Yavalnews :जळगाव विमानतळावर वैयक्तिक प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, हवाई प्रवासाची वाढती मागणी आणि जळगाव व परिसरातील लोकांच्या वाढत्या आकांक्षा लक्षात घेता, जळगाव विमानतळावरील विद्यमान पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची तातडीची गरज असुन जळगांव विमानतळ येथे प्रवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी विविध विविध विकास कामांचा विस्तार करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांची नागरी विमान वाहतूक मंत्री श्री.राम मोहन नायडू किंजरापु यांची भेट घेऊन मागणी केली.
यावेळी श्रीमती खडसे यांनी जळगाव शहराचे व विमानतळाचे भौगोलिक महत्व अधोरेखित करून या विमानतळावरून वाढत असलेली प्रवासी संख्या लक्षात घेता वर्तमान धाव पट्टीचा (रन वे) विस्तार करण्याची प्रमुख मागणी या पत्राद्वारे केली आहे.
धाव पट्टीचा विस्तार केल्यामुळे बोईंग सारखी मोठी विमाने सुद्धा या विमानतळावर सेवा देण्यास सक्षम ठरतील व प्रवासी क्षमता वाढून जळगाव या शहराला अधिकाधिक अन्य शहरांशी हवाई मार्गाने जोडता येईल. दुसरी महत्वाची मागणी जी केली आहे ती म्हणजे वर्तमान विमानतळाचे टर्मिनल वाढती प्रवाशी संख्या हाताळण्यासाठी अपुरी पडत असल्याने या टर्मिनल संख्या वाढऊन लवकरात लवकर विस्तारीकरण करण्यात यावे ही आहे.
या दोघही सुधारणा केल्या मुळे एकूणच जळगाव विमानतळावरून सेवा देणाऱ्या विमानांची व ओघानेच प्रवासी संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढून जळगाव शहर, जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील अन्य दोन धुळे व नंदुरबार जिल्हे यांच्या आर्थिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळेल.
Yavalnews :विशेषत्वाने जळगाव ते पुणे व पुणे ते जळगाव या मार्गावर नियमित वाहतूक सेवा उपलब्ध आहे. या संदर्भात माननीय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री यांचेशी झालेल्या सविस्तर चर्चे अनुसार संबंधित मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांना दिले गेले आहे.
Hingnghat:हिंगणघाट:- परभणी येथे संविधान शिल्प विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी.दिल्लीतील शेतकरी आंदोलकांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध.आगामी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता बँलेट पेपरवर घेण्यात यावे याकरिता सर्व पक्षीय द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
परभणी येथे भारतीय संविधानचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्या समोरील भारतीय सविधांचा प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तीस फक्त अटक करून चालणार नाही तर त्यांच्यावर प्रशासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी व परभणी येथिल भीमसैनिकावर गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच संविधान शिल्प विटंबनेचा विरोधात भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली व पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला.
अमानुष मारहाणीमुळे हि घटना घडली असून यास जबाबदार असलेल्या सबंधित कर्मचाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना तात्काळ न्याय मिळून यावा.
नोव्हेंबर २०२० मध्ये दिल्ली सीमेवर सुरु झालेले शेतकर्याचे आंदोलन एक वर्ष चालले. सर्वाच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर केंद्र सरकारने शेतकर्यांचे नुकसान करणारे तीन कायदे स्थगित केले. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, म्हणून १३ फेब्रुवारी २०२४ पासून शेतकरी आंदोलन करीत आहेत.
शेतकऱ्यांचा समस्या समजून त्यावर तोडगा काढण्याऐवजी
त्यांना अमानुष मारहाण करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक करीत आहात.
देशातील बहुसंख्य मतदारांनी ज्या पक्षाला मते दिली, तो पक्ष सरकार स्थापन करतो. यात निवडणूक आयोग आयुक्त कार्यालयाचा धोरणात्मक निर्णयाचा मुख्य आधार आहे. २०१९ च्या सार्वत्रीत निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनबाबत मोठ्या प्रमाणात संशय यायला लागला. तेव्हापासून “माझे मत कुठे गेले ?” हा प्रश्न मतदारांना भेडसावीत आहे.
निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आश्चर्याचा धक्का सहन करावा लागला. या धक्क्यातून सावरण्यासाठी म्हणून काही गावामध्ये मतदारांनी मशीनने दाखविलेले मतदान योग्य असल्याची खात्री करण्याकरिता बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा संकल्प जिल्हाधिकारी व सबंधित यंत्रणेस कळवीला. त्याचा परिणाम असा झाला कि, याकरिता गावातील मतदारांना मतदान करण्यापासून सक्त मनाई करण्यात आली. मतदानाची प्रक्रिया पार पाडता येऊ नये यासाठी पोलिसांना पाठववून जमावबंदी आदेश लागू करून गावातील नागरिकांना मतदान करू दिले नाही. अशा प्रकारे मतदारांनी दिलेले मत कोणत्या उमेदवाराला गेले, याची खात्री करण्याचा प्रयत्न सरकारने हाणून पाडला. त्यामुळेच मतदारांचा ईव्हीएम मशीनवर असलेला संशय खरा ठरतो.
बहुतांश जनतेला ईव्हीएम वर शंका असेल व ‘माझे मत कुठे गेले’ ? हे समजण्यास जर वाव नसेल तर अशा परिस्थितीमध्ये जनतेचा गैरसमज दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आगामी होण्यार्या सर्वच निवडणूका बॅलेट पेपरवर घ्यावे असे निवेदन सर्व पक्षीय समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
Hingnghat:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे, नवीन इंदुरकर, शिवसेनेचे सतीश धोबे, मनीष देवढे, समाजसेवक सुनील डोंगरे, डॉ. उमेश वावरे, बालु वानखेडे, विजय तामगाडगे,शंकर मुंजेवार,संजय धबर्डे, राजेश धोटे, बाळा मानकर, सुरेश मुंजेवार, अनिल मुन, दशरथ ठाकरे, ज्वलंत मुन, सिद्धार्थ मस्के, गोकुल पाटील, अमोल बोरकर, मनीष कांबळे, सुरेश गायकवाड,अतुल नंदागवळी यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
brekingnews:हिंगणघाट दि.१९ डिसेंबर:- बुरकोनी येथील एका अविवाहित युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी मौजा लाडकी शिवारातील रेल्वे गेट क्र.१९ जवळ घडली.
विशाल रमेश चाफले(२६) अशी या युवकाची ओळख असून हिंगणघाट पोलिसांत मृतकावर घरफोडीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा मनस्ताप झाल्याने निराशेपोटी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याचे कुटुंबियांनी केला आहे.
काल पोलिस पंचनाम्यानंतर विशाल याचा मृतदेह शव विच्छेदनाकरीता स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात आणला.
आज गुरुवारी शव विच्छेदन झाल्यानंतर मृतकाचे कुटुंबियांनी आत्महत्येला जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी करीत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.
काल पासूनच मृतकाचे कुटुंबियांसह बुरकोनी येथील नागरिकांनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाचे परिसरात ठाण मांडले असून दोन इसमांसह एका महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दि.१३ रोजी पोलिसांनी विशाल रमेश चाफले याचेवर घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात वर्धा येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मृतकास ताब्यात घेतले होते. गावातील जुन्या वैमनस्यातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा आरोप मृतकाचे कुटुंबीयांनी केला आहे.
मृतकाने आत्महत्या केली त्यापूर्वी त्याला हिंगणघाट येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात चौकशी करिता बोलविण्यात आले होते. अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे,यानंतर त्याने घरी जाऊन शेतावर जातो असे घरच्यांना सांगितले, परंतु शेतात न जाता त्याने निराशेपोटी लाडकी शिवारातील रेल्वेलाईन वरती येणाऱ्या ट्रेनपुढे उडी घेऊन आत्महत्या केली.मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार.
सरकारी दवाखाना येथे
brekingnews:शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले, संबंधीत प्रकरणी पोलिसांनी योग्य चौकशी करावी अशी मागणी केली.
lonarnews:दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथील विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रस्तावनेची एका माथेफिरू इसमाने फाडतोड करून विटंबना केल्यामुळे परभणी येथील आंबेडकर वाद्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले त्यामुळे परभणी येथील पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून त्या ठिकाणी होत.
असलेले आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला संचारबंदी लागू करून बौद्ध वस्तीमध्ये कोंबींग ऑपरेशन केले आणि अनेक कार्यकर्त्यांनवर लाठी चार्ज करून महिला पुरुषांना सुद्धा बेदम मारहाण केली अनेक ठिकाणी वाहनांची सुद्धा तोडफोड केली.
त्याच आंदोलनामध्ये सोमनाथ चव्हाण या युवकाला बेदम मारहाण करून पोलिसांनी पोलीस कोठडी मध्ये ठेवून मारहानकेलयामुळे सोमनाथ चव्हाण यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी अहवाल दिला आहे.
ज्या संविधानावर अख्खा देश चालतो आणि आम्ही त्याचा आदर सन्मान करतो अशा संविधानाची विटंबना करणाऱ्या समाज कंठकावर आणि ज्यांच्या खांद्यावर देशाच्या संरक्षणाची तसेच कायदा व सुव्यवस्था शांतता राखण्याची जबाबदारी सरकारने दिलेली आहे.
अशा पोलीस प्रशासनाकडून कायद्याचा अभ्यास करीत असलेल्या एलएलबी च्या तिसऱ्या वर्षांमध्ये असलेल्या सोमनाथ चव्हाण या युवकाला पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनातील अधिकारी व संबंधितशासकीय अधिकारी दोषी असलेल्या वर कठोर कारवाई करून निष्पक्ष तपासणी करून दोषी असलेल्यांना न्यायालयीन कक्षेत आणावे संविधानाच्या आदर्शाच्या रक्षणासाठी आवश्यक ती कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी या घटनेमुळे आंबेडकरी प्रेमी लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे ते दूर करण्यासाठी त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी.
lonarnews:भारतीय संविधान प्रस्तावनेची विटंबना आणि सोमनाथ चव्हाण यांची पोलीस कोठडी मध्ये हत्या केल्यामुळे या घटनेचा सुलतानपूर पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आलेला आहे अशा आशयाचे निवेदन लोणार तहसीलदार भूषण पाटील यांना सादर केलेले आहे या निवेदनावर भाई सुरेश मोरे शेख निसारभाई संतोष पाटील शेख वसीम भाई विनोद अंभोरे स्वप्निल अवचार राजेश अवचार अमोल अवचारआशा अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत
lonar:परभणी येथील संविधानाच्या अवमान बद्दल दोषीवर कठोर शासन होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या गुढ मृत्यूची एसआयटी चौकशी करा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ऑड दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या वतीने राज्यपालांना देण्यात आला
१० डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे अवमान करण्यात आले त्याबद्दल दोशींवर कडक कार्यवाही व्हावी याकरिता आंदोलक सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी यांनी आंदोलन केले त्या आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.
न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली न्यायालयीन कोठडीत असताना दिनांक १५ डिसेंबर रोजी कोठडीतच त्याचा गुढ मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू की हत्या हे तपासण्यासाठी महामहीम राजपाल यांनी एसआयटी समितीचे गठन करून तपास करण्यात यावा व दोषींवर कठोर कार्यवाही करावी.
अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मा. तहसीलदार लोणार यांच्यामार्फत महामहीन राज्यपालांना देण्यात आला.
lonar:याप्रसंगी जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ऑड दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, यांच्यासह तालुका संघटक कैलाश अंभोरे, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, जेष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, अल्पसंख्यांक सेनेचे शहर प्रमुख इकबाल कुरेशी, महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख संजीवनी वाघ, तालुकाप्रमुख तारामती जायभाये, शहर प्रमुख पार्वतीताई सुटे, नगरसेविका सिंधुताई जाधव, सौ रंजना बछीरे, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख अमोल सुटे, समरजीत बछीरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे आदी उपस्थित होते
Ravikanttupkar:कोल्हापूर, 15\12\2024 रोजी रविकांत तुपकर शेतकरी संघटने चे दबंग नेते कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना आज जयसिंगपूर (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) येथे चळवळीतील जेष्ठ सहकारी श्री. सावकारअण्णा मादनाईक यांच्या निवासस्थानी रविकांत तुपकर यांनी सदिच्छा भेट दिली.
hingnghatnews:हिंगणघाट :- गेल्या काही दिवसात वाघोलीला घडलेल्या 57 निष्पाप विद्यार्थाना विषबाधा झाली प्रकरणात मनसेने घेतली दखल व गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना हिंगणघाट शहर अध्यक्ष याच्या नेतृत्वात दिले निवेदन व निवेदनातून कळविण्यात आले कि ज्या अधिकाऱ्यांचं निष्काळजी पणे मुळे ही धक्कादायक घटना घडली.
त्या संपूर्ण अधिकार्यावर कारवाही करून तात्काळ निलंबित करा व विषबाधित मुलांना आर्थिक साहाय्य गोषित करा अश्या मगण्या करण्यात आल्या मनसेची टीम वाघोली जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यास तिथल्या इन्चार्ज कडून माहिती मिळाली कि शालेय पोषण अधिकाऱ्याचा गेल्या चार वर्षातून एकही राउंड झालेला नाही.
व गट शिक्षण अधिकाऱ्यांचा सुद्धा राउंड झालेला नाही त्यामुळे समोर मोठा प्रश्न उभा होतो कि शालेय पोषण अधिकाऱ्यां शिवाय आहाराला संमती कशी मिळाली
फक्त मुख्याध्यापकच नाही तर शालेय पोषण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी ज्याला आहाराच टेंडर देण्यात आले या सर्व अधिकाऱ्यावर चौकशी करून गुन्हास्पद आढलल्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे असा इशारा मनसेनी दिला.
आणि गट विकास अधिकाऱ्याला निवेदनातून सांगण्यात आले कि हे फक्त शांती निवेदन आहे पण याला फक्त निवेदन समजून फाईल मध्ये ठेऊ नये तर 15 दिवसात तात्काळ करवाही करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीच अंदोलन कराला भाग पाडू नका याची दखल आपण गट विकास अधिकारी पंचायत समिती म्हणून घ्यावी समोरील आक्रमक आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना किव्हा पदधिकारी जवाबदार राहणार नाही.
hingnghatnews:याची दक्षता घ्यावी हा संपूर्ण हा संपूर्ण कार्यक्रम मा जिल्हा अध्यक्ष शंकर पोटफोडे याच्या आदेशानुसार तसेच जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर व तालुका अध्यक्ष पवन तडस याच्या मार्गदर्शनातं व हिंगणघाट शहर अध्यक्ष केतन तायवाडे याच्या नेतृत्वात घेण्यात आला यावेळेस उपस्तिथ शहर उपाध्यक्ष रमेश राऊत,कामेश बावणे, तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले,तालुका संघटक देवा काटकर, शहर सचिव योगेश नासरे, शहर संघटक स्वप्नील दाते, अजय खंदार, गोलू नरवडे,राम कांबळे,अनिकेत वानखेडे, अभिजित तायवाडे,राज भस्मे,लकी कासारे, मंगेश ससाणे आकाश पोटफोडे,सर्कल अध्यक्ष सागर घवघवे, सुरज तिमांडे, अक्षय थुल,अविनाश थुल, दिक्षु थुल इत्यादीची उपस्तीथी होती
Hingnghat :हिंगणघाट :- बहुजन समाज पार्टी हिंगणघाट विधानसभा द्वारा महामहीम राज्यपाल साहेब यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचे मार्फत बसपा नेता प्रलय तेलंग व नितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदना नुसार परभणी शहरा मध्ये BJP ची रैली सुरू असताना परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेसमोरील संविधान कृतीला तोडून संविधानाचा अपमान करण्यात आला.
तसेच बौध्द समाजानी काढलेल्या निषेधार्थ मोर्चाला उपस्थित आंबेडकरी समाजातील युवकांची पोलीस प्रशासन द्वारे जबरण कोंबिंग करण्यात आली. त्या दरम्यान पोलीस कोठडी मधील मारहाणी मुळे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कस्टडी मध्ये दुर्दैवी मृत्यु झाला.
हिंगणघाट बहुजन समाज पार्टी कडुन निवेदनातून केली मागणी(Hingnghat)
Hingnghat:निवेदनात दोषी विरुद्ध गुन्हा दाखल करून दमनकारी असंविधनिक सरकार बरखास्त कररुन तसेच संपूर्ण बौद्ध समाजाला संरक्षण देऊन कोंबींग ऑपरेशन त्वरित थांबवावे अन्यथा बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल. सदर निवेदनात सुदेश जवादे, मोरेश्वर जवादे, रवी भगत, राजकुमार गाठले, सुनील कांबळे संजय भगत, विजय वाघमारे, अशोक मुन, हरीश नाईक, प्रदीप हाडके, अनिल नगराळे.
buldhananews:नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत वझर आघाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सर्व वरिष्ठ समित्यांनी लोणार तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी केली.त्यामध्ये वझर आघाव येथील शाळेचे या स्पर्धेसाठी आवश्यकठ निकष पूर्ण असल्याचा अहवाल सादर.
त्या अनुषंगाने आज गट शिक्षणाधिकारी माननिय श्री जंगलसिंग राठोड सर यांनी वझर आघाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वझर आघाव ला प्रथम क्रमांकाचे तीन लाखाचे बक्षीस जाहीर केले.
शाळा सुंदर करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व शालेय शिक्षक कर्मचारी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विशेष म्हणजे ज्यांनी तन मन धनाने शाळेला मदत केली
buldhananews:त्यांचे या वेळी गटशिक्षणाधिकारी श्री जंगलसिंग राठोड सर यांनी अभिनंदन केले.यामुळे वझर आघाव येथील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला आहे
crimenews:अवैद्य रेती वाहतूक प्रकरणातील शासकीय चलनात खाडाखोड केल्याचे निर्दशनास आल्या प्रकरणी निवासी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे यांच्या तक्रारीवरुन लोणार पोलिसांत ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात साठवणूक केलेल्या रेतीची लोणार मार्गे अवैध वाहतूक केल्याचे मागील दिवसांमध्ये उघडकीस आले होते. याप्रकरणी अवैद्य रेती वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई करत दंड आकारून दंडाची रक्कम वसूल केली. एप्रिल ते ३० नोव्हेंबर याकालावधीत अवैद्यरीत्या रेती वाहतूक कारवाई प्रकरणाची तपासणी करण्यात आली.
यामध्ये, अवैद्य रेती वाहतूक प्रकरणात आकारलेल्या दंडाची रक्कम भरलेल्या शासकीय चलनात खोडाखाड झल्याचे निर्दशनास आले. निवासी नायब तहसिलदार रामप्रसाद डोळे यांनी ११ डिसेंबर रोजी लोणार पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली.
त्यावरुन, विनोद डोईफोडे, गणेश हरिभाऊ चाटे, रामेश्वर वामन राठोड, अभिषेक जनार्धन कुंबफळे (सर्व रा. मंठा) व लोणार तालुक्यातील अरुण विष्णुपंत जायभाये यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३८, ३३६ (३), ३४० (२), ३ (५) नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात स.पो.उपनि. इंगळे हे करीत आहेत.
संबंधीत प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच वर्षभरात अवैद्य रेती वाहतूक कारवाई प्रकरण दंडाच्या भरणा झालेल्या चलनाची पडताळणी करणे सुरू आहे. यामध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
भूषण पाटील, तहसिलदार, लोणार.
crimenews:या मागे कोण सदर प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र समिती नेमून सखोल चौकशी करून लेखा परीक्षण केल्यास खूप मोठे रॅकेट उघडे पडू शकते. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक करणारे यामागे कोण सूत्रधार आहे याचा सुद्धा तपास करणे तितकेच गरजेचे आहे.