Home Blog Page 58

स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष तर्फे निषेध मोर्चा.(hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

hingnghat:हिंगणघाट शहर व ग्रामीण शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा तर्फे प्रीपेड व स्मार्ट मीटर बसविल्यास धोके व अडचणी बाबत उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे ,तथा माझी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, तसेच तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय, हिंगणघाट यांना शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक पासून कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पर्यंत समाजाच्या हितासाठी शिवसेना परत एकदा रस्त्यावर पाई चालत जाऊन धडक मोर्चा द्वारे निवेदन देण्यात आले.

स्मार्ट आणि प्रीपेड मीटर योजनेवर चर्चा सुरू असताना, योजनेची संबंधित काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत. सरकार आणि महावितरण कंपनीने योजनेचे समर्थन करताना दिलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर वास्तव अधिक चिंताजनक आहे. स्मार्ट मीटर ची किंमत रुपये २६१०/- सिंगल फेज,व ४०५०/- थ्री फेज आहे. मात्र प्रीपेड मीटर साठी प्रत्यक्ष खरेदी मध्येही किंमत जवळपास दुप्पट म्हणजे ११९८७/- झाली आहे.

त्यामुळे ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक ताण येतो. याशिवाय मीटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पारदर्शक नाही. प्रीपेड मीटर साठी होणारा खर्च वीज दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकाकडून वसूल केला जाणार आहे. अंदाजे ३०/- पैसे प्रति युनिट वाढ हा ग्राहकांवर मोठा आर्थिक बोजा असेल.त्यामुळे वार्षीक तीन हजार कोटींचा अतिरिक्त भार पडेल.

तसेच ग्राहकांचे हक्क वीज कायदा २००३ च्या कलम ४७ (५) नुसार ग्राहकाला पोस्टपेड किंवा प्रीपेड मीटर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रात प्रीपेड मीटर साठी सक्ती केली जात आहे. त्यामुळे कायद्याचे उलंघन होत आहे. इंटरनेट किंवा स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या भागामध्ये रिचार्ज प्रक्रिया अडथळे येतील .अशा परिस्थितीत ग्राहकांना वारंवार डिस्कलेक्शनला समोरे जावे लागू शकते. राज्यातील २ कोटी लहान ग्राहकांना प्रीपेड मीटर योजनेचा कोणताही फायदा होणार नाही. उलट त्यांना अतिरिक्त खर्च आणि तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागेल .१०० युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना हा भार टाकला जात आहे.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

तसेच प्रीपेड मीटरच्या अंमलबजावणीनंतर महावितरणच्या अकाऊंट आणि बिलिंग विभागातील सुमारे २०००० आणि मीटर रिडिंग करणारे ३०००० रोजगार कायमचे कमी होणार आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती ही प्रभावित होणार आहे .या केंद्र सरकारच्या धोरणानुसार विज क्षेत्राचे खाजगीकरण हळूहळू सुरू आहे.

hingnghat:ही अत्यावश्यक सेवा रहण्याऐवजी खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी वस्तू बनेल. ज्यामुळे ग्राहकाचे शोषण होण्याची शक्यता दाट आहे.
या मोर्चात सहभागी उपतालूकाप्रमुख प्रकाश अनासाने ,माजी नगरसेवक मनीष देवडे, श्रीधर कोटकर, भास्कर ठवरे,मनोज वरघणे ,गोपाल मेघरे ,शितल चौधरी ,पप्पू घवघवे,अनंता गलांडे ,नितीन वैद्य ,गजानन काटोले, सुरेश चौधरी ,संजय पिंपळकर, शंकर भोमले ,नथूजी कुकडे, प्रशांत सुपारे, गजानन ठाकरे ,अमोल वादाफळे, हेमराज हरणे, विजय कोरडे ,बलराज डेकाटे, शंकर झाडे ,संजय रहाटे ,घनश्याम येडे ,गजानन सातारकर, फिरोज खान,राजू मंडलवार, हिरामण आवारी ,भास्कर कोल्हे ,शकील अहमद ,श्रीकृष्ण रामगडे,दिलीप वैद्य, श्रीरंग चंदनखेडे,प्रशांत कांबळे ,गजानन साखरकर, वसीम शेख, अतिक मिर्झा, रमेश तामगाडगे ,नरेश तामगाडगे ,सोनू भगत,लक्ष्मण कापकर ,विनोद दांरुडे ,अमोल चिंचाळकर, गुणवंत वानखेडे,विनोद दारूंडे, रवी बागडे ,गोवर्धन शाहू, भोला ठाकूर , चंगेज खान, राजेश बोंडे ,मारुती अराडे, दिनेश धोबे,सुनील आष्टीकर, संतोष गाले,विनोद मोहोड, प्रकाश भुसारी, किशोर इंगोले, सतीश मसराम,अरविंद झिलपे,शुभम धनगाये, नितीन कोल्हे, अनिल मानकर, अविनाश धोटे,राजू बोडे,दिलीप जाधव,मनोज सावंत,संजय गिरडकर, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

