Home Blog Page 592

जळगाव न प चे मुख्य अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नगरसेवकांचा आत्महत्येचा प्रयत्न

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी :-

जळगाव जामोद नगरपरिषद चे वादग्रस्त अधिकारी आशिष बोबडे हे नेहमीच वादात रहात असून विरोधी पक्षाचे नगरसेवकांना विश्वासात न घेता नगरपरिषद चा कारभार करत आहे. याच प्रमाणे जळगाव शहराच्या मध्यभागी असलेले दुर्गा चौकातील व्यापारी संकुल मधील गाळेलिलावाची कोणालाच माहीत नसताना ती ई निविदा काढली व आपल्याजवळील ठेकेदारांना व लोकांना त्याच्यामध्ये हर्रासी साठी निविदा भरायला सुरुवात केली होती वास्तविक पाहता शहरांमध्ये लाऊड स्पिकर फिरून शहरांमध्ये माहीती देणे बंधनकारक असल्यावरही मुख्याधिकारी यांनी तसं न करता आपली मनमानी केली याचाच जाब विचारला व जळगाव नगरपरिषद मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच व्यापारी गाळेलिलावाची मुदत वाढून व्यापारी गाळे गरजूंना मिळावीत यासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला असता त्यांनी समाधान कारक उत्तर न दिल्याने त्या ठिकाणी वातावरण तापले म्हणून नगरसेवक गजानन वाघ, रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्या चा प्रयत्न याठिकाणी केला शिवसेनेचे नगरसेवक गजानन वाघ व रमेश ताडे हे अंगावर पेट्रोल घेत असताना त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित होते म्हणून एक मोठा अनर्थ त्या ठिकाणी टडला हे सगळं पाहून मुख्याधिकारी यांनी माघार घेत व्यापारी गाळे लिलावाची मुदतवाढ करण्याचा लेखी आश्वासन नगरसेवक गजानन वाघ ,रमेश ताडे , अर्जुन घोलप कृष्ण केदार, संदीप मानकर यांना दिला. त्यानंतर त्याठिकाणी तापलेला वातावरण शांत झाल्याचे दिसून आले मुख्यधिकारी यांच्या ह्या मनमानी कारभाराला पाहून शहरातील जनता रोष व्यक्त करत आहे.

काळे हास्पिटलवर महिलांचा हल्ला दवाखान्याची तोडफोड, डॉक्टर कुटूंबियांना मारहाण

0

 

अनिलसिंग चव्हाण

बुलडाणा – साखर खेर्डा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मौजे शेंदुर्जन येथील डॉ शिवकुमार काळे यांच्या दवाखान्यावर आज दि 6 नोव्हेंबरचे दुपारी संतप्त महिलांनी हल्ला करुन दवाखान्याची तोडफोड करीत डॉक्टरसह कुटूंबियाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, पंधरा दिवसांपुर्वी येथील शिक्षक यांच्या बारा वर्षीय मुलाचा बुलडाणा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तत्पूर्वी सदर मुलावर शेंदुर्जन येथे डॉक्टर काळे यांनी प्रथमोपचार केले होते मात्र डॉक्टर काळे यांनी चुकीचे उपचार केल्याने आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृताच्या कुटुंबियांनी सबंधीतांकडे केली होती यामध्ये डॉ काळे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. पंधरा दिवसानंतर मृतक कुटुंबातील विस ते तिस महिला अचानक डॉक्टर काळे यांच्या दवाखान्यावर धडकल्या व त्यांनी डॉक्टरची कार, दवाखान्याची तोडफोड करायला सुरुवात केली आत घुसून डॉ काळे, पत्नी, मुलगा, मुलगी यांना लाठ्याकांठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली दरम्यान डॉक्टर काळे यांनी घराचे दरवाजे बंद करून आत जीव मुठीत धरून वाचवा वाचवा ची विनवणी करीत होते दरम्यान साखरखेर्डा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सदर महिलांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले असून वृत्त लिहीपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नव्हती.

सूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या राशी 659 कंपनीच्या विरोधातील तक्रारीवर कृषी अधिकारी यांनी केली शेताची पाहणी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या झाडांना कमी प्रमाणात बोंडे लागली व काही झाडांना तर बोंडे लागलीच नाही व लागलेल्या बोडांना सुरवातीपासूनच कीड लागलेली आहे व मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे या वर्षी आधीच संकटात सापडलेल्या अवस्थेत शेतकरी असताना अशा परिस्थितीत राशी कंपनीचे 659 वान पेरून उत्पन्न न झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे व कंपनीने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे तरी आपण सदर शेताची पाहणी करून पंचनामा करून कंपनीवर कायदेशीर कारवाई ची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांचा झालेला खर्च व उत्पादन खर्च त्याल त्यानुसार मोबदला शेतकर्‍यांना देण्यात यावा अशी तक्रार 2 नोव्हेंबर रोजी दिली होती त्यानुसार आज कृषी अधिकारी वाकोडे साहेब व पंचयातसमिती कृषी विभागाचे नावकर साहेब यांनी शेताची पाहणी केली व पंचनामा केला तक्रारदार शेतकरी यांनी राशी सिड्स कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कृषी अधिकारी यांचेकडे केली आहे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेगाव मध्ये रास्ता रोको आंदोलन

0

शेगाव :- प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने दि.5/11/2020 रोजी शेगाव तहसील चोक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून.
शेतकरी विरोधी कृषी विधेयक सरकारने रद्द करावे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना किमान पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
तालुक्यातील आनेवारी वस्तुनिष्ठ 50% च्या आत घोषित करावी.
पिक विमा कंपन्यांना सरसकट 100% पिकांना विमा देण्याची सक्ती करावी.
कापसाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी तात्काळ सीसीआयची खरेदी केंद्र चालू करण्यात यावे. या सर्व मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रास्ता रोको करून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. मागण्या पूर्ण झाल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा या वेळी देण्यात आला असून स्वाभिमानि शहर अध्यक्ष गोपाल तायडे, सागर महेंगे, अतुल तायडे, सागर भगेवर,
ऋषीं बघे, संकेत मुंडे, विशाल पाखरे, यदी कार्यकर्ते उपस्तित होते.

धनगर समाजावर अत्याचाराचे सत्र थांबता थांबेना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट चा गैर फायदा घेऊन सरपंच आणि त्यांचे सर्व कुटुंब धनगर समाजाला शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याची देत आहेत धमकी

0

 

सविस्तर विषय माहिती महाराष्ट्रामध्ये महा आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून धनगर समाजावर अत्याचाराचे प्रमाण खूप वाढले त्याचाच एक भाग
ग्राम कोल्हाडी तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथील काही दिवसापूर्वी गावातील अस्वच्छ गटारींची बातमी स्थानिक मीडिया वर आल्यामुळे येथील सरपंच पती सोपान सुरळकर आणि त्याचा भाऊ ज्ञानेश्वर सुरळकर यांच्या जिव्हारी लागली आणि लागताच त्याच दिवशी आणि लगातार रोज दारू पिऊन सर्व स्थानिक मीडिया ना शिवीगाळ करत त्यातील कोतवाल ज्ञानेश्वर सुरळकर हा बनावट पत्रकार आहे असे सांगत तेथील स्थानिक नागरिक आणि धनगर समाजाच्या वस्तीत जाऊन तेथील सर्व धनगर समाजाला शिवीगाळ करू लागला आणि धमकी देत सर्व समाजाला खालच्या पातळीवरील शिवीगाळ करू लागला त्यामुळे तेथील सर्व धनगर समाज यांनी दिनांक 04,11,2020
पोलिस तक्रार करत स्थानिक आमदार श्री चंद्रकांत पाटील,बिजेपी नेते गोपीचंद पडळकर,राज्य मंत्री दत्तात्रय भरणे साहेब,माजी मंत्री राम शिंदे साहेब यांच्या महितिस्तव सर्व धनगर समाज च्या सहिनिशी निवेदन सादर करण्यात आले यामुळे कोल्हाडी गावात वातावरण खूप नाजूक आहे त्यामुळे अश्या कायद्याचा गैर वापर करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे नाही तर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही

अभिनेता विजय राजला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोंदियात अटक

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

रन चित्रपटातील कौवा बिरयानी फ़ेम अभिनेता विजय राज

गोंदिया ३ : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे शेरनी चित्रपटाचे चित्रिकरन सुरु असुन चित्रपटाच्या शूटिंग क्रूमधील महिलेची छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून विजय राजला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोंदियाच्या रामनगर पोलीस यांनी अटक केली आहे.
अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी या चित्रपटाचे शूटिंग गोंदिया शहरापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू आहे. यासाठी चित्रपटाचा क्रू गोंदियातील हॉटेल गेटवेमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामास आहे. यावेळी शूटिंग क्रूमधील ३० वर्षीय महिलेची विजय राजने छेडछाडकेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.
शूटिंग क्रूमधील महिलेने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी कलम ३५४ (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज याला अटक करण्यात आली आहे.

