प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :-आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कार्यक्षम लॉजिस्टिक्स आणि साठवणुकीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी NFSA अंतर्गत ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल दिनांक ३१ मे, २०२५ रोजी पर्यंत व वाटप दि. ३० जून, २०२५ रोजीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानूसार कार्यवाही करण्याबाबत शासनाचे संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.२. NFSA अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल व वाटप यासंदर्भात आढावा घेण्यासाठी शासनाकडून तसेच भारतीय अन्न महामंडळाकडून कार्यालयांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, यासंदर्भात शासनामार्फत दि. ०९.०५.२०२५ व दि. १४.०५.२०२५ रोजी व भारतीय अन्न महामंडळाकडून दि. २१ मे, २०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे बैठक आयोजित करुन आढावा घेण्यात आला.
Crimenews/दुकान फोडणारे अट्टल चोरटे हिंगणघाट पोलीसाचे जाळयात
तथापि, जिल्ह्यांकडून करण्यात येणारी अन्नधान्याची उचल ही अत्यंत धिम्या गतीने होत असल्याने आजमितीस केलेली उचल ही अत्यल्प आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, माहे ऑगस्ट पर्यंतचे नियतन दि. ३१ मे, २०२५ रोजी पर्यंत उचल करणे आवश्यक आहे. मात्र, अन्नधान्याची उचल विहीत कालावधीत न झाल्यास पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
rainupadate:उपरोक्त प्रयोजनाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.३. त्यामुळे आपणास सूचित करण्यात येत आहे की, NFSA अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, पात्र लाभार्थ्यांनी सदर अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानामधुन करावी,