संग्रामपुरात नुकतेच नेत्र गरजु रुग्णांसाठी नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया , चष्मे वाटप शिबीर संपन्न झाले. सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मोहनराव नारायणराव नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ वैधकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली यात मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठी १०० रुग्ण पात्र ठरले त्यात पहिल्या टप्प्यात १०० पैकी ३० गरजु नेत्र मोतिबिंदु रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया मोहनराव नारायणराव नेत्र रुग्णालयात करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ७० नेत्र रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे संग्रामपुर मित्र परिवाराच्या सामाजीक बांधीलकीमुळे १०० व्यक्तीना दुष्टी मिळणार असल्याने संबंधीत नेत्र रुग्णांनी व नातेवाईकांकडून आभार मानले जात आहे. संग्रामपुर मित्र परिवाराच्या वतीने स्वखर्चाने रुग्णांचा शस्त्रक्रिया खर्च,वाहनाची जेवणाची ऊत्तम व्यवस्था करण्यात आली होती तसेच या शिबीरात शस्त्रक्रियाची आवश्यकता नसल्याने चष्मे हवे असलेल्या नेत्र रुग्णांना २११ मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सामाजीक कार्यात अग्रेसर असलेला स्तृत्य उपक्रमाची संग्रामपुर मित्र परिवाराचे नेत्र रुग्ण व नातेवाईकांनी आभार मानले व कौतुकही केले.आणि सर्वकडे संग्रामपूर मित्र परिवाराच्या उपक्रमाची वाह वाह होत आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संग्रामपूर मित्र परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक संस्कृती लक्षात घेऊन दहिसरचा विकास हेच ध्येय,चारशे वर्षे पुरातन विहिर झाली पुनर्जीवित !!

0

 

सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक संस्कृती लक्षात घेऊन दहिसरचा विकास हेच आपले ध्येय असल्याची माहिती शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. दहिसर पश्चिमेकडील आय.सी. कॉलनी येथे चारशे वर्षांपूर्वीची दगडी बांधणीची आखीव-रेखीव पुरातन विहीर पूर्णतः बुझून गेली होती. तिच्यावर फुटपाथ बनविण्यात आले होते.या पुरातन विहिरीचा लोकार्पण सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलतांना घोसाळकर यांनी आज आपणांस गावाची आठवण आल्याचे सांगत या उपक्रमाबद्दल शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचे कौतुक केले. यावेळी ईस्ट इंडियन समाजाच्या नागरिकांनी वाजत-गाजत पारंपारिक पद्धतीने या विहिरीची पूजा केली. स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी या विहिरीचे पुनरुज्जीवन केले आहे. आय. सी.चर्चचे रेव्ह फादर हॅरी वाझ यांच्या हस्ते या विहिरीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना फादर वाझ यांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असतांना आपल्या प्रभागातील हा प्रयोग आदर्श ठरणार असल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले. तर ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा करण्यात आल्याने त्यांनी सर्व नागरिक व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. चारशे वर्षांपूर्वी इस्ट इंडियन नागरिक विवाह सोहळ्यासाठी उंबराचं पाणी या विधीसाठी तिचा वापर करीत असत.या सोहळ्यात विहीरीची पूजा करून तेथे पापड भाजून त्याचा प्रसाद सर्वांना वाटत असत व विहीरीचे पाणी घरी नेऊन आंघोळ करीत असत. कालांतराने मुंबापुरीत नळ आल्यावर विहिरींचे महत्व कमी होत गेले अशी माहिती या उपक्रमाचे शिल्पकार, मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. ही पुरातन विहीर दुर्लक्षित होऊन बुझली. तिच्यावर पालिकेचे गटारही आल्याने त्याचे पाणी विहिरीत गडप होऊ लागले होते. दरम्यान गटाराचे पाणी जाते कोठे याचा शोध घेतला असता ही पुरातन बारा फूट लांब रुंद विहीर आढळून आली. तिच्या दगडी भिंती, पायऱ्या या सर्व जुन्या गोष्टी सुस्थितीत असल्याचे आढळले. त्यामुळे या विहिरीच्या पुनरुज्जीवनाचा आगळावेगळा प्रयोग करायचे ठरवले, असेही अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले. त्यासाठी तिच्यावरील गटार वळवण्यात आले. नागरीकरणाच्या रेट्यात शेजारच्या जमिनीची उंची वाढल्याने ही विहीर दोन फूट खाली गेली होती.त् यामुळे तिला दगडी लुकचा व्यवस्थित कठडा तसेच सुरक्षेसाठी शीट-जाळी लावण्यात आली आहे. या कामास विंसी परेरा यांनी पाठपुरावा केल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. आता याठिकाणी खराखुरा रहाट बांधण्यात आला असून प्रकाशझोत सोडण्यात आले आहेत.