0

 

 

राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलढाणा द्वारा संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर अँड ज्यु क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड मध्ये आज त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट हे होते. सर्वप्रथम माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी स.शिक्षीका प्रियंका सरकटे यांनी बहारदार गिताने सुरुवात केली. तर आराध्य लहाने, ईश्वरी बांन्डे ,प्राची सुसर ई विद्यार्थीनी आपल्या गीत तसेच भाषणातुन माता रमाई त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आला.

यावेळी शाळेचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून माता रमाई यांचे कार्य त्यांचा जीवन त्याग व त्यांनी केलेले समाजासाठीचे काम व त्याग यासह अनेक विषयावर दैनंदिन जीवनातील उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडले. पुस्तके वाचली पाहिजे ज्ञान वृद्धिंगत केले पाहिजे. तरच समाज सन्मान करतो. त्यागमूर्ती माता रमाईचे जीवन कार्य आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारले पाहिजेत, अशा महान पुरुषांचे कार्यक्रम घेण्यामागचा हाच उद्देश असतो त्यांचे जीवन कार्य आपण अंगीकारावे, हेच त्यांना अभिवादन ठरेल असे ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष माननीय संदीप दादा शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गायकवाड यांनी केले कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती

रेती चोरीवर शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेध. ( mahsulnews)

0

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

mahsulnews:हिंगणघाट:- हिंगणघाट व समुद्रपूर तालूक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास २४ तास वाळू उपसा केला जात आहे. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सर्रास सुरु असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अश्याच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरविण्याचा शासनाचा हेतू हे असले रेती माफिया पायदळी तुडवीत आहे.

हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील येळी वाळू डेपो, दारोडा वाळू डेपो, खुनी (सेवा) वाळू डेपो, आजनसरा येथील सावंगी वाळू डेपो, साती वाळू डेपो, तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव वाळू डेपो अशी वाळू डेपो आहे. वना, वर्धा नदीवर असलेले जवळ जवळ सर्व वाळू घाट या रेती डेपोला जोडले आहेत.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

मात्र या डेपोवर रेती न टाकता हे डेपो धारक नदीत अनधिकृत रित्या पोकलन्ड मशीन, यांत्रिकी बोट लाऊन टिप्पर च्या माध्यमातून नदीपात्रातून २४ तास थेट विक्री करत असून प्रशासनाचे सुर्व नियम पायदळी तुडवीत आहे. जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपूर येथील रेती आणि हि ग्रुप पणे विक्री केली जात आहे.

वाळू डेपोवर वाळू टाकून ती शासनाच्या आकारण्यात येणाऱ्या दराने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. ज्या लोकांनी डेपो घेतला आहे ते शासकीय नियमानुसार काम करीत नाही. नियमानुसार रेती उपसा सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणे आवश्यक आहे. परंतु सायंकाळी सहा नंतर सुद्धा रेती उपसा चालू असतो. रेती साठा साठवून मोठ्या प्रमानात अनधिकृतरित्या विक्री सुरु आहे. त्यामुळे लाभ्यार्थ्यांना रेती मिळत नाही कारण त्यावर डेपो धारकाचे योग्य ते नियंत्रण नाही.

शेकापूर (बाई) च्या वाळू घाटावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून शासनाच्या करोडो रुपयाचा महसूलाचे नुकसान होत आहे. 20 ते 25 टिप्पर आणि ट्रक्टर शेकापूर रेती घाटावर चोरी ची वाहतूक करण्यासाठी तयार आहे. काही गाड्या जेसीपी च्या माध्यमातून रेती भरून निघाल्या आहे. याबाबत सबंधित अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा यावर कारवाई झाली नाही. अधिकारी वर्ग नेत्याच्या दबावात येऊन रेती माफियांना वाचविण्याचे काम करीत आहे. आणि वरिष्ठांना दाखवण्यासाठी एक, दोन ट्रक्टर वाल्यांवर कारवाई करीत प्रशासन जागृत आहे असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसत आहे.