महावितरणने पंधरा दिवसात आदिवासी भागांमध्ये लाईन चालू करण्याचे स्वप्न दाखवून … कुंभकर्णा सारखे झोपले

0

 

आदिवासी भागांमध्ये राजकीय लोकांच्या ढवळाढवळी मुळे आदिवासी विद्युत लाईन पासून वंचित…

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांचे पुनर्वसन 2017 ला झाले.
सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिंगळी बु जवळ असलेल्या एक किलोमीटर अंतरावर रोहन खिडकी गाव बसले त्या ठिकाणी तीन वर्षे होऊन सुद्धा कुठल्याही उपाययोजना झाल्या नव्हत्या पण सोनाळा येथील महावितरण अधिकारी श्रीराम बोदळे यांच्या पाठपुराव्याने त्याठिकाणी विद्युत लाईन जी मंजुरात देण्यात आली. मंजुरात देऊन बोदडे यांनी आपल्या कार्य पंधरा दिवसात पूर्ण केले. काम पूर्ण होऊन दोन महिने झाले. पण पण वरिष्ठ महावितरणचे अधिकारी त्या ठिकाणी परवानगी देण्याकरता टाळाटाळ का करत आहेत. महावितरणचे यामध्ये काही काळा घोर तर नाही ना असा प्रश्न असल्याने त्या ठिकाणी लाईन सुरू होत नसल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे.
महावितरणला आदिवासी भागांत लाईन द्यायचं नव्हती तर रिकामा तमाशा आदिवासी बांधवांना का दाखवला. व त्यांना आठ दिवसात लाईन चालू करण्याचे स्वप्न का दाखवले असा प्रश्न आदिवासी बांधव करत आहेत.

(1)प्रतिक्रिया / सतीश कुमार वानखडे
संभाजी बिग्रेड जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा

आदिवासींना पंधरा दिवसात लाईन देण्याचे स्वप्न दाखवून राजकीय नेत्या सारखे भरोशावर बसवले…

सांडपाण्याचे व्यवस्थापन करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा. स्वाभिमानी चा आंदोलनाचा इशारा

0

 

शेगाव काँग्रेस नगर वार्ड 5 येथील सांडपाण्या ची व्यवस्थापना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सांडपाणी जाण्याकरिता भुयारी गटारीचे व्यवस्था सांडपाणी जाण्याकरिता करावा लागेल
सांड पाण्याला जाण्याकरिता मार्ग नसल्याने घरगुती सांडपाणी तिथेच साचून राहते या मुळे साथीच्या रोग, डेंगू, मलेरिया चा मोठया प्रमाणात फेलाव होऊ शकतो सध्या उद्भवलेल्या वैशेषिक माहाणारी असेलेल्या कोविड 19 ( कोरोना ) च्या प्रादुर्भाग मुळे परिस्तिथी अत्यंत गंभीर होत चालली आहे. दिवसा गणित नवीन रुग्णाची संख्या वाढतच आहे. काँग्रेस नगर परिसरात नेहमी स्वरूपात जंतू नाशक फवारणी. सफाई कामगार द्वारे साफ सफाई होणे गरजेचे आहे.परंतु तसे न होता सांडपाणी वेवस्थापनेत होत असलेला निष्काळजीपणा तिथ राहत असलेल्या नागरिकांच्या जीवावर उठलेला आरोग्यास धोका उदभवलेला आहे. शेगाव नगर परिषद ही स्वछता पारितोषिक सन्मानित आहे.
त्या मुळे अश्या समस्या कळे गांभीर्याने लक्ष दयावे.
समस्या चे समाधान न होत नसल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना वतीने देण्यात आला असून या वेळेस *स्वाभिमानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे.* आकाश भालेराव.,रामा दुतोंडे, गजानन तायडे, आकाश शेगोकार, अयुब शेख. हे कार्यकर्ते उपस्तित होते.

डॉक्टर तो भगवान का रूप होता है??? अकोल्यातील डॉक्टरने विकलांग युवती सोबत केले गैरवर्तन,डॉक्टर वर विनयभंगाचा गुन्हा दाखल

0

 