नागरिकांमध्ये पाण्याचे महत्त्व लक्षात घेता जनजागृती व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला याची माहिती घोसाळकर यांनी दिली. या परिसराचे सौंदर्यीकरण व्हावे यासाठी तेथे भित्तीचित्र तसेच पाषणशिल्पेही उभारण्यात आली आहेत. पुरातन इस्ट इंडियन रहिवासी उंबराचं पाणी घेऊन विवाहविधी करीत असल्याचे शिल्प येथे लावण्यात आले आहे. आता विहीर पुन्हा सज्ज झाल्याचे पाहून येथे पुन्हा विवाहसोहळ्यातील उंबरा -विधीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. याप्रसंगी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, नगरसेविका माधुरी भोईर, अलबर्ट डिसूज़ा मैनेजिंग डायरेक्टर सेट. जॉर्ज कॉलेज, इग्नेशियस डिसूजा प्रेसिडेंट ईस्ट इंडियन असोसिएशन, लुइस रोड्रिक्स सेक्रेटरी ईस्ट इंडिया असोसिएशन स्थानिक नागररिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी स्टार व क्रॅब स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

राज्य मराठी पत्रकार परिषद ची विदर्भ स्तरीय बैठक संपन्न

0

 

आज दी. 27/12/2020 रविवारी रोजी अमरावती येथील सिटी न्यूज चैनल च्या मुख्य कार्यालय येथे विदर्भ स्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम इत्यादी जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेले पदाधिकारी यांची पूर्णतह उपस्थिती होती
या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष सिटी न्यूज चैनल चे प्रबंध संपादक व मालक डॉ. चंदूभाऊ सजोतीया , प्रमुख अतिथी मधुसूदन कुलथे (केंद्रीय अध्यक्ष ), पवन बैस, नीतेश किल्लेदार, मधुभाऊ कान्हेरकर,राजू भास्करे, सय्यद शकील, हर्षल काळे, दिलीपसिंग ठाकूर , अशोक राठी, राजलता ताई बागडी, चंद्रकांत पवार, तिवारीजी, राहुल बुंदीले,व समस्त पदाधिकारी(राज्य मराठी पत्रकार परिषद) उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान upsc बोर्ड च्या डायरेक्टर रोडे म्याडम यांचा सत्कार तसेच डॉ. चांदुभाऊ सजोतीया , दैनिक मंगल प्रहर ची संपूर्ण टीम या सर्वांचा सन्मान राज्य मराठी पत्रकार परिषद तर्फे करण्यात आला व अमरावती जिल्हाध्यक्ष पदावर नीतेश किल्लेदार यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली तसेच संघाच्या पुढील कार्यक्रमा संबधित व संघटना वाढीकरिता , विविध उपक्रम राबविण्यासंबंधित चर्चा करण्यात आली व नंतर सर्वांसोबत स्नेहभोजन करून बैठक पूर्ण पार पडली।

गीता जयंती निमित्त श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय ग्रंथ व पुस्तक प्रदर्शनी संपन्न….

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरातील स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयांमध्ये दिनांक २५ डिसेंबर रोजी श्रीमद्भगवद्गीता जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तकांचे प्रदर्शन संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.रा. देशमुख यांनी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करून प्रदर्शनीचे उद्घाटन केले. श्रीमद्भगवद्गीतेशी संबंधित अन्य भाषेतील पुस्तके सुद्धा या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. विविध महानुभावांनी श्रीमद् भगवत गिते विषयी लिहिलेल्या विविध पुस्तकांचा सुद्धा या प्रदर्शनात समावेश होता. आप पेटीच्या आकाराची भगवद्गीता सुद्धा ह्या प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आली होती. श्रीमद्भागवत गीतेवर ह्यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम देशमुख, प्रा. चव्हाण, ग्रंथपाल संतोष कतोरे, ग्रंथालय विभागातील डाबेराव, समाधान यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांची या प्रदर्शनी मध्ये आपला सहभाग नोंदविला. ह्या ग्रंथप्रदर्शनाच्या आयोजनासाठी ग्रंथपाल संतोष कतोरे आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

या गावात सरपंच पदासाठी तब्बल 42 लाखांची बोली.

0

 

(सूर्या मराठी न्यूज़ ब्यूरो)

साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या खोंडामोळी ग्रामपंचायतीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विकासाच्या नावाखाली गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी ज्या पक्षाकडून जास्त निधी दिला जाईल त्यांना ग्रामपंचायत बिनविरोध करून सरपंच पद देण्यात येईल यासाठी गावातील शिवाजी चौकात झालेल्या सभेत सर्वच पक्षांकडून सरपंच पदासाठी बोली लावण्यात आल्याची चर्चा आहे. 25 लाखांपासून तर 42 लाखांपर्यंत झालेल्या या बोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप वना पाटील यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीसाठी होणारा खर्च टाळून गावाचा विकास व्हावा यासाठी झालेला प्रयत्न योग्य आहे, परंतु सरपंच पदासाठी झालेला लिलाव लोकशाहीसाठी घातक असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे यांनी व्यक्त केली आहे. तर एकी कडे . तर खोंडामळी ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्यासाठी भाजप पक्षाने समर्थन दिले आहे. गावाच्या विकासासाठी आणि हिंदू धर्माच्या मंदिर उभारणीसाठी भाजपच समर्थ असल्याची प्रतिक्रिया जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे.
खोंडामळी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 72 वर्षात बिनविरोध निवडणूक झालेली नाही. गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी भाविकांनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु निधीअभावी मंदिराची स्थापना झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मंदिर उभारणीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी चक्क सरपंच पदाचा लिलाव केला आहे. यासाठी गावातील वाघेश्वरी माता श्रद्धाळूनीं मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. खोंडामळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाचा पैशांच्या जोरावर झालेला लिलाव लोकशाहीसाठी घातक असून अशा प्रकारचा निर्णय संविधानाच्या विरोधात आहे. गावातील सर्व नागरिकांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाचा झालेला लिलाव आम्हाला मान्य नाही. गेल्या अनेक वर्षापासून समाजमंदिर, पाण्याची टाकी, रस्ते या सुविधांपासून आम्ही वंचित आहोत, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे अनुसूचित जमातीतील आंबेडकरवादी संघटनांनी निर्णय घेतला आहे.खोंडामळी ग्रामपंचायत मध्ये गावाचा विकास व वाघेश्वरी माता उभारणीसाठी सरपंच पदाचा केलेला लिलाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे अनुसूचित जमातीतील नागरिकांना हा निर्णय मान्य नसून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे खोंडामळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होते की नाही हे तर येणारी वेळच सांगू शकेल परंतु सध्यातरी सरपंचपदासाठी 42 लाखाची लागलेली बोली चर्चेचा विषय ठरत आहे.

 

आज के दिन 28 दिसंबर14 पौष समय – छोटे साहिबज़ादे और माता गुजर कौर जी का अंतिम संस्कार

0

 

सरहिंद के नवाब वजीर खान ने गुरु गोबिंद सिंह जी के साहिबजादों और उनकी माता गुजरी जी को ठंडे बुर्ज में तीन दिन और दो रातों तक जमीन पर रखा था। उस समय यह बुर्ज सबसे ठंडा हुआ करता था, जिसमें रहना काफी मुश्किल था। वजीर खान ने साहिबजादों पर इस्लाम कबूल करने के लिए कई बार दबाव बनाया, लेकिन दोनों साहिबजादों ने इस्लाम कबूल करने से मना कर दिया। इस पर वजीर खान ने दोनों को दीवार में चिनवा कर शहीद कर दिया। शहीदी प्राप्त करने के बाद साहिबजादों के अंतिम संस्कार के लिए दीवान टोडर मल ने जितनी जमीन चाहिए थी, उतनी जमीन पर सोने की मोहरें बिछाकर उसे खरीदा था। इसी जमीन पर साहिबजादों का अंतिम संस्कार किया गया। इस जगह गुरुद्वारा श्री ज्योति स्वरूप बनाया गया है।

वंचित बहुजन आघाडी चा,वतीने, नांदुरा, यथिल,माळी समाज मंगलभवन,येथे,कलावंताचा सतकार,समारंभ

0

 