रेती डेपो आडून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपऊन घेणार नाही. कारण शासन रेती तस्करीवर आळा लावण्यात असमर्थ ठरत आहे. अवैध्य रेती माफियावर कारवाई झाली नाही तर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी- (श.प) रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणत आंदोलन करेल. या आंदोलना नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील. असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

mahsulnews:यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, तालुकाध्यक्ष महेश पाटील झोटिंग, शहर अध्यक्ष बालु वानखेडे, समाजसेवक अशोक पराते, समाजसेवक सुनील डोंगरे, युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, माजी नगरसेवक दादा देशकरी, माजी नगरसेवक बालाजी बहलोद, विजय तामगाडगे, माजी जि.प. सदस्य घनश्यामजी येंडे, किशोर चांभारे, भोला निखाडे, मोहम्मद अली अजानी, नाना पुंड, रविभाऊ डेकाटे, उमेश नेवारे, संदीप चाफले, सौ. सरपंचां कविता वानखेडे, महिला कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, तालुकाध्यक्ष सुचिता सातपुते, शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, राऊत मॅडम, जील्हाउपाध्यक्ष मीना सोनटक्के, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, मीनाक्षी ढाकणे, सरचिटनिस सविता गिरी ओबीसी सेल शहर अध्यक्ष आचल वकील, सिद्धार्थ मस्के, शोहेब शेख, जितेंद्र रघाटाटे, अमित रंगारी, नितीन भूते, रमेश चतुर, रवी गिरसावले, सुनील घोडखांदे, तालीम कुमार पिसे, अमोल बोरकर, प्रवीण भूते, जगदीश वांदिले, पुरुषोत्तम कांबळे, अनिल भूते, गजानन महाकळकर, बच्चू कलोडे, सुशील घोडे, आकाश हूरले, दिनेश पिसे, कुणाल गोल्हर, हुकेश धोकपांडे, अमर धनविज, पंकज भट, सचिन घोडे, रवी बोरकर, राहुल बोरकर, नरेश चिरकुटे, दीपक चांगलं, वैभव बोरकर, मो. शाहिद, उपस्थित होते

सहामास कार्यक्रमात वडिलांना लेकाची वैचारिक आदरांजली(Lonarnews)

0

 

बिबी प्रतिनिधी :-सय्यद जहीर

Lonarnews:लोणार तालुक्यातील चिखला काकड येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक काकड यांच्या वडिलांचे निधन १७ ऑगस्ट २०२४ रोजी झाले.
त्यांच्या वडिलांची वारकरी संप्रदायावर प्रचंड निष्ठा होती आणि ते तत्वनिष्ठ होते.

जिवंतपणी कधीच कुणाचे वाईट केले नाही मग त्यांच्या मरणानंतर पर्यावरणाला देखील कुठलाचं त्रास नको.
माणूस गेल्यानंतर आपण रक्षा आणि अस्ति व इतर वस्तू नदीमध्ये विसर्जित करतो पण त्याचे विघटन होण्यासाठी बराच काळ लागतो व त्याचा जलचरास त्रास देखील होतो. तोच त्रास टाळण्यासाठी व पर्यावरणाला हानी करणाऱ्या रुढींना थांबवण्यासाठी मुलगा विनायक यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

वडिलांची रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता आपल्या शेतामध्ये नेऊन त्यावर वृक्षारोपण केले.
जेणेकरून वडिलांची आठवण कायम राहील व हे वृक्ष पर्यावरणास पूरक ठरेल.त्यानंतर वडीलांच्या सहा मास विधी व नैवद्य कार्यक्रमात देखील विनायकने अनोख्या आदर्श पद्धतीने राबविला. स्व.जगन्नाथ काकड हे उत्तम वाचक होते व ते पर्यावरणवादी, पर्यावरणप्रेमी देखील होते त्यांना वृक्षारोपणाची प्रचंड आवड होती.

आज दिवसेंदिवस वाचन चळवळ ही लोप पावत चालली आहे आणि निसर्गाचा देखील ऱ्हास होत चालला आहे.
वाचन चळवळ वृंद्धिगत व्हावी व पर्यावरण रक्षणाचा छोटासा संदेश देण्याचा विनायकने प्रयत्न केला आहे.
वडीलांच्या सहा मास नैवद्य कार्यक्रमात विनायकने कुठलाही अपव्यय खर्च न करता कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्येक पाहुणेमंडळी, मित्रपरिवार, आप्तेष्टांना विनायकने पुस्तकं व दुर्मिळ रोपांच्या बिया देऊन वाचनाचे व वृक्षरोपणाचे आवाहन करून वडिलांना अनोखी आदरांजली दिली आहे.
आपली वाचनाची व पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा हीच माझ्या वडिलांना खरी आदरांजली असेल असेल विनायक काकड यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे.

