Home Blog Page 585

शेतकऱ्यांच्या मांगण्यासाठी स्वाभिमानी चे खातखेळ ग्रापंपचायत समोर धरणे आंदोलन 

0

 

 

जिल्ह्यात ओला दुुष्काऴ जाहीर करुण. नुकसान भरपाई व पिक विमा मिळण्यासाठी २१ आक्टोबर रोजी संग्रामपुर तहसिलवर प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक मुक्काम मोेर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्यातील हजारो शेतकरी तहससिललाच मुक्कामी असल्याची माहीती सरकारला कळताच. त्या मोर्चाची सरकारने दखल घेतली. मदत व पुनर्वसन मंत्री मा.विजय वडेट्टीवार यांनी माजी खासदार राजु शेट्टी यांच्या सोबत चर्चा करुण मोर्चातील मागण्या कँबिनेटच्या बैठकित मार्गी लावणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते.पंरतु सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही. त्यामुळे सरकारला ईशारा म्हणून मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी जिल्ह्याभरात गावातील प्रत्येक ग्रामपंचायत समोर शेतकऱ्यांचे एकदिवसीय धरणे आदोंलन करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता या वर्षी सतत पावसाने झालेल्या नुकसान
भरपाई म्हणून राज्य सरकारने सरसकट हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी.कंपनिने १००% पिकाचा विमा मंजुर करावा.मागिलवर्षी आनलाईन नोंदि करुनही सरकारने मका खरेदि केला नाही अशा मका उत्पादक शेतक-यांना प्रति किव्टिंल ७०० रुपये अनुदान द्यावे.कर्ज माफि पासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त करा. सततच्या दुष्काळाने हतबल झालेल्या शेतमजुरांना दर महा २००० हजार रुपये खावटी भत्ता द्या. माईक्रो फाईनान्स कंपनि कडुन होणारी सक्तिची वसुलि थांबवा.लोड शेडिंग बंद करुण.कृर्षी पंपाना १२ तास विज द्या.लाकडाउन काळातील घरगुती विज बिल माफ करा. ह्या मागण्या मंजुर करुन घेण्यासाठी स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या नेतृत्वात खातखेळ येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. व ग्रामपंचायत मार्फत मा.राज्यपाल व मा.मुख्यमंत्री साहेब यांना.निवेदन देण्यात आले संकटाने खचुन न जाता लढण्यासाठी समोर यावे हा लढा शांततेचा मार्गाने सरकारला ईशारा म्हणुन देत आहोत पंरतु मागण्या मान्य न झाल्यास पुढचा आंदोलनचा टप्पा आक्रमक व सरकारच्या आटोक्याच्या बाहेरचा असेल असा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शासन प्रशासन ला दिला आहे. या वेळेस स्वाभिमानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे. हरी तायडे, मुकुंदा भाऊ उन्हाळे, पिंटू उन्हाळे, ऋषिकेश काळुंगे, सागर जमाव,प्रकाश वगारे स्वाभिमानी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्तित होते. उपस्तित होते.

मलकापूर विधानसभा मतदारसंघात मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होणार-आमदार राजेश एकडे

0

 

सुनील पवार
नांदुरा प्रतिनिधी

मलकापूर विधानसभा मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा तालुक्यांचा कायम अवर्षण प्रणव तालुक्यात समावेश आहे.त्याच प्रमाणे या दोन्ही तालुक्यातील पूर्णा नदीच्या तीरावरील गावे खारपानपट्ट्यातील आहे.या दोन्ही तालुक्यात जलसंधारणाची कामे करणे नितांत आवश्यक आहे.या अनुषंगाने मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.श्री.शंकररावजी गडाख यांची भेट घेऊन मतदार संघातील जलसंधारणाच्या कामाचा अनुशेष बाबत ची माहिती दिली.मलकापूर विधानसभा मतदार संघातील विश्वगंगा,नळगंगा व ज्ञानगंगा नदीवर शासनास सादर केलेल्या प्रस्थावास नदी पुनर्जीवन अंतर्गत बंधारे बांधण्या करिता निधी उपलब्ध करून द्यावा तसेच मलकापूर व नांदुरा तालुक्यातील जलसंधारणाच्या नवीन कामाचे सर्वेक्षण करून त्याची अंदाजपत्रक मंजूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारें केली. मा.मंत्री महोदयांनी जलसंधारणाच्या कामाचा अनुशेष लक्षात घेता मृद व जलसिंचन विभागाचे सचिव यांना सादर बाबत चा प्रस्थाव मंजुरी साठी सादर करण्याचे निर्देश दिले.मा.मंत्री महोदयांच्या सकारात्मकते मुळे मलकापूर विधानसभा मतदार संघात मृद व जलसंधारणाच्या कामासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे….!!

विजयराज शिंदे यांच्या “घागर मोर्च्याच्या” इशाऱ्याने बारा गाव पाणीपुरवठा योजना सुरू होणार

0

 

पाणीपुरवठा तत्त्काळ सुरु करून घागर मोर्च्या काढण्यास परावृत्त करण्या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-
दिवाळी सारखा महत्वाचा सण तोंडावर असतांना सुद्धा मोताळा तालुक्यातील रोहीनखेड़-राजुर सह बारा गाव पाणीपुरवठा योजना गेल्या आठ महिन्यापासुन बंद असलेली पाणी पुरवठा योजना तत्त्काळ सुरु अन्यथा “घागर मोर्च्या” आणू अशी आग्रही मागणी व इशारा मा.आमदार विजयराज शिंदे यांनी ४/११/२०२० रोजी जिल्हाधिकारी व मजिप्र कार्यकारी अभियंता यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केला होता.
हि पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकड़े विविध निवेदने ,बैठका होऊन सुद्धा प्रशासकीय अडचणी व इच्छाशक्ति अभावी योजना सुरु झाली नव्हती. ग्रामस्थांना धरणात पाणी साठा उपलब्ध असताना सुद्धा पाणी मिळत नव्हते . महिलांना शेतातील कामे करून दूरवरुण पाणी आणावे लागत होते.अनेक गावांत दूषित पाणी पिल्याने रोग राई पसरन्यास सुरवात झालेली होती ही गंभीर बाब मा.विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून देत लेखी निवेदन देऊन सदर योजना तत्त्काळ चालू करा अन्यथा घागर मोर्च्याचा इशारा भाजपाच्या वतीने दिला होता.या इशाऱ्या नंतर मात्र धास्तावलेल्या प्रशासनाने सकारात्मक दिशेने प्रयत्न सुरु केले.

मा.जिल्हाधिकारी यांनी सदर निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता यांना तत्त्काळ तोंडी व लेखी सूचना देऊन
“विलंब न करता संबंधित गावांत तातडीने पाणीपुरवठा करावा तसेच होऊ घातलेला “घागर मोर्च्या” काढण्यापासून संबंधितांना परावृत्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी मजिप्रा ला दिले आहे व याबाबत मा.आमदार विजयराज शिंदे यांना कळविले आहे.

महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे उप कार्यकारी अभियंता श्री.भिलवाड़े यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता दिवाळीपूर्वीच योजनेत सहभागी सर्वच्या सह गावाना योजना कार्यान्वित करून पानी पुरवठा सुरळीत करणार असल्याची माहिती दिली आहे.
त्यामुळे आता रोहीणखेड़ राजुर सह बारा गाव पाणी पुरवठा योजना सुरु होऊन ग्रामस्थ व खास करून महिलांना दिवाळीची चांगली भेट मिळणार असल्याची भावना व आनंद व्यक्त केला जात आहे.

सूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवर राशी सिड्स 659 कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली शेताची पाहणी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या झाडांना कमी प्रमाणात बोंडे लागली व काही झाडांना तर बोंडे लागलीच नाही व लागलेल्या बोडांना सुरवातीपासूनच कीड लागलेली आहे व मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे या वर्षी आधीच संकटात सापडलेल्या अवस्थेत शेतकरी असताना अशा परिस्थितीत राशी कंपनीचे 659 वान पेरून उत्पन्न न झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे व कंपनीने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे तरी आपण सदर शेताची पाहणी करून पंचनामा करून कंपनीवर कायदेशीर कारवाई ची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांचा झालेला खर्च व उत्पादन खर्च त्याल त्यानुसार मोबदला शेतकर्‍यांना देण्यात यावा अशी तक्रार 2 नोव्हेंबर रोजी दिली होती त्यानुसार कृषी अधिकारी वाकोडे साहेब व पंचयातसमिती कृषी विभागाचे नावकर साहेब यांनी शेताची पाहणी केली व पंचनामा केला त्यानंतर आज दि 9 नोव्हेंबर रोजी राशी सिड्सचे बुलडाणा झोनल अधिकारी राजेंद्र सोनूले व जळगाव जामोद तालुका फिल्ड प्रतिनिधी राजू साबे यांनी शेतांची पाहणी केली

बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक बळीराम गीते.

0

 

अनिलसिंग चव्हाण/शिवदास जामोदे

बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांची बदली अकोला येथे झाल्याने स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद रिक्त असल्याने बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी आज एक आदेश काढून
बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक पदावर बळीराम गीते यांची नियुक्ती केली आहे.त्यांनी आज (ता.9नोव्हेंबर) सोमवार रोजी बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदाचा कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बळीराम गीते
यांनी पदभार स्वीकारला.पोलीस निरीक्षक बळिराम गीते यांनी यापूर्वी जिल्हा वाहतूक शाखा संभाळली. बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक पदाचा बळीराम गीते यांनी पदभार स्वीकारताच त्यांचे पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

पत्रकार कु. किरण चौधरी यांना कोरोना प्रहार योद्धा म्हणून सन्मानित

0

 

तुळजापूर :- प्रतिनिधी
covid-19 कोरोना महामारी आपत्तीजन्य संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या आरोग्यासाठी कोरोना विरुद्ध लढ्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पत्रकार कु. किरण चौधरी यांना कोरोना प्रहार योद्धा म्हणून सन्मानित करून सन्मानपत्र देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, उपाध्यक्ष दगडू माने, युवक अध्यक्ष अनिस मुजावर, कार्याध्यक्ष अभिजित खोत, शहराध्यक्ष अजय डांगे यांनी चौधरी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला

रस्ते महामार्गाच्या कामांत हेल्पलाइन सेंटर सुरु करा–

0

 

मा.आमदार विजयराज शिंदे यांची केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितिनजी गडकरी यांच्या कड़े प्रत्यक्ष भेटून मागणी.

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

अजिंठा-बुलडाणा-बैतूल सह सर्वच भागात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
या बाबत आपल्या सूचना व मागण्यासाठी आज दि.8 /11/2020 रोजी ना.नितिनजी गडकरी यांची सदिच्छा भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद आहे की,
अजिंठा-बुलडाणा-बैतूल या
महत्वाच्या व महत्वाकांक्षी असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षभरापासून सुरु आहे.रस्त्याची लांबी रूंदी अत्यंत जास्त असल्याने या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात खोलवर खोदकाम झालेले आहे.वाहतुकीच्या दृष्टिने एक बाजू वाहनांच्या वाहतुकीसाठी तर दूसरीबाजू ने खोलवर खोदकाम सुरु आहे सदर खोदकामामुळे वाहतूकची कोंडी होत आहे तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे व अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे.
संबंधीत कंत्राटदार यांनी जीवितहानी व अपघाताच्या दृष्टिने आवश्यक असणाऱ्या सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना मार्गाच्या कामात केलेल्या दिसून येत नाही. खोदकामाच्या कड़े लगत कोणतेही रेडियम लावलेली baaricades लावल्यात आलेले नसल्याने वाहने सरळ रस्ताच्या खाली खोलवर जाऊन पलटी होऊन भीषण अपघाताच्या घटना घडत आहे. अश्या रात्री अपरात्री झालेल्या अपघातातिल ज़ख्मीना साधी प्राथमिक उपचार सुद्धा मिळत नाही. जख्मी व त्यांची अस्ताव्यस्त स्थितीतील वाहने खोल खोदकामात पडल्यास रात्री दृष्टिक्षेपास न आल्याने लवकर उचलली सुद्धा जात नाही.खोदकाम ची लांबी ऊंची बरीच असल्याने होणारा अपघात हा भयावह असतो. अनेक ठिकाणी पुलांची कामे सुरु आहेत अश्या वळण रस्त्याच्या ठिकाणी (Divertion) रेडियमचे सुस्पष्ठ दिशादर्शक नसल्याने अशी ठिकाणे अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे. संबंधित कंत्राटदार यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना प्रगती पथातिल महामार्गात केलेल्या दिसून येत नाही.सदर महामार्गाच्या कामांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्या दृष्टिने सुरक्षिततेच्या उपाययोजना
करणे आवश्यक ठरले आहे.अनेक ठिकाणी कंत्राटदारांच्या चुकीच्या कार्य पद्धतिमुळे वाहतूक ठप्प होऊन तासनतास वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. बुलडाणा जिल्ह्यासह इतरही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगती पथा असलेल्या कामात पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.

1)संबधित कंत्राटदार यांचे दर 25 कि.मि.आपातकालीन सेवा देणारे “हेल्पलाइन सेंटर” असावे सदर हेल्पलाइन सेंटरचे दूरध्वनी क्रमांक मार्गात ठिकठिकाणी ठळक अक्षरात नोंदवावे.

2) दर 25 कि.मि. अंतरावरील हेल्पलाइन सेंटर द्वारे एका रुग्णवाहीकेची विशेष सेवा उपलब्ध करून दयावी जेणेकरून जख्मी ना तातडीने आरोग्य सेवा पुरविता येईल व रुग्णालयात पर्यत नेता येईल.

3)खोदकामाच्या कड़े लागत रेडियम लावलेली barricades असावे जेणेकरून दिवसा व रात्री वाहणे खाली उतरून अपघात होनार नाही.

4)महामार्गाच्या कामात कंत्राटदार यांच्या चुकीच्या कार्य पद्धतिमुळे किंवा सुरक्षिततेचे उपाय न योजल्यास अपघात घडून मृत्यु गेलेल्यांच्या वारसास 50 लाख रु चे विमा संरक्षण देण्याची सक्ति कंत्राटदार यांना करावी.जेने करून रास्तकंत्राटदार सुरक्षिततेच्या उपाययोजना काळजीने करतील.

5) मुळ रस्त्यापासून नवीन होण्याऱ्या महामार्गाच्या कामाची ऊंची खुप जास्त असल्याने या कामांमुळे रस्त्यालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी खुप त्रास होत आहे.शेतात बैलगाड़ी व वाहने जाऊ शक़त नाही .त्यामुळे शेत रस्त्याची योग्य व्यवस्था करावी.

6)पुल व वळण रस्त्याच्या ठिकाणी सुस्पष्ठ रेडियम लावलेली दिशादर्शक आवश्यक त्या ठिकाणी असावी.

अश्या प्रकारच्या सूचना व मागणी निवेदनात नमूद आहे.

बोथा घाटातील उड्डाणपुल व बुलडाणा बायपास साठी निधि उपलब्ध करून द्या–

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांची ना.गडकरी यांच्या कड़े मागणी

बुलडाणा जिल्हा व शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या ज्ञानगंगा अभ्यारण्य बोथा घाटातील उड्डाणपुल व बुलडाणा शहरासाठीचा बायपास या मागण्यासाठी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. या बाबत शासन दरबारी वरिष्ठ पातळीवर बैठका सुद्धा पार पडल्या आहेत.ना.गडकरी साहेब यानी बुलडान्यासाठीच्या बायपास ला तात्विक मान्यता दिल्या नंतर अंदाज पत्रकही तयार करण्यात आलेले आहे. पुढील केंद्र पातळी वरील मान्यतेसाठी व निधि उपलब्ध करून देण्यासाठी आज दि.08/11/2020 रोजी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितिनजी गडकरी यांची नागपुर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन बोथा घाटातील उड्डाणपुल व बुलडाणा शहरासाठीचा बायपास याबाबत सविस्तर माहिती दिली व राज्यशासनाकड़े प्रस्ताव प्रलंबित असल्याचे ना.गडकरींच्या लक्षात आणून दिले.

ना.गड़करी यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद आहे की,
“आपण भारतीय जैन संघटनेच्या बुलडाणा जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी आलेले असताना मी दि 3 मार्च 2018 रोजी बुलडाणा शहरातील बायबास किंवा उड्डाणपूल तसेच ज्ञानगंगा अभयारण्य बोथा घाटातील उड्डाणपूल पूलासाठी मान्यता देऊन काम सुरू करणेबाबत आपणास आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिले होते .
सदर पत्रातील विनंती नुसार तत्कालीन मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव मा प्रवीण परदेशी यांनी त्यांच्या दालनात दि 22 मे 2018 रोजी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मीटिंग घेतली होती .
सदर मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे बुलडाणा शहरासाठीच्या बायपास आणि ज्ञानगंगा अभयारण्य यामधून जाणाऱ्या रस्त्यावर तारेचे कुंपण किंवा उड्डाणपूल बनविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे ठरले होते . तसेच अभयारण्य यातील उड्डाणपूल की तारेचे कुंपन यासाठी मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समितीने सुचविल्या प्रमाणे कार्यवाही कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांच्यामार्फत प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याचे ही ठरले होते .
त्यानुसार दि 17/7/2018 रोजी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा येथे समितीची मीटिंग होऊन अभयारण्यांतून उड्डाण पूलाचे बांधकाम सर्व दृष्टीने सोईचे आणि फायद्याचे ठरेल असे सर्वानुमते ठरले होते .
उड्डाण पूल बनवल्यास वन्यजीवांचे अपघात होणार नाही ,वन्यजीवांचा मुक्त संचार होईल, वन संपदेची सुरक्षितता वाढेल .
उड्डाणपूलावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकाचे वन पर्यटन होईल .वाहतुकीसाठी रस्ता बंद करावा लागणार नाही .
उड्डाणपुलासाठी कोणतेही झाडे तुटणार नाही कारण अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच उड्डाणपुलाचे होणार आहे, उड्डाणपुल करताना वळणे कमी झाल्याने अंतर कमी होईल . पर्यायाने इंधनाची फार मोठी बचत होईल , वळणे कमी झाल्याने आणि उड्डाणपुलाचे काम सरळ होणार असल्याने आता असलेल्या वळणावरची जमीन वनविभागाला परत मिळेल, वनविभागाची जमीन केवळ उड्डाणपुलाचे पिलर साठीच लागणार असल्याने जमीनही वाचेल .