सुनिल पवार नांदुरा

वंचित बहुजन आघाडी,महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती वतीने नांदुरा जी.बुलडाणा येथे आयोजित मनुस्मृती दहन दिन व कलावंत मेळावा प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, याप्रसंगी मंचावर उपस्थित महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग,चित्रपट निर्माते सुरेश गवई,गायक महेंद्र सावंग,जनार्दन सरदार,कलावंत समिती जिल्हाध्यक्ष गजानन मिसाळ,वं.आ.युवा तालुकाध्यक्ष धर्मेश तायडे,जेष्ट नेत्या सुमनताई थाटे, जिल्हा नेत्या ऍड.रागिणी तायडे,जिल्हा सदस्या अनिता गवई,कवी गायक भगवान शिरसाठ,हभप मधुकर साबे,रामरावजी देशमुख,मासुम शाह,रामचंद्र डोंगरदिवे,लहू ठाकरे,नितीन जाधव

विवाहितेचा विनयभंग तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

0

 

साखरखेर्डा (प्रतिनिधी )

सिंदखेड राजा तालुक्यातील जागदरी येथे 23 डिसेंबर च्या सकाळी एका पंचेचाळीस विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली ‘गावाबाहेर एक 45 वर्ष विवाहिता शौचालयास गेली होती त्या महिलेच्या पाठीमागे गावातीलच गजानन अर्जुनराव डोईफोडे वय 48 या इसमाने तिच्या पाठीमागून जाऊन तिचे तोंड दाबून तू मला खूप आवडते असे म्हणत वाईट उद्देशाने जबरदस्ती करून विनयभंग केला ।या आशयाची माहिती विवाहितेने आपल्या पती व मुलांना घरी सांगितली ।यावरून तिचा पती व दोन मुले गजानन डोईफोडे ला समजावून सांगण्याकरता गेले असता गेले असता गजानन डोईफोडे व त्यांच्या दोन साथीदारांनी यांनी महिलेला तिच्या पतीला व तिच्या दोन मुलांना अश्लील पद्धतीने शिवीगाळ केली ‘व जीवे मारण्याची धमकी दिली याया प्रकरणी महिलेने साखरखेरडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली या महिलेच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी गजानन डोईफोडे रामभाऊ अर्जुनराव डोईफोडे ‘राजू अर्जुनराव डोईफोडे राहणार जागदरी या तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे करीत आहे !

जात पडताळणीसाठी उमेदवाराची कागदपत्र जमा करण्यासाठी धावपळ ! महिलांच्या कागदासाठी अनेक जावई सासरवाडीत तळ ठोकून!

0

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे यामध्ये अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा सुद्धा समावेश आहेसाखरखेर्डा येथे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप हे प्रमुख पक्ष आपापले उमेदवार मैदानात उतरणार असून यावर्षी साखरखेर्डा येथे नवीन सरपंच कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे !अनेक दिग्गज उमेदवार या वेळी मैदानात उतरल्यामुळे साखरखेर्डा येथील ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची व अतीतटीच्या होण्याची शक्यता आहे सर्व उमेदवार आपापल्या कामाला लागले असून कडक थंडीमध्ये उमेदवार घरोघरी प्रचार करत आहेत कडक थंडीमध्ये साखरखेर्डा येथील वातावरण गरम झाले असून राखीव प्रवर्गातील जागेसाठी जात पडताळणी करण्याकरता लागणाऱ्या कागदपत्रांसाठी प्रमुख उमेदवाराची सध्या धावपळ बघायला मिळत आहे ‘महिला उमेदवार असतील तर माहेर कडील लागणाऱ्या कागदपत्र आणण्यासाठी अनेक जावई सासुरवाडी तळ ठोकून बसले आहे !तर निवडणूक आयोगाने लावलेल्या जाचक अटीमुळे अनेक उमेदवारांची कागदपत्र काढण्यासाठी दमछाक होत आहे !सध्या जसजशी निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे तस तसे उमेदवार कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करताना सध्यातरी दिसत आहेत !

श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय मेरा बुद्रुक येथे स्व. डॉ . पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

आज दिनांक 27 डिसेंबर रोजी श्री शिवाजी हायस्कूल व क.म.विध्यालय मेरा बु.येथे मोठ्या उत्साहात शिक्षण महर्षी,स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री स्व.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जंयती उत्सव सोहळा कोरोना विषाणू संदर्भात सर्व नियमाचे पालन करीत साजरा करण्यात आला,मुख्याध्यापक आर.एस.सुसर सर,पर्यवेक्षक एस.बी.सोळंकी सर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन करण्यात आले, शिक्षण महर्षी स्व.भाऊसाहेबांच्या महान कार्यावर पी.डी.खरात सर,पी.के.पडघान सर यांनी प्रकाश टाकला*