विनायक काकड हे उत्तम वक्ता व सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. अनेक सामाजिक चळवळीत ते सक्रिय सहभागी असतात.ते सध्या निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय मुंबई येथे पदवीचे शिक्षण घेत आहेत. विनायकच्या या अनोख्या विचाराने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lonarnews:वाचन व पर्यावरण चळवळ ही प्रत्येक व्यक्तीच्या मरणोत्तर राबवावी यासाठी विनायकने समाजामध्ये प्रबोधन करण्याचा निर्धार वडिलांच्या सहामास कार्यक्रमात केला आहे.

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी व मोबाईल सिडींग करावी अन्यथा धान्य होईल बंद.. दिपक बाजड तहसिलदार शेगांव यांचे आवाहन तालुक्यात केले ई-केवायसी कॅम्पचे आयोजन(tahsilnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

tahsilnews:शेगांव तालुक्यातील शिधापत्रिका धारक ग्राहकांनी ई-केवायसी करुन घेण्याबाबत चे आव्हाण तहसिलदार दिपक बाजड यांचे माध्यमातून निरीक्षण अधिकारी पुरवठा संतोष बावणे यांनी केले आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना शासकीय धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

त्यासाठी दिनांक 06/02/2025 पासून 28/02/2025 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत नेवून आपल्या गावातील स्व् स्त् धान्य दुकानदारांशी संपर्क करुन तात्काळ आपले ई- केवायसी पुर्ण करुन घ्यावे.

केवायसी करण्यासंबधीत लाभार्थी यांनी रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून पॉस् मशीनवर बायोमॅट्रीक करावे. ई-केवायसी पुर्ण न केल्यास अन्न धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

tahsilnews:ई-केवायसी पुर्ण न केल्यामुळे अन्न धान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची जबाबदारी ही संबधीत लाभाथ्यांची राहील असे आवाहन तहसिलदार शेगांव दिपक बाजड यांचे माध्यमातून निरीक्षण अधिकारी संतोष बावने व पुरवठा निरीक्षक किसन केणे यांनी केले आहे.

बसमध्ये दिव्यांगसाठी सीट आरक्षितच ठेवा विराट मल्टीपर्पज फाउंडेशन ची मागणी(busnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगाव () आज दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी जिल्हा वाहतूक नियंत्रक (ST) जिल्हा बुलढाणा बुलढाणा यांना
मार्फत खामगाव आगार व्यवस्थापक सई तांबटकर खामगाव यांना विराट मल्टिपर्पज फाउंडेशन खामगाव च्यावतीने अध्यक्ष मनोज नगरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यातील चालक व वाहक विशेषता वाहकच यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील दरवाजाजवळील चार आसने क्रमांक तीन, चार, पाच व सहा (इतर बस मध्ये वेगळी आसन) कायमस्वरूपी दिव्यांगांसाठी राखीव ठेवली आहेत.
५ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झालेला हा अध्यादेश राज्यभर लागू करण्यात आला आहे.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

दिव्यांगांना त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सन्मानजनक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर योग्य ते सहकार्य करीत नसल्याचे तक्रारी आहेत तसेच हा नियम कोणी मोडल्यास पाच हजारांच दंड आणि दंड न भरल्यास तुरूगांत पाठवून त्या मजुरीतून दंड वसूल करण्याची तरदूत नियमात आहे.

दिव्यांग प्रवासी यांना सहकार्य करण्यासाठी

1) आपल्या कार्य क्षेत्रातील आगार मध्ये कंट्रोल रूमच्या माध्यमातून ध्वनी प्रेक्षकावर याविषयी जनजागृती करावी

2) बस मधील असलेली आरक्षित सीट ही विशिष्ट रंगाने आरक्षित दिसणारी करावी 3) तसेच बसच्या दर्शनी भागावर तसेच प्रत्येक प्लॅटफॉर्म वर या विषयी फलक लावत जनजागृती करण्याचे सहकार्य करावे.

busnews:तसेच यावर काय कारवाई केली याबद्दल आम्हाला पंधरा दिवसाच्या आत कळावे अश्या मागणीचे निवेदन आज सई तांबटकर यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी अध्यक्ष मनोज नगरनाईक शत्रुघन इंगळे
मंगेश अंभोरे शेखर तायडे ,सरदार,मधुकर पाटील आदी हजर होते

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :-

दि. 4/02/2025 रोजी शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट येथे रथसप्तमी निमित्य हळदीकुंकु कार्यक्रम पार पडला कार्यकमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रणाली सायंकार , डॉ. नेहा भेंडे , शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्थेचे सदस्य, नयना आशिष सायंकार ,

मोनिका सतिष कापसे, किर्ती सतिश सायंकार,या कार्यक्रमाचे आयोज‌न शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था मनिषा गायकवाड , अंकिता उंबरकर ,अमृता चावरे यांनी संचालन केले. वैष्णवी शेन्डे, ,मेधा चंदनखेडे , दिपाली ढगे यांनी सहकार्य केले.