अकोला – कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अकोला शहरात घडली आहे. डॉक्टररांनपासून कोणतीही गोष्ट लपविली तर आपणच गोत्यात येतो असे बोलले जाते मात्र याच गोष्टींचा फायदा अनेक जण उचलत असतात त्यातुन विनयभंग सारखे गुन्हे घडत असतात असाच प्रत्यय आज अकोल्यात आला आहे. खामगाव जिल्ह्यातील एक छोट्याशा गावात राहणाऱ्या परिवरराती एक पीडिता आपल्या आई आणि भावा सोबत अकोल्यात आली दोन वर्षांपासून पोटात दुखत असल्याने दुर्गा चौक स्थित पुरुषोत्तम तायडे यांच्या अमृत हॉस्पिटलमध्ये तपासणी साठी आली असता सदर डॉक्टर ने तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला आपल्या कॅबिन मध्ये झोपवले पीडितेचा आईला व भावाला शंका आल्याने त्यांनी या नराधम डॉक्टर आत के करतो आहे पाहण्याच्या प्रयत्न केला असता या डॉक्टर ने पीडितेच्या आई व भावाला कॅबिन बाहेर काढले व व पीडिते सोबत गैरवर्तन केले असता पीडितेने या नराधम डॉक्टर च्या कानशिलेत पेटवली थोड्या वेळाने तपासणी होताच सदर पीडितेने कॅबिन मध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगताच पीडितेच्या भावाने रामदास पेठ पोलीस स्टेशन गाठून गुन्ह्या नोंदविला डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप करीत पोलीस स्टेशन गाठल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरणात डॉक्टर पुरुषोत्तम तायडे याला रामदास पेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये 354, 376,C (D) L, 377 कलम खाली गुन्ह्या नोंदविला. विशेष बाब म्हणजे पीडिता ही विकलांग असल्याने या नराधम डॉक्टरावर रोष व्यक्त होत आहे सदर ची कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेशन चे ठाणेदार आव्हाळे, PSI नरेंद्र नरेंद्र पद्मने, प्रशांत इंगळे, श्रीकांत पतोंड, विशाल चव्हाण यांनी केली

मोताळा तालुक्यातील वनहक्क दावेदारांवर वन व महसूल प्रशासनाकडून अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी- के जी शाह

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा :- तालुक्यातील उबाळखेड , माळेगाव , मोहेगाव , रोहिनखेड , राहेरा , लोणघाट , दाभा , कोऱ्हाळा , खडकी , गुलभेली , खैरखेड , कोथळी , तरोडा , वारुळी इत्यादी गावातील वनजमिनिवर अतिक्रमण केलेल्या वनहक्क कायद्यानुसार दावे दाखल झालेल्या वनहक्क दावेदारांचे एकूण 262 वनहक्क दावे मा. उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष उपविभागीय स्तरीय समिती यांनी दि. 29/10/2020 रोजी मोताळा तहसील कार्यालयात ग्रामस्तरीय वनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सदर दाव्यातील त्रुटी पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत सदरचे 262 वनहक्क दावे मोताळा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार महसूल यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत
सदर दावे महाराष्ट्र शासनाच्या दि 18/05/2018 रोजीच्या परिपत्रकानुसार तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 , नियम 2008 , सुधारित नियम 2012 अंमलबजावनीचे प्राधिकार व कार्यपद्धती नुसार संबंधित दाव्याची पडताळणी करण्याबाबत व वनहक्क कायद्यातील कलम 12 क (1) प्रमाणे वनहक्क समितीच्या व दावेदऱ्यांच्या उपस्थितीत वन व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ताब्यात असलेल्या अतिक्रमण शेतजमिनीच्या स्थळ निरीक्षण व ताब्यात असलेल्या जमिनीचे पंचनामे तसेच मागणीचे क्षेत्र निश्चित करणारा नकाशा , वनविभागाचा नमुना-अ इत्यादी वनहक्क दाव्याच्या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांनी माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर यांना याआधीच पत्र क्र . 1822/2020 दि. 22/05/2020 नुसार दिले आहे .
असे असतांना , मोताळा तालुक्यातील वनहक्क दावेदाऱ्यांच्या संदर्भात पंचनामे व स्थळ निरीक्षण अहवाल तयार करतांना तसेच दि 11 मे 2018 च्या शासन परिपत्रकाप्रमाणे वनमित्र मोहीम राबविताना वनहक्क दावेदारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी याबाबत आज दि 3/11/2020 रोजी मा तहसीलदार मोताळा यांना भूमिहक्क परिषदेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले आहे सदर निवेदनाच्या प्रती मा. आयुक्त अमरावती , मा. जिल्हाधिकारी बुलडाणा , मा. उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना सादर करण्यात आले आहे .
निवेदन सादर करतांना शिष्ट मंडळामध्ये संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड , मोताळा तालुकाध्यक्ष भास्कर धुरंधर , संघटनेचे महासचिव रामकृष्ण मोरे यांच्यासह शिवदास घोती , उत्तम मोरे , तेजराव चव्हाण , आत्माराम फुलमाळी , पुनमचंद डांगे , संतोष चव्हाण , अनुसया वाकोडे उपस्थित होते.