Home Blog Page 593

सूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिले राशी सिड्स 659 कंपनीच्या विरोधात तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या झाडांना कमी प्रमाणात बोंडे लागली व काही झाडांना तर बोंडे लागलीच नाही व लागलेल्या बोडांना सुरवातीपासूनच कीड लागलेली आहे व मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे या वर्षी आधीच संकटात सापडलेल्या अवस्थेत शेतकरी असताना अशा परिस्थितीत राशी कंपनीचे 659 वान पेरून उत्पन्न न झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे व कंपनीने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे तरी आपण सदर शेताची पाहणी करून पंचनामा करून कंपनीवर कायदेशीर कारवाई ची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांचा झालेला खर्च व उत्पादन खर्च त्याचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यात यावा अशा आशयाची तक्रार दिली आहे व तक्रारीची प्रतिलिपी तहसीलदार जळगाव जामोद यांना दिली आहे तक्रारीवर गजानन सोनटक्के सुरेश ढगे प्रमोद राऊत सुमित्राबाई राजपूत आदिच्या सह्या आहेत

सत्याग्रह शेतकरी संघटनेचा अयाज भाऊ शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्व नियमांचे पालन करून शेगांव तहसील येथे आकाल मोर्चा काढण्यात आला

0

 

मागच्यावर्षी ओला दुष्काळ ने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले होते. ते संकट झाले न झाले यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनची दोन ते तीन वेळा पेरणी करावी लागली. असे वाटले उडीद, मुगाचे पीक आम्हाला साथ देईल पण तेही निसर्गाने आमच्यापासून हिवरून घेतले. तिळाचे पीक सुद्धा आले नाही. आणि कपाशी पीक सुद्धा मोठया प्रमाणात जास्त पाण्याने बोड्या सोडल्यामुळे हातातून गेले.
शेतात एवढी कसरत करून सुद्धा रोगराई अतिवृष्टीमुळे सोयाबिनला हिरवा गच्च पाला दिसला पण उत्पन्न मात्र आले नाही. एकरी एक ते दीड क्विंटल पेक्षा कमी उत्पन्न आले असून यात सोयाबिन काढणीचा सुद्धा खर्च निघाला नाही. त्या मुळे आत्ता वर्षभराचा घर खर्च, शिक्षण, आजाराचा खर्च , कसा भागावायचा व उदरनिर्वाह तरी कसा करायचा हाच प्रश्न पडला आहे . पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाल्या मुळे सगळ्या पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची येणारी दिवाळी अंधारात जाणार आहे. आमच्या मंडळाची नजर अंदाज आनवरी 65 पैसे इतकी दाखवली आहे परंतु उत्पन्ना सारखे दिसत नसतांना नजर अंदाज आणेवारी 65 पैसे आली तरी कशी ? खरं तर ही आणेवारी 30 पैसे च्या आत यायला पाहिजे होती ही वस्तुस्थिती आहे, पण ती खरी आणेवारी दाखवली नाही. तरी आम्हला यात शंका वाटत आहे म्हणुन हा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यानं पुढे खूप मोठे आर्थिक संकट आहे . म्हणून शेगांव तालुका दुष्काळ ग्रस्थ घोषित करून दुष्काळाच्या सर्व सवलती पीक विमा तात्काळ लागू करण्यात यावा अन्यथा या सवलती लागू न झाल्यास 15 दिवसा नंतर आम्ही सर्व शेतकरी आमच्या कुटुंबासह आपल्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू. याची दक्षता घ्यावी ही विनंती