जिजाऊ ज्ञान मंदिरात बोधकथा स्पर्धा संपन्न.(Buldhananews)

0

 

दि.05 फेब्रुवारी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदर गड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट येथे स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन बोधकथा स्पर्धा संपन्न झाली. यावेळी विष्णू सिरसाट, तुळशिराम म्हस्के, प्रल्हाद सिरसाट, शकिल सौदागर व शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांची उपस्थिती होती.

सविस्तर वृत्त असे की, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी जिजाऊ ज्ञान मंदिरात विविध स्पर्धा घेतल्या जातात. याचाच एक भाग म्हणून वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी बोधकथा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वर्ग एक ते नऊच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Buldhananews :यात इंग्रजी भाषेची मर्यादा होती. यामध्ये शाळेतील बहुसंख्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्पर्धा यशस्वी केली या स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता 9 वी तील विद्यार्थी तन्मय काळे याने पटकावला तर द्वितीय क्रमांक सातवी तील विद्यार्थीनी देवयानी सिरसाट हिने मिळवला तर तृतीय क्रमांक आयुष घोलप याने पटकावला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धेसाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील शिक्षकांचे सहकार्य लाभले.

तहसील कार्यालयातील खासगी ऑपरेटर बंद करण्याची मागणी ( sangrampurnews)

0

 

“बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसील कार्यालय संबंधित पुरवठा विभागात खासगी ऑपरेटर कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.”

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

“या तक्रारीत शेख कलीम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संग्रामपुर तालुका अध्यक्ष यांनी म्हटले आहे की, पुरवठा विभागात सरकारी कर्मचारी उपलब्ध असतानाही खासगी ऑपरेटरकडून महत्त्वाची सरकारी कामे केली जात आहेत. हे केवळ नियमबाह्य नाही, तर माहिती सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे.”

“शासनाने सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. मात्र, पुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी ओळखपत्राशिवायच काम करत आहेत. यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.”राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संग्रामपुर तालुका अध्यक्ष यांनी आणखी एक गंभीर बाब निदर्शनास आणली आहे. पुरवठा विभागात दाखल होणाऱ्या अर्जांची रितसर नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे अर्जदारांना योग्य वेळी पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.”

“आम्ही अर्ज करतो, पण त्याचा काहीच पत्ता लागत नाही. तहसील कार्यालयात पारदर्शकता हवी.”

“या संपूर्ण प्रकरणावर आता तहसीलदार काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात येणार असल्याचे समजते.”

sangrampurnews:”सरकारी कार्यालयांमध्ये खासगी हस्तक्षेप थांबवला जाईल का? प्रशासन काय पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष राहील.”

शहर स्वच्छ करा नसता शहरातील घाण कचरा नगरपरिषदेत टाकू डॉ. गोपाल बछीरे (Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

Lonarnews:लोणार शहरातील घाण कचरा त्वरित उचलून स्वच्छ करा नसता नगर परिषदेमध्ये शहरातील कचरा आणून टाकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांनी नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

लोणार शहरात गत एक महिन्या पासून घाण कचरा उचलला जात नाही त्याचे व्यवस्थापन होत नाही नगरपालिकेचे कर्मचारी कुठल्याही प्रकारचे कचऱ्याचे नियोजन करत नाही आणि त्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या कारणाने कित्येक सामान्य नागरिक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे यास सर्वस्व नगरपरिषद जबाबदार आहे.

म्हणून त्वरित कचऱ्याचे व्यवस्थापन करा शहरातील कचरा उचला शहर स्वच्छ करा अन्यथा शहरातील संपूर्ण घाण कचरा आपल्या कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल

Lonarnews:असा इशारा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी लोणार नगरपरिषदचे मुख्यअधिकारी यांना दिला, याप्रसंगी तालुकाप्रमुख एड. दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधाव, शहर संघटक तानाजी मापारी, सुदन अंभोरे, अल्पसंख्यांक सेनेचे तालुकाप्रमुख ऊमर सय्यद, गणेश सोलंकी, तालुका संघटक कैलास अंभोरे, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, , यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते