Home Blog Page 564

पेनटाकळी चा कालवा फुटला.. शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान.. हजारो लिटर पाणी वाया….

0

 

 

मनीष जाधव मेहकर बुलढाणा

 

प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे पेन टाकळी प्रकल्पाच्या कालव्याला मोठे भगदाड पडून त्यातुन विसर्ग झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. तत्काळ कालव्याची दुरुस्ती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
मदतीची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाची ओळख आहे…

कचरा संकलन कंपन्यांवर आर्थिक दंड करा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे सक्त निर्देश

0

 

(सूर्य्या् मराठी न्युज ब्युरो)

 

नागपूर, ता. १६ : शहरातील नागरिकांच्या कच-याच्या समस्या सुटावी संपूर्ण शहरातील कच-याबाबतचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी मनपाद्वारे बीव्हीकजी आणि एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सुरूवातीच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून उत्तम कार्य झाले. मात्र सद्या दोन्ही कंपन्यांच्या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. शिवाय कंपन्यांकडून निविदेमध्ये नमूद बाबींची पूर्तताही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक घरातील, व्यावसायीक प्रतिष्ठानांमधील कचरा योग्यरित्या संकलित न करण्याच्या तक्रारींवर दोन्ही कंपन्यांवर मोठा आर्थिक दंड (हेवी पेनॉल्टी) लावण्याची सक्त ताकीद आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.
विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१६) आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, समितीच्या सदस्या आशा उईके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते. याशिवाय समितीच्या सदस्या लीला हाथीबेड, सरीता कावरे, उज्ज्वला लांजेवार, विशाखा बांते यांनी व्हिडिओ कॉन्फर्निंगच्या माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदविला.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नागपूर महानगरपालिका सुरूवातीला ५८व्या क्रमांकावर होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात झालेल्या कार्यामुळे मनपाने १८वे स्थान प्राप्त केले. या यशाबद्दल वीरेंद्र कुकरेजा यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले व यावेळी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये १०व्या क्रमांकाच्या वरचेच स्थान प्राप्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली. समितीच्या सदस्या आशा उईके यांनी ‘बेटी बचाव’ अभियानाद्वारे कॅन्सरची लस देण्यात येते. मात्र त्या लसीसाठी नागरिकांना सुमारे ३५०० रूपये खर्च करावा लागतो. ही लस मनपाद्वारे मोफत देण्याची मागणी केली. आशा उईके यांच्या प्रस्तावावर आरोग्य विभागाद्वारे चर्चा करून त्याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देश वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
बैठकीत प्रारंभी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. कोव्हिडचे रुग्ण वाढलेले असताना मनपाद्वारे ६६ खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. यापैकी काही रुग्णालय रुग्णांकडून जादा पैसे घेत असल्याची तक्रार प्राप्त होताच मनपा आयुक्तांच्या आदेशाने प्रत्येक रुग्णालयामध्ये ऑडिटर नियुक्ती करण्यात आले. या ऑडिटरकडून रुग्णालयाचे बिल तपासल्यानंतरच रुग्णांना भरावे लागते, अशी माहिती डॉ.प्रवीण गंटावार यांनी यावेळी दिली. मनपाद्वारे नियुक्त सर्व ऑडिटरची माहिती आणि त्यांच्याकडून ऑडिट झालेल्या बिलांचा अहवाल पुढील बैठकीत समितीपुढे सादर करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
कोव्हिडच्या संकट काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून अनेक डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य कर्मचा-यांनी अहोरात्र सेवा दिली. प्रामाणिकपणे दिवस-रात्र अनेकांनी नि:स्वार्थ भावनेने काम केले. मात्र याच काळात काहींनी संधी म्हणून फायदा घेत रुग्णांकडून मनमानीपणे बिल वसूल करण्याचे काम केले. संकटाच्या प्रसंगी सेवाकार्य न बजावता पैशाला प्राधान्य देणा-या अशा खाजगी रुग्णालयांवर सक्त कारवाई करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
नागपूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे. सध्या शहरात २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ही संख्या वाढून ५० होणे गरजेचे आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या रहिवासी परिसरात उपलब्ध व्हावी यासाठी शहरातील प्रत्येक भागात मनपाचे आरोग्य केंद्र व्हावे यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापतींनी दिले.