राजू नाकाडे(जिल्हा संयोजक)
अयाज शेख(युवा आघाडी अध्यक्ष)
आकाश देशमुख(युवा आघाडी)
गणेश सडतकार(युवा आघाडी)
अमीर शहा(अल्प.युवा आघाडी)
शब्बीर शेख(अल्प.ता.अध्यक्ष)
मोहन कवरे(युवा ता.अध्यक्ष)
मनीष खवले(ता.संपर्क प्रमुख)
गणेश भंबेरे(ता.अध्यक्ष)
गोपाल बाठे संजय फाटे अनिल कवडे अनिल गव्हादे
भागवत मिरगे
नथुराम बेळूरकर
विष्णू फायके
शिवा भाऊ पाटील
आत्माराम पाटील
सागर जवंजाळ
गोपाल गावंदे.पवन चव्हाण वसंतराव पहुरकर
शुभम पहुरकर शब्बीर खान मनोज बेलोकार प्रथमेश साळुंके
शेख सत्तार शेख इस्माईल शेख लतीप शेख आजाम व सत्याग्रह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते

वरवट बकाल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीबांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे दानशूर व्यक्तीमत्व मा. शंकरभाऊ पुरोहित यांना महाराष्ट्र बहुजन ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार

0

 

संग्रामपूर – आज वरवट बकाल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीबांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे दानशूर व्यक्तीमत्व मा. शंकरभाऊ पुरोहित यांना महाराष्ट्र बहुजन ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल संग्रामपुर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला…
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरवट बकाल चे ग्राम पंचायत सदस्य चक्रधर इंगळे होते तसेच प्रमुख उपस्थितीत जेष्ट नेते देविदास दामोदर , माजी पंचायत समिती सदस्य दशरथ भाऊ सुरडकर , आबाराव इंगळे , पंचायत समिती सदस्य शेषराव खंडेराव , संजु भाऊ इंगळे असंख्य समाज बांधव उपस्थित होते… बोलतांना देविदास दामोदर यांनी सांगितले की सत्कार त्यांचाच होतो ज्यांचे सत्कार्य असते…. प्रास्ताविक राहुल इंगळे सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन विजयभाऊ पहुरकर यांनी केले .. आभार संजु भाऊ इंगळे यांनी मानले.तालुक्यातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते…

दखल सूर्या मराठी न्युज ची सुनगाव येथील वार्ड नंबर 6 मध्ये सफसफाईचे काम सुरू

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत येथे वार्ड6 नंबर सहा मध्ये नाल्या गेल्या कित्येक दिवसांपासून साफ केलेल्या नाहीत व ग्रामपंचायत सफाई कामगार सुद्धा वार्ड नंबर 6 मधील सुनील खवले यांच्या घरासमोरील नाल्या साफ करीत नाही त्या नाल्या ब्लॉक होऊन त्यामधील केरकचरा घाण रोडवर येत आहे व त्या घाणीमुळे नागरिकांना रस्त्यावर चालतासुद्धा येत नाही व त्या घाणीचा दुर्गंध परिसरात पसरून परिणामी सदर गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी या संबंधित बाबीचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी वार्ड नंबर सहा मधील नागरिकांनी केली आहे ही बातमी प्रसारित होताच ग्रामपंचायत प्रशासन जागे होऊन वॉर्ड न 6 मध्ये सफाई कामगारांकडून साफ सफाईचे काम सुरू केले

जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन…

0

 

 

 

गजानन सोनटक्के
जळगांव जामोद प्रतिनिधी:-

आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटी जळगाव जामोद च्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जळगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाची पिके अत्यल्प स्वरूपात शेतकऱ्यांच्या हातामध्ये येत आहेत या पिकांमधून शेतकऱ्यांचा शेतीमाल तयार करण्यासाठी खर्च निघणे कठीण झाले आहे त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याचे आनेवारी 54 टक्के जाहीर करून प्रशासनामार्फत शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आलेले आहे यामुळे पीक विमा ही शेवटची आशा आहे दुसर होताना दिसत आहे करिता जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 24 तास राबणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनामार्फत पिकाची योग्य ती आणेवारी जाहीर करून त्यांना या संकटातून शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर करावा यासाठी निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर अविनाश उमरकर, डॉक्टर स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील,ज्योतीताई ढोकणे, बाल गजानन पाटील, युनूस खान, अमर पाचपोर, राजू भाऊ घुटे, अर्जुन घोलप, आदींच्या सह्या आहेत.