वरील मुद्दे विचारात घेता वन विभाग किंवा अभयारण्य यातून जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल बनविणे सर्व दृष्टीने फायदेशीर ठरत असल्याने उड्डाणपुलच बनवावा असे ठरलेले आहे . तसेच हा पॅटर्न देशभरात वन विभागाच्या हद्दीत लागू केल्यास वन संपदेचे, पर्यावरण होणारे नुकसान टळेल तसेच वळणे कमी झाल्याने अंतर कमी होऊन इंधनाची बचतही होऊन राष्ट्रीय कार्यास हातभारही असेही समितीचे मत झालेले होते.
समितीच्या बैठकीनंतर कार्यकारी अभियंता , राष्ट्रीय महामार्ग यांनी ज्ञानगंगा अभयारण्य यातून जाणाऱ्या पुलाचे अंदाजपत्रकासह सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे ठरल्यानुसार कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला यांनी सदर उड्डाणपूलाचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती कार्यकारी अभियंता , राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून मिळालेली आहे.
सोबतच मलकापूर सोलापूर NH 753 A, अजिंठा _ बुलडाणा_ बैतुल 753 E , बुलडाणा _ धाड राज्यमार्ग 226 हे मार्ग बुलडाणा शहरातून जातात . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जीवित हानी होत आहे.अजिंठा बुलडाणा खामगाव शेगाव बैतुल या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे आणि ज्ञानगंगा अभयारण्य बोथा घाट तसेच बुलडाणा सुद्धा याच रस्त्यावर आहे.

अशी सर्व काही परिपूर्ण माहिती ना.गड़करींना देऊन राज्य शासनास सादर केलेल्या बोथा घाटातील उड्डाणपूलाचे व बुलडाणा
शहरासाठीचा बायपास रस्त्याचे अंदाजपत्रक केंद्रा कड़े बोलावून दोन्ही विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा व काम तत्त्काळ सुरू करावे.
अशी आग्रही मागणी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी ना.गड़करीं कड़े केली आहे.

पंचशील नगरात वीस वर्षीय युवतीची गळफास घेवून आत्महत्या

0

 

आयुषी दुबे शेगाव

:शेगाव: येथील पंचशील नगर मध्ये एका वीस वर्षे युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली याबाबत शहर पोलिस स्टेशन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निशा रमेश कराळे या वीस वर्षीय तरुणीने घरात कोणी नसताना ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार 7 नोव्हेंबर दुपारी अडीच वाजेदरम्यान घडली याबाबत अंबादास विठ्ठल सहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आकस्मीत मृत्यूची नोंद केली आहे तपास पीएसआय इंगोले करीत आहेत

भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी दशरथ बनकर

0

 

ऋषी जुंधारे
जिल्हा प्रतिनिधी

वैजापूर । भाजप पक्षसंघटना विस्तारात नागरपालिकेतील भाजपचे गटनेते तथा नगरसेवक दशरथ बनकर यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.नगरपालिकेच्या राजकारणात मागील १५वर्षांपासून सक्रिय असलेल्या बनकर यांच्या माध्यमातून भाजपाने ओबीसी समूहाकडे लक्ष केंद्रित केले आहे.त्यांच्या निवडीचे पत्र ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी दिले. त्यांचे खा. डॉ भागवत कराड, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथ जाधव,विजय औताडे,जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी, तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे, डॉ हेडगेवार पतसंस्थेचे प्रशांत कंगले,जिल्हा कार्यकरणी सदस्य नबी पटेल, नगरसेवक राजेंद्र गायकवाड, दिनेश राजपूत, शैलेश चव्हाण,शहर अध्यक्ष भूषण निंबाळकर,युवा मोर्चाचे उपतालुका अध्यक्ष महेश भालेराव आदींनी अभिनंदन केले