Home Blog Page 583

मित्र असावे तर असे -व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून लोक वर्गणी जमा करून मित्रांनी अपंग मित्राला – दिली चक्की –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

रक्ताचे नाते पेक्षाही आपण मित्राची नाते श्रेष्ठ मानतो आपली खाजगी असो वैयक्तिक असो सुख-दुख असतो हे सर्व आपण फक्त आपल्या मित्र जवळच सांगतो व मन मोकळं करून घेतो ‘परंतु अशीही काही मित्र असतात किती मित्रत्वाचा मदत करतात अशीच एक अतूट मैत्रीचे नाते ची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा या गावात घडली ।साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये राहणारा गणेश बेहीरे हा युवक पायाने अपंग होता .पायाने त्याला स्टॅन्ड धरून चालता येत होते परंतु एक पाय पूर्णपणे अपंग असल्यामुळे तो कुठल्याही प्रकारची नोकरी करू शकत नव्हता किंवा उद्योग करू शकत नव्हता !परिस्थिती ही त्याची गरिबीची असल्यामुळे करावे तरी काय हा प्रश्न त्याच्या मनामध्ये उभा ठाकला !परंतु त्यांच्या मनामध्ये विचार येत असताना गणेश चे वर्गमित्र असलेले वीस ते पंचवीस मित्रांनी गणेश ला काहीतरी उद्योग उभारायचा म्हणून सर्व मित्र एकत्र येत एक जिवलग मित्र नावाचा व्हाट्सअप ग्रुप बनवला !या ग्रुपच्या माध्यमातून सर्व मित्रांनी गणेशला सहकार्य करण्याचे ठरवले व सर्वांनी आपापल्या परीने रक्कम जमा करण्याचे ठरले !2014 सली हा ग्रुप बनवला होता !असे म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे !या म्हणी प्रमाणे प्रत्येक मित्र खारीचा वाटा उचलत होता व मदत करत होता !अशातच पिठाची गिरणी घेण्याचे ठरले व सर्व मित्रांनी पिठाची गिरणी घेण्याकरता ठरलेली रक्कम 60 ते 70 हजार रुपये जमा केले !यामध्ये भाऊराव मोरे ओंकार काळकर गणेश राजगुरू सचिन राजपूत संतोष मंडळकर सागर खरात जगदीश खरात प्रवीण अग्रवाल संदीप जगताप संदीप सपकाळ सचिन खरात गणेश नन्हई आनंद बेटवाल तुषार राजपूत अनिल मलये’मंदार देशपांडे संदेश ठाकूर गणेश खरात योगेश अवचार सुभाष अंभोरे व इतर गुप्त काही रुपये जमा झालेली होती !यायामध्ये विनोद भाऊ कोतवाल यांनी मीटर साठी लागणारे सर्व केबल म्हणून मदत दिली तर चेतन राजपूत यांनी स्वखर्चातून मीटर बसवले !अशा तऱ्हेने अपंग असलेल्या गणेशला सर्व मित्रांनी मदतीचा हात म्हणून पिठाची गिरणी टाकून दिली व असे एकूण सत्तर हजाराची पिठाची गिरणी गणेशला उभारून दिली म्हणून प्रत्येक मित्रांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितच एक चांगला आदर्श समाजापुढे निर्माण होईल !

एअरटेल जिओचे नेटवर्क नाही जिओचा जातोय जीव . ‘अनेकांचे ऑनलाईन कामे खोळंबली –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

जी ओ जी भरके ‘ कर लो दुनिया मुठ्ठी मे असे म्हणतातजिओच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये मोबाईल नेटवर्क जावून खोऱ्याने पैसे कमावणाऱ्या या जिओ नेटवर्क कंपनीने लोकांना सेवा तरी चांगली द्यावी अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत आहे ।25 नोव्हेंबरला सकाळी सहा वाजेपासून जिओ नेटवर्क व एअरटेल कंपनीची कुठल्याही प्रकारची रेंज मोबाईल ला लागत नव्हती !त्यामुळे ऑनलाईन कामे लोकांची खोळंबली आहे ‘तलाठी ऑफिस मध्ये सुद्धा नेटवर्क चा प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकऱ्यांना कामासाठी लागणारा सातबारा मिळेना झाला आहे ।तर काही ठिकाणी धान्य वितरित करतांना सुद्धा अडचणी निर्माण झाल्या !तर काहींना ऑनलाइन कृषी योजनेचा लाभ घेताना अर्ज भरताना अडचणी जाणवत आहे -तसेच काहींना फोन पे वरून पैसे ट्रान्सफर करताना अडचणी येत आहेत ‘त्यामुळे आज दिवसभर एरटेल व जिओची नेटवर्क नसल्यामुळे अनेक लोकांची कामे खोळंबली आहे -तरी जिओ व एअरटेल कंपनीने नेटवर्कची समस्या उद्भवणार नाही यासाठी उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वस्त धान्य दुकानदार अशोक खरात यांनी दिला आहे –

मास्क न घातल्यास आता एक हजार रुपये दंड…

0

 

रविंद्र ठाकरे – जिल्हाधिकारी नागपुर

¤ मास्क न घालणाऱ्या १७ व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल

¤ ४ लाख ३३ हजार रुपयाचा दंड वसुल
नागपूर :- मास्क व सोशल डी स्ट सिंग चे पालन न करणाऱ्या विरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत ८०६ व्यक्तीकडून ४ लाख ३३ हजार ५०० रुपयाचा दंड वसुल केला आहे, दंडाची रक्कम ५०० रुपया वरून एक हजार रुपये करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे, जनतेने नियमाचे कठोर पालन करणे अपेक्षित आहे, दिवाळी नंतर कोरोना रुग्ण वाढत आल्यामुळे जनतेनी सामाजिक अंतर व मास्क वापरण्या सोबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

 

नक्षलांनी पेरून ठेवलेला डम्प शोधण्यास गोंदिया राजनांदगाव पोलिसांना यश

0

 

गोंदीया-शैलेश राजनकर

गोंदिया 24: कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांना बतमीदारांकडून विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती. पोलीस स्टेशन गातापार राजनांदगाव अंतर्गत मौजा कहुआभरा जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या व पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य ठेवलेली होती अशी माहिती मिळताच पोलिस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे , पोलीस अधीक्षक राजनंदगाव डी. श्रवण आणि अप्पर पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेल देवरी आणि राजनांदगाव पोलीस यांनी काहुआभरा जंगलात नक्षल विरोधी अभियान राबविण्यात आले सर्च ऑपरेशन राबवित असतांना जंगल परिसरात संशयास्पद वस्तू आढळून आल्यामुळे राजनांदगाव येथील बी डी डी एस पथकाच्या साहाय्याने खबरदारीच्या उपाययोजना करून पाहणी केली असता नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली बंदुकीची बॅरल, हँड हेल्ड ग्रॅनाइट आऊटर कव्हर, इलेक्ट्रॉनिक वायर, टेप रोल, स्वीचेस, नक्षल पुस्तके, निळ्या रंगाचा मोठा ड्रम, बॅटरी, सोलर प्लेट, इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई राजनांदगाव पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया, डी श्रवण पोलीस अधीक्षक राजनांदगाव, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिकारी गोंदिया, यांच्या मार्गदर्शनात पार पडली असून नक्षल सेल देवरी, राजनांदगाव पोलीस, अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

धानाला बोनस जाहिर – खा. प्रफुल पटेल यांच्या आश्वानाची पुर्तता प्रति क्विंटल 700 रुपये मिळणार बोनस

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया / भंडारा: धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षा प्रमाणे यंदा ही खरीप हंगामात धानाला प्रति क्विंटल 700/- रुपये बोनस देऊ अशी ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दोन्ही जिल्हयातील शेतकऱ्यांना दिली होती. त्याच आश्वानाची पूर्तता त्यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार ने धानाला 700/- रुपये बोनस देण्याचे राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत जाहीर केले. याचा गोंदिया भंडारा जिल्हया सह पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाची लागवण केली जाते.त्यातच गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही जिल्हे केवळ धान उत्पादक जिल्हे आहे. या दोन्ही जिल्हयाची अर्थ व्यवस्था प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. मागील 3 – 4 वर्षा पासून धानाचा लागवड खर्चात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत धानाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला
याचीच दखल घेत लगतचा मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याचा धर्तीवर पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 2500/- प्रतिक्विंटल दर मिळवून देण्याची घोषणा मागली वर्षा विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार यांच्या उपस्थितीत गोंदिया येथे खासदार प्रफुल पटेल यांनी केली होती. या नंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार आल्या नंतर धानाला 700/- रुपये प्रति क्विंटल प्रथमच बोनस जाहिर करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2500/- रुपये हमी भाव मिळाला. मात्र यंदा कोरोना मुळे सरकारच्या तिजोरीत ठनठनात असल्याने आणि बोनस जाहिर केल्यास सरकारच्या तिजोरी वर 1400 कोटी रुपयांचा भार येणार होता. त्यामुळे यंदा बोनस मिळणार की नाही याची शंका होती, मात्र खासदार प्रफुल पटेल यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षा प्रमाणे यंदाही धानाला बोनस जाहिर केला जाईल अशी ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दिली होती.

बाप नंबरी तो बेटा दस नंबरी ??? अजब चोरांची गजब कहाणी ,

0

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

बापानेच पोरांना चोरीची तालिम दिली अन् त्यांनी मग स्विफ्ट कार चोरी करण्याचा सपाटाच लावला होता राज्यातील अनेक जिल्ह्यात त्यांनी कार चोरी केल्या ते चोरी केलेल्या कार बुलडाणा जिल्ह्यात आणायचे . या कारच्या नंबरप्लेट बदलायचे आणि मग या कार परराज्यांत विकायचे असा त्यांचा उधोग गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता मात्र देऊळगाव राजाचे महेश भोसले कन्नड ( औरंगाबाद ) येथे मावशीकडे गेले होते . तिथे त्यांची व त्यांच्या मावसभावाची कार चोरीला गेली व त्यांनी याची तक्रार दाखल केली अन् आपल्याच जिल्ह्यातल्या माणसाने या भामट्यांची आजवरची कारकीर्द संपवली . त्यांच्या चोऱ्यांचा पर्दाफाश झाला ते अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार कन्नडमध्ये दोन कार चोरीच्या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळास भेट देली . घटनास्थळाचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली . त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की , हा गुन्हा शेख दाऊद शेख मंजूर ( रा . धाड , जि . बुलडाणा ) याने त्याच्या मुलांच्या मदतीने केला आहे . त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळ न दवडता तातडीने चिखली ( जि . बुलडाणा ) गाठले . चोरटे बापलेक रोहिदासनगर ( चिखली ) येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्या भागात छापा मारला आणि शेख दाऊद शेख मंजूर ( 55 , रा . धाड जि.बुलढाणा ) , त्यांचा मुलगा शेख नदीम शेख दाऊद ( 22 , रा . धाड , ह.मु. देऊळगावराजा जि . बुलडाणा ) , दुसरा मुलगा शेख जिशान शेख दाऊद ( 28 , रा . धाड , ह.मु. घाटनांद्रा ता . जि . बुलडाणा यांना ताब्यात घेतले . या बापलेकांचे साथीदारही इथेच मिळून आले . सखाराम भानुदास मोरे ( 31 ) व दीपक दिगंबर मोरे ( 20 , दोघे रा . निरखेडा , ता.जि.जालना ) यांनाही ताब्यात घेण्यात आले . त्यांच्या कसून चौकशीत त्यांनी कन्नड येथून दोन्ही स्विफ्ट कार चोरल्याची कबुली दिली . नंबर प्लेट बदलल्याची कबुलीही त्यांनी दिली मराठवाडा सेलू ( जि . परभणी ) येथून एक स्विफ्ट कार ऑक्टोबरमध्ये चोरून आणल्याची कबुलीही बापलेकांनी दिली आहे . याशिवाय कन्नड येथून चोरलेली एक स्विफ्ट कार त्यांनी बनावट नंबर प्लेट लावून कुंभारवाडा ( चिखली ता . चिखली ) येथे लावून ठेवली होती . त्यांच्या ताब्यातून 3 स्विफ्ट कार , एक होंडा शाईन मोटार सायकल , 7 मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 19 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . ताब्यात घेतलेल्या सर्वांच्या चौकशीत एकापेक्षा एक आश्चर्य चकित करणाऱ्या बाबी समोर आल्या . बापलेकांसह साथीदारांनी जालना , परभणी , जळगाव व अहमदनगर जिल्ह्यात स्विफ्ट कार चोरलेल्या असून या गुन्ह्यांत चोरलेल्या स्विफ्ट कार या बाहेर राज्यांत त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने विक्री केल्याचे सांगितले आहे . त्यांच्याकडून आणखीही स्विफ्ट कार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे . ही कामगिरी औरंगाबाद चे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक भागवत कुंदे , पोलीस उपनिरिक्षक संदीप सोळंके , जमादार संजय काळे , दीपेश नागझरे , श्रीमंत भालेराव , धीरज जाधव , पोलीस नाईक संजय भोसले , नरेंद्र खंदारे , पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर धापसे , योगेश तरमाळे , जीवन घोलप यांनी केली .

शे. महेबुब यांचे किडनी आजाराने निधन. ( संग्रामपुरात किडनी आजाराने मृत्यूचे तांडव सुरूच, एका महिन्यात 4 मृत्यू, मतदारसंघातील लोकप्रतिनी व आरोग्य विभाग उपाययोजना करण्यात अपयशी )

0

 

मागील काही वर्षांपासून खारपान पट्ट्याचा शाप लागलेल्या संग्रामपूर तालुक्यात आतापर्यंत किडनीच्या आजाराने शेकडो बळी गेले असून शेकडो रुग्णांना किडनी आजाराने ग्रासले आहे. व कित्त्येक रुग्णांना मुतखड्याचा सुद्धा त्रास निर्माण झाला आहे.
मतदारसंघातील लोकप्रतिनिधी सह आरोग्य विभाग किडनी रोगासाठी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहेत. शासनाने तालुक्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे त्यासाठी 140 गाव पाणी पुरवठा योजना सुरू केली मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी या योजनेचा गाजावाजा करत मोठमोठे फ्लेक्स लावून फक्त फोटो शेसन केले. आजही मतदारसंघातील कित्त्येक गावात 140 गाव पाणी पोहचले नाही. आणि ज्या गावात पाणी पोहचले त्या गावात 10-10 दिवस पाणी सोडल्या जात नसल्याची ओरड गावातील नागरिक करत आहेत. संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त किडनी आजाराने बळी गेले असून आजसुद्धा शेकडो रुग्णांना किडनी रोगाची लागण आहे. आरोग्य विभाग व मतदारसंघातील लिकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही गत झाली असल्याची चर्चा परिसरात आहे.
25 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वरवट बकाल येथील शे. महेबूब शे. बशीर यांचे किडनी आजाराने मृत्यू झाला असून शेगाव, अकोला येथील खाजगी रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 3 मुली, नातवंड असा आप्त परिवार आहे.

संग्रामपूरात मृत्यूचे तांडव सुरूच
(22 दिवसात 4 मृत्यू )
3 नोव्हेंबर रोजी संग्रामपूर येथील सचिन सोनोने, 4 नोव्हेंबर रोजी येथीलच पांडुरंग सटोटे, 5 नोव्हेंबर रोजी वानखेड येथील सुनील येणकर व आज 25 नोव्हेंबर रोजी वरवट बकाल येथील शे. महेबूब शे. बशीर या चारही रुग्णांचा मृत्यू झाला असून संग्रामपुरात मृत्यूचे तांडव सुरूच आहेत.

भाजपाच्या वतिने विज बिल माफ करावे यासाठी आंदोलन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

भारतीय जनता पार्टी च्या वतीने सिदंखेड राजा तालुक्यातील माहेरखेड गावात उपअभियंता कार्यालय माहेरखेड याठिकाणी कोरोणा महामारीच्या काळातील संपुर्ण घरगुती वीजबील माफ करावे यासाठी विदयुत महामंडळ कार्यालया समोर दि . 23 नोव्हेबर रोजी’ महाविकास आघाडी सरकार चा जाहीर निषेध करुन वीजबीलाची होळी करुन हे आंदोलन करण्यात आले व निषेध करण्यात आला यावेळी सिदंखेड राजा भाजपाचे तालुकाध्यक्ष मा. प्रा. गजाननराव घुले मा. सर्जेराव नागरे मा.श्रीराम मुंढे भाजपा युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी मा.संतोष डोईफोडे मा.राजेंद्र नागरे मा.रंजित पवार मा.राहुल पवार मा.रविंद्र जायभाये साहबराव नागरे मल्हारी जायभाये अंबादास जायभाये गजानन सानप राजु कोल्हे प्रकाश लहाने एकनाथ डोईफोडे शिवाजी नागरे गजानन नागरे विष्णू जायभाये डिगांबर लाड विश्वनाथ लाड भगवान वाघ भीमराव म्हस्के हिमंत ढाकणे प्रकाश ढाकणे भावराव नागरे संदिप घुले ज्ञानदेव घुले शिवानंद टेलर हनवंतराव नागरे संदिपराव नागरे दिलीप सानप गणेश नागरे विलास वाघ ई.पदाधिकारी कार्यकर्ते तथा शेतकरी मंडळी उपस्थित होते

विहिरीत पडलेल्या रोहिला युवकांनी दिले जीवनदान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

एका पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी मध्ये रोहि पडला होता परंतु युवकाच्या सतर्कतेमुळे रोहितचे प्राण वाचवण्यात यश आले आहे ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी या गावातील शेतात घडली ।23 नोव्हेंबर रोजी विक्रम इंगळे यांच्या गट नंबर 180 मधील विहिरीत रोही पडला होता ही माहिती मिळताच ‘सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे व त्यांचे सहकारी सुधाकर इंगळे प्रभाकर इंगळे गणेश इंगळे प्रशांत इंगळे या सहकाऱ्यांना सोबत घेऊन !शेतातील विहीर गाठली .विहीर हे पूर्णपणे पाण्याने भरलेली होती काही करून रोहिचे प्राण वाचले पाहिजे या हेतूने संदीप इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोरी च्या साह्याने रोहित चे पाय दोरीने बांधून ।चौघांनी दोरी ओढून !रोहिला सुखरूप पणे पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीतून बाहेर काढले !त्यामुळे रोहिला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याला सुखरूप पणे जंगलात सोडून देण्यात आले !

मलकापूर पांग्रा येथे दोन दुकानांमधून चोरी !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सध्या चोरट्यांनी तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला असून तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे 22 नोव्हेंबरला मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडल्याची घटना घडली !मलकापूर पांग्रा येथील अतुल दायमा यांचे श्री महालक्ष्मी एजन्सी नावाचे होलसेल दुकान आहे हे दुकान चोरट्यांनी 22 नोव्हेंबर च्या मध्यरात्री शटर चे कुलूप तोडून चोरी केली !यामध्ये रोख 30 हजार रुपये .इतर किराणा सामान संतूर साबण खाद्यतेल मसाला ‘सीसीटीव्ही व्हिव्हीआर ‘असा एकूण पाच लाख 24 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला ।त्यानंतर चोरट्यांनी बशीर किराणा दुकान कडे मोर्चा वळवला बशीर दुकानाचे कुलूप कोंडा तोडून ‘दुकानातील रोख ४०हजार आठशे रुपये ‘त्याच बरोबर इतर किराणा सामान ‘संतूर साबण कपड्याचे साबण खाद्यतेलखोबरेल तेल शांती आवला शाम्पू .असे इतर आणखी किराणा सामानअसा एकूण एक लाख 95 हजार 600दोन्ही दुकानातील सामानाची किंमत सात लाख 22 हजार शंभर रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला !या घटनेची माहिती मिळताच साखरखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळी साहेब ।बीट जमदार नारायण गीते ‘पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर हे घटनास्थळी दाखल झालेव घटनेचा पंचनामा करून बुलढाणा येथून श्वान पथकाला पाचारण केले !परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही !त्यामुळे आता चोर शोधणे पोलिसांपुढे आव्हान असेल !