जामोद महावितरण केंद्राचा भोंगळ कारभार वरिष्ठ अधिकारी यांचा आशीर्वादाना सर्रास चालू आहे अवैधरित्या कनेक्शन स्थानिक कर्मचाऱ्यांचा काही साटंलोटं तर नाही ना असा सवाल

0

 

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद उपविभागातील जामोद वितरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या करमोळा गावांमध्ये सर्रासपणे वीजचोरी चालू आहे जामोद ते टुनकी रोड वरती तीन ढाब्यावरती वरिष्ठ अधिकारी यांचा आशीर्वादाने सर्रासपणे अवैधरित्या विजेची चोरी होत आहे तरीपण महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कुंभकरण झोपीतच नाटक करताना दिसत आहे तसेच आजूबाजूच्या खेळामध्ये सुद्धा अवैधरित्या चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे या अवैध कनेक्शन मुळे बऱ्याच वेळा महावितरण चे तार तुटण्याच्या पण प्रकार वाढत आहे तसेच या गावांमधील ट्रांसफार्मर वरील फ्युज जाण्याचे प्रकार होत आहे तसेच करमोळा भागांमध्ये लाईट जाण्याचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तरी महावितरण वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का अशी मागणी येथील नागरिक करीत आहे

सुनगाव येथील वार्ड नंबर 6 मध्ये घाणीचे साम्राज्य

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत येथे वार्ड6 नंबर सहा मध्ये नाल्या गेल्या कित्येक दिवसांपासून साफ केलेल्या नाहीत व ग्रामपंचायत सफाई कामगार सुद्धा वार्ड नंबर 6 मधील सुनील खवले यांच्या घरासमोरील नाल्या साफ करीत नाही त्या नाल्या ब्लॉक होऊन त्यामधील केरकचरा घाण रोडवर येत आहे परिणामी सदर गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी या संबंधित बाबीचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी वार्ड नंबर सहा मधील नागरिकांनी केली आहे

तिरोडा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प मार्गी लावून हरितक्रांती आणण्याचे प्रयत्न- खासदार प्रफुल पटेल

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

तिरोडा,01- शेतकरी समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आपला मानस आहे. यासाठी आपण प्रयत्नरत आहो. जिल्ह्यातील सिंचन सुविधेत वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून प्रलंबित प्रकरणांची कामे लावण्यात येत आहे. यासाठी बावनथडी, सोंड्याटोला, धापेवाडा हे प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून धापेवाड्याचे उर्वरित काम आणि गोंदिया तालुक्यातील अनेक उपसा सिंचनाचा मार्ग मोकळा करुन हरितक्रांती परिसरात दिसून येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले. तिरोडा येथील कुंभारे लाॅन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत ते शनिवारी बोलत होते. खासदार पटेल म्हणाले, शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे यंदाही धानाला ७०० रुपये बोनस देण्यात येईल. धानाचे विक्रमी उत्पादन यावर्षी झाले. त्यामुळे अधिकची मदत अंदाजे १४०० कोटी रूपये बोनस शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्पांचे काम पूर्णत्वास आली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे, असे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागल्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शासनातर्फे धानाला २५८८ रुपये बोनससह भाव मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानण्यात आले.सभेचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांनी केले.सभेला माजी खासदार डाॅ. खुशालचंद्र बोपचे,माजी आमदार राजेंद्र जैन, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,माजी सभापती निता रहागंडाले,रायुकाँ नेता रविकांत बोपचे,माजी नगराध्यक्ष अजय गौर,तालुकाध्यक्ष प्रेम रहागंडाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

धानाला तुडतुडा रोगाची लागण, शेतकऱ्यांनी उभ्या पिकाला लावली आग

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया – जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जे काही थोडे फार धानपीक वाचले तेही तुडतुडा रोगाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील शेतकरी धानपिकाला आग लावत आहे.गोंदिया तालुक्यातील लोहारा येथील शेतकर्याने शेतातील उभे पिक जाळले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.याची माहिती मिळताच काँग्रेस नेते अशोक(गप्पू)गुप्ता यांनी सदर शेतकर्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. पूर्व विदर्भात धानपिकाची सर्वात जास्त लागवड ही गोंदिया जिल्ह्यात केली जाते. या वर्षी कोरोनामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला होता. त्यात परतीच्या पवासाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता मावा, तुडतुडा रोगामुळे थोडेफार हाथी येणारे पीकही नष्ट झाले आहे. पेरणी, रोवणी, खते, बियाणे याला एकरी २० हजार रुपये खर्च येतो. मात्र, पीक नष्ट झाल्याने हा खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. तसेच, जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, विवंचनेत असलेला शेतकरी धानपिकांना आग लावत आहे. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.

अंभोराजवळ अपघात,मोटारसायकलस्वार ठार

0

 

गोंदिया-शैलैश राजनकर

साखरीटोला : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या जुलमी कायद्यांविरोधात देशभर असंतोषाचे वातावरण आहे. महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसने सर्वत्र गाव तिथे आंदोलन अभियानाला सुरुवात केली आहे. शनिवार दिनांक 31 ऑक्टोबरला गावागावात मशाल आंदोलन झाले. याचाच एक भाग म्हणून साखरीटोला येथे सायंकाळी 6 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते जगनाडे चौक मशाल रॅली आयोजित करण्यात आली.या रॅली मध्ये सुमारे ३१ मशाली पेटवून शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यात आले

या आंदोलनात काँग्रेसचे आमदार ना. सहसराम कोरॉटे गोंदिया जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ नामदेव किर्सान ,गोंदिया जिल्हा कॉंग्रेस किसान कमिटी चे अध्यक्ष जितेश राणे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराळे, जिल्हा कॉंग्रेस ओबीसी आघाडी चे अध्यक्ष जितेंद्र कटरे ,जिल्हा किसान काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष राजीव ठाकरे, जिल्हा किसान काँग्रेस समन्वयक हल्मारेजी,जिल्हा सचिव राजू काळे,जिल्हा कॉंग्रेस महिला प्रतिनिधी वंदना ताई काळे,माजी जिल्हा परिषद सभापती लता ताई दोनोडे ,सालेकसा तालुका अनु जाती अध्यक्ष मिलिंद गजभिये, सरपंच संगीता ताई कुसरम, वरिष्ठ काँग्रेस नेते डॉ संजय देशमुख,डॉ,अजय उमाते, उमेश दोनोडे, शैलेस दोनोडे , तंटा मुक्ती अध्यक्ष संतोष देशमुख, माजी सरपंच,संतोष बोहरें,अशोक मेहर, कोरेजी,तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रशांत लील्हारे,आमगाव तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गणेश हुकरे, आमगाव तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष संजय बहेकर, सालेकसा तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मनोज गजभिये,सालेकसा तालुका किसान काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष संजय बागडे,सालेकसा तालुका किसान काँग्रेस कमिटी चे महासचिव देवराज खोटले, व जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

एक देश एक बाजारपेठ, करार शेती व जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायद्यातील तरतुदी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी प्रचंड घातक ठरणार आहेत. त्यामुळेच या विरोधात देशभर प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे फोटो लावून त्याचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. देशात प्रथमच शेतकऱ्यांमध्ये एवढी चीड दिसून येत आहे.
या प्रसंगी नरेंद्र मोदींचा चे शेतकरी विरोधी काळे कायदे यांची मुठ माती देण्यात आली आणि या ३ कायदा ना प्रखर विरोध करून या ५ दिवसाची आंदोलनाला सांगता. करण्यात आली.. या प्रसंगी या कार्यक्रमाचे संचालन किसान काँग्रेस कमिटी चे महासचिव देवराज खोटेलें, आणि आभार प्रदर्शन किसान काँग्रेस कमिटी चे आमगाव तालुका किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गणेश हुकारे यांनी केले..शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता या कायद्यांचा विरोध करावा व आंदोलनात सहभागी व्हावे. हे कायदे रद्द होई पर्यंत किसान काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करावा असे आवाहन गोंदिया जिल्हा किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष जितेश राणे यांनी केले आहे..