Home Blog Page 59

घरकुल योजनेतील भ्रष्टाचारामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला…(gharkulyojna)

0

 

संबंधित अधिकारी कर्मचारी यांची सरपंच व ग्रामसेवक यांची पाठ राखण….

प्रतिनिधि सय्यद जहीर

gharkulyojna:लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व इतर पदाधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार चालला असून भ्रष्ट कारभाराला ऊत आला आहे.
घरकुल योजनेत तर ५ हजार ते २५ हजार रुपये घेऊन खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. या भ्रष्ट कारभाराला वेळीच थांबविले नाही तर गरजू व पात्र नागरिकांना घरकुले कशी मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

याबाबत माहिती अशी, शासनाकडून ज्यांना घरे नाहीत अशा गरीब, कष्टकरी, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेचा हेतू जरी चांगला असला तरी सध्या ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व ग्रामसेवकांनी संगनमताने या योजनेत भ्रष्टाचार करून योजनेचा हेतूच संपविण्याचे धोरण आखले आहे.

ग्रामपंचायतीतील सरपंच,उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक संगनमताने ५ हजार ते २५ हजार रुपये घेऊन लाभार्थ्यांची निवड करत आहेत. यासाठी लाभार्थ्याच्या नावावर जागेची अट असताना त्यासाठी खोट्या माहितीची पूर्तता करून घरे मंजूर केली जात आहेत. तसेच जागा व्यापून आपल्या नावावर नोंदणी करून घेत आहेत.

एक रेशनिंग कार्ड, नावावर गाड्या दोन,जागा पूर्ण नसताना मंजुरी, त्याचप्रमाणे घरे पूर्ण नसताना उतारे नोंदणी, घर पूर्ण झाल्याचा दाखला, तसेच दारे, खिडक्या, प्लास्टर, शौचालय नसतानाही तीन महिने आधीच खोट्या नोंदणी करून घरकुलांची बिले काढली जात आहेत.बांधलेल्या घरावर सुद्धा घरकुलाच्या नावे पैसे काढून दिल्या जात आहेत.
घरकुल योजनेतील या मनमानी कारभारावर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा गरजूंना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची जर चौकशी केली तर त्यातील निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी योजनेसाठी पात्र नसल्याचेच आढळून येईल.
घरकुल योजनेतील भ्रष्ट कारभाराची सर्व ग्रामपंचायतीतील कर्मचारी, पोलीस पाटील, सत्ताधारी तसेच विरोधक यांनाही याची माहिती असूनही ते गप्प का बसतात? हे कळायला मार्ग नाही.

gharkulyojna:गटविकास अधिकाऱ्यांना याची माहिती नसावी, असे वाटत नाही. निश्चितच तेही या कारभाराला पाठीशी घालतात, अशी नागरिकांचा समज झालेला आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा खऱ्या गरजू व पात्र लाभार्थ्यांना यापुढे लाभ मिळण्यासाठी या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

■ घरकुल मंजूर करणे, घरकुलाचा हप्ता देण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत कोणी नागरिकांना मंजुरीसाठी किंवा हप्ता देण्यासाठी पैसे मागत असेल तर याद राखा. कोणीही पैसे मागितले तर त्याला सोडणार नाही,भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी कार्यालयाबाहेर माझा मोबाईल क्रमांक लिहिण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
– जयकुमार गोरे, ग्रामविकासमंत्री

20 लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट…

प्रत्येकालाच वाटते कि आपल्याला हक्काचे स्वताचे घर असावे. हे स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे कारण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळालेले आहेत.या सर्व घरकुलांना तत्काळ मंजुरी देण्यात येणार आहे.

बऱ्याच वेळेस होते असे कि लाभार्थीला घरकुल मिळाल्यानंतर निकृष्ठ दर्जाचे काम केले जाते. मात्र यापुढे आता घरकुल योजनेचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे किंवा नाही हे पाहण्याच्या सूचना देखील संबधित अधिकारी यांना मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया —
घरकुल मंजुरी,घरकुलाचा हप्ता,नावे कमी जास्त,खाली वर ,खोट्या कागदपत्रांची पूर्तता,बांधलेल्या घरावर पैसे काढून देतो अशा प्रकारच्या कुठल्याही कामासाठी कोणीही आर्थिक व्यवहार करू नये.यासाठी सरपंच,सचिव,कर्मचाऱी,अधिकारी यांना कुठल्याच प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही.कारण घरकुलाची कामेही नियमानुसार करण्यात येणार आहेत.
काही ठिकाणी अनेकदा घरकुल योजनेचा अनुदानाचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्याकडून लाज मागण्याची शक्यता असते अशावेळी कोणतेही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास पैसे न देता लोणार पंचायत समिती कार्यालयात तक्रार करावी.
— श्री उमेश देशमुख,गटविकास अधिकारी पंचायत समिती,लोणार

जिजाऊ ज्ञान मंदिरात निरोप समारंभ संपन्न(buldhananews)

0

 

जावेद शहा बुलढाणा

दि. 01 फेब्रुवारीराजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु. सायन्स व क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट मध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष मा.संदीपदादा शेळके होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक मंडळी होती. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा निरोप समारंभ संपन्न झाला.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

यावेळी शाळेच्या प्राध्यापकां बद्दल विद्यार्थ्यांनी स्तुती सुमने गायली तसेच सर्व सोयी सुविधा युक्त डिजिटल माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता चांगल्या प्रकारचे शिक्षण या संस्थेतर्फे पुरविण्यात येतं याबद्दल आभाराचा सुर विद्यार्थ्यांमधून उमटला.
प्रसंगी कॉलेजच्या प्रा. सुनिल सुसर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले की, आदरणीय भाऊसाहेब शेळके यांनी लावलेला शिक्षणरूपी वटवृक्ष उत्तरोत्तर वाढत आहे.

आजच्या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलताना खूप आनंद होतोय आपण या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व उच्च प्रतीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या साठी मागील वर्षापासून संपूर्ण शाळा डिजिटल करण्यामध्ये आपण यशस्वी झालेला आहोत.

त्याचप्रमाणे डिजिटल सिलॅबस सुद्धा आपण त्यातून देत आहोत. येणारे दिवस हे परीक्षेचे असून या परीक्षेच्या काळामध्ये आपण टेन्शन मुक्त परीक्षा द्यावी मनावरील मानसिक ताण घालवण्यासाठी नियमित दहा मिनिटे मेडिटेशन, योग, प्राणायाम करावा, चांगल्या वातावरणामध्ये पेपर सोडवावा. आपले ध्येय एकच असले पाहिजेत. ध्येयपूर्तीसाठी नियमित कष्ट घेणे काळाची गरज आहे. आताच्या युगामध्ये एक नवीन क्षेत्र उदयास आलेले ते म्हणजे सायबर क्षेत्र, या क्षेत्राच्या माध्यमातून नवीन नोकऱ्या तयार होत आहे. भविष्य काळामध्ये चांगला नागरिक बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजेत.

आपण या शिक्षण संकुलात शिकलात लहानाचे मोठे झालात पुढील भविष्यामध्ये आपण उद्योग क्षेत्रात जाल शिक्षणासाठी देश-विदेशात जाल अशा वेळेस कोणत्याही समस्या आपल्याला येत असेल, तर नक्कीच मला किंवा या संस्थेला आपण एक आवाज द्या. त्यावेळेस आपल्याला नक्कीच मदत मिळेल. भविष्यकाळासाठी जिजाऊ ज्ञान मंदिराचे दरवाजे आपल्यासाठी नेहमीच खुले असेल.

buldhananews:“मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है।
“कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले. सुत्रसंचलन पायल चिकटे व आदिती सरकटे यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी खंडागळे हिले केले.

सिंदी रेल्वे येथे लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान प्रशासन शिबिर..(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

सिंदी रेल्वे..लोकांची कामे जलद गतीने व्हावी यासाठी महसूल विभागाच्या वतीने सिंदी येथे नायब तहसील कार्यालयात लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान प्रशासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

परिविक्षाधीन तहसीलदार डोगरे रेवैया यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात नायब तहसीलदार मधुकर ठाकरे, मंडळ अधिकारी सचिन पिसूद्दे, यांचे हस्ते महसूली प्रकरणातील आदेश संजय गांधी योजनेतील तसेच पुरवठा विभागातील विविध प्रमाणपत्रे शेतकरी व नागरिकांना वाटप करण्यात आले.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

या शिबिरात वहीवाटीचा रस्ता मोकळा करण्याबाबत चार आदेश पारित करण्यात आले, वाटणीपत्रचे ६ आदेश, कलम १५५ अंतर्गत दुरुस्तीचे पाच आदेश, ऍग्री स्टॅक बाबत नोंदणी ३२ अर्ज प्राप्त, संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ७ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,

सिंदी रेल्वे मंडळ अंतर्गत २२ फेरफार प्रकरणाचा निपटारा करण्यात आला, ३७ प्रत सातबाराचे वाटप करण्यात आले, उत्पन्न अहवाल २२ प्रति वाटप करण्यात आले, शिधापत्रिका मधून १७ नावे कमी करण्याच्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आला, ३ लोकांची नवीन शिधापत्रिका तयार करण्यात आली, श्रावण बाळ निराधार योजना मध्ये ४ नवीन अर्ज प्राप्त करण्यात आले, १७ लोकांना हयातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले,

संजय गांधी निराधार डीबीटी अंतर्गत २२ लोकांचे कागदपत्रे घेण्यात आली व इतर विविध प्रकरणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आली तसेच शिबिरामध्ये अनेक लोकांनी भेट दिली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सेलू तालुक्यात गावागावात शिबिर घेऊन जनतेची कामे निकाली काढण्याची योजना म्हणजेच लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान प्रशासन शिबीर होय..

Hingnghat:शिबिरात सिंदीचे पटवारी तिलक चंदनखेडे, हेलोडीच्या पटवारी रोशनी कोळमकर, पळसगावचे पटवारी धम्मदीप थुल, चाणकी कोपऱ्याच्या पटवारी संगीता थोटे, महसूल सहाय्यक कुसुम वाघ, दिलीप पाटील, कविता उरकुडे पुरवठा निरीक्षक सेलू आदींनी विविध प्रमाणपत्राचे नागरिकांना व शेतकऱ्यांना वाटप केले…

उल्का नगरी ला सीसीटीव्ही चा अभाव प्रशासनाला सी सी टी व्ही नसल्याने अनेक घटना उघडकीस आणण्यात अडचणी चोरटे मोकाट…. पुरावे मिळत नसल्याने घटनांमध्ये वाढ(Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

शहरात सीसीटीव्ही कॅमेर्यांची नितांत आवश्यकता असल्याचे काही महिन्यात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. अनेक मोठमोठ्या घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरयांचा अभाव असल्याने पुरावे नसल्याची माहिती समोर येत आहे.
लोणार हे जागतिक पर्यटन स्थळ आहे. पंरतु हे अनेक मुलभूत सोयी सुविधा पासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. लोणार शहरात देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेचा दृष्टीने कोणतीही उपाययोजना पहावयास मिळत नाही.

लोणार शहरात वाढत्या चोऱ्या, वाढते पशुधन चोरी, अपघात, मनुष्य हरवल्याच्या अनेक तक्रारी पोलिस स्टेशनला प्राप्त होत आहेत. पंरतु लोणार शहरात असलेला सीसीटीव्ही कॅमेराचा अभावामुळे हया अनेक गुन्ह्यांना उघडकीस आणण्यात दिरंगाई होत असून तपासात अपयश येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोणार शहराचा सुरक्षेचा प्रश्न असून जनमाणसात “असंतोष” निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

एसटी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना किसान सेनेच्या वतीने वरवट बकाल येथे चक्काजाम आंदोलन(andolannews)

लोणार शहरात अनेक शाळकरी मुली हया लोणार ला बाहेर गावावरून शिकण्यासाठी येत असतात. त्यांना सुद्धा चीडीमारीचा बसस्थानक परिसर मुख्य चौकात सामना करावा लागत आहे तसेच लहान मुल शाळेतून येत असतांना दुचाकीस्वार हे तुला घ्यायला तुझ्या घरच्यांनी आम्हाला पाठवल आहे.

असे सांगून अपहरण करण्याच्या बेतात असल्याच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे. तरी या सर्व घटनेंचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने पर्यटक, विद्यार्थीनी, लहान शाळकरी मुले-मुली यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे.

लोणार बसस्थानक परिसरात व लोणार शहरातील मुख्य ठिकाणी त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास घटनांचा तपास करण्यास तपासयंत्रणाना सोयीचे होईल. गुन्हा घडण्यावर ही आळा बसू शकतो.
भूषण मापारी पाटील, मा.नगराध्यक्ष,न.प. लोणार.

मेहकर येथे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सोहेल शर्मा हे कार्यरत असतांना त्यांनी लोणार शहरात सीसीटीव्ही कॅमेरयांचा डेमो घेतला होता.

त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र नागरिक व पर्यटक यांच्या सुरक्षेची चिंता प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. किमान आतातरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.
गजानन मोरे, सामाजिक कार्यकर्ते, लोणार.

लोणार शहरे ऐतिहासिक शहर आहे या शहरांमध्ये इतिहासा साठी इतिहासकार , सहली तसेच देश विदेशातून पर्यटक येत.

आहे परंतु या शहरांमध्ये प्रशासन कोणत्याही प्रकारचे गांभीर घेत नसून लोणारच्या चारी बाजूने अशी वैभवशाली स्वागत गेट उभारण्याचे व शहरांमध्ये विविध ठिकाणी कॅमेरे लावण्याची गरज आहे जेणेकरून शहरात येणारे जाणारे व्हानावर आणि चुकी ने घडणारी घटणा सुद्धा लक्ष देता येईल.

Lonarnews :तसेच लोणार शहरांमध्ये चालू असलेले अवैध धंदे ज्या च्यावर कुठेतरी आळा बसेल त्या मुळे प्रशासनाने तातडीनेया यावर्ती कार्य करावे मा.नगर सेवक तथा मा.संजय गाधी निराधार योजना तालुका अध्यक्ष शेख करामत शेख गुलाब

विदर्भस्तरीय आमदार चषक कब्बडी स्पर्धा मैदान चे भूमिपूजन(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे   हिंगणघाट

Hingnghat::- दि. २८ जानेवारी, २०२५ ला स्थानिक मोहता विद्यालयाचे पटांगणात भव्य “आमदार चषक” पुरुष व महिलांचे कबड्डी सामने ७, ८,व ९ फेब्रुवारी २०२५ ला होणार असुन त्याच अनुषगाणे सुभाष बोस व्यायाम शाळेचे जेष्ठ क्रिडा प्रशिक्षक महादेव मडावी (पहेलवान) तसेच श्रेष्ठ खेळाडू विजय महाबुधे यांच्या शुभहस्ते भुमीपुजन कार्यक्रम पार पडला

ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू(Yavalnews)

उपरोक्त प्रसंगी मा. आ.समिर कुनावार हे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते. आमदार स्वतः उत्कृष्ठ कबड्डी पटू असल्याने मंडळाचे आयोजनात प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने हजेरी लावतात हे उल्लेखनीय आहे.

Hingnghat:भुमीपुजनाचे प्रसंगी मंडळाचे समस्त सान, थोर, सदस्य,खेळाडू, प्रशिक्षक, आयोजन समितीचे सदस्य, पद‌सिद्ध पदाधिकारी हजर होते. उपरोक्त क्रिडा महाकुंभात हिंगणघाट शहरातील समस्त क्रिडाप्रेमीनी हजेरी लावावी असे आवाहान आयोजन समितीचे अध्यक्ष रितेश गांवडे व सचिव धनंजय बकाने व कार्याध्यक्ष रवि आस्कर यांनी केले.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगांव जामोद तालुका अध्यक्ष पदी किशोर दाताळकर तर तालुका सचिव पदी नागेश भटकर (buldhananews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

buldhananews:जळगाव जामोद आसलगाव येथे २९ जानेवारी रोजी अहिल्यादेवी होळकर हॉलमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

या बैठकीत जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी किशोर दाताळकर तर तालुका सचिव नागेश भटकर , तालुका कार्याध्यक्ष संतोष मांजरे , तालुका उपाध्यक्ष सुरेश मानकर , तालुका सल्लागार श्रीधर ओव्हेकर , यांची नावे बैठकी जाहीर करण्यात आली प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनात तर अभिमन्यू भगत केंद्रीय सदस्य, दत्तु दांडगे जिल्हा उपाध्यक्ष ह्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम स्थळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष यांना शुभेच्छा देण्यासाठी असलगांवती सरपंच विष्णू इंगळे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशसेठ ढोकणे , उल्हास माहोदे होते तर बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे , जिल्हाध्यक्ष विजय जोशी , सचिन खंडारे , राजेंद्र मोरे , डॉक्टर उमाळे , प्रल्हाद देशमुख जिल्हासचिव ,अजय टप प्रदेश संघटक ,श्रीकृष्ण भगत

जिल्हा कार्याध्यक्ष, मंगेश राजनकार कार्यलय प्रमुख, सुरेश यादव , प्रदीप शर्मा, संतोष कुलथे , संतोष जांभे , जाधव , प्रभुदास पारस्कर , अशोक इंगळे शिवाजी चिमकर , विवेक पाऊल झगडे व तसेच निमंत्रित मंडळी अनिल पाटील , जयदेव वानखडे, प्रीतम ठाकुर , गुलाबराव इंगळे , विनोद चिपडे , अश्विन राजपूत किसान एकता संघ दिल्ली

महासचिव पवन ठाकूर , गणेश गिरे , संजय दांडगे , भगवान टापरे ,अमोल भगत, सुरेश कलंत्री, अनिल भगत, विजय वानखेडे , विनोद वानखेडे , गजानन सोनटक्के तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते
तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष ह्याचे असलगांव व जळगांव तालुक्यातील मित्रमंडळी व गावकरी शुभेच्छा वर्षाव करत आहेत.

ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू(Yavalnews)

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी

गट विकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड, विस्ताराधिकारी, ग्रामविकास अधिकारी
सरपंच , उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी थकीत मालमत्ता कर धारकांवर वसुलीसाठी जप्ती कारवाईस सुरुवात केलेली आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

या कारवाईचा धसका घेऊन मागील

दोन दिवसात चार लाख 40 हजार रुपयांची थकीत कराची वसुली करण्यात या चार ग्रामपंचायती यशस्वी ठरली आहे.

शिरसाळ 155000 , आडगाव 90000, अठरावल 20000, न्हावी प्र या,175000 ,तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये मालमत्ता कर थकीत आहे.थकीत कराची वसूली होत नसल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर होऊन ती कामे ठप्प होत आहेत.ही बाब गांभीर्याने घेत , यांनी सर्व ग्रामपंचयाय लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांना विश्वासात घेत मागील दोन दिवसांपासून मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईचा धसका घेऊन मागील दोन दिवसात 4 लाख चाळीस हजार रुपयांची थकीत कराची वसुली करण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे.

Yavalnews:ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मालमत्ता असून त्या मालमत्तांना अजूनही मालमत्ता कर आकारणी केलेली नसल्याने अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर दंडासह मालमत्ता कर आकारणी करून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढ केली जाईल अशी माहिती गट विकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांनी दिली आहे.

एसटी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना किसान सेनेच्या वतीने वरवट बकाल येथे चक्काजाम आंदोलन(andolannews)

0

 

संग्रामपुर /  सूर्या मराठी न्यूज ब्युरो चीफ

andolannews:राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या एसटी भाडेवाढीच्या विरोधात शिवसेना (उबाठा) किसान सेनेच्या वतीने २९ जानेवारी रोजी वरवट बकाल बस स्टॉप वर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

महाराष्ट्रात महायुती सरकारने अव्वाच्या सव्वा एसटी भाडे वाढ केली असून या भाढेवाडीने शेतकरी, गोरगरीब लोकांचे कंबर्डे मोडले आहे ही भाडेवाढ तात्काळ रद्द व्हावी या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

“जय भवानी जय शिवाजी”हा आवाज कुणाचा शिवसेनेचा , एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरवट बकाल बस स्टॉप वर एसटी थांबवून झालेली जुलमी भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

andolannews:आंदोलकांमध्ये अमोल ठाकरे शिवसेना किसान सेना तालुकाप्रमुख,अजय घिवे युवा सेना विधानसभा संघटक, धनंजय अवचार, भगवान पवार, सुनील मुकुंद, शिवाजी अढाव माजी युवा सेना तालुकाप्रमुख, रामदास मोहे उपताप्रमुख किसान सेना , विशाल बकाल, नंदू अढाव, गजानन वानखडे,अतुल बांगर,संजय ठाकुर, गजानन गोल्हर,मनोज आवारे,आदी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार इस्माईल शेख यांनी सापडलेला मोबाईल केला शेगांव पो.स्टे. ठाणेदार नितिन पाटील यांच्याकडे सुपूर्द..(mobaile)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

mobaile:शेगांव येथील निर्भिड पत्रकार इस्माईल शेख हे २८ जानेवारीच्या रात्रीअतिक्रमणाची बातमी घेण्यासाठी गेले असता त्यांना शेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्त्यावर एक विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किमंत अंदाजे १८००० रुपयांचा आढळून आला.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

पत्रकार इस्माईल शेख यांनी पत्रकारितेची माणूस दाखवत लगेच शेगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितिन पाटील यांना मोबाईल सापडल्याचा रात्री २:३६ मिनिटांनी व्हॉट्सॲपला मॅसेज टाकला व दुसऱ्या दिवशी शहर पोलीस स्टेशन गाठत पत्रकार इस्माईल शेख यांनी तो सापडलेला मोबाईल हा ठाणेदार नितीन पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळेस नितिन पाटील यांनी पत्रकार इस्माईल शेख यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांचे कौतुक केले.

mobaile:इस्माईल शेख यांच्या सोबत पोलीस स्टेशनला मोबाईल जमा करतेवेळी पत्रकार अनिल उंबरकर, राजकुमार व्यास, विवेक शेगांवकर, गजानन ददगाळ, महेंद्र मिश्रा, ललित देवपूजारी हे उपस्थित होते.

घरकुलच्या लाभार्थ्यांना लुटण्याचा ग्रामसेवकाचा नवा प्रयोगएजेंट मार्फत एक फाईल तयार करण्याचे आठशे रुपये?ग्रामसेवक म्हणतो याच एजंट कडून काम करून घ्या!(Gharkulyojna)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना चालू केली असून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करता येते परंतु या योजनेला पंचायत समिती मधील ग्रामसेवक आणि त्यांनी नियुक्त केलेल्या दलालांमुळे घरकुल चे स्वप्न रंगवणाऱ्या लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंदंडाला सामोरे जावे लागत आहे.

सिंदखेड राजा पंचायत समिती मध्ये पत्रकार सुरेश हुसे यांच्या नावावर निमगाव या ठिकाणी घरकुल मंजूर झाले आहे. त्या घरकुलाचे करारनामे 100 रुपयाच्या बॉण्डवर करण्यासाठी व संपूर्ण कागदपत्र फाईल भरून देण्यासाठी ग्रामसेवकांनी स्वतः एजंटला भेटण्याचे सांगून त्यांच्याकडून काम करून घ्या असे बजावले.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

सदर प्रकरण हे घरकुल लाभार्थ्यांचे आर्थिक लुटमारीचे असल्याचे पत्रकारांच्या लक्षात आल्यावर पत्रकार यांनी सदर घटनेची माहिती गटविकास अधिकारी सिंदखेड राजा आणि ग्रामसेवक यांना दिली बिडिओ पंचायत समिती सिंदखेड राजा यांनी ग्रामसेवक तसेच एजंट यांच्या नावे तक्रार द्या मी कारवाई करतो असे म्हटले आहे.

गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आलेल्या तक्रारी मध्ये पत्रकार सुरेश हुसे यांनी असे म्हटले आहे की, घरकुल ची फाईल बनवण्यासाठी ग्रामसेवक संतोष भुतेकर यांनी त्यांचा एजंट प्रवीण खांडेभराड यांच्याकडे मला पाठविले. सदर एजंटने घरकुल फाईल तयार करण्यासाठी माझ्याकडून नगदी 800 रुपये घेतले आहे.

सदर फाईल करण्यासाठी आशा एजंटची आवश्यकता नसतांना फक्त ग्रामसेवकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एजेंट ची नेमणूक केली असून त्या एजंट मार्फत घर धारकाकडून प्रतिपश लाभार्थी आहेत आठशे रुपये घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असून संबंधित एजंट व त्याला नियुक्त केलेल्या ग्रामसेवकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. असे या निवेदनात म्हटले आहे.

 लाईव्ह बातमी सविस्तर पहा 

तक्रार अर्ज हातात येणार नाही, तो पर्यंत कारवाई करणार नाही – गटविकास अधिकारी पत्रकार सुरेश हुसे यांनी केलेल्या घरकुलाच्या फाईल मध्ये त्यांची आर्थिक लूट झाली असून, याची माहिती गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून दिली असता तुम्ही तक्रार अर्ज दाखल करा मी त्वरित कारवाई करतो. असे गटविकास अधिकारी म्हणाले होते मात्र आता जोपर्यंत तक्रार अर्ज आवक-जावक मधून गटविकास अधिकारी यांच्याकडे येणार नाही तोपर्यंत त्यांना यावर कारवाई करता येणार नाही.

Gharkulyojna :असे स्वत: गटविकास अधिकारी हे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले आहे. जर आठ दिवस अर्ज आवक-जावक मधून गटविकास अधिकारी यांच्या कडे जाण्यासाठी वेळ लागला तर आठ दिवसांमध्ये किती नागरिकांची आर्थिक लूट होईल असा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागला आहे. व या आर्थिक लुटेला जबाबदार कोण राहील? हा सवाल आता सर्वत्र उपस्थित होत आहे.