कोरोना लस संदर्भात दिशानिर्देशानुसार कार्यवाही करा
कोरोनाची लस उपलब्ध झाली असून नागपूर शहरामध्येही लवकरच ती तीन टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी शहरातील सर्व खाजगी, शासकीय रुग्णालयांकडून कर्मचा-यांची माहिती मागवून त्याचा डेटाबेस तयार करण्यात येत आहे. नागपूर शहरामध्ये ६४० खाजगी रुग्णालये, ५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मनपाचे ६२ रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्वांकडून माहिती मागविण्यात येत असून आतापर्यंत ११ हजार ५६० कर्मचा-यांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आली आहे व उर्वरित माहितीही मागविण्यात येत असल्याची माहिती यावेळी आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरोना लसी संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडून दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करून तिन्ही टप्प्यामध्ये नागरिकांना लस योग्यरित्या उपलब्ध व्हावी, याबाबत तातडीने कार्यवाही करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

बोरगाव मंजू येथे दुचाकी व ट्रकच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार,

0

 

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

अकोला दि. 16 डिसेंबर :- बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महामार्ग क्रमांक 6 वरील बोरगाव मंजू येथील उज्वल स्कूल व आराम मशीन नजीक आज दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका घटनेमध्ये एक अनोळखी दुचाकीस्वार अकोल्याकडे येत असताना अमरावती कडे खत भरून घेऊन जाणाऱ्या ट्रक समोर आल्याने जागीच ठार झाल्याचे वृत्त असून याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरगाव मंजू येथे घडलेल्या दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातामध्ये एक अनोळखी इसम दुचाकी क्रमांक MH 19 DC 6533 ने अकोल्याकडे येत असताना समोरून येणाऱ्या व अमरावतीकडे खताचे पोते भरून घेऊन जात असलेल्या ट्रक क्रमांक MH 40 BL 5263 हा मार्गस्थ असताना दुचाकीस्वार त्या ट्रकसमोर येवून त्याची दुचाकी ट्रक खाली आल्याने या अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके,यांनी पो.कॉ. शरद बुंदे,हे.कॉ.कानडे,हे.कॉ.संजय इंगळे च यांच्यासह घटनास्थळ गाठीत तात्काळ पंचनामा करण्यात येऊन अनोळखी इसमाच्या मृत्यूदेहास अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे शवचिकित्से करिता पाठविण्यात आले असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

सरपंच पदाच्या आजच्या सुधारित आदेशाने संभ्रम दूर

0

 

बुलडाणा, १६ डिसेंबर जिल्ह्यामध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे, त्यांच्या सोडत रद्द करण्यात आल्याचा सुधारीत आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला आहे. संपूर्ण राज्यात नव्याने सरपंच आणि उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर तथापि ३० दिवसांच्या आत राबविण्यात यावी, असा आदेश आज, १६ डिसेंबर रोजी ग्राम विकास विभागाने जारी केला आहे. या आदेशामुळे मोठा संभ्रम दूर झाला असून आता राज्यभरातील सर्वच ठिकाणी सरपंचपदाची आरक्षण सोडत नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी विवेक शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी आज हा आदेश संपूर्ण राज्यभर निर्गमीत करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला नागपूर मेट्रोतून प्रवास

0

 

चंद्रपूर, ता. १६ :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननंतर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. प्रत्येक फेरीनंतर होणाऱ्या निर्जंतुकीकरणासोबतच सर्व नियमांचे पालन होत असलेल्या नागपूर मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून विदर्भातून नागपुरात येणाऱ्या नागरिकांनीही मेट्रो प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

नागपूर मेट्रोने अधिकाधिक लोकांनी प्रवास करावा यासाठी महामेट्रोतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नागपुरातील आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांनी नुकतीच मेट्रोची सफर केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एनएमआरडीएच्या आयुक्त शीतल उगले-तेली, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सारंग आव्हाड यांनी मेट्रोच्या सुरक्षित प्रवासाचा आनंद लुटला. मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपुरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मेट्रोने प्रवास करावा, असे आवाहन या अधिकाऱ्यांनी केले.

राजकीय नेत्यांचीही मेट्रो सफर
नागपुरात येणाऱ्या आणि नागपुरातील राजकीय नेत्यांनीही मेट्रोची सफर केली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार मोहन मते, माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी सुरक्षित मेट्रोची सफर करण्याचे आवाहन प्रवाशांना केले.

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्याचे सुपुत्र प्रदीप मांदळे जवान शहीद.

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सुपुत्र प्रदीप मांदळे दि . १४डिसेंबर रोजी जम्मू काश्मीर खोऱ्यातील द्रास टायगर हिल येथे शहिद झालेअंगावरती बर्फाचा मोठा गोळा पडल्यामुळे ते ड्युटीवर असताना शहीद झाले ! बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र वीर जवान शहीद प्रदीप साहेबराव मांदळे पळसखेड चक्का या गावातील गरीब कुटुंबामधील हा तरुण व्यक्ती दोन हजार आठ ते नऊ यास साली फौजी सैन्यदलामध्ये औरंगाबाद या ठिकाणी भरती झाला होता.

शहीद झाल्याचे ठिकाण द्रास टायगर हिल जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत ड्युटीवर होता त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती पत्नीच नाव कांचन प्रदीप मांदळे, प्रदीप च लग्न २०१४ साली झालेलं होतं.
तीन मुलं असून त्यांचे समोर नाव. सुरज ,सार्थक ,जयदीप असे मुलांचे नाव असून आईचे नाव श्रीमती. शिवनंदा साहेबराव मांदळे .भावांचे नाव संदीप साहेबराव मांदळे कृषी सहाय्यक विशाल साहेबराव मान्दळे फौजी सैन्यदलामध्ये सध्या कार्यरत आहे.

बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र प्रदीप मांदळे जवान शहीद.
पश्चिम बंगाल या मधील पन्हागड या ठिकाणी कार्यरत आहे २००८ च्या अगोदर ची परिस्थिती फार गरीब कुटुंबातील ही व्यक्ती असून आई वडील मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण करून तिन्ही मुलं चांगल्या

ठिकाणी नोकरी लावणारे शेवटी स्वर्गीय साहेबराव मांदळे यांना सर्व कुटुंबाला सोडून जावे लागले काही आजारामुळे त्यांची मृत्यु दिनांक २०१७ साली झालेला आहे त्यामुळे मोठा मुलगा म्हणून प्रदीप यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी होती.
त्यामुळे घरात घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे मांदळे परिवार खूप दुःखाचा डोंगर सावट याठिकाणी आहे आणि पळसखेड चक्का या गावांमध्ये अशी घटना पहिल्यांदा घडल्यामुळे या गावांमध्ये खूप दुःख होत आहे.
संदीप साहेबराव मांदळे यांना रात्री नऊच्या दरम्यान मध्ये माहिती मिळाली सैन्य दला कडून फोनवरून माहिती मिळाली तुझा भाऊ शहीद झालेला असल्याची माहिती फोनवर देण्यात आली.

त्यांचा पार्थिव अंत्यविधीसाठी दिनांक १८तारखेला येईल अशी प्राथमिक माहिती आहे !

BIG BREKING 1 कोटीच्या विमा साठी बायकोने नवऱ्याला संपवले

0

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

ही घटना धक्कादायक आहे आता पर्यंत आपण आयकलेच असेल की नवरा बायको ही जोडी सात जन्माचे एकामेकाच्या दुःख सुखात साथ देणारे आहे पण या ठिकाणी जे घटना घडली ते विचार करणारीच आहे बायको न पैसा साठी केला चक्क मर्डर
एखाद्या गुन्ह्याबद्दलची किरकोळ शंकासुद्धा गुन्हा उघडकीस आणण्यास मदतीची ठरू शकते. असाच काहीसा प्रकार निलंगा येथे घडला आहे. नवऱ्याची १ कोटीची विमा पॉलिसी होती, ही विम्याची रक्कम मिळवण्यासाठी बायकोनेच नवऱ्याचा काटा काढल्याचा प्रकार तब्बल ८ वर्षांनी निलंगा येथे उघडकीस येऊ शकला आहे.या गुन्ह्याच्या तपासात विमा कंपनीला आलेला संशय आणि त्यानंतर पोलिसांनी शिताफीने केलेला तपास या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.

निलंगा तालुक्यातील निटूर या गावातील रहिवाशी आण्णाराव बनसोडे यांचा अपघाती मृत्यू २०१२ला झाला होता.

तशी पोलिसांत नोंदही होती. आण्णाराव यांनी १ कोटी रुपयांचा अपघाती विमा २०१०मध्ये उतरवला होता. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची बायको आणि कायदेशीर वारसदार ज्योती यांनी विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला होता.

या क्लेममधील काही माहिती विपर्यस्त होती, शिवाय व्यवसायाने फर्निचर बनवणारे आण्णाराव १ कोटीचा अपघात विमा का उतरवतील अशी शंका विमा कंपनीला आली. त्यांनी या प्रकाराची चौकशी औसा इथल्या पोलिस स्टेशनमध्ये केली आणि कंपनीला आलेली शंका पोलिस निरीक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली. पोलिसांनाही यात तथ्य वाटल्याने त्यांनीही बंद झालेली फाईल उघडून चौकशीला सुरुवात केली.

अन् काळेबेरे असल्याचा आला संशय…

दरम्यान, आण्णाराव यांच्या कुटुंबियांनाही या प्रकारात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आला होता. त्यांनीही या प्रकरणात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी ज्योती हिला चौकशीला बोलावून घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण १ कोटी इतक्या रकमेची पॉलिसी कशी उतरवली, याचं उत्तर काही तिला देता येत नव्हतं. अखेर तिने पॉलिसीची रक्कम मिळवण्यासाठी नवऱ्याचा खून केल्याचे कबुल केले. ही पॉलिसी तिचा आतेभाऊ रमेश विवेकी हा विमा एजंट असून त्याने ही विमा पॉलिसी उतरल्याचं तिने सांगितलं.

गळा दाबून खून, मृतदेह महामार्गावर नेऊन टाकला

विमा पॉलिसी उतरवतानाचा विम्याची रक्कम हडपण्यासाठी आण्णाराव याचा खून करण्याचा कट ज्योती आणि रमेश यांनी रचला होता, असं पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले.

२०१२ त्यांनी आण्णाराव यांचा गळा दाबून खून केला, मृतदेह महामार्गावर नेऊन टाकल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिस आणि विमा कंपनीच्या सतर्कतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस येऊ शकला आहे.

हे आहेत आरोपी….

याप्रकरणी आरोपी 1) लहू विश्वनाथ कांबळे (वय 54, रा. लातूर), 2) गोविंद माधव सुबोधी (वय 36, रा. वायगाव सातळा, ता. उदगीर, 3) विमा एजंट रमेश भागवतराव विवेकी (वय 44), 4) वैजीनाथ तुळशीराम सुडे (वय 51) यांना अटक केली आणि काही दिवसांपूर्वी मयताची पत्नी ज्योती अण्णाराव बनसोडे (वय 35, रा. सुमठाणा) यांना लातूर स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी औसा पोलिसात आरोपी विरुद्ध पोलिस डायरीत 73/2014 अन्वये भादंवि 302, 201,120 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ऋषिकेश म्हस्के” यांनी मांडल्या आक्रमतेने शेतकऱ्यांच्या व्यथा…

0

 

गेल्या 17 ऑगस्ट 2020 रोजी मा.अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या दालनात खडकपूर्णा प्रकल्प विभाग,देऊळगाव राजा अंतर्गत गांगलगाव वितरीकेवरील संबंधित कास्तकार यांच्या मागण्या विभागीय स्तरावरुन पूर्ण न झाल्यामुळे मा.अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ऋषिकेश म्हस्के व संबंधित कास्तकार यांच्यासोबत दुपारी 1:00 वाजेपासून तर रात्रीच्या 11:00 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.
संबंधित कास्तकार यांच्या मागण्या आम्ही विविध कालावधीत पूर्ण करून असे आश्वासन/करावयाची कार्यवाही पत्र मा.अधीक्षक अभियंता यांनी दिले व आंदोलन माघे घेऊन सांगता करण्यात आली
त्यानंतर 4 महिने होऊन सुद्धा हे काम पूर्ण झाले नाही .
त्या कामाचा पाठपुरावा करण्यास गेल्या नंतर मा.अधीक्षक अभियंता उडवा उडवी चे उत्तर देतात…
हे माझं काम नव्हे ते कार्यकारी अभियंता यांचे कार्य आहे मला काय एवढं काम आहे का आमच्याकडे मनुष्यबळ नाही
त्यानंतर सहायक अभियंता यांना विचारल्या नंतर तेही उडवा उडवीचे उत्तर देतात ते प्रकरण पाठवले तुमचे काम झाले मी प्रत्यक्षस्थळी येऊन बघितले परिस्थिती अशी आहे की हे संबधीत अधिकारी कदापिही प्रत्यक्षस्थळी आलेले नाही.
नुसता खोटेपणा करून शेतकऱ्यांनाचा आवाज दाबतात आणि कमी आवाजात बोला आवाज वाढू नका असा अश्या धमक्या शेतकऱ्यांना देतात.

दिलेल्या पत्राची व काय कामे केली यांचा जाब विचारण्यासाठी काल संबंधित कास्तकार गेले असता दुपारी 3 वाजेपासून तर 7 :33 वाजेपर्यंत सहायक अभियंता खडकपूर्णा प्रकल्प चिखली यांच्या कार्यलयात ठिय्या देऊन होते.
त्यानंतर संबंधित अधिकारी कोणत्याही मुद्याला थारा लागू देत नव्हेत.
सौजन्याने बोला माझे काम नाही ते मी वरिष्ठांना कस बोलू असे म्हणून तेही शेतकऱ्यांची दिशाभूल करत होते.
त्यांनतर ऋषिकेश म्हस्के आक्रमक होऊन मुद्यांवर संपूर्ण चर्चा करून सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे नाहीतर आम्ही येथून उठत नाही अशी भूमिका घेतली.
त्यानंतर सर्व मुद्यांवर लेखी आश्वासन दिले व आंदोलन माघे घेण्यात आले.
दिलेल्या आश्वासनाची पूर्तता विहित कालावधीत झाली नसल्यास त्रिव आक्रमक भूमिका घेऊन पुढील आंदोलन करण्यात येईल.

यावेळी यावेळी ऋषीकेश बबनराव म्हस्के,गणेश मदनराव म्हस्के व नितीन मधुकर म्हस्के,आव्हाड साहेब,चांदवडकर साहेब,देशमुख साहेब व इतर अधिकारी यांच्यासह राजेंद्र गंगाराम म्हस्के,ज्ञानेश्वर अशोक म्हस्के,महादू कुंडलिक म्हस्के,गणेश दिनकर सावळे,अमोल रामकृष्ण म्हस्के,विलास पुंडलिक म्हस्के,शिवाजी पुंडलिक म्हस्के,प्रदीप शंकर खरात,एकनाथ दत्तू सोळंकी हे प्रामुख्याने हजर होते

बुलडाणा जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण कायम

0

 

गजानन सोनटक्के जळगांव जा

सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याच्या वृत्ताने आज, १५ डिसेंबरला दिवसभर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वारे वाहत राहिले! मात्र अखेर हे वारे चुकीच्या दिशेने वाहत असल्याचे अन् बुलडाण्यातील आरक्षण फेविकोल का पक्का जोड असल्याचे स्पष्ट झाले. दिवसभर उगाच घामाघूम झालेल्या हजारो राजकारणी व प्रशासन वर्तुळाने सुटकेचा श्वास सोडला.
आज जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली. नेमके याच मुहूर्तावर राज्यासह बुलडाणा जिल्ह्याचे सरपंच आरक्षण रद्द झाल्याची बातमी एका चॅनेलवर ब्रेकिंग म्हणून प्रसारित झाली. त्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा हवाला देण्यात आला. यामुळे ही बातमी वादळाच्या वेगाने व्हायरल झाली. ग्रामीण भागात फैलावली. मोबाईलमध्ये क्लिपच्या रुपात फिरत राहिली. यामुळे १३ तहसील, ६ एसडीओ व जिल्हाधिकारी कार्यालयामधील फोन, अधिकाऱ्यांचे मोबाईल संध्याकाळपर्यंत खणखणत राहिले. अनेक जण कार्यलयात येऊन विचारते झाले. यामुळे कामकाज व आज निवडणूक आढावा सभेत व्यस्त अधिकारी व कर्मचारी देखील हैराण परेशान झाले. मात्र अखेर ग्रामविकास मंत्रालयाचे उप सचिव एल. एस. माळी यांच्या स्वाक्षरीच्या खलीत्याने हा जिल्ह्याला वेढून टाकणारा संभ्रम दूर झाला. ज्या जिल्ह्यात सरपंच आरक्षण काढले ते कायम राहील व ज्या जिल्ह्यात आरक्षण निघाले नाही केवळ आणि केवळ त्याच जिल्ह्यात निवडणुकीनंतर सोडत काढण्यात येईल, असे या खलीत्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

१५२ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क आतापर्यंत २३९४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई

0

 

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

नागपूर, ता.१५  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (१५ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १५२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २३९४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,०३,३०,५००/- चा दंड वसूल केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असले तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.
मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २३, धरमपेठ झोन अंतर्गत ३०, हनुमाननगर झोन अंतर्गत ८ धंतोली झोन अंतर्गत ११, नेहरुनगर झोन अंतर्गत १७, गांधीबाग झोन अंतर्गत ८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १२, लकडगंज झोन अंतर्गत १०, आशीनगर झोन अंतर्गत १५, मंगळवारी झोन अंतर्गत १३ आणि मनपा मुख्यालयातील ५ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १८४७३ बेजबाबदार नागरिकांकडून रु ९२ लक्ष ३६ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.