यावल येथील अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे.चुंचाळे या महिलेचे निधन संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त(Yavalnews)

0
311

 

विकी वानखेडे तालुका प्रतिनिधी

Yavalnews:यावल दि.२८ यावल येथील आठवडे बाजाराच्या दिवशी अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे या महिलेचे निधन झाल्याने संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून ट्रक ट्रक चालक विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली नागरिकांनी केली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील चुंचाळे येथील कस्तुराबाई चैत्राम सावकारे वय ५८
यांचा काल यावल येथे शुक्रवारच्या बाजारात रस्त्यावरील अतिक्रमणामुळे झालेल्या अपघातात पायाला गंभीर दुखापत झाली असता त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू असताना काल शुक्रवार दि.- २७ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले,त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि.२८ रोजी दुपारी ५ वाजता चुंचाळे येथील राहत्या घरापासून निघेल त्या चैत्राम सावकारे यांच्या पत्नी होत तर किरण व विजय चैत्राम सावकारे यांची आई होत.

आ.मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी(mlamanojkaynde)

कस्तुराबाई काल यावल येथील आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी आल्या असता बऱ्हाणपूर- अंकलेश्वर ( यावल चोपडा रोडवर ) या महामार्गावर भरत असलेल्या बाजाराच्या आजूबाजूला व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे एका वाहनाच्या चाकाखाली त्यांचा पाय दाबला जाऊन गंभीर दुखापत झाली असता त्यांच्यावर यावल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव हॉस्पिटलमध्ये तातडीने रवाना करण्यात आले होते.

परंतु औषध उपचार सुरू असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास निधन झाले. यावल नगरपालिकेच्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि संबंधित सर्व यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे यावल येथील अतिक्रमणाचा पहिला बळी चुंचाळे येथील कस्तुराबाई सावकारे या ठरल्याने चुंचाळे ग्रामस्थ यांच्यासह यावल शहरात,तालुक्यात वाहनधारकांचे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यावल येथील बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गाच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण आता तरी संबंधित सर्व शासकीय यंत्रणेने काढायला पाहिजे आणि यात काही मोजक्या ठराविक राजकीय पुढार्‍यांनी,समाजसेवकांनी अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप न करता शासकीय अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत सहकार्य करावे अन्यथा यापुढे फार मोठी अप्रिय घटना घडू शकते याची समय सूचकता बाळगून तात्काळ अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

यावल शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे जागोजागी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो हे या अधिकाऱ्यांना आणि काही लोकप्रतिनिधींना दिसत नाही का..? आणि अतिक्रमण का काढले जात नाही.? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Yavalnews /गेल्या महिन्यात अतिक्रमण काढणे संदर्भात काही प्रमाणात सुरुवात करण्यात आली असता यावल शहरातील व बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावरील अतिक्रमण का काढले गेले नाही याबाबत सुद्धा यावल शहरात